Page

स्वातंत्र्याच्या 75 वर्षात पहिल्यांदा आदिवासी पोडावर फडकला तिरंगा


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : स्वतंत्र मिळून 75 वर्ष पूर्ण झाले मात्र अजूनही आदिवासी समाज सोयीसुविधेपासून वंचित आहे. अजूनही आदिवासी पोडावर लाईट,पाणी आणि जायला रस्ते नाही. मात्र तरीदेखील कसलीही तक्रार न करता आदिवासी समाज हळू हळू विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याचा प्रयत्न करत आहे.
असेच आज यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी बहुल मारेगाव तालुक्यातील जानकाई या अतिमागास आदिवासी कोलाम पोडावर जिथे जायला चांगला रस्ता सुद्धा नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. तरी देखील कसलीही तक्रार न करता समाज कल्याण अधिकारी डॉ.सचिन मडावी यांच्या पुढाकारातून प्रत्येक घरावर तिरंगा फडकविन्यात आला. तसेच पोडाच्या मध्यभागी चावडी वर सामूहिक झेंडावंदन आणि राष्ट्रगीत घेण्यात आले.
यावेळी श्री.राहुल आत्राम अध्यक्ष कोलाम संघटना, श्री. पैकुजी आत्राम सर, श्री.वासुदेव टेकाम सर, पोलीस पाटील यांनी पुढाकार घेऊन गावातील सर्व लोकांना एकत्र आणले.
अपुऱ्या सुविधा असतानाही कसलीही तक्रार न करता देशाच्या अमृत महोत्सवात स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदविणाऱ्या आदिवासी समाजाचे वैशिष्ट यानिमित्ताने शहरी भागातील लोकांना विचार करायला भाग पाडणारे आहे.