सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : मच्छिन्द्रा गट ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्रीधरराव श्रीपत पेंदोर (वय ८०) यांचे ता. १३ रोजी सकाळी साडे दहा वाजता वृध्दापकाळाने निधन झाले.
त्यांचे पश्चात दोन विवाहित मुलगे व दोन स्नुषा, नातवंडे असा परिवार आहे.
वेटर्नरी सुधाकर पेंदोर व बाजार समिती चे कनिष्ठ लिपिक अरुण पेंदोर हे त्यांचे सुपुञ होत. तसेच रोजगार सेवक शैलेश व शुभम पेंदोर हे त्यांचे नातू होत.
सन १९८५ मध्ये कै. श्रीधर पेंदोर मच्छिन्द्रा गट ग्रामपंचायतचे सरपंच होते. सलग दहा वर्ष त्यांचे कारकीर्दीत विहीर, रस्ता, शाळा इमारत बांधकाम, गावठाण तसेच अनेक लोकांभिमुख कामे मार्गी लावली आहेत. येथील स्मशानभूमित कै. पेंदोर यांचे पार्थिवावर शोकाकूल वातावरणात साडेपाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.