Page

29 वर्षानंतर एकत्र आलेल्या वर्ग मित्रांना सहवासातून मिळाला नवचैत्यनाचा अविस्कार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मित्रांचे आपल्या जीवनात काय महत्त्व आहे आणि बालपणीचे मित्र एकत्रित आल्यानंतर कोणती नवउर्जा देऊन जातात व नवचैतन्याचा अविष्कार कसा होतो, याचा प्रत्यय 29 वर्षांनंतर मारेगाव येथील बदकी भवन सभागृहात काल रविवारी एकत्रित आलेल्या मित्रांना झाला, या स्नेहमिलनातून मित्र वर्गांना मिळाला एक सुखद अनुभव जो सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला.

आजच्या धकाधकीच्या जीवनात एक समाधानकारक
सहवास देण्याची संधी उपलब्ध करून देतात ते मित्र म्हणूनच म्हणावं लागतं 'दोस्ती खून के रिश्ते से भी काफी गहरी होती है' कारण दोन दशकांपूर्वी एकत्रित शिक्षण घेणारे किशोर वयीन मित्र व्यवहाराच्या व कौटुंबिक जगात आज रोजी पुर्णतः गुंतले आणि एवढया प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकदा 29 वर्षांपूर्वीचे मित्र भेटलेत तेव्हा सर्वांना प्रत्यय आला की, मित्र हा रखरखत्या वणव्यामध्ये गार गारव्याचा सुखद अनुभव देणारा असतो. उपरोक्त ठिकाणी मित्रांनी एकत्र येऊन उपस्थित मान्यवरांचा सहृदय सत्कार केला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.महेश बदकी, मा. बंडुजी देरकर (चंद्रपूर), मा. अमोल कुमरे, मा.सुरेंद्र भालेराव (झरी जामणी), मा, चेतन बोढाले, मा. मारोती पाचभाई, मा. युगल नागरकर, यशराज भंडारी, समारंभाला उपस्थित होते.

उपस्थित सर्व मित्र वर्गांच्या परिचय सत्राचा आवर्जून उल्लेख करतांना आज जे आपण आहात किंवा जे आपण कमावलं आहे ते आमच्या करिता गौरवास्पद आहे. आयोजकांनी सत्कार अधोरेखित करून मैत्री भाव वाढविण्याचे आवाहन केले तर संचालन करतांना प्रशांतकुमार भंडारी, व कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोविंदा आसुटकर (गुरुजी) यांनी मित्र हे जीवनाची संजीवनी आहे, आपण त्यांना जपले पाहिजे, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्यात तसेच सहभागी मित्रांनी हा आदर्शवत व अविस्मरणीय असा स्नेहमिलनाचा कार्यक्रम घडवून आणल्याबद्दल आभार व्यक्त केले.

याप्रसंगी भंडारी याने मित्रत्व कायम असावे या यासाठी व्हाट्सअप ग्रुप तयार करून सर्वांची एकत्र मोट बांधली. या वेळी प्रांजली बदकी, दमयंती देरकर, अनामिका बेगानी, गजानन दुमोरे यांनी उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांना नवीन वर्षाच्या आनंददायी शुभेच्छा दिल्या. 

याप्रसंगी जगन सुरशे, प्रविण बलकी, रुदा सातपुते,  आकाश भोसले, प्रांजली बदकी, शाबान शेख, शाम ठावरी, नंदकिशोर चव्हाण, प्रवीण मिलमिले, मीना चरडे, अनामिका दुग्गड, गजानन दुमोरे, विलास वाटेकर, कमलाकर परचाके, कंचना चहानकर, नरेश निखाडे, गोविंदा आसुटकर, प्रशांतकुमार भंडारी, संगीता ठेंगणे, वंदना टोंगे, नलिनी बदखल, सुनील कुचनकर, तुकाराम माथनकर, दमयंती चिकटे, संगीता खंडाळकर अरविंद आसेकर, चिंतामण भोसले, मंगेश खारकर, यांनी हजेरी लावली. समारोपीय कार्यक्रमात मनोगत, कथाकथानक इत्यादी मधून 29 वर्षांपूर्वीच्या आठवणीना उजाळा देण्यात आला.

याप्रसंगी नागपूर, खामगाव, चंद्रपूर, वर्धा, पांढरकवडा, समुद्रपूर, वरोरा, झरी जामणी, मारेगाव, पुरड (पुनवट), एकार्जुना, वणी, डोलडोंगर गाव, लाखापूर, वांजरी, वनोजा, नांदेपेरा आदी गाव शहरांमधून अनेक वर्ग मित्र-मैत्रिणी सहभागी झाले होते.