Page

केंद्राच्या परवानगीशिवायच राज्यात लवकरच घरोघरी जाऊन लसीकरण, ठाकरे सरकार चा निर्णय

                        (संग्रहीत फोटो)

मुंबई, (ता.३०) : घरोघरी जाऊन लसीकरण करण्याबाबत केंद्र सरकारवर अवलंबून राहणार नाही. राज्यात लवकरच घरोघरी जाऊन आता लसीकरण करण्यात येईल. प्रायोगिक तत्वावर घरोघरी लसीकरणाची सुरूवात पुण्यापासून करण्यत येईल, असे महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात सांगितले.

ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना घरोघरी जाऊन लस देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्या. जी. एस. कुलकर्णी यांच्यासमोर खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी राज्य सरकारच्या वतीने हा निर्णय कळवण्यात आला.

घरोघरी जाऊन लसीकरण करण्यासाठी केंद्राच्या परवानगीची वाट बघणार नाही. केंद्राच्या परवानगीशिवायच राज्यात घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात येईल. प्रयोगिक तत्वावर या लसीकरणाची सुरूवात पुणे जिल्ह्यातून केली जाईल, अशी माहिती राज्याचे महाअधिवक्ता अनिल कुंभकोणी यांनी मुंबई उच्च न्यायालयास दिली. आम्ही परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरणाची मोहीम राबवली होती. त्याच अनुभवाचा फायदा घेऊन ही लसीकरण मोहीम राबवण्यात येईल, असे राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आले.

पुणे जिल्ह्याच्या आकारामुळे प्रायोगिक तत्वावर लसीकरणाची मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे जिल्हा आकाराने फार मोठा नाही आणि फार छोटाही नाही. पुणे जिल्ह्यातच परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरणाची मोहीम राबवली होती. हा जुना अनुभव आणि पुणे जिल्ह्याचा आकार यामुळे पुणे जिल्ह्याची निवड करण्यात आल्याचेही राज्य सरकारने न्यायालयात सांगितले.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेबाबत आवाहन

सह्याद्री न्यूज नेटवर्क |
मुंबई, (ता.३०) : राज्यातील अनुसूचित जातीतील इयत्ता 10 वी च्या परीक्षेत 90% किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना व्यावसायिक उच्च शिक्षणाची पूर्वतयारी करण्यासाठी 11 वी व 12 वी या दोन वर्षात प्रत्येकी 1 लाख रु. याप्रमाणे एकूण दोन लाख रुपयांचे “भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना” राबविण्यात येत आहे.

ही योजना MH-CET, NEET, JEE, मेडिकल, इ. सारख्या परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी अनुसूचित जातीतील गुणवंत तसेच आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी असून ज्या विद्यार्थ्यांचे पालक दारिद्र्यरेषेखालील किंवा ज्यांचे वार्षिक उत्पन्न रक्कम 2,50,000/-(अक्षरी दोन लाख पन्नास हजार रुपये) पेक्षा कमी आहे व मुख्यत: लाभ हा त्याच विद्यार्थ्यांसाठी असेल ज्यांचे पालक असंघटित क्षेत्रात, कंत्राटी पद्धतीने कामे करतात.

सन -2021 इयत्ता 10 वी च्या निकालानंतर जाहिरात देऊन विद्यार्थ्यांकडून बार्टी वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतील तसेच संबंधित निवड झालेल्या विद्यार्थ्याच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना बार्टीमार्फत प्रपत्र पाठवून कागदपत्रे प्राप्त करून घेण्यात येतील.

योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यास SSC, CBSE, ICSE बोर्डांमध्ये मध्ये 90% किंवा त्यापेक्षा जास्त गुण असणे बंधनकारक आहे. ज्या विद्यार्थ्यांचे आई-वडील शासकीय नोकरीत आहेत ते विद्यार्थी शिष्यवृत्ती करिता पात्र राहणार नाही.

योजना ही सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात व यापुढे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना हा लाभ देय असेल, अशी माहिती डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, पुणे यांच्यामार्फत प्रसिध्दीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

कार्ड धारकांना राशन देण्यात यावे : युवक काँग्रेसचा आक्रमक पवित्रा

सह्याद्री न्यूज | राजविलास 
यवतमाळ, (ता.३०) : तालुक्यात येणार्‍या वाई गावात राशन कार्ड धारकांना स्वस्त धान्य मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यासमोर नवीन प्रश्‍न निर्माण झाला आहे.

लाभार्थ्यांना स्वस्त धान्य देण्यात यावे, यासाठी आक्रमक झालेल्या युवक काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले. अंत्योदय कार्ड धारकांना शेतकरी दाखविण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसने आक्रमक पवित्रा

यावेळी कोरोना महामारीच्या संकट काळात लाभार्थ्यांना धान्य देण्याची मागणी करण्यात यावी, अशी मागणी कुणाल जतकर व युवक काँग्रेस पदाधिकारी  यांच्याकडून करण्यात आली आहे.

ओबीसी आरक्षण पूर्ववत करा - ओबीसी न्यायहक्क समितीची मागणी

सह्याद्री न्यूज नेटवर्क
महागांव, (ता. ३०) : ओबीसी समाजाचे हक्काचे आरक्षण पुर्ववत लागू करावे, बहुजन समाजास त्या पासुन वंचित ठेऊ नये, पदोन्नती देण्यात यावी. नॉनक्रिमीलियर अट हटविणे, विमुक्त जातीय भटक्या जमातीच्या मुला मुलींना प्रत्येक क्षेत्रात नोकरीची संधी देण्यात यावी.

बहुजन समाजास त्या पासुन वंचित ठेवू नये. अन्यथा ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल. अशा आशयाच्या मागणीचे लेखी निवेदन ओबीसी न्यायहक्क समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी महागांव तहसीलदार नामदेव इसाळकर यांना दिले.

 यावेळी नरेंद्र जाधव,युवराज राठोड, रविंद्र पवार,मोहन राठोड, श्रीनिवास जाधव, सुधाकर राठोड, दिलीप चव्हाण, डॉ. तोळाराम चव्हाण, मा.नगरसेवक राजु राठोड महागांव व अन्य बांधव उपस्थित होते.

फ्लिपकार्टकडून ३० आयसीयू व्हेंटिलेटर्सची मदत

सह्याद्री न्यूज नेटवर्क |
मुंबई, (ता. ३०) : कोविडचा प्रभावी मुकाबला करण्यासाठी ई-कॉमर्स क्षेत्रातील आघाडीच्या फ्लिपकार्ट कंपनीने राज्य शासनाला ३० आयसीयू व्हेंटिलेटर्सची मदत दिली असून ती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज स्वीकारली. यावेळी कंपनीचे व्यवस्थापक रजनीश कुमार उपस्थित होते.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना हातभार लावण्यासाठी फ्लिपकार्टने दिलेली ही मदत नक्कीच उपयुक्त ठरेल. कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांना यामुळे जीवदान मिळेल, असा विश्वास श्री. देसाई यांनी व्यक्त केला.

फ्लिपकार्टने यापूर्वी विविध राज्यांना १८० आयसीयू व्हेंटिलेटर्स दिले आहेत, असे रजनीश कुमार यांनी यावेळी सांगितले.

तलाठी संवर्गाच्या बदल्यांना २०१९ च्या शासन निर्णयातून वगळण्यासाठी सकारात्मक

सह्याद्री न्यूज नेटवर्क |
मुंबई, (ता.३०) : तलाठी संवर्गाच्या जिल्हांतर्गत बदल्यांना दि. १५ मे, २०१९ च्या शासन निर्णयातून वगळण्याबाबत महसूल विभागाने सविस्तर प्रस्ताव करून सामान्य प्रशासन विभागाला पाठवावा तसेच या प्रस्तावावर सामान्य प्रशासन विभागाने सकारात्मक कार्यवाही करावी, असे निर्देश सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

तलाठी संवर्गाच्या बदल्यांबाबतच्या समस्यांविषयी श्री. भरणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला महसूल व वन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव श्रीमती गीता कुलकर्णी, अवर सचिव दि. बा. मोरे यांच्यासह महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

शासकीय कर्मचाऱ्याच्या विनंतीनुसार संवर्गाअंतर्गत एका नियुक्ती प्राधिकाऱ्याच्या आस्थापनेवरुन दुसऱ्या नियुक्ती प्राधिकाऱ्याच्या आस्थापनेवर कायमस्वरुपी समावेशनाबाबतचा शासन निर्णय दि. १५ मे, २०१९ रोजी जारी करण्यात आला आहे. या शासन निर्णयात जिल्हा अंतर्गत एका नियुक्ती प्राधिकाऱ्याकडून दुसऱ्या नियुक्ती प्राधिकाऱ्याच्या आस्थापनेवर बदलीने कायमस्वरूपी समावेशन करता येणार नाही अशी तरतूद आहे.

 त्यामुळे तलाठी संवर्गाची विनंती बदली जिल्ह्यातल्या जिल्ह्यात एका उपविभागीय अधिकाऱ्याच्या आस्थापनेवरून दुसऱ्या उपविभागीय अधिकाऱ्याच्या आस्थापनेवर होत नाही. या कारणाने न्याय मिळत नसल्याची भावना तलाठी महासंघाने राज्यमंत्री श्री. भरणे यांच्याकडे व्यक्त केली. त्याची तात्काळ दखल घेऊन या शासन निर्णयातून तलाठी संवर्गाला वगळण्याबाबतचा प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश श्री. भरणे यांनी दिले.

आमदार संदीप धुर्वे साहेबांच्या हस्ते गरीबांसाठी जिवनाशक वस्तुचे वाटप


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
घाटंजी, (ता. ३०) : आज रोजी बस स्टॅन्ड घाटंजी येथे माननीय आमदार डॉ.संदीप धुर्वे यांच्या स्थानिक विकास निधीतून गोर गरीब जनतेसाठी व प्रवासींसाठी अल्कलाईन,जीवनावश्यक क्षारयुक्त, जीवाणू मुक्त शितलीकरण युक्त अनेक स्तर आधुनिक शुद्धीकरण जल संयत्राचे लोकार्पण त्यांचे हस्ते संपन्न झाले.

यावेळी पंचायत समिती सभापती सौ निताताई जाधव, पंचायत समिती उपसभापती सुहास भाऊ पारवेकर, सचिन भाऊ पारवेकर, श्री प्रकाश पाटील डंभारे माजी नगराध्यक्ष श्रीराम खांडरे एसटी आगार प्रमुख देशमुख साहेब भरत पोतराजे प्रशांत उगले प्रकाश खरतडे विद्याधर राऊत सर संदीप माटे अंकुश ठाकरे आकाश जाधव मदन देऊळकर गजानन धांदे संदीप बोबडे ऊजाला संयंत्र वितरक वर्धमान लूनावत संजय अग्रवाल शेख मेहमूद भाई श्रीहरी निबुदे गजानन मांडवगडे बाबाराव महल्ले विलास ढवळे गजानन नव्हते शेख इक्बाल व इतर कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.


तालुक्यातील कोविड उपाययोजना, खत, बियाणे व पीक कर्जाचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा

सह्याद्री न्यूज नेटवर्क |
राळेगाव, (ता. ३०) : कोरोना लसीकरणाचा पहिला डोज घेतल्यावर विहित कालावधीनंतर दुसऱ्या डोजसाठी पात्र झाल्यावरही अद्याप बऱ्याच नागरिकांनी लसचा दुसरा डोज घेतलेला नाही, विशेषत: कोव्हॅक्सीन लसच्या दुसऱ्या डोजचा कालावधी केवळ २८ दिवसच असल्याने हा कालावधी पुर्ण करणाऱ्या नागरिकांना पुढील दोन दिवसात दुसरा डोज देण्यात यावा. यासाठी उद्या व परवा दोन दिवस कोव्हॅक्सीन लस देण्यासाठी विशेष लसीकरण केंद्र सुरू करण्याचे व संबंधीत पात्र नागरिकांना तालुका नियंत्रण कक्षाद्वारे दुरध्वनीद्वारे आवाहन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज तालुका यंत्रणेला दिले.

जिल्हाधिकारी येडगे यांनी आज राळेगाव तालुक्यात प्रत्यक्ष भेट देवून कोविड प्रतिबंधाबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजना, लसीकरण, कोरोना संभाव्य तीसऱ्या लाटेच्या अनुषंगाने पुर्वतयारी, खत व बियाण्यांची उपलब्धता व शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप या बाबींचा आढावा घेतला. 
कोरोनाची लस घेण्यासाठी ग्रामीण भागातील तसेच आदिवासी पाड्यावरील नागरिकांमध्ये जनजागृती करून लसीकरण वाढविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले. तसेच बियाण्यांची उपलब्धता व खताचा आढावा घेताना युरियाच्या बफर स्टॉकची माहिती घेतली. तर राष्ट्रीयकृत बँकांनी पीककर्जाची उद्दिष्ट पुर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांच्या दारापर्यंत जावे, त्यांना एनपीए व ओटीएस योजनांची माहिती देवून पीककर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक सहकार्य करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी येडगे यांनी दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी यांनी प्रशासकीय इमारतीच्या आवारात वृक्षारोपण केले तर ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली.

यावेळी राळेगाव उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, तहसिलदार डॉ रविंद्रकुमार कानडजे , पोलीस निरीक्षक प्रकाश तूनकुलवार, संबंधीत गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी तसेच महसुल, आरोग्य, पोलीस, कृषी व नगरपरिषद यंत्रणेचे अधिकारी व बँकांची प्रतिनिधी उपस्थित होते.

सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या प्रयत्नांना यश, गोंडवाना विद्यापीठाद्वारे परीक्षा शुल्कात १० टक्क्याची कपात व २०२१-२२ करिता विद्यापीठाकडून संपूर्ण शुल्क माफ

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
बल्लारपूर, (ता.२९) : देशात कोरोना महामारी च्या प्रादुर्भाव मागील दीड वर्षापासून आहे.विद्यार्थी महाविद्यालयांमध्ये प्रत्यक्ष शिक्षण घेण्याकरिता जाऊ शकले नाही.संपूर्ण शिक्षण ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आले.कोरोना महामारी मुळे विद्यार्थ्यांचे पालक आर्थिक अडचणीत होते. अनेक विद्यार्थी कोरणाग्रस्त होते, विद्यार्थ्यांचे आधार हरपले, विद्यार्थ्यांचे आर्थिक हाल झाले, विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. अशातच महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठ प्रशासन द्वारे अनेकदा सांगण्यात आले कि, महाविद्यालयीन शुल्क व परीक्षा शुल्क वेळेवर भरा परंतु कोरोना महामारी मुळे विद्यार्थी व पालक वर्ग आर्थिक अडचणीच्या संकटात सापडला त्यामुळे परीक्षा शुल्क व महाविद्यालय शुल्क भरायचे कसे ? असे प्रश्न विद्यार्थ्याच्या मनात येऊ लागले त्यामुळे पालक वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

आद.बाळासाहेबजी आंबेडकर यांच्या मार्गदर्शनात वंचित बहुजन आघाडी प्रणित विद्यार्थी संघटना सम्यक विद्यार्थी आंदोलन बल्लारपूर चे कार्यकर्ते स्वप्निल सोनटक्के, सिद्धांत पुणेकर, प्रथम दुपारे, गुंजन वानखेडे, फारुक शेख, प्रणय मडावी, भोजेंद्र दुबे, सचिन ठीपे, रुपेश चंदनखेडे यांनी मा.राजू भाऊजी झोडे विदर्भ समन्वयक वंचित बहुजन आघाडी यांच्या नेतृत्वात सतत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना घेऊन शिक्षणमंत्री, गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव, चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी, बल्लारपूर तालुक्याचे तहसीलदार त्यांना अनेकदा निवेदने दिले.
अशातच विद्यार्थी हितकारक असा निर्णय गोंडवाना विद्यापीठ द्वारे घेण्यात आला विद्यापीठाद्वारे येत्या शैक्षणिक सत्र २०२१-२२ करिता इंद्रधनुष्य, आव्हान, अविष्कार, विद्यार्थी कल्याण निधी, विद्यार्थी वैद्यकीय मदत शुल्क, विद्यार्थी संघ शुल्क, वैद्यकीय तपासणी शुल्क, आपत्ती व्यवस्थापन शुल्क, १०० टक्के माफ करण्यात आले असून, ग्रंथालय शुल्क, प्रयोगशाळा शुल्क व पर्यावरण शुल्क यामध्ये ५० टक्के ही सवलत देण्याचा निर्णय विद्यापीठ द्वारे घेण्यात आलेला आहे.सोबतच उन्हाळी २०२० परीक्षा करिता सर्व नियमित विद्यार्थ्यांना १० टक्के फी कपात करण्याच्या निर्णय सुद्धा मा.व्यवस्थापन परिषदेने घेतलेला आहे सदर निर्णयाचे सर्व महाविद्यालयाने काटेकोरपणे पालन करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा असे आव्हान विद्यापीठाचे मा.कुलगुरू, प्रा.श्रीनिवास वरखेडी व मा.प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे यांनी केले आहे असे परिपत्रकाद्वारे कळविण्यात आले.

एकता नगर येथील मटक्यावर पोलिसांची धाड, एका आरोपीला घेतले ताब्यात

                         (संग्रहीत फोटो)

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (ता.२९) : वरली मटक्याचा खेळ चालविणाऱ्या एका आरोपीला डीबी पथकाने अटक केली आहे. मटका जुगारावर पैशाची बाजी लावत असतांना पोलिसांनी या आरोपीला रंगेहाथ अटक केली आहे. शहरातील एकता नगर येथील नगर परिषद गाळ्यामध्ये सुरु असलेल्या मटक्यावर आज दुपारच्या सुमारास डीबी पथकाने धाड टाकली. पोलिस आल्याची चाहूल लागताच मटका खेळणारे व मटक्याची पट्टी फाडणारे पळत सुटले. तर मटक्याची पट्टी फाडणारा एक आरोपी पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 
शहर व तालुक्यात मटका खेळला जाणार नाही, याची पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येत असतांना देखील काही अवैध धंद्यांशी जुळलेल्या व्यक्तींकडून चोरून लपून मटका चालविला जात आहे. शहरातील एकता नगर येथील नगर परिषदेच्या गाळ्यामधे मटका सुरु असल्याची गुप्त माहिती डीबी पथकाला मिळताच डीबी पथकाने त्याठिकाणी धाड टाकून मटक्याची पट्टी फाडणाऱ्या एका आरोपीला अटक केली. पोलिस आल्याचे कळताच काही जण सैरावैरा पळाले. तर मटका जुगारावर पैशाची बाजी खेळवणारा एक जण पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी मटका पट्टी फडणाऱ्या अब्दुल रज्जाक शेख मुख्तार (३६) रा. वार्ड नंबर ४, मस्जिद मागे मुकुटबन याला घटनास्थळावरून ताब्यात घेतले. त्याच्या जवळून १०८० रुपये रोख रक्कम व मटक्याचे साहित्य जप्त करण्यात आले. त्याच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२(अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे. 
सदर कार्यवाही एसडीपीओ संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार वैभव जाधव, डीबी पथक प्रमुख गोपाल जाधव, डीबी पथकाचे सुदर्शन वानोळे, सुधीर पांडे, सुनील खंडागळे, दीपक वान्ड्रूसवार, पंकज उंबरकर, हरिन्द्रकुमार भरती यांनी केली.

आशिया खंडातील सर्वात मोठी महिला फुटबॉल स्पर्धा महाराष्ट्रात

                         (संग्रहित फोटो) 

सह्याद्री न्यूज नेटवर्क |
मुंबई, (ता.२९) : महाराष्ट्रात फुटबॉल खेळाला चालना मिळावी या उद्देशाने आशिया खंडातील सर्वात मोठी एएफसी महिला आशिया कप २०२२ स्पर्धेचे आयोजन राज्यात करण्यात आले आहे.

सह्याद्री अतिथीगृहात आशिया एएफसी महिला आशिया कप २०२२ स्पर्धेच्या तयारी बाबतीत आयोजित आढावा बैठकीत क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार बोलत होते. यावेळी पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई जिल्हा फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष श्री.आदित्य ठाकरे, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष तथा खासदार प्रफुल्ल पटेल, राज्याचे क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया उपस्थित होते.

क्रीडामंत्री श्री.केदार म्हणाले, एएफसी महिला आशिया कप २०२२ या स्पर्धेमुळे राज्यामध्ये क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन मिळणार आहे. आपल्या राज्यात फुटबॉल खेळाला चालना मिळावी आणि खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने महाराष्ट्र राज्यातील मुंबई, नवी मुंबई आणि बालेवाडी पुणे येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई, नवी मुंबई आणि पुणे येथील स्टेडियम सर्व मापदंडांवर सुसंगत आहेत. राज्यात स्पर्धेसाठी आणि सरावासाठी अद्ययावत खेळपट्टी उपलब्ध असल्याचेही श्री.केदार यांनी सांगितले.

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, राज्यात या स्पर्धेसाठी आवश्यक असणारी सर्व प्रकारची सुविधा उपलब्ध करण्यासाठी विविध यंत्रणांना सूचित करण्यात येईल. यामध्ये कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य, रस्ते, वाहतूक व्यवस्था, सुरक्षा, निवास अशा सर्व सुसज्ज सुविधा पुरविण्यात येईल. सर्व स्टेडियमच्या इमारतींची जर काही डागडुजी करणे गरजेचे असेल तर ती वेळेत करून घ्यावी, असे निर्देशही श्री.ठाकरे यांनी दिले.
अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल म्हणाले, फुटबॉल स्पर्धा २० जानेवारी २०२२ ते ६ फेब्रुवारी दरम्यान होणार आहेत. यासाठी राज्य शासनाने योग्य नियोजन करावे. स्पर्धा जागतिक स्तरावरील असल्याने फुटबॉलप्रेमींना खेळाचा आनंद घेता यावा यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तयारी करावी. प्रशिक्षण आणि सरावासाठी खेळपट्ट्या तयार करण्यात याव्यात असेही श्री.पटेल यांनी सांगितले.

राज्यातील मुंबई, नवी मुंबई आणि बालेवाडी येथे सामने होणार आहेत. ही स्पर्धा आशिया खंडातील महिलांसाठीची सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा असून या स्पर्धेत एकूण १२ संघ सहभागी सहभागी होणार आहेत. - ऑस्ट्रेलिया, जपान आणि चीन आधीच पात्र ठरले आहेत. इतर संभाव्य सहभागींमध्ये कोरिया आणि दक्षिण कोरिया यांचा समावेश होणार आहे. याकरिता खेळाचे मैदान सज्ज करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

सार्वजनिक गणेशोत्सव २०२१ च्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना जारी



                                             (संग्रहीत फोटो)

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
मुंबई, (ता.२९) : कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा सार्वजनिक गणेशोत्सव (२०२१) साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने गृहविभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

‘ब्रेक दि चेन’च्या अनुषंगाने लागू करण्यात आलेल्या निर्बंध पातळीबाबत (Level of Restrictions for Break the Chain) वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार इतर निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये गणेशोत्सवानिमित्त कोणतीही शिथिलता देता येणार नाही असेही या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी महापालिका, स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार यथोचित पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील.

कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपांबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत. यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतींची सजावट करतांना त्यात भपकेबाजी नसावी.

श्रीगणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळांकरिता ४ फूट व घरगुती गणपतीकरिता २ फुटांच्या मर्यादेत असावी. यावर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमूर्तीऐवजी घरातील धातू / संगमरवर आदी मूर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची/ पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रीम विसर्जनस्थळी विसर्जन करण्यात यावे.उत्सवाकरिता वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पाहावे. तसेच आरोग्यविषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी.

सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रम / शिबिरे उदा. रक्तदान आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता यांबाबत जनजागृती करण्यात यावी. आरती, भजन, कीर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच ध्वनी प्रदूषणासंदर्भातील नियमांचे व तरतुदींचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. श्रीगणेशाच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी. गणपती मंडपांमध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारीरिक अंतराचे (फिजिकल डिस्टन्सींग) तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनीटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.

श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणूका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपारिक पध्दतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जनस्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरीष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील/इमारतीतील सर्व घरगुती गणेशमूर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नयेत. महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोक प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने गणेशमूर्तींच्या विसर्जनाकरिता कृत्रीम तलावांची निर्मिती करण्यात यावी.

कोविड- १९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करणे बंधनकारक राहील असेही गृहविभागाने स्पष्ट केले आहे.

कोल्हापुरच्या मुंबईस्थित दोन समाजसेवकांचा बुलढाणा फिल्म सोसायटीतर्फे सन्मान


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
बुलढाणा, (ता.२९) : शाहू महाराजांच्या कोल्हापूर नगरीतील भुदरगड या ऐतिहासिक तालुक्यातील बामणे या गावचे दोन अभ्यासु साहित्यिक समाजसेवक सुनिल बोरणाक आणि संदीप मेंगाणे यांना ह्या वर्षीचा बुलडाणा फिल्म सोसायटीचा अनुक्रमे समाज गौरव पुरस्कार २०२० आणि समाज रत्न पुरस्कार २०२० जाहीर झाला आहे. त्याबद्दल त्यांच्यावर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 लहानपणापासूनच समाज सेवेची आवड असणाऱ्या दोघांनीही अनेक मंडळे, प्रतिष्ठान व मित्रांच्या मदतीने मदत कार्यात पुढाकार घेतला. राज्यस्तरीय शिवसह्याद्री प्रतिष्ठाण या राजकारण विरहित प्रतिष्ठान मार्फतही ते समाजकार्यात अग्रेसर आहेत.

गेली अनेक वर्षे आयुर्वेदिक मोफत आरोग्य शिबीर राबवणे, रक्तदान शिबीर राबवणे, काही शालेय उपक्रम जसे एक वही एक पेन जेणेकरून गरजू विद्यार्थ्यांना थोडी शैक्षणिक मदत मिळेल, ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून कचरा साफ करणे, गरजुंना मोफत अन्नधान्य वाटप, दाल खिचडी वाटप, कोरोना काळात सेफ्टी मास्क, अर्सेनिक गोळया, सॅनिटायजर, कोविड किट वाटप, झोपडपट्टी एरिया सॅनिटाईस करणे, खेड्यातील लोकांना शेतकरी मंडळ चालू करून देणे, महिलांचे - पुरुषांचे बचत गट चालू करणे व त्यांना कर्ज मंजूर करून देणे, दारिद्र्य रेषेखालील लोकांना मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण देणे व मोफत शिलाई मशीन वाटप करणे, पूरग्रस्त लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करणे, वृक्षारोपण करणे, शासन आणि प्रशासनाच्या मदतीने रस्त्यांची डागडुजी करणे ह्या सारखी कामे सातत्याने ते सातत्याने करत आहेत.
त्यांच्या या सेवेला प्रोत्साहन देण्यासाठी बुलढाणा फिल्म सोसायटी तर्फे सुनील बोरणाक यांना समाजगौरव तर संदीप मेंगाने यांना समाजरत्न पुरस्कार जाहीर झाल्याचे सोसायटीचे अध्यक्ष भास्कर वाडेकर यांनी जाहीर केले आहे.

शेतमालकांकडून सालगड्याच्या पत्नीचा विनयभंग, घोडधरा येथील घटना


                        (संग्रहीत फोटो) 

सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव, (ता.२९) : घोडधरा येथे शेतकामासाठी ठेवलेल्या माणसाच्या पत्नीवर मालकाने घरात घुसून विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना शनिवार दि.२६ जुन रोजी दुपारी दोन वाजता घडली होती. 

माणूस शेतामध्ये काम करत असताना सालगड्याच्या घरी त्याचा डब्बा आणण्यासाठी गणेश आनंद जीवतोडे (४५) हा गेला असता, सालगड्याच्या पत्नीचा मोबाईल चार्जिंगला लावून असलेल्या खोलीमध्ये शिरून चार्जिंगला लावून असलेला मोबाईल काढुन घेतला. माणसाची पत्नी आपला मोबाईल मागण्यांसाठी गेली असता, तिला खाली पाडून विनयभंग केल्याची तक्रार पिडीत महिलेने मारेगाव पोलीस स्टेशनमध्ये सोमवार दि.२८ जुन रोजी सांयकाळी दाखल केली.

सदर तक्रारी वरुन संशयित आरोपी गणेश जीवतोडे रा.घोडधरा यांच्या विरुद्ध कलम ३५४/४५२/५०६ सह अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असुन, पुढील तपास मारेगाव पोलीस करित आहे.

पेट्रोल, डिझेल, गॅसची दरवाढ कमी करा. - राष्ट्रवादी युवक काँग्रेसची पार्टीचा आंदोलनाचा इशारा.


सह्याद्री न्यूज नेटवर्क |
यवतमाळ, (ता.२९) : देशासह राज्यात ही पेट्रोल डिझेल  व गॅसच्या दरवाढीचा भडका उडाला असून दिवसेन दिवस इंधन दरवाढ होतच चालली आहे. याचा फटका सर्वसामान्यांसह शेतकरी वर्गास सुध्दा बसत आहे.पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ झाल्याने व खर्च झेपावत नसल्याने शेतकामास लागणारी यंत्रसामग्री ठप्प पडण्याची वेळ आली आहे.
 
एकीकडे गॅसचे भाव गगनाला भिडल्याने सर्वसामान्य नागरिकासह गोरगरीबांच्या झोपडीत दोन वर्षापुर्वी तोडलेल्या चुली परत चेततांना दिसू लागल्या आहेत.तर सिलेंडर हे शोभेची वस्तू बनून झोपडीत अडचण निर्माण करत आहेत.

या जुलमी केंद्र सरकारने गरीबांच्या झोडीत डोकावून गरिबींच्या नजरे पाहुन व शेतकर्‍यांचा शेतात गळत असलेल्या घामाची कदर करून तात्काळ इंधन आणि गॅसची दरवाढ कमी करून जनतेला दिलासा द्यावा अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी महागांव तर्फे  रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी ही केंद्र सरकारची राहील असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.


कुपनधारक धडकले महागांव तहसील कार्यालयावर

 
सह्याद्री न्यूज नेटवर्क |
महागांव, (ता.२९) : महागांव येथील स्वस्त धान्य दुकानदारा कडुन शासकीय वेळेत धान्य मिळत नसल्याने रोजमजुरी करणार्‍या कुपनधारकांची कुचंबणा होत असल्याने संतप्त झालेल्या कुपनधारकांनी थेट तहसील कार्यालयात घुसून तहसीलदार नामदेव इसाळकर यांचे समोर आपबीती मांडुन स्वत धान्य दुकानदारा विषयी तक्रार केली आहे.
 
संपूर्ण शहरात दोन स्वस्त धान्य दुकानाव्दारे धान्याचा वाटप केल्या जात होता. परंतु दोन्ही ही दुकाने भष्टाचाराच्या विळख्यात अडकल्या गेल्याने,मागील अनेक वर्षां पासून प्रभारी दुकानदाराच्या भरवशावर येथील कारभार चालत होता.
   
मागील काही दिवसांपासुन अंबोडा येथील महिला बचत गट हे दोन्ही दुकाने प्रभारावर चालवत होते.संपर्ण शहरास एकाच दुकानाव्दारे वाटप करताना तान पडत असल्याने दुसऱ्या एका दुकानास जोडण्यात आले होते.त्यांचे कडून शासकीय वेळे नुसार धान्य मिळत नसल्याने संतप्त झालेल्या कुपनधारकांनी तहसील कार्यालयावर जाऊन तहसीलदार यांना स्वत धान्य मिळत नसल्याची तक्रार केली आहे.


विठ्ठलवाडी येथील प्रमुख रस्त्याच्या दुरुस्तीकरणाचे काम थांबले, रस्ता अद्यापही डांबरीकरणाच्या प्रतिक्षेत !

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (ता.२९) : विठ्ठलवाडी परिसरातून एस बी लॉन मार्गे वणी वरोरा रोडला जोडला जाणारा प्रमुख रस्ता अद्यापही डांबरीकरणाच्या प्रतिक्षेत आहे. मागील दिड वर्षांपासून या रस्त्याचे काम सुरु आहे. अतिशय संत गतीने या रस्त्याचे काम करण्यात आले.

खडीकरणाला वर्षभर लागले, आता डांबर पडायला पुढील वर्ष उजाडते की, काय असे वाटू लागले आहे. खनिज विकास निधी अंतर्गत या रस्त्याच्या दुरुस्तीकरणाचे काम हाती घेण्यात आले. पण आता निधी अभावी या रस्त्याचे काम रखडले असल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात येत आहे.

या रस्त्यावर आता ठिकठिकाणी पाणी साचत असून रस्त्यावर पडलेले गिट्टीचे ढिगारे वाहतुकीला अडथळे निर्माण करीत आहे. खडीकरण करण्यात आलेली गिट्टीही उखडू लागली असून रस्त्यावर खड्डे पडू लागले आहेत. त्यामुळे या रस्त्यावर आता डांबर केंव्हा पडते, ही प्रतिक्षा येथील नागरिकांना लागली आहे.

विठ्ठलवाडी परिसरातून मुख्य मार्गाकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्याच्या दुरुस्तीचे काम २०२० च्या एप्रिल, मे महिन्या पासून सुरु आहे. फेब्रुवारी २०२० मध्ये या रस्त्याच्या दुरुस्तीकरणाची निविदा बांधकाम विभागाकडून काढण्यात आली. अगदीच बरसादीच्या तोंडावर हा रस्ता खोदण्यात आला. पावसाळ्याचे चार महिने हा रस्ता निव्वळ खोदून राहिला. परिसरातील नागरिकांचे या रस्त्याने जाणे येणे कठीण झाले. नागरिकांच्या घरासमोर पाण्याचे खळगे तयार झाले. रस्त्यालगत घरे असणाऱ्यांचे तर घराबाहेर पडणे कठीण झाले होते.

हिवाळ्यानंतर या रस्त्याच्या खडीकरणाच्या कामाला सुरुवात झाली. खडीकरणाचे कामही अत्यंत संत गतीने चालले. परंतु आता पर्यंत या रस्त्यावर डांबर पडले नाही. दुसरा पावसाळा सुरु झाला पण अजूनही या रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. आता पावसाचे पाणी या रस्त्यावर साचून राहते. पाऊस पडला की, या रस्त्याने मार्गक्रमण करणेच कठीण होऊन बसते. गिट्टीचे ढिगारे अद्यापही रस्त्यावर पडले आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होतात. खनिज विकास निधी अंतर्गत धडाक्यात या रस्त्याचे काम सुरु करण्यात आले. पण तडाक्यात हे काम पूर्ण करण्यात आले नाही. दिवाळी पासून निधी मिळालाच नसल्याने काम थांबविण्यात आल्याचे सांगण्यात येते. आता हे रखडलेले काम केंव्हा पूर्ण होते, याकडे नागरिकांच्या नजरा लागल्या आहेत.

विठ्ठलवाडी वासियांचा संयम नेहमी कायम राहिला आहे, त्यामुळे येथील नागरिकांनी तक्रारी करण्याचे टाळले. पण आता कालावधी जास्तच होत असल्याची कुजबुज येथील नागरिकांमधून ऐकायला मिळत आहे. या रस्त्याचे दुरुस्तीकरणाचे काम मागील दिड वर्षांपासून सुरु आहे. आता तर डांबराच्या किमतीही वाढल्या असल्याने कंत्राटदार चिंतेत आले आहे. वेळेवर निधी न मिळाल्याने काम रखडल्या गेले. त्यावेळेस ज्या रेट मध्ये काम घेतले, तेंव्हा डांबराच्या किमती कमी होत्या. आता डांबराच्या किमती वाढल्याने कंत्राटदाराला आर्थिक नुकसान सहन करावे लागणार असल्याचेही बोलल्या जात आहे.

त्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण होण्याला आता किती कालावधी लागतो, कुणास ठाऊक. पण रस्त्याच्या दुरुस्तीकरणाचे काम अर्ध्यावर थांबल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

कोरोनाची तिसरी लाट थांबविण्यासाठी यंत्रणा सज्ज – पालकमंत्री डॉ.नितीन राऊत


सह्याद्री न्यूज नेटवर्क |

नागपूर, (ता.२८) : कोविडवर मात करण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढविणे आवश्यक असून तिसऱ्या लाटेची शक्यता  लक्षात घेवून ऑक्सिजन, बेडची व्यवस्था, ग्रामीण तसेच  शहरी भागातील सर्व रुग्णालयातील यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्री डॉ. राऊत यांनी कोरोनासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेवून आढावा घेतला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा, पोलीस आयुक्त अमितेश कुमार,  जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, उद्योग सह संचालक श्री. धर्माधिकारी आदी उपस्थित होते.

कोरोनावर प्रभावी व परिणामकारक उपाययोजना करण्यात आल्यामुळे दुसऱ्या लाटेचा परिणाम कमी होत असल्याचे सांगताना डॉ. नितीन राऊत म्हणाले की, ग्रामीण तसेच शहरी भागात लसीकरणाचा वेग वाढविणे आवश्यक आहे. दररोज ५० हजारपेक्षा जास्त पात्र नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट समोर ठेवून १८ वर्षांवरील युवकांना  मोठ्या प्रमाणात लसीकरण  करणे आवश्यक आहे. १८ ते ४४ या वयोगटात सरासरी १३ लाख नागरिक असून त्यांना डोज  देण्यासाठी मोठ्या प्रमाणात केंद्र सुरु करावे, तसेच शहरातील किमान २५ खासगी रुग्णालयासाठी लसीकरणाची सुविधा निर्माण केल्यास मोठ्या प्रमाणात उद्दिष्ट साध्य होवू शकेल. लसीच्या उपलब्धतेबाबतही यावेळी आढावा घेण्यात आला.

ग्रामीण  भागात १८ वर्षांवरील सरासरी ४० टक्के नागरिकांना पहिला डोज देण्यात आला आहे. तर ९ टक्के नागरिकांना दुसरा डोज देण्यात आला आहे. शहरातही मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

शहरात ३० ठिकाणी ऑक्सिजन सेंटर

कोविडच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेवून नागरिकांना सुलभपणे ऑक्सिजन उपलब्ध व्हावे, यासाठी ३० ऑक्सिजन वॉक एन सेंटर सुरु करण्यात येणार आहेत. या सेंटरवर ज्या नागरिकांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे. त्यांना तात्काळ ऑक्सिजन उपलब्ध करुन देण्यात येईल व त्यानंतर जवळच्या  हॉस्पिटलमध्ये भरती होण्यासाठी मदत करण्यात येईल. यासाठी १०० कॉन्सनट्रेटर सज्ज ठेवण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार आणखी १०० कॉन्सनट्रेटर जिल्हा निधीमधून खरेदी करण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. राऊत यांनी दिली.

कोविडसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच ग्रामीण रुग्णालयांसाठी आवश्यकतेनुसार ऑक्सिजन उपलब्ध व्हावे, यासाठी ऑक्सिजन निर्मिती सुविधा सुरु करण्यात आल्या आहेत. तसेच द्रवरुप ऑक्सिजन साठविण्यासाठी मध्यवर्ती केंद्र उभारण्यात येणार आहे. तसेच १ हजार ३७५ नवीन ऑक्सिजन सिलेंडर खरेदी करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले. जिल्ह्यासाठी दररोज १६० मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता असून यामध्ये तीनपट जास्त ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे.

तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी अमरावती रोड येथे ६०० बेड्स नव्याने उपलब्ध होणार असून शहरात एकूण १ हजार ८०० बेड्स उपलब्ध होतील. त्यामुळे कोविड रुग्णांच्या उपचारासाठी अडचणी येणार नसल्याचे महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सांगितले. यामध्ये सुमारे दोनशे खाटा बालकांसाठी राखीव ठेवण्याचे नियोजन आहे.

जिल्ह्यात नवीन प्रकारचे कोविड रुग्ण आढळले असून यामध्ये उमरेड येथे आठ तर नागपूर येथे चार रुग्णांचा समावेश आहे.  या रुग्णांच्या कोविड तपासणीचे नमुने एनआयव्ही, पुणे येथे पाठवून तात्काळ रिपोर्ट मिळेल यादृष्टीने नियोजन करावे, अशा सूचना यावेळी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिल्या.

कोरोनाची तिसरी लाट थांबविण्यासाठी प्रशासनातर्फे आवश्यक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. जनतेने  प्रशासनाच्या सूचनांचे पालन करुन जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे,असे आवाहन यावेळी  करण्यात आले.

पावसाळी अधिवेशनासाठी ३ व ४ जुलै रोजी आरटी-पीसीआर चाचणी

सह्याद्री न्यूज नेटवर्क |
मुंबई, (ता.२८) : महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ आणि ६ जुलै, २०२१ रोजी विधान भवन, मुंबई येथे आयोजित करण्यात आले असून त्यासाठी विधान भवन प्रवेशाकरीता कोविड-१९ संदर्भात RT-PCR चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या दिनांक २२ जून, २०२१ रोजी झालेल्या बैठकीत याबाबत झालेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी विधान भवन, मुंबई येथे उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत RT-PCR चाचणी संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

दोन्हीही सभागृहांचे सन्माननीय सदस्य, त्यांच्या वाहनांचे चालक आणि वाहनातून मुंबईत येणारे सहप्रवासी अशा सर्वांनी सोयीच्या ठिकाणी मान्यताप्राप्त लॅबमध्ये दिनांक ३ किंवा ४ जुलै, २०२१ या निर्धारित वैध कालावधीसाठीची RT-PCR चाचणी करून त्याचा अहवाल विधान भवन प्रवेशासाठी सोबत ठेवणे आवश्यक असेल. लसीकरणातील पहिला वा दुसरा डोस घेतलेल्यांना तसेच कोविड-१९ संदर्भातील प्रतिपिंड (Antibodies) चाचणीचा सकारात्मक अहवाल असणाऱ्यांनासुद्धा RT-PCR चाचणी करणे अनिवार्य राहिल. मागील अधिवेशनांप्रमाणे विधान भवन प्रवेशद्वाराजवळील मंडपात दिनांक ३ आणि ४ जुलै, २०२१ रोजी, सकाळी ९.०० ते सायं. ६.०० यावेळेत RT-PCR चाचणीची सुविधा सर्व संबंधितांसाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोविड-१९ संदर्भातील लसींचा पहिला अथवा दुसरा डोस घेतलेल्यांना संसर्ग होण्याची शक्यता कमी असली तरी काही जण कोरोना विषाणूचे वाहक असू शकतात. त्यामुळे दोन्हीही डोस घेतलेल्यांना सुद्धा RT-PCR चाचणी इतरांच्या सुरक्षिततेसाठी करणे अत्यावश्यक असल्याचे मत या उच्चस्तरीय बैठकीत नोंदविण्यात आले.

या बैठकीस महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव, श्री. राजेन्द्र भागवत, वैद्यकीय शिक्षण संचालक, डॉ. तात्याराव लहाने, जे. जे. रुग्णालय समूहाचे अधिष्ठाता डॉ.माणकेश्वर, मुंबई महापालिकेच्या उपकार्यकारी आरोग्य अधिकारी, डॉ. प्रणिता टिपरे, डॉ. संतोष गायकवाड, विधानमंडळाचे विशेष कार्य अधिकारी, डॉ.अनिल महाजन, अवर सचिव श्री. रविंद्र जगदाळे उपस्थित होते.



जनसंपर्क अधिकारी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन, मुंबई.

कुलरचा शॉक लागून महिलेचा मृत्यू, राजूर ईजारा येथील घटना


                       (संग्रहित फोटो)

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (ता. २८) : कुलरचा करंट लागून एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास वणी तालुक्यातील राजूर ईजारा येथे उघडकीस आली. घरची साफ सफाई करत असतांना कुलरमध्ये संचारलेल्या विद्युत प्रवाहाचा धक्का लागून महिलेचा दुर्दैवी अंत झाला. शालू रामकृष्ण जगनाडे (३४) असे या मृतक महिलेचे नाव आहे. 
शहरापासून जवळच असलेल्या राजूर ईजारा येथील मजूर महिलेचा घराची साफ सफाई करतांना कुलरला स्पर्श झाला. कुलरमध्ये संचारलेल्या विद्युत प्रवाहाचा धक्का लागल्याने घटनास्थळीच महिलेचा मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास राजूर ईजारा येथील महिलेच्या राहत्या घरी उघडकीस आली. शालू जगनाडे यांच्या पतीचाही सात वर्षांपूर्वी विजेचा धक्का लागूनच मृत्यू झाल्याचे समजते. या महिलेचा पती विद्युत कंत्राटदारांकडे कामाला होता. पतीच्या मृत्यू नंतर मोलमजुरी करून ती मुलांचा सांभाळ करीत होती. तिच्या मागे एक मुलगी व एक मुलगा असून माता पित्याचे छत्र हरपल्याने दोन्ही मुले पोरकी झाली आहेत. महिलेच्या अकाली मृत्यूने गावात शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणी करिता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. शवविच्छेदनानंतर मृतदेह अंतिम संस्काराकरिता नातलगांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.

२५ लाखाचा बकरा बनला चर्चेचा विषय, तसे झळकले गावात पोस्टर

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
चंद्रपूर, (ता.२८) : सिंदेवाही शहरापासून जवळच असलेल्या पालेबारसा या गावातील तामदेव उंदीरवाडे यांच्याकडे बकरा विक्रीस उपलब्ध असल्याचे बॅनर क्षेत्रात लावण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे, या बकऱ्याची जी किंमत ठरविण्यात आली आहे, ते ऐकून तुम्हाला धक्काच बसेल. चक्क २५ लाख रुपये, आता बोला.

सावली तालुक्यात पालेबारसा गाव आहे. या गावातील तामदेव उंदीरवाडे यांच्याकडे बकरा आहे. साडेतीन वर्ष वय असलेल्या बकऱ्याची चांगली जोपासना केली असून बकऱ्याचे वजन ८५ किलो आहे. आता हा बकरा त्यांनी विक्रीसाठी काढला आहे. मात्र, या बकऱ्याची किंमत त्यांनी २५ लाख रुपये ठेवली आहे. हा बकरा विक्रीस उपलब्ध असल्याचे बॅनरही त्यांनी गावात लावून टाकले आहे.
यामुळे विविध ठिकाणी चचेर्ला उधाण आले आहे. लाखो रुपयांची किंमत असलेल्या बकऱ्यामधील नेमके आश्चर्य आणि वैशिष्ट काय आहे, हे मात्र कुणालाही माहीत नाही. पालेबारसा येथील तामदेव उंदीरवाडे यांना फोनद्वारे विचारणा केली असता बकऱ्याच्या कपाळावर चांद आहे आणि बकरी ईदनिमित्त कपाळावर चांद असलेल्या बकऱ्याला विशेष महत्त्व असते, असे त्यांनी सांगितले.

'गंगुबाई काठीयावाडी' ची शूटिंग पूर्ण


सह्याद्री न्यूज नेटवर्क |
मुंबई, (ता.२८) : सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भंसाळी दिग्दर्शित 'गंगुबाई काठियाडवाडी' या चित्रपटासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केल्यानंतर प्रेक्षकांची ही उत्सुकता शिगेला जाऊन पोहचली आहे. 'क्युट' अभिनेत्री आलिया भट्ट आणि बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण स्टारर 'गंगुबाई काठियाडवाडी' चित्रपटाची शूटिंग पूर्ण झालीय.
लॉक डाऊन मुळे या चित्रपटाचं एक गाणं आणि छोटया भागातील शूटिंग राहिली होती. अनलॉक नंतर या चित्रपटाची उरलेल्या शूटिंग ला सुरुवात करण्यात आली होती.
ती आता पूर्ण झाली असून हा चित्रपट रिलीजसाठी सज्ज झालाय. याबाबत अभिनेत्री आलिया भट्ट ने स्वतः ही माहिती दिली आहे.
अभिनेत्री आलिया भट्ट ने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन काही फोटोज शेअर करून ही माहिती दिलीय. हे फोटो शेअर करताना आलियाने लिहिलं '८ डिसेंबर २०१९ रोजी आम्ही चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली होती. त्यानंतर २ वर्षांनी आम्ही या चित्रपटाची शूटिंग पूर्ण केलीय. या चित्रपटाने दोन लॉक डाऊन, दोन चक्रीवादळ आणि ब? याच समस्यांचा सामना केलाय. पण तरी सुद्धा आम्ही हार मानली नाही.

सरपंच परिषदेच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

सह्याद्री न्यूज नेटवर्क |

मुंबई, (ता. २८) : सरपंच परिषद मुंबईच्या एका १४ सदस्यीय शिष्टमंडळाने प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सोमवारी (दि २८ जून) भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.

पंधराव्या वित्त आयोगातील निधीतून गावाचा विकास होण्यासाठी उपलब्ध निधी केवळ विकास व पायाभूत सुविधा यांवर खर्च करण्यात यावा, मुंबई येथे सरपंच भवनाची निर्मिती करण्यात यावी तसेच कोरोनामुळे निधन झालेल्या राज्यातील ३५ पेक्षा अधिक सरपंचांच्या कुटुबिंयाना आर्थिक मदत देण्याची मागणी शिष्टमंडळाने केली.

यावेळी सरपंच परिषद मुंबईचे विश्वस्त अविनाश आव्हाड, राजाराम पोतनिस, आनंद जाधव तसेच अश्विनीताई थोरात यांसह सहा महिला सरपंच देखिल उपस्थित होते.

कुलरचा शॉक लागून सहा वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, दहेगाव येथील घटना

सह्याद्री न्यूज नेटवर्क |
राळेगाव, (ता.२७) : वडकी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दहेगाव येथील एका सहा वर्षांच्या चिमुकल्याचा कुलरला करंट लागुन जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज २७ जुन रोजी सकाळी नऊ वाजता दरम्यान घडली. मन सुन्न करणाऱ्या या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहेत.

सौरभ रंजित भोसले (६) रा.पारधी बेडा दहेगांव ता.राळेगांव असे त्या चिमुकल्याचे नाव असून,घटनेच्या वेळी आई वडील व बहिण हे सर्व जण शेतात कामाला गेले होते. दरम्यान, तो घरी एकटाच असल्याने सकाळी नऊ वाजता दरम्यान जेवन आटोपल्यानंतर कुलरच्या बाजुला असलेल्या स्टिलच्या गुंडातून पाणी घेत असताना कुलरचा जोराचा करंट लागला. दरम्यान,या घटनेची माहिती शेजाऱ्यांना कळताच त्याला तातडीने उमरी येथील रुग्णालयात भर्ती केले मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात असुन, दोन वर्षांपूर्वी तालुक्यातील कोदुर्ली श्रीरामपूर येथे अशीच घटना घडली होती.त्या घटनेत दोन लहान चिमुकल्यांचा जीव गेला होता. त्यामुळे पालकांनी आपल्या लहान मुलांकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे.

राजश्री शाहू महाराज जयंती निमीत्त धारूर येथे रक्तदान शिबीर संपन्न

सह्याद्री न्यूज | ऋतुजा सोनवणे 
धारूर, (ता.२७) : येथे छञपती राजश्री शाहू महाराज जयंती निमीत्त धारूर येथील सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आले असून या निमीत्त आयोजित रक्तदान शिबीरास उस्फूर्त प्रतिसाद मिळला. या  शिबीरात ११ रक्तदात्यानी स्वंयस्फूर्तीने रक्तदान केले.

धारूर येथे छञपती राजश्री शाहू महाराज जयंती उत्सव समितीचे वतीने विवीध विवीध सामाजीक उपक्रम राबवून हि जयंती साजरी करण्यात आली. राजश्री शाहू महाराज जयंती निमित्ताने जागतिक रक्तदान दिनाचे औचीत्य साधून रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे उदघाटन माजी नगराध्यक्ष अर्जूनराव गायकवाड यांचे हस्ते करण्यात आले. या प्रसंगी राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी काँग्रेस आय चे जिल्हा सरचिटणीस प्रभाकर चव्हान, पञकार अनिल महाजन, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सय्यद शाकेर, नगरसेवक बालाजी चव्हान, सामाजिक कार्यकर्ते अमरजीत तिवारी, जयंती चे संस्थापक अध्यक्ष बंडोबा सांवत, उत्सव समिती अध्यक्ष शरद सांवत, विजय लोखंडे आदिंच्या  उपस्थितीत करण्यात आले. या रक्तदान शिबीराला  कोरोना संकटाचे सावट असतांना देखील उस्फूर्त प्रतिसाद मिळला. यावेळी ११ रक्तदात्यानी रक्तदान केले असून अंबाजोगाई येथील शासकीय रक्तपेढीला रक्तदान करण्यात आले.

यावेळी रक्तपेढीचे डॉ.प्रियंकी गवई, शशीकांत पारखे, जगदीश रामदासी, शेख बाबा, बालाजी पडगी यांनी शिबीराला विशेष सहकार्य केले. तर या शिबीराच्या  यशस्वीतेसाठी शरद सांवत, बलभीम मुंडे, मदन नाटकर अजित शिनगारे, विजय सांवत बबलू सांवत, तानाजी मोरे आदीनी परीश्रम घेतले.

सिंचन प्रकल्प मार्गी लावल्याबद्दल जलसंपदामंत्री पाटील व पालकमंत्री चव्हाण यांचे आ. केराम यांनी मानले आभार


सह्याद्री न्यूज नेटवर्क |
किनवट, (ता.२७) : अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या किनवट, मारेगाव व धनोडा येथील उच्च पातळी बंधारा प्रकल्पास तत्वतः मंजूरी देवून मान्यता दिल्याबद्दल आमदार भीमराव केराम यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील व पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे आ.भीमराव केराम यांनी आभार मानून नागझरी प्रकल्पाची उंची वाढविणे, रखडलेला उनकेश्वर येथील प्रकल्प पूर्ण करा वा व लघुसिंचन तलावाच्या कालव्यांची दुरुस्ती करावी अशी मागणीही त्यांनी केली. 
          
नांदेड येथील नियोजन भवनात शनिवार (दि.26) रोजी झालेल्या बैठकीत किनवट-माहूर विधानसभा मतदार संघाचे आमदार भीमराव केराम यांनी राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना निवेदन देऊन नागझरी मध्यम प्रकल्प सांडणव्यायाची उंची वाढविणे,उनकेश्वर उच्च पातळी बंधारा प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यतेस विशेष बाब अंतर्गत मंजुरी मिळवून देणे,लघु प्रकल्पा कालवा दुरुस्तीच्या कामांना मंजुरी देणे आदी महत्वपूर्ण मागण्या केल्या.

याबाबत सविस्तर असे की, किनवट तालुक्यातील नागझरी मध्यम प्रकल्पाचे काम सन १९८६ ला पुर्ण झाले असून या प्रकल्पाची साठवण क्षमता ६.०० द.ल.घ.मी. आहे. सदरिल प्रकल्पात किनवट शहरास पिण्याच्या पाणीसाठी १.०० द.ल.घ.मी. आरक्षित केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामास पाणी मिळत नाही. सदरिल प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात पुर्ण संचयपातळी पेक्षा जास्त भुसंपादन केलेले आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या सांडव्यायाची उंची ०.६० मी. ने वाढविल्यास अतिरिक्त भुसंपादन करण्याची गरज नाही. पाणीसाठा वाढुन शेतकऱ्यांना उन्हाळी हंगाम घेणे शक्य होईल. तेव्हा नागझरी प्रकल्पाच्या सांडव्याची उंची ०.६० मी. ने वाढवून देण्याची मागणी केली आहे. 

निवेदनातील दुसरी मागणी अशी की, उनकेश्वर येथे उच्च पातळी बंधाऱ्याचे कामास मंजुरी प्राप्त झाली असून, या प्रकल्पाचा पाणी वापर ९ .६९ द.ल.घमी. असून या प्रकल्पावर आतापर्यंत ५५.०० कोटी खर्च झालेला आहे. या प्रकल्पाच्या सुधारीत प्रशासकीय मान्यता मापदंडात बसत नसल्यामुळे प्रलंबीत आहे. परंतु या प्रकल्पावर ५५.०० कोटी खर्च झाल्यामुळे व पुर्ण झाल्यास सिंचनामुळे या तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांचा विकास होईल. त्यामुळे या प्रकल्पास विशेष बाब म्हणून सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळणे अत्यंत आवश्यक आहे. ही बाब त्यांनी मंत्री महोदयांच्या लक्षात आणून दिली. 
          तिसरी मागणी ही की, किनवट-माहूर मतदार संघातील पुढील लघुसिंचन तलावाच्या कालव्याची दुरुस्ती करणे अत्यंत आवश्यक आहे :
१)पिंपळगाव लघुसिंचन तलाव-या तालावाचे कालव्या वरील बांधकामे ४० वर्षे जुनी असून पुर्णपणे पडलेली आहेत. दुरुस्तीशिवाय सिंचन करणे अशक्य झाले आहे. तरी त्वरीत निधी उपलब्ध करुन बांधकामे पुर्ववत करण्यास्तव आदेशित करावे.
२) पालाईगुडा बृहत ल.पा.तलाव - या तलावाच्या लाभक्षेत्रात भाग -१ (चाऱ्याचे काम) झाले नसल्यामुळे फक्त कालव्यालगतच्या शेतांना पाणी मिळत आहे व उर्वरित शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. तरी त्वरीत चाऱ्याचे काम करण्यास्तव आदेशित करण्यात यावे.
३) मांडवी बृहत ल.पा.तलाव - या प्रकल्पाचे कालवे खडकाळ भागातून जात असल्याने पाण्याचा पाझर घेऊन शेवटच्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळत नाही . तरी कालव्यास आवश्यक असलेले अस्तरीकरण करण्याचे आदेशित करावे. या मागण्या पूर्ण करून माझ्या आदिवासी डोंगरी मतदार संघाला बारमाही हिरे राहण्यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती आमदार भीमराव केराम यांनी केली आहे.

आज दुपारी आलेल्या पाऊसाने तालुक्यात समाधान

सह्याद्री न्यूज नेटवर्क |
राळेगाव, (ता.२७) : राळेगाव तालुक्यात आज दु.४ वाजता पासून पावसाला सुरुवात झाली. बळीराजाला चांगल्या दमदार पाऊसाची अपेक्षा होती. ती आज आलेल्या टपोऱ्या थेंबाच्या या पावसाने त्याला पूर्णत्व मिळाले. या आधी एकाच दिवशी सव्वीस मिलीमीटर पाऊसाची नोंद झाली होती. नंतर पेरणीच्या कामाला गती आली. 

आज दुपारी अचानक आभाळ भरून आले व पावसाला सुरुवात झाली. कपाशी, तूर, सोयाबीन करीता या पावसाची गरज होती. सध्या जमिनीतील बियाणे अंकुरणे सुरु असून, त्यावर पावसाच्या सिडकाव्याची नितांत गरज होतीच. आज झालेल्या पावसाने आता शेती कामाला गती येणार असून, तालुक्यात आलेल्या पावसाने समाधान व्यक्त  होत आहे. 

सिडको एन सहा मथुरानगर भागात ड्रेनेजलाईनचे पाणी रस्त्यावर, सगळीकडे घाणीचे साम्राज्य


सह्याद्री न्यूज | संतोष गढवे 
औरंगाबाद, (ता.२७) : वर्षभरापासुन सिडको एन सहा मथुरानगर कुलस्वामीनी मंगल कार्यालयाच्या मागच्या बाजुस घाणीचे साम्राज्य पसरल्याने परिसरातील नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या वर्षभरापासुन कोरोना या महाभयंकर रोगाने संपूर्ण देशात थैमाण घातलेले असतांना प्रत्येक व्यक्ति हा आपल्या आरोग्यांची विशेष काळजी घेतांना दिसतोय अशी परिस्थिती असतांना महानगरपालीकेच्या दुर्लक्षामुळे सिडको एन सहा मथुरानगर भागातील रस्त्यावर तसेच घरासमोरून नाल्याचे घाण दुर्गंधीयुक्त पाणी वाहत असल्याने परिसरात डास, मच्छर, विविध प्रकारचे किटके वाढल्याने साथीच्या रोगाची नागरीकांना तसेच लहान बालकांना महीलांना लागन झाली आहे. संपूर्ण गल्लीमध्ये ड्रेनेजचे घाण पाणी साचल्याने नागरीकांना ये जा करतांना मोठी कसरत करावी लागते. ड्रेनेजलाईनचे पाणी खुप मोठ्या प्रमाणावर वाहत असुन हेच पाणी पिण्याच्या पाण्याच्या नळाच्या आत जाऊन अस्वच्छ व दुर्गंधीयुक्त पाणी नळाला येत आहे. परिणामी फिल्टरचे विकतचे पाणी घ्यावे लागते त्यामुळे आर्थीक भूर्दड सुद्धा लागतोय. ही परिस्थिती मनपा वार्ड अधिकारी यांना कळवली असता, त्याच्यामार्फत तात्पुरत्या स्वयमरूपाचे काम केले जाते. त्यातही स्थानिक नागरीकांकडून पैसे घेतले जातात. काम झाल्याच्या एक तासानंतर परिस्थिती जेसे थे बघायला मिळते. मथुरानगरमधील हा भाग उताराच्या दिशेने असल्याने संपूर्ण वार्डाचे पाणी उताराच्या दिशेने जाऊन सरळ घरामध्ये शिरते. सद्या  पावसाळ्याचे दिवस असल्याने पाण्याचे लोढे मोठ्या प्रमाणावर वाहतात,भविष्यात या भागामध्ये दुर्घटना घडल्यास याला सर्वस्वी जवाबदार मनपा प्रशासन असेल. पाण्याचा निचरा होण्यासाठी या भागामध्ये नवीन ड्रेनेजलाईन टाकुन अतिरिक्त नविन चेंबर बाधावे व पाण्याचा निचरा चेंबरमध्ये करावा. तसेच सगळा परिसर स्वच्छ करून जंतुनाशक फवारणी या भागात करावी व होणा-या त्रासापासून नागरीकांना मुक्त करावे अशी मागणी मनीष नरवडे जिल्हा अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) विद्यार्थी आघाडी तर्फे महानगरपालीकेला करण्यात आली. मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्यात येईल असा, इशारा मनीष नरवडे यांनी दिला आहे.

सालेभट्टी येथील विविध निकृष्ट कामाची चौकशी करण्यात यावी : लोकप्रतिनिधी यांना निवेदनातून केली ग्रामवासियांनी मागणी

सह्याद्री न्यूज | दिलदार शेख
मारेगाव, (ता.२७) : तालुक्यातील सालेभट्टी, वरुड -गट ग्रामपंचायत मध्ये येणाऱ्या मौजा सालेभट्टी येथील जन विकासाच्या विविध योजनेतील निकृष्ट दर्जाचे बांधकाम करून लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करणाऱ्या ठेकेदार यांना २०२०-२०२१ या सालीचे मंजूर झालेले ठक्कर बाप्पा योजनेतील सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करण्यात येऊ नये, या मागणी चे निवेदन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व वणी विधानसभेचे आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांना देण्यात आले.

सदर निवेदनात सन २०१६-२०१७ ते २०२१ या कालावधीत शासनाच्या विविध योजनेतील साल्लेभटी येथे निकृष्ट दर्जाचे कामे करून लाखोचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी पारदर्शक चौकशी करून संबंधित ठेकेदार व सचिव यांच्या कारवाई करण्यात यावी. तसेच गावात सन २०१६ -२०१७ ते सन २०२०-२१ या कालावधीत शासनाच्या विविध विकास योजनेतील सिमेंट,काँक्रेट रस्ते, बंदिस्त नाल्या, बांधकाम, व्‍यक्तिगत शौचालय, सार्वजनिक शौचालय, बांधकाम यासह विविध विकास कामे केल्या गेली. मात्र, सदरची विकास कामे आज रोजी अस्तित्वात आहे की, नाही हा प्रश्न साल्लेभटी येथील नागरिकांना पडलेला असुन, या निकृष्ट दर्जाचे बांधकाम करून गावातील लोकांना नाहक त्रास दिल्या जात आहे.

रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून नालीच्या बांधकामातील निकृष्ट दर्जा दुर्गंधीला आमंत्रण देत असून, परिणामी गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले. याला सर्वस्वी ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार असुन, तात्काळ बांधकाम थांबवून संबंधित ठेकेदार व ग्रामपंचायत सचिव यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
वेळी उपस्थित गंगधार लोनसावले महाराज, बालाजी टेकाम, शंकर बोन्द्रे, नानाजी येरणे, डोंडू कोरझारे, गणेश लोनसावले यांच्या सह अनेक नागरिक उपस्थित होती.

मार्डी परिसरातील विद्युत पुरवठा सतत 'ऑफ'

                         (संग्रहीत फोटो)

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
मारेगाव, (ता.२७) : तालुक्यातील मार्डी विद्युत सबस्टेशन असणाऱ्या गावाचा विद्युत पुरवठा दर पाच मिनिटाला जाणे येणं करीत आहे. काल झालेल्या पावसामुळे पुरवठा खंडीत झला असून गेल्या १२ तासापासून विद्युत पुरवठा सुरळीत नाही, सध्या वातावरणात उकाडा असल्याने घरात राहणे कठीण  आहे. शिवाय ऑनलाईन शिक्षण व शेतीचा हंगाम सुरु असल्यामुळे शेतमालाला पूरक पाणी सुद्धा देता येत नाही.

तालुक्यात पाऊसाचे प्रमाण कमी असल्याने शेतकऱ्यांना अखंड विद्युत आणि पाणी प्रश्न फार हवालदिल करणारा आहे. सध्या कोरोना या महामारीचे दिवस असल्यामुळे बरेच विद्यार्थी हे ऑनलाइन शिक्षण घेत आहे. मात्र, या मार्डी परिसरातील विद्युत पुरवठा सतत खंडीत होत असल्याने मोबाईल फोन चार्जिंग करायचे कसे व ऑनलाईन शिक्षण कसं घ्यावे असा प्रश्न विद्यार्थ्यांना भेडसावत असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते धनंजय आसुटकर यांनी व्यक्त केले.

मार्डी विद्युत सबस्टेशन असणाऱ्या १५ गावाचा विद्युत पुरवठा जवळपास बंद आहे. ही गोष्ट नवी नाही या अगोदर याच संदर्भात आसुटकर यांनी माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर तो विजेचा लपंडाव काहीसा कमी झाला. परंतु आता थोडसं वातावरण बिघडलं किंवा पाणी पाऊस आला की बत्ती गुल होते. धड पाच मिनिट सुद्धा लाईट टिकत नाहीत.

यामुळे शेतकरी,विद्यार्थी आणि विद्युत वर अवलंबून असणारे व्यावसायिक लोकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. किंबहुना आर्थिक फटकाही बसत आहे. जर ही समस्या अशीच कायम राहली तर विद्युत अधीक्षक अभियंता यांच्याकडे पाठ्पुरावा करून तक्रार करु असे, त्यांनी सांगितले. 

COVID DELTA PLUS VARIANT: कोविड -19 चा डेल्टा प्लस प्रकार काय आहे आणि त्याची लक्षणे कशी?

नवी दिल्ली, (ता.२७) :
लाईफस्टाईल डेस्क | Delta Plus Variant:
देशात कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेचा कहर झाल्यानंतर आता कोविडच्या डेल्टा प्लस व्हेरियंटने दरवाजा ठोठावला आहे. वेगाने विस्तारत असलेला डेल्टा प्रकार आता डेल्टा प्लसमध्ये बदलला आहे. महाराष्ट्रातील एकूण 21 प्रकरणे मुंबईतील 2 चा समावेश आहे. या 21 प्रकरणांपैकी रत्नागिरीमध्ये सर्वाधिक 9 प्रकरणे आढळली आहेत. याशिवाय तामिळनाडू, महाराष्ट्र, पंजाब आणि मध्य प्रदेशमधून 15 ते 20 प्रकरणे आढळली आहेत.

कोरोना डेल्टा प्लस व्हेरिएंट म्हणजे काय

 डेल्टा व्हेरिएंट म्हणजेच B.1.617.2 जो सर्वात आधी भारतात आढळून आला. त्याच्या देखावातील बदलांचा परिणाम डेल्टा प्लस व्हेरियंटमध्ये झाला आहे. ते युरोपमध्ये प्रथम सापडले. स्पाइक प्रोटीन हा कोरोना विषाणूचा एक महत्वाचा भाग आहे. त्याच्या मदतीने, विषाणू मानवी शरीरात प्रवेश करून संसर्ग पसरवते.

सुपर-स्प्रेडरसह डेल्टा प्लस व्हेरिएंट प्रकार

 आतापर्यंत आलेल्या सर्व प्रकारांपैकी, डेल्टा वेगाने विस्तारत आहे. अल्फा प्रकारही अत्यंत संक्रामक असूनही, डेल्टा 60 टक्के अधिक संसर्गजन्य आहे. डेल्टासारखे कप्प्याचे रूप देखील लस देताना पाहिले गेले आहे, परंतु अद्याप फारसे नाही, तर डेल्टा व्हेरिएंट सुपर-स्प्रेड्टर असल्याचे सिद्ध होत आहे.

डेल्टा प्लस व्हेरिएंटची लक्षणं 

 कोरोना विषाणूचे स्वरूप बदलल्यानंतर, लक्षणांमधेही काही बदल दिसून आले आहेत. म्हणूनच त्यांच्याबद्दल जाणून घेणे महत्वाचे आहे.

 डेल्टा प्लस व्हेरियंटच्या सामान्य लक्षणांमध्ये कोरडा खोकला, ताप आणि थकवा यांचा समावेश आहे.

 दुसरीकडे, जर त्याच्या तीव्र लक्षणांबद्दल बोलायचं म्हटलं तर छातीत दुखणे, श्वास लागणे आणि बोलण्यात अडचण येऊ शकते.

या व्यतिरिक्त, WHO च्या आरोग्य अधिकाऱ्यांनी त्वचेवर पुरळ उठणे, बोटाचा रंग बदलणे, घसा खवखवणे, चव गंध कमी होणे, अतिसार आणि डोकेदुखी यासह काही सामान्य लक्षणे नोंदवली आहेत.

Disclaimer: लेखात नमूद केलेले सल्ला आणि सूचना केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहेत आणि व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून घेऊ नये. आपल्याला काही प्रश्न किंवा समस्या असल्यास नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

सौजन्य : जागरण
हिंदीचे मराठी अनुवाद 

वैभवजी स्वामी यांच्या मातोश्रीच्या स्मृतिदिनानिमित्त बीड शहरात वृक्षारोपण



सह्याद्री न्यूज | ऋतुजा सोनवणे
बीड, (ता.२५) : आज शनिवार रोजी बीड शहरामध्ये विविध ठिकाणी वृक्षरोपण कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाचे अतिथी नेते तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई चे औरंगाबाद विभागाचे विभागीय अध्यक्ष तथा दैनिक समर्थ राज योग समूहाची संपादक मा.श्री वैभव जी स्वामी यांच्या मातोश्री जगदेवी स्वामी यांच्या स्मृती प्रित्यर्थ बीड शहरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले.

तसेच ग्रामीण भागांमध्ये देखील विविध ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आली असून, आणखीन दोन ते तीन दिवस हा वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे मत वैभव स्वामी यांनी व्यक्त केले.
आज बीड शहरांमधील मध्यवर्ती ठिकाण असलेले पोलीस अधीक्षक कार्यालय या परिसरात स्वामी साहेबांच्या उपस्थित वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी हितोपदेश वडमारे, किशोर सोनवणे, संजय देवा कुलकर्णी पत्रकार दैनिक समर्थ राज योग तथा सदस्य महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई प्रदेश शाखा बीड जिल्ह्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

कोतवाल संघटनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव, (ता.२६) : महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेची जिल्हा अध्यक्ष शशिकांत निमसटकर यांनी नुकतीच जाहीर केली. २२ जून रोजी यवतमाळ येथे झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष उपस्थित होते. 
यावेळी या नेमणूका करतांना विभागीय समतोल साधत नेमणुका करण्यात आल्या.

यावेळी अध्यक्ष शशिकांत निमसटकर यांनी यवतमाळ येथील मंगेश ढकळे यांची कार्याध्यक्ष म्हणून महागाव येथील सुदर्शन गोस्वामी यांची जिल्हा उपाध्यक्ष राळेगाव येथील उमेश चांदेकर सहसचिव, दारव्हा येथील प्रशांत प्रभाते कोषाध्यक्ष, केळापूर येथील राहुल काळे संघटक तर, पुसद येथील श्रीमती शारदा गायमुखे, अमरावती विभागाच्या विभागीय महिला संघटक म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली .
महिला जिल्हा अध्यक्ष म्हणून राळेगाव येथील छाया दरोडे आणि संगीता काळे तसेच रविना धुळध्वज यांची जिल्हा महिला संघटक म्हणून नेमणूक करण्यात आली.

ओबीसी आरक्षणाकरीता आ.प्रा.डॉ.अशोक उईके यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन

सह्याद्री न्यूज नेटवर्क |
राळेगाव, (ता.२६) : भाजपच्या वतीने आज दि.२६ जून २०२१ रोजी राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात चक्का जाम आंदोलन करण्यात आले.
जिल्हा परिषद पंचायत समिती महानगर पालिका नगरपरिषद नगरपंचायत ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसीचे राजकीय आरक्षण महा विकास आघाडी सरकारच्या ओबीसी द्वेषामुळे आणि नाकर्तेपणामुळे सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्याने रद्द झाले आहे. यासंबंधात सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला सवलतही दिली आदेशही दिला होता ही मागणी विशेष मागासवर्गीय आयोग स्थापन करून एम्पिरिकल डाटा सादर करण्यात यावा. परंतु राज्य सरकारची ओबीसी बाबत असलेली अनास्था द्वेष यामुळे सदर आयुक्त स्थापन करून एम्पिरिकल डाटा कोर्टाने दिलेल्या मुदतीत सादर न केल्यामुळे ओबीसी बांधवाच्या न्याय हक्काचा राजकीय आरक्षणास सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे.

राज्य सरकारमार्फत ओबीसी वर जाणून-बुजून झालेला हा अन्याय ओबीसींचे राजकीय नेतृत्व संपविण्याची हे षड्यंत्र असल्याने या अन्यायाविरुद्ध तसेच सदर आरक्षण पूर्ववत लागू करण्यासाठी महाराष्ट्र भाजपातर्फे राज्य सरकार विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात चक्का जाम आंदोलन आज आयोजित करण्यात आले होते.

त्याच अनुषंगाने राळेगाव येथे माजी मंत्री तसेच आमदार प्रा.डॉ.अशोक उईके यांच्या नेतृत्वात राळेगाव यवतमाळ रोडवर चक्काजाम आंदोलन करण्यात आले व राजकीय दृष्ट्या मागासलेल्या कष्टकरी मध्यम वर्गीय ओबीसी बांधवांनी आरक्षण प्राप्त करून देण्यासाठी सर्व घटकातील समाज बांधवांनी बहुसंख्येने या आंदोलनात सहभाग घेतला व सलग दोन तास रास्ता रोको करून आंदोलन यशस्वी केले.

या वेळी भाजपाचे तालुका अध्यक्ष  चिंतरंजन दादा कोल्हे, जिल्हा महामंत्री ऍड प्रफुलसिंह चौहान, सभापती प्रशांत तायडे, जी.प सदस्या सौ. प्रीतिताई काकडे, सौ.छायाताई पिंपरे, सौ. संतोषिताई वर्मा, सौ.विद्याताई लाड, गजानन लढी, संजय काकडे, अरुण शिवणकर, विनोद मांडवकर, बाळासाहेब दीघडे, संदीप तेलंगे, विशाल पंढरपुरे, सागर वर्मा, विनायक महाजन, आशिष इंगोले, किशोर गारघाटे, शारदानंद, विशाल येनोरकर, जैसवाल, शुभम मुके उपस्थित होते.

ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत करण्याकरिता भाजपचे चक्काजाम आंदोलन

सह्याद्री न्यूज : प्रशांत चंदनखेडे 
वणी, (ता.२६) : ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्ववत करण्याच्या मागणीला घेऊन भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज संविधान चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी ओबीसी समाजाचे आरक्षण परत घेऊनच राहू अशी ठाम भूमिका आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्यासह भाजपच्या नेते मंडळींनी घेतली. यावेळी भाजपच्या नेते मंडळी व पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 
महाविकास आघाडी सरकारच्या दुर्लक्षित धोरणामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण हिरावल्या गेल्याचे भाजपचे म्हणणे आहे. सर्वोच्च न्यायालयात राजकीय आरक्षणाचा मुद्दा लावून धरण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याचा आरोपही भाजपने केला आहे. भाजपने ओबीसींसाठी वेगळं खातं तयार केलं. मग या आरक्षणाचे खरे मारेकरी कोण आहेत, असा प्रश्नही यावेळी भाजप नेत्यांनी उपस्थित केला. सर्वोच्च न्यायालयाने मागासवर्गीय आयोग स्थापन करून ओबीसींचा इम्पेरिकल डाटा सादर करण्यास सांगितले. पण महाविकास आघाडी सरकारने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे न्यायालयाने ओबीसींचे राजकीय आरक्षणच रद्द केले आहे. ओबीसींना जोपर्यन्त पूर्ववत राजकीय आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत भाजचा लढा सुरूच राहणार असल्याचे यावेळी भाजप नेत्यांनी स्पष्ट केले. आंदोलनात मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनेही दिली. आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी रुग्णवाहिका व मालवाहू वाहने जाता यावी व वाहतुकीची कोंडी होऊ नये याकरिता सामंजस्यातून एकेरी वाहतूक सुरु केली. 
आंदोलनात आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, विजय पिदूरकर, दिनकर पावडे, संजय पिंपळशेंडे, श्रीकांत पोटदुखे, गजानन विधाते, व आवारी, शुभम इंगळे यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ओबीसी आरक्षण संपुष्टात आणणाऱ्या केंद्र सरकारचा तालुका काँग्रेस कमिटीकडून निषेध; तहसिल प्रशासनाला दिले निवेदन


सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव, (ता.२६) : स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओबीसी आरक्षण संपुष्टात आणणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध करीत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसील प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

नुकताच सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्था मधील ओबीसी चे आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिला. या सर्व प्रकाराला केंद्रातील मोदी सरकार जबाबदार असून केंद्र सरकारने जाणीव पूर्वक ओबीसी चे आरक्षण रद्द केले असा, आरोप या निवेदनातून करण्यात आला आहे. 
यावेळी बाजार समिती सभापती नरेंद्र पाटील ठाकरे, जि.प.सदस्या अरुणाताई खंडाळकर, तालुका काँग्रेस कमेटी अध्यक्ष मारोती गौरकर, जि. प. सदस्य अनील देरकर, पं. समिती सभापती शितल पोटे, शेख युसूफ शेख नबी, शशिकांत आंबटकर, विनोद आत्राम, यादवराव काळे, यादवराव पांडे, रविंद्र पोटे, रविंद्र धानोरकर, आकाश बदकी, शंकर मडावी, दुष्यंत जयस्वाल आदी उपस्थित होते.

खेती बचाओ, लोकतंत्र बचाओ" देशव्यापी आंदोलनंतर्गत वणी येथे किसान सभेचे आंदोलन

सह्याद्री न्यूज |जयंत कोयरे 
वणी, (ता.२६) : दिल्ली येथील कृषी कायदे रद्द व्हावीत यासाठी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला ७ महिने पूर्ण होण्याच्या अनुषंगाने देशात संविधानिक तरतुदी च्या विरोधात घेण्यात येत असलेल्या धोरणामुळे व केल्या जाणाऱ्या कायद्यामुळे या बाबतीत राष्ट्रपती महोदयांनी लक्ष घालून संविधानाचे रक्षण करावे यासाठी देशव्यापी आंदोलन २६ जून रोजी करण्यात येत आहे, त्याच आंदोलनांर्गत वणी येथेही किसान सभा व माकपचे वतीने एक दिवसीय धरणे व निदर्शने आंदोलन उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयासमोर करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व कॉ. शंकरराव दानव, कॉ. कुमार मोहरमपुरी व कॉ. ऍड. दिलीप परचाके यांनी केले.

देशातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे व भांडवलदारांच्या हिताचे कृषी कायदे करून मोदींच्या भाजप सरकारने भारतीय जनतेला धोक्यात मारण्याचे षडयंत्र चालविले आहे. शेतकरी, कामगार, विद्यार्थी व युवकांच्या विरोधात धोरणे घेत संविधानिक तरतुदी चे विरोधात हुकूमशाही पद्धतीने राजकारभार सुरू आहे. भारत देशाच्या इतिहासात आणीबाणी पुन्हा एकदा लागून राजकारभार सुरू असल्याचे वातावरण आहे. ह्या सर्व प्रकारामुळे या देशात शेतकरी, कामगार, युवक व विद्यार्थी आंदोलनात उतरले आहेत. ह्याच अनुषंगाने दिल्लीच्या सीमेवर शेतकरी गेल्या ७ महिन्यापासून सातत्याने आंदोलन करीत असताना त्यांच्या सोबत कामगार, युवक व विद्यार्थी सहकार्य करीत आंदोलन करीत आहेत. आजच्या आंदोलनात सुद्धा संपुर्ण देशभरात विद्यार्थी, युवक, महिला उतरल्या आहेत.

या आंदोलनाद्वारे मा. राष्ट्रपती यांना निवेदन स्थानिक अधिकाऱ्यांमार्फत सादर करण्यात आले आहे. वणी येथेही माननीय महोदय राष्ट्रपती यांना मा. उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत निवेदन देण्यात आले. 

या आंदोलनात खुशालराव सोयाम, सुधाकर सोनटक्के, गजानन ताकसांडे, रामभाऊ जिड्डेवार, नंदू बोबडे, मनोज काळे, आनंदराव पानघाटे, भास्कर भगत, दशरथ येनगंटीवार, तुकाराम भगत, ऋषी कुळमेथे, वैभव मजगवळी, गंगाराम मेश्राम आदींनी सहभाग घेतला.
या आंदोलनात मोठ्या संख्येने स्त्री पुरुष व युवकांनी सहभाग घेतला.

वणी-यवतमाळ मार्गावर रास्तारोखो, अर्धा तास मार्ग ठप्प

सह्याद्री न्यूज | दिलदार शेख 
मारेगाव, (ता.२६) : स्थानिक स्वराज्य सस्था निवडणुकीतील ओबीसीचे रद्द केलेले आरक्षण पूर्वरत करा या मागणी साठी तालुका भाजपाचे वतीने मारेगाव येथे रास्ता रोखो आंदोलन करुन तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

स्थानिक स्वराज्य सस्था निवडणुका मधील ओबीसी समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच रद्द केले. त्यामुळे ओबीसी समाजात आपला हक्क हिरावला गेला ही भावना निर्माण झाली आहे. राज्य सरकारच्या नाकर्तेपनामुळे ओबीसी समाज आरक्षणापासून वंचित राहिला, असा आरोप भाजपाने केला असून आज राज्यव्यापी आंदोलन केले.

तालुका भाजपा अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे यांचे नेतृत्वात येथील मार्डी चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी वणी-यवतमाळ या जिल्हा मार्ग अर्धा तास रास्तो रोखो आंदोलन करण्यात आले. त्यामुळे एक तास वाहणे रोडच्या दोन्ही बाजुला अडकून पडली होती. त्या नंतर तहसील व पोलिस प्रशासनाला मागण्याचे निवेदन देण्यात आले.

यावेळी आंदोलनात तालुका भाजपा अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, शंकर लालसरे, अनुप महाकुलकर, विलास चिंचूलकर, प्रशांत नांदे, आनंद पचारे, गणेश झाडे, पवन ढवस, सुभाष खडसे, मारोती राजुरकर, मंगेश देशपांडे, सुनिता लालसरे, सविता दरेकर, शोभा नक्षने, सुनिता पांढरे, शालिनी दारुंडे आदीची उपस्थिती होते.
   

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा जयंती सोहळा संपन्न

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (ता.२६) : आरक्षणाचे जनक व थोर समाज सुधारक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त वणी एमआयडीसी परिसरातील राजर्षी शाहू महाराज हिंदी विद्यालयात अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी समस्त शिक्षक व शक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सर्वप्रथम शाहू महाराजांच्या प्रतिमेसमोर दिप प्रज्वलित करून त्यांच्या प्रतिमेला हारार्पण करण्यात आले. त्यानंतर उपस्थित सर्व शिक्षकवृंदांनी त्यांना अभिवादन करून त्यांच्या समाज सुधारणेच्या कार्यावर प्रकाश टाकला. त्यांची शिक्षणासाठीची तळमळ व त्यांनी वंचितांच्या शिक्षणासाठी घेतलेला पुढाकार तसेच शिक्षण क्षेत्रात सर्वप्रथम लागू केले आरक्षण ही त्यांनी केलेली सामाजिक उत्थानासाठीची क्रांती असल्याचे विचार यावेळी शिक्षकांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शुभांगी चोपणे होत्या. कार्यक्रमाचे संचालन अनिता टोंगे यांनी केले. तर आभार प्रदर्शन सुनिल गेडाम यांनी केले.

महागांव पोलिसांची गुटखाविरोधी कारवाई २९ हजार ३०६ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
महागांव, (ता. २६) : महागांव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील महागांव शहरामध्ये मागील अनेक दिवसापासून प्रतिबंधित गुटख्याची साठवणूक करुन लगतच्या खेडेगावात विक्री करण्याचा गोरखधंदा राजरोसपणे सुरु होता. मंगळवारी (ता. २२) रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन सहायक पोलिस निरीक्षक प्रताप भोस व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी शहरातील संशयित आरोपी आकाश विठ्ठल बेलखेडे वय २४ वर्षे रा.महागांव यांच्या राहत्या घरी छापा टाकला असता
एका प्लॅस्टीक बॅगेमध्ये क्रेज तंबाखु जर्दाचे १२० पॉकेट किंमत अंदाजे १८० रूपये प्रमाणे २१ हजार ६०० रुपये, विमल १२ पॉकेट किंमत १९८ रूपये
प्रमाणे २ हजार ३७६ रूपये, व्ही - १ तंबाखु ५४ पॉकेट किंमत ३० रूपये प्रमाणे १ हजार ६२० रूपये, एन ०५ प्रिमीयम जाफरानी तंबाखु २३ पॉकेट किंमत ७० रूपये प्रमाणे १ हजार ६१० रुपये, एस आर - १ तंबाखु ३५ पॉकेट किंमत ६० रूपये प्रमाणे २ हजार १०० रूपये असा एकुण २९ हजार ३०६ रूपयांचा किंमतीचा वेगवेगळ्या कंपनीचा प्रतिबंधित गुटखा आढळला. पोलिसांनी तो गुटखा जप्त करुन (ता. २३) रोजी अन्न व औषध विभागीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात पंचनामा होऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील महागांव व फुलसावंगी ही व्यापारी केंद्र प्रामुख्याने गुटखा व्यवसायासाठी प्रसिद्धी आहेत. तेलंगणा राज्याच्या सीमावर्ती भागात आर्णी येथून गुटख्याचा गड राखला जातो हे सर्वश्रुत आहे. आर्णी येथील काही प्रतिष्ठित मंडळींनी गुटखा व्यवसाय मजबूत केल्याने या बेकायदेशीर व्यवसायाला सुगीचे दिवस आले आहेत. शासनाने प्रतिबंधित केलेले व शरीरास अपायकारक असलेला गुटखा व पानमसाला साठवणूक केलेला गुटखा महागांव शहरात मिळून आल्यामुळे गुटख्याचे मालक महागांव येथील संशयित आरोपी आकाश विठ्ठल बेलखेडे यांच्याविरुद्ध (ता. २३) रोजी अन्न व सुरक्षा अधिकारी गोपाल माहोरे यवतमाळ यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा नोंद करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक विलास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप भोस, चालक प्रविण इंगोले, रायटर नारायन पवार, जमादार विनोद जाधव, पोलिस अमंलदार संतोष जाधव करीत आहे. पोलिसाच्या या कारवाईमुळे प्रतिबंधित गुटखा व्यवसायिकामध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून व्हाईट कॉलर गुटखा व्यवसायिकांनी चार दिवस मैदान सोडून जाण्याचा पवित्रा घेतल्याची माहिती मिळाली आहे. तालुक्याच्या केंद्रस्थानी महागांव येथील गुटखा माफियांच्या सराईत टोळीमधील केवळ एक बडा मासा हाताला लागला आहे. या चौकडीतील इतर पार्टनर अजून तरी मोकळेच आहे.

शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयाचे योगसंस्कार शिबीर संपन्न

                        (संग्रहित फोटो) 

सह्याद्री न्यूज | शंकर घुगरे 
वणी, (ता.२६) : शिक्षण प्रसारक मंडक विध्याळ्यातर्फे दि.१५ जून ते २१ जून २०२१ ह्या कालावधीत सर्व विद्यार्थ्यांसाठी योग्य संस्कार शिबिराचे आयोजन आभासी स्वरूपात करण्यात आले होते. आभासी स्वरूपातील या योह शिबिराच्या माध्यमातून योगासने सूक्ष्म संधी व्यायामप्रकार आणि सूर्य नमस्काराची माहिती व समंत्र सराव घेण्यात आला.

संस्काराच्या दृष्टीने बीजारोपण म्हणून विद्यार्थ्यांपुढे एका सुभाषितांचे वाचन व त्याचा अर्थ सांगणे,प्रार्थना पठण व तिची आवश्यकता समजावणे आणि रोज एक बोधकथा असे स्वरूप ठरवून त्याप्रमाणे त्याचे सादरीकरण करण्यात आले. तसेच दंडस्थिती बैठक स्थिती शयनस्थिती व विपरीत शयनस्थिती करण्यात येणारी आसने,वर्णन,कृती,व फायदयांसह समजावून सांगण्यात आली.

विद्यालयातील श्री.मडावी व गारघाटे सर, सौ.कचवे, नवघरे व मेश्राम या शिक्षकांनी संस्कारक्षम बोधकथा सांगितल्या. शिबिराचे सूत्रसंचालन शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयाचे शारीरिक शिक्षक श्री.किरण बुजोने ह्यांनी केले.

श्री.प्रमोदजी क्षीरसागर मुख्याध्यापक शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय ह्यांनी उद्घाटनपर व समारोपीय उदबोधन करून शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालक मंडळाचे व पालकांचे आभार मानले. सदर उपक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्माच्यारी सहकार्य लाभले आंतरराष्ट्रीय योगदिनी योगासनाच्या सरावनंतर शिबिराची सांगता करण्यात आली..

लाखापूर ते आकापूर रस्त्याची दयनीय अवस्था लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे लक्ष आहेत तरी कुठे?


सह्याद्री न्यूज | विवेक आवारी
मारेगाव, (ता.२६) : तालुक्यातील लाखापूर ते आकापूर या गावाचा रस्ता बहुतांश उखडून गेल्याचे चित्र आहे. तर ठिकठिकाणी खड्डे ही पडलेत. 'एक ना धड भाराभर चिंद्या' अशी अवस्था आहे.

लाखापूर ते आकापूर या रस्त्याकडे संबधीतांचे अजिबात लक्ष नसून दुर्लक्षित असल्याचे लोकं सांगतात. या मार्गाने प्रवास करणे म्हणजे तारेवरची कसरत करणे हेच सध्याचे चित्र पहावयास मिळते आहे. हा 
जवळपास तीन ते चार किमी अंतरा च्या ही पलीकडे या रस्त्याची गिट्टी उखडून कुठे कुठे खड्डे पडले आहे. या मार्गाने जाणाऱ्या येणाऱ्या च्या कमरेत,मानेच्या मणक्यात दुखणे वाढवत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्यांची साधी डागडुग्गी सुद्धा केली नसल्याचे बोलल्या जात आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे लक्ष आहे तरी कुठे?, असा प्रश्न या उखडलेल्या रस्त्याची दयनीय अवस्था पाहून साहजिक च उपस्थित होतो.

वेळेची बचत, आरोग्याच्या दृष्टीने, शालेय विद्यार्थी, तालुक्यातील शासकीय कामं अशा विविध सोयीकरिता मार्ग सुखकर व्हावा या उद्देशाने ग्रामीण रस्ते शहराला जोडले तर गेलेत, मात्र या रस्त्यांची पूर्ण वाट लागली असून या मार्गाने चारचाकी वाहन घेऊन जाणे येणे कठीण काम झाले आहे. सदर रस्ता निदान दगडूग्गी तरी करून द्यावा अशी मागणी आहे.