Page

....तर मागण्या मंजूर होई पर्यंत आमरण उपोषण सुरु राहणार : तालुका काँग्रेस कमिटी

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगावतालुका काँग्रेस कमिटी मारेगावच्या वतीने काल दि.23 ऑक्टोबर 2023 पासून मार्डी चौकातील पेट्रोल पंपच्या समोर महावितरण कंपनी च्या विरोधात आमरण उपोषण सुरु केले आहे. या उपोषणास उपविभागातील विविध राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांनी समर्थन देत आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

 दरम्यान, आमच्या प्रतिनिधीने उपोषण कर्त्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, मारेगाव तालुका हा आदिवासी बहुल तालुका आहे. या तालुक्यातील लोकांचे जीवन हे 100 टक्के शेतीवर आधारित असून शेती हा मुख्य व्यवसाय आहे. अशावेळी शेती साठी वीज पुरवठा हा महत्वाचे असताना फक्त आठ तास वीज पुरवठा दिल्या जाते, त्यामध्ये संपूर्ण दिवसात 20 ते 25 वेळा दर पाच मिनिटाला वीज खंडीत होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेती करायची कशी हा मोठा प्रश्न उभा ठाकला असताना महावितरण कंपनीने 24 तास शेतकऱ्यांना वीज पुरवठा करावा, लोड शेडींग पूर्णतः बंद करावी यासह इतर ही मागण्या आहे. त्या तत्काळ मंजूर करावे अशी आमची मागणी आहे. जर उपविभागीय कार्यालय, मारेगाव यांनी मागणीची दखल घेतली नाहीत तर हे आमरण उपोषण जनतेला न्याय मिळेपर्यंत मागण्या मंजूर होई पर्यंत सुरु राहणार आहे. असे तालुका अध्यक्ष मारोती गौरकार यांनी स्पष्ट केले.

तालुक्यात आणि प्रत्येक गावात शेतकरी शेतमजूर व्यावसायिक वर्गाने महावितरण कंपनीला जागे करण्यासाठी एकत्र यावे. व आमरण उपोषणास भेट द्यावी, आपल्या समस्या मांडव्या, असे सभापती गौरी शंकर खुराणा म्हणाले. 

पुढे बोलतांना यु कॉ. चे ता अध्यक्ष तथा नगरसेवक आकाश बदकी म्हणाले, एच ओ डी योजने मार्फत प्रत्येक शेतकऱ्यांना एजी कनेक्शन ला प्रत्येकी 1 डिपी देण्यात आली. परंतु त्या डिपी बोगस असून वर्ष भरा पासून 5 ते 6 वेळा डिपी बंद पडते. त्यामुळे शेतकऱ्यांना पाण्या पावसात डिपी बदलविण्याकरिता संबंधित कार्यालयाला हेलपाट्या माराव्या लागतात. त्यात आर्थिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागतो.

तालुक्यातील शेतकऱ्यांना शेत पिकांसाठी पाण्याची सध्या अत्यंत गरज आहे. त्यासाठी शेतीला पाणी देण्यासाठी विज अखंडित असणे आवश्यक आहे. परंतु नेमकी शेतकऱ्यांना विजेची गरज भासते त्याच वेळी महावितरण कार्यालयाकडून सतत वीज खंडीत केल्या जाते. त्यामुळे हा सर्व प्रकार एमएसईबि (MSEB) ने ताबडतोब थांबवून शेतकऱ्यांना 24 तास अखंडीत वीज पुरवठा द्यावा,असं अंकुश माफूर त्यांनी स्पष्ट केले.

स्थानिक महावितरण कार्यालयाने शेतकऱ्यांना लवकरात लवकर या अघोषित लोड शेडींग बंद करावी. त्याच बरोबर मारेगाव तालुक्यात 132 के. वि. चे नवीन उपकेंद्र लवकर तयार करण्यात यावे, ग्राहकांची संख्या लक्षात घेता नवीन विद्युत केंद्राची मान्यता देण्यात यावी, 33 के.वि. चे नवीन वनोजा (देवी), कुंभा, वेगाव, रोहपट येथे उपकेंद्र करण्यात यावे, मारेगाव तालुक्यात सोलर प्लांट तयार करून जास्तीत जास्त विद्युत तयार करण्यात यावे, शेतकऱ्यांचे विज बिल पूर्णतः माफ करण्यात यावे, बेमाप विज बिल व पठाणी वसुली त्वरित थांबविण्यात यावी, ग्रामीण भागातील गांवठाण वरील विद्युत तारा व पोल देखभालचे काम त्वरित सुरु करण्यात यावे, शेतकऱ्यांचे नवीन A.G. चे कनेक्शन त्वरित जोडणी करून देण्यात यावी. या प्रमुख मागण्या घेऊन आमरण उपोषण सुरु आहे. आजचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे. नवरात्री व विजयादशमी सारखा सण असून सुद्धा सणवार न पाहता जनतेच्या न्यायासाठी  महावितरण कंपनीच्या तकलाधू धोरणाच्या विरोधात मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीचे कालपासून उपोषण सुरु आहेत.

उपविभागीय कार्यालयाला 3 दिवस देऊन सन्मान केला. आता 23 तारखेनंतर महावितरण कंपनी वर परिणाम होईल, असा इशारा गौरकार यांनी दिला आहे.