Page
केंद्राच्या परवानगीशिवायच राज्यात लवकरच घरोघरी जाऊन लसीकरण, ठाकरे सरकार चा निर्णय
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेबाबत आवाहन
कार्ड धारकांना राशन देण्यात यावे : युवक काँग्रेसचा आक्रमक पवित्रा
ओबीसी आरक्षण पूर्ववत करा - ओबीसी न्यायहक्क समितीची मागणी
फ्लिपकार्टकडून ३० आयसीयू व्हेंटिलेटर्सची मदत
तलाठी संवर्गाच्या बदल्यांना २०१९ च्या शासन निर्णयातून वगळण्यासाठी सकारात्मक
आमदार संदीप धुर्वे साहेबांच्या हस्ते गरीबांसाठी जिवनाशक वस्तुचे वाटप
तालुक्यातील कोविड उपाययोजना, खत, बियाणे व पीक कर्जाचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा
सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या प्रयत्नांना यश, गोंडवाना विद्यापीठाद्वारे परीक्षा शुल्कात १० टक्क्याची कपात व २०२१-२२ करिता विद्यापीठाकडून संपूर्ण शुल्क माफ
एकता नगर येथील मटक्यावर पोलिसांची धाड, एका आरोपीला घेतले ताब्यात
आशिया खंडातील सर्वात मोठी महिला फुटबॉल स्पर्धा महाराष्ट्रात
सार्वजनिक गणेशोत्सव २०२१ च्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना जारी
कोल्हापुरच्या मुंबईस्थित दोन समाजसेवकांचा बुलढाणा फिल्म सोसायटीतर्फे सन्मान
शेतमालकांकडून सालगड्याच्या पत्नीचा विनयभंग, घोडधरा येथील घटना
पेट्रोल, डिझेल, गॅसची दरवाढ कमी करा. - राष्ट्रवादी युवक काँग्रेसची पार्टीचा आंदोलनाचा इशारा.
कुपनधारक धडकले महागांव तहसील कार्यालयावर
विठ्ठलवाडी येथील प्रमुख रस्त्याच्या दुरुस्तीकरणाचे काम थांबले, रस्ता अद्यापही डांबरीकरणाच्या प्रतिक्षेत !
कोरोनाची तिसरी लाट थांबविण्यासाठी यंत्रणा सज्ज – पालकमंत्री डॉ.नितीन राऊत
सह्याद्री न्यूज नेटवर्क |
नागपूर, (ता.२८) : कोविडवर मात करण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढविणे आवश्यक असून तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेवून ऑक्सिजन, बेडची व्यवस्था, ग्रामीण तसेच शहरी भागातील सर्व रुग्णालयातील यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्री डॉ. राऊत यांनी कोरोनासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेवून आढावा घेतला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, उद्योग सह संचालक श्री. धर्माधिकारी आदी उपस्थित होते.
कोरोनावर प्रभावी व परिणामकारक उपाययोजना करण्यात आल्यामुळे दुसऱ्या लाटेचा परिणाम कमी होत असल्याचे सांगताना डॉ. नितीन राऊत म्हणाले की, ग्रामीण तसेच शहरी भागात लसीकरणाचा वेग वाढविणे आवश्यक आहे. दररोज ५० हजारपेक्षा जास्त पात्र नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट समोर ठेवून १८ वर्षांवरील युवकांना मोठ्या प्रमाणात लसीकरण करणे आवश्यक आहे. १८ ते ४४ या वयोगटात सरासरी १३ लाख नागरिक असून त्यांना डोज देण्यासाठी मोठ्या प्रमाणात केंद्र सुरु करावे, तसेच शहरातील किमान २५ खासगी रुग्णालयासाठी लसीकरणाची सुविधा निर्माण केल्यास मोठ्या प्रमाणात उद्दिष्ट साध्य होवू शकेल. लसीच्या उपलब्धतेबाबतही यावेळी आढावा घेण्यात आला.
ग्रामीण भागात १८ वर्षांवरील सरासरी ४० टक्के नागरिकांना पहिला डोज देण्यात आला आहे. तर ९ टक्के नागरिकांना दुसरा डोज देण्यात आला आहे. शहरातही मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
शहरात ३० ठिकाणी ऑक्सिजन सेंटर
कोविडच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेवून नागरिकांना सुलभपणे ऑक्सिजन उपलब्ध व्हावे, यासाठी ३० ऑक्सिजन वॉक एन सेंटर सुरु करण्यात येणार आहेत. या सेंटरवर ज्या नागरिकांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे. त्यांना तात्काळ ऑक्सिजन उपलब्ध करुन देण्यात येईल व त्यानंतर जवळच्या हॉस्पिटलमध्ये भरती होण्यासाठी मदत करण्यात येईल. यासाठी १०० कॉन्सनट्रेटर सज्ज ठेवण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार आणखी १०० कॉन्सनट्रेटर जिल्हा निधीमधून खरेदी करण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. राऊत यांनी दिली.
कोविडसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच ग्रामीण रुग्णालयांसाठी आवश्यकतेनुसार ऑक्सिजन उपलब्ध व्हावे, यासाठी ऑक्सिजन निर्मिती सुविधा सुरु करण्यात आल्या आहेत. तसेच द्रवरुप ऑक्सिजन साठविण्यासाठी मध्यवर्ती केंद्र उभारण्यात येणार आहे. तसेच १ हजार ३७५ नवीन ऑक्सिजन सिलेंडर खरेदी करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले. जिल्ह्यासाठी दररोज १६० मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता असून यामध्ये तीनपट जास्त ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे.
तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी अमरावती रोड येथे ६०० बेड्स नव्याने उपलब्ध होणार असून शहरात एकूण १ हजार ८०० बेड्स उपलब्ध होतील. त्यामुळे कोविड रुग्णांच्या उपचारासाठी अडचणी येणार नसल्याचे महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सांगितले. यामध्ये सुमारे दोनशे खाटा बालकांसाठी राखीव ठेवण्याचे नियोजन आहे.
जिल्ह्यात नवीन प्रकारचे कोविड रुग्ण आढळले असून यामध्ये उमरेड येथे आठ तर नागपूर येथे चार रुग्णांचा समावेश आहे. या रुग्णांच्या कोविड तपासणीचे नमुने एनआयव्ही, पुणे येथे पाठवून तात्काळ रिपोर्ट मिळेल यादृष्टीने नियोजन करावे, अशा सूचना यावेळी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिल्या.
कोरोनाची तिसरी लाट थांबविण्यासाठी प्रशासनातर्फे आवश्यक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. जनतेने प्रशासनाच्या सूचनांचे पालन करुन जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे,असे आवाहन यावेळी करण्यात आले.
पावसाळी अधिवेशनासाठी ३ व ४ जुलै रोजी आरटी-पीसीआर चाचणी
कुलरचा शॉक लागून महिलेचा मृत्यू, राजूर ईजारा येथील घटना
२५ लाखाचा बकरा बनला चर्चेचा विषय, तसे झळकले गावात पोस्टर
'गंगुबाई काठीयावाडी' ची शूटिंग पूर्ण
सरपंच परिषदेच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट
सह्याद्री न्यूज नेटवर्क |
मुंबई, (ता. २८) : सरपंच परिषद मुंबईच्या एका १४ सदस्यीय शिष्टमंडळाने प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सोमवारी (दि २८ जून) भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.
पंधराव्या वित्त आयोगातील निधीतून गावाचा विकास होण्यासाठी उपलब्ध निधी केवळ विकास व पायाभूत सुविधा यांवर खर्च करण्यात यावा, मुंबई येथे सरपंच भवनाची निर्मिती करण्यात यावी तसेच कोरोनामुळे निधन झालेल्या राज्यातील ३५ पेक्षा अधिक सरपंचांच्या कुटुबिंयाना आर्थिक मदत देण्याची मागणी शिष्टमंडळाने केली.
यावेळी सरपंच परिषद मुंबईचे विश्वस्त अविनाश आव्हाड, राजाराम पोतनिस, आनंद जाधव तसेच अश्विनीताई थोरात यांसह सहा महिला सरपंच देखिल उपस्थित होते.