सह्याद्री न्यूज | योगेश तेजे
कायर, (ता.३) : माणसाला पैश्याची हाव कुठे बुडवेल सांगता येत नाही
आणि त्याच पैश्याच्या लोभापायी आपल्या खात्यावरील पैसे गमवावे लागत आहेत.
असेच फेक कॉल कायर परिसरात अनेकांना येत असून त्यामुळे अनेक नागरिक फेक कॉलच्या भुलथाफांना बळी पडत असल्याचा प्रकार कायर परिसरात घडत असून सावधानत: बाळगण्याचा विषय झाला आहे.
सविस्तर असे की, फेक कॉल आल्यानंतर समोरील व्यक्ती गोडीगुलाबीने बोलून तुम्हाला पंचवीस लाख मिळेल असा दावा करतात. त्यांनतर खाते नंबर मागतात आणि आपल्या खात्यावर हजार रुपयांपासून ते लाखो रुपये टाकण्यापर्यंत सांगतात. त्यानंतर तुमच्या खात्यावर पंचवीस लाख जमा केल्या जाईल असे, सांगितल्या जातात.
मात्र, लालसे पोटी पुन्हा त्या नंबरवर कॉल केल्यावर फोन बंद दाखविल्या जातात, त्यानंतर खात्यावर पैसे टाकलेल्या व्यक्तीच्या हातात पंचवीस लाख न येता निराशा येत आहे.
अशा घटना दिवसेंदिवस वाढतांना दिसत आहे तर त्यात अनेकांनी फेक कॉल आलेल्या व्यक्तीच्या नावावर पैसे टाकून स्वतःची फसवणूक करून घेतल्याच्या घटना सुद्धा पहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांनी भुलथाफांना बळी पडून न जाता आजघडीला अशा कॉल पासून सावध राहण्याची गरज आहे.