राळेगाव : यवतमाळ येथे मुख्यमंत्री येणार असल्याने त्यांच्या कार्यक्रमाला महिलांना नेण्यासाठी परीवहन मंडाळाची एस.टी.बस जागजई गावात येऊ शकते,तर मग शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत येजा करीता बस का येत नाही? असा सवाल जागजई येथील विद्यार्थ्यांनी आज गावात आलेल्या एस.टी बस समोर उभे राहुन सरकारवर संताप व्यक्त केला.
आज शनिवारी २४/८/२४ रोजी यवतमाळ येथे राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येणार होते,त्यांच्या कार्यक्रमाला महिलांना नेण्यासाठी परीवहन मंडाळाची एस.टी.बस जागजई गावात येऊ शकते,तर मग शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत येण्याजाण्यासाठी बस का येत नाही? असा संताप तालुक्यातील जागजई येथील विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.
तसेच जागजई, चंदेरी, अंतरंगाव, शेळी, वनोजा, धानोरा रोहनी, परीसरात मागील काही दिवसांपासून वाघाच्या वावर असल्याने परीसरात वाघाची दहशत निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना अंतरंगाव येथे सात किलोमीटर पायपीट करीत जाणे येणे करावे लागते. त्यामुळे सरकारने जशी लाडक्या बहीणीची काळजी घेतली, तशीच शाळेत जाणाऱ्या लाडक्या भाच्याची काळजी का घेत नाही. त्यांचा जिव प्रिय नाही का?,आम्हाला बस सेवा कधी उपलब्ध करून द्या, अशी मागणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना येथील चिमुकल्या शालेय विद्यार्थी तसेच पालकांकडून केली जात आहे.