देगलूर -बिलोली तालुक्यातील अतिवृष्टीने झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत घोषित करावी- बी. एम. कांबळे
सह्याद्री न्यूज | गौतम गावंडे
नांदेड, (२६ जुलै) : जिल्ह्यातील बिलोली व देगलूर तालुक्यामधील संततधार पावसामुळे झालेल्या अतोनात पीक नुकसानीचे सर्वेक्षण करून तात्काळ आर्थीक मदत घोषीत करण्यात यावी अशी मागणी मा. अपर जिल्हाधिकारी बी.एम.कांबळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून संततधार पाऊस सुरु असल्याने सरासरी पेक्षा अधिक पावसाची नोंद झालेली आहे. त्यात जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील शहापुर, अलूर, नंदूर, शेळगाव, शेवाळा, तमलूर, लोणी, मानूर, बल्लूर, माळेगाव, कावळगाव, गवंडगाव ही गावे तर बिलोली तालुक्यातील बोळेगाव, लोहगाव, सगरोळी, येसगी, केसराळी, खतगाव, आदमपूर, अटकळी इत्यादी गावाना भेट देऊन पाहणी केलेली आहे. त्यात संततधार पावसामुळे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच अत्यंत लहान असलेल्या पिकांना धोका निर्माण झाले असून नद्या, नाले दुथडी वाहून शेती व निवासी घरामध्ये पाणी घुसल्याने अनेक घरे व शेती पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. याबरोबरच परिसरातील बऱ्याच गाव मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बांधण्यात आलेले पूल व रस्ते तुटून, वाहून गेलेले आहेत. त्यामुळे रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे येथील नागरिक, शेतकरी यांना याचा मोठा फटका बसलेला आहे. या सर्व प्रकाराचे सर्वेक्षण करून तात्काळ आर्थिक मदत घोषित करण्यात यावी या मागणीचे निवेदन कमलादेवी सेवा फाऊंडेशनचे उपाध्यक्ष तथा मा. अपर जिल्हाधिकारी बी. एम.कांबळे यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. याच्या प्रति राज्याचे बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्हा पालक मंत्री अशोकराव चव्हाण व कृषी मंत्री दादाजी भुसे यांना सादर केल्या आहेत.
देगलूर -बिलोली तालुक्यातील अतिवृष्टीने झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत घोषित करावी- बी. एम. कांबळे
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 26, 2021
Rating:
