वीज महावितरण कंपनी च्या गलथान कारभाराने तरुण शेतकरी अर्धवट जळाला


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

मारेगाव : तालुक्यातील मजरा (हिवरा) येथील ४५ वर्षीय तरुण शेतकऱ्यांला विजेचा धक्का लागल्याने शरीराच्या विविध भाग अर्धवट जळाला आहे. ही घटना आज शनिवार रोजी ५ वाजताच्या सुमारास घडली.

मजरा (हिवरा) येथील रहिवासी सुभाष रामचंद्र पिंगे असे विजेचा शॉक लागून जळालेल्या इसमाचे नाव आहे. सुभाष आपल्या शेतात गेला असता त्याला विजेचा धक्का लागला यात त्याच्या शरीराच्या विविध भाग जळला असल्याची माहिती आहे. घडलेल्या घटनेबाबत त्यांच्या निकटवर्तीयांनी वीज महावितरण कंपनी चा दोष असल्याचा आरोप केला आहे. सदर लाईट दररोज रात्रीला पुरवठा करीत होती, काल पिंगे यांच्या शेतातील डीपी चा फ्युज गेला होता, याबाबत त्यांनी त्या परिसरातील लाईनमन यांना फ्युज टाकून देण्यात यावे असे सांगितले. परंतु लाईनमन वेळेवर आले नाही, दोन दिवस शेतमालाला पाणी मिळाले नसल्याने शेवटी सुभाष पिंगे यांना स्वतः डीपी वर चा फ्युज टाका लागला. अशातच दिवसाला बंद राहणारा वीज पुरवठा सुरु झाला. त्यामुळे सुभाष यांना शॉक लागला आणि जळल्या अवस्थेत जमिनीवर फेकले गेले. यात ते मोठया प्रमाणात जळले गेले असल्याचे माहिती आहे. त्यांना तात्काळ वणी येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी भरती करण्यात आल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे.

परिणामी या गंभीर प्रकाराची दखल घेऊन दोषीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी किशोर पिंगे यांनी माध्यमातून केली आहे.
Previous Post Next Post