Page

पुसद विधानसभा मतदारसंघातील शाळा बनल्या कोंडवाडे

नंदकुमार मस्के | सह्याद्री चौफेर 

महागांव : शासनाच्या शैक्षणिक ध्येय धोरणानुसार, 30 विद्यार्थी पटसंख्येच्या मागे 1 शिक्षक असावं या पद्धतीच शैक्षणिक धोरण निश्चित असताना पुसद विधानसभा मतदार संघातील, राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनिष्ठ शेवटचे टोक असलेले महागाव पंचायत समिती अंतर्गत डोंगराळ भागातील आदिवासी बहुल बंजारा तांडा, (कोनदरी) या गावामध्ये सध्या जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेमध्ये वर्ग १ ते ५ असून, एकूण पटसंख्या 212 विद्यार्थ्यांची असताना देखील केवळ दोनच शिक्षक या ठिकाणी कार्यरत आहे. त्यामध्ये एक शिक्षक व दुसरे सहाय्यक कंत्राटी, शिक्षक असुन वेळोवेळी शिक्षकांकरिता गाव पातळीवरून मागणी झाल्यानंतर 2021 -- 22, हे शिक्षक उपलब्ध झाले. अन्यथा संपूर्ण शाळेचा शैक्षणिक ज्ञानदानाचे कारभार हे केवळ एकच शिक्षकावर अवलंबून आहे व दैनंदिन इतर तालुका स्तरावरील प्रशासकीय शैक्षणिक मीटिंग, इतर निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासकीय कामकाजाच्या बैठकी व शैक्षणिक कामकाज शालेय मध्यम पोषण आहार त्यासोबत सर्व विद्यार्थ्यांना धडे देण्याचे काम चालू असून या गावांमध्ये मागील 10 वर्षापासून उच्च श्रेणी पद रिक्त आहे.
शासनाच्या शिक्षण विभागाच्या विद्यार्थी पटसंखेच्या ध्येय धोरणानुसार या गावाला (6 + 1) असे एकूण शिक्षक पदसंख्या असणे अपेक्षित व क्रमप्राप्त आहे ही वरील पदे या शाळेला मंजूर असून हे गाव डोंगराळ भागात असल्यामुळे शहरी आसरा शोधणाऱ्या नव्या पिढीच्या शिक्षकांना येथे रुजू होण्यास फारसं स्वारस्य नसतो अशा गावात रूजू होण्यास नकार देतात. या गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून इयत्ता (5) पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या मुलांचं पोखरी या गावामध्ये शाळेत प्रवेश निश्चित केला या बालवयात प्राथमिक शिक्षण हे गावातच मिळायला हवं पण दुर्दैवाने या बाल वयात त्यांना दररोज 10, किलोमीटर स्वखर्चाने ये -- जा करून शिक्षण घ्यावं लागत आहे, या शाळेला उत्पन्नाचे साधन म्हणून 11, हेक्टर शेतजमीन पण हराशी होत नसल्याचे निदर्शनास येत आहे त्यामुळे शाळा च्या सादिल खर्चासाठी आर्थिक स्रोत मिळणे बंद आहे.

पंचायत समिती महागाव शिक्षण अधिकारी यांनी दिलेल्या अधिकृत माहिती नुसार या महागाव पंचायत समितीत, 250 शिक्षकांची आज रोजी गरज असून आदिवासी बंजारा तांडा वाडी वस्तीवर शिक्षण व्यवस्था शिक्षकां अभावी ही पूर्णतः कोलमडलेली असून या अभावात जगणाऱ्या या बंजारा, आदिवासीबहुल भागातील तांडा वाडी वस्तीवरील शैक्षणिक गुणवत्तेवर न बोललेलंच बरं. शासनाचा गले लठ्ठ पगार घेऊन आपल्या कर्तव्यात काम चूकारपणा करून निवासी न राहता निवासी भत्ता घेणे अधून मधून शाळेला दांडी मारणे, ग्रामीण विभागातील शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा अत्यंत घसरलेला असून यामध्ये गत दोन दशकात अनेक पिढ्या गारद झाल्या शाळा व्यवस्थापन समिती केवळ कागदावर नामात्र असून शिक्षण व्यवस्थेची माती करणाऱ्या या बोथट व संवेदनाहीन यंत्रणा व व्यवस्थेला प्रश्न उपस्थित करून राज्यकर्ते जबाबदारी निश्चित करणार का? या ज्वलंत प्रश्नावर आढावा घेऊन या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहायला यांना वेळ मिळणार की, नाही, केवळ प्रासंगिक प्रसंगी इंग्रजी माध्यमांच्या शाळेंवर जाऊन सेल्फी घेऊन व्हाट्सअप वर वळवळ करत असतानाचे फोटो सध्या पुसद विधानसभा मतदारसंघात दृष्टिक्षेपात येतात पण अशा डोंगराच्या कुशीमध्ये होत असलेली विद्यार्थ्यांची शिक्षका अभावी होणारी कोंडी गैरसोय बघण्याकरिता ना स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य, स्थानिक प्रस्थापित आमदारांकडे वेळ नाही, राज्यातील सध्याचे अस्तित्वात असलेले प्रचलित शैक्षणिक ध्येयधोरण ग्रामीण व शहरी अशा विषमतावादी बिज रोहण्याचं काम करत आहे शैक्षणिक धोरणामुळे ग्रामीण विभागातील विद्यार्थ्यांची स्पर्धेतील पीछेहाट, क्षमता बांधणी निर्माण होणे मोठे कठीण झाले आहे.
स्थानिक जिल्हा प्रशासनाने व पंचायत समिती कक्ष अधिकारी यांनी आम्हाला सकारात्मक आश्वासन देऊन तातडीने या गावाला व पंचायत समितीला लवकरच शिक्षक उपलब्ध करून देण्यात येईल अशी ग्वाही दिली प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास या विधायक विषयाच्या मागणीला घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलनाची भूमिका घेणार पंचायत समिती शिक्षणाधिकारी कडे निवेदन करताना शेतकरी नेते मनीष भाऊ जाधव, विशाल पवार जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटना सचिव, सचिन राठोड, निलेश राठोड, आकाश राठोड, आदी गावकरी उपस्थित होते.

सावली येथील विश्रामगृहात खा.अशोकजी नेते यांच्या दौऱ्या दरम्यान विविध विषय घेऊन भाजपा सावली कार्यकर्त्यांची बैठक..


उमेश गोलेपल्लीवार | सह्याद्री चौफेर 

सावली : शासकीय विश्रामगृह सावली येथे खा.अशोकजी नेते गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्र तथा भाजपा राष्ट्रीय महामंत्री अनु.जनजाती मोर्चा यांनी अधिकाऱ्यांसोबत घेतला आढावा या बैठकीदरम्यान खासदार अशोकजी नेते यांनी बोलतांना क्षेत्रात विविध ठिकाणी होत असलेले वाघांचे हल्ले यावर उपाय योजना करावी. पंतप्रधान आवास योजनेचा अहवाल,यशवंतराव चव्हाण योजनेत सर्व गावांना प्राधान्य द्यावे,ड यादीचा सर्वेक्षण करून गरजूं लाभार्थ्यांना आवास योजनेत समाविष्ट करावे.पुरपरिस्थितीमुळे पिकांचे झालेले नुकसान व त्वरीत पंचनामे,सततच्या पाण्याने,पुराने अनेकांची घरे पडली.या संदर्भातसुध्दा चौकशी करून पंचनामे करणे आवश्यक आहे.
अशा विविध विषयाचा आराखडा घेऊन अधिकाऱ्यांना सूचना देऊन निर्देश दिले.

 याप्रसंगी खा.अशोकजी नेते, तालुकाध्यक्ष अविनाश पाल,महामंत्री तथा नगरसेवक सतिशजी बोमावार,शहर अध्यक्ष आशिष कार्लेकर,तहसीलदार पाटील,थानेदार बोरकर साहेब,BDO सुनिता मरसकोल्हे,RFO राजुरकर साहेब, वनपाल कोडापे सर, कोषाध्यक्ष अर्जुन भोयर,निखिल सुरमवार,प्रफुल तुम्हे,राकेश गोलेपलिवार तसेच भाजपाचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते..

मारेगाव येथे राष्ट्रीय क्रीडादिन निमित्य 'मेजर ध्यानचंद भव्य दौड स्पर्धा' संपन्न

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

मारेगांव : कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मारेगांव जि यवतमाळ ,शारीरिक शिक्षण विभागातर्फे राष्ट्रीय क्रीडादिन निमित्य 'मेजर ध्यानचंद भव्य दौड स्पर्धा' दिनांक 29 ऑगस्ट 20022 रोजी आयोजित करण्यात आली होती.P या स्पर्धेत 18 वर्षा आतील 3 किमी तथा वारिस्ट गट 5 किमी असे दोन वयोगट ठेवण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्धघाटन प्रसंगी शेतकरी शिक्षण संस्था मारेगाव यांचे अध्यक्ष मा. जीवन पाटील कापसे, मारेगाव चे नगराध्यक्ष डॉ. मनीष मस्की, पोलीस ठाणेदार श्री सावंत साहेब तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाशजी घरडे यांनी हिरवे झेंडे दाखवून केले. 
या स्पर्धेत प्रथम पारितोषिक प्रवीण लांडे यास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. घरडे सर यांचे कडून रोख 3001 द्वितीय पारितोषिक डॉ. येवले यांचेकडून कुणाल चौधरी यास रोख 2001 तर तिसरे पारितोषिक डॉ. सोडणार यांचे कडून रोख 1001 प्रवीण नारनवरे यास तर कनिस्ट गटात प्रथाम पारितोषिक मा. जीवन पाटील कापसे यांचे कडून 3001 क्रिश मिस्त्री यास तर द्वितीय पारितोषिक भाऊरावजी राऊत यांचे कडून 2001 ओम ढवळे यास तर तिसरे पारितोषिक रवीभाऊ धानोरकर यांचे कडून रोख 1001 निकुंज किरमिरे यास प्रधान करण्यात आले.
या स्पर्धे करीता कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मारेगांव शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. नितेश राऊत, डॉ चिरडे, डॉ.आडसरे, डॉ सोडणार, डॉ चावरे, डॉ देशमुख,डॉ चौहान, प्रा. चिंचोलकर, डॉ गायकवाड यांनी परीश्रम घेतले .

वर्धा नदीच्या पुलाला असलेल्या कठड्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला युवकाचा मृतदेह

चंदू राऊत | सह्याद्री चौफेर 

वणी : वर्धा नदीवरील पाटाळा पुलाला असलेल्या लोखंडी कठड्याला एका युवकाने गळफास घेतल्याचे लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आलेल्या युवकाचे नाव तेजस मोगरे असल्याचे कळते. आज 31 ऑगष्टला पहाटे काही वाहन चालकांना हा युवक ट्यूबने (टायर) वर्धा नदीच्या पुलाभोवती असलेल्या कठड्याच्या लोखंडी पाईपला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला असून, त्याच्या आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप कळू शकले नाही.

पुलावर एक दुचाकी उभी असून ती या युवकाचीच असावी असा अंदाज लावल्या जात असून मृतदेहाजवळ उभी असलेल्या दुचाकीचा क्रमांक एम एच 34 बि एल 5163 हा आहे.

सदरहू घटनेचा पोलिस तपासात लवकरच ते समोर येईल. 

आ.संतोष बांगर यांची राज्यभरातील 102 रुग्णवाहिका चालकांनी हिंगोली येथे भेट घेऊन दिले विविध मागण्यांचे निवेदन...!!!


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

हिंगोली : आज हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर साहेब यांची राज्यभरातील 102 रुग्णवाहिका चालकांनी हिंगोली येथे भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले.
             
यावेळी बोलताना आमदार संतोष बांगर साहेब म्हणाले की 102 रुग्णवाहिका चालकांना नियमाप्रमाणे 19 हजार 900 रुपये वेतन मिळाले पाहिजे तसेच कंत्राटी पध्दत बंद करून 102 रुग्णवाहिका चालकांचे n r h m अंतर्गत नियोजन करावे तसेच सर्व चालकांचे मासिक वेतन हे वेळेवर अदा करावे या व इतर मागण्यांसाठी एक महिन्याच्या आत राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ भाई शिंदे यांच्याकडे 102 रुग्णवाहिका चालकांच्या समस्या मांडून सर्व चालकांना न्याय मिळवून देणार असल्याचे आमदार बांगर यांनी यावेळी सांगितले.
      
यावेळी संपूर्ण राज्यभरातून 102 रुग्णवाहिका चालक हे मोठ्या आशेने आपल्याला न्याय मिळेल म्हणून आमदार बांगर साहेब यांच्याकडे आपले गऱ्हाणे मांडण्यासाठी आले असता त्यांनी आमदार बांगर हे नेहमीच गोरगरीब कष्टकरी जनता व कर्मचारी लोकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवत असतात व कष्टकरी लोकांसाठी वेळप्रसंगी कायदा हातात घेण्याची गरज पडली तर कायदा हातात घेण्यासही मागेपुढे पाहत नाहीत म्हणून आम्ही राज्यभरातून आमची कैफियत मांडण्यासाठी आमदार संतोष बांगर साहेब यांच्याकडे आलो अशी भावना उपस्थित 102 रुग्णवाहिका चालकांनी व्यक्त केली.
      
यावेळी आरोग्य विभागाचे आयुक्त नितीन आंबडकर यांना आमदार संतोष बांगर साहेब यांनी दूरध्वनी लावला असता त्यांनी तो उचलला नाही आणि काय काम आहे ते मेसेज द्वारे सांगा असा मेसेज केला असता आमदार बांगर हे चांगलेच संतापले आणि अश्या मुजोर अधिकाऱ्यांना वठणीवर आणावेच लागेल अशी भावना व्यक्त केली.
नंतर तासाभराने आयुक्त महाशय यांनी आमदार संतोष बांगर साहेबांना कॉल केला असता आमदार बांगर यांनी आयुक्त श्री नितिन आंबाडेकर यांना चांगलेच फैलावर घेतले आणि 102 रुग्णवाहिका चालकांना शासन नियमाप्रमाणे 19900 पगार हा मिळाला पाहिजे आणि जो कोणी कंत्राटदार त्यांना मनमानी प्रमाणे 7 हजार, 8 हजार पगार देऊन बोळवण करीत आहेत अशा कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश आमदार बांगर यांनी आयुक्त साहेबांना यावेळी दिले.     
यावेळी जि. प. समाज कल्याण सभापती फकीरराव मुंडे, युवा सेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम,रामजी नागरे, पंढरी मगर, नितीन होकर्णे, सचिन पवार,102 रुग्णवाहिका चालक शरद देवरे हिंगोली, पिंटू गडदे कळमनुरी, मनोज अगडे चंद्रपूर, रविन्द्र अंबादे चंद्रपूर.उमेश गोलेपल्लीवार चंद्रपूर. संजय वाघ वर्धा, गफार शेख बुलढाणा, नादर शेख नांदेड, अमन पठाण यवतमाळ, श्रीराम भंडारा, अतिक भाई वाशिम, उमाकांत शेंडे नागपूर, रघुनाथ भाऊ बीड, तुकाराम भाऊ परभणी, लोकेश बारंगे वर्धा, अनुकूल ठाकरे अकोला, ज्ञानेश्वर जालना यांच्यासह 29 जिल्ह्यातून आलेले 102 रुग्णवाहिका वाहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्या झालेल्या अपघातात किशोर चा उपचारादरम्यान मृत्यू


रवि घुमे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : तालुक्यातील मार्डी नांदेपेरा वणी हा नव्याने झालेल्या राज्यमार्गामुळे या मार्गांवर वेगाने,जलदगतीने किंबहुना निष्काळजीपणे चालणाऱ्या वाहनामुळे अपघातात वाढ झाली असून एका तरुण दुचाकीस्वाराला आपला जीव गमवावा लागला आहे.
अठरा दिवस त्याचे वर वेगवेगळ्या हॉस्पिटल येथे उपचार सुरु असतांना अखेर आज (ता.30 ऑगस्ट) ला त्याची प्राणज्योत मालवली. मृतक किशोर लटारी बोधाने (38) रा. मार्डी असे नाव आहे. किशोर हा वणी येथील श्रीपाद अटोमोबाइल्स मध्ये गेली 15 वर्षापासून मोटरसायकल दुरूस्तीची कामे करत होता. त्याच्या पाठीमागे वृद्ध आई वडील,पत्नी, तीन बहिणी,एक 10 वर्षांचा व एक 8 वर्षांचा मुलगा आहे.
सविस्तर असे की, दिनांक 12 ऑगस्ट रोजी किशोर बोधाने मोटरसायकल क्र एम एच 29 ए क्यू 7458 ने वणी वरून मार्डीकडे येत असतांना अशातच समोरून येणारी दुचाकी क्र एम एच 29 एजी 4092 चा चालक दिलीप चिकटे (25) रा. नांदेपेरा ता. वणी याने त्याच्या ताब्यातील मोटरसायकल भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून मृतकाचे दुचाकीला ठोस मारल्याने मृतक याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने उपचाराकरिता वणीतील खासगी रुग्णालयात दाखल केले, गंभीर असल्याने तिथून वर्धेच्या नामांकित दवाखान्यात हलविण्यास सांगितले, तेथून व्हेंटिलेटर अभावी त्याला नागपूर ला हलविण्यास सांगितले. नागपूर ला शासकीय व खासगी रूग्णालयात दाखल केले. खासगी रूग्णालयाच्या अती खर्चामुळे पुन्हा सावंगी मेघे येथे दाखल केले.पुन्हा मेघे सावंगी येथून यवतमाळ येथे रेफर केल्याने  तो रस्त्यामध्ये मरण पावला. अशी तक्रार मृतकाच्या भाऊजीने किशोर वासुदेव घुगुल (45) रा. दहेगाव ता. वणी यांनी दि.30 ऑगस्ट 2022 ला सायंकाळी वरील आरोपीविरोधात मारेगाव पोलिसात तक्रार दाखल केली असून कलम 279,337,304 (अ) भांदवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास मारेगाव पोलीस करित आहे.

आज दि.31 ऑगस्ट ला त्याच्या पार्थीवाचे शवविच्छेदनानंतर अंदाजे 11 वाजेपर्यंत अंत्यसंस्कार होणार असल्याचे नजिकच्या नातेवाईकांनी सांगितले.

सुंदर हस्ताक्षर हाच खरा दागिना होय- केंद्रप्रमुख शिवशंकर पाटील यांचे मत

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

उदगीर : सध्याचे युग हे जरी तंत्रज्ञानाचे युग असले तरी विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनात विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुंदर असणे गरजेचे असून सुंदर हस्ताक्षर हाच खरा दागिना असल्याचे मत केंद्रप्रमुख शिवशंकर पाटील यांनी आपले मत व्यक्त केले ते तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांदेगाव येथील ज्ञानज्योती प्रकाशनच्या वतीने सुंदर हस्ताक्षर लेखन पुस्तके वाटप प्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चांदेगाव येथील नवतरुण सरपंच सुधाकर मुस्लिम होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानज्योती प्रकाशन संस्थेचे संस्थापक नागनाथ सोमवंशी प्रकल्पप्रमुख प्रा अतिश कळशे शाळेचे मुख्याध्यापक मोघेकर यांच्यासह आदी मान्यवर उपसथित होते पुढे शिवशंकर पाटील यांनी ज्ञानज्योती प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुंदर हस्ताक्षर लेखन या पुस्तिकेचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या यावेळी या प्रसंगी या सुंदर हस्ताक्षर लेखन उपक्रमाविषयीची उपस्थितांची मार्गदर्शनपर भाषणे झाली अध्यक्षीय समारोह प्रसंगी सरपंच सुधाकर मुस्लिम यांनी या सुंदर हस्ताक्षर लेखन या उपक्रमाचे कौतुक करून जिल्हा परिषद शाळेतील या लेखन पुस्तिकेचा विद्यार्थ्यांना खूप चांगला फायदा होईल असे मत व्यक्त करून या शाळेतील सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना या पुस्तिकेचे वाटप करण्यात आले व ज्ञानज्योती प्रकाशनाचे कौतुक करून या संस्थेला सहकार्य करण्याचे यावेळी त्यांनी आश्वासन दिले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य तथा शिक्षक धनंजय गुडसूरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन शिक्षक विजय गुरुखेल यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वी साठी शाळेतील सर्व शिक्षकांनी पुढाकार घेतला यावेळी विद्यार्थी शिक्षक आधी सह शिक्षण प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गुरु आले माझ्या दारी...अनिल डोंगरे परिवाराकडून वने, सांस्कृतिक कार्य व मस्त्यव्यवसाय मंत्री मा.ना सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचा सन्मानपूर्वक स्वागत सत्कार..


सह्याद्री चौफेर | न्यूज 

चंद्रपूर : राज्याचे वने सांस्कृतिक कार्य मंत्री मा.ना.श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी श्री अनिल डोंगरे यांच्या निमंत्रणावरून घरी भेट दिली असता, श्री अनिल डोंगरे परिवाराकडून मा.ना. श्री.सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक स्वागत सत्कार करण्यात आला.
सुधीर भाऊ हे माझे गुरु आहे मंत्रीपद मिळताच ते माझ्या घरी आले, हा माझ्यासाठी भाग्याचा क्षण आहे. मा. ना. सुधीर भाऊ मुळे मी राजकारणात समाजकारणात जनतेची सेवा करीत असताना भाऊंनी माझ्या प्रत्येक पावलावर साथ दिली. एक गुरु म्हणून एका शिष्याच्या घरी येणे हे माझ्यासाठी गुरुने दिलेली दक्षिणा आहे असे डोंगरे यांनी सांगितले.

मा.माणिकराव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रासेयो च्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न


चेतन पवार | सह्याद्री चौफेर 

दारव्हा :  कला व वाणिज्य महाविद्यालय, बोरी अरब व जिजामाता कला महाविद्यालय, दारव्हा येथील राष्ट्रीय सेवा योजना पथक  संयुक्त विद्यमाने नुकतेच नवसंजीवन  शिक्षण प्रसारक मंडळ दारव्हा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.माणिकरावभाऊ  ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नीधी मंगल कार्यालय, दारव्हा येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण 75 रक्तदात्यांनी रक्तदानाचे  अनमोल दान देऊन आपले सामाजिक दायित्व पार पाडले यामध्ये कला व वाणिज्य महाविद्यालय, बोरी अरब येथील जय गावंडे, निखिल वाघ, आशिष मेश्राम, ऋत्विक पोपलकर, नंदागवली, सहर्ष चंद्रिकापुरे या विद्यार्थ्यांचा प्रामुख्याने सहभाग होता. या रक्तदान शिबीराकरिता प्राचार्य डॉ.सुनील ढेरे, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.नंदकुमार भाकरे, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ.सुजाता नाईक, प्रा प्रकाश तेलगोटे, ज्येष्ठ प्रा.डॉ.रामचंद्र बुटले,डॉ.दीपक कुटे, डॉ.विकास निंघोट, डॉ. गणेश पवार, डॉ.विजय खोब्रागडे व समस्त   रासेयो स्वयंसेवक यांनी अथक परिश्रम घेतले.

आनंद निकेतन महाविद्यालय,आनंदवन,वरोरा येथेमहाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रा प्रशिक्षण शिबिर संपन्न


कालू रामपुरे | सह्याद्री चौफेर 

वरोरा : आनंद निकेतन महाविद्यालय,आनंदवन,वरोरा येथे महाराष्ट्र राज्य कौशल्य,रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन,यांचे महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण 2018 अंतर्गत आयोजित "महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रेच्या" सदर धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी नोडल एजन्सी म्हणून कार्यरत आहे.
राज्यातील नागरिकांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी विभागामार्फत महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. या संबंधाने प्रशिक्षण शिबिर घेऊन यासंबंधीचे आनंद निकेतन महाविद्यालयात विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले. ही स्टार्टअप यात्रा 2 सप्टेंबर 2022 रोज शुक्रवारला आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन,वरोरा येथे सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत येत आहे. या अनुषंगाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.मृणाल काळे, कार्यक्रमाचे मार्गदर्शक प्रा.राजू महाजन, प्रमुख उपस्थिती, महाविद्यालयीन समन्वयक नीरज आत्राम,प्रा. राधा सवाने,प्रा. रमेश पळसुटकर, प्रा. गालकर प्रा. नितीन बारेकर, प्रा.सीमा नगरारे, प्रा.मानसी काळे, व्ही.आर.आत्राम, प्रा मंडल, प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते. "विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले कौशल्य, कला आणि ज्ञान विकसित करून बेरोजगारांना रोजगाराच्या संबंधाने सतत प्रोत्साहित केले पाहिजे" असे आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये प्राचार्य डॉ.मृणाल काळे यांनी सांगितले. तसेच मार्गदर्शक प्रा. राजू महाजन यांनी "महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण 2018" आणि महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विद्यार्थ्यांनी तथा बेरोजगारांनी सामोरे यावे असे आवाहन केले." महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेसाठी स्पर्धक नोंदणी सुरू आहे. तरी इच्छुकांनी महाविद्यालयात येऊन समन्वयकांशी संपर्क साधावा. अशाप्रकारे सर्व योजना सविस्तरपणे समजावून सांगितले.
प्रा मंडल, प्रा.सचिन लोहकरे, प्रा.व्ही पि.गजरे, नव उद्योजक, जितेश कायरकर, प्रशांत ढेंगळे यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक निरज आत्राम यांनी केले. तर या कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन प्रा. रमेश पळसुटकर यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.नितीन बारेकर यांनी केले. या शिबिराला विद्यार्थ्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

आणखी एका शेतकऱ्यांची आत्महत्या; 28 ऑगस्ट रोजी घेतले होते विष


चंदू राऊत | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : तालुक्यात आत्महत्यांची मालिका थांबता थांबेना, आत्महत्यांचे सत्र सुरूच असून, दिवसेंदिवस आत्महत्येच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. मात्र, मारेगाव प्रशासन या गंभीर प्रश्नाकडे गांभीर्याने घेत नसल्याचे बोलल्या जात आहे.

मारेगाव तालुक्यातील दांडगाव येथील शेतकरी तरुण तोताराम मंगत चिंचोलकर (47) याने राहत्या घरात दि.28 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 वाजता विषप्राशन केले. त्यांना वणी येथे दाखल करण्यात आले होते, परंतु प्रकृती गंभीर असल्याने त्यांना चंद्रपूर येथे हलविण्यात आले होते. त्यांचे वर तेथे उपचार सुरु असतांना काल मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली. या दुःखद घटनेने चिंचोलकर परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.

मागील महिन्याभऱ्यातील अतिवृष्टी आणि सततची नापिकी, डोक्यावर असलेले ओझे त्यामुळे कुटुंबाचा गाडा हाकलने फार तारेवरची कसरत सध्या शेतकऱ्यांना करावी लागत असल्याने तालुक्यात आत्महत्याचे प्रमाण वाढत असून शासन प्रशासन या गंभीर बाबीकडे पाहिजे तसे लक्ष घालत नसल्याचे बोलल्या जात आहे. 

तोताराम यांचे पाठीमागे पत्नी, आई-वडील, दोन मुली असा बराच आप्त परिवार आहे.

अनिल सचदेव साहेबांचा सूरमाज फाउंडेशनच्या वतीने सत्कार

सह्याद्री चौफेर | न्यूज 

चोपडा : आपल्याला माहीत आहे की, रुग्णालयात गेल्यास रुग्णाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यामुळे काही वेळा रुग्णाची प्रकृती गंभीर होते, त्यामुळेच जिल्हास्तरावर वैद्यकीय मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे आणि तेथे जिल्हा समन्वय.रुग्णांना मार्गदर्शन करण्यासाठी व त्यांच्या समस्या सोडविण्याचे काम करणारे एक पद आहे, या पदावर चोपडा शहरातील माननीय सुनील सचदेव साहेब यांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्यामुळेच सूरमज फाऊंडेशनने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.यावेळी अध्यक्ष डॉ. सूरमज फाउंडेशनचे हाजी उस्मान शेख साहिब अब्दुल्ला शेख नजीर काझी साहिब शाहिद शेख जुबेर बाग उपस्थित होते.

पिकअप वाहनाने दिली दुचाकीला धडक, दुचाकीस्वार ठार

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

वणी :भरधाव पिकअप वाहनाने  एका दुचाकीस्वाराला मागून धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाला. ही घटना मुकुटबन मार्गावरील मानकी गावाजवळ घडली. मृतक मानकी येथील रहिवासी आहे. मात्र, घटना घडताच वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला. 

घटना अशी की, मानकी येथील शेतकरी चरणदास पांडुरंग ठेंगणे (54) हे  दुचाकी क्र एम एच 29 डब्ल्यू 5040 ने आज रविवार रोजी दुपारी 2:15 वाजताच्या सुमारास घरून काही कामानिमित्त वणी कडे निघाले सोबत मुलाला वाटेत असलेल्या शेतात त्याला सोडून वणीकडे जात असताना अशातच त्यांच्या पाठीमागून येत असलेल्या भरधाव चार चाकी पिकअप वाहनाने चरणदास यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने चरणदास हे रस्त्यावर पडले असता त्याच  पिकअप वाहनाने त्यांना चिरडले व त्याच्या मृत्यू झाला. 

आवाजाच्या दिशेने आसपासच्या शेतातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दुचाकीला धडक देवून चरणदास ठेंगणे यांच्या मृत्युस कारणीभूत ठरणाऱ्या पसार पिकअप वाहनचालकाच्या विरोधात वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर अपघातातील पिकअप वाहन विस्फोटक वाहतूक करणारी असल्याची माहिती आहे. या घटनेचा पोलीसांनी पंचनामा केला असून, पुढील तपास वणी पोलीस करित आहे.
  

49 वर्षीय इसमाची विष प्राशन करून आत्यहत्या


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

वणी : शिरपूर पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या नवरगाव (कायर) येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडे चार वाजताचे दरम्यान, घरी एकटा असतांना विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली.
रमेश विठ्ठल तिखट (49) असे विषारी औषध प्राशन आत्महत्या केलेल्या मृतकाचे नाव आहे. घरी कोणीच नसतांना त्याने विषारी औषध प्राशन केले असता, त्याला  वणी येथील ग्रामिण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला चंद्रपूर येथे हलविण्यास सांगितले, चंद्रपूर येथे उपचारादरम्यान 23ऑगस्ट रोजी त्याचा मृत्यू झाला. त्याच्या निधनाने तिखट कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.
रमेश यांच्या पाठीमागे पत्नी, दोन विवाहित मुली, एक मुलगा असा बराच आप्त परिवार आहे. 

जिबगाव येथे तान्हा पोळा मोठ्या उत्साहात साजरा....


उमेश गोलेपल्लीवार | सह्याद्री चौफेर 

सावली : तालुक्यातील मौजा जिबगांव वासीयांच्या वतीने जिबगांव येथे दिनांक 27 आगस्ट ला लहान बाळ गोपालांचा तान्हा पोळा उत्सव मोठ्या थाटामाटाने संपन्न झाला. यामध्ये नंदीबैल सजावट स्पर्धा व वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, या स्पर्धेमध्ये शेकडो लहान बालगोपालांनी आपल्या नंदीबैलाच्या सजावटीसह वेशभूषा मध्ये सहभाग नोंदवला.
जिबगांव येथील हनुमान चौकात आयोजित तान्हा पोळा यामध्ये नंदीबैल सजावट व वेशभूषा स्पर्धे मोठ्या संख्येने जिबगांव वासीयांच्या उपस्थित भव्य दिव्य बाल गोपाळाचा ताणा पोळा मोठ्या उत्साहात पार पडला.

कोब्रा मॅन संतोष वानखेडे यांच्या वाढदिवशी फळझाडे वाटप

विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : तालुक्यातील सगणापूर येथील सर्पमित्र तथा निसर्गप्रेमी कोब्रा मॅन संतोष वानखेडे यांनी आपला जन्मदिवस गावातील नागरिकांना फळझाडे वाटप करून साजरा केला आहे. त्यांच्या ह्या कृतीचे कौतुक होत असून पर्यावरण पोषक उपक्रम करून संतोष वानखेडे यांनीजन्मदिवस साजरा करून एक आदर्श समाजापुढे ठेवला. कोब्रा मॅन संतोष वानखेडे हे उच्चशिक्षित असून त्यांना सापाबद्दल विशेष आकर्षण असून आजपर्यंत वानखेडे यांनी 988 सापांना जीवदान दिले. त्यांच्या उपक्रमाने समाजात पर्यावरण रक्षणाचा संदेश जात आहे. 

प्रत्येक शाळेत आता आपले गुरुजी यांचा फोटो दर्शनी वर्गात झळकणार !


बालाजी सुवर्णकार | सह्याद्री चौफेर 

उदगीर : राज्यातील आता प्राथमिक माध्यमिक शाळांमध्ये सर्व माध्यमांच्या वर्गशिक्षक व शिक्षिका यांचा योग्य आकारातील फोटो आपले गुरुजी या नावाने सन्मानपूर्वक वर्गाच्या दर्शनी भागात प्रदर्शित करावा व सर्व शाळांमध्ये या सूचनेचे मा मंत्री मंडळात झालेल्या चर्चेनुसार मा आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांचे संदेश दिनांक 23 ऑगस्ट 2022 यानुसार व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद लातूर नांदेड उस्मानाबाद यांना शिक्षण उपसंचालक लातूर विभाग लातूर यांनी दिनांक 25 ऑगस्ट 2022 रोजी च्या परिपत्रकाद्वारे कळविले असून त्या कारवाई बाबतचा अहवाल शिक्षण उपसंचालक लातूर यांनी दिनांक 29 ऑगस्ट 2022 पर्यंत सादर करण्याचे कळविले असून याबाबत टीचर ग्रुप ऑफ महाराष्ट्र राज्याचे खाजगी प्राथमिक विद्यालयाचे संस्थापक बालाजी सुवर्णकार यांनी या परिपत्रकाचे स्वागत केले असून आपले गुरुजी या शासनाच्या उपक्रमात शाळेच्या मुख्याध्यापकाने पुढाकार घ्यावेत असे मत बालाजी सुवर्णकार यांनी केले असून या आपले गुरुजी या प्रदर्शित फोटोला किती प्रतिसाद मिळेल अशी उत्सुकता गुरुजींना व पालकांना आता लागली आहे.

पोळ्या सारख्या सण आणि विवाहित तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : तालुक्यात आत्महत्यांचे सत्र सुरूच असून, दिवसेंदिवस आत्महत्येच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. मात्र प्रशासन या गंभीर प्रश्नाकडे गांभीर्याने घेत नसल्याचे बोलल्या जात आहे.
मारेगाव तालुक्यातील म्हैसदोडका येथील विवाहित तरुण सतिश वासुदेव बोथले (32) याने राहत्या घरात दि.25 ऑगस्ट रोजी सकाळी विषप्राशन करून आत्महत्या केली.
घडलेली दुःखद घटना कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत सतीशला लगेचच उपचारासाठी मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सतिशच्या तब्बेतीचे गांभीर्य लक्षात घेत त्यांचे वर येथील प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ चंद्रपूर येथे हालविण्यात आले. येथील उपचार सुरू असताना सायंकाळी सतीश यांचा उपचारादरम्यान मुत्यु झाला. ऐन पोळ्या सारख्या सणा च्या दिवशी त्याची सायंकाळी 26 ऑगस्ट रोजी निधन झाल्याने गावात शोककळा पसरली.
सतिशच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून याच्या पाठीमागे आई-वडील, पत्नी व एक भाऊ असा बराच आप्त परिवार आहे. या घटनेने बोथले कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. 
एक महिन्याआधी मोठ्या भावाची आत्महत्या : 

मागील एक महिन्यांपूर्वी मोठ्या भावाने विषप्राशन करून आत्महत्या केली होते. त्यांनंतर लहान भावाने आत्महत्या केली, त्यामुळे या दु:खदायक घटनेने म्हैसदोडका परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मच्छिन्द्रा वासीयांनी जपली अनेक वर्षांची परंपरा


नितेश वनकर | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : वर्षभर शेतकरी वर्ग ज्यांच्या भरोशावर शेती करत असतो. त्या बैलांचा पोळा मोठ्या उत्साहात मच्छिन्द्रा येथे साजरा करण्यात आला. मारेगाव तालुक्यातील मच्छिन्द्रा येथे अनेक वर्षांपासून ऐतिहासिक बैलांचा पोळा भरतो. मात्र, कोरोना काळात दोन वर्षे या पोळाचे आयोजन नाममात्र करण्यात आले होते.     
पिढ्यान् पिढ्या हा बैलांचा पोळा येथील सर्वधर्म समभावातून जोपासला जात आहे. स्पर्धेच्या युगात ट्रॅक्टरचे प्रमाण वाढले असतांना मात्र, आजही पोळ्याच्या आदल्या दिवशी "आज आवतन घ्या, उद्या जेवायला या" म्हणत बैलांचे खांदे शेकत असतात. व दुसऱ्या दिवशी बैलांना रंगरंगोटी व सजावट केले जात असत. अशातच सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास प्रथम जोडीला मान दिला जातो. हनुमान मंदिराला प्रदक्षिणा घालण्याचा अगोदर आंब्याच्या बांधलेल्या तोरणाला तोडले जातात, ठरलेल्या मैदानात गावातील सर्व शेतकरी बांधवांच्या बैलांच्या जोड्या एकत्र येत असत. पोळ्यानिमित्त गावातील नागरिक हे बैलांच्या पाया व एकमेकांना अक्षदा लावून नमस्कार घेत असतात. एकमेकांच्या घरी बैल जोडी नेवून भेट देत असतात.
पोळा पाहण्यासाठी गावातील महिला, पुरुष मोठ्या प्रमाणावर मिळेल त्याठिकाणी उपस्थित होते. या निमित्ताने जातीय सलोखा ठेवणे ही मच्छिन्द्रा गावची परंपरा आहे.