Page

सांगा साहेब! नाभिक समाजाने जगायचे कसे?


                      (संग्रहित फोटो)

सह्याद्री न्यूज | योगेश तेजे 
कायर,वणी (ता.३) : कोरोना महामारी संकटाने गेल्या काही महिन्यांपासून नाभिक समाजाचे सलून व्यवसाय पुर्णतः बंद आहे.
१ जुन पासून अत्यावश्यक सेवेमध्ये मोडणाऱ्या दुकानाबरोबर इतरही दुकानांना उघडण्याची वेळ सकाळी ११ वाजल्यापासून ते दुपारी २ वाजेपर्यंत दिली आहे. परंतु सलून व्यवसायाला परवानगी दिली नसुन परिणामी  सलून व्यवसायिकांचे पार कंबरडे मोडले आहे. त्यातच काही व्यक्तीनी आत्महत्या सुद्धा केल्या आहेत. असेच समोरही येणाऱ्या काळात सलून व्यवसाय बंद राहिल्यास नाभिक समाजातील आत्महत्या वाढण्याची भिती आहे. त्यामुळे आपले जीवन कसे जगायचे हा कठीण प्रश्न नाभिक समाजापुढे उभा ठाकला आहे. या सर्व कारणांनी सलून व्यवसायाला परवानगी मिळायला पाहिजे यासाठी नाभिक समाजाने शासनदरबारी अनेक निवेदने आणि मागण्या सादर केल्या होत्या, पण शासनाने नाभिक समाजाच्या मागण्यांना केराची टोपली दाखवली आहे. नाभिक समाज गावातील बाराबलुतेदारात मोडणारा व शांतता राखणारा एक गरीब समाज आहे. पण त्याच नाभिक समाजाची कोरोना महामारीमुळे आज अत्यंत बिकट अवस्था झालेली आहे. या समाजाचे जगणे 'हातावर आणुन पानावर खाणे' असे आहे. त्याचसोबत गावात समाजाचे एकच घर पहायला मिळतात तर नाभिक समाजातील लोकांकडे शेती व्यवसाय कमी प्रमाणात आढळून येतात. शिवाय नाभिक समाजाचा मुख्य व पारंपरिक व्यवसाय सलून च व्यवसाय असल्याने त्यांचा उदरनिर्वाह सलून व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे नाभिक समाजाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांचेवर उपासमारी ची वेळ आली आहे. शासनाने हीच बाब लक्षात घेऊन सलून व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी देण्याची आवश्यकता यावी अशी मागणी होत आहे.