Page

खासदार धानोरकर यांनी घेतला पूर परिस्थितीचा आढावा

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

वणी : परिसरात गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या भागातील नदी नाले तुडुंब भरले आहेत. पुरामुळे शेती व पिके पाण्यात बुडाली. तसेच पूर आणि मुसळधार पावसामुळे शेकडो घरांचे नुकसान झाले आहे. याची दखल घेत खासदार बाळू धानोरकर यांनी नुकसानीचा आढावा घेतला.
त्यांनी राज्य सरकारकडे प्रयत्न करून पूर आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची तातडीने भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले. धानोरकर यांनी स्वत: शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांची व शेतातील नुकसानीची पाहणी केली, तसेच पुराचे पाणी ज्या घरामध्ये शिरले खासदारही तेथे पोहोचले. वणी तालुक्यातील झोला, उकणी, झरी जामणी तालुक्‍यातील आडेगाव, मुकुटबन, खतेरा पार्डी ब्रिज पुलासह इतर गावांमध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी प्रभावित झालेल्या ग्रामस्थांची विचारपूस करून समस्या जाणून घेतल्या.
त्यांच्यासमवेत माजी आमदार वामनराव कासावार, तहसीलदार धुलकर, वणी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रमोद वासेकर, देविदास काळे, झरी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आशिष खुलसंगे, प्रवीण काकडे, पुरुषोत्तम आवारी, सुनील वरारकर, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा वंदना आवारी, 
संध्या बोढे, दगडी, तेजराम बोढे, डॉ लोढा,
 संजय खाडे, संजय सपाट हे उपस्थित होते.
CMD सोबत बैठक

वणी तालुक्यातील डीएव्ही शाळेत मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ही शाळा आता वेस्टर्न कोल फिल्ड घुग्गुस येथे हलवण्यात येणार आहे. त्यामुळे वणी तालुक्यामधील विद्यार्थ्यांना घुग्गुसमध्ये शिक्षण घेणे कठीण होणार आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या पालकांनी खासदार बाळू धानोरकर यांची भेट घेऊन त्यांना निलाजई शाळेत बदली करण्याची मागणी केली. खासदार धानोरकर यांनी वेकोलिचे सीएमडी सोबत बैठक घेतली.
पिकांची नासाडी, शेतकऱ्यांची अवस्था बिकट

कोरोनाच्या काळात जनजीवन विस्कळीत झाले होते. समाजातील प्रत्येक नागरिक त्रस्त होता. कोरोनानंतर वातावरण पूर्वीच्या स्थितीत येऊ लागले होते, मात्र आता अतिवृष्टी आणि नंतरच्या स्थितीमुळे मोठे संकट निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांनी कर्ज काढून बी-बियाणे, खते खरेदी केली होती, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरलेली पिके वाहून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा पेरणीचे संकट ओढवले असून, कर्जाचे पैसे गुंतवून आता काय करायचे. असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.
शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करून दिलासा दिला जाईल. असे आश्वासन खासदार धानोरकर यांनी शेतकऱ्यांची भेट घेऊन दिले. अतिवृष्टी आणि त्यानंतर झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीसोबतच त्यांची शेती व पाळीव जनावरेही दगावली आहेत. शेतकऱ्यांवरील ही भीषण परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी आर्थिक पॅकेज जाहीर करून दिलासा देण्याची गरज आहे, या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.