कोळशाच्या धूळ प्रदुर्षणामुळे होत असलेल्या शेतकऱ्यांना शेतमालाची नुकसान भरपाई द्या - विजय पिदूरकर

सह्याद्री चौफेर | दिगांबर चांदेकर 

वणी : तालुक्यात कोळशाच्या खाणी मोठ्या प्रमाणात असल्यामूळे साखरा-शिंदोला रस्त्यावरून कोळसा वाहतूक दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात होत असते. मात्र, वेकोली प्रशासन जल, वायू, प्रदूषण या कायद्याची अंमलबजावणी न करता बेजवाबदारपणे कोळसा वाहतूक करीत आहे. कोळसा धूळ प्रदूषणामूळे शेतकर्‍यांच्या शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे,या नुकसान भरपाईसाठी वेकोली प्रशासनाकडून मिळण्याबाबतचे निवेदन माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकार यांचे नेतृत्वात उपविभागीय अधिकारी वणी यांचे मार्फत जिल्हाधिकारी यांना दि.5 जानेवारी 2024 रोजी देण्यात आले.
वणी तालुक्यात विविध उद्योग व दळणवळण यांच्या धूळ प्रदूषणामूळेही शेतकर्‍याचे जिवन उद्धस्त होत आहे,परंतू अश्या नुकसानीला कारणीभूत ठरणार्‍या खाजगी कंपनीकडून शेतकर्‍याला नुकसान भरपाई मिळण्यासाठी शासनाचे धोरणच अस्तित्वात नसल्याने शेतकरी मदतीपासून वंचित आहे. त्यामूळे शासनाने या विषयाचे धोरण निश्चित करून शेतकरी संकटातून बाहेर काढण्यासाठी कोळसा कंपन्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी बाध्य करावे, या करीता तालूक्यातील शेतकर्‍यांनी निवेदनातून म्हटले की, साखरा,शिंदोला या रस्त्यावरून वेकोलीची कोळसा वाहतूक सूरू असल्याने रस्त्याची धूळ लगतच्या शेतात पडल्याने धूळ प्रदूषणामूळे शेतपीकांचे उत्पादनात मोठ्या प्रमाणा घट होत आहे, परंतू या नुकसानीची जबाबदारी उद्योग व कंपन्या घ्यायला तयार नाही.
वणी तालुक्यात वेकोलीच्या तेरा कोळसा खाणी आहेत. या खाणीमधील कोळसा उद्योगांना व विजनिर्मिती केंद्रांना पाठविण्यासाठी ट्रक द्वारे वणी व घुगुस रेल्वे सायर्डिंग पर्यंत पोहचविला जातो. ट्रकमधून कोळशाची वाहतूक करतांना ट्रकवर ताडपत्री न झाकल्याने कोळसा रस्त्यावर पडतो. त्याची भूकटी होवून रत्यालगतच्या शेतातील पिकावर पसरते. परिणामी पिकांची प्रकाशसंश्लेशन क्रिया मंदावल्याने पिकाची वाढ खूंटते, फळ धारणा कमी होते. त्यामुळे उत्पादनात घट येत असल्यामुळे आठ गावातील शेतकर्‍यांंनी नुकसान भरपाई मिळावी या करीता दि.31 जूर्ले 2023 रोजी येनाडी (फाटा) येथे माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर यांच्या नेतृत्वात रस्तारोको आंदोलन सुध्दा करण्यात आले होते. त्या ठिकाणी वेकोली प्रशासनाने लेखी आश्वासन दिले. उपविभागीय अधिकारी वणी यांचे सर्वेक्षणसुचना, कृषी विभाग अहवाल भाजार भाव प्रमाणे दिला,दरम्यान अनेक आंदोलन शेवटी नैसर्गिक आपत्ती प्रमाणे मानवनिर्मित नुकसानीला 13 हजार 600 प्रति हेक्टर मदत ही शेतकर्‍यांना मिळणारी मदत नूकसानी प्रमाणे फार कमी मदत असल्याने देशाचा पोशिंदा अडचणीत आला आहे.
साखरा-शिंदोला रस्त्यावरील कोलगाव, साखरा, येनक, शिवनी, येणाडी, शेवाळा, शिंदोला, कूर्ली या 8 गावातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या शेतपीकावर कोळसा धूळ प्रदूषणामूळे झाल्यामूळे त्यांच्यकडे जीवन जगण्याकरीता दूसरा पर्याय नसल्याने त्यांच्या पिकाच्या नुकसानीप्रमाणे भरपाई देण्यास वेकोली ला भाग पाडावे, तसेच साखरा, शिंदोला सिमेंट रस्त्याचे काम त्वरित करण्यात यावे अशा आशयाची मागणी निवेदनद्वारे केली आहे.