Page

मारेगाव तालुक्यातील नागरिकांची वरोरा जलशुद्धी केंद्राकडे 'ही' केली मागणी

विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : तालुक्यातील दांडगाव येथील सरपंच व मुकटा, शिवणी, दांडगाव व हिवरा गावकऱ्यांनी मार्डा डॅम वरील रॅलिंग दुरुस्त करण्यात यावी अशी मागणी मा जनरल मॅनेजर महा. औ वि म जलशुद्धी केंद्र वरोरा यांना करण्यात आली.
मागील विस दिवसापासून तालुक्यात संततधार पाऊस सुरु आहे. त्यातच अप्पर वर्धा, बेंबळा प्रकल्प यातून मोठा विसर्ग झाल्याने महापूर आला. वर्धा नदीला ओसंडून पाणी वाहू लागल्याने पुरामध्ये अतोनात नुकसान झाल्याने या नदी वरील यवतमाळ चंद्रपूर जिल्ह्याचा पाणी साठवणारा मार्डा डॅमचे रॅलिंग तुटल्याने या रॅलिंग व विस्कळीत रस्ता पूर्वव्रत करण्यात यावा, वरोरा तालुका जवळ असल्यामुळे येथे जाणे येण्यास अडचण निर्माण झाली असून दवाखाना, बाजार मार्केट व शाळा येथे जाण्या येण्यासाठी मोठा पेच पडल्याने या वर्धा नदी वरील मार्डा डॅम चे रॅलिंग दुरुस्त करून रस्ता सुरळीत करण्यात यावा,अशी मागणी येथील सरपंच, पोलीस पाटील व गावकरी यांनी केली आहे.
 दिलेल्या निवेदनावर अजय देविदास ताजने पोलीस पाटील (मुकटा), संतोष उताणे,निलेश ताजणे, अतुल कोंढेकर, रविंद्र इनामे जितेश ढवस, भास्कर मेश्राम, विवेक ताजणे, विनोद कंडे, प्रवीण लोडे (शिवणी), दिलीप ढवस, विशाल ढवस, कमलाकर लोहे (शिवणी), विजू ढवस, शरद ताजणे, नामदेव भोंग, अभय दुमोरे (शिवणी) यांच्या सह्या आहेत.