Page

मच्छिन्द्रा गट ग्रामपंचायतला पडला विसर...ना फॉगिंग मशीनद्वारे फवारणी; ना स्वच्छतेचा जागर

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या गट-ग्रामपंचायत मच्छिन्द्रा मध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य असताना आजपर्यंत ग्रामपंचायतच्या वतीने कुठलीही जंतुनाशक कीटकनाशक फॉगिंग मशीनद्वारे धूर फवारणी न केल्याने सर्वत्र डासांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या वेळकाढू धोरणामुळे मानवी आरोग्य धोक्यात येवून विविध आजार डोकं वर काढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सध्या पावसाचे दिवस चालू असल्याने अनेक रोग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळ्यात नाल्या गटारांची स्वच्छता आणि पावसाळ्यात नियमित धूर फवारणी हे नागरी आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. साहजिकच ही जबाबदारी ग्रामपंचायत यांची आहे. परंतु मच्छिन्द्रा गट ग्रामपंचायतला विसर पडला की काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पावसाळा सुरू होऊन एक- दोन महिन्याचा कालावधी लोटूनही मुहूर्त सापडलेला दिसत नाही, किंबहुना ग्रामपंचायत हेतू पुरस्पर दुर्लक्ष याकडे करित असल्याचे बोलल्या जात आहे. 
पेसा ग्रामपंचायत, पावर सुशिक्षित युवकांकडे असून देखील गावात घाणीचे साम्राज्य. नियोजन शून्य असल्यामुळे विकास थंड बस्त्यात आहे. शासन योजना देतील त्या आम्ही राबवू यावर डिपेंड राहून चालणार नाहीतर सरपंच महोदयांनी तालुका स्तरावर जाणे येणं, भेटीगाठी, योजनाची माहिती काढणे, योजना राबविणे, योजना खेचून आणणे हे अपेक्षित असते. तसेच आपल्या गावात जाऊन गावपातळी वरील किरकोळ समस्या कडे लक्ष द्यायला हवे. परंतु असे होतांना दिसत नाही. मात्र, सध्या पावसाळा सुरु आहे, फॉगिंग मशीनद्वारे फवारणी कधी करणार? असा सवाल आहे. 

विशेष म्हणजे सरपंचाचे विद्यार्थी दशेच वय,त्यामुळे वेळेअभावी अनुभव कमी पडत असल्याने आता तालुका पंचायत समिती प्रशासनाने धूर फवारणीचे तत्काळ आदेश देऊन विविध प्रकारच्या जंतूनाशक फवारणी, फॉगिंग मशीनद्वारे हे रोगराई मिशन पूर्ण करावे. तसेच गावात स्वच्छता मोहीम, आरोग्य अबाधित राहावे याबाबतची जनजागृती, ठिकठिकाणी जमा असलेले सांडपाणी याची विल्हेवाट लावण्यात यावी व सामान्यांना रोगराई, गावात डासांचा प्रचंड वाढलेल्या प्रकोप पासून दिलासा देण्यात यावा अशी आग्रही मागणी आहे.