Page

वणी आणि नागपूर अशा दोन्ही ठिकाणी ऑनलाइन नामांकन दाखल करणारा एकमेव उमेदवार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : राजकीय प्रचारासाठी मोठ्या निधी, विपुल संसाधने आणि प्रभावी पाठिंबा लागतो, अशी एक समजूत आहे. पण या धारणेला आव्हान देत केतन नत्थुजी पारखी, वणीचा एक सॉफ्टवेअर अभियंता, नागपूरसारख्या मोठ्या शहरात विधानसभा निवडणुकीत उतरला आहे. त्याच्याकडे कुठलाही आर्थिक पाठिंबा, मोठे नाव किंवा राजकीय वारसा नाही. मात्र, दृढनिश्चय आणि सर्जनशील दृष्टिकोन यांच्या जोरावर तो लढा देत आहे. पारंपरिक जाहिरातींऐवजी केतनने डिजिटल माध्यमांचा वापर करत, अगदी शून्य खर्चात लोकांपर्यंत पोहोचण्याचे तंत्र अवलंबले आहे. विशेष म्हणजे, तो वणी आणि नागपूर अशा दोन्ही ठिकाणी ऑनलाइन नामांकन दाखल करणारा एकमेव उमेदवार आहे.

पार्श्वभूमी :
वणी सारख्या तालुक्याच्या ठिकाणावरून आलेला केतन हा एक सॉफ्टवेअर अभियंता आहे. तो एका हायपर-लोकल मीडिया स्टार्टअपचा संस्थापक देखील आहे, ज्यामुळे त्याला समाजाच्या विविध स्तरांशी थेट संवाद साधण्याचा अनुभव आहे. शहरातील विकासाचे प्रश्न आणि स्थानिक गरजांची त्याला पूर्ण जाण आहे. असे असले तरी, आर्थिक पाठिंबा किंवा मोठे समर्थक नसल्यामुळे निवडणूक लढवण्याचे स्वप्न त्याच्यासाठी आव्हानात्मक होते. परंतु त्याला त्याच्या डिजिटल कौशल्यावर पूर्ण विश्वास होता, आणि त्याने त्याचा उपयोग लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी केला.

केतन पारखी याला तरुणांना एक संदेश द्यायचा आहे की, कोणत्याही नेत्यासाठी काम करण्यापेक्षा त्यांनी स्वतः निवडणुकीत उतरणे आणि समाजासाठी पुढे येणे आवश्यक आहे. त्याला विश्वास आहे की अशा प्रकारेच नवे नेतृत्व उदयास येईल, आणि बदल घडवून आणण्याची क्षमता असलेल्या तरुण पिढीला खरे मार्गदर्शन मिळेल.

बंडखोर उमेदवारांची मनधरणी, रिंगणातील उमेदवारांची वाढवणार डोकेदुखी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकीत आयारामांना उमेदवारी दिल्याने राज्यातील अनेक मतदार संघात बंडखोरी पहायला मिळत असून 76- वणी मतदार संघात सुद्धा कमालीची बंडखोरी झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. 

यामध्ये काँग्रेसचे संजय खाडे, एमआयएमचे आसिम हुसैन मंजूर हुसैन, वंचित बहुजन आघाडीचे हरीश पाते, आपचे निखिल धर्मा ढुरके यांनी बंडखोरी करत अपक्ष नामांकन अर्ज दाखल केला आहे. 
गेल्या काही दिवसापासून वणी विधानसभा क्षेत्रात राजकीय वातावरण चांगलेच गरम असल्याचे दिसून येत असून ते काही केल्या थंड व्हायचे नाव घेत नाहीये. महाविकास आघाडीच्या उमेदवाराने आपली उमेदवारी दाखल केली, यादरम्यान अनेक नेते, पुढारी, पदाधिकारी व कार्यकर्ते या क्षणी उपस्थित होती, परंतु एक दोन बड्या नेत्याच्या अनुपस्थितीने वणीच्या राजकारणाचं वातावरण जस काही "इसकी टोपी उसके सर"...असं वाटत असल्याचे बोलल्या जात होत. खरंतर वणी मतदार संघासाठी उमेदवार यावेळी कर्ता, अनुभवी, दूरदृष्टी व जनतेशी नाळ जुळवून घेणारा हवा, अशी या रणधूमाळीने चर्चा रंगू लागल्या आहे. त्यामुळे बंडखोर उमेदवारांची मनधरणी, रिंगणातील उमेदवारांची डोकेदुखी वाढवणार का? किंबहुना बंडखोरांना थोपवण्याचे तगडे आव्हान उमेदवारांना असणार आहे. 
विशेष उल्लेखनीय की, यावेळीची निवडणूक मागील लोकसभेची पुनरावृत्ती इथं होऊ नये म्हणजे झाले, कारण हीच वेळ असल्याने कोण? कोणाची "जिरवेल" आणि "मिरवेल" हे येत्या 23 नोव्हेंबर ला पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहेत.

हरीश दिगांबर पाते अध्यक्ष, उम्मेदवारी अर्ज अपक्ष

सह्याद्री चौफेर । वृत्तसंस्था 

वणी : अध्यक्ष हरीश दिगांबर पाते यांनी मंगळवारी २९ ऑक्टोबर रोजी उपविभागीय कार्यालय वणी येथे आपले नामांकन अर्ज भरला आहे. 

यावेळी अर्चनाताई कांबळे, विशाखाताई लोखंडे, बेबीताई गाडगे, मधुमती वाळके, रजत सातपुते, रविंद्र कांबळे, सत्तार शेख, देवानंद झाडे, गौतम जीवने, प्रशांत गाडगे, सचिन मडावी, प्रशांत मडावी, पुखराज खैरे, शिवाजी दूपारे, आकाश बोरकर, अनिल पथाडे, बुद्धघोष लोणारे, नरेंद्र वाळके, गोलू गारघाटे, रवी विरुरकर, विनोद डुंबरे, हर्षल चामुलवार, दीपक उमरे, राणू कुमराम, राहुल दोरखंडे यासह असंख्य समर्थकांची उपस्थिती होती.
वणी विधानसभेच्या निवडणुकीत जनतेचा विश्वास जिंकून मतदार संघाच्या विकासासाठी आणि एसी, एसटी ओबीसी प्रवर्गातील जनतेला न्याय देण्यासाठी जे धोरण आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेला लढ्याला बळ मिळेल त्याकरिता दिनांक २९ ऑक्टोबर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून असंख्य कार्यकर्त्याच्या साक्षीने हरीश दिगांबर पाते यांनी अपक्ष उमेदवार म्हणून नामांकन अर्ज दाखल केला आहे. 
हरीश पाते उम्मेदवारी अर्ज अपक्ष भरून निवडणूक लढवत असल्यामुळे होऊ घातलेली वणी विधानसभा मतदार संघाची निवडणूक ही अतिशय चूर्षीची होणार आहे.

30 वर्षीय युवकाची विष प्राशन करून आत्महत्या

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मारेगाव पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या वडगाव येथील शेतकरी पुत्राने शेतामध्ये जाऊन विषाचा घोट घेत आपली जीवन यात्रा संपवली. ही घटना मंगळवार, दि.29 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. या दुःखद घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. 
राहुल अंबादास ठावरी (वय 30) रा. वडगाव असे विष प्राशन केलेल्या युवकाचे नाव आहे. त्याला मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. गेल्या आठ ते दहा वर्षापासून राहुल स्पर्धा परीक्षेची वणीत तयारी करत होता. सोबत ग्राऊंड वर प्रॅक्टिस करायचा,काल स्वगृही आला आणि त्याने टोकाचे पाऊल उचलत गावा शेजारी असलेल्या शेतात विष प्राशन करून जगाचा निरोप घेतला. वृत्त लिहे पर्यंत कारवाई व्हायची होती. 
मागील काही दिवसापासून मारेगाव तालुक्यात आत्महत्येचे प्रमाण वाढले असून राहुल याच्या आत्महत्येचे मात्र,कारण अस्पष्ट असून मृतकाच्या पाठीमागे आई, वडील, एक भाऊ, असा परिवार आहे.

राष्ट्रवादी मधून उद्धवसेनेत घरवापसी

सह्याद्री चौफेर । वृत्तसंस्था 

मारेगाव : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पक्षामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून राजकारण चालू असून या राजकारणाचे बळी कार्यकर्ते होत आहे. त्यामुळे आपल्या सोबतही राजकारण होऊ नये म्हणून व शेतकरी पुत्र नात्याने शेतकऱ्याची वाहतात बघता राष्ट्रवादीला सोडचिट्टी देत कोसरा येथील उपसरपंच सचिन पचारे यांनी विचार केला आणि शिवसेनेत (उबाठा) घरवापसी करत आज (ता. 29) ला खा. संजय देशमुख (यवतमाळ-वासीम) व राजेंद्र गायकवाड (यवतमाळ जिल्हा संपर्कप्रमुख) यांच्या उपस्थितीत अनेक कार्यकर्त्यांसह वणी येथे प्रवेश घेतला. यामध्ये अतुल पचारे, कडू पाटील, राजू येरेकर, सुमित पचारे, कुंडलिक पचारे, राजू पचारे, शंकर पचारे, दादा पचारे, दिलीप येडमे, महेश पाटील, व असंख्य कार्यकर्त्यासह उद्धव बाळासाहेब ठाकरे च्या शिवसेनेत प्रवेश घेतला आहे. 

मनसेचा प्रचार झंजावात: राजु उंबरकर यांना विधानसभेत पाठविण्यासाठी कार्यकर्ते लागले कामाला


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : होऊ घातलेल्या विधान सभेच्या निवडणूकीचे बिगूल वाजताच राजु उंबरकर यांच्या कार्यकर्त्याकडून जोरदार प्रचाराला सूरूवात झाल्याचे चित्र खेडोपाडी पहायला मिळत आहे. उंबरकर यांना विधानसभेत पाठविण्यासाठी अख्खे कार्यकर्ते कामाला लागल्याचे दिसून येत आहे. नुकतेच मनसेचे नेते राजु उंबरकर यांनी उमेदवारी दाखल केल्यानंतर वणी विधानसभा मतदार संघांत विरोधकांच्या तुलनेत आमदार म्हणून राजु उंबरकर फिक्स असे बोलल्या जात आहे.
  
वणी मतदार संघात राजु उंबरकर यांची अल्पावधीतच ओळख कार्यसम्राट कार्यकर्ता म्हणून आहे. 18 ते 20 वर्षांच्या कार्यकाळातील सामाजिक कार्याची ही ओळख त्यांना यश देणार असुन त्यांचा साधेपणा व ते मतदार संघात करत असलेले कार्य विरोधकांवर भारी पडणार असल्याने कितीही रान ऊठवले तरी, बाजी राजु उंबरकरच मारणार असे बोलल्या जात आहे. मतदार संघातील रहिवासी असल्याने त्यांना मतदार संघातील अनेक समस्या माहीत आहे. आपल्या कार्याच्या जोरावर त्यानी मतदार संघात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. लोकांसमोर जाणे त्याचे सोबत बसणे चर्चा करणे आणि जागच्या जागी प्रश्न सोडविणे असे त्याच्या कार्याची पद्धत आहे. जी लोकांना ही पटत आहे. त्या मुळेच राजु उंबरकर आमदार बनण्याशाठी कारणीभूत असून कार्यकर्तेही कामाला लागले आहे. उंबरकर यांनी मतदार संघातील बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी रोजगार मेळावे घेतले. नागरिकाच्या होणाऱ्या हालअपेष्टा लोकं दरबारी लाऊन जागच्या जागीच सोडवितात म्हणून नागरीक देखील त्यांच्याकडे आशेने ने पहात असल्याचे दिसून येत आहे. 

वणी विधानसभा मतदार संघात मनसे चे उमेदवार राजु उंबरकर विजयी होणार यासाठी मनसैनिकांनी कंबर कसल्याचे कार्यकर्त्यातून बोलल्या जात आहे. वणी, मारेगाव, झरी, मुकुटबन, पाटण शहरासह ग्रामीण भागामध्ये कार्यकर्त्यांनी मतदारांच्या घराघरापर्यंत जाऊन त्यांच्या भेटीगाठी घेत पक्षाच्या व उमेदवारांच्या भूमिका विषद करण्यावर भर देत असल्याचे दिसून येत आहे.

बिगर सातबारा शेतकरी संघटना उतरली वणी विधानसभेच्या रिंगणात , ओबीसी नेते वाटगुरे यांनी केला नामांकन दाखल

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या वतीने वणी विधानसभे च्या निवडणुकी करीता ओबीसी नेते तथा बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष देवराव वाटगुरे यांनी नामांकन अर्ज दाखल केला असुन दलीत आदिवासी भूमिहीन बेघर ओबीसी गरीब मराठा तथा सातबारा नावावर नसलेल्या शेतकऱ्यांच्या आणि मूलभूत प्रश्न घेऊन प्रचार करणार असल्याची प्रतिक्रिया संघटनेचे प्रणेते भाई जगदिश कुमार इंगळे यांनी दिली.

यावेळी बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या महिला अध्यक्षा तथा शामादादा कोलाम ब्रिगेड च्या प्रदेश अध्यक्षा सौ इंदिरा बोंदरे मां जिजाऊ संघर्ष समितीचे संस्थापक तथा बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय कार्यअध्यक्ष डा सुखदेव कांबळे समशेर सिंग भोसले फासे पारधी समाजाचे संस्थापक अध्यक्ष तथा बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष विलास पवार यांची उपस्थिती होती.

प्रचंड गर्दीच्या साक्षीने संजय देरकर यांची उमेदवारी अर्ज दाखल

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : वणी विधानसभा मतदारसंघासाठी संजय देरकर यांनी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून उबाठा मधून मंगळवारी (दि.२९) जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी वणी, मारेगाव, झरी-जामणी तालुक्यातील हजारो कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.

यावेळी काँग्रेस चे नेते वामनराव कासावार, खा. संजय देशमुख (यवतमाळ वासीम), शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विजय नगराळे, संजय निखाडे, सुनील कातकडे, दीपक कोकास, काँग्रेस च्या अरुणाताई खंडाळकर, महिला जिल्हा संघटिका डीमनताई टोंगे, साधनाताई गौरकार, टिकाराम कोंगरे, घनश्याम पावडे, मारोती गौरकार,आशिष खुलसंगे, राजेश कासावार, सुधीर थेरे, अजिंक्य शेंडे, यांच्यासह महाविकास आघाडीचे बडे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच ग्रामीण भागातून आलेला जनाधार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

संजय देरकर यांच्या उमेदवारीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार पक्ष), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे हजारो कार्यकतें स्थानिक जत्रा मैदान येथे उपस्थित होते. दरम्यान संजय देरकर यांनी रंगनाथ स्वामी मंदिर, भगत सिंग चौक, गांधी चौक, खाती चौक, छत्रपती शिवाजी महाराज, अशी रॅली जोरदार शक्तीप्रदर्शन व नागरिकांना अभिवादन करत शासकीय मैदान पाण्याची टाकी जवळ सभेत रूपांतर झाले. तत्पूर्वी शहरात अलोट गर्दी उसळली होती. जिकडे तिकडे महाविकास आघाडी चे झेंडे, दिसत असल्याचे चित्र पहायला मिळाली. 

यानंतर निवडणूक अधिका-यांकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काढण्यात आलेल्या समर्थन रॅलीत मतदारसंघातील महाविकास आघाडीचे हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी एकच चर्चा ऐकायला मिळत होती ती म्हणजे काल पेक्षा आज तीनपट पब्लिक होती.

नगराध्यक्ष डॉ. मनिष मस्की यांच्या निवासस्थानी खा. संजय देशमुख भेट

सह्याद्री चौफेर | वृतसंस्था 

मारेगाव : येथील नगरपंचायत चे नगराध्यक्ष डॉ मनिष मस्की यांच्या निवासस्थानी यवतमाळ वाशीम लोकसभा क्षेत्राचे खा. संजय देशमुख यांनी भेट देऊन होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकीचा आढावा घेण्यात आला. 

या बैठकीला महाविकास आघाडी चे उमेदवार संजय देरकर, जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्रजी गायकवाड, शिवसेना (उबाठा) चे सुनील कातकडे, युवा सेना जिल्हाप्रमुख अमोल धोपेकर, सौ.नेहा मनीष मस्की, मयूर ठाकरे, गणेश आसुटकर, रवी कुचनकर, लक्ष्मीकांत देठे, पंकज नेहारे, अतुल मस्की, अमोल झोटिंग आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. 

मारेगाव तालुक्यातील शिवसैनिक डॉ. मनिष मस्की यांच्या घरी यवतमाळ वासिम लोकसभा क्षेत्राचे खासदार संजय देशमुख यांनी दि. 27 ऑक्टोबर रोजी दुपारी सदिच्छा भेट दिली. यामुळे या बैठकीकडे सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या, नेमकं काय होणार राजकीय घडामोडी घडणार यावर तालुका वासियांचे लक्ष वेधले असताना संजय देशमुख यांनी महाविकास आघाडी चे उमेदवार संजय देशमुख यांच्या पाठीशी आपण सर्वांनी खंबीरपणे उभे राहून त्यांना विधानसभेत भरघोस मताने निवडणूक पाठवायचे आहे अशा सूचना दिल्याचे माहिती आहे. खासदार संजय देशमुख हे वणी विधानसभेच्या दौऱ्यावर होते, यावेळी यांनी डॉ मनिष मस्की यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली, यावेळी सौं नेहा मनिष मस्की यांनी त्यांचं शाल व श्रीफळ देऊन सत्कार व स्वागत केले. 

दरम्यान, या सदिच्छा भेटीत वणी विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने दहा ते पंधरा कार्यकर्त्यासोबत महत्वाच्या विषयावर चर्चा केली असे डॉ मस्की यांनी सांगितले. यावेळी मारेगाव तालुक्यातील उद्धवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते. 

संजय खाडेंना विधानसभेची तिकीट मिळाली नाही तर, सांगलीचा "विशाल पाटील" पॅटर्न राबविणार का?

सह्याद्री चौफेर | वृतसंस्था 

वणी : शिवसेना (उबाठा) ला वणी मतदार संघाची उमेदवारी जाहीर केल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. यामुळे काँग्रेस मध्ये नाराजी चा सूर असून संजय खाडे हे सांगलीचा विशाल पाटील पॅटर्न राबविणार का? यावर मतदार संघात विविधांगी चर्चा होत आहे. 

मागील काही दिवसापासून उमेदवारी वरून वणी मतदार संघात नाट्य सुरु आहे. भाजपा ने उमेदवार जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडी चा कोण असणार याकडे जनतेचे लक्ष लागले होते. दरम्यान, संजय खाडे हेच काँग्रेस चे उमेदवार असणार अशी चर्चा वणी विधानसभा क्षेत्रात होती. संजय खाडे यांच्या जनहितार्थ उपक्रमाने नागरिकही त्यांच्या कडे नवा चेहरा या अपेक्षेने पाहत होती. तिकडे निवडणुकीचा बिगुल वाजला आणि वणी विधानसभा मतदार संघातील पक्षाचे कार्यकर्ते बुलेट ट्रेन सारखे दिल्ली तर कधी मुंबई सुसाट पळू लागले. इकडे महाविकास आघाडी चा उमेदवार संजय खाडे हेच असतील म्हणून समर्थक काँग्रेसचे स्टेशन पकडून बसली होती, मात्र ऐन वेळेवर शिवसेनेने उमेदवारांची यादी जाहीर करून राजकीय वादळ उठले. महाविकास आघाडी च्या वरिष्ठांच्या वतीने नाराजी होऊ लागली. त्यामुळे आघाडीचा तिढा वाढला जो आजही कायम दिसत असून '90' चा फार्मुला ठरला असला तरी काँग्रेस चा वणी साठी असलेला दावा शिवसेना (उबाठा) ने उधळून लावत काही उमेदवार जाहीर केले. यात वणी ची उमेदवारी संजय देरकर यांना मिळाल्याने आणखीनच काँग्रेस च्या जिव्हारी लागल्याने वणीच्या राजकारणात चांगलाच गोंधळ उडाला आहे. 

वसंत जिनिंग चे अध्यक्ष आशिष खुलसंगे यांनी एका वृत्त वहिनीला बोलताना सांगितलं की, वरिष्ठाना विश्वासात न घेता उमेदवार जाहीर केली. जेव्हा उमेदवार आम्हाला भेटायला आले तेव्हा आम्ही अस्वस्थ झालो असेही त्यांनी म्हटलं आहे. आज उबाठा ला उमेदवारी मिळाली त्याबाबत आम्ही सहमत नाही,ती उमेदवारी काँग्रेस ला असायला पाहिजे होती. वणी काँग्रेस चा बालेकिल्ला असून काँग्रेसचे भक्कम मतदान आहे, महाविकास आघाडी ची निवडून येणारी शीट आहे. त्यामुळे वणी मतदार संघाची उमेदवारी ही काँग्रेस मिळायची पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली आहे. त्यामुळे वणीतून काँग्रेस उमेदवार नसल्यास बंडखोरीचे संकेत दिसून येत आहे. काँग्रेस चे संजय खाडे हे "सांगलीचा विशाल पाटील" पॅटर्न राबविणार अशी महिती 'सह्याद्री चौफेर' ला बोलताना खुद खाडेंनी दिली आहे. त्यामुळे संजय खाडे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास वणी विधानसभेची लढत ही चौरंगी होईल असे बोलले जात आहे.

वणीत सांगली पॅटर्न राबवणार

गेल्या दोन वर्षांपासून मी मतदारसंघ पिंजून काढला आहे. वणी विधानसभा क्षेत्र हा काँग्रेसचाच बालेकिल्ला होता. व काँग्रेसचाच या जागेवर दावा होता. मात्र ही जागा शिवसेना (उबाठा) च्या वाटेला गेली. यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी पसरली आहे. कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळेच व त्यांच्या आग्रहास्तव मी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.

 - संजय खाडे


संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे जल्लोषात उमेदवारी दाखल



सह्याद्री चौफेर | वृतसंस्था 

वणी : आज दि. २८ ऑक्टोबरला वणी विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी चे उमेदवार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी वणी, मारेगाव, झरी तालुक्यातील हजारो च्या संख्येने समर्थक,कार्यकर्ते नामांकन रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

उपस्थितांनी विजयी शंखनाद घोषणांनी संपूर्ण आसमंत दणाणून सोडला होता.
याप्रसंगी संजीवरेड्डी बोदकुरवार उमेदवार म्हणून आणि प्रल्हाद सिंग पटेल, केंद्रीय मंत्री, दिनकर पावडे, तारेंद्र बोर्डे, रवी बेलूरकर, अविनाश लांबट, संजय पिंपळशेडे, विजय पिदूरकर, नितीन रासेकर, विशाल किन्हेकर, मनीष गायकवाड, श्रीकांत पोटदुखे,शंकर लालसरे, ज्ञानेश्वर चिकटे यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते व लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

घोन्सा परीसरात कोंबडबाजारासह जुगार

सह्याद्री चौफेर | वृतसंस्था 

वणी : मुकूटबन पोलीस स्टेशन अतर्गत येत असलेल्या घोन्सा परीसरात खुलेआम कोंबडबाजार सुरू असुन या बाजारात अवैध जुगार ही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. घोन्सा परीसरात कोंबडबाजार भरविण्यासाठी परवानगी दिल्याने कोंबडबाजार ठेकदाराने कोंबडबाजार खुलेआम सुरू केला आहे. अवैध धंदेउच्चाटन करण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षकांचे मनोधर्य केवळ नाममात्र ठरले असुन दररोज या ठिकाणी कोंबडबाजार भरविला जात आहे. विशेष म्हणजे या कोंबडबाजारात कोंबडच्या झुंजी लावण्यासाठी पंचक्रोशीतील जुगारी या बाजारात येताना दिसत आहे. 

कोंबडबाजारासह यामध्ये पत्याचे डाव मांडले जातात यात अंदर बाहर, एक्का बादशहा, तीन पत्ती चे खेळ खेळविले जात आहे. हा बाजार चांगलाच फुलला असुन बिट जमादारही या बाजारात आपले नशीब आजमवत असल्याचे बोलल्या जात आहे. घोन्सा परीसरात शेतकरी शेतमजुर मोठ्या संख्येने असुन या ठिकाणी आदिवासीबहुल परीसर आहे. या परीसरात अवैध दारू मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे. मात्र,पोलीस या सर्व गंभीर बाबीची दखल घेत नाही.

आरोपिंना दोन दिवसाची पोलीस कोठडी


सह्याद्री चौफेर | वृतसंस्था 

मारेगाव : मारेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील कुंभा-बोटोणी मार्गांवरील श्रीरामपूर नजीक 24 ऑक्टोबरला रात्रीच्या सुमारास एका इसमाचा दुपट्याने गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली होती. सदर प्रकरणातील आरोपीस दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. 

भीमराव तुकाराम मडावी (वय 31) रा. बाबई पोड (श्रीरामपूर) असे या घटनेत हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार बाबई पोड (श्रीरामपूर) येथील भीमराव तुकाराम कोडापे (वय 31) यांचा कुंभा येथील महादेव पुसदेकर व संतोष पडोळे यांचेसोबत वाद झाला. त्यानंतर भीमराव रात्री उशीरा आपल्या गावाकडे परत जात असतांना मार्गात असलेल्या उलमाले यांचे शेताजवळ संशयित महादेव पुसदेकर व संतोष पडोळे या दोघांनी भीमराव याचा दुपट्याने गळा आवळून हत्या केली. पोलिसांनी कलम 103 (1),3(5) नुसार गुन्ह्यांची नोंद करीत तपासाची चक्रे फिरवून संशयित आरोपी महादेव पुसदेकर (वय 32) व संतोष पडोळे (वय 29) दोघेही रा.कुंभा, यांना अटक करून ताब्यात घेतले. आरोपीस दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. 

अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांचे मार्गदर्शनात ठाणेदार संजय सोळंके यांचेसह जमादार अजय वाभीटकर रजनीकांत पाटील हे करीत आहे.

वणी मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी


सह्याद्री चौफेर | वृतसंस्था 

वणी : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १५ ऑक्टोबरपासून आचार संहिता लागू झाली आहे. या नियमांनुसार, निवडणूक निकाल लागेपर्यंत शहरात लावलेले राजकीय पक्षांचे बॅनर, पोस्टर आणि फ्लेक्स बोर्ड काढण्याची जबाबदारी नगर परिषदेची आहे. 

मात्र, वणी शहरातील यात्रा मैदान परिसरात सार्वजनिक शौचालय आणि गाळ्यांच्या भिंतीवर असलेले एका राजकीय नेत्याचे पोस्टर अद्याप काढले गेले नाही. 

याबद्दल जबाबदार असलेल्या मुख्याधिकाऱ्यांवर आचार संहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता रवींद्र धर्मराव कांबळे यांनी वणी विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करून केली आहे.

संजय देरकर यांचं वणी मध्ये जंगी स्वागत, नागरिकांचे मानले आभार

सह्याद्री चौफेर | वृतसंस्था 

वणी : वणी विधानसभा मतदार संघात उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी रस्सीखेच सुरु होती, काँग्रेस असो की शिवसेना अनेकांनी दिल्ली मुंबई वारी केली. मात्र, शिवसेना (उबाठा) च्या वतीने यादी जाहीर करून संजय देरकर यांना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांचं वणीमध्ये ढोल ताशांच्या गजरासह जंगी स्वागत करण्यात आलं. 
संजय देरकर आज मुंबईहून वणीला आल्यानंतर नंदेश्वर देवस्थान ते त्यांच्या निवासस्थानापर्यंत समर्थक, कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने उपस्थिती दर्शवली होती. यावेळी महाविकास आघाडी तसेंच शिवसैनिकांनी अतिशय उत्साहवर्धक व आत्मीयतेने भेट घेऊन त्यांचे शुभेच्छा सह अभिनंदन केले. निवडणुकीचा बिगुल वाजताच वणी विधानसभा मतदार संघात उमेदवारीवरून रण पेटले होते. मात्र, तरीही संजय देरकर यांना उमेदवारी मिळणार अशी चर्चा सुरु होती. त्यानंतर महाविकास आघाडी तथा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे माझा नक्की विचार करतील, असा विश्वास संजय देरकर यांना बोलून दाखवला होता.
मुंबई वरून आल्याआल्याच संजय देरकर यांचं वणी मध्ये जंगी स्वागत करण्यात आले, यावेळी संजय देरकर यांनी सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेवून छञपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्व. बाळासाहेब ठाकरे, संत जगन्नाथ महाराज, मुराद अली दर्गा, जय भिवसन देव या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नागरिकांचे त्यांनी मनपूर्वक आभार मानले.
 

महाविकास आघाडीचे सर्वाधिक उमेदवार निवडून येतील: 
वणी विधानसभा मतदार संघाची उमेदवारी मला मिळाली, आनंदाची गोष्ट आहे. सर्वांचे आशीर्वादामुळे हे झाले. परंतु महाविकास आघाडी चा उमेदवार म्हणून आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मी निवडून येणार आहे. त्याच सोबत विदर्भात महाविकास आघाडी चे सर्वाधिक उमेदवार निवडून येतील असा विश्वास संजय देरकर यांनी व्यक्त केला.

हजारो समर्थकांच्या उपस्थितीत राजू उंबरकर यांनी भरला उमेदवारी अर्ज

सह्याद्री चौफेर | वृतसंस्था 

वणी : मनसे पक्ष नेते, ठाण्या वाघ, राजू उंबरकर यांनी हजारो समर्थकांच्या उपस्थितीत वणी मतदारसंघाकरिता आज (ता. 25) उमेदवारी अर्ज दाखल केला. 

यावेळी त्यांच्या सौभाग्यवती तृप्ती उंबरकर ह्या सुद्धा उपस्थित होत्या. भव्य मिरवणुकीने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राजू उंबरकर यांचे समर्थकांनी 'कामाचा माणूस' असे विजयाचे ब्रीदवाक्य लिहिलेल्या ओपन ट्रकमधून राजू उंबरकर यांनी नागरिकांना अभिवादन करत शहराच्या मुख्य मार्गाने निघाले.
या प्रसंगी वणी, मारेगाव, झरी तालुक्यातील अर्चना बोदाडकर, माजी नगरसेवक नानू त्रिंबके, अलका टेकाम, निर्शाद खान, फाल्गुण गोहोकार, शंकर वरघट, रुपेश ढोके, चांद बहादे, गजानन मिलमीले, शुभम भोयर, अनिस सलाट, मयूर गेडाम, अजित शेख, तुषार गबराणी, उदय खिरटकर यांचेसह हजारों समर्थकांची उपस्थिती होती.

तीन वर्षांपासून फरारीत आरोपीच्या शिरपूर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : मागील तीन वर्षापासून फरारीत आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता.खबर मिळाली,सापळा रचला अन् शिरपूर पोलिसांनी आरोपीताच्या मुसक्या आवळल्या आहे.

नौशाद शहादातुल्ला कुरेशी (34) रा. वार्ड क्र.2 घुग्गुस (जि.चंद्रपुर) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. शिरपूर पोलीस ठाण्यात अप क्र.248/2021 कलम 399,402 भा.द.वी. सहकलम 4/25 शत्र अधिनियम गुन्हे दाखल आहे. गेल्या तीन वर्षापासून पोलिसांना हुलकवणी देणारा आरोपी नौशाद कुरेशी हा दि. 23 ऑक्टोबर रोजी पोलीस पथक गस्त घालत असताना घुग्गुस हद्दीत असल्याची खात्रीलायक माहिती शिरपूर पोलिसांना मिळाली.

लगेच पोलीस निरीक्षक माधव शिंदे यांनी पो.स्टे. चे पोउपनि रावसाहेब बुधवंत व पोलीस कर्मचाऱ्यांना वरील कारवाई कामी आदेशित केले असता त्यांनी क्षणाचा विलंब न करता नमुद ठिकाणी आरोपीचा शोध घेऊन त्यास जेरबंद केले व त्याचे नावाची पडताळणी करुन तो इसम नौशाद शहादातुल्ला कुरेशी रा. वार्ड क्र.2 घुग्गुस ता. जि. चंद्रपुर असल्याची खात्री पटल्याने त्यास ताब्यात घेऊन अटक केली.
 
सदर आरोपीतास दिनांक 24/10/2024 रोजी मा. सत्र न्यायालय केळापुर येथे हजर केले असता मा. न्यायालयाने सदर आरोपीचा जेल वारंन्ट केल्याने आरोपीची यवतमाळ कारागृहात रवानगी केली. 

ही कामगिरी कुमार चिंता पोलीस अधीक्षक, यवतमाळ, पियुष जगताप साहेब अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ, गणेश किंन्द्रे उपविभागीय पोलीस अधिकारी वणी, पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि माधव शिंदे ठाणेदार पो.स्टे.शिरपुर, पोउपनि/रावसाहेब बुधवंत, पोहवा/ सुनिल दुबे, पोकॉ/ विनोद काकडे, पोकों/पंकज कुडमेथे यांनी पार पाडली आहे. 

आज जोरदार शक्तीप्रदर्शन! राजू उंबरकर करणार अर्ज दाखल

सह्याद्री चौफेर | वृतसंस्था 

वणी : आज शुक्रवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजू मधुकरराव उंबरकर शक्तीप्रदर्शन करणार असून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे वणी मतदार संघांचे राजकारण चांगलेच रंगणार आहे.

काही महिन्यापूर्वी राजू उंबरकर यांची उमेदवारी जाहीर केली होती, तेव्हापासूनच सर्व वणी मतदार संघातील कार्यकर्ते तयारीला लागले होते. त्या दिवसाची समर्थक आतुरतेने वाट पाहत होते. आज 25 ऑक्टोबर रोजी मनसेचे राजू उंबरकर उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. त्यामुळे वणी, मारेगाव, झरी तालुक्यातील कार्यकर्ते पाण्याच्या टाकी जवळ हजारोच्या संख्येने गोळा होणार असून वणी मध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहे. 

राजू उंबरकर हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आज आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनसे देखील महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. 

अन्न पुरवठा निरीक्षक अधिकारी ए सी बी (ACB) च्या जाळ्यात अडकला

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : येथील अन्न पुरवठा विभागाचे निरीक्षक अधिकारी यांना आज ७० हजार रुपयांची लाच घेतांना एसीबी (ACB) ने रंगेहाथ पकडले. ही कारवाई २४ ऑक्टोबर ला दुपारी ३ वाजता दरम्यान अमरावती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केल्याची माहिती आहे. 

वणी तहसील कार्यालयातील अन्न पुरवठा विभागात निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले संतोष उईके यांनी रास्त धान्य दुकान बंडू देवाळकर रा. चिखलगाव यांना राशन दुकान संदर्भात सत्तर रुपयाची लाच मागितली याबाबत बंडू देवाळकर यांनी पुरवठा निरीक्षक संतोष उईके यांची ए सी बी (ACB) कडे तक्रार दाखल केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याबाबत आज सापळा रचला व अन्न पुरवठा निरीक्षक अधिकारी संतोष उईके यांना कार्यालयातच मागणी केलेल्या रकमेसह लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. 

पुढील कारवाईसाठी शासकीय विश्रामगृह येथे आणण्यात आले होते. या कार्यवाहीने तालुका प्रशासन चांगलेच खळबळले...

प्रहार मधून मनसेत जाहीर प्रवेश

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : विधानसभेच्या तोंडावर विविध राजकीय घडामोडीला वेग आला. यातच आज प्रहार जनशक्ती पक्षाला रामराम करत जिल्हा उप प्रमुख निलेश माहूरकर यांनी आपल्या समर्थकांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत दाखल झाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षनेते नेते राजु उंबरकर यांच्या हस्ते आज वणी येथील पक्ष कार्यालयात माहूरकर यांचा मनसेत पक्ष प्रवेश पार पडला. माहूरकर यांच्या पक्षप्रवेशनाने मनसेला बळ मिळाले असून आगामी विधानसभेत याचा फायदा पक्षाला होणारं असल्याचे बोलले जात आहे.

निलेश माहुरकर यांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षात अनेक सामाजिक आणि राजकीय उपक्रमासह विविध मुद्द्याला घेऊन आक्रमक स्वरूपाचे आंदोलने केली होती. तर नुकत्याच पार पडलेल्या बुटीबोरी नगर परिषदेमध्ये त्यांनी निवडणूक लढवून समाधानकारक मताधिक्य प्राप्त केले होते. तर कामगार क्षेत्रामध्ये विविध कंपन्यावर त्यांनी कामगार संघटनेच्या माध्यमातून पकड निर्माण केली असून नामांकित कंपन्यावर प्रहार जनशक्ती पक्षाच्या कामगार संघटना उभ्या केल्या. आता या सर्वांचा फायदा मनसेच्या पदरात पडणार. माहूरकर यांनी आज अचानक मनसेत प्रवेश केल्याने विविध राजकिय चर्चांना उधाण आले. मनसेचे नेते राजु उंबरकर यांनी माहूरकर यांच्या गळ्यात पक्षाचा दुप्पटा टाकून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी नागपुर जिल्हाध्यक्ष आदित्य दुरुगकर, बिजाराम किनकर ( हिंगणा मनसे उमेदवार) वणी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, शिवराज पेचे, विलन बोदाडकर, अजित शेख, शुभम भोयर, मयूर गेडाम, संदिप वाघमारे, लक्की सोमकुंवर यांच्या सह नागपुर येथिल सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते..

बोलोरो वाहणाची दुचाकीला धडक, एक ठार एक गंभीर


सह्याद्री चौफेर | वृतसंस्था 

मारेगाव : मारेगाव तालुक्यातील खडकी फाट्यानजीक एका मोटारसायकलला विरुद्ध दिशेने येणाऱ्या बोलेरो वाहनाने धडक दिल्याने मोटारसायकल चालक जागीच ठार तर, एक गंभीर जखमी झाल्याची घटना आज बुधवार ला रात्री साडेसात वाजता राज्यमहामार्गांवर घडली.

शेतातून गावाकडे जाणाऱ्या बुरांडा शिवारात असलेल्या शेतातून दोघेजण मोटारसायकल ने राज्यमहामार्गाने खडकी गावाकडे निघाले. अशातच वणीवरून भरधाव येणाऱ्या बोलेरो वाहनाने खडकी फाट्या जवळ मोटारसायकल ला धडक दिली. यात खडकी (बु.) येथील हरी उर्फ रविंद्र दिगांबार अवताडे (वय ४५) हे जागीच ठार झाले तर, त्याचा सहकारी अतुल झिंगू उईके ( वय २७) हे गंभीर जखमी झाले. 

वणीचा तिढा सुटला : विधानसभेची उमेदवारी शिवसेना 'उबाठा'कडे


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : महाविकास आघाडीतील मित्र पक्ष असलेले काँग्रेस, उद्धवसेना या पक्षातून कोणत्या पक्षाला वणी विधानसभेची उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी वणी मतदारसंघातून संजय देरकर यांना अखेर उमेदवारी जाहीर झाली आहे. उमेदवारी जाहीर होताच वणी येथे शिवसेना (उबाठा) कार्यकर्त्यांत जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या महिन्याभऱ्यापासून वणीचा नाट्यमय तिढा कायम होता,येथील अनेकजन तिकीट मिळवण्यासाठी दिल्लीवारी तर मुंबईत तळ ठोकून होते.

वणी मतदारसंघातून महाविकास आघाडी,काँग्रेस पक्षासह अनेक इच्छुकांनी उमेदवारीसाठी आपल्या पक्षश्रेष्ठीकडे रेटून प्रयत्न केला. त्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडूनही मोठी रस्सीखेच चालू असल्याची चर्चा होती. रविवारी महायुतीची यादी जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीची वणी मतदार संघाची उमेदवारी कोणाला मिळेल! याची उत्कंठा वाढली होती, उद्धवसेनेचे संजय देरकर यांनी उमेदवारी मिळविण्यात अखेर यश मिळवले आहे. महाविकास आघाडी चे ८५-८५-८५ असा फार्मुला ठरला असून उर्वरित जागा मित्र पक्षांना. मात्र,वणीत कार्यकर्त्यांकडून श्री.देरकर यांचं अभिनंदनासह विजयश्रीचा वर्षाव केला जात आहे. 

प्रचाराला कमी कालावधी असल्याने लवकरच आता प्रचाराची रणधुमाळी चालू होणार असून जनतेचा कल कोणाकडे राहणार, हे काही दिवसातच समजेल. आता मात्र, वणी विधानसभा ही महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा निवडणूक आखाडा रंगणार आहे.

दहावीच्या परीक्षेत सर्वात मोठा बदल; आता विषयांत 35 ला नाही तर 20 ला पास

सह्याद्री चौफेर | वृतसंस्था 

विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. दहावीमध्ये काही विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान हे विषय अवघड जातात. त्यामुळे या विषयात नापास होण्याची संख्या देखील जास्त आहे. 

मात्र, आता दहावीच्या बोर्डाने एक मोठा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत गणित आणि विज्ञान या विषयांमध्ये 35 पेक्षा कमी आणि 20 पेक्षा जास्त गुण मिळाले तरी देखील अकरावीमध्ये प्रवेश घेता घेणार आहे.

 नव्या अभ्यासक्रम आराखड्यात यासंदर्भात तरतूद देखील करण्यात आली आहे. मात्र त्या विद्यार्थ्यांच्या रिझल्टवर एक विशिष्ट शेरा देण्यात येणार आहे. 

मात्र आता ज्या विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान हे विषय अवघड जात होते त्यांना बोर्डाच्या या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.


नवी भरती का नाही?

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

सध्या रेल्वेची स्थिती अनेक अर्थाने बिकट बनली आहे. मुळात रेल्वेकडे सरकारचे लक्षच आहे की नाही, असा प्रश्न मनात येतो. रेल्वेमध्ये कर्मचाऱ्यांची सर्वच पातळ्यांवर तीव्र कमतरता जाणवत आहे. त्याविषयीचे अहवाल वेळोवेळी सरकारकडे सादर झाले आहेत. पण त्याकडे सातत्याने कानाडोळा केला गेला. आता अगदी परिस्थिती हातघाईवर आल्यावर एक नवीनच निर्णय सरकारने घेतल्याचे कानावर आले. सरकारने नवी भरती करण्याऐवजी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्याचा एक आगळाच फंडा शोधून काढला आहे. या अंतर्गत म्हणे २५ हजार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेतले जाणार आहे. 

६५ वर्षांच्या वयाच्या आतील कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेची संधी दिली जाईल आणि त्यांना जेमतेम दोन ते पाच वर्षांच्या अवधीसाठी नेमले जाईल. त्यांना शेवटी म्हणजे, निवृत्तीच्या वेळी शेवटच्या महिन्यात जेवढे वेतन मिळत होते त्या वेतनावर त्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्याखेरीज त्यांना पगारवाढ वगैरे काहीही मिळणार नाही, असेही या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या बातमीत म्हटले आहे. २५ हजार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना नियुक्त करणे म्हणजे किमान तेवढ्या नवयुवकांना नोकरीची संधी नाकारण्यासारखीच परिस्थिती आहे. सरकार हे असले तकलादू उपाय योजून नेमके काय साधू इच्छित आहे हे कळत नाही. सरकारला वेतनावरचा खर्च टाळायचा आहे म्हणूनच बहुदा नोकरभरती टाळली जात आहे की काय, अशी शंका निर्माण होते. अन्यथा सरकारने वेळोवेळी रिक्त पदांवर नवयुवकांना संधी दिली असती, तर आज त्या युवकांचे संसारही सावरले गेले असते आणि देशातील बेरोजगारी काहीअंशी कमी होण्यास मदत झाली असती. पण कायमच उफराट्या भूमिकेत असलेल्या सरकारने हा तकलादू पर्याय स्वीकारलेला दिसतो आहे. 

देशातल्या प्रत्येक क्षेत्रात सरकारी नोकऱ्यांमध्ये कमतरता जाणवते आहे. एका माहितीनुसार, केंद्र सरकारच्या एकूण सेवांमध्ये तब्बल सुमारे दहा लाख पदे रिकामी आहेत. ही पदे भरण्याचे आश्वासन सरकारने निवडणूक काळातही दिले होते; पण त्याचा त्यांना पुन्हा विसर पडला. त्याऐवजी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना कामावर घेऊन त्यांना तात्पुरत्या स्वरूपात नेमून कशीबशी वेळ भागवून नेण्याचे काम हे सरकार करते आहे. म्हणजेच नव्याने भरती करून त्याचा जो आर्थिक बोजा सरकारवर पडणार होता तो टाळण्यासाठीची ही पळवाट आहे हे स्पष्ट दिसते आहे. 

रेल्वेकडे कर्मचारी टंचाई एवढीच एकमेव समस्या नाही, तर देशातील एकूणच रेल्वे खाते सध्या अनेक अर्थाने डबघाईस आलेले पाहायला मिळते आहे. रेल्वेच्या यंत्रणेकडे कोणत्याच पातळीवर गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. किंबहुना रेल्वे ही जनतेच्या सोयीसाठी आहे आणि ती प्रभावी आणि कार्यक्षम असली पाहिजे याचेच भान सरकार विसरलेले दिसते आहे. म्हणून तर करोना काळात रद्द केलेल्या अनेक रेल्वे गाड्या आजही सुरू झालेल्या नाहीत. अगदी आपल्या पुण्यातील उदाहरण द्यायचे झाले तर करोनापूर्वकाळात पुणे-लोणावळा मार्गावर जितक्या संख्येने लोकल धावत होत्या तेवढ्या संख्येने आज त्या धावताना दिसत नाहीत. त्यातून लोकांची होणारी अडचण सरकारला दिसत नाही. सगळा कारभार दिखाऊपणाच्या आवरणाखाली झाकून टाकला जात आहे. रेल्वेतील अपघातांचे प्रमाणही सध्या खूप वाढले आहे. दर महिन्याला कुठे ना कुठे रेल्वे रुळावरून घसरल्याच्या बातम्या येतात. लोहमार्ग आणि एकूणच तांत्रिक विभागातील देखभालही दुर्लक्षित झाली आहे, असेही अनेकांचे म्हणणे आहे. सरकारला त्याचे काहीही पडलेले दिसत नाही. मुळात रेल्वेचे स्वतंत्र बजेट रद्द करून त्याचा अंतर्भाव केंद्रीय अर्थसंकल्पामध्येच करण्याचा नवीन प्रघात या सरकारने पाडला, तेव्हापासून रेल्वेची वाताहत सुरू व्हायला सुरुवात झाली आहे. रेल्वेचा ऑपरेशनल रेशो कमालीचा घसरला आहे. त्याविषयी कोणी वाच्यता करताना दिसत नाही. त्या उलट लोकांचे डोळे दिपवण्यासाठी 'वंदेभारत'सारख्या गाड्या सुरू करून रेल्वेसाठी आम्ही फार काही करत आहोत, असे सरकार भासवत असले तरी, या वंदेभारत गाड्यांसाठी नियमित स्वरूपातील गाड्यांचा बळी दिला जातो हा प्रकार लोकांना सहन होण्यासारखा नाही. त्यामुळे देशात विविध ठिकाणी वंदेभारत गाड्यांवर दगडफेक होण्याचे प्रकार वाढले आहेत. वंदेभारत गाड्या हा केवळ दिखाऊ उपाय आहे तो सर्वसामान्य प्रवाशांच्या हिताचा नाही हे रेल्वे प्रवाशांच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर लक्षात येते. या गाड्यांचे भाडेही अव्वाच्या सव्वा आहे. रेल्वेची भाडेवाढ करता येत नाही म्हणून असले काहीतरी थातूरमातूर उपाय योजून सरकार धूळफेक करीत आहे हे जाणवते आहे. मुळात स्वतंत्र रेल्वे बजेट रद्द झाल्यापासून रेल्वे हा विषय प्रसारमाध्यमांमधून गायब झाला आहे. 

पूर्वी निदान रेल्वे बजेटच्या अनुषंगाने रेल्वे प्रवाशांच्या समस्यांवर संसदेत आणि संसदेबाहेरही विस्तृत चर्चा व्हायची. त्यातून लोकांना काय हवे काय नको हे समजायचे. लोकांच्या तक्रारींकडे आवर्जून लक्ष दिले जायचे. पण आता या सगळ्या प्रकाराला पद्धतशीर बगल दिली गेली आहे. चालू वर्षाचा जो अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केला त्यावेळी त्यांनी रेल्वेसाठीच्या तरतुदींचा कोणताच स्वतंत्र उल्लेख आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात केलेला दिसला नाही. त्यातूनच तूनच सरकारची रेल्वेविषयीची एकूण अनास्था लक्षात येते. त्यामुळेच आज भारतीय रेल्वे बिकट स्थितीला सामोरे जाताना दिसते आहे. रेल्वे हा सरकारच्या आर्थिक नफा-तोट्याच्या बाहेरचा विषय आहे. हा केवळ जनतेच्या सोयीसाठीचा मामला आहे, त्यात नफ्या-तोट्याचा विचार करता येणार नाही हे सरकारने लक्षात घेतले पाहिजे. 

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना नेमून आपण तात्पुरती वेळ भागून न्याल, पण कायमस्वरूपी उपाययोजनांचे काय हा मुद्दा शिल्लकच राहतो. त्यामुळे सरकारने तातडीने रेल्वेच्या गरजांचा अभ्यास करून युद्धपातळीवर उपाययोजना केल्या नाहीत, तर जनसामान्यांच्या प्रवासाचा हा मार्ग दिवसेंदिवस आणखीनच खडतर होईल हे सरकारने वेळीच ध्यानात घेतलेले बरे.

समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन


सह्याद्री चौफेर । वृतसंस्था 

नवी दिल्ली : माजी आमदार आणि समाजवादी गणराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष कपिल पाटील यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. दिल्लीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत कपिल पाटील यांनी प्रवेश केला. 

यावेळी महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड, सुनील केदार, सतेज पाटील उपस्थित होते. दरम्यान, काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आता कपिल पाटील यांना गोरेगाव विधानसभा मिळण्याची शक्यता आहे. 

शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी जदयूला रामराम ठोकल्यानंतर समाजवादी गणराज्य पक्ष या नव्या पक्षाची स्थापना केली होती. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांनी नवीन पक्षाची स्थापना केली होती.

मात्र, आता त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. महाविकास आघाडीत गोरेगाव किंवा वर्सोवा ही जागा काँग्रेसला सुटणार आहे. त्या जागेवर कपिल पाटील विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.

पोलीस स्मृतिदिनानिमित्त पोलीस विभागाने दिली मानवंदना

सह्याद्री चौफेर । वृतसंस्था 

यवतमाळ : 1 सप्टेंबर 2023 ते 31 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये देशांमध्ये एकूण 216 जवानांनी आपले कर्तव्य बजावत असताना मातृभूमीच्या संरक्षणार्थ प्राणाची आहुती दिली,त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभावी म्हणून आज पोलीस स्मृतिदिन पाळण्यात आला. 

यावेळी प्रमुख अतिथी असलेले जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी स्मृती दिनाचे महत्त्व विशद केले. आयोजित कार्यक्रमाला अप्पर पोलीस अधीक्षक जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाणे, पोलीस उपअधीक्षक मुख्यालय हुड यांच्यासह इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते. पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी स्मृतिदिनाबाबत आपले मनोगत व्यक्त केले तर, जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश न्हावकर यांनी स्मृतिदिनाचे महत्त्व सांगून 216 जवानांनी मातृभूमीच्या रक्षणार्थ प्राण्यांची आहुती दिली त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभावी म्हणून त्यांना विनम्र अभिवादन केले.

हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण केले आणि परेड ग्राउंड वर शोकपरेडची कारवाई करून तीन ब्लॅक राउंड फायर केले.

सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयाचे ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट कडून स्वागत

सह्याद्री चौफेर | वृतसंस्था 

वणी : देशातील बाल विवाह कायद्यावर ऐतिहासिक निर्णय देताना, सर्वोच्च न्यायालयाने कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे जारी करून असे म्हटले आहे की बाल विवाहामुळे स्वत: च्या इच्छेनुसार जीवनसाथी निवडण्याचा अधिकार काढून घेतला जातो. सोसायटी फॉर एनलाइटनमेंट अँड व्हॉलंटरी ॲक्शन (SEWA) आणि 'बालविवाह मुक्त भारत' मोहिमेचे भागीदार कार्यकर्ते निर्मल गोराणी यांच्या याचिकेवर आलेल्या या निर्णयाचे स्वागत करताना, आधार बहुउद्देशीय संस्था प्रतिनीधी डॉ. भारती पाटील,रेणू प्रसाद, आनंद पगारे म्हणाले, “हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे देशातील बालविवाह संपुष्टात आणण्याच्या प्रयत्नांना बळ मिळेल आणि आम्ही राज्य सरकारला या मार्गदर्शक तत्त्वांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आवाहन करतो जेणेकरून २०३० पर्यंत भारत बाल विवाह मुक्त करण्याचे उद्दिष्ट साध्य करता येईल.” 

ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट यवतमाळ जिल्ह्यात 'बाल विवाह मुक्त भारत' (CMFI) मोहिमेचा एक प्रमुख भागीदार आहे, देशभरातील 200 हून अधिक स्वयंसेवी संस्थांची युती आहे जी 2030 पर्यंत बालविवाह समाप्त करण्यासाठी 400 हून अधिक जिल्ह्यांमध्ये तळागाळात मोहीम राबवत आहे.
सरन्यायाधीश न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने निकाल देताना म्हटले आहे की, बाल विवाह प्रतिबंध कायदा (PCMA), 2006 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सरकार आणि प्रशासनाने प्रतिबंध व अभ्यासाची रणनीती असलेल्या समुदाय-आधारित दृष्टिकोनाने काम करणे आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वां मध्ये शाळा, धार्मिक संस्था आणि पंचायतींना बाल विवाहाचे उच्च प्रमाण असलेल्या भागात बाल विवाह रोखण्यासाठीच्या उपाययोजनांची माहिती शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी शाळा, धार्मिक संस्था आणि पंचायतींना महत्त्वाचे साधन म्हटले आहे. बाल विवाहा विरुद्ध जनजागृती करणे. विभागीय खंडपीठासमोर स्वयंसेवी संस्था सेवा आणि कार्यकर्ते निर्मल गोराणा यांच्या याचिकेवर सुनावणी सुरू होती. ज्यामध्ये असा दावा करण्यात आला होता की, देशातील बालविवाहाची परिस्थिती गंभीर आहे आणि बाल विवाह विरोधी कायद्याच्या मूळ भावनेशी खेळले जात आहे. 

निकाल देताना न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड म्हणाले, “बहु-क्षेत्रीय समन्वय असेल तेव्हाच कायद्याची अंमलबजावणी यशस्वी होऊ शकते. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण आणि क्षमता वाढण्याची गरज आहे. आम्ही पुन्हा एकदा समुदाय-आधारित दृष्टिकोनाच्या गरजेवर जोर देतो.” या निर्णयाचे स्वागत करत.. ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट चे समन्वयक प्रकाश चहानकर म्हणाले, “हा आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाचा निर्णय आहे. बालविवाह रोखण्यासाठी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन ज्या आवेशाने आणि जिद्दीने काम करत आहे ते कौतुकास्पद आहे आणि हा निर्णय आपल्या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांना अधिक बळ देईल. बालविवाह हा एक गुन्हा आहे ज्याने संपूर्ण देशाला वेठीस धरले आहे आणि त्याच्या स्पष्ट व्याख्याबद्दल आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे आभारी आहोत. आम्हाला विश्वास आहे की एकत्रितपणे आणि एकत्रित प्रयत्नांनी आम्ही 2030 पर्यंत हा गुन्हा पूर्णपणे नष्ट करू.” आम्ही तुम्हाला सांगतो की, गेल्या एका वर्षात बालविवाह मुक्त भारत अभियान आणि त्याच्या भागीदार स्वयंसेवी संस्थांच्या प्रयत्नांमुळे देशात 120,000 बालविवाह यशस्वीपणे थांबवण्यात आले. याव्यतिरिक्त, सरकारी प्रयत्नांमुळे बालविवाहास बळी पडलेल्या 1.1 दशलक्ष मुलांना विवाह करण्यापासून रोखले गेले.

बालविवाह मुक्त भारत' मोहिमेचे संस्थापक भुवन रिभू यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे वर्णन भारत आणि संपूर्ण जगासाठी एक उदाहरण म्हणून केले आणि ते म्हणाले, "हा ऐतिहासिक निर्णय संस्थात्मक संकल्पना मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण वळण देणारा ठरेल. देशातून बालविवाह समूळ निर्मूलनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा विजय आहे. सुप्रीम कोर्ट आणि सरकारच्या प्रयत्नांमुळे हे दिसून आले आहे की त्यांना मुलांची काळजी आहे आणि आता वेळ आली आहे की आपण सर्वांनी पुढे येऊन या सामाजिक गुन्ह्याचा अंत करण्याची वेळ आली आहे.

रिभू म्हणाले, “जर आपण आपल्या मुलांचे संरक्षण करण्यात अयशस्वी झालो तर जीवनात दुसरे काहीही महत्त्वाचे नाही. सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा सर्वांगीण दृष्टिकोनाची गरज अधोरेखित केली आहे आणि ‘बालविवाह मुक्त भारत अभियान’ देखील ‘पिकेट’ रणनीतीद्वारे यावर जोर देत आहे. बालविवाह त्याच्या मूळ स्वरुपात लहान मुलांवर होणारा बलात्कार आहे. "हा निर्णय केवळ आमचा निश्चयच मजबूत करत नाही तर उत्तरदायित्व आणि सहयोगी प्रयत्नांद्वारे आम्ही बालविवाह संपुष्टात आणू शकतो, मुलांवरील हिंसाचाराचा सर्वात घृणास्पद प्रकार देखील अधोरेखित करतो."

बाल विवाह प्रतिबंध प्रभावी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे

• सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, बालविवाह हे स्वतःच्या इच्छेने जीवनसाथी निवडण्याच्या अधिकाराचे उल्लंघन करते.
• हा निर्णय एनजीओ 'सेवा' आणि कार्यकर्ते निर्मल गोराणा यांच्या याचिकेवर आला, दोन्ही सदस्य आणि 'बालविवाह मुक्त भारत' मोहिमेचे सहकारी, आधार बहुउद्देशिय संस्था यांनी कृतज्ञता व्यक्त केली आणि सांगितले की, या निर्णयामुळे 2030 पर्यंत देशातून बाल विवाहाचे उच्चाटन होईल.
• बालविवाह मुक्त भारत ही 200 हून अधिक स्वयंसेवी संस्थांची युती आहे .जी एकट्या 2023-24 मध्ये देशभरात 120,000 बाल विवाह थांबवेल आणि 50,000 बाल विवाह मुक्त गावे तयार करेल
.

विद्यार्थ्यांनी कोणताही न्यूनगंड बाळगू नये - एसडीपीओ गणेश किंद्रे

सह्याद्री चौफेर | वृतसंस्था 

वणी : विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे शिक्षण घेवून चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाचा विकास केल्यास करिअर बनवणे सहज शक्य आहे. प्रत्येकात प्रचंड क्षमता आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणताही न्यूनगंड न बाळगता स्वतःच्या मनात डोकावून उपजत क्षमता, कौशल्ये विकसित व अद्यावत केल्यास करिअरच्या संधी चालून येतील असा सल्ला उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे यांनी दिला. ते लायन्स इंग्लिश मिडीयम हायस्कूल कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.

लायन्स क्लब वणी व लायन्स चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ‘युवकांपुढील आव्हाने’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लायन्स क्लब चे अध्यक्ष राजाभाऊ पाथ्रडकर, सचिव किशन चौधरी, प्रोजेक्ट डायरेक्टर पुरुषोत्तम खोब्रागडे, महेन्द्र श्रीवास्तव, चंद्रकांत जोबनपुत्रा, अकॅडमीक डायरेक्टर प्रशांत गोडे, प्राचार्य चित्रा देशपांडे मंचावर उपस्थित होते.

मोबाईल फोनच्या अतिरेकी वापरामुळे वाचन व विचारशक्ती कमी झाली असून "मोबाईल आपल्यासाठी की, आपण मोबाईलसाठी" याचा विचार करण्याची गरज आहे. हे स्पष्ट करुन मुलींनी स्वतःच्या सुरक्षेसाठी कोणती काळजी घ्यावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. 

पाहुण्यांचा परिचय श्री राम पवार यांनी केला. कार्यशाळेचे प्रास्ताविक राजाभाऊ पाथ्रडकर, सूत्रसंचालन किरण बुजोणे तर आभार किशन चौधरी यांनी मानले. यावेळी विद्यार्थी व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.

राज्यात आज पुन्हा जोरदार पाऊस! 'या' जिल्ह्यांना हवामान विभागाचा इशारा..!

सह्याद्री चौफेर | वृतसंस्था 

मुंबई : राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या ऊन पावसाचा खेळ पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत असताना उन्हाचा कडाका देखील जाणवत आहे. राज्यात बऱ्याच ठिकाणी सकाळी ऊन आणि संध्याकाळी पाऊस अशीच स्थिती काही भागात पाहायला मिळत आहे. पावसाला पोषक हवामान असल्याने आज वादळी वारे, विजांसह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) कायम असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. 

काल सायंकाळी नवी मुंबई यासोबतच नाशिक जिल्ह्यातील त्रंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यातील फूर्व भागात जोरदार पाऊस झाला. नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसाने सोयाबीन, भात पिकासह बागायती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

आज कुठे पाऊस?
आज कोकणामधील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड या जिल्ह्यांमध्ये तर मध्य महाराष्ट्रात पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड आणि बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.


संजीवरेड्डी बोदकूरवारांना तिसऱ्यांदा उमेदवारी, वणी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे मात्र अद्याप ठरेना...

सह्याद्री चौफेर । वृतसंस्था 

वणी : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा उमेदवाराच्या नावाची पहिली यादी आज जाहिर केली आहे. पक्षाने येथून आपले विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना परत उमेदवारी दिली आहे. निवडणूक आयोगाने मंगळवारी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा केली होती. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी च्या वरिष्ठ नेत्यांची या दिल्ली मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातील विधानसभेच्या पहिली 99 जागांची यादी आज जाहीर झाली. या मध्ये वणी विधानसभा निवडणुकीसाठी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांचे नाव जाहीर झाले आहे. 

वणी विधानसभा मतदार संघांचे आमदार बोदकुरवार यांचे वर दरम्यान,विविध आरोप केले जात होते. त्यामुळे त्यांची जागा धोक्यात असल्याचे चर्चा समोर येऊ लागली होती. मात्र वणी मतदार संघात उल्लेखनीय कामगिरी असल्यामुळे त्यांची तिकीट कापणे अवघड होते, असेही म्हटलं जात होतं. त्यानंतर दिल्ली व मुंबई भाजपा च्या बैठकीत इतर उमेदवाराह आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार यांनाच उमेदवारी देण्याचा एकमत ठरल्याच राजकीय वर्तुळातुन माहिती मिळाली होती. आज भारतीय जनता पार्टीची यादी जाहीर झाली,त्यामध्ये त्यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता वणीला मंत्रीपदाचा मार्गही मोकळा असल्याचे निश्चित तिसऱ्यांदा त्यांना मिळालेल्या संधीने नागरिकांतून बोलल्या जात आहे. मात्र, या वणी विधानसभाकरिता परत आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना उमेदवारी जाहीर झाल्याने कार्यकर्त्यामध्ये उत्साह संचारला असून त्यांना परत विधानसभेत पाठवण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाले आहे. 

आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची उत्कृष्ट कामगिरी 

विशेष उल्लेखनीय म्हणजे संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी वणी विधानसभा मतदार संघात भरघोस असा मोठया प्रमाणात निधी खेचून आणला आहे. दहावर्षात शहर ग्रामीण भागात बऱ्यापैकी कामे झालेली असून आदर्श आचारसंहिता लागायच्या अगोदर अनेक कामांचे लोकार्पण, भूमिपूजन व उदघाटन विधानसभेत केली व महत्वाचे प्रकल्प राहूनही गेली. पण राहून गेलेली काम पुन्हा जोमाने करण्यासाठी भाजपाने त्यांना परत विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचे संधी दिली. त्यानुसार संजीवरेड्डी बोदकुरवार आता वणी येथे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला आव्हान देतील.


 भाजपच्या पहिल्या यादीतले 99 उमेदवार :
1) नागपूर दक्षिण पश्‍चिम - देवेंद्र फडणवीस
2) कामठी - चंद्ररशेखर बावनकुळे
3) शहादा (आजजा) - राजेश पाडवी
4) नंदुरबार (अजजा) - विजयकुमार गावीत
5) धुळे शहर - अनुप अग्रवाल
6) शिंदखेडा - जयकुमार रावल
7) शिरपूर (अजजा) - काशिराम पावरा
8) रावेर - अमोल जावळे
9) भुसावळ (अजा) - संजय सावकारे
10) जळगांव शहर - सुरेश भोळे
11) चाळीसगाव - मंगेश चव्हाण
12) जामनेर - गिरीश महाजन
13) चिखली - श्वेता महाले
14) खामगांव - आकाश फुंडकर
15) जळगांव (जामोद) - डॉ. संजय कुटे
16) अकोला पूर्व - रणधीर सावरकर
17) धामणगांव रेल्वे - प्रताप अडसद
18) अचलपूर - प्रवीण तायडे
19) देवळी - राजेश बकाने
20) हिंगणघाट - समीर कुणावार
21) वर्धा - डॉ. पंकज भोयर
22) हिंगणा - समीर मेघे
23) नागपूर-दक्षिण - मोहन मते
24) नागपूर-पूर्व - कृष्णा खोपडे
25) तिरोडा - विजय रहांगडाले
26) गोंदिया - विनोद अग्रवाल
27) आमगाव (अजजा) - संजय पुराम
28) आरमोरी (अजजा) - कृष्णा गजबे
29) बल्लारपूर - सुधीर मुनगंटीवार
30) चिमूर - बंटी भांगडिया
31) वणी - संजीवरेड्डी बोदकुरवार
32) राळेगांव - अशोक उइके
33) यवतमाळ - मदन येरावार
34) किनवट - भीमराव केराम
35) भोकर - श्रीजया चव्हाण
36) नायगांव - राजेश पवार
37) मुखेड - तुषार राठोड
38) हिंगोली - तानाजी मुटकुळे
39) जिंतूर - मेघना बोर्डीकर
40) परतूर - बबनराव लोणीकर
41) बदनापूर (अजा) - नारायण कुचे
42) भोकरदन - संतोष दानवे
43) फुलंब्री - अनुराधा चव्हाण
44) औरंगाबाद पूर्व - अतुल सावे
45) गंगापूर - प्रशांत बंब
46) बागलान (अजजा) - दिलीप बोरसे
47) चंदवड - डॉ. राहुल अहेर
48) नाशिक पूर्व - ॲड. राहुल ढिकाले
49) नाशिक पश्चिम - सीमा हिरे
50) नालासोपारा - राजन नाईक
51) भिवंडी पश्चिम - महेश चौघुले
52) मुरबाड - किसन कथोरे
53) कल्याण पूर्व - सुलभा गायकवाड
54) डोंबिवली - रवींद्र चव्हाण
55) ठाणे - संजय केळकर
56) ऐरोली - गणेश नाईक
57) बेलापूर - मंदा म्हात्रे
58) दहिसर - मनिषा चौधरी
59) मुलुंड - मिहिर कोटेचा
60) कांदिवली पूर्व - अतुल भातखळकर
61) चारकोप - योगेश सागर
62) मलाड पश्चिम - विनोद शेलार
63) गोरेगाव - विद्या ठाकूर
64) अंधेरी पश्चिम - अमित साटम
65) विले पार्ले - पराग अळवणी
66) घाटकोपर पश्चिम - राम कदम
67) वांद्रे पश्चिम - ॲड. आशिष शेलार
68) सायन कोळीवाडा - आर. तमिल सेल्वन
69) वडाळा - कालिदास कोळंबकर
70) मलबार हिल - मंगलप्रभात लोढा
71) कोलाबा - अ‍ॅड. राहुल नार्वेकर
72) पनवेल - प्रशांत ठाकूर
73) उरण - महेश बाल्दी
74) दौंड - अ‍ॅड. राहुल कुल
75) चिंचवड - शंकर जगताप
76) भोसरी - महेश लांगडे
77) शिवाजीनगर - सिद्धार्थ शिरोळे
78) कोथरूड - चंद्रकांत पाटील
79) पर्वती - माधुरी मिसाळ
80) शिर्डी - राधाकृष्ण विखे पाटील
81) शेवगांव - मोनिका राजळे
82) राहुरी - शिवाजीराव कार्डिले
83) श्रीगोंदा - प्रतिभा पाचपुते
84) कर्जत जामखेड - राम शिंदे
85) केज (अजा) - नमिता मुंदडा
86) निलंगा - संभाजी पाटील निलंगेकर
87) औसा - अभिमन्यू पवार
88) तुळजापूर - राणा जगजीतसिंह पाटील
89) सोलापूर शहर उत्तर - विजयकुमार देशमुख
90) अक्कलकोट - सचिन कल्याणशेट्टी
91) सोलापूर दक्षिण - सुभाष देशमुख
92) माण - जयकुमार गोरे
93) कराड दक्षिण - अतुल भोसले
94) सातारा - शिवेंद्रराजे भोसले
95) कणकवली - नितेश राणे
96) कोल्हापूर दक्षिण - अमल महाडिक
97) इचलकरंजी - राहुल आवाडे
98) मिरज - सुरेश खाडे
99) सांगली - सुधीर गाडगीळ

प्रवक्ते किशोर तिवारींनीं संजय देरकर यांना देण्याचा आग्रह केला

सह्याद्री चौफेर | वृतसंस्था 

वणी : निवडणूक आयोगाने विधानसभेच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला तेव्हापासून राज्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात निवडणूकविषयक प्रशिक्षण कार्यक्रम वेगात सुरु आहेत. मात्र, महायुती व महाविकास आघाडी च्या उमेदवारांच्या याद्या जाहीर अद्यापही केल्या नसल्याने वणी विधानसभा क्षेत्रात राजकारण तूर्तास तापले असून इथं तिथं आमदार कोण होणार आणि कोणाला उमेदवारी मिळणार अशी चर्चा रंगू लागली आहे. 

वणी विधानसभेत काँग्रेस भाजपा काटे की टक्कर होणार अशी चर्चा रंगत असली तरी, या दोन्ही पक्षाचा उमेदवार कोण असणार आहे. याचा तिढा अजूनही कायम असताना शिवसेना (उबाठा) चे प्रवक्ते किशोर तिवारी यांनी विदर्भातील २०१४ व २०१९ मध्ये गमावलेल्या जागांचा आग्रह काँग्रेसने सोडावा, असं वृत्तपत्रातून वृत्त समोर आल्याने वातावरण तापले आहे. तसेंच शिवसेना (उबाठा) वणीकरिता संजय देरकर यांना आग्रह असल्याने वणी विधानसभा क्षेत्रात राजकारण आणखीनच गरम झाले असून आघाडीत बिघाडी येण्याची शक्यता तर येणार नाही,अशी उलटसुलट चर्चाना आता उधाण आल्याचे दिसून येत आहे. 

मागील लोकसभेत भाजपाने अगोदरच उमेदवार जाहीर केल्याने काँग्रेस ला संधीच सोनं करता आले असे पक्षातीलच कार्यकर्ते म्हणतात, त्यामुळे आता ती घाई कदाचित भाजपाला नसल्याचे सध्यातरी दिसून येत आहे. दिल्ली पासून ते गल्ली पर्यंत बैठका पार पडल्या, त्यात झालेल्या बैठकीत "बंद लिफाफा" पॅटर्न राबविण्यात आला. त्यामुळे बंद लिफाफा कुणाचं नशीब उघडतो यावर सर्वांचं लक्ष खिळून असताना लाईट, कॅमेरा रेडी आहे. फक्त "ऍक्शन" म्हणायचं वेळ बाकी राहिलंय...एवढं मात्र नक्की.

मात्र,काँग्रेस च्या गोट्यात असलं काहीही नाहीये, इथे गोंधळात गोंधळ आहे. वणीत "संजय" या एकाच नावाची चर्चा होत असल्याने मलाही आमदार व्हायचंय यासाठी वणी मारेगाव झरी मधून अनेक दावेदार उभे ठाकले असल्यामुळे वणी विधानसभेमधील "काँग्रेस चॅप्टर"च क्लोज होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, आता महाराष्ट्रासह वणीकरांची उत्सुकता शिगेला...

सह्याद्री चौफेर | वृतसंस्था 

नवी दिल्ली : झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर झाली आहे. यामध्ये 66 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. भाजपने जामतारा मतदारसंघातून सीता सोरेन, कोडरमा मधून नीरा यादव, गांडेमधून मुनिया देवी, सिंद्रीमधून तारा देवी, निरसामधून अपर्णा सेनगुप्ता, झारियामधून रागिणी सिंह, चाईबासामधून गीता बालमुचू, छतरपूरमधून पुष्पा देवी भुईया यांना तिकीट दिले आहे. 

झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर झाली आहे. यामध्ये 66 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. भारतीय जनता पक्षाने सरायकेला विधानसभा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांना तिकीट दिले असून, चंपाई सोरेन यांनी झारखंड मुक्ती मोर्चा सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यासोबतच धनवारमधून बाबूलाल मरांडी यांना रिंगणात उतरवले आहे.

मात्र, अख्या राज्याचे राजकारणाचे केंद्रबिंदू महाराष्ट्र असल्याचे बोलल्या जाते. त्याच महाराष्ट्र राज्याकडे लक्ष जनतेचे वेधले असल्यामुळे तातही महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी विधानसभेकरिता भाजप चा कोण उमेदवार? असणार आहे याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.





बाल लैंगिकशोषण प्रतिबंध करण्यासाठी दोन दिवसीय प्रशिक्षण मोहीम मारेगाव येथे संपन्न

सह्याद्री चौफेर | वृतसंस्था 

मारेगाव : मुल आणि मुलांची अधिकार बाल शोषण बाललैंगिक अत्याचार त्यासोबत पोक्सो कायदा इत्यादी बाबत मार्गदर्शन व चर्चा स्थानिक महाकुलकर कॉम्प्लेक्स या ठिकाणी पार पडले. 

या प्रशिक्षणाला मार्गदर्शन करण्यासाठी अर्पण संस्थेचे तज्ञ प्रशिक्षक अशा खाडकर, संगीता शिंदे, योगेश जावळे, शंकर गवस इत्यादी तज्ञ यांच्यामार्फत मार्गदर्शन करण्यात आले. पंचायत समितीचे प्रशिक्षण समन्वयक निलेश आत्राम पंचायत समिती मारेगाव यांनी आपले मोलाचे योगदान देऊन संपूर्ण प्रशिक्षणाला हातभार लावला त्याचप्रमाणे प्रशिक्षणाची संपूर्ण व्यवस्था तत्पर त्यांनी पार पाडले. 

या प्रशिक्षण कार्यक्रमाला तालुक्यातील शिक्षक एक ते आठ अध्यापन करणारे 240 शिक्षक प्रशिक्षणाला उपस्थित होते. हा कार्यक्रम सफल करण्यासाठी मोलाचे योगदान सेवक नरांजे, आशिष चव्हाण, समता मेश्राम, निलिमा पाटील, बेबी घुमकर, संतोष खेवले इत्यादींनी परिश्रम घेऊन दोन दिवसीय प्रशिक्षण मोहीम राबवून मोलाचे सहकार्य केले.