सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
मारेगाव : शहरी व ग्रामीण भागातील विविध प्रश्न, समस्याबाबत चर्चा - विमर्श कारणासाठी आढावा बैठक
येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे गुरुवारी (23 फेब्रुवारी) रोजी पार पडली. या बैठकीत आमदार बोदकुरवार यांनी तालुक्यातील विविध समस्या जाणून घेऊन उपाययोजना करण्यासंदर्भात निर्देश दिले.
शहरी व ग्रामीण भागातील विकासकामांना गती देण्यासाठी गांव,पातळीवरील समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यावर मार्ग काढण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आ संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या आढावा बैठकीत जलजीवन मिशन 'हर घर जल' अंतर्गत 100 टक्के कुटूंबियांना नळ जोडणी करून पाणीपुरवठा करण्याचे ध्येय असल्याचे श्री कुरडकर उपअभियंता पाणीपुरवठा विभाग वणी यांनी सांगितले तसेच संभाव्य पाणीटंचाई व उपाययोजना यासंदर्भात आढावा घेण्यात आला तसेच विद्युतवितरण कंपनी च्या वतीने वीज ग्राहकांचा समस्या, सार्वजनिक बांधकाम विभाग व जि प विभाग यांच्या वतीने ग्रामीण रस्ता यासारख्या पाणी, वीज, आरोग्य, रस्ते, कृषी, वनसंपदा या क्षेत्रातील विविध समस्या व उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.
या प्रसंगी तहसीलदार दिपक पुंडे, नगरपंचायत मुख्याधिकारी अभिजित वायकोस, माजी जि.प. सदस्या अरुणाताई खंडाळकर, माजी जि.प.सदस्य अनिल देरकर, माजी सभापती शितलताई पोटे, माजी उपसभापती संजय आवारी, ज्ञानेश्वर चिकटे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन सुधाकर जाधव यांनी केले.