सह्याद्री न्यूज नेटवर्क |
वरोरा, (३० सप्टें.) : वरोरा तालुक्यातील टाकळी या गावातील एका महिलेच्या आब्रुवर हात टाकणाऱ्या आरोपीवर थातुर मातुर गुन्हे नोंदवुन त्याला वाचविण्याचा पोलिस जमादारा कडून पुरेपुर प्रयत्न केला जात असल्याचा आरोप तेथील ग्रामपंचायत कमेटी, तंटामुक्ती समिती गट ग्रामपंचायत खापरी व ग्रामस्थांनी वरोरा उपविभागीय पोलिस अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन केला आहे. महिलेचा पती घरी नसतांना तिच्या घरात घुसुन आरोपीने तिला व तिच्या मुलाला जबर मारहाण केली. एवढेच नही तर तिच्यावर आरोपीने जबरदस्ती करण्याचाही प्रयत्न केला. पत्नी व मुलाच्या किंचाळया ऐकुन पती घराकडे धावत सुटला. त्याने पत्नी व मुलाला आरोपीच्या तावडीतून वाचण्याचा प्रयत्न केला. पण महिलेला जबर मार लागल्याने तिला आधी वरोरा उपजिल्हा रुग्णालयात व नंतर चंद्रपुरला रेफर करावे लागले. ही घटना 21 सप्टेंबर ला सायंकाळी 7 वाजता च्या सुमारास घडली. हे गंभीर व माणूसकीला तडा पोहचविनारे प्रकरण घडूनही पोलिसांनी आरोपी विरुध्द गंभीर गुन्हे दाखल न करता आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न केला आहे. बिट जमादार हा आरोपीच्या नाते संबंधातला असून आर्थिक हितसंबंध जोपासत आरोपीला पाठीशी घालण्याचा या जमादारा कडुन प्रयत्न केला जात आहे. आरोपीवर गंभीर गुन्हे दाखल करण्याऐवजी महिलेच्या पतीवरच कलमा लावण्याचा महाप्रताप या जमादाराने केला असल्याने गाव वासियांमध्ये आच्छर्य व तेवढाच संतापही व्यक्त केल्या जात आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील आरोपीवर कडक कार्यवाही करण्याची मागणी केली असतांना देखील पोलिस या प्रकरणाला गांभीर्याने घेण्यास तयार नाही. ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. गावकरी मदतीला धावून आल्याने आरोपीच्या खुनी हल्ल्यातून हे कुटुंब थोडक्यात बचावलं. नाही तर हे कुटुंबही आरोपीच्या अंधश्रद्धेचं बळी ठरलं असतं आरोपी हा अंधश्रध्दा जोपासणारा आहे. अंधश्रद्धेच्या अगदीच आहरी गेला आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा आहे. गावात जादूटोणा, भानामती केल्या जात असल्याच्या अफवा पसरविल्या जात आहे. भोंदू बाबांना गावात आणुन या भोंदी बाबांकडुन अघोरी पुजा करुन गावकर्यांमध्ये भिती निर्माण करण्याचे प्रकार सुरु आहे. आरोपी हे देखील अंधश्रद्धेच्या आहारी गेले असल्याने भोंदूबाबाने आरोपीच्या डोक्यात मनिषा खारकर यांच्या विषयी संशयाचे बीज पेरणे सुरु केले. मनिषा खारकर यांच्या मुळेच तुमच्या घराचे नुकसान होत असल्याचे भोंदूबाबाने आरोपीच्या मनात रुजविल्याने मनिषाचा सूड घेण्याच्या उद्देशाने आरोपीने मनिषा खारकर यांच्यावर हल्ला चढवून त्यांच्या इज्जतीवर हात टाकण्याचा प्रयत्न केला. पत्नी व मुलाचा किंचाळण्याचा आवज आल्याने दिपक खारकर याने घराकडे धाव घेतली. त्याने आरोपीच्या तावडीतून पत्नीची सुटका करण्याचा प्रयत्न केला. पण पत्नीला जबर मार लागल्याने आधी तिला उपजिल्हा रुग्णालयात व नंतर चंद्रपुर येथे रेफर केले. या गंभीर प्रकरणाची महिलेने पोलिस स्टेशनला तक्रार केली. पण जमदार रिश्तेदार निघाल्याने आरोपोची चांगलीच पाठराखण झाली. घटनेचं स्वरुपच या जमदारने बदलवुन टाकलं. पंचनामा करतांनाही अनेक कारणामे केले. प्रत्यक्षदर्शींची साक्ष न नोंदविता आरोपींच्या निकटवर्तीयांची साक्ष नोंदविल्या गेली. उलट महिलेच्या पतीवरच कलमा लावल्या गेल्या. जमादाराकडुन आरोपीला वाचविण्याचा पुरेपुर प्रयत्न केल्या गेला. आरोपीवर अब्रुवर हात टाकणे व हल्ला चढवुन जबर मारहाण करणे, हा गुन्हा न नोंदविता अगदीच किरकोळ कलमा लावण्यात आल्या. मनिषाचे बयाण न नोंदविता केवळ दिपक खारकर याचेच बयाण नोंदवुन त्याला जमानत मिळेल अशा कलमा लावण्यात आल्या. आता तो जमानतीवर सुटून तोर्यात वावरत आहे. साक्षीदारांना तंबी देत आहे. त्याच्यावर याआधीही गंभीर गुन्हे दाखल आहेत. जादूटोणा, भानामती यासारख्या अंधश्रध्दा पसरवुन भोंदूबाबा कडुन पुजा अर्चा करवुन घेणाऱ्या आरोपीवर अंधश्रध्दा निर्मुलन कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्याचीही मागणी निवेदनातुन करण्यात आली आहे. आरोपीने अन्य साथीदारांना घेऊन महिलेच्या घरात घुसुन तिच्यावर हल्ला चढवला. तिची ईज्जत घेण्याचा प्रयत्न केला. ही घटना अतिशय निंदनीय असतांना देखील रिश्तेदरी निभावण्याकरीता हा जमादार कर्तव्याशी गद्दारी करुन आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करित आहे. (पीडित महिला व मनसे पदाधिकारी यांची पत्रकार परिषदेमधून कारवाईची मागणी करताना)
या महिलेला न्याय न मिळाल्यास पोलिस यंत्रणेवर असलेल्या नागरिकांच्या विश्वासाला तडा गेल्याशिवाय राहणार नाही. तेंव्हा आरोपीवर उचित गुन्हे दाखल करुन त्याच्यावर कडक कार्यवाही करण्याची मागणी ग्रामपंचायत कमेटी, तंटामुक्ती समिती गट ग्रामपंचायत खापरी व टाकळी गाव वासियांनी तसेच पिडीत महिलेले वरोरा उपविभागीय पोलिस अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे. हिच मागणी मनसेच्या पदाधीकार्यांनी सुद्धा केली आहे. पोलिसांनी आरोपीवर कडक कार्यवाही न केल्यास पोलिस स्टेशन समोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा टाकळी वासियांनी दिला आहे.