भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो!
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशाच्या पुढील यशाची आणि गौरवाची पायाभरणी करणारा ठरावा अशी अपेक्षा आहे. त्यासाठी देशप्रेमाची ही ज्योत मनात सतत तेवत ठेवावी लागेल. त्यासाठी आपण ज्या क्षेत्रात असू त्या क्षेत्रात आपली भूमिका अधिक प्रभाविपणे, क्षमतेने आणि देशाचा सन्मान वाढविण्याच्या हेतूने अदा करावी लागेल. आपली प्रत्येक सकारात्मक कृती देशाच्या राष्ट्रध्वजाचा गौरव अधिक वाढवणारी ठरणार आहे. तेव्हा स्वातंत्र्य लढ्यातील योद्ध्यांकडून प्रेरणा घेत आणि उत्तम कार्याचा निश्चय करीत उत्साहाने आपल्या घरावर तिरंगा फडकावूया!
भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो!
'देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक, देशभक्तांना विनम्र अभिवादन'..!
७५ व्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा!!
#मारेगाव पोलीस स्टेशन
जिल्हा यवतमाळ महा. राज्य