सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : तंत्रज्ञानाच्या या युगात जग प्रचंड वेगाने पुढे जात आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि संवर्धित वास्तवाच्या माध्यमातून होणारी तांत्रिक क्रांती मानवाच्या जीवनपद्धतीत बदल घडवून आणत आहे आणि या क्रांतीमध्ये मोबाईल फोन आपल्या समाजात खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी क्रिकेट, टेनिस, कबड्डी अशा अनेक खेळांमध्ये सहभाग दर्शविला. घनश्याम आवारी यांचे आई व वडील शिक्षक आहेत. यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम राबवत, विद्यार्थ्यांना मोबाईल ला पर्याय देणे आवश्यक असल्याचं ते यावेळी म्हणाले. अशा क्रीडा स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या नेतृत्वगुणाचा विकास होतो हे नियोजन करायला शिकतात. यामुळे कौशल्यांचा विकास होतो. हे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा जाऊ शकतात. अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.