उदघाटन : भाजपा कार्यालयाचे उदघाटन थाटात संपन्न

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मा.पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजींनी देशभरात राबवलेल्या जनहिताच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी आपण सर्वांनी तत्परतेने कार्य केले पाहिजे. जनसेवेच्या कार्यात सुसूत्रता राहावी यासाठी जनसंपर्क कार्यालय गरजेचे असते, असे प्रतिपादन वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन प्रसंगी केले. 

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष किसान मोर्चा दिनकर पावडे, विधासभा प्रमुख संजय पिंपळशेंडे, जिल्हा किसान सेलचे अध्यक्ष शंकर लालसरे, जिल्हा सचिव मंगेश देशपांडे, भाजपा तालुकाध्यक्ष अविनाश लांबट, भाजपा युवा मोर्चा जिल्हामहामंत्री नितीन वासेकर, भाजपा तालुका सरचिटणीस प्रशांत नांदे,आदीची उपस्थिती होती.
वणी विधानसभा क्षेत्रातील मारेगाव येथे भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार श्री संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते आज (ता.12 फेब्रु.) ला मोठ्या थाटात करण्यात आले. 

मारेगाव तालुक्यातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी, जनतेला हव्या असणाऱ्या सोयी सुविधा उभारण्यासाठी हे कार्यालय महत्वाचे ठरणार आहे, अशी भावना उदघाटन प्रसंगी श्री बोदकुरवार यांनी व्यक्त केली. या प्रसंगी गाव चलो अभियान बदल कार्यकर्त्यांशी संपर्क साधत.“गाव चलो अभियान" बूथ पातळीवर सुरवात करण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते प्रत्येक बूथ वर विस्तारक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरू केलेल्या १० वर्षाच्या योजनांची माहिती नागरिकापर्यंत पोहोचवतील असेही ते म्हणाले. 
या प्रसंगी पवन ढवस, अनुप महाकुलकर, वैभव पवार नगरसेवक, राहुल राठोड, हेमंत नारांजे नगरसेवक, मालाताई गौरकार, शालिनीताई दारुण्डे, नंदा ताई थेरे, प्रसाद ढवस, सुभाष खडसे, गणेश खडसे, गणेश खुसपुरे, सुनील देवूलकर, रवी टोंगे, मारोती तुराणकर, दत्तू लाडसे, चंद्रकांत धोबे, विश्वजीत गारगाटे, यासह तालुक्यातील भाजपाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.