सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
संपूर्ण महाराष्ट्रात महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सुधारीत आश्वासीत योजना लागु करावी. पाच दिवसाचा आठवडा लागु करावा. महाविद्यालयातील रिक्त पदाची तात्काळ भरती करण्यास मंजुरी द्यावी. ७ डिसेंबर २०१८ चा व १६ फेब्रुवारी २०१९ चा शासन निर्णय रद्द करावा. १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागु करावी इ.मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले असुन यात जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले. या मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी वणी व विद्यमान आमदार यांना सोपविण्यात आले असून वणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालय येथील शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष राजु आगलावे, उपाध्यक्ष अरविंद ब्राम्हणे, सचिव आनंद नगराळे, प्रभाकर धानफुले, राहूल करमरकर, मुकेश वाढई, मनिष पेटकर, जयंत त्रिवेदी, अशोक बागळदे, दिनकर उरकुंडे आदी निवेदन प्रसंगी उपस्थित होते.
जर महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर २० डिसेंबर २०२१ पासुन बेमुदत आंदोलनाचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.