समस्याना वाचा फोडणारी प्रतिभा ठरतेय पहिली महिला पत्रकार...
20 मार्च,आज पत्रकार प्रतिभा तातेड यांचा अभिष्टचिंतन दिन
महिलांना संधी उपलब्ध करून दिल्यास त्या कोणत्याही क्षेत्रात मागे राहात नाही.त्यामुळेच महिलांसाठी भारतीय लोकशाहीने सर्वच क्षेत्राचे दरवाजे खुले ठेवले आहे.मात्र, ग्रामीण भागातअजूनही महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला नाही.या बाबीला छेद देण्यासाठी माध्यमाच्या पटलावर प्रतिभा तातेड या महिला पत्रकाराने एन्ट्री केली आहे. अल्पावधीत त्यानी अनेक समस्याना वाचा फोडण्याचे काम एका सांध्य दैनिकाच्या माध्यमातून निर्भीडपणे करीत आहे.त्यामुळे त्या मारेगाव तालुक्याच्या इतिहासातील पहिली महिलां पत्रकार म्हणून ठरली आहे.तालुक्यात केवळ पुरुष वर्गाचेच वर्चस्व या क्षेत्रावर राहिले असताना "हम भी कुछ कम नहीं" हे त्यांच्या लेखणीतून उमटले आहे.वणी येथील नामवंत एका दैनिकांचे तालुका पत्रकार स्व. चंपालाल भंडारी तसेच स्व.ग्यानचंद भंडारी यांची ती पुतणी असून परंपरेने बालकडू पिलेल्या या महिला पत्रकारने अल्पवधीत गरुड भरारी घेतली आहे.प्रस्तापीताना लाजवेल असे वृत्ताकन करून अनेक प्रकरणाला वाचा फोडली आहे.निर्भीड लेखन केल्यामुळे त्यांचेवर खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, न डगमगता त्या तक्रारीलाच हायकोर्टात थेट आव्हान देत "सत्य मेव जयते"चा नारा दिला.त्यांची ही कार्यप्रणाली इतरांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेल्या या महिला पत्रकाराने अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहे.यामध्ये विद्यार्थी गुणगौरव सोहळा विशेष उल्लेखनीय ठरला असून वृक्षारोपण,शहरात पाणपोई यासंह अनेक उपक्रम त्यांनी राबविले आहे.अशा या निर्भीड,निपक्ष पत्रकार प्रतिभा तातेड यांना जन्मदिनाच्या अनंत शुभेच्छा... त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच निर्मिकाकडे प्रार्थना.. "सह्याद्री चौफेर" परिवारा तर्फे उदंड आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा...!!