Page

वणीत केंद्र सरकारचा जाहीर निषेध: काँग्रेसचा शांततापूर्ण सत्याग्रह

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

वणी : नॅशनल हेराल्ड केस संदर्भात सोनिया गांधींची ईडीकडून चौकशी करण्यात येत असतांना आज देशभर केंद्र सरकार आणि ईडी च्या विरोधात काँग्रेस च्या वतीने तीव्र निदर्शने व आंदोलन करण्यात आले. त्याचेच पडसाद आज (ता.26 जुलै) ला वणी येथेही उमटले.
वणी शहर व तालुका काँग्रेस पक्षा च्या वतीने केंद्र सरकार च्या निषेर्धात शांतता सत्याग्रह करण्यात आला. "मोदी जब जब डरता है, ईडी को आगे करता है" या टॅग लाईन खाली संताप व्यक्त करित मा सोनिया गांधी यांना ईडी च्या माध्यमातून त्रास देणाऱ्या  केंद्रातील मोदी सरकारचा अ‍ॅड. देविदास काळे उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या नेतृत्वात जाहीर निषेध करण्यात आला आहे.
तसेच वणी उपविभागामध्ये झालेल्या अतिवृष्टी महापुरामुळे शेती जमीन खरवडून गेली व पिके नष्ट झाली. त्या मुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई व  वणी उपविभागात ओला दुष्काळ जाहीर करावा हि मागणी सरकार कडे उपविभागीय अधिकारी शरद जावळे यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.
या वेळेस अ‍ॅड. देविदास काळे उपाध्यक्ष महाराष्ट प्रदेश काँग्रेस यांच्या नेतृत्वात राजाभाऊ पाथ्रडकर, विवेक माडंवकर, राकेश खुराणा, संजय खाडे, प्रशांत गोहोकार, शालिनी रासेकर, निलीमा काळे, सविता रासेकर, वंदना धगडी, विलास माडंवकर, अ‍ॅड. सुरज महातळे, तेजराज बोढे, प्रेम खुराणा, भास्कर गोरे, प्रेमीला चौधरी, फेतफुलवार, सौ. सिघांनिया, गजरा जयस्वाल, प्रमोद लोणारे, रमेश भोगंळे, ऊदय रायपुरे, खालीदभाई, ऊत्तमराव गेडाम, अरविंद बोबडे, सुरेश बरडे, प्रदीप खेकारे, अशोक नागभिडकर, विकेश पानघाटे आदी सह असंख्य काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
             जाहिरात साठी संपर्क : 9011152179