Page

स्वराज्य शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा व पदाधिकाऱ्यांच्या काँग्रेस मध्ये प्रवेश

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

मारेगाव : स्वराज युवा शेतकरी संघटनेचे शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये काल खा.बाळू धानोरकर व माजी आमदार वामनराव कासावार यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. या जाहीर पक्ष प्रवेशाने शहरातील राजकीय चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

मारेगाव नगरपंचायतची सार्वत्रिक निवडणूक येत्या २१ डिसेंबर रोजी होत आहे. या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांचा धुराळा रंगणार आहे. निवडणुकीचे बिगुल वाजला असतांना माजी शिवसेना तालुका प्रमुख तथा स्वराज्य युवा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गजानन किन्हेकर, माजी पंचायत समिती सदस्या सुनीता मेश्राम, माजी नगराध्यक्ष इंदूताई किन्हेकर, विजय मेश्राम, विशाल किन्हेकर, माजी नगरसेवक उमा देवगडे यांच्यासह शहर आणि तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश केला.
पक्ष प्रवेशाने काँग्रेस ला शहरात अधिकच बळ मिळाल्याने आगामी काळात राजकीय समिकरण बदलण्याची संभाव्य शक्यता बळावली आहे. परिणामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय वर्चस्व निर्माण करणाऱ्या गजानन किन्हेकर यांच्या पक्ष प्रवेशाने काँग्रेसची स्थिती आणखीच स्ट्रॉंग झाली आहे. 

कार्यकर्ता मेळावा व पक्ष प्रवेश कार्यक्रमास मंचावर खा.बाळू धानोरकर, माजी आमदार वामनराव कासावार, बाजार समिती सभापती नरेंद्र पाटील ठाकरे, जिप सदस्या अरुणा खंडाळकर, आशिष खुलसंगे, आकाश बडकी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष मारोती गौरकार,सूत्रसंचालन चौधरी सर तर, शंकर मडावी यांनी आभार मानले.