सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
चांदुरबाजार नागरवाडी कडे जाणारी गाडी अचानक अमरावतीकडे वळते . कारण गाडीत बसल्या व्यक्तीची प्रकृती बिघडते , गाडी अमरावती जवळ वलगाव पुलावर आली गाडीतील व्यक्तीने डोळे मिटले . वेगाने गाडी अमरावतीला पोहचली डॉक्टरानी सांगितले गाडगेबाबा मरण पावले . आजचा तो दिवस प्रबोधनाची धुरा हातामध्ये घेऊन संपूर्ण महाराष्ट्र वादळाप्रमाणे पालथी घालणारे गाडगेबाबा नावाचं वादळ शमल, गेली कित्येक दशक गाडगेबाबा हे नाव संपूर्ण महाराष्ट्रभर समाज परिवर्तन करत होता. आज त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त संत गाडगेबाबांची आठवण करत असताना ते समाज परिवर्तनाचा कोणता वारसा देऊन गेलेत? काय होती त्यांची शिकवण ? कोण होते गाडगेबाबा ?
संतांची जन्मभूमी म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यात शेणगाव या गावी डेबू चा जन्म झाला. वडील दारूच्या नशेमुळे वारले . डेबु मामाकडे राहून कष्ट करून दिवस काढू लागतो . डेबू चे लग्न होते व पुढे एक दिवस तो अचानक घर सोडून निघून जातो . वाट मिळेल तिकडे जाणे, कुठेही राहणे ,मागून खाणे, लोकांना मदत करत जाणे, या काळात डेबू लोक समाज जीवनाचा बारीक निरीक्षण करत होते .बारा वर्ष समाज व्यवस्था पाहत, अन्याय , अत्याचार पाहत डेबूजी भटकतो आणि पुढे गाडगेबाबा या नावाने नावा रुपास येतो. निरक्षर गाडगेबाबांचे नाव साक्षरतेचे घर असलेल्या अमरावती विद्यापीठाला दिला जाते आणि मात्र दुसरीकडे जनसामान्यांमध्ये गाडगेबाबाच काम स्वच्छतेच्या पलीकडे जाताना दिसत नाही गाडगेबाबांच्या हातात असणारा हा खराटा फक्त परिसरातले घाण स्वच्छ करत नव्हता .तर परंपरेने लोकांच्या डोक्यात पडलेली वैचारिक स्वच्छता सुद्धा करीत होता . बाबाच कार्य स्वच्छतेच्या चौकटी पलीकडे शैक्षणिक जनजागृती, अंधश्रद्धा निर्मूलन , अस्पृश्यता निवारण, भूतदया, व्यसनमुक्ती, समानता या विविध अंगाने आहे . तुकाराम महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा समाज परिवर्तनाचा रथ ग्रामीण भागात पुढे नेण्याचं काम संत गाडगेबाबानी केल. या सर्वांमध्ये एक सामान्य गोष्ट आपल्याला आढळते या समाज परिवर्तनाच्या मध्यभागी जनसामान्यावर होणाऱ्या अन्याय विरुद्ध लढणे व जनसामान्यत लढण्याची शक्ती निर्माण करण्यासाठी 'शिक्षण' या महत्वाच्या बाबी दिसते . महापुरुषांचे दृष्टीने शिक्षण हे आताच्या कागदापुरता मर्यादित नव्हत, तर वैज्ञानिक दृष्टिकोन, बुद्धीप्रामाण्यवाद, नैतिकता ,समजदारी, समजाभिमुक या वर आधारित होते. त्याच प्रकारचा कार्य गाडगेबाबांनी ग्रामीण भागात केल . अन्याय व शोषणाविरुद्ध आवाज उठवत.लोक भाषेत शिक्षणा संदर्भात जनजागृती केली . गावात गेल्यावर प्रत्येक ठिकाणी बाबा सांगत "या गावात चार वर्ग शिकाची सोय करा, जेवणाच ताट मोडापण पोराले शिकू द्या" संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांनी ज्ञानाची गंगा घराघरात पोहोचवली; असे कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना गाडगेबाबांनी होईल तेवढी भारी मदत केली.
कीतनातून गाडगेबाबा सांगत,
बाबा - देव पाहिला कधी देव ?
लोकं - हा काय ,आमचा देव विटेवर उभा आहे. विठ्ठल मंदिर कडे बोट दाखवीत लोक सांगत.
बाबा - तुमच्या देवाले अंग धुता येते का ?
लोक - नाही जी ,
बाबा - देवाले विवंद दवता , आंन कुत्रा आलं ता का करता ?
लोक - आमी कुत्रा हणतो जी ,
बाबा - देवाला दिवा लावता का ?
लोक - हो जी ,आमीस लावतो.
बाबा - "एवढा मोठा तुमचा देव, जो स्वतःची अंघोळ करू शकत नाही , थो तुमचं भाग्यची अंघोळ कशी करणार? देव नैवेद्याची रक्षा करू शकत नाही तो तुमचं रक्षण कसं करणार ? जो तुमचा देव स्वतःच्या घरात प्रकाश पडू शकत नाही तो तुमच्या जीवनात कसा प्रकाश पडणार? "
गाडगेबाबा सोबत एक व्यक्ती असायचे दाढी वाढलेली, टक्कल पडलेलं, मळके कपडे, पायात चप्पल नाही . त्याच्या कडे हात दाखवत गाडगेबाबा म्हणत, हे कर्मवीर भाऊराव पाटील हे गोरगरिबाच्या पोराला शिक्षण देण्याचं काम करतात ,याला देव म्हणा !देव दगडात नसून माणसात आहे. हे साध्य तत्व गाडगेबाबा नि दिल माणसात आहे . त्याची मदत करा . मोठमोठे तत्त्वज्ञान न सांगता अत्यंत सोप्या भाषेत ग्रामीण भागात लोकांना समजेल या पद्धतीने मुद्दा समजून सांगायचे.
या सर्व अन्याय ,अत्याचाराच्या मुळाशी शिक्षण आहे हे बाबा कीर्तनातून सांगायचे , "हे लोक गरीब कायले राहिले, तर त्यायले विद्या नाही. ज्यायले विद्या नाही ,त्याले खटाऱ्यचं बैल म्हटलं तरी चालेल. विद्या मोठा धन आहे. त्यानं माणूस दिल्लीच्या तक्त्यावर भाषण करत. त्यांनाच माणूस पोरबंदरच्या ठेशनावर वर पोते उचलत, या टायमाला विद्या मुलाले पाहिजे.विद्या एवढी मोठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पिढ्यानपिढ्या झाडू मारायचं काम केलं. पण त्याच्या वडिलांनी बुद्धी सुचली आंबेडकराले साहेबावाल्या शाळेत टाकलं. आंबेडकर साहेबांना काही लहान कमाई केली नाही, हिंदुस्थानाची घटना लिहिली शाळेत नसते गेले तर झाडू मारणे नशीबात होत "
एकही अक्षर न शिकलेल्या गाडगेबाबांनी शिक्षणाचा प्रचार करावा हे नवलच गाडगेबाबांना हे माहीत होतं. समाज परिवर्तनाचा सगळ्यात मोठा माध्यम शिक्षण आहे. शिक्षणाच्या दरवाजातूनच समाज परिवर्तनाचा मार्ग जाईल आणि अत्याचार संपुष्टा येईल . आज मात्र गाडगे बाबा गेल्यानंतर त्यांची शिकवण मातीमोल झाली .त्यांना स्वच्छतेपुरत मर्यादित केल्या गेल . एवढा प्रचार झाला की स्वच्छता आणि गाडगे बाबा जणू काही समीकरणच तयार केला , स्वच्छता करणं चांगली गोष्ट आहे . हा एक कार्यचा भाग असू शकतो .पण हे पूर्णत्व किंवा अंतिम नाही . गाडगेबाबांना जातीपुरता मर्यादित केलं आपण सहज म्हणून जातो गाडगे बाबा कोणाचे? तर वठ्यांचे! गाडगेबाबानी जातीपुरता कार्य कधीच केलं नाही. त्यांना ही गोष्ट कधीच मान्य झाली नाही. गाडगेबाबा कडून प्रेरणा घेऊन कित्येक लोकांनी कार्य केलं ते काही वठठी समाजाचे नव्हते. आज संत गाडगेबाबा कडून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रात विविध विषयांवर कित्येक चळवळी उभ्या राहिल्या. आपणही काही बोध घेणार आहोत का ?आपण गाडगेबाबा प्रमाणे संपूर्ण जीवन नाही ,पण थोडा वेळ तरी समाजासाठी देऊ शकलो. गाडगेबाबा कडून प्रेरणा घेऊन काही थोडेफार कार्य करू शकलो तरी 'मी कोणाचा गुरू नाही व माझा कुणी शिष्य नाही' असं म्हणणाऱ्या महापुरुषाची शिकवण आपण जिवंत ठेवली असं म्हणायला हरकत नाही.
- संदिप गोहोकार
मो.नं. 7350006276