Page

कर हर मैदान फतेह: आपटी घाटावर रेती तस्करांची खेळ पट्टी

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : होणाऱ्या अवैध रेती तस्करीवर स्थानिक प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला असला तरी मात्र, तालुक्यातील नदी घाट रेती तस्करांनी बहुतांश साफ केले आहे याचं काय? कोरोडोची संपत्ती चोरीला गेली त्याचा कोण हिशेब देणार आणि घेणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गेल्या महिन्यात कोसारा येथील कार्यवाही, मागील आठवड्यात करणवाडी त्यानंतर दांडगांव येथील ट्रॅक्टर पकडून त्यावर कारवाई केली गेली. आणि ह्या कारवाया होतच राहतील,परंतु तस्करी व शासनाला लावलेला चुना हा थांबतील का?...तालुक्यातील नदी घाटावरील हजारो ब्रास रेती गायब झाली, त्याचं काय? जवळपास करोडो रुपयांची रेती चोरीला गेली असल्याचा अंदाज वर्तविला जात असून अजूनही रेती तस्करी वर पाहिजेत तसे नियंत्रण संबंधित विभाग, प्रशासन आणू शकले नाहीत किंबहुना कारवाई शंकाच्या भोवऱ्यात असल्याचे बोलल्या जात आहे. 
शहरासह ग्रामीण भागात रेती चोरीला जाने हा नित्याचाच विषय असून तस्करीला मोठे उधाण आले आहे. दिवस-रात्रीचा फायदा घेत आपटी या नदी घाटातून खुलेआम रेती तस्करी करून त्या ठिकाणी "खेळ पट्टी" च्या मैदानाचे स्वरूप आल्याचे चित्र पाहावयास मिळतेय. चक्क नदी काठा च्या या पलीकडून ते मध्यभागी पाणी असलेल्या भागापर्यंत किमान रेती गायब, किंबहुना वाळू ची चोरी झालेली दिसून येते. हे सर्वश्रुत उघड असतांना देखील यावर का अंकुश लावण्यात प्रशासन कुठे "फेल" अपयशी ठरत आहे ? असा प्रश्न उपस्थित निर्माण होत आहे. या रेती तस्करीत गांव पुढारी, नेते मंडळी यात गुंतल्याचे, बोलल्या जात आहे. या गोरखधंद्यात आपापल्या परिसरातील आपला घाट वाटून घेत शासनाचा करोडोचा महसूल रेती तस्करांनी आपल्या घशात घातला आहे. शिवाय यात बहुतांश हात संबंधिताचे ओले होत असल्याने नेमका कारवाईचा बडगा कसा व कुणावर उगारायचा, हा पेच'च आहे. असेही चर्चील्या जाते.
तूर्तास तालुक्यासह आपटी घाटा वर मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी होत असून स्थानिक प्रशासन याला आळा घालू शकतील का? याकडे पाहणे गरजेचे झाले असून,रेती घाटाचे लिलाव झाले नसल्याने गरजूना वाळू मिळतेय खरं, परंतु बेभावात रेती घ्यावी लागत असून यात शासनाला मात्र रेती चोरट्यांनी चुना लावला हे खरे.

परिणामी मारेगाव तालुक्यातील रेती तस्करी, हा गहन विषय झाला असून अवैध रेती तस्करांवर अंकुश ठेवायचे असेल तर योग्य नियोजन, रोखठोक कार्यवाही त्या शिवाय पर्याय नाही...!
असं स्थानिकाकडून बोलल्या जातेय हे विशेष...