सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (२५ ऑक्टो.) : चंद्रपूर जिल्ह्याच्या नागभिड तालुका अंतर्गत येणा-या पळसगांव (खुर्द) येथील मुळ रहिवाशी असणारे मिलिंद मेश्राम यांनी आपल्या कुटुंबाला क्षुल्लक कारणास्तव समाजाने बहिष्कृत केल्याची तक्रार वरिष्ठांकडे लेखी स्वरुपात केली हाेती.
दरम्यान, ही बातमी सर्वप्रथम "सह्याद्री न्यूज" नेटवर्कने प्रकाशित करुन प्रशासनाचे लक्ष वेधले हाेते, या प्रकरणाची पाेलिस विभागाने दखल घेतली असल्याचे नुकतेच वृत्त प्राप्त झाले आहे.