सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
वणी, (२६ ऑगस्ट) : आज वणीत रास्ता रोको व जेलभरो आंदोलन करण्यात आले. सरकार विदर्भावर सातत्याने अन्याय करत आहे. केंद्र सरकार स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीचा निर्णय घेत नसल्यामुळे विदर्भातील जनतेमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे. स्वतंत्र विदर्भाच वादळ आता केंद्रा सरकार वर हुंकारलं आहे. सरकार विदर्भातील जनतेला वाऱ्यावर सोडलं म्हणून, विदर्भात शेतकरी आत्महत्या, कुपोषण, नक्षलवाद, वीज महाग, विदर्भातील युवकांच्या नौकऱ्या पळवणे असा समस्या वाढत सतत आहे. हा अन्याय थांबावण्यासाठी आज विदर्भामध्ये संपूर्ण ११ ही जिल्ह्यात आणि १२० तालुक्यात "रास्तारोको व जेलभरो" आंदोलन करण्यात आले आहे. त्याचाच भाग म्हणून वणी शहरातील साई मंदिर समोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांपासून स्वतंत्र विदर्भ राज्याची त्वरित निर्मिती करा यासाठी विदर्भवादी लढत आहे, परंतु केंद्र सरकार याकडे दुर्लक्ष करून विदर्भावर अन्याय करीत आहे. हा आता सहन केला जाणार नाही, वेगळा विदर्भ झालाच पाहिजे अशा घोषणा देत, येथील साई मंदिर चौकामध्ये चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी यवतमाळ मार्गावर काही वेळापुरता चक्काजाम झाला होता. परंतु पोलीसांच्या चोक बंदोबस्ता मुळे हा रास्ता रोको फार काळ ठेवता आला नाही.
यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पुरुषोत्तम पाटील, रफिक रंगरेज, देवराव धांडे, राहुल खारकर, राजू पिंपळकर, अमित उपाध्ये, सृजन गौरकर, संजय चिंचोळकर, प्रमोद खुरसाने, राजकीरण कहाते, अजय पोहणे, दशरथ पाटील, बालाजी काकडे, बाळकृष्ण राजूरकर, विनोद मुसळे, अलका मोहाडे, शालिनी रासेकर, राहुल झट्टे, कमलेश भगत, सुरेखा वडीचार, नीलिमा काळे, मंदा तांमगडगे, गीता दोरखंडे, चंद्रकला धूमने, मंजू मंदळे, कलावती क्षीरसागर यांचेसह महिला, पुरुष, युवक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.