Page

APMC Election Result 2023 : मारेगाव बाजार समितीवर काँग्रेसची सत्ता, आमदार वामनराव कासावारांनी राखला गड

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

मारेगाव : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच बाजार समितीच्या निवडणुका पार पडत आहेत. या निवडणुकीत काँग्रेसने आपले वर्चस्व राखल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसने मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागा पैकी १७ जागा जिंकल्या आहेत. तर भाजपाने एक खाते उघडले.

राज्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून अनेक जणांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राज्यातील सत्तांतरानंतर ही पहिली गाव पातळीवरील प्रत्यक्षात शेतकरी सहभागी असणारी निवडणूक होती. त्या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार याची चर्चा सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्यातील मारेगावमध्ये सुद्धा ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. मात्र, या निवडणुकीमध्ये काँग्रेसने एक हाती सत्ता मिळवली असून आमदार वामनराव कासावारांनी आपला गड पुन्हा राखला आहे.

मारेगाव शेतकरी एकता पॅनलने जिंकल्या सतरा जागा : मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसला एक तर्फी वामनराव कासावार व माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या मारेगाव शेतकरी एकता पॅनलने १७ जागा जिंकून बाजार समितीवर सत्ता आणली आहे. यामध्ये विरोधक असणाऱ्या शेतकरी परिवर्तन पॅनलला एक जागा मिळवता आली. त्यांचा दारून पराभव झाला आहे.

काँग्रेस पुरस्कृत शेतकरी एकता पॅनल चे विजयी उमेदवार :

गौरी शंकर खुराणा, अरुणाताई खंडाळकर, वसंत आसूटकर, गणू थेरे, यादव काळे, जीवन काळे, काशिनाथ खडसे, ब्रम्हदेव जुनगरी, सुनीता मस्की, संतोष मडावी, रमण डोये, प्रफुल विखणकर, विजय अवताडे, महादेव सारवे, देविदास बोबडे, भास्कर धांडे यांचा समावेश आहे.



अज्ञातांनी पेटवली माजी नगरसेवकाची गाडी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : येथील सामाजिक कार्यकर्ता तथा माजी नगरसेवक यांच्या घरा समोर उभे असलेल्या त्यांच्या चारचाकी वाहणाला अज्ञात इसमांनी ज्वलनशील पदार्थ झोकून पेटवून दिल्याची घटना रविवारी पहाटे 2.30 वा.च्या सुमारास घडली. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून विविध चर्चेला उधाण आले आहे.

माजी नगरसेवक तथा चापली रिपवाटिकेचे संचालक राजू तुराणकर हे नेहमीप्रमाणे आपल्या नर्सरीवरून घरी दहा वाजता परतले, त्यांनी आपली महिंद्रा बेलोरो (एम एच 31 सी एस 7900) हे वाहन घरा समोर उभे केली होती. दरम्यान कालपासून अवकाळी पावसाचे थैमान सुरु असल्याचा फायदा घेत अज्ञात इसमानी गाडी च्या काचा फोडल्या व ज्वलंनशील पदार्थ झोकून बेलोरा गाडीला पेटवून दिले. दरम्यान, वाहनाच्या काचा फुटत असल्याचा आवाज त्यांना गेला, परंतु पाऊस सुरु असल्यामुळे त्यांना विजेचा आवाज असावा म्हणून दुर्लक्ष केले. मात्र धूर उडल्याने व काचेचा आवाज जोराने घुमल्याने आजूबाजूला वास्तव्यास राहणारे लोकं जागी झाले. तेव्हा गाडी पेटत असल्याचे निदर्शनास आले. अशातच घरची मंडळी उठली, आजूबाजूला असणाऱ्यांनी घटनेच्या ठिकाणी धाव घेत गाडी विझवण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली, पोलीस घटनास्थळी दाखल होऊन सदर घटनेचा पंचनामा केला. व अज्ञात इसमाविरोधात तक्रार दाखल करून गुन्हा नोंदवाण्यात आला. घटनेचा पुढील तपास पोलीस करित आहे.

शहरातील भरवस्तीत घडलेल्या या जाळपोळीच्या घटनेने स्थानिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे दहशत माजविणारे हे राजु तूराणकर यांच्यावर भ्याड हल्याचा प्रयत्न असावा असा संशय व्यक्त केला जात असून अशी खमंग चर्चा शहरात आहे. 

कसा असेल तुमचा महिन्याच्या शेवटचा दिवस? जाणून घ्या...!!


                  राशीभविष्य : ३० एप्रिल रविवार..!

मेष:-
मेष राशीच्या लोकांना भाग्य साथ देत आहे आणि महत्वाकांक्षी लोकांसाठी दिवस शुभ राहील आणि तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. प्रवासात लाभ आणि यश मिळेल. दुपारनंतर वरिष्ठांशी वाद होऊ शकतो. संध्याकाळी योजना पूर्ण करणे फायदेशीर ठरेल आणि संध्याकाळी अतिथीच्या आगमनामुळे खर्च वाढू शकतो.

वृषभ:-
वृषभ राशीच्या लोकांसाठी दिवस अनुकूल नाही. मालमत्तेशी संबंधित वादात तुमचे नुकसान होऊ शकते. भौतिक सुखाची साधने खरेदी करण्यात खर्च होऊ शकतो. तुम्ही तुमचा मुद्दा लोकांसमोर ठामपणे मांडू शकाल. रात्री कुटुंबियांसोबत सहली आणि मौजमजा करण्यात वेळ जाईल. तुम्ही जवळपास फिरायलाही जाऊ शकता.

मिथुन:-
मिथुन राशीच्या लोकांना भाग्य साथ देत आहे आणि काहीजण व्यवसायाशी संबंधित नवीन योजना बनवतील. कर्जाची परतफेड करू शकाल. मुलाकडून पूर्ण आनंद आणि सहकार्य मिळेल. भौतिक साधनांवर खर्च होण्याची शक्यता आहे. पण तुम्हाला आनंद होईल. नवीन शैली शिकण्याची संधी मिळेल. फालतू खर्च टाळा.

कर्क:-
कर्क राशीच्या लोकांची ग्रहस्थिती शुभ आहे. भौतिक सुख आणि समृद्धी वाढण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्य आणि सहकाऱ्यांशी संबंध चांगले राहतील. संध्याकाळपासून रात्रीपर्यंत तुम्ही शुभ कार्यातही वेळ घालवू शकता, ज्यामुळे तुमची कीर्ती वाढेल. नोकरीच्या ठिकाणी मान-सन्मान मिळेल आणि सुविधा वाढतील.

सिंह:- 
सिंह राशीच्या लोकांना भाग्य साथ देत आहे आणि जुन्या मित्रांच्या मदतीने कामाच्या ठिकाणी अनुकूलता येईल. तुमचे थांबलेले काम पूर्ण होईल आणि तुमच्यासाठी नवीन संधी येऊ शकतात. हुशारीने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. तुम्ही जे काही काम कठोर परिश्रम आणि समर्पणाने कराल त्यात तुम्हाला यश मिळेल. आत्मविश्वासात वाढ होईल. कोणत्याही राजकीय कार्यात सहभागी व्हाल आणि तुमचा प्रभाव वाढेल.

कन्या:-
कन्या राशीच्या लोकांना नशीब साथ देत आहे आणि विनाकारण शत्रूंची वाढ कमी होईल आणि तुमच्या समस्या दूर होतील. तुमचा खर्च कमी झाल्याने अर्थव्यवस्था सुधारेल. वाहनाचा आनंद मिळेल. आर्थिक बाबतीत कुटुंबातील सदस्यांशी वाद होऊ शकतात. आज तुमचे सर्व काम पूर्ण झाल्यामुळे लोक तुमचा हेवा करतील.

तूळ:-
तूळ राशीच्या लोकांना भाग्य साथ देईल. आर्थिक बाबतीत फायदा होईल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. पैसे मिळून निधी वाढेल. नोकरदार लोकांच्या अधिकारात वाढ होईल. स्पर्धा परीक्षा किंवा राजकारणात यश मिळण्याची शक्यता आहे. संध्याकाळपासून रात्रीपर्यंतचा वेळ काही शुभ समारंभात जाईल.

वृश्चिक:-
वृश्चिक राशीच्या लोकांचे भाग्य साथ देत आहे आणि अचानक एखाद्या मोठ्या अधिकारी किंवा नेत्याशी भेट होईल. तुमचे मन प्रसन्न राहील. नोकरीशी संबंधित चांगली बातमी कुठूनही येऊ शकते. तुम्हाला उत्तम प्रकारचे पदार्थ खायला मिळतील. एखाद्या कार्यक्रमाला गेल्यावर तुमचा खर्च वाढेल. जवळ किंवा दूरचा प्रवास करावा लागू शकतो.

धनु:-
धनु राशीच्या लोकांना भाग्य साथ देत आहे आणि तुमचे अडथळे दूर होतील. पूजापाठ आणि सत्संगात रुची वाढेल आणि कमाईचा काही भाग दानही होईल. नवीन व्यवसायासाठी नवीन योजना आखल्या जातील, ज्यामुळे भविष्यात धनलाभ होईल. तुम्हाला प्रत्येक बाबतीत भाऊ-बहिणींचे आनंद आणि सहकार्य मिळेल. आत्मविश्‍वासात वाढ होईल. राजकारणाच्या बाबतीत तुम्हाला धावपळ करावी लागेल.

मकर:-
मकर राशीच्या लोकांचा दिवस आर्थिक बाबतीत खूप संमिश्र जाणार आहे. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. व्यवहारात सावधगिरी बाळगा. तुम्ही पैशाच्या गुंतवणुकीशी संबंधित कोणतेही काम करू नका. नुकसान होण्याची शक्यता आहे.

कुंभ :- 
कुंभ राशीच्या लोकांचे नशीब साथ देत असून काही जुनी रखडलेली कामे पूर्ण होतील. जुनी रखडलेली कामे काही अडचणींनंतर पूर्ण होतील. सामाजिक कार्यात तुमचे योगदान वाढेल. तुम्ही तुमचे म्हणणे खरे असल्याचे सिद्ध कराल. शत्रू पक्ष तुम्हाला घाबरेल.

मीन :-
एप्रिल महिन्याचा शेवटचा दिवस तुमच्यासाठी शुभ राहील. तुमच्या तिजोरीत वाढ होईल आणि नशीब तुम्हाला अनुकूल राहील. तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून दिवस अनुकूल राहील. तुमच्या महत्त्वाच्या कामातील अडथळे दूर होतील आणि नशीब तुमची साथ देईल.


जिल्हा प्रशासनाने नवीन वाळू धोरणाची अंमलबजावणी गतिमान करावी – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर 

मुंबई : सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून राज्य शासनाने नवीन वाळू धोरण तयार केले आहे. या धोरणानुसार सर्वसामान्यांना चांगल्या प्रतीची वाळू स्वस्त दरात उपलब्ध होणार असून अवैध वाळू उपसा होण्यास प्रतिबंध होणार आहे. नव्या वाळू धोरणाची अंमलबजावणी राज्यातील जिल्हा प्रशासनाने करावी, असे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील यांनी आज दिले.

महसूल मंत्री श्री. विखे-पाटील यांनी व्हिडीओ कॉनफरन्सिंगद्वारे राज्यातील जिल्हाधिकारी आणि अपर जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधला. यावेळी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

महसूल मंत्री श्री. विखे - पाटील म्हणाले की, राज्यातील नागरिकांना स्वस्त दराने रेती मिळण्यासाठी तसेच अनधिकृत रेती उत्खननाला आळा घालण्यासाठी नवे सर्वंकष सुधारित रेती/वाळू धोरण राज्य शासनामार्फत जाहीर केले आहे. हे धोरण राबवित असताना जिल्हा पातळीवर काम करणाऱ्या स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांना अडचणी येऊ शकतात. यासाठी स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांच्या पाठिशी जिल्हाधिकारी यांनी ठामपणे उभे रहावे.

वाळू उत्खनन व्यवसायात शिरलेल्या अपप्रवृत्ती नष्ट करण्याला प्राधान्य देणे गरजेचे आहे, असे सांगून श्री. विखे- पाटील म्हणाले की, राज्य शासनाने जाहीर केलेल्या रेती/वाळू धोरणानुसार रेतीचे/ वाळूचे उत्खनन, साठवणूक आणि ऑनलाईन प्रणालीद्वारे विक्री करण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वाळू/ रेतीचे सर्वंकष धोरण असावे याबाबतची मागणी होती. या नवीन धोरणामुळे सर्वसामान्यांना वाळू/रेती सोप्या पद्धतीने खरेदी करता येणार आहे. शिवाय अनधिकृत पद्धतीने होणारे रेती/वाळूचे उत्खनन यावर आळा बसणार आहे. सर्वसामान्यांना परवडेल अशा किंमतीत रेती/ वाळू उपलब्ध व्हावी, वाळूची अवैध वाहतूक रोखली जावी यावर राज्य शासनाने भर दिला आहे.

पूर परिस्थिती धोका कमी करणे, नदीपात्रातील दिशा सरळ करणे कामी आवश्यक असलेली रेती /वाळू नदीपात्रातून काढणे यासाठी जलसंपदा विभागाची मदत घेऊन अशी कामे प्राधान्याने करणेबाबत निर्देश दिले. वैयक्तिक घर बांधकामासाठी ठराविक प्रमाणात वाळू उपलब्ध करून देणे, नवीन वाळू धोरण करताना सामाजिक स्वास्थ्य राखण्यासाठी, नागरिकांना कमीत कमी दरात वाळू उपलब्ध देण्याचा शासनाचा मानस आहे. मुबलक वाळू पुरवठा उपलब्ध केल्यास त्याचा सर्वसामान्यांना लाभ मिळणे, हा शासनाचा उद्देश आहे, असे त्यांनी सांगितले.

या नवीन धोरणानुसार प्रायोगिक तत्त्वावर एक वर्षासाठी सर्व नागरिकांना प्रति ब्रास 600 रुपये वाळू विक्रीचा दर निश्चित करण्यात आलेला आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार असून घरांच्या किंमतीही आवाक्यात येण्यास मदत होणार आहे. वाळू लिलाव बंद होणार असल्याने डेपोतूनच 600 रुपयात वाळू उपलब्ध होणार आहे. या धोरणानुसार स्वामित्व धनाची रक्कम माफ करण्यात येईल. याशिवाय जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी व वाहतूक परवाना सेवा शुल्क इत्यादी खर्च देखील आकारण्यात येतील. वाळूचे उत्खनन, उत्खननानंतर वाळूची डेपोपर्यंत वाहतूक, डेपोची निर्मिती आणि व्यवस्थापन यासाठी एक निविदा प्रक्रिया राबवण्यात येईल. यातून वाळू किंवा रेती उत्खनन करण्यात येईल. ही रेती शासनाच्या डेपोमध्ये नेली जाईल व तिथूनच या रेतीची विक्री करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

नदी पात्रातील वाळू गटाचे निरीक्षण करण्याची कार्यवाही तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील तांत्रिक समिती करेल. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय वाळू संनियंत्रण समिती स्थापन करण्यात येईल. ही समिती वाळू गट निश्चित करून, त्या गटासाठी ऑनलाईन ई-निविदा पद्धती जाहीर करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीला शिफारस करेल. जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतील आणि या समितीत मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक किंवा पोलीस आयुक्त, अपर जिल्हाधिकारी, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग व जलसंपदा विभाग तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी, भू-विज्ञान व खनिकर्म विभाग, भूजल सर्वेक्षण तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी असतील. ही समिती वाळू डेपोमध्ये वाळू साठा उपलब्ध करून घेण्यासाठी वाळू गट निश्चित करतील. तसेच राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या निर्देशांचे पालन होईल, याची दक्षता घेईल. विकास कामांसाठी वाळू उपलब्ध करण्याबरोबरच आजुबाजूच्या परिसरात पूरसदृश्य परिस्थिती उद्भवू नये, म्हणून वाळूचे उत्खनन केले जाते. राज्यातील वाळू लिलाव प्रक्रियेवरुन सातत्याने तक्रारी येण्याबरोबरच अनियमिततेला आळा बसणार आहे, असेही मंत्री श्री. विखे- पाटील यांनी सांगितले.

रविकांत मडावी यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या डोल डोंगरगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक यांना नुकताच जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.त्यामुळे त्यांचे शैक्षणिक विभागासह सामाजिक क्षेत्रामध्ये सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

रविकांत शामराव मडावी असे जिल्हा आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकाचे नाव आहे. सदर शिक्षक इंग्रजी विषयाचे उत्कृष्ट अध्यापक आहे. त्याचबरोबर त्यांनी तालुका स्तरावरील शैक्षणिक शिबिरामध्ये शिक्षकांना इंग्रजी विषयाचे प्रशिक्षणासह विविध नाविन्य उपक्रम राबविले आहेत.

त्यामुळे त्यांना नुकताच झालेल्या जिल्हास्तरीय कार्यक्रमात जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

एस.पी.एम विद्यालयात बालसंस्कार शिबिराचे आयोजन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : येथील एस. पी.एम विद्यालयात दिनांक 26 एप्रिल ते 3 मे 2023 पर्यंत बाल संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना व कलागुणांना वाव देण्याकरिता या शिबिराचे आयोजन करण्यात आले.

सकाळी सात ते दहा या दरम्यान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात शालेय प्रार्थना, प्राणायाम कराटे प्रशिक्षण व इतर विषयाचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना संबंधित विषयाचे शिक्षक करतात. यात गीत गायन वाचन प्रेरणा अभियान लेखन कौशल्य सामान्य ज्ञान व विद्यार्थ्यांमधील कलाविष्कार सादर करण्यात येतो, या शिबिराचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री क्षीरसागर सर व विद्यालयाचे उपमुख्याध्यापक माननीय श्री तामगाडगे सर यांच्या हस्ते 26 एप्रिल रोजी करण्यात आले शालेय प्रार्थना व योगासना श्री बुजुरे सर यांनी सादर केली सिंग मॅडम यांनी विद्यार्थ्यांना कराटे प्रशिक्षण दिले तर बिडकर मॅडम आणि बिडकर सर यांच्या चमुचे सहकार्य लाभले.

मेश्राम मॅडम यांनी विद्यार्थ्यांना संगीताचे धडे दिले. गारघाटे,सर, चिडे मॅडम, कनाके मॅडम,कचवे मॅडम,नवघरे मॅडम, आस्कर सर,धकाते सर, राजगडकर मॅडम, पडलवार सर, निमकर सर, मडावी सर, गादेवार मॅडम, आसुटकर सर, बुजुरे सर यांनी मुलांना वेगवेगळ्या विषयाचे धडे दिले. दरम्यान मधल्या सुट्टीत विद्यार्थ्यांना नाश्ता दिला जातं असे, या शिबिरासाठी सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.

भाजपा पुरस्कृत शेतकरी एकता पॅनलचा दणदणीत विजय

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत शेतकरी एकता पॅनलने दणदणीत विजय मिळवित बाजार समितीत आपली सत्ता कायम केली. 18 पैकी 14 जागांवर शेतकरी एकता पॅनलचे उमेदवार निवडून आले. या निवडणुकीत शेतकरी एकता पॅनलचा दणदणीत विजय झाला. तर महाविकास आघाडी समर्थित शेतकरी परिवर्तन पॅनलला 4 जागांवर समाधान मानावे लागले.

वणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे आज शुक्रवारी झालेल्या निवडणुकांचे निकाल रात्री उशिरा जाहीर झाले. त्यात शेतकरी एकता पॅनलने 18 पैकी 14 जागांवर दणदणीत विजय मिळावीत बाजार समितीत सत्ता काबीज केली. या बाजार समितीच्या निवडणुकीत 94 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. 36 अधिकृत तर दोन अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यापैकी सहकारी संस्था गटातील 10 व ग्रामपंचात गटातील 4 जागांवर भाजप समर्थित शेतकरी एकता पॅनलच्या उमेदवारांनी विजय मिळविला. तर व्यापारी अडते व हमाल गटातील तिन जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले. सहकार संस्था गटातील आरक्षित जागेवर महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून आला.

भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत या बाजार समितीच्या निवडणुकीत पाहायला मिळाली. अ‍ॅड. विनायक एकरे यांच्या नेतृत्वात शेतकरी एकता पॅनल तर, माजी आमदार वामनराव कासावार व माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वात शेतकरी परिवर्तन पॅनलचे उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. यात शेतकरी एकता पॅनलचे उमेदवार सरस ठरले. त्यांनी एकहाती विजय मिळविला. या विजयाचे पडसाद अन्य निवडणूकीवर पडतील अशा ही चर्चा रंगू लागल्या आहेत. 


कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये सहकारी संस्था गटातील शेतकरी एकता पॅनलचे अ‍ॅड. विनायक एकरे, नितीन पानघाटे, प्रभाकर बोढे, दिलीप बोढाले, मंगल बलकी, मोहन वरारकर, अशोक पिदूरकर, वेनूदास काळे, मीरा पोतराजे, वैशाली राजूरकर व शेतकरी परिवर्तन पॅनलचे प्रमोद वासेकर, यांचा तर ग्रामपंचायत गटातील उमेदवारांमध्ये शेतकरी एकता पॅनलचे विजय गारघाटे, प्रकाश बोबडे, चंद्रकांत हिकरे, हेमंत गौरकार यांचा तसेच व्यापारी अडते व हमाल गटातील उमेदवारांमध्ये शेतकरी परिवर्तन पॅनलचे सतिश बडघरे, रवींद्र कोंगरे, प्रमोद सोनटक्के यांचा समावेश आहे.



महाविकास आघाडतील अंतर्गत धुसपूस पराभवास
कारणीभूत ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळातून ऐकायला मिळत होती. महाविकास आघाडी पासून राष्ट्रवादी दूर राहिली. घटक पक्षही महाविकास घडतीत दिसून आले नाही. शेतकरी संघटनांनाही सोबत घेण्यात आले नाही. अनुभवी नेत्यांना दूर ठेवण्यात आले. काँग्रेस व सेना (ठाकरे) गटानेच महाविकास आघाडीच्या सीट वाटप करून निवडणूक लढविली. त्यामुळे महाविकास आघाडीशी संबंधित असलेले त्यांचे खंदे समर्थक नाराज दिसून येत होते. ही नाराजीच विजयला भोवल्याची चर्चा राजकीय विश्लेषकांमधून ऐकायला मिळत होती. रणनीतीकार, राजकीय धुरंधर व अनुभवी राजकारणी समजल्या जाणाऱ्या दोन माजी आमदारांच्या पॅनलला पराभवाचा सामना करावा लागल्याने हा पुढील वाटचालीकरता मोठा धक्का मानला जात आहे. दोन्ही राजकीय नेत्यांच्या संगठनाचा अभाव या निवडणुकीत दिसून आला. आपापसातील समन्वयाच्या अभावामुळे महाविकास आघाडीला पराभवाची चव चाखावी लागल्याच्या चर्चा आता शहरात रंगू लागल्या आहेत.

त्या निराधार महिलेचे घरावरील छत वादळ वाऱ्याने उडाले

आकांतात घरावरील उडालेले टिनपत्रे 

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यासह शिवणाळा उमरीपोड येथे बुधवारी अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला. त्यामुळे वादळ पाऊस वाऱ्याने येथील सुशिला बुतू जुनघरे (33) या निराधार महिलेच्या घरावरील छत पूर्णतः उडून गेले असून ती सध्या बेघर झाली आहे.

परिणामी तालुक्यात रोजच्या होणाऱ्या वादळ पाऊस वाऱ्यामुळे हे जुनगरी कुटुंब भितीखाली वावरत आहेत. दि.26 एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पावसाचा जोरदार फटका तालुक्याला बसला असताना यात शिवणाळा (उमरीपोड) येथील सुशीला जुनघरे यांच्या राहत्या घराचे छत्र आकांताने हरवले आहे. यात घरातील जीवनाशक्य वस्तू, कपडे त्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. महिलेच्या कुटुंबात दोन मुले व ती स्वतः राहते. तसेच सदर महिला ही निराधार  आहे.
गेल्या काही दिवसापासून तालुक्यात अवकाळी पावसाने वादळ वाऱ्याने थैमान घातले आहे. रोज काहींना काही घटना माध्यमातून समोर येत आहे. विशेष म्हणजे विजेचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होत असून काही ठिकाणी वीज पडत असल्याने या निराधार महिलेला प्रशासनाच्या तात्काळ मदतीची अत्यंत गरज असून संबंधित विभाग व स्थानिक प्रशासन घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. परंतु सुशीला ला शासनाच्या तात्काळ मदत मिळावी अशी आर्तहाक आहे. 
महाराष्ट्र् राज्य आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार तरतुदी नुसार आपत्ती व्यवस्थापन व सुरक्षितेची जबाबदारी ही संबंधित तालुका व जिल्हा व्यवस्थापन विभागाची आहे. त्या अनुषंगाने सदर घटनांना शह देण्यासाठी आपआपल्या परीने विभाग अधिकारी व कर्मचारी तसेच राजकीय प्रतीनिधी यांची जबाबदारी पाडली पाहिजे. असा सूर सदरील घटनास्थळी झालेल्या नुकसानीकडे पाहता म्हणता येईल. अशावेळी नुकसानग्रस्त कुटुंबाला लवकरात लवकर शासनाची मदत मिळावी हिच अपेक्षा.

- गंगाधर लोणसावळे महाराज
सालेभट्टी ता. मारेगाव 

ग्रामीण भागात पुन्हा पेटल्या चुली, महागाई च्या भडक्याने घर खर्चाचे बजेट कोलमडले

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये स्वयंपाक करण्यासाठी पुन्हा चुली पेटत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने ग्रामीण भागातील महिला आता पुन्हा चुलीकडे वळल्या आहेत. ग्रामीण भागात उज्वला गॅस योजने अंतर्गत गॅस जोडणी देण्यात आल्यावर चुलीचा वापर कमी झाला होता. परंतु सिलेंडरचे दर भडकताच,आता एवढे बजेट आणायचे कुठून हा प्रश्न मजूर वर्ग महिला समोर निर्माण झाल्याने आपली चूलच बरी म्हणत चूली पेटायला लागल्या आहे. त्यामुळे महागाई च्या सतत च्या भडक्याने महिलांचे घर खर्चाचे बजेट डगमगले.

मागील वर्षा पासून गॅस सिलेंडरचे भाव गगनाला भीडत उमटत आहे. आहे. या वाढत्या महागाई व गॅस दराची झळ सामान्य कुटुंबाला बसत आहे. मजुरांच्या घरातील घर खर्चाचे बजेट कोलमडत असून, काही भागात तर मिळत असलेल्या फ्री धान्य विकून घरातील तेल मीठ सारख्या गरजा कशा बशा भागवने चालू आहे. परिस्थिती नाजूक असतांना गेल्या काही  महिन्यामध्ये हाताला काम पण नाही, मग मोलमजुरी नसल्याने घर चालवायचे कसे? अशी चिंता कुटुंब प्रमुखांना असतांना दुःख सांगावे कोणाला, असा नाराजीचा सुर महिला वर्गातून उमटत आहे.

मारेगाव महसूल विभागाची दोन ट्रॅक्टर वर कारवाई

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यातील कोसारा सावंगी पात्रातून अवैधरित्या वाळु चोरून घेवून जाणाऱ्या 2 ट्रॅक्टर चालकाला महसूल विभागाने पकडले. ही कारवाई 26 एप्रिल रोजी सकाळी करण्यात आली.

शासनाने नवीन धोरण आणल्यानमुळे वाळूची चोरटी वाहतूक जोमात सुरु असल्याने याला आळा घालण्यासाठी महसूल विभाग गेल्या काही दिवसापासून ऍक्शन मोडवर दिसत आहे. बुधवारी 11 वाजेच्या सुमारास विना नंबर चे दोन ट्रॅक्टर अवैधरित्या वाळु चोरून घेवून जात असतांना आढळून आले असता मारेगाव नायब तहसीलदार किशोर यादव हे आपल्या पथकासह कोसारा सावंगी परिसरात गस्तीवर असतांना यांनी पकडले.

कारवाई दरम्यान,2 ट्रॅक्टर पैकी एका ट्रॅक्टर ने पोबारा केला अशी माहिती आहे. त्याचे विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. तर एक मुद्देमालसह महसूल विभागाने जप्त केले. 

बाजार समितीत परिवर्तन तेजीत, यंदा गुलाल आपलाच..!!


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : होऊ घातलेल्या मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अगदी अंतिम टप्प्यात आली आहे. या अनुषंगाने दोन्ही पॅनल कडून यंदा गुलाल आपलाच म्हणत सभा बैठाका, चर्चा, 'या ना त्या' निमित्ताने कार्यक्रमात पुढाकार दर्शविणे सुरु असल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत. सहकार क्षेत्रात कायम काँग्रेस ची पकड असतांना यात बीजेपी पुरस्कृत सर्वसामान्य उमेदवार उतरवल्याने आता पक्षश्रेष्टीना विजय मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार. किंबहुना सत्ताधारी व विरोधक यांच्यात "काटे की टक्कर" होण्याचे संकेत वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

या बाजार समिती च्या निवडणुकीत माजी आमदार व माजी सभापती, यांच्या गटाने बहुमतावर निवडुन आणण्याचे रणनीती अखण्यासाठी रणशिंग फुंकले. तर याच निवडणुकीमध्ये आ. संजीवरेड्डी बोदकूरवार, अनिल देरकर व विशाल किन्हेकार यांनी सुद्धा आपले उमेदवार निवडुन कसे आणता येईल यासाठी तेही नियोजन पूर्ण व्हिजिट देत आहे. पण मात्र, यात असंतुष्ट झालेल्या उमेदवारांची भूमिका काय असणार याकडे तालुक्याचे लक्ष वेधले आहेत.

मारेगाव तालुक्यात माजी सभापती नरेंद्र पा. ठाकरे यांच्या आशिर्वादाशिवाय या खुर्चीचा मानकरी ठरणार नाही. अशी वर्तुळात चर्चा आहे. ते कोणाला आशीर्वाद देतील हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे. तसेच आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या भाजपा समर्थीत शेतकरी परिवर्तन पॅनल मध्ये कोण होणार सभापती याबाबत अनिश्चितता कायम आहे.

दरम्यान, निवकडणुकीचे दिवस जवळ येत असल्याने परस्परात धाकधूक वाढली असून, मा आ. बोदकुरवार समर्थित मतदारांना पसंती दिली जात असल्याचे वर्तुळात चर्चा आहे. तर विरोधकांच्या वतीने हि बाजार समिती ताब्यात घेण्याकरीता मोठे प्रयत्न केले जात आहे. 

शेवटी "विजयी होणारं निवडणूक येणारं होऊद्या किती बी काय... यंदा गुलाल आपलाच हाय... यंदा धुराळा आपलाच हाय" असे जरी असले तरी निकालाअंती सारं चित्र स्पष्ट होणार आहे. 

'पहिले पाऊल' ठरणार ऐतिहासिक पाऊल...

सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर 

मुंबई : शिक्षण विभागातील 'पहिले पाऊल' हा उपक्रम ऐतिहासिक पाऊल ठरणार असल्याचे सांगून मुलांसाठी प्रशासनाने सुरू केलेली ही पूर्वतयारी त्यांच्या भविष्यासाठी नक्कीच फलदायी ठरणार असा विश्वास अभिनेते सचिन खेडेकर यांनी व्यक्त केला. 'पहिले पाऊल' या उपक्रमात खारीचा वाटा उचलण्याची अभिनेत्री निशिगंधा वाड यांनी तयारी दर्शविल्याने मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले.

प्रकल्प संचालक कैलास पगारे यांनी प्रास्ताविकातून उपक्रमाची माहिती दिली. येत्या २७ एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात असाच कार्यक्रम होणार असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी मान्यवरांनी उपस्थित चिमुकल्यांशी संवाद साधला. सेल्फी घेताना श्री. केसरकर यांनी चिमुकल्यांना उचलून घेतले. त्यामुळे लहानग्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. मान्यवरांनी पहिलीच्या वर्गात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या प्रवेशपात्र मुलांच्या क्षमतांची तपासणी करण्यासाठी मांडण्यात आलेल्या विविध संचांना भेट दिली. शाळेच्या मुख्याध्यापक श्रीमती निशा म्हात्रे यांनी संयोजन केले. किसन पावडे यांनी सूत्रसंचालन केले.

डॉक्टर एकनाथ डाखरे यांना पुत्रशोक

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : प्रसिद्ध डॉक्टर एकनाथ डाखरे यांचे सुपुत्र तुषार डाखरे (35) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने बुधवारी (ता. 25) रात्री 10 वाजता च्या दरम्यान निधन झाले. मनमिळाऊ स्वभावाच्या तुषार यांचे अशा अवेळी जाण्याने डाखरे कुटुंबासह मित्र परिवारात शोककळा पसरली आहे.

शहरातील प्र. क्र. 9 येथे डाखरे कुटुंब राहतात. वडील एकनाथ डाखरे हे मारेगाव येथे डॉक्टर असुन, तुषार यांचे मेडिकल स्टोअर्स तथा एका ढाब्याचे संचालक होते. 

काल मंगळवार ला रात्री 10 वा. दरम्यान,ढाब्यावर असताना  त्यांच्या छातीत दुखु लागले. त्यांना उपचारार्थ वणी येथील रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेतच तुषार यांचे निधन झाले. 


गौराळा स्मशानभूमी रस्त्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या गौराळा स्मशानभूमी रस्त्याची दुरावस्था झाली आहे. याबाबत नागरिकांनी संबंधित विभागाला वारंवार निवेदन देऊनही रस्ता कायमस्वरूपी बांधून देण्यात अपयशी ठरत असलेल्या प्रशासनाच्या विरोधात अखेर सोमेश्वर गेडेकार यांनी (25 एप्रिल) पासून आमरण उपोषण सुरु केले आहे.

मारेगाव तालुक्यातील गौराळा येथील स्मशानभूमी च्या रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने ग्रामवासियांनी खडीकरण व मजबुतीकरण करून कायम स्वरूपी रस्ता बांधून देण्यात यावा व मयत व्यक्तीचा शेवटचा प्रवास तरी सुखमय व्हावा यासाठी प्रयत्न प्रशासनाने दुर्लक्ष न करता जातीने लक्ष देऊन करावे अशी आर्तहाक नागरिकांची आहे. तूर्तास पंचायत समितीच्या या गलथानपणाला गावाकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे.

परिणामी वारंवार निवेदन देत सदर बाब संबंधितांच्या लक्षात आणून दिली तरी देखील प्रशासनाने ही बाब गंभीर्याने घेतली नसल्याने येथील ग्रामपंचायत सदस्य सोमेश्वर गेडेकार यांनी आज मंगळवारपासून पंचायत समितीचे समोर उपोषण सुरु केले आहे. यावेळी अनेकांनी उपोषण स्थळी भेट देत मागणी केली.


■ स्मशानभूमी रस्त्याच्या दुर्दशेबद्दल आम्ही गावाकऱ्यांच्या वतीने प्रशासनाकडे निवेदनाद्वारे लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करण्यात यावा. तसेच तात्पुरत्या स्वरूपात काम न करता कायमस्वरूपी खडीकरण व मजबुतीकरण देण्यात येत नाही तो पर्यंत हे आमरण उपोषण सुरु राहील -
सोमेश्वर गेडेकार, उपोषणकर्ते

निधी उपलब्ध करून स्मशान भुमीच्या रस्त्याचे काम प्राधान्याने करून देण्यात यावे.
आकाश बदकी, नगरसेवक नगरपंचायत, मारेगाव 




शेतकरी, आदिवासी बांधवांच्या मागण्यांसंदर्भात राज्य शासन सकारात्मक – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर 

मुंबई : “राज्यातील शेतकरी, आदिवासी बांधवांच्या मागण्यांसंदर्भात राज्य शासन सकारात्मक आहे. उपसमितीसमवेत अखिल भारतीय किसान सभेने मांडलेल्या मागण्यांबाबत पुढील आठवड्यात सविस्तर चर्चा करण्यात येईल,” असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज सांगितले.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह येथे अखिल भारतीय किसान सभा यांच्या विविध मागण्यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितिन करीर, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, नाशिक विभागाचे आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिद्धराम सालिमठ यांच्यासह अखिल भारतीय किसान सभेचे डॉ. अशोक ढवळे, डॉ. अजित नवले, उमेश देशमुख, ॲड. अण्णा शिंदे, डॉ.उदय नारकर, किसन गुजर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

परंपरागत पद्धतीने आदिवासी कसत असलेल्या जमिनी, वनहक्क दावे, वनाधिकार, देवस्थान जमीन, वरकस इत्यादी जमिनी, घरांच्या तळ जमिनी, हिरडा, शेतकऱ्यांना देण्यात येणारी कर्जमाफी, दुग्ध पदार्थ आयात आणि दूध प्रश्न, जमीन अधिग्रहण आणि पुनर्वसन, शेतमालाचे भाव, कांद्याचा प्रश्न, वनांमधील अतिक्रमणे, गायरान जमिनी, शेतकऱ्यांना बारा तास वीज, शेती विषयक कर्ज आदी विविध मुद्यांवर सुमारे तीन तास चाललेल्या या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.

चारचाकी वाहणाला पार्किंग झोन मध्ये लागली आग...

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : शहरात असलेल्या नगर परिषद पार्किंग झोन मध्ये एका चारचाकी कार ला अचानक आग लागल्याची घटना आज दि. 25 एप्रिल ला दुपारी 1.30 च्या दरम्यान आग  घडली.

वणीच्या मध्यभागी  असलेल्या पार्किंग झोन मध्ये वाहन दाखल झाले असता, येथील उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्याने वाहन वाहकांना सूचित केल्याने कारमधील मंडळी ताबडतोब बाहेर निघाले. दरम्यान, अचानक आगीने रौद्ररूप धारण केले होते. मात्र, त्यात कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याचे समजते.

सदर कार पार्किंग मध्ये असतांना या वाहणाला नेमकी आग लागली कशी? याचे कारण अद्याप कळू शकले नसुन, उपस्थितांच्या समयसुचकतेने या घटनेवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. सतर्कतेने अनर्थ टळल्याने वाहणधारकांनी सूटकेचा निःश्वास सोडला..

शिक्षकांच्या बदल्यांना कायमची सुट्टी? महाराष्ट्र सरकार चा नवा फंडा..! मुक्काम पोस्ट झेडपी शाळा..

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

खासगी शाळांच्या धर्तीवर आता जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांनाही कायमस्वरुपी एकाच शाळेत नोकरी करता येण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता असून सरकारी शिक्षकांच्या वारंवार होणाऱ्या बदल्यांचं झंझट कायमचं संपणार आहेत, कारण जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या बदल्याच होऊ नयेत, यासाठी नवं धोरण करण्याचे संकेत राज्य सरकारनं दिले आहेत.

शिक्षकांवरील बोजा कमी व्हावा, त्याचबरोबर शिक्षक एकाच जागी थांबून मुलांना चांगल्यारीतीने शिक्षण देतील अशी व्यवस्था निर्माण करणं अशी सरकारची प्राथमिकता आहे. त्यामुळे भविष्यात राज्यातील शिक्षकांच्या बदल्या न करण्यासंदर्भात विचार सुरू असल्याचं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सुद्धा या संदर्भात चर्चा करावी लागेल, असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता सर्वांचे डोळे सरकारच्या निर्णयाकडे लावून राहिले आहेत.

शिक्षकांच्या बदल्या न करण्याचं धोरण राज्य सरकार का आणतंय? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळं शिक्षक कायम त्रासलेले असतात. या त्रासातून शिक्षकांना कायमचा दिलासा मिळेल, अशी आशा आहे. शिक्षकांवरील कामाचा बोजा कमी व्हावा, यासाठी हे धोरण आखलं जातंय. माध्यमिक आणि खासगी शाळांमध्ये आयुष्यभर शिक्षक एकाच शाळेत शिकवतात. त्याच धरतीवर शिक्षकांना एकाच शाळेत थांबून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देता येईल, असं शालेय शिक्षण खात्याला वाटतं. मात्र या निर्णयावरून उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

 दरम्यान, गेल्या 3 वर्षांपासून सरकारी शाळांमधील शिक्षकांच्या बदल्या रखडल्या आहेत. कोरोनाची 2 वर्षं आणि नवं ऑनलाईन सॉफ्टवेअर यामुळं शिक्षकांच्या बदल्यांना मुहूर्त सापडेला नाही. आता राज्य सरकारनं बदल्या न करण्याचंच धोरण लागू केलं तर या कटकटीमधून शिक्षकांची, विद्यार्थ्यांची आणि सरकारचीही कायमची सुटका होणार आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर काय निर्णय घेणार? दर्जेदार शिक्षणासाठी बदल्यांना चाप बसणार का? असा सवाल आता उपस्थित केला जातोय.

शिवसेना (ठाकरे गट) तालुका प्रमुखांवर प्राणघातक हल्ला...

सह्याद्री चौफेर | कालू रामपुरे 

वरोरा : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरीकर यांच्यावर अनोळखी इसमानी काल रात्री 11. 30 ते 12.00 च्या दरम्यान वरोरा-भद्रावती विधानसभा मध्यवती कार्यालय वरोरा नागपुर नाका चौक येथुन कृषी उत्पन्न बाजार समितीचा प्रचार आटपवुन घरी जात असताना देशपांडे पेट्रोल पंपासमोर प्राणघातक हल्ला करण्यात आला असुन ही विरोधकांची खेळी असल्याचे बोलल्या जात आहे.

कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरु असताना व प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना या निवडणूकीतील उमेदवारावर जिवघेणा हल्ला होणे म्हणजे विरोधकांची राजकीय नितिमत्ता किती खालच्या पातळीवर गेली याचा अंदाज येत आहे.

राजकारणात विरोध होत असतो पण तो विचाराचा विरोध असतो पण वरोरा भद्रवती विधानसभा क्षेत्रात काही गुंड प्रवृत्ती आपली राजकीय सत्ता अबाधित राखण्यासाठी गुंडशाहीवर उतरली असल्याने इथे राजकीय वैर कुणाच्या जीवावर बेतेल याचा नेम नाही. दरम्यान, दत्ता बोरीकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा सर्वत्र निषेध व्यक्त होत असून हा हल्ला कुणी केला त्याचा शोध पोलिसांनी लवकर घ्यावा व त्या गुंडाना बदडून काढावे अशी मागणी होत आहे.

दत्ता बोरीकर यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती कारण्यात आले आहे. दरम्यान शिवसेना पदाधिकारी आता आक्रमक झाले असून या घटनेचे पडसाद जिल्हाभर उमटणार असल्याने त्यांची पुढील काय भूमिका असणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

जाणून घ्या आजचा आपला दिवस...

               
                 राशीभविष्य : २५ एप्रिल मंगलवार..!

मेष:-
मेष राशीचे लोक आज भविष्यातील त्यांच्या गुंतवणूक योजनांना अंतिम रूप देऊ शकतात. घरामध्ये तुमच्यावर खूप जबाबदारी येईल. नोकरीच्या क्षेत्रात तुमची कामगिरी चांगली राहील. आज तुमचे विरोधक तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न करू शकतात. सार्वजनिक ठिकाणी विनाकारण जाणे टाळा. जे काम तुम्ही हातात घ्याल त्यात तुम्ही यशस्वी व्हाल. 

वृषभ:- 
आज वृषभ राशीच्या लोकांना कामात चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. नवीन भागीदार व्यवसायात सामील होऊ शकतात. पैशाशी संबंधित काही बाबींमध्ये तणाव कमी होईल. घरातून काम करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमचा मित्र किंवा कुटुंबासोबत आनंददायी प्रवास होईल, एकमेकांसोबत चांगला वेळ घालवाल. 

मिथुन:-
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असेल. यावेळी कोणतीही मालमत्ता खरेदीची योजना बनवताना काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी वर्चस्व प्रस्थापित कराल. मुलांच्या भवितव्याबद्दल तुम्ही खूप चिंतेत असाल. आज तुम्ही घराबाहेर फिरायला जाल, ज्यामुळे तुमचे खूप मनोरंजन होईल. 

कर्क:-
कर्क राशीच्या लोकांना आज ताऱ्यांची साथ मिळेल. जीवनाच्या सर्व क्षेत्रात प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल. आर्थिक बाजू पूर्वीपेक्षा मजबूत होईल. व्यापाऱ्यांना कायदेशीर गोष्टीपासून दूर राहावे लागेल. नोकरीच्या क्षेत्रात सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आरोग्यासाठीही आजचा दिवस चांगला आहे. 

सिंह:- 
सिंह राशीच्या लोकांसाठी आज व्यावहारिक निर्णय घेणे फायदेशीर ठरेल. दुधाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना आज चांगला नफा मिळेल. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला नफा मिळू शकतो. तुम्ही तुमच्या जीवनसाथीसोबत जीवनाचा उत्तम अनुभव घेऊ शकता. कुटुंबातील सदस्यांकडून आनंद आणि सहकार्य मिळेल. 

कन्या:-
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुम्हाला स्वतःच्या मेहनतीने पुढे जाण्याचा आहे. व्यापाऱ्यांना सामाजिक वर्तुळ वाढवण्यावर भर द्यावा लागेल. पैशाच्या बाबतीत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासात काळजी घेणे आवश्यक आहे. घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबाच्या वतीने तुम्ही निश्चिंत राहाल. मुलांच्या मदतीमुळे आनंद वाढेल. भगवंताचे ध्यान केल्याने तुम्हाला मनःशांती मिळेल. 

तूळ:-
तूळ राशीच्या लोकांची सर्व कामे आज सहज पार पडतील. व्यापार्‍यांना विशेष फायदा मिळू शकतो. पैशाची देवाणघेवाण करताना एखाद्याला साक्षीदार म्हणून ठेवा. तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर आज तुम्हाला यश मिळू शकते. तरुणांना इच्छित जीवनसाथी मिळाल्याने मन प्रसन्न राहील. विचारांचे नियोजन होणार आहे, त्यामुळे कामात यश मिळेल. पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या. मित्रांसोबत चांगला वेळ जाईल. 

वृश्चिक:-
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. स्वतःसाठी वेळ काढा आणि तुमच्या भविष्यातील योजनांवर काम करा. मालमत्तेशी संबंधित प्रकरणे मार्गी लागतील. नोकरी बदलण्याचा विचार करू शकता. देवाची उपासना केल्याने मनाला शांती मिळेल. घरातून बाहेर पडताना काळजी घ्या. आज वैवाहिक जीवनात गोडवा राहील. कुटुंब किंवा प्रियकरांसोबत चांगला वेळ जाईल. 

धनु:-
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. तुम्हाला तुमच्या दैनंदिन दिनचर्येत किंवा नियोजनात काही मोठे बदल करावे लागतील. व्यावसायिकांना काही व्यक्तींसोबत आवश्यक भेटीगाठी कराव्या लागतील. घरातील वडिलधाऱ्यांचा सल्ला पाळणे हितकारक ठरेल. नोकरी करणाऱ्या लोकांची वरिष्ठांकडून प्रशंसाही होईल. वैवाहिक चर्चेतील यशामुळे तरुण उत्साही होतील. 

मकर:-
आज मकर राशीच्या लोकांसाठी परिस्थिती प्रतिकूल असू शकते. तुमची आर्थिक आणि कौटुंबिक परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न सुरूच राहतील. तुम्हाला पैसे आणि मौल्यवान वस्तूंबाबत जास्त काळजी घ्यावी लागेल. तरुणांना अपेक्षित रोजगार मिळू शकतो. आज तुम्हाला हवे तसे फळ मिळेल. तुमची मानसिक सुस्ती आज संपेल आणि तुम्हाला सर्व बाजूंनी चांगली बातमी मिळेल. 

कुंभ :-
कुंभ राशीचे लोक आज आपले काम प्रामाणिकपणे करतील. आज तुमच्या वागण्यात अधिक सकारात्मकता असेल. पैशाच्या बाबतीत आज लोभाची स्थिती टाळण्याचा प्रयत्न करा. कोणतेही ऑनलाइन काम सुरू करण्यासाठी तुम्ही योजना तयार कराल. मुलांसोबत चांगला वेळ जाईल. तुम्ही चांगल्या लोकांशी संपर्क प्रस्थापित कराल, जे तुम्हाला कामात यश मिळवण्यासाठी मदत आणि मार्गदर्शन करतील. 

मीन :-
आज मीन राशीचे लोक असे काही करू शकतात ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. दैनंदिन उत्पन्न पूर्वीपेक्षा चांगले होईल. तुमच्या महत्त्वाच्या गोष्टी कोणाशीही शेअर करू नका. आईसोबत वेळ घालवणे तुमच्यासाठी चांगले राहील. आज तुम्हाला नवीन नोकरी मिळू शकते. आज व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे आणि आरोग्य देखील चांगले राहील.


मारेगाव बाजार समिती ची निवडणूक शेतकरी परिवर्तन पॅनल च्या दिशेने, राजकीय वर्तुळात चर्चा...!!


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक काँग्रेस सेना आघाडी समर्थित पॅनल लढत आहे. तर त्यांच्या विरोधात भाजप समर्थित इतर सर्व विरोधक एकत्र आलेले आहे. काँग्रेसकडून अनेक वजनदार नेत्यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या काही असंतुष्टांनी भाजपशी सूत जुळवीत उमेदवारी पदरात पाडून घेतली आहे. यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अत्यंत रोचक व चूरशीची होणार असे दिसते.

येत्या 30 एप्रिलला मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाची निवडणुक होत आहे. या निवडणुक मैदानात शेतकरी परिवर्तन तथा शेतकरी एकता पॅनल आमने सामने दंड थोपटून उभे आहेत. या निवडणूक मैदानात दोन्ही पॅनल कडून 34 उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका प्रलंबित असल्यामुळे गेल्या काही वर्षाच्या इतिहासात ही निवडणूक पहिल्यांदाच रंगतदार होताना दिसत आहे. 

नेहमी अविरोध होणाऱ्या यंदाच्या निवडणूकीत बाहुबली उमेदवारांनी परस्पर विरोधात दंड थोपटले असून विजय आपलाच असे दावे प्रतिदावे दोन्ही पॅनल कडून केल्या जात असले, तरी दोन्ही पॅनल कडून प्रचाराची रणधुमाळी डोअर टू डोअर सुरु झाली आहे. अवघ्या चार दिवसानंतर प्रचाराचा कार्यक्रम क्लोज होईल, त्यामुळे कोण कोणाच्या क्लोज येतील हे आता सांगणे नक्की जरी नसले तरी, मारेगाव बाजार समितीची निवडणूक शेतकरी परिवर्तन पॅनल च्या दिशेने वाटचाल करित असल्याचे राजकीय वर्तुळात बोलल्या जात आहे. 



राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी- अनिकेत नैताम


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

केळापूर : सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपिल क्र. २५०२/ २०२२ महाराष्ट्र आदिवासी ठाकूर जमात स्वरक्षण समिती विरुद्ध महाराष्ट्र शासन व इतर या प्रकरणात न्यायमूर्तीद्वय संजय कौल,अभय ओक,मनोज मिश्रा या तीन न्यायमूर्तीच्या खंडपीठाने २४ मार्च २०२३ रोजी निर्णय दिलेला आहे.

या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात यावी.अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचेकडे ट्रायबल फोरम यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष अंकित नैताम यांनी केली आहे.
 
सर्वोच्च न्यायालयाने बहुचर्चित व प्रलंबित असलेले 'शिल्पा ठाकूर' प्रकरणाचा न्यायनिवाडा नुकताच केला.यात जमातीच्या खरे, खोट्याची पडताळणी करतांना आप्तसंबंधी पडताळणी निरर्थक ठरविण्यात आली आहे. 

आप्तसंबंध तपासणी निर्थक ठरविल्यामुळे जमातीचे संशयास्पद अगर खोटे दाखले पडताळणीसाठी दाखल करणाऱ्या अर्जदारांच्या दाव्यांची पडताळणी करतांना आप्तसंबंध तपासणी (Affinity Test) करण्यास फारच मोठा अडथळा निर्माण झालेला आहे.

कोणत्या दाव्यांची प्रकरणे दक्षता समितीकडे अधिक सखोल तपासणी व आप्तसंबंध तपासणीसाठी पाठवायची ह्याबाबत निर्णय घेण्याच्या पडताळणी समित्यांच्या अधिकारांवर गदा आली आहे. त्यामुळे राज्यात मूळ ३३ आदिवासी जमातींच्या नामसदृष्याचा फायदा घेणाऱ्या गैर आदिवासी जातींना ह्यापुढे बिनबोभाटपणे आदिवासी जमातींचे जातपडताळणी प्रमाणपत्र मिळण्याचा धोका उद्भवलेला आहे. 

संविधानाने खऱ्या आदिवासींना घटनात्मक हक्क दिलेले आहे, मात्र नामसद्रुश्याचा गैरफायदा घेऊन जमातींची चोरी करणा-या जाती आदिवासींचे घटनात्मक हक्क पळवू शकतात.

त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या ह्या निकालाचे पुनर्विलोकन करण्यासाठी तात्काळ राज्यशासनाने पुनर्विचार याचिका दाखल करण्यात यावी.अशी मागणी ट्रायबल फोरम यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष अंकित नैताम यांनी केली आहे.


कायद्याचे उद्दिष्ट व गाभा नष्ट होईल
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती,भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र  (देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियम) अधिनियम २००० च्या कायद्याचे उद्दिष्ट व गाभा नष्ट होऊ शकतो .ज्या आधारावर हा कायदा तयार झाला त्या ‘कुमारी माधुरी पाटील विरुद्ध अतिरिक्त आदिवासी आयुक्त‘ ह्या खुद्द सर्वोच्च न्यायालयाच्या १९९४ सालच्या ऐतिहासिक निकालाच्या उद्दिष्टालाही देखील "खो' बसू शकतो.


बनावट जातप्रमाणपत्राच्या आधारे आमच्या घटनात्मक हक्काच्या नोक-या, मेडिकल आणि इंजिनिअरिंग प्रवेशातील राखीव जागा, जमिनी, म्हाडाच्या सदनिका, पेट्रोलपंप, गॅस एजन्सी चोरल्या आहे. घटनात्मक हक्काचे संरक्षण होण्यासाठी पुनर्विचार याचिका दाखल करण्याची मागणी केलेली आहे.
- अंकित नैताम
जिल्हा उपाध्यक्ष, ट्रायबल फोरम यवतमाळ .

मारेगावात वंचित बहुजन आघाडी तर्फे पाणपोई सुरु

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : येथील वंचित बहुजन आघाडी तर्फे गरजू नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पंचायत समिती मारेगाव मेन रोड परिसरात पाणपोई सुरु करण्यात आली आहे.

पाणपोईचे उदघाटन तालुका अध्यक्ष गौतम दारुंडे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.

या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव नेहारे, म्हणाले की यावर्षी उष्णता खूप जास्त आहे, बाजारात येणाऱ्या लोकांची संख्या खूप मोठी आहे. या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत होता. परंतु श्री. संदीप आस्वले यांनी ही बाब लक्षात घेऊन पाणपोई करिता सहकार्य केले आहे. अनेक नागरिकांना याचा फायदा होणार आहे.

वंचित बहुजन आघाडी च्या वतीने दरम्यान, मान्यवरांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष गौतम दारुंडे, उपाध्यक्ष संजय जिवने, मोरेश्वर लभाने, गोरखनाथ पाटिल, विठ्ठलराव नेहारे साहेब, अनंता खाडे, दिनेश करलुके, अनंतराव गोवर्धन, कुमार अमोल कुमरे यांची उपस्थिती होती. 

'भाजप हटाव - देश बचाव' भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे यवतमाळ तालुक्यात रूई येथुन अभियानाला सुरुवात...

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : देशात गेली ९ वर्षे सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळात नरेंद्र मोदी सरकारच्या जनविरोधी धोरणामुळे देशातील सर्वसामान्य जनता महागाई, बेरोजगारी व विषमतेच्या खाईत लोटली जात आहे. देशाची अर्थव्यवस्था पार रसातळाला गेली असून, एकूण लोकशाही व्यवस्था धोक्यात आणली जात आहे. अशा परिस्थितीत हुकूमशाही पद्धतीचे निर्णय घेणाऱ्या आणि जनविरोधी धोरणे राबविणाऱ्या भाजपला सत्तेतून हद्दपार करणे हाच एकमेव पर्याय आहे. यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने १४ एप्रिल ते १५ मे पर्यंत 'भाजप हटाव - देश बचाव' ही जनजागरण मोहीम देशभरात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ही मोहीम महाराष्ट्रात प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार घेतला असुन त्याचाच भाग म्हणून यवतमाळ जिल्हा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने विविध तालुक्यात मोहीम सुरु आहे.आज यवतमाळ तालुक्यातील रूई वाई येथुनही मोहीमेला सुरवात करण्यात आली आहे.याप्रसंगी मोहीमे ला सुरुवात करतांना पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. अनिल घाटे म्हणाले, की भाजप सरकारने गेल्या ९ वर्षांच्या काळात संसदीय लोकशाही पद्धतीला तिलांजली देण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपा आणि भ्रष्टाचार यांचा जवळचा संबंध हिंदेनबर्ग रिपोर्टच्या निमित्ताने अधिक उघड झाला आहे. सरकारच्या निर्णयाला विरोध करणाऱ्यांना देशद्रोही लेबल लावून विरोधी स्वर दाबण्याचा प्रकार होत आहे. भाजप सरकारने सामाजिक न्यायाच्या तत्वाला पूर्णपणे हरताळ फसला असून, एकीकडे दलितांवरील अत्याचार वाढत असताना, विविध घटनांमध्ये दोषी असणाऱ्या आरोपींना सरकार मोकाट सोडत आहे. अल्पसंख्यांकांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असून, समाजात दुही निर्माण केली जात आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून व राज्यपाल पदाचा दुरुपयोग करून विविध राज्यातील सरकार पाडण्याचे कारस्थान भाजपाकडून सातत्याने केले जात आहे. महाराष्ट्रातही हाच प्रकार गेल्यावर्षी दिसून आला असून, त्यामुळे लोकशाहीच धोक्यात येऊ लागली आहे. याशिवाय बेरोजगारीचे प्रश्न वाढत असून, शेतीवर देखील मोठ्या प्रमाणात हल्ले होते आहेत. कामगार, कर्मचाऱ्यांचे प्रश्न गंभीर होत असून, या कडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. अशा भाजप सरकारला धडा शिकविण्यासाठी त्यांना सत्तेवरून हटविण्यासाठी लोकांनी एकजूट दाखवावी, असे आवाहन कॉ.अनिल घाटे यांनी केले.यावेळी राज्यभरातून आलेल्या पक्षाच्या राज्य कौन्सिल सदस्यांनी आणि जिल्हा सेक्रेटरींनी महाराष्ट्रात ही मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला प्रमाणे यावेळी मोहिमेच्या पोस्टर व प्रचार पत्रकाचे वाटप करण्यात आले याप्रसंगी पक्षाचे जिल्हा सचिव कॉ.अनिल घाटे , कॉ.बंडु उईके , नारायणराव बोरकर, निरंजन गोंधळेकर, ईश्वर दरवरे , गुलाबराव उमरतकर , दिलीप‌ महाजन, दिवाकर नागपुरे, अभिक्षक उईके, यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

राज्य मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत सूर्यभान आत्राम ठार


मारेगाव | विवेक तोडासे 
                          
मारेगाव : करंजी बोटोणी राज्य मार्गावर बोटोणीजवळील पेट्रोल पंपा नजिक 22 एप्रिल ला रात्री 8 वाजताच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार सूर्यभान बापूराव आत्राम वय (४५) रा मेंढणी ठार झाले. 
        
कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार करंजी बोटोणी राज्य महामार्गावर मारेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बोटोणी व जळका यांचे दरम्यान सुर्यभान बापुराव आत्राम वय ४५ हे आपल्या मोटारसायकल ने करंजी येथुन रात्री आठ वाजता सुमारास बाजार घेऊन गावी जात होते, दरम्यान विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार सुर्यभान हे गंभीर जखमी झाले त्यांना प्रथम करंजी ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

करंजी ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता मृत घोषित केले. त्यांचे पच्छात पत्नी, दोन मुली व मुलगा असा आप्त परिवार आहे.

सावधान : तुमचीही फसगत होऊ शकते, जशी हिची झाली...

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव :  नौकरीचे आमिष दाखवून मारेगाव येथील भाड्याने वास्तव्यात असलेल्या महिलेला थेट मध्यप्रदेश येथे चक्क! दीड लाख रुपयात विक्री केल्याची घटना उघडकीस आली.

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील दोघांकडून फसवणूक झालेल्या महिलेच्या आईने रामनगर (चंद्रपूर) पोलिस ठाण्यात 20 एप्रिल रोजी दिलेल्या तक्रारीवरून ही घटना उघडकीस आली. मारेगाव शहरात आपल्या मुलीसोबत भाड्याची रूम करून राहणारी महिला ही रोजमजुरी करून आपल्या मुलीसह उदरनिर्वाह करीत असतांना चांगली नौकरीच्या शोधात असताना पिडीत महिलेच्या संपर्कात चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील एक महिला व पुरुष आलेत. त्या दोघांनी तुला कंपनीत नोकरी लावून देण्याचे बहाण्याने भद्रावती येथे बोलाविले. येथे तिला जेवणातून गुंगीचे औषध देऊन मध्यप्रदेश कडे रवाना झाल्याची माहिती आहे.

पीडितेस मध्य प्रदेश जिल्हा रतलाम येथील जितू पाली या इसमाला दीड लाख रुपयात विक्री केल्याची खळबळजनक घटना,फिर्याद महिलेच्या आईने चंद्रपूर शहरातील रामनगर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केल्यानंतर महिलेच्या आईने दिलेल्या तक्रारी वरून संशयीतावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून मारेगाव पोलीस स्टेशन कडे दि.21 एप्रिल ला वर्ग करण्यात आले.

याघटनेचा अधिक तपास मारेगाव ठाणेदार राजेश पुरी यांचे मार्गदर्शनाखाली एक पोलिस पथक नेमून हे पथक मध्यप्रदेश कडे रवाना झाले आहे. 

जिल्ह्यात 1 मेपासून मिळणार केवळ 600 रुपयांत घरपोच वाळू…

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

अवैध वाळू उपसा व यातून वाढलेल्या गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी तसेच नागरिकांना स्वस्तात वाळू मिळावी यासाठी तेलंगण राज्याच्या धर्तीवर राज्य सरकारने वाळूचे नवीन धोरण आणले आहे. त्यानुसार ग्राहकांना एक ब्रास वाळूसाठी ६०० रुपये महसूल विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन रजिस्ट्रेशन करून पैसे भरावे लागतील, त्यानंतर थेट घरपोहोच वाळू १ मेपासून दिली जाणार आहे. विशेष म्हणजे सध्या ८ हजार रुपये ब्रासने मिळणारी वाळू ६०० रुपयांना मिळणार असल्याने एक ब्रासमागे ग्राहकांचे ७ हजार ४०० हजार रुपये वाचणार आहेत. श्रीरामपूर येथे पहिला वाळूचा डेपो तयार करण्यात आला असून, अन्य दोन ठिकाणी असे वाळूचे डेपो सुरू करण्यात येणार आहेत.

आठ वर्षांपूर्वी महाराष्ट्रात वाळूचे लिलाव हे बोली पद्धतीने होत होते, मात्र या लिलावात पारदर्शकता आणण्यासाठी तत्कालीन सरकारने वाळूचे लिलाव ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार वाळूचे लिलाव हे ऑनलाइन पद्धतीने सुरू झाले होते, मात्र लिलावाच्या किचकट प्रक्रियेमुळे वाळू साठे निश्चित करूनही लिलावांना कमी प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे दरवर्षी महसूल प्रशासनाला वाळू लिलावांतून मिळणाऱ्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागत होते. वाळूतून वाढलेली गुन्हेगारी व वाळूचे वाढलेले दर लक्षात घेऊन राज्य सरकारने वाळूचे नवीन धोरण आणले आहे. बुधवार (१९ एप्रिल) ला महसूल विभागाने वाळू धोरणाचा शासनाचा निर्णय जारी केला आहे.

वाळू लिलावांसाठी ग्रामसभेची शिफारस अनिवार्य, वाळू गटांवर राहणार सीसीटीव्हीचे लक्ष :

शासनाच्या निर्णयानुसार वाळू लिलावाची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी ग्रामसभेची शिफारस अनिवार्य राहील. शिवाय वाळू गटांवर २४ तास लक्ष ठेवण्यासाठी आणि डेपोमध्ये देखील सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या प्रकल्पासाठी वाळूचा एक गट राखून ठेवण्याचे निर्देशदेखील देण्यात आले आहेत. गैरप्रकार होऊ नयेत यासाठी नदीपात्रातून वाळू घेतल्यानंतर डेपोपर्यंत जाणाऱ्यां वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसवण्यात येणार आहे. 

 १ मेपासून महसूल विभाग ग्राहकांना थेट घरपोच वाळू देणार आहे. त्यासाठी तीन डेपोदेखील निश्चित केले आहेत. त्यासाठी महसूल विभागाने सर्व तयारी पूर्ण केली आहे.

-सिद्धाराम सालीमठ
जिल्हाधिकारी

विदर्भवाद्यांचा महाराष्ट्र दिनी उमरेड कोळसा खाणी समोर "कोयला रोको आंदोलन"

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : विदर्भ राज्य आंदोलन समितीने मिशन 2023 अंतर्गत विदर्भ मिळवू औंदा या घोषणेची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने थेट केंद्र सरकारशी संबंधित असलेल्या कोळसा खनिजाचे उत्पादन करून वीज/ऊर्जा निर्मितीकरीता देशभर जाणारा कोयला दिनांक 1 मे 2023 रोजी महाराष्ट्र दिनाचा निषेध म्हणून उमरेड जवळील कोळसा खाणी मधून बाहेर जाणारा 'कोयलो रोको आंदोलन' करण्याचा निर्णय घेतला असून, हे आंदोलन 1 मे ला दुपारी 12 वाजता सुरू होईल व स्वातंत्र्याच्या एलगाराचे रणशिंग फुंकले जाईल.
        
कोयला या खनिजाने उत्पादन महाराष्ट्रातील खास करून विदर्भातील नागपूर यवतमाळ व चंद्रपूर याच जिल्ह्यात होते व त्या आधारे 6300 मेगावॅट वीज विदर्भात तयार होते व त्यापैकी विदर्भाला केवळ 2200 मेगावॅट वीजच वापरावयास मिळते विदर्भात 58 टक्के शेती पंपाचा अनुशेष असून 6 ते 12 तास लोड शेडिंग सहन करावी लागते व प्रदूषणामुळे श्वासोच्छवासाचे फुफुसाशी संबंधित सर्व आजार विदर्भातील प्रदूषित जिल्ह्यात आहे. दिल्ली व हरियाणा येथील हृदयरोग तज्ञांची चमू 4 वर्षाआधी विदर्भात येऊन गेली असून त्यांनी पाच वर्षात प्रदूषण नियंत्रणात आले नाही तर देशात सर्वाधिक हृदयरोगी चंद्रपूर जिल्ह्यात व विदर्भात मिळतील असे जाहीरपणे सांगितले होते.
           
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीची लढाई गेल्या 118 वर्षापासून सुरू असून ती 31 डिसेंबर 2023 पर्यंत कायमची निकाली काढण्याच्या दृष्टीने विदर्भ राज्य आंदोलन समितीने गेल्या 12 वर्षापासून आंदोलनाची मालिका सुरू ठेवली असून ही आरपारची लढाई समजून तिचा बिगुल वाजवण्याच्या दृष्टीने व 31 डिसेंबर 2023 पूर्वी करू किंवा मरू,जिंकू किंवा मरू या तऱ्हेने ही निकराची लढाई लढून विदर्भ निर्मितीचा प्रश्न कायमचा निकाली काढण्याचा निर्धार केला असून 19 डिसेंबर 2022 पासून "शुरू हुई है जंग हमारी लढेंगे जितेंगे", "लाठी खाऊ गोळी खाऊ विदर्भ राज्य मिळवून घेऊ, विदर्भ राज्य मिळवून घेऊ" कटेंगे मगर हटेंगे नाही असा एल्गार करून आरपारची लढाई करून 31 डिसेंबर पर्यंत विदर्भ मिळवून विदर्भातील जनतेच्या स्वाधीन करण्याचा चंग बांधला आहे.
        
विदर्भातील जनता 100 वर्ष महाराष्ट्रात राहिली व ब्रह्मदेवाला जरी मुख्यमंत्री केले तरी विदर्भातील जनतेचे बरे होणे नाही म्हणून महाराष्ट्र दिनाचा निषेध म्हणून सर्व आंदोलक त्या दिवशी काळ्या पट्ट्या,काळे वस्त्र व काळ्या टोप्या परिधान करून आंदोलनात सहभागी होतील. सर्व प्रश्नांचे एकच उत्तर आणि ते म्हणजे "विदर्भाचे स्वतंत्र राज्य'' 
             
घटनेतील आर्टिकल 3 प्रमाणे विदर्भ राज्य निर्मितीचा अधिकार हा केवळ केंद्र सरकारचा व संसदेचा अधिकार आहे. त्यामुळे विदर्भ राज्य आंदोलन समितीने केंद्राशी संबंधित कोयला व खनिजाला कोयले रोको आंदोलन करून केंद्राला टाचणी टोचण्याचा प्रयत्न केला आहे तसेच विदर्भातील खासदार व केंद्रीय मंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री यांना गावबंदी घोषित केली आहे.

विदर्भ राज्य निर्मितीचा घडी हळूहळू जवळ येत असून 31 डिसेंबर पर्यंत तीव्र आंदोलने करून या मागणीला विदर्भ राज्य निर्मिती करून पूर्णविराम देण्याचा संकल्प विदर्भ राज्य आंदोलन समिती ने सोडला असून वणी येथिल विश्राम गृहात संपन्न झालेल्या बैठकीला विदर्भाचे नेते नेते अ‍ॅड. वामनराव चटप प्रा. पुरुषोत्तम पाटील, रफिक रंगरेज, राहुल खारकर, राजू पिंपळकर, बाळासाहेब राजूरकर, नामदेवराव जेनेकर, देवा बोबडे, होमदेव कनाके, धीरज भोयर, संजय चिंचोळकर, अनिल टोंगे, मोहन हरडे, काशीनाथ देऊळकर, शशिकांत नक्षीने, दिनेश रायपूरे, विजय बोबडे, रामजी महाकूलकर, पांडुरंग पंडिले, राम मुडे सर, अशोक चौधरी, निलिमा काळे, कलावती क्षीरसागर, नारायण मांडवकर, सुभाष वैद्य, प्रभाकर उईके, योगेश बेलेकर, सिद्धार्थ ताकसांडे इत्यादी विदर्भवादी कार्यकर्ते उपस्थित होते.

महागाव तालुक्याला वादळीवाऱ्यासह गारपिठाचा बसला तडाखा

सह्याद्री चौफेर | नंदकुमार मस्के

माहागाव : तालुक्यात अवकाळी वादळी वऱ्यांसह पावसाने जोरदार थैमान घातले असून कासार-बेहळ, वरोडी, सेवा नगर येथे गारपिठासह अवकाळी पावसाने घरांचे,शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

जगाच्या पोशिंदयाच्या तोंडाशी आलेला घास ज्वारी, तीळ यांचे मोठे नुकसान झाले आहे. सेवा नगर येथील परसराम आला राठोड यांच्या बैलाला सोसाट्याचा वाऱ्या मुळे टिन पत्रे उडून त्यांच्या बैलाला इजा पोहचली व वरोडी येथील देवानंद अडकिने यांची म्हैस जागीच ठार झाली.

21 एप्रिल रोजी सायंकाळी पाच ते सहा वाजता दरम्यान, अचानक आलेल्या वादळी पावसामुळे व गारपिठीमुळे महागाव तालुक्यातील सेवा नगर, कासारबेहळ व वरोडी येथील शेतकऱ्यांची पुरती ताराबळ ऊडाली व या वादळी वाऱ्यात शेतकऱ्यांचे ज्वारी हे पीक जमिनदोस्त झाली असून अनेक गांव परिसर या वादळा ने प्रभावित झाल्याचे चित्र असून शासन व प्रशासन यांनी तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
माध्यमातून शेतकऱ्यांची मागणी 


बाजार समितीत घराणेशाहीला थारा देवू नका - आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मारेगाव बाजार समितीत शेतक-यांचे प्रश्न सोडवतील असेच उमेदवार भाजपा तर्फे देण्यात आले असुन, मतदारांनी बाजार समितीत घराणेशाहीला थारा देऊ नका त्यांचा पराभव करण्याचे अवाहन भाजपाचे लोकप्रिय विकासपुरुष आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार यांनी केले आहे.

कृषी उपन्न बाजार समितीच्या सार्वत्रीक निवडणुक भाजपा-शिंदे (गट) पुरस्कृत 'शेतकरी परिवर्तन पॅनल' प्रचार नारळ श्रीक्षेत्र वनोजा देवी (जनामाय कासामाय) येथे शुक्रवारी (21 एप्रिल) ला फोडण्यात आला. या कार्यक्रमाला लोकप्रिय आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार, अनिल देरकर, शिंदे गटाचे तालुका अध्यक्ष विशाल किन्हेकर, शंकर लालसरे, बोबडे गुरुजी, शशिकांत आंबटकर, प्रदीप डाहुले, जगदीश ठेंगणे, राहुल राठोड, चंद्रकांत धोबे, वैभव पवार, पवन ढवस, प्रशांत नांदे, जयंता लांबट, प्रवीण बोथले, मारोती तुराणकर, रमेश चिकटे, सुनीता पांढरे, गणेश झाडे, गोवर्धन तोडासे, प्रसाद ढवस, प्रशांत भंडारी, प्रविण भट, चौधरी, विशाल गाडगे, प्रमोद आञाम, मारोती राजुरकर, गणपत वऱ्हाटे, गजानन चिंचोलकर,प्रसाद झाडे, शेखर चिंचुलकर, प्रमोद ताजणे, महाजन भाऊ, आदी भाजपा शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मतदार उपस्थित होते.
उमेदवारांनी करून दिला परिचय

भाजपा-शिंदे गट पुरस्कृत तर्फे 'शेतकरी परिवर्तन पॅनल' सर्व साधारण सहकारी संस्था मत. संघा मधुन जयवंत ठेपाले, बंडू डाहुले, जीवन डाखरे, शरद ताजणे, रमेश लसणे, प्रवीण लोहे, प्रवीण बोबडे, सर्व साधारण महिला प्रतिनिधी सौ सुरेखा खंगार, अनुसूचित जमाती मनोहर गेडाम, इतर मागासवर्गीय भास्कर दानखेडे, ग्रामपंचायत गट सर्वसाधारण मधून ज्ञानेश्वर चिकटे, सुरेश लांडे, आर्थिक दुर्बल घटक अविनाश लांबट, व्यापारी -अडते संजय काळे, अजय भंसाळी, हमाल-मापारी विजय डोंगरकर यांनी परिचय करून दिला.

बाजार समिती निवडणूक आमदार संजीवरेड्डी बोदकूरवारांसाठी प्रतिष्ठेची

आगामी लोकसभा विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका तोंडावर असतांना मारेगाव बाजार समितीची निवडणूक आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार यांच्यासाठी अत्यंत महत्वाची असणार आहे. या निमित्ताने संजीवरेड्डी बोदकूरवारांची देखील प्रतिष्ठापणाला लागणार आहे. आधीच त्यांच्या बद्दल जनतेत "कही खुशी कही गम" असतांना आमदार बोदकूरवारांनी खेचून आणलेल्या विकासकामाची पोचपावती मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत या निमित्ताने देतील का याकडे सर्वांचे लक्ष आहे.

हेमराज कळंबे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

   
सह्याद्री चौफेर | विवेक तोडासे 

मारेगाव : दि.20/04/2023 ला वसंतराव नाईक सभागृह जि. प. यवतमाळ येथे सन 2020-21 व सन 2021-22 चा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद यवतमाळ यांच्या द्वारे आयोजित करण्यात आला.

यात जि. प. शाळा धामणी पंचायत समिती मारेगाव येथील ओबिसी जनजागृती समितीचे सदस्य, उत्कृष्ट वक्ता, उपक्रमशील शिक्षक, गुरुदेव सेवक, उत्कृष्ट खेळाडू, अनेक क्षेत्रात योगदान असलेले हेमराज गणेश कळंबे सर यांचा सन 2021-22 च्याआदर्श शिक्षक पुरस्काराने मा. अमोल येडगे जिल्हाधिकारी व डॉ. श्रीकृष्ण पांचाळ मुख्यकार्यकारी अधिकारी जि. प. यवतमाळ यांच्या हस्ते शाल श्रीफळ मोमेंटम,व प्रमाणपत्र देऊन सपत्नीक सन्मान करण्यात आला.

माधव सरपटवार यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : मागील ६१ वर्षांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रात सक्रिय असलेले मार्गदर्शक माधव गंगाधरराव सरपटवार यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त येथील जैताई मंदिरात सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार हे होते. प्रमुख अतिथी म्हणून विद्यावाचस्पती स्वानंद पुंड, ह भ प मनू महाराज, मनसे चे नेते राजुभाऊ उंबरकर, नगर परिषदेचे माजी अध्यक्ष तारेंद्र बोर्डे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष संजय देरकर, विजय चोरडिया रंगनाथ अर्बन निधीचे अध्यक्ष संजय खाडे प्रामुख्याने उपस्थित होते. 
    
कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेतून अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य गजानन कासावार यांनी माधवराव सरपटवार यांच्या सन १९६२ पासून सुरू केलेल्या सार्वजनिक जीवनावर प्रकाश टाकला.

सर्व प्रथम आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व उपस्थित अतिथींच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यांनतर जैताई देवस्थान समिती, गजानन महाराज उपासक मंडळ, मित्र मंडळ, प्रेस वेलफेअर असोसिएशन, अन्न छत्र समिती, नगर वाचनालय, विदर्भ साहित्य संघ या संस्थेसोबत माधवराव सरपटवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या अनेक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. 
      
सत्काराला उत्तर देतांना माधवराव सरपटवार यांनी उपस्थितांचे मनापासून आभार मानून सार्वजनिक जीवनात आलेल्या कडू-गोड प्रसंगाचा उल्लेख करून जीवनात संकटे ही येतातच पण त्यामुळे खचून न जाता त्यांच्याशी सामना करा असा संदेश दिला. अध्यक्षीय भाषण करतांना आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी माधवराव यांनी आदर्श विद्यालयात एक आदर्श शिक्षक म्हणून मोलाचे काम केले आहे. पण त्यासोबत सार्वजनिक क्षेत्रात काम करीत असतात पत्रकारितेचे क्षेत्र, रंगभूमी वरील त्यांचे कार्य, विदर्भ साहित्य संघ, नगर वाचनालय, जैताई देवस्थानच्या वतीने समाज प्रबोधनाचा उल्लेख करून अशा बहुप्रतिभाशाली व्यक्तिमत्वाचा आज सन्मान करतांना अतिशय आनंद झाल्याचे सांगून अशा व्यक्तींची समाजाला खऱ्या अर्थाने आवश्यकता असल्याचे प्रतिपादीत केले. 
    
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश खुसपुरे यांनी केले. आभार विदर्भ साहित्य संघ शाखा वणीचे अध्यक्ष डॉ. दिलीप अलोणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुन्ना पोद्दार, मयूर गोएंका, नामदेव पारखी, मुलचंद जोशी, दिवाण फेरवानी, सागर मुने, प्रशांत महाजन इत्यादींनी परिश्रम घेतले.

मारेगाव कृउबा निवडणूक: दोन पॅनल मध्ये यंदा चूरशीची लढत

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : ग्रामीण राजकारणाचे केंद्र समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका येत्या 30 एप्रिलला होणार आहे. 

मारेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत एकूण 91 उमेदवारांनी आपले नामांकन दाखल केले होते. त्यापैकी 11 उमेदवारी अर्ज छानणी मध्ये बाद झाले. तर 46 उमेदवारांनी आपले नामांकन परत घेतले. त्यामुळे उर्वरित 34 उमेदवारी अर्ज कायम राहिले. यात अनुसूचित जाती जमाती मध्ये एकच अर्ज कायम राहिल्याने विश्वनाथ आत्राम हे एकच नाव राहिल्याने या प्रवर्गातील जागा बिनविरोध निघण्याच्या मार्गांवर आहे. तर सहकारी संस्था गटामध्ये महिला राखीव मधून 2 जागेसाठी 3 उमेदवारी अर्ज कायम आहे.

सहकारी संस्था गटामध्ये एकूण 11 जागा आहेत. त्यापैकी सर्वसाधारण मतदार संघात एकूण 7 जागा असून एकूण 14 अर्ज आलेले आहे. इतर मागासवर्गमध्ये एका जागेसाठी दोन उमेदवारी कायम आहे. महिला प्रतिनिधी वर्गात दोन जागेसाठी 3 अर्ज कायम आहे. अनुसूचित जमाती मतदार संघात एका जागेसाठी दोन उमेदवारी कायम आहे.

ग्रामपंचायत मतदार संघामध्ये सर्वसाधारण मध्ये दोन जागेसाठी 4 उमेदवारी अर्ज कायम आहे. आर्थिक दुर्बल घटकमध्ये एका जागेसाठी दोन उमेदवारी कायम असून, अनुसूचित जाती-जमाती मतदार संघामध्ये एका जागेसाठी एकच अर्ज कायम आहे. व्यापारी अडते मतदार संघामध्ये दोन जागेसाठी चार उमेदवारी कायम आहे. तर हमाल मापारी मतदार संघात एका जागेसाठी दोन उमेदवारी कायम आहे.

या निवडणुकीत काँग्रेस सेना समर्थीत महाविकास आघाडी तर भाजप, शिंदे (गट) मिळून लढत आहे. तूर्तास दोन्ही पॅनल 'बाहुबली' वाटत असले तरी, शेवटी कोण? बाजी'राव मारणार हे येणारा काळच सांगेल.


विलास जुमनाके यांना आदर्श सरपंच सम्राट पुरस्कार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

केळापूर : तालुक्यातील पढा-पिपंळापूर-गणेशपूर या गट ग्रामपंचायतचे सरपंच श्री विलास भगवानराव जुमनाके यांना आदर्श युवा सरपंच पुरस्कार जाहीर झाला आहे.

सर्वात कमी वयात सरपंच होऊन गावात केलेल्या विविध कामांची दखल घेऊन 'आदर्श युवा सरपंच' हा पुरस्कार त्यांना देऊन गौरविण्यात आले आहे.

त्याबदद्दल उपसरपंच कांचन गेडाम, संदिप पवार, सुचिता पवार, जयश्री मोहिते, उमेश खिरटकर, प्रांजली बुराण, चंद्रभान मडावी, सरिता परचाके, ग्राम. सदस्य,सचिन काळे, ग्राम.पं,कर्मचारी, उमेश गेडाम, ग्रामस्थांसह तालुक्यातून त्यांचे कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये क्षयरोग निदानासाठी ट्रूनॅट मशिन

सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर 

मुंबई : राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत राज्यातील आदिवासी बहुल जिल्ह्यांसाठी १०० ट्रूनॅट मशिनचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

मंत्रिमंडळ बैठकीनंतर झालेल्या कार्यक्रमात मशिनचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, आरोग्य विभागाचे सचिव नविन सोना, आयुक्त धीरजकुमार, सहसंचालक डॉ. सुनिता गोलाईत, उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर आदी उपस्थित होते.

इंडियन ऑईलच्या माध्यमातून सीएसआर निधीतून हे १०० ट्रूनॅट मशिन आरोग्य विभागाला उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याद्वारे क्षयरोग निदान लवकरात लवकर करण्यासाठी या मशिनचा उपयोग होईल. राज्याला क्षयरोगमुक्त करण्याच्या मोहिमेसाठी या मशिनमुळे मोठे बळ मिळाल्याचे सांगत राज्याला क्षयरोगमुक्त करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केले.

राज्यातील गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, नागपूर, ठाणे, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, पालघर, अमरावती, गोंदिया, यवतमाळ, रायगड, पुणे, अहमदनगर आणि नांदेड या जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागात या मशिनच्या माध्यमातून क्षयरोग निदानासाठी वापर करण्यात येणार आहे. यावेळी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे महाराष्ट्राचे कार्यकारी संचालक अर्निबन घोष, महाव्यवस्थापक गौतम दत्ता आदी अधिकाऱ्यांचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

निवडणूक नामनिर्देशन पत्रासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या राखीव जागांकरिता नामनिर्देशन पत्रासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

आता ग्रा. पं. सदस्य, सरपंच, अध्यक्ष आणि सभापती पदाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत भरता येतील.

या जागांवर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या मागासवर्गीय उमेदवारांना नामनिर्देशन पत्रासोबतच जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करावे लागते. नामनिर्देशन पत्राअभावी निवडणूक लढवण्यापासून वंचित राहू नये म्हणून जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास काही कालावधी मिळावा म्हणून हा निर्णय घेण्यात आला.


खुल्या, मागास प्रवर्गातील महिलांना नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्राची आवश्यकता नाही

खुल्या गटातील महिलांकरीता आरक्षित पदावरील निवडीकरीता तसेच सर्व मागास प्रवर्गातील महिलांना नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्राची अट शिथील करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत प्राध्यापक पदावरील भरती प्रक्रियेदरम्यान अराखीव (महिला) या पदावर गुणवत्ता क्र.३ वरील महिला उमेदवाराची नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र नसल्यामुळे निवड न करता गुणवत्ता क्र. ६ वरील उमेदवाराची निवड करण्यात आली. या पदाकरीता सहयोगी प्राध्यापक पदावरील तीन वर्षाचा अनुभव अशी अर्हता निश्चित करण्यात आलेली होती. या पदाचे वेतन विचारात घेता सध्याच्या नॉन-क्रिमिलेअर मर्यादेपेक्षा अधिक होत असले तरी नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र प्राप्त उमेदवारांना या खुल्या गटातील महिला आरक्षित पदावर निवड होऊन त्याचा लाभ होत होता.

हा लाभ सर्व प्रवर्गातील महिला उमेदवारांना होणे आवश्यक असल्याने त्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक होते. त्यानुसार आता खुल्या गटातील महिलांकरीता आरक्षित पदावरील निवडीकरीता खुल्या प्रवर्गातील महिला तसेच सर्व मागास प्रवर्गातील महिलांना नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्राची आवश्यकता असणार नाही.

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत आज अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आले असून शेती पंपाना दिवसा अखंडित आणि भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2 राबविणार आहे. सन २०२५ पर्यंत ३० टक्के वाहिन्यांना सौर ऊर्जेचा पुरवठा यामाध्यमातून होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षेतेखाली पार पडलेल्या या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील अन्य मंत्रीही उपस्थित होते.

शेती पंपांना दिवसा अखंडित आणि भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा दुसरा टप्पा राबविण्याचा त्याचप्रमाणे वर्ष २०२५ पर्यंत ३० टक्के वाहिन्यांना सौर ऊर्जेचा पुरवठा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. याचा लाभ राज्यातील ४५ लाख कृषी वीज ग्राहकांना होईल.

वीज खरेदी करारानुसार वीज बिलाची रक्कम देण्यासाठी ७०० कोटी रुपयांचा स्वतंत्र रिव्हॉल्विंग फंड देखील स्थापन करण्यात येईल. चालू वर्षासाठी या करिता १०० कोटी रुपये इतका निधी, हरित ऊर्जा निधीमधून खर्च करण्यात येईल.

या अभियानात वीज वाहिनीसाठीची जमीन अकृषी करण्याची गरज राहणार नाही. तसेच अशा जमिनीवरील सौर ऊर्जा प्रकल्पांना ३० वर्षांपर्यंत सर्व कर व शुल्कांतून सूट देण्यात येईल. कृषी वीज वाहिनी योजनेसाठीची जमीन नाममात्र एक रुपया वार्षिक भाडे पट्ट्याने देण्यास, यापूर्वीच मान्यता देण्यात आली आहे. या जमिनीचे नोंदणी व मुद्रांक विभागाने ठरवलेल्या किंमतीच्या सहा टक्के दरानुसार किंवा प्रतिवर्षी १ लाख २५ हजार प्रति हेक्टर यापेक्षा जी रक्कम जास्त असेल, त्या दराने वार्षिक भाडेपट्टा दर निश्चित करण्यात येईल.

गावच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने कार्य करण्याची आवश्यकता -पालकमंत्री मुनगंटीवार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

चंद्रपूर : गावातील सर्वांगीण विकास साधण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

पडोली चौकातील सुरक्षा उपाययोजनेसह विद्युतीकरण कामाचे भूमिपूजन व शुद्ध पेयजल संयंत्राचे लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला देवराव भोंगळे, डॉ. मंगेश गुलवाडे, रामपाल सिंग, नामदेव डाहुले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील कुंभे, विद्युत उपकार्य अभियंता श्री. येरगुडे, सरपंच विकी लाडसे, अनिल डोंगरे, माजी सैनिक मनोज ठेंगणे, शोभा पिदुरकर, प्रदीप गंधारे, सागर गोविंदवार,अनुताई ठेंगणे आदी कार्यक्रमाला उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, पडोली चौक हा राष्ट्रीय महामार्गावर असल्याने या चौकात अपघात झाले असून यात दोघांना जीव गमवावा लागला. या दृष्टीने माजी सैनिक मनोज ठेंगणे यांनी उपोषण देखील केले. याची दखल घेत या मतदार संघाचा आमदार नसतानाही निधी कुठून उपलब्ध करून द्यायचा? याबाबत अभ्यास केला व 2016-17 मधील कायद्यान्वये सुरक्षा निधीतून 5 कोटी 21 लक्ष रुपये या चौकातील सुरक्षा उपाययोजनासह विद्युतीकरण करण्यासाठी मंजूर करून दिले. या कामाचे भूमिपूजन करतांना मला मनस्वी आनंद होत आहे. प्रस्तावित सर्व कामे गतीने व वेगाने व्हावे, अशा सूचना त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला केल्या आहेत.

रोड सेफ्टी मेजर्स, सिग्नल इन्स्टॉलेशन, रोड डिव्हायडर व फुल लाईट सिग्नल आदी उपाययोजनेसह जिल्ह्यात कुठेही नाही, असे काम येथे करावे. या चौकाचे सौंदर्यीकरण करून सीसीटीव्ही सिस्टीम, सौंदर्यीकरण व आवश्यक उपाययोजना कराव्यात. यासाठी योग्य नियोजन करा. सीसीटीव्हीच्या माध्यमातून अपघातात दोष कोणाचा हे शोधणे सोयीस्कर होईल. यासाठी लागणारा आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही ते म्हणाले. यापूर्वी लखमापूर हनुमान मंदिरासाठी 60 लक्ष रुपये निधी उपलब्ध करून दिला असून पडोली येथे पिण्याच्या पाण्याची टाकी उभारण्यासाठी निधी दिला जाईल, असे पालकमंत्री म्हणाले.

पडोली येथील चौकात झालेल्या अपघातात मुलगा गमाविलेल्या वीर बहादुर सिंग आणि रोशनी सिंग या दाम्पत्याचे पालकमंत्र्यांनी सांत्वन केले. तसेच येथील चौकाच्या उपाययोजनेकरीता उपोषण करणारे माजी सैनिक मनोज ठेंगणे यांचा त्यांनी सत्कार केला.

शुद्ध पेयजल संयंत्राचे लोकार्पण

आरो मशीनच्या माध्यमातून पडोली वासियांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी पडोली ग्रामपंचायतीने मागणी केली होती. या गावातील नागरिकांना आरो मशीनच्या माध्यमातून शुद्ध पिण्याचे पाणी अल्पदरात उपलब्ध होईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले