Page

मनावर अधिराज्य करणारा नेता आज आपल्यातून गेला!

सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
महागांव, (३१ जुलै) : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय आमदार गणपतराव देशमुख यांचे निधन माननीय आमदार गणपतराव देशमुख हे अफलातून निर्माण झालेलं व्यक्तिमत्व होते. सलग सलग अकरा वेळा आमदार होणे तेही जनतेच्या विश्वासाने जनतेच्या मनाने आणि कुठलेही प्रलोभनं न देता,अकरा वेळा आमदार होणे ही एक अद्वितीय आणि न पटणारी अशी गोष्ट असली तरी, हे खरे आहे.

माननीय आमदार गणपतराव देशमुख उर्फ आभार हे सांगोला सांगोला तालुक्याचे करत होते. ते धनगर समाजाचे एक अत्यंत विश्वासू साधे मनमिळावू आणि सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारं असं नेतृत्व होतं असे नेतृत्व आज आपल्यातून निघून गेले देशाची तसेच राज्याची मोठी हानी झालीआबा ना भावपूर्ण श्रद्धांजली बाबाच्या जाण्याने एकच शतकातील कायम लोकप्रतिनिधी व करून शासनाला आपल्या भाषणाच्या माध्यमातून प्रभावित करणारे व्यक्तिमत्व अभ्यासू व्यक्तिमत्व तसेच साधी राहणी आणि उच्च विचारसरणी नागपूर असो या मुंबई असो अधिवेशनासाठी एसटीने प्रवास करणारे व्यक्तिमत्व असे नेते दुर्मिळच कुठले भ्रष्टाचाराचे ठपका न ठेवता जीवन जगणारे तसेच शुद्ध चारित्र्याचे व्यक्तिमत्व निरोगी आणि जनतेच्या मनावर अधिराज्य करणारा नेता आज आपल्यातून गेला आहे.(आबा साहेब उर्फ गणपतराव देशमुख बसने प्रवास करताना)

असे नेते होणे नाही जीवनामध्ये अकरा वेळा आमदार होताना कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता शेतकरी कामगार पक्षाची ध्येयधोरणे राबवणे कुठल्याही पक्षाने प्रलोभने दिले तरी पक्ष बदलला नाही प्रलोभनाला बळी पडले नाही. तहहयात एकाच पक्षांमध्ये राहून जनतेची सेवा केली असे व्यक्तिमत्व आज आपण हरवून बसलो याचे मोठे दुःख होत आहे. आबा आपण देशामध्ये एक आदर्श निर्माण केला की, पैसा पद हे काहीच नसते तर जनता ही सर्वस्व असते जनतेसाठी कामे करणे हेच महत्त्वाचे याच्याच जोरावर अकरा वेळा जवळ जवळ अस पंचावन्न वर्षे आमदार म्हणून काम केले.

देशाचे नेते आदरणीय शरदराव पवार यांचे विश्वासू आणि एक मित्र असे त्यांचे व्यक्तिमत्व होते माननीय शरदरावजी पवार साहेब यांनी त्यांना मंत्रिपदी ही आमंत्रित केले होते, सन्मान माननीय पवार साहेबांनी केला. अनेक वेळा अनेक मोठी पदे देण्याचे प्रलोभन दाखवून सुद्धा बाबांनी पक्ष सोडला नाही.

आजच्या काळात असे दैवी जनतेची सेवा करणारे जनतेवर विश्वास ठेवणारे कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार न करणारे नेते दुर्मिळच अशी एक स्वच्छ कारभाराचे जनतेच्या मनातील राजा आबा साहेब उर्फ गणपतराव देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली..

देगलूर,बिलोली विधानसभा पोटनिवडणुकी संदर्भात मतदार संघात इच्छुक उमेदवारांची भेटी गाटींना सुरुवात


सह्याद्री न्यूज | गौतम गावंडे
नांदेड, (३१ जुलै) : केसराळी तालुका बिलोली येथे देगलूर/बिलोली विधानसभा पोटनिवडणुकी संदर्भात माजी अपरजिल्हा अधिकारी मा. बी.एम.कांबळे यांनी ग्रामस्थांची भेट घेऊन अनेक विषयांवर चर्चा तसेच हितगुज झाले. ग्रामस्थांच्या अडी अडचणी जाणून घेतल्या. यावेळी एक मोकळा संवाद झाला, या भेटी दरम्यान देगलूर-बिलोली  पोटनिवडणूक संदर्भात सविस्तर चर्चा आणि ग्रामस्थांनी स्वतःची मत व्यक्त केली. या संवाद दरम्यान ग्रामस्थांचे मिळालेले आशीर्वाद नेहमी बळ देतील.

यावेळी माडे दत्तात्रय पाटील (माजी सरपंच), सुभाष पाटील काळे, सटवाजी सोनकांबळे (माजी सरपंच), 
प्रकाश फकीरे (त्रिरत्न बौद्ध विहार ट्रस्ट अध्यक्ष), रानबाजी इरबा सोनकांबळे, हनमंत टमटम, मोगलाजी फकीरे, नितीन कारले, राजेश्वर मंदरणे (सरपंच प्रतिनिधी), मादळे मारुती (उपसरपंच), विनोद मोगलाजी फकीरे‌ तसेच केसराळी गावातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

ट्रक झाडावर आदळून झालेल्या अपघातात चालकासह क्लिनर ठार

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
केळापूर, (३१ जुलै) : यवतमाळ-चंद्रपूर या राज्य महामार्ग क्रमांक चार वर ट्रक झाडावर आढळल्याने झालेल्या अपघातात चालक व क्लिनर दोघेही ठार झाले आहेत. हा अपघात आज ३१ जुलै ला सकाळी ८:३० वाजताच्या दरम्यान घडला.

चंद्रपूरहून यवतमाळच्या दिशेने लोखंडी पोल घेऊन निघालेल्या ट्रकचा टायर फुटून अनियंत्रित ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळला. यात ट्रकचालक व क्लिनर दोघेही ट्रकच्या केबिनमध्ये फसले. यात दोघांचाही मृत्यू झाला.
अपघातात ट्रक मध्ये दोघे फसले असतानाही त्यांना वाचविण्यासाठी ५ तासात कुठलेही प्रयत्न न झाल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला. या अपघातात ठार झालेले ड्राइवर व क्लिनर दोघेही चंद्रपूर जिल्ह्यातील असल्याचे चर्चा आहे. 

मारेगाव: समाज भवन मंदिराचे काम ४ महिन्यापासून रखडले

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
मारेगाव, (३१ जुलै) : समाज कार्यासाठी निर्माण होत असलेल्या समाज भवनाचे केवळ पिल्लर उभे करून  भवनाचे बांधकाम चार महिन्यापासून रखडले आहे. लोकप्रतिनिधीनी लक्ष घालून बांधकाम पूर्ण करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. 
स्थानिक नगरपंचायत जवळ हनुमान मंदिराला लागून असलेल्या खुल्या जागेवर एक समाज भवन बनावे या मागणीसाठी काही प्रतिष्ठित नागरिकांनी समाज भवनासाठी वणी विधानसभेचे विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्याकडे आग्रही मागणी घालून त्यांच्या पुढाकाराने २० लाखांचा निधी भावनासाठी मिळाला. मात्र, गेल्या तीन चार महिन्यापूर्वी सुरू झालेले समाज भवनाचे बांधकाम पिल्लर उभे करून थांबल्या गेले असून, पुढील बांधकामाचा वेग मंदावल्याने बांधकाम बस'स्टॉप आहे.

तातडीने समाज भवनाचे काम पूर्ण करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

मित्रानेच केली मित्राची हत्या : सहा तासात आरोपीला पकडण्यात पोलिसांना आले यश


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
यवतमाळ, (३१ जुलै) : नागपूर तुळजापूर महामार्ग वरील उमरखेड येथुन तीन किलोमीटर अंतरावरील नदीच्या पुलाजवळ युवकाचा मृत्यू खळबळ जनक घटना आज घडली मृतक अक्षय वसंतराव करे वय २० वर्ष या युवकाचा खून करून मारून टाकले असता, पोलीसांनी अवघ्या पाच ते सहा तासात मुख्य आरोपी आकाश लोंढे यांना जेरबंद करून यांच्यावर गुन्हा दाखल करून तपास करीत आहेत. सदरील घटना ज्ञानेश्वर कदम यांच्या शेतात घडली ज्ञानेश्वर कदम या शेतकऱ्यांनी पोलीस स्टेशन उमरखेड यांना संपर्क साधून घटनास्थळी पोहोचण्यास सांगितले, पंचनामा केला असता पोलिसांना दोन तीन मोठे दगड, दोन डिस्पोजल ग्लास, एक नंबर वन मॅकडॉल : दारूची बॉटल मिळाली. तसेच मृतकाचे चार मित्र संशयित ताब्यात घेऊन तपास करण्यात आला. तपासातून आरोपी आकाश लोंढे यांनी मृतक अक्षय करे याचा खून करण्यात आला असे सांगण्यात आले.

पुढील कायवाही उपविभागीय पोलिस अधिकारी पुसद अनुराग जैन त्यांच्या मार्गदर्शनाखाली उमरखेड ठाणेदार आनंद वाघतकर साहेब, API संदीप गाडे, पी. एस. आय. विनित घाटोळ, NPC विजय पतंगे, संदीप ठाकूर हे करीत आहे.

वणी गणेशपूर मार्गावरील निरगुळा नदीच्या पुलाजवळील खड्डे बुजविण्याची मागणी

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (३१ जुलै) : शहरातून ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली असून रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. खड्यातून मार्ग काढतांना वाहन धारकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. वणी गणेशपूर मार्गावरील निरगुळा नदीच्या पुलाजवळ मोठं मोठे खड्डे निर्माण झाले असून हे खड्डे बुजविण्याची मागणी होऊ लागली आहे. रहदारीला अडथळे निर्माण करणारे हे खड्डे कित्येक दिवसांपासून दुर्लक्षित असून हे खड्डे तत्काळ बुजविण्याकरिता छत्रपती महोत्सव समिती गणेशपूरच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला अल्टिमेटम देण्यात आला आहे. बांधकाम विभागाचे उपअभियंता यांना लेखी तक्रार देऊन दोन दिवसांत नदीच्या पुलाजवळील खड्डे बुजविण्याची मागणी करण्यात आली आहे. दोन दिवसांत हे खड्डे बुजविण्यात न आल्यास याच खड्ड्यात बसून आंदोलन करण्याचा इशारा समितीच्या वतीने देण्यात आला आहे. 
वणी गणेशपूर या प्रमुख रहदारीच्या रस्त्यावरील निरगुळा नदीच्या पुलाजवळ ठिकठिकाणी मोठं मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत असून या खड्ड्यांमधून मार्ग काढतांना वाहन धारकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. हे खड्डे अपघाताला आमंत्रण देत असून या खड्ड्यांमुळे आठवड्याभरात तीन अपघात झाले आहेत. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वार अनियंत्रित होऊन खाली पडल्याने ते किरकोळ जखमी झाले आहेत. या खड्ड्यांमुळे मोठा अपघात होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. वणी वरून गणेशपूर मार्गे कायर व घोन्सा रोडवर निघणारा हा शॉर्टकट रस्ता असल्याने हा रस्ता नेहमी रहदारीने गजबजलेला असतो. छोरीया टाउनशिप कडे जाण्याकरिता हाच जवळचा मार्ग असल्याने या रस्त्याने मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. या प्रमुख मार्गावर नदीच्या पुलाजवळ मोठं मोठे खड्डे तयार झाले असून मागील कित्येक दिवसांपासून हे खड्डे दुर्लक्षित आहेत. हे खड्डे आता अपघाताचे कारण बानू लागले असून दोन दिवसांत हे खड्डे बुजविण्याचा अल्टिमेटम छत्रपती महोत्सव समिती गणेशपूरच्या वतीने देण्यात आला आहे. बांधकाम विभागाचे उपअभियंता यांना दिलेल्या लेखी तक्रारीतून येत्या दोन दिवसांत खड्डे बुजविण्याचे मागणी करण्यात आली आहे. दोन दिवसांत नदीच्या पुलाजवळील खड्डे बुजविण्यात न आल्यास याच खड्ड्यात बसून आंदोलन करण्याचा इशाराही समितीच्या वतीने देण्यात आला आहे.

मुखेड तालुक्यातील दिव्यांगाचे बार्हाळी ग्रामपंचायत समोर थालीनाद आंदोलन


सह्याद्री न्यूज | गौतम गावंडे
नांदेड, (३१ जुलै) : जिल्ह्यातील दिव्यांगानी आपल्या हक्कासाठी दि. ३० जुलै रोजी मुखेड तालुक्यातील बा-हाळी येथे
दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलिकर यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालय समोर कुंभकर्ण शासन प्रशासनास जागे करण्यासाठी आज मुखेड तालुक्यातील बा-हाळी येथे दि. ३० जुलै २१ दिव्यांग संस्थापक अध्यक्ष चंपतराल डाकोरे पाटिल, ता. अध्यक्ष आर एम कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत समोर थालीनांद आंदोलन करण्यात आले. आंदोलनात घोषणेने थालीनांद करून परिसर दणाणून टाकले त्या वेळी निवेदन  स्वीकारण्यासाठी सशश ग्रामसेवकांनी निवेदन स्विकारून आपल्या मागण्यांसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. खालील मागण्या संदर्भात दिव्यांगानी घोषणेने थालीनांद करून आपला संताप व्यक्त केला. 
       
ग्रामपंचायतचा दिव्यांग राखीव पाच टक्के स्वनिधी व तेरावा, चौदावा, पंधरावा विकासातून २०१६ ते आज पर्यंत राखीव दिव्यांग निधी न देणार्‍या दोषी अधिकारी यांचा आढावा घेऊन त्वरीत वाटप देण्यात यावा. 
दिव्यांग अँप मध्ये नोंदणी पासुन एकही दिव्यांग वंचित राहू नये म्हणून मा.जिल्हाधिकारी साहेब यांनी तिन वेळा वेळापञक देऊन अकरा महिन्यात दिव्यांगाना माहिती न देता आपल्या आदेशाची अंमलबजावणी न करणार्‍या दिव्यांगाना निधी व हक्कापासुन वंचित ठेवणार्‍या दोषी अधिकारी यांच्यावर कारवाई करावी.

दिव्यांग कायदा २०१६ ची अंमलबजावणी ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभा घेऊन योजनेची माहिती देऊन देऊळ अंमलबजावणी करणे बाबत, पंचायत समिती अंतर्गत दिव्यांगाचा पाच टक्के निधी अनुशेष सहित वाटप न करणार्‍या गटविकास अधिकारी यांच्या वर कार्यवाही करावी.

दिव्यांगाना घरकुल योजनेतून प्राधान्य क्रमाने घरकुल गावातील रिकाम्या जागेत त्वरीत देण्यात यावा. 
दिव्यांगाना स्वरोजगार करण्यासाठी गाळे किंव्हा २०० फुट जागा त्वरीत देण्यात यावा. दिव्यांग कायदा २०१६ कलम ९२ ए, बी, सी प्रमाणे दिव्यांगाना ञास देणार्‍या दोषींवर कारवाईमुळे करावी.
    
थालीनाद आंदोलनात दिव्यांग वृध्द निराधार मिञमंडळ महाराष्ट्र मुखडे ता.अध्यक्ष रामकिसन कांबळे ता ऊपअध्यक्ष मगदुम शेख,ता सचिव रंजीत पाटिल इंगळे,पांचाळ वैजनाथ, मजा चव्हाण, हनमत बोईनवाड,माया फुलारी, योगेश देशमुख, मौलासाब तांबोळी, शंकर बोईऩवाड, गोपाळ गायकवाड, पांडूरंग गुडघे,ईत्यादी कार्यकर्त्यांनी आंदोलन यशस्वी केले.

किटकनाशक प्राशन करून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या: नेरड (पुरड) येथील दुःखद घटना

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (३१ जुलै) : शिरपूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नेरड (पुरड) येथील एका तरुण शेतकऱ्याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज ३० जुलैला उघडकीस आली. प्रदिप रामदास कौकमवार (२६) असे या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. २९ जुलैला तो कुणालाही न सांगता घरून निघून गेला. कुटुंबीय व नातेवाईक त्याचा शोध घेत होते. दरम्यान नातेवाईकांना तो पहाटे त्याच्याच शेतात निपचित पडून दिसला. शेतात फवारणी करणारे किटकनाशक त्याने प्राशन केले होते. त्याला तत्काळ वणी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. येथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचारानंतर त्याला चंद्रपूरला रेफर केले. चंद्रपूर येथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळालेले नाही. 
प्रदिप कौकमवार हा अल्प भूधारक शेतकरी होता. त्याच्याकडे चार एकर कोरडवाहू शेती असल्याचे समजते. शेतीतीलच उत्पादनावर त्याच्या कुटुंबाचा गाडा चालायचा. कुटुंबाचा तो एकमेव आधार होता. काही वर्षाआधी वेकोलीने कोळसा खाणीच्या विस्तारीकरणाकरिता त्याचे शेत राखीव केल्याचे समजते. पण वेकोलिने शेत जमीन संपादित न केल्याने ते प्रदिप कौकमवार याच्याच ताब्यात होते. तोच शेत जमिनीवर वहती करीत होता. त्याचे नुकतेच लग्न झाले होते. त्याने एकाएक आत्महत्ये सारखा टोकाचा निर्णय घेतल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. काही वर्षाआधी त्याच्या वडिलानेही विषारी द्रव्य प्राशन करूनच आत्महत्या केली होती. प्रदिप कौकमवार २९ जुलैला अचानक घरून बेपत्ता झाला. त्यानंतर ३० जुलैला पहाटे त्याच्याच शेतात तो निपचित पडून दिसला. त्याने किटकनाशक प्राशन केल्याचे दिसून येताच त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथील डॉक्टरांनी त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला चंद्रपूर येथे रेफर करण्यास सांगितले. चंद्रपूर येथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. कुटुंबाचा एकमेव आधार असलेल्या प्रदीप कौकमवार याने आत्महत्ये सारखा पर्याय निवडल्याने कुटुंब चांगलेच हादरले आहे. त्याच्या मागे पत्नी, आई व दोन बहिणी असा आप्त परिवार आहे. त्याच्या या अकाली जाण्याने गावात शोककळा पसरली आहे. त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप कळू शकले नाही.

गर्भपाताच्या औषधांची प्रिस्क्रीप्शनशिवाय विक्री प्रकरणी अमेझॉन व फ्लिपकार्टला नोटीस – अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
मुंबई, (३० जुलै) : गर्भपाताकरिता वापरात येणाऱ्या औषधाची Medical Termination of Pregnancy Kit (MTP) KIT) ऑनलाईन विक्री होत असल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने तपासणीकरिता विशेष मोहिम राबविण्यात आली. प्रशासनाने एकूण ३४ ऑनलाईन संकेतस्थळावर गर्भपातासाठी लागणाऱ्या औषधांच्या उपलब्धतेबाबत पडताळणी केली.

त्यानुसार अमेझॉन या संकेतस्थळावर प्रशासनातील अधिकाऱ्यांनी ग्राहक म्हणून मागणी नोंदविली. त्यानुसार डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय गर्भपाताच्या औषधाची मागणी दोन वेळा अमेझॉनवर स्वीकारून त्याची गुरुनानक इंटरप्राइजेस, लखनऊ, उत्तर प्रदेश व चौधरी फार्मास्युटिकल्स/पिरामल लि., कोरापूर, ओरिसा या संस्थेकडून औषधे पुरविण्यात आले. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय MTP kit औषधाची ऑनलाईन विक्री करणे हे औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० मधील तरतुदींचे उल्लंघन आहे. प्रशासनाने अमेझॉन व संबंधित वितरक यांना यासंदर्भात नोटीस बजावली असून पुढील कारवाई करण्यात येत आहे.

दुसऱ्या एका प्रकरणात फ्लिपकार्ट या ऑनलाईन संकेतस्थळावर गर्भपातासाठी लागणाऱ्या औषधाची मागणी नोंदविली असता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची मागणी न करता फ्लिपकार्टच्या संकेतस्थळावर दोनवेळा औषधाची मागणी स्वीकारण्यात आली व ते पुरविण्यात येणार असल्याचे देखील संकेतस्थळावरुन एसएमएस संदेशद्वारे कळविण्यात आले. वास्तविक गर्भपातासाठी वापरात येणाऱ्या औषधांची डॉक्टर प्रिस्क्रिप्शनशिवाय विक्रीस होकार दर्शविणे, हे देखिल कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करणारे असल्याने फ्लिपकार्ट या कंपनीस नोटीस बजाविण्यात आली असून पुढील कारवाई करण्यात येत आहे.

नुकतेच पुणे येथे अमेझॉन या संकेतस्थळावरुन MTP Kit ची विक्री पुण्यातील औषध विक्रेत्यास केल्याने औषध विक्रेत्याने पुणे येथील अन्न व औषध प्रशासन कार्यालयास तकार दाखल केली होती. या तक्रारी अनुषंगाने प्रशासनाने तातडीने कारवाई करुन यामध्ये सामील असलेला पुरवठादार, मे. आर. के. मेडिकल, अहमदाबाद, गुजरात यांचेकडे प्रत्यक्ष जावून चौकशी केली. या वितरकाकडे औषधाचे खरेदी बिल नसल्याचे उडकीस आले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून संबंधिताविरुध्द पुणे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील कारवाई करण्यात येत आहे.

यंदाही स्वातंत्र्यदिनावर कोरोनाचे सावटः ‘या’ मार्गदर्शक सूचना पाळून साजरा करा १५ ऑगस्ट!


                        (संग्रहित फोटो)

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
मुंबई, (३० जुलै) : भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ७४ वा वर्धापनदिन रविवार, १५ ऑगस्ट २०२१ रोजी साजरा करण्यात येणार आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्याकरिता ‘ब्रेक दी चेन’अंतर्गत शासनाने ४ जून २०२१ अन्वये आदेश पारित केले आहेत. गत वर्षीप्रमाणेच यावर्षीही राज्यात स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी निर्देश देण्यात आले आहेत. हा कार्यक्रम साजरा करताना कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या गृह मंत्रालय तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घ्यावी, असे निर्देश राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत देण्यात आले आहेत.

स्वातंत्र्यदिनासाठी ठळक निर्देश असेः

राज्यात सर्व विभागीय, जिल्हा, उपविभागीय, तालुका मुख्यालयात तसेच ग्रामपंचायत मुख्यालय येथे ध्वजारोहण करुन स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात यावा. पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, अमरावती व कोकण विभागीय आयुक्त यांनी आपापल्या विभागातील तसेच जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी ध्वजारोहण समारंभ आयोजित करण्याची योग्य ती व्यवस्था करावी. राज्याचा मुख्य शासकीय कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईत मंत्रालय येथे सकाळी ९.०५ वाजता ध्वजारोहण करून साजरा करण्यात येईल. पुणे येथे राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण होईल.

• विभागीय व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी संबंधित पालकमंत्री ध्वजारोहण करतील. ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी म्हणजे सकाळी ९.०५ वाजता आयोजित करण्यात यावा. या दिवशी सकाळी ८.३५ ते ९.३५ या वेळेत ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येवू नये. जर एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला आपला स्वतःचा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो सकाळी ८.३५ वाजेपूर्वी किंवा ९.३५ वाजेनंतर आयोजित करावा.

• राष्ट्रध्वजाला वंदन करताना राष्ट्रगीत वाजविण्यात यावे. सलामीच्या वेळी सज्ज असलेला बॅण्ड सलामीपूर्वी व सलामीनंतर वाजवावा. यावेळी करण्यात येणाऱ्या भाषणांचा विषय हा स्वातंत्र्यदिनाचे महत्व विषद करणारे तसेच उपस्थितांना देशाची एकता व अखंडता याकरीता कार्य करण्यासाठी प्रेरित करणारे असावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

• ध्वजारोहण करणारे मंत्री, राज्यमंत्री काही अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रमस्थळी वेळेवर पोहचू शकणार नसल्यास विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी विभागीय आयुक्तांनी आणि जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी ध्वजारोहण करुन ध्वजवंदनाचा कार्यक्रम सुरळीतपणे पार पडेल याची दक्षता घ्यावी. संबंधित प्रांत अधिकारी व तहसिलदार हे अनुक्रमे उपविभागीय मुख्यालय व तालुका मुख्यालय आणि सरपंच किंवा गाव प्रमुख हे ग्रामपंचायत मुख्यालय येथे ध्वजारोहण करतील.

• स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्यसैनिक, शहीद जवानांच्या पत्नींना व आई-वडील तसेच कोरोनायोध्दे जसे डॉक्टर्स, सफाई कामगार, आरोग्यसेवक यांच्यासह या आजारावर मात केलेल्या काही नागरिकांना निमंत्रीत करावे. कोरोना विषाणूची पार्श्वभूमी विचारात घेता स्वातंत्र्यदिनाचा संपूर्ण कार्यक्रम सामाजिक अंतर संदर्भातील सर्व नियम पाळून संपन्न होईल, याची संपूर्ण जबाबदारी आयोजकांची असेल, आयोजकांनी त्यानुसार मान्यवरांना निमंत्रित करण्याची कार्यवाही करावी.

• समारंभास उपस्थित राहणाऱ्या सर्व व्यक्तींनी राष्ट्रीय पोषाख परिधान करावा. सर्वांसाठी मास्क बंधनकारक आहे. सुरक्षित वावराच्या सर्व नियमाचे काटेकोर पालन करावे व अधिकाधिक नागरिकांना हा सोहळा घरबसल्या पाहता यावा, यासाठी वेबसाइटद्वारे थेट प्रक्षेपण करावे, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.

• या कार्यक्रमातून व सोशल मीडियाद्वारे ‘आत्मनिर्भर भारत’ या घोषणेचा प्रसार करावा. दिवसभरातून विविध कार्यक्रम जसे: वृक्षारोपण, आंतर शालेय, आंतर महाविद्यालय स्तरावर ऑनलाईन पध्दतीद्वारे वादविवाद स्पर्धा, प्रश्नमंजूषा, देशभक्तीपर निबंध व कविता स्पर्धांचे आयोजन करावे. महत्वाच्या योजनेचा शुभारंभ करावा. सोशल मिडीयाद्वारे निवडक विद्यार्थी, विद्यार्थीनींचे देशभक्तीपर गाणे, भाषणे आयोजित करावी.

• शासकीय इमारतीवर विद्युत रोषणाई करावी, एखाद्या विषयाचा वेबिनार आयोजित करावा, एनएसएस व एनवायकेएसद्वारे देशभक्तीपर ऑनलाईन मोहिम राबविण्यात यावी, तसेच सोशल मिडीया व डिजीटल माध्यमाद्वारे देशभक्तीपर किंवा राष्ट्रीय एकात्मतेसंबंधातील गाण्यांचा प्रचार करावा, संदेश द्यावा, नागरिकांनी घराच्या बाल्कनी, गच्चीवरुन राष्ट्रीय ध्वज हलविणे, याप्रमाणे नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे देखील स्वातंत्र्यदिन साजरा करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
-राज्यातील सर्व सार्वजनिक व शासकीय इमारतीवर तसेच ऐतिहासिक महत्वाच्या किल्ल्यांवर (उदा. रायगड, सिंहगड, शिवनेरी, पुरंदर, वसई, प्रतापगड, दौलताबाद, सिताबर्डी) राष्ट्रध्वज उभारण्यात यावा. राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पध्दतीबाबत शासन परिपत्रक दिनांक २० मार्च १९९१, ५ डिसेंबर १९९१ आणि ११ मार्च १९९८ अन्वये दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी. ध्वजारोहणाची रंगीत तालीम घेतली जाईल याचीही दक्षता घ्यावी.

• राष्ट्रध्वज चांगल्या स्थितीत असल्याची व सुर्यास्तास उतरवला जाईल याचीही दक्षता घेण्यात यावी. पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक व अमरावती विभागीय आयुक्त हे त्यांच्या मुख्यालयात ध्वजारोहण समारंभाची व्यवस्था करणार असल्यामुळे तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी वेगळे कार्यक्रम करण्याची आवश्यकता नाही. कोकण विभागीय आयुक्त हे कोकण भवन येथील समारंभाची व्यवस्था करतील. मुंबई शहर जिल्हाधिकारी यांनी ध्वजारोहणाची कार्यवाही करण्याची आवश्यकता नाही.

• याप्रमाणे सर्वसाधारण निर्देश देण्यात आले असले तरी कोरोना पॉझिटिव्हीटी दर विचारात घेऊन संबंधित विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी आपआपल्या अधिकारक्षेत्रात स्वातंत्र्य दिनाचे महत्व लक्षात घेऊन साजेसा समारंभ साजरा करण्यासंबंधी पालकमंत्री यांच्या सहमतीने आवश्यक ती उचित कार्यवाही करण्यासाठी मुभा देण्यात येत आहे, असे शासन आदेशात म्हटले आहे.

माजी अर्थमंत्री तथा अध्यक्ष-लोकलेखा समिती विधिमंडळ महाराष्ट्र मा.आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त वरोरा येथे रक्त दान शिबीर

सह्याद्री न्यूज | कालू रामपुरे 
वरोरा, (३० जुलै) :  मा. आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचे जिल्हाध्यक्ष देवरावजी भोंगळे यांच्या सूचनेनुसार वरोरा येथील नगर भवन येथे रक्त दान शिबीर आयोजित करण्यात आले होते. 
    
या शिबिराला सरकारी रुग्णालयाचे कर्मचारी चमू चंद्रपुर येथून आली. यावेळी ३५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. आमदार मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त हा पुर्ण सप्ताह सेवा सप्ताह म्हणून साजरा केला जाणारा आहे.
जिल्हा महासचिव श्री.नामदेव डाहुले, नगराध्यक्ष श्री.अहेतेशाम अली, जिल्हा परिषद सभापती राजु गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष भगवानजी गायकवाड, माजी सभापती रोहिणी देवतळे, बाबासाहेब भागडे, पाणी पुरवठा सभापती अनिल साखरिया, स्वच्छता व आरोग्य सभापती दिपाली टिपले, विनोद लोहकरे, जिल्हा महासचिव सचिन नरड, करण देवतळे, नगरसेवक दिलीप घोरपडे, डॉ. दुर्गे, सुनिता काकडे, जगदीश तोटावार, भरत तेला, किशोर टिपले, बाबासाहेब काळमेघ, प्रकाश दुरर्गपुरोहीत,ओम यादव, अमित आसेकर, राजेश साकोरे, प्रमोद ढवस, ईश्वर नरड, गजानन राऊत, शरद कातोरे, आसाराम रोकडे, मधुकर ठाकरे, विलास गयनेवार, राजु दोडके, प्रकाश काकडे, शुभांगी निम्बाडकर, सुषमा कराड, चंद्रकला मत्ते, अनुराधा दुर्गे,
आशिष रणदिवे, दादू खंगार, प्रतीक काळे, अनिल मत्ते अभिजीत गयनेवार, राहुल बांदुरकर, आकाश भागडे, रोशन लखोटे, अमोल देऊळकर, सूशील बाकडे, आदींची उपस्थितीती होती.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शहर अध्यक्ष सुरेश महाजन, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अमित चवले, युवा मोर्चा चे कादर शेख, भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता युवा मोर्चा, महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रामुख्याने प्रयत्न केले.

पुतण्याचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधनाची बातमी एकूण चुलतीचाही ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू


सह्याद्री न्यूज | गौतम गावंडे 
बिलोली, (३० जुलै) : तालुक्यातील बामणी (बु.) येथील रहिवासी लक्ष्मण पिराजी बादेवाड (२८) यांचा शेतात काम करत असतांना आज ३० जुलै रोजी हृदयविकाराच्या  झटक्याने मृत्यू झाला.
 
सविस्तर वृत्त, बामणी (बु.) येथील युवक लक्ष्मण पिराजी बादेवाड हा शेतात निंदन, खुरपणी चे काम करत असतांना अचानक पणे हृदयविकाराचा झटका आल्याचे समजताच देगलूरला उपचारासाठी रुग्णालयात जात असतांना अर्ध्या वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. पुतण्या वारला हे बातमी कळताच चुलती शेतात काम करत होत्या त्यांनी लगेच घर गाठले. पुतण्याचे निधन अनावर झाले, घरी आल्यावर जाईबाईच्या गळ्याला पडुन रडत असतांना लक्ष्मीबाई बादेवाड (५५) यांचाही हृदयविकराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. एकाच कुटुंबातील दोघांचा काही क्षणात मृत्यू झाल्याने बादेवाड कुटुंबावर दु:खाचे डोंगर कोसळले. सदर घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

या दुःखद घटनेत गावातील नागरिक त्यांच्या दु:खात शामिल असून, त्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करण्यात येत आहे.

ग्रामसंवाद सरपंच संघाची मारेगाव तालुका कार्यकारणी गठीत



सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव, (३० जुलै) : महाराष्ट्र राज्य ग्राम संवाद सरपंच संघाची कार्यकारणी (दि.२९) जुलै रोजी बैठक कार्याध्यक्ष बाबाराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत घोषित करण्यात आली. प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शक म्हणून एड. देवा पाचभाई, नवजीवन संस्था मारेगाव मारोती पाचभाई प्रशिक्षक संतोष आस्वले, तर यावेळी कुंभा येथील सरपंच अरविंद ठाकरे यांची प्रदेश कार्यकारणी मध्ये निवड करण्यात आली.
तालुका अध्यक्ष पदी सिंधी महागाव उपसरपंच अविनाश लांबट यांची निवड करण्यात आली. सचिव पदी देवाडा उपसरपंच सुरेश लांडे, उपाध्यक्ष नरसाळा उपसरपंच यादवराव पांडे, उपाध्यक्ष घोडदरा विनोद आत्राम, उपाध्यक्ष धामणी सरपंच सुरेखा चिकराम, समनव्यक सरपंच सिंधी नीलिमा थेरे, सरचिटणीस सरपंच चिचमंडळ वैशाली परचाके, सरचिटणीस सरपंच चोपन शारदा गोहोकार, सरचिटणीस सरपंच बोरी(गदाजी) प्रवीण नान्हे, सरचिटणीस कोसारा पांडुरंग ननावरे, कोशाध्यक्ष सरपंच मांगरूळ जगदीश ठेंगणे यांची निवड करण्यात आली.

रक्ताच्या थारोळ्यात आढळला युवक, उमरखेड येथील घटना


सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
उमरखेड, (३० जुलै) : उमरखेड तालुक्यातील पाटील कॉलनी येथील एका तरुणाला दगडाने ठेचून खून करण्यात आला. घटनेची बातमी कळताच बघ्यानी घेतली पैनगंगा नदीकडे धाव. 

अक्षय वसंतराव करे (अंदाजे वय २०) रा. पाटील कॉलनी उमरखेड येथील रहिवाशी आहे.
सविस्तर असे की, काल दिनांक २९ जुलै रोजी सायंकाळ च्या दरम्यान, मित्रांसोबत बाहेर गेले असल्याचे कळतेय, उमरखेड ते हदगांव रोड पैनगंगा नदीलगत अक्षय करे हा मृत अवस्थेत वाटसरुंच्या निदर्शनास आला. त्यावेळी  घटनास्थळी त्याच्या डोक्यावर व तोंडावर दगडाने ठेचल्या सारख्या च्या अवस्थेत आढळून येत आले. दरम्यान, उपस्थितीतांकडून ठेचून खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून, शहरात एकच खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती उमरखेड पोलिसांना मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्याच वेळी मृतकाची ओळख पटली असून, अक्षय च्या वडीलांना सकाळी ११ वाजता च्या जवळपास मोबाईल संपर्क साधून कळविण्यात आले. दरम्यान,मृत्यूदेहाच्या बाजूला प्लास्टिक ग्लास व दारूच्या बाटला आढळून आल्याने अक्षय चा दारूच्या नशेतून घातपात तर झाला नाही ना? अशी शंका वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, पंचनामा करून मृत्यूदेह उत्तरीय तपासणी करिता उमरखेड शासकीय रुग्णालय येथे पाठवण्यात आला. ठाणेदार वागतकर साहेब यांच्या मार्गदर्शनात घटनेचा पुढील तपास उमरखेड पोलीस करीत आहे.

महाराष्ट्र राज्याचे माजी अर्थमंत्री तथा लोकलेखा समिती प्रमुख,विकासपुरूष मा.आ. सुधीर मुनगंटीवार साहेब यांना यांच्या वाढदिवसानिमित्त अभिषेक!

सह्याद्री न्यूज नेटवर्क |
चंद्रपूर, (३० जुलै) : मा.आ.श्री.सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त श्री.लखमापूर हनुमान मंदिर येथील अभिषेक पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा.श्री.देवराव दादा भोंगळे जिल्हा अध्यक्ष भाजपा हे होते. कार्यक्रमाची सूरवात हनुमानजीच्या मूर्तीला हार, फुल दुधाचा अभिषेक करून हनुमानजीच्या मूर्तीचे पूजन, आरती करून हनुमानजी मूर्तीला उपस्थित सर्वांनी साखळ घालून प्राथना केली. 'हे संकट मोचन हनुमानजी' आमचे नेते सुधीर भाऊ यांना महाराष्ट्रातील दिन दुर्बल जनतेचे प्रश्न सोडविताना व सेवा करीत असताना त्यांना यश दे, बळ दे, तसेच त्यांचे आरोग्य निरोगी सुदृढ राहू दे, त्यांना दीर्घ आयुष्य दे, याप्रमाणे सर्वांनी मिळून प्रार्थना केली. या कार्यक्रमाला मा. नितुताई चौधरी माजी बालकल्याण सभापती जी.प चंद्रपूर, मा. शोबाताई पिदुरकर जिल्हा उपाध्यक्ष भाजपा, मा.विकास जूमनाके उपसभापती पं. स.चंद्रपूर, मा.रणजित सोयाम, जि.प. सदस्य मा.विनोद चौधरी, श्री.अजय चालेकर, सौ.सुरेखा पाटील, सौ.दुर्गा बावणे, सौ.अन्नू ठेंगणे, सौ.माधुरी सागोरे सरपंच, सौ.संगीता हेलवडे, सौ.किरण अलोणे, सौ.किरण डोंगरे सौ.सलमा शेख, सौ.कल्पना घुने, सौ.शर्मा ताई श्री.विनोद खडसे, श्री.भारत रोहणे, श्री.रामू बल्की, श्री.अशोक पटेल, श्री.विजय माशिरकर श्री.आशिष वाडई, श्री.महादेवपिदुरकर,श्री.नानाजी थेरे श्री.प्रमोद जाधव हे प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन श्री.नामदेव डाहुले जिल्हा महामंत्री भाजपा चंद्रपूर, श्री.अनिल डोंगरे तालुका अध्यक्ष भा.ज.यू.मो चंद्रपूर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता श्री. पवन डोंगरे, श्री.संदीप ठाकरे, श्री.गोविंदा गणफुले यांनी विशेष परिश्रम घेतले.

मनसेची कोकणातील पुरग्रस्तांकरिता मोठी मदत, अन्नधान्य व जीवनावश्यक साहित्य भरलेला ट्रक कोकणाकडे रवाना

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (३० जुलै) : यावर्षी राज्यात मान्सूनचा पाऊस विलंबाने पडला पण पावसाने दमदार हजेरी लावली. मुसळधार कोसळलेल्या पावसाने सर्वत्र दाणादाण उडविली. राज्यातील काही भागात तर पावसाने हाहाकार माजविला. नद्या नाले तुडुंब भरल्याने पुराचे पाणी गावात शिरले. अनेक गावे पाण्याने वेढली गेली. तर काही गावे पाण्याखाली आली. नद्या नाल्यांना आलेल्या पुरामुळे अनेक गावांचे संपर्क तुटले. कोसळधार पावसामुळे शहरातील वस्त्यांमध्येही पाणी शिरले. नदी नाल्यांप्रमाणे रस्त्यांवरून पाणी वाहू लागले. शहरातील रस्ते जलमय झाले. शहरातील मुख्य रस्त्यांवर पूर आल्यागत पाणी वाहत होते. रस्त्यावरील पाण्याच्या ओढ्याने वाहने देखील वाहून गेल्याचे पाहायला मिळाले. धुवाधार कोसळलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीतच नाही तर अनेकांचे जीवनचं समाप्त झाले. धो धो बरसणाऱ्या पावसाने गावांनाच पूर आल्याने अनेक निष्पाप जीवांचे बळी गेले. तर अनेकांचे संसार उघड्यावर आले. आजही गावांभोवती पाण्याचा वेढा कायम आहे. राज्यातील अनेक ठिकाणी आभाळ फाटले, दरड कोसळली, घर कोसळले, संरक्षण भिंती घरांवर पडल्या, माणसे दबल्या गेली, अनेकांना जलसमाधी मिळाली, पालापाचोळ्याप्रमाणे जीवं वाहून गेली, काही तर गावच नाहीशी झाली, पावसाने रुद्रावतार धारण केल्याने पार होत्याच नव्हतं झालं. पुराचा सर्वात जास्त फटका बसला तो 'कोकण' भागाला. या भागात ठिकठिकाणी ढगफुटी झाल्याच्या घटना घडल्या. अनेक गावे पाण्याखाली आली. पूर्वपरीस्थीतीने जगण्याचे संदर्भच बदलले. अनेकांच्या उदर्निवाहाचे प्रश्न निर्माण झाले आहे. शासन सर्वोतपरी मदत करीतच आहे. पण अनेक राजकीय व सामाजिक पुढारीही मदती करिता सरसावले आहेत. काही ठिकाणच्या नागरिकांनी तर स्वतःहून पुरग्रस्तांच्या मदतीकरिता पुढाकार घेत अन्नधान्य व जीवनावश्यक साहित्य पूर पीडितांकरिता पाठविले आहे.

वणी विधासभा क्षेत्रातूनही नेहमी संकटकाळात मदतीला धावणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून कोकणातील पूर पीडितांकरिता अन्नधान्य व जीवनावश्यक साहित्य पाठविण्यात आले आहे. मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी राज्यात उद्भवलेल्या पुरसंकटामुळे तेथील जनतेची उपासमार होऊ नये याकरिता वणी विधानसभा क्षेत्रातील जनतेला अन्नधान्य व जीवनावश्यक साहित्याची जमेल तेवढी मदत करण्याचे आव्हान केले होते. त्यांच्या पुढाकारातून आज ३० जुलैला अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंनी भरलेला ट्रक कोकणाकडे रवाना करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळून हा ट्रक रवाना करण्यात आला. यावेळी मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष राकेश खुराणा, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार, ठाणेदार वैभव जाधव व बरीच मान्यवर मंडळी उपस्थित होती. यावेळी राज्यात निर्माण झालेली पूर परिस्थिती, त्यात उद्धवस्त झालेली संसारं व नैसर्गिक आपत्तीमुळे गेलेली जिवं याबाबत गजानन कासावार गुरुजींनी दुःखद संवेदना व्यक्त करत नागरिकांनी आपलं उत्तरदायित्व समजून अशा संकट काळात नेहमी सडळ हाताने मदत करावी असे सांगतानाच येथील जनतेने जी मदत दिली त्याबद्दल समाधान व्यक्त केले. मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर हे नेहमी संकटात धावून आले आहेत. त्यांनी असेच नेहमी संकट काळात जनतेच्या पाठीशी उभे राहावे अशा भावना उपस्थितांमधून व्यक्त होत होत्या. अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंनी भरलेला ट्रक एसडीपीओ संजय पुज्जलवार यांनी हिरवी झेंडी दाखविल्या नंतर कोकणाकडे रवाना झाला.

लग्नाचे आमिष दाखवून विधवा महिलेचे तीन वर्षांपासून शारीरिक शोषण

                        (सांग्रहित फोटो)

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (३० जुलै) : शहरातील एका तीस वर्षीय विधवा महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिचे तीन वर्षांपासून शारीरिक शोषण करणाऱ्या शहरातीलच एका युवका विरुद्ध पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेचा पाठलाग करून तिच्याशी ओळख निर्माण करून तिला लग्नाचे आमिष दाखऊन सदर युवकाने तिचे सतत शारीरिक शोषण केल्याचा आरोप महिलेने वणी पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीतून केला आहे. नंतर या युवकाने लग्न करण्यास नकार दिल्याने महिलेने त्याच्या विरुद्ध लैंगिक अत्याचाराची तक्रार पोलिस स्टेशनला दाखल केली आहे.

शहरातील सर्वोदय चौक येथे वास्तव्यास असलेल्या विधवा महिलेला लक्ष्मण किशोर खेडकर (२८) रा. मच्छी मार्केट याने प्रेमाचा फास टाकून तिला आपल्या जाळ्यात अडकविले. तो सतत या विधवा महिलेचा पाठलाग करायचा. महिला प्रेमाच्या जाळ्यात अडकताच त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले. २०१८ पासून सदर युवकाने तिचे शारीरिक शोषण केल्याचे महिलेने तक्रारीत नमूद आहे. लग्नाचे वचन देत तो तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत होता. नंतर महिलेने लग्नाची गळ घालताच तो टाळाटाळ करू लागला. महिलेने लग्नाचा आग्रह धरल्यानंतर त्याने तिला साफ नकार दिल्याने तिने २८ जुलैला पोलिस स्टेशनला येऊन लक्ष्मण खेडकर याच्या विरुद्ध लैंगिक अत्याचाराची तक्रार नोंदविली. पोलिसांनी आरोपी लक्षण किशोर खेडकर याच्या विरुद्ध भादंवि च्या कलम ३७६ (२)(N), ४१७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. 
पुढील तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहे.

जिल्ह्यात संततधार पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट तातडीने मदत द्या- जन आक्रोश महाराष्ट्र राज्य समिती च्या जिल्हाध्यक्षा सीमा स्वामी यांची मागणी


सह्याद्री न्यूज | गौतम गावंडे 
नांदेड, (३० जुलै) : जिल्ह्यात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेले असून, अतिवृष्टीने ग्रस्त भागांचे तात्काळ पंचनामे करुन नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना सरसकट आर्थिक मदत द्यावी अशा  आशयाचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांची भेट घेऊन जन आक्रोश महाराष्ट्र राज्य समिती या सामाजिक संघटनेच्या जिल्हाध्यक्षा सीमा स्वामी लोहराळकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना मागणी केली आहे.
  
नांदेड जिल्ह्यात गत कांही दिवसात संततधार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झालेले असून, जनता हवालदिल बनली आहे. खरीपाची बहुतांश पिके वाहून गेली असून अनेक घरांचीही पडझड झालेली आहे तसेच,अनेक बाबींतून शेतकरी, जनता त्रस्त बनली आहे.
या अतिवृष्टी ग्रस्त भागांची स्थळ पाहणी पंचनामे करून सरसकट नुकसान झालेल्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी अन्यथा भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश या सामाजिक संघटनेच्या वतीने आगामी काळात तिव्र जनआंदोलन सुरु करू असा ईशाराही निवेदनातून जिल्हाध्यक्षा स्वामी यांनी दिला आहे.

यावेळी जिल्हा सचिव सुप्रिया कल्याणकर,संगीता झिंझाडे आदीं कार्यकर्त्यांची उपस्थित होती.

ग्राहकाचा मीटर पळविणाऱ्या लाईनमन वासेकर व ठाकरे यांचे वर कार्यवाही करा - सामाजिक कार्यकर्ते घनश्याम मेश्राम यांची मागणी


सह्याद्री न्यूज नेटवर्क |
राजुरा, (३० जुलै) : बामणवाडा तह. राजुरा येथील श्री. सुभाष टेकाम, मजुरी करून कुटुंब चालवीत असताना यांनी नवीन मीटर साठी दिनांक २४/४/२०२१ ला चार महिन्यापूर्वी राजुरा येथील वीज वितरण कंपनीकडे अर्ज केला. त्यानंतर रीतसर दिनांक ८/५/२०२१ ला डिमांड चा भरणा श्री. टेकाम यांनी केला. चार महिने लोटूनही मीटर आले नाही म्हणून तब्बल पाच दिवस राजुरा विद्युत विभागाच्या चकरा मारून मीटर आल्याची खात्री करवून घेतली. तेथील कर्मचाऱ्याने तुझा मीटर ठाकरे लाईनमन कडे पाठविला असून, लावून देईल असे सांगितल्याने सुभाष आनंदित झाले. मात्र, मीटर पाठवून दहा दिवस लोटले असताना लाईनमन ठाकरे कडून मीटर लावण्यात आला नाही. ठाकरे यांचे सोबत संपर्क साधले असता वासेकर लाईनमन ला मीटर लावण्यासाठी सांगितले आहे. असे सांगितले असून टोलवाटोलवी ची उत्तर देत आहेत, वासेकर लाईनमन यांनी दहा दिवसांपासून मीटर लावून दिले नाही. यामुळे विद्युत विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. 

चार महिन्याचा कालावधी लोटला असताना लाईनमन ठाकरे यांनी सुद्धा दहा दिवसांपासून मीटर दडवून ठेवला आहे. यामुळे सुभाष टेकाम यांच्या कुटुंबियांना अंधारात राहावे लागत असून लहान मुलांना त्रास होत आहे. 

लाईनमन ठाकरे हे सुभाष टेकाम यांचा मीटर इतर व्यक्तीला लावून दिलं की काय? अशी शंका निर्माण होत आहे. या अगोदरही असे अनेक प्रकार घडलेले असून शक्यता नाकारता येत नाही असे मत सुभाष टेकाम यांनी व्यक्त केले असून, माझा मीटर मला माझे घरी न लावून दिल्यास कार्यालयात ठीया मांडणार असा संकल्प टेकाम यांनी केला आहे. 

सुभाष टेकाम यांचा मीटर तत्काळ लावून द्यावा व मीटर दडवून ठेवणारे वासेकर व ठाकरे लाईनमन वर कार्यवाही करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते घनशाम मेश्राम यांनी केली आहे.

बिलोलीचे तालुका कृषी अधिकारी रमेश पसलवाड एसीबीच्या जाळ्यात


सह्याद्री न्यूज | गौतम गावंडे 
बिलोली, (२९ जुलै) : आरोपी लोकसेवक श्री रमेश लक्ष्मण पसलवाड, वय ५७ वर्ष, व्यवसाय नोकरी तालुका कृषी अधिकारी, बिलोली यांनी दिनांक ७-०७-२०२१ रोजी तक्रारदार यांच्या कडे 9,000 हाजाराची रुपयेची लाचमागणी केली. लाचलुचपत विभागाचे अधिकारी यांनी दिनांक १६-०६-२०२१ रोजी पडताळणी केली. तक्रारदार यांचे तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पडताळणीच्या कामासाठी वेळ वाढल्याने 15,000/- रुपये लाचेची मागणी केली तडजोडीअंती 12,000/- रु.मिळवण्याचा प्रयत्न केला.

यातील आरोपी लोकसेवक रमेश लक्ष्मण पसलवाड यांनी तक्रारदार यांचे नवीन कृषी सेवा केंद्र सुरू करण्यासाठी शेती उपयोगी खत, बियाणे,औषधे विक्रीचे परवान्यांचा प्रस्ताव कृषी अधीक्षक कार्यालय, नांदेड येथे पाठवण्यासाठी 15,000/- रुपये लाचेची मागणी केली व तडजोडीअंती 12,000/ रुपये मिळविण्याचा प्रयत्न केला.

सदरील सापळा मा. श्रीमती कल्पना बारवकर, पोलीस अधीक्षक ला.प्र.वि.नांदेड परिक्षेत्र नांदेड मा. श्रीमती अर्चना पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक ला. प्र.वि. नांदेड परिक्षेत्र नांदेड, पोलीस उप अध्यक्षक मा. विजय डोंगरे, यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक अरविंद हिगोले, पोना गंगातीर्थ, जगन्नाथ अनंतवार, ईश्वर जाधव, नरेंद्र बोडके यांनी कार्यवाही पार पाडली आहे.

तरी सर्व नागरिक आवाहन करण्यात येथे की शासकीय अधिकारी कर्मचारी हे शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असल्यास लाचेच्या मागणीचे फोन ,मॅसेज, विडीओ, आडीओ क्लिफ असल्यास किंवा शासकीय कर्मचारी, अधिकारी यांनी माहिती अधिकारात शासकीय निधीचा भ्रष्टाचार झाल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला संपर्क साधा असे आवाहन केले आहे.


राज्यातील २५ जिल्ह्यांतील निर्बंध पूर्णतः उठवणार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची घोषणा


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
मुंबई, (२९ जुलै) : राज्यातील कोरोना रूग्णांची घटत चाललेली संख्या लक्षात घेता राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथील करण्यात येणार आहे. उर्वरित ११ जिल्ह्यांमध्ये मात्र निर्बंधात कोणतीही शिथिलता दिली जाणार नाही, अशी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केली.

राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत घट आहे, अशा जिल्ह्यांमध्ये कोरोना निर्बंध शिथील करण्यात यावेत, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत होती. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाची बैठक घेतली. या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

 ज्या २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथील केले जाणार आहेत, तेथील रुग्णसंख्या वाढली किंवा परिस्थिती बिघडली तर स्थानिक प्रशासन तेथील निर्बंध वाढवेल,असेही राजेश टोपे म्हणाले. निर्बंध शिथिलतेचा अंतिम प्रस्ताव तयार करून तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवण्यात आला आहे.मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर येत्या एक दोन दिवसांत शासन आदेश जारी करण्यात येईल, असे टोपे म्हणाले.

 निर्बंध शिथील होणारे २५ जिल्हे कोणते?: कोरोना रुग्णसंख्या घटत असलेल्या २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या २५ जिल्ह्यांमध्ये सध्या तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू आहेत. त्या निर्बंधांतून या २५ जिल्ह्यांना सूट दिली जाणार आहे, असे टोपे म्हणाले.

 या ११ जिल्ह्यांत निर्बंध कायमः पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, बीड आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये मात्र निर्बंध कायम राहणार आहेत. परिस्थिती पाहून या जिल्ह्यांमधील निर्बंध वाढवले जाऊ शकतात, असेही टोपे म्हणाले. हे ११ जिल्हे वगळता उर्वरित २५ जिल्हे निर्बंधमुक्त होणार आहेत.


नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक! तसे नियुक्तीपत्र ही दिले


सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
महागांव, (२९ जुलै) : नोकरीचे आमिष दाखवून दोन भामट्यांनी जिल्ह्यातील अनेक बेरोजगार युवकांना फसविले आहे. एका युवकांकडून ३० हजार रुपये घेऊन त्याला कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून बनावट नियुक्तीपत्र ही दिले. मात्र, तिथे कामावर गेलेल्या युवकयुवतीना, अशी कुठलीही भरती केली नसल्याचे सांगून परत पाठविण्यात आले.
सोमवारी या युवकांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले. सुशिक्षित बेरोजगारांच्या अगतिकतेचा फायदा घेणारे भामटे तयार झाले आहेत. प्रकाश उर्फ जगदीश राठोड रा. घुई, ता. नेर व त्याचा यवतमाळातील एक साथीदाराने याच पद्धतीने युवकांना भुरळ घातली. त्यांच्याकडून प्रत्येकी ३० हजार वसुल केले. नंतर त्यांना नियुक्ती पत्र देत त्यांना कामावरही रुजू होण्याचा आदेश ही दिला. आठ जणांना आर्णी तहसील कार्यालय व न्यायालय परिसरात सिक्युरिटी गार्ड म्हणून रुजू होण्यास सांगितले. नौकरी मिळाली या आनंदात ते आठ युवक युवती तेथे गेले. परंतु त्या ठिकाणी अशी कुठलीही नियुक्ती झाली नसल्याचे सांगण्यात आले. या बाबत जगदीश राठोड याला विचारणा केली असता त्याने उडवाउडवी ची उत्तरे दिली. त्यामुळे आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आर्णी उमरखेड यवतमाळ महागांव तालुक्यातील युवक पोलीस अधीक्षक कार्यालयात पोहचले. त्यांनी नगरसेवक नितीन मिझापुरे यांना सोबत घेऊन आपली समस्या मांडली. युवकांना फसवणाऱ्यावर प्रत्येक तालुक्यात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. यावेळी वैशाली मस्के, राजरत्न हनवते, बालाजी तुमवार, अजय ठाकरे, प्रशांत बारडे, परमेश्वर पाटे, नितीन चौधरी, प्रतिभा बारडे आदी उपस्थित होते.

आर्णी तालुक्यातील २० जणांना गंडविले

"प्रकाशने केवळ एकाच गावातील तर जिल्ह्यातील विविध बेरोजगार युवकांना सिक्युरिटी कंपनीत लावून देण्याचे आमिष दाखवून गंडविले आहे. त्याने आर्णी  तालुक्यातील २० लोकांकडून ५.५० लाखांची रक्कम घेऊन त्यांची फसवणूक केली आहे. आर्णी येथील फसवणूक झालेल्या एका युवकाने पोलिसात तक्रार नोंदविली. आर्णी पोलिसांनी प्रकाश राठोड विरुद्ध कलम ४२०,५०६,५०४ नुसार गुन्हे दाखल केले आहे."

नोकरीचे आमिष देणारी टोळी लाखोंच्या घरात

या टोळीने सुपरवायजर पदासाठी काही तालुक्यातून साठ ते सत्तर हजार रुपये घेतले. जिल्ह्यातील २०० ते २५० युवक युवातींना चांगला गंडा घालण्यात आल्याची माहिती मिळाली. पुसद, उमरखेड, महागाव, दिग्रस, दारव्हा येथील फसगत युवक तक्रारी देण्याच्या तयारीत असल्याचे माहिती मिळाली आहे. असाच प्रकार नांदेड जिल्ह्यातील युवकांना नोकरीचे आमिष दाखवून गंडवणारी टोळी असल्याच्या तक्रारी पुढे आल्या होत्या, त्याचीच पुनरावृत्ती यवतमाळ जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे. तरी जिल्हा अधीक्षक भुजबळ पाटील साहेब हे काय कारवाई करतील याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. 

समाजकार्य व जनहितासाठी योद्धा सेना ग्रुपचे युवा रनांगणात


सह्याद्री न्यूज | गौतम गावंडे 
नायगाव, (२९ जुलै) : तालुक्यातील जयराज पॅलेस येथे योद्धा सेना ग्रुपची पहिली बैठक संपन्न झाली. समाजात आपले दैनंदिन जिवन जगत असताना सर्वांना अडचणी येत असतात, काही अडचणी, समस्या ह्या सुटतात व काही समस्यांचा निराकरण कधीच होत नाही. अशा लहान मोठ्या समस्या लक्षात घेऊन नायगाव तालुक्यातील युवा समाजकार्य तसेच जनहीतासाठी मैदानात उतरली. योद्धा सेना ग्रुप हा एक सामाजिक ग्रुप असुन त्यामध्ये तब्बल दिडशे ते दोन युवा नेतृत्वांचा समावेश आहे. योद्धा सेना ग्रुप मध्ये सर्व जाती धर्माचा समावेश आहे.
दिनांक २८ जुलै रोजी दुपारी जयराज पॅलेस नायगाव येथे ही बैठक आयोजित करण्यात आली होती. समाजकार्याची जिद्द पाहता, योद्धा सैनिकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. योद्धा सेनेचे धैय व उद्देश सर्वांपुढे मांडल्यानंतर सर्व योद्धांनी जयघोष करत या बैठकीस पुर्णविराम दिला आहे.

या बैठकीत योद्धा सेनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल गायकवाड, नायगाव तालुका अध्यक्ष दाऊद शेख अंजनीकर, आझाद समाज पार्टीचे विद्यार्थी युवा मोर्चा नायगाव तालुका अध्यक्ष साईनाथ नामवाडे, रिपाई चे विद्यार्थी युवा मोर्चा नायगाव ता. अध्यक्ष आमिर पठाण, पत्रकार मंगेश झगडे, पत्रकार धमानंद गायकवाड, सुर्या भाऊ गायकवाड, बाळासाहेब घंटेवाड, महेश पवार, गायकवाड, विकास सोनटक्के, प्रदिप मगरे, रऊफ पठाण, नितीन वने, राजेश गायकवाड, रुषिकेश रोडे, विषाल कागदेवाड, रोहीत सुर्यवंशी, रोहन वाघमारे, सुमेध झगडे, राजेंद्र वाघमारे, सिद्ध वाघमारे, प्रकाश वाघमारे, नागोराव बोयाळ, गोतम वाघमारे, आमोल आयलवार, पुनम धमनवाडे आदीसह तब्बल तीस ते चाळीस योद्धा सैनिक उपस्थित होते.

नांदेड : गौतम गावंडे

कोरोना महामारीच्या काळात उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विनायक कूलमेथे ह्याचा सत्कार

सह्याद्री न्यूज नेटवर्क |
राजूरा, (२९ जुलै) : श्री शिवाजी कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय राजूरा, क्रिडा विभाग, तथा पतंजली योग समिती, भारत स्वाभिमान, किसान सेवा समिती युवा, युवती संघटन, राजूरा च्या वतीने विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तीचा सत्कार केला.
   
कोरोना काळात वैद्यकीय अधिकारी, पोलिस अधिकारी, सफाई कामगार ह्यांनी जीवाचि बाजी लावून कामे केली. त्यांच्या कामाला प्रोत्साहन मिळेल ह्या उद्देशाने आज सहायक पोलीस उपनिरीक्षक विनायक कूलमेथे ह्यांना शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

माजी संसदपटू वामनराव चटप, माजी आमदार सुदर्शन निमकर, माजी आमदार संजय धोटे, श्री शिवाजी कॉलेज च्या संचालक मंडळ व राजूरा शहरातील मान्यवर उपस्थित होते.

मनसेचे प्रभाग क्र.१ मध्ये रस्त्यावरील खड्यात वृक्षारोपण

सह्याद्री न्यूज | प्रदीप गावंडे 
पुणे, (२९ जुलै) : प्रभाग क्र.१ मधील टाळगाव चिखली सोनवणे रस्ता हा खड्डेमय रस्ता म्हणून आता ओळखला जात आहे. ठिकठिकाणी मोठं मोठे खड्डे पडले असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
वारंवार सूचना देऊन ही प्रशासन अधिकारी लक्ष देत नसल्याचा मनसेचे प्रभाग अध्यक्ष क्रं.१२ चे देवेंद्र निकम यांनी आरोप केला आहे.

चिखली - सोनवणे वस्ती रस्ता
मागील वर्षी ऑक्टोबर २०२० रोजी निवेदन देण्यात आल्यानंतर २३ जानेवारी २०२१ ला रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करण्यात आले परंतु ('फ') क्षेत्रीय कार्यालय येथील - स्थापत्य विभागाच्या मार्फत अत्यंत खालच्या दर्जाचे काम करण्यात आले, 
यात मल - मूत्र व स्टॉर्म वॉटर लाईन विभाचा देखील तेवढाच मोठा कामचुकारिचा वाटा असल्याचे सांगितले जात आहे. 

फेब्रुवारी २०२१ पासून ते जुलै २०२१ पर्यंत या रस्त्याला ड्रेनेज ची काम झाली, पाण्याची पाईप लाईन आली परंतु रस्त्याचे खोद काम झाल्यानंतर पुन्हा डांबरीकरण करण्यात आले नाही.
वारंवार सूचना देऊन देखील अधिकारी काम करत नाही म्हणून आज सोनवणे वस्ती रोड वर महाराष्ट्र नवनिर्माण सेना च्या वतीने वृक्षारोपण करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे. या वृक्षारोपणाला स्थानिक व वाटसरूनी प्रतिसाद देत या रस्त्यातील खड्डे बुजवून दर्जेदार काम करावे असे मत व्यक्त केले.  

वृक्षारोपण करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग १ टाळगाव चिखली येथील शाखाध्यक्ष प्रतिक बबन शिंदे, देवेंद्र निकम सहकारी, ऋषिकेश दादा पाटील, दत्ता धर्मे, नारायण पठारे, तुषार बनसोडे, मनोज दगडे, सुनी चव्हाण व अनेक महाराष्ट्र सैनिक यावेळी उपस्थित होते.

कलाकारांचे ९ ऑगस्ट ला राज्यव्यापी आंदोलन

                       (संग्रहीत फोटो)

सह्याद्री न्यूज | प्रदीप गावंडे 
पुणे, (२९ जुलै) : कलाकारांना कला सादर करण्याची परवानगी मिळावी, चित्रीकरणास परवानगी मिळावी,नाट्य गृहे सुरु करावीत आणि कलाकारांना रंगकर्मी रोजगार हमी योजना लागू करावी,अशा विविध मागण्यासाठी रंगकर्मी राज्यभर आंदोलन. करणार आहेत. ९ ऑगस्ट ला प्रत्येक जिल्ह्यात एकाच वेळी हे आंदोलन होणार असून, त्यात मालिका चित्रपट,नाटक क्षेत्रातील कलाकारांसह लोककलावंत सहभागी होणार आहेत. कलाकारांच्या व्यथेकडे सरकार चे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन केले जाणार आहे. बुधवारी संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत कलाकारांना आपल्या व्यथा मांडल्या, पुण्यात जिल्हाधिकारी कार्याल्यासमोर दुपारी १२ वाजता हे आंदोलन होणार असून, प्रत्येक जिल्ह्यात सरकार च्या नियमांप्रमाणे ५० जणांच्या उपस्थितीत आंदोलन होणार असल्याचे कलाकार जयराज मोरे यांनी सांगितले. 

मनसेकडून शुक्रवारी 'मदत' कोकणाकडे रवाना होणार - राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांची माहिती

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
यवतमाळ, (२८ जुलै) : गेल्या काही दिवसांत पावसाने महाराष्ट्रात हाहाकार माजवला आणि पुराबरोबरच दरडी कोसळण्याच्या घटनांनी अख्खी गावंच्या गाव माळीणसारखीच क्षणार्धात होत्याची नव्हती झाली.

कोकणात आलेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेकांना आपले सर्व काही गमवावे लागले असून हजारो कुटुंब बेघर झाली आहे. हा एकूणच घटनाक्रम आणि संभाव्य उपाययोजना म्हणून मनसे आता कोकण पूरग्रस्तांना मदत करण्याकरिता सरसावली आहे. मा. राजसाहेब ठाकरे यांनी पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना सैनिकांना सूचना दिल्या. त्यांचे आदेशानुसार राज्य उपाध्यक्ष राजूभाऊ उंबरकर यांनी शुक्रवारी वणीतून मदतीचा ट्रक जीवनाश्यक साहित्यसह पूरग्रस्तांना पाठविली जाणार आहे अशी माहिती दिली.

मागील काही दिवसात प्रचंड पाऊस झाल्याने कोकणातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. अनेक कुटुंबे रस्त्यावर आली, अन्न, कपडे, रोख रकमा पुरात वाहून गेली. अनेकांचे बळी गेले. परिणामी कोकणात आलेल्या अतिवृष्टीमुळे येथील जीवन उध्वस्त झाले आहे. त्यांना मदतीची नितांत गरज आहे. ही बाब लक्षात घेऊन मनसेकडून स्वखर्चाने ही मदत दिली जाणार आहे.

त्यात १ हजार ब्लँकेट, १ हजार साड्या, ३ हजार बिस्कीट पुडे, ३ हजार पाणी बॉटल, ५ टन तांदूळ, दीड टन डाळ, १ हजार टॉवेल, झटपट तयार होणाऱ्या नास्त्याचे साहित्य आदींचा समावेश असणार आहे. शुक्रवारी सकाळी १० वाजता च्या दरम्यान, शिवाजी चौक वणी येथून साहित्याने भरलेला हा ट्रक कोकणाकडे रवाना होणार, मनसेकडून मदतीची पहिली खेप शुक्रवारी रवाना होत आहे. वणीतील ज्या नागरिकांना स्वेच्छेने मदत द्यायची असेल, त्यांनी केवळ वस्तू स्वरूपात आपली मदत मनसेच्या रूग्णसेवा केंद्रात आणून द्यावी, रोख रक्कम स्वीकारल्या जाणार नाही असे आवाहन मनसेच्या वतीने करण्यात आले आहे.



भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले इजहारभाई शेख यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा


"भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले इजहार शेख़ यांना त्यांच्या वाढदिवसा निमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.."

               अभिष्टचिंतन  : २८ जुलै 
गोरगरीबांची मदत करण्यास नेहमी तत्पर असलेले इजहार भाई संकटकाळात सर्वसामान्यांच्या नेहमी पाठीशी उभे राहतात. कोरोना काळात त्यांनी गरजूंच्या उदर्निवाहाचा विडा उचलला. हरसंभव मदत केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांचे मदत कार्य सुरूच आहे. तसेही त्यांची मदतगार म्हणून शहरात ख्याती आहे. त्यांच्याकडे मदत मागण्यास गेलेला कुणीही खाली हात कधी परतला नाही.

सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले इजहार भाई यांनी राजकीय क्षेत्रातही अल्पावधीतच भरारी घेतली आहे. त्यांच्या सुस्वभावी व्यक्तिमत्वाची व मदतकार्याची शहरात नेहमी प्रशंसा होत असते. लॉकडाऊन काळात त्यांनी गरजू गरिबांना मोठ्या प्रमाणात अन्नधान्य वितरित केले. आपत्ती व्यवस्थापनाकरिताही त्यांनी शासनाच्या साह्यता फंडात निधी जमा केला. अशा या मनमिळाऊ व मदतगार व्यक्तिमत्व लाभलेल्या इजहार शेख यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा ! त्यांचं शहरवासियांकरिता असलेलं आपुलकी व प्रेम असचं अबाधित राहावं हिच सर्वांची मनोकामना आहे.

आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभोत हीच मनस्वी सदिच्छा....!!

शुभेच्छुक : सैफूर रहेमान, आतिफ रहेमान, वणी (यवतमाळ)

कोविड-१९ उपाययोजना करीता वितरित निधीची अफरातफर,राजुरा आरोग्य केंद्रातील प्रकार - संतोष कुळमेथे यांनी सीईओकडे केली चौकशीची मागणी

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
राजुरा, (२८ जुलै) : कोविड - १९ या आजारावर उपाययोजना करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र चिंचोली, काढोली व देवाडा येथे वितरित करण्यात आला या निधीतून खरेदी केलेली औषध व साहित्य खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाल्याने त्याची उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करावी अशी मागणी बिरसा क्रांती दलाचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष कुळमेथे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी यांच्याकडे केली आहे.
    
माहे मार्च-एप्रिल २०२० मध्ये कोविड - १९ या आजारावर उपाययोजना व प्रतिबंधात्मक उपायाकरिता राजुरा तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयांतर्गत येत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंBBद्र चिंचोली, काढोली व देवाडा येथे औषधी, साधनसामग्री,साहित्य खरेदी करण्यासाठी तिनही आरोग्य केंद्राला प्रत्येकी एक लाख रुपये या प्रमाणे जिल्हा परिषद मधून निधी वितरित करण्यात आला या वितरित निधीतून निकृष्ट दर्जाची साहित्य खरेदी करून निधीची अफरातफर केल्याचा आरोप कुळमेथे यांनी केला आहे.
    
माहे मार्च-२०२० ते सप्टेंबर-२०२० या कालावधीत खरेदी केलेली औषधे, साधनसामग्री,साहित्य, व्हाउचर, बिल वितरकाचे नाव,खर्चित रक्कम आणि खतावलेल्या जमावही (stock book) आदींची काटेकोरपणे तपासणी केल्यास भोंगळ कारभाराची सत्यता समोर येण्याची शक्यता वर्तुळात वर्तविली जात असल्याने संबंधित कर्मचाऱ्यांची धाकधूक वाढली आहे.

 मार्च-२०२० ते सप्टेंबर-२०२० या कालावधीत खरेदी केलेल्या साहित्याची संपूर्ण कागदोपत्री असलेल्या नोंदीची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी संतोष कुळमेथे यांनी केली आहे यावर जिल्हा परिषद कार्यालयाकडून काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे.

"कोविड-१९ या आजारावर उपाय योजना करण्यासाठी राजुरा तालुक्यातील तीन प्राथमिक आरोग्य केंद्राला जो निधी वितरण करण्यात आला त्यात मोठा भ्रष्टाचार झाला आहे याची निःपक्षपाती चौकशी करून दोषींवर कारवाई करावी ही माझी मागणी आहे".

एमपीएसएसी’च्या भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा; प्रस्ताव १५ ऑगस्टपर्यंत ‘एमपीएससी’कडे पाठविण्याचे उपमुख्यमंत्री यांनी दिले निर्देश

सह्याद्री न्यूज नेटवर्क |
मुंबई, (२८ जुलै) : ‘एमपीएसएसी’च्या भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा; शासनाच्या सर्व विभागांनी रिक्त पदांचा प्रस्ताव १५ ऑगस्टपर्यंत ‘एमपीएससी’कडे पाठविण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश. विशेष बाब म्हणून ४ मे आणि २४ जून २०२१ च्या शासन निर्णयांतून पद भरतीसाठी सूट.

‘एमपीएससी’कडील पदांच्या भरतीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत पद भरती करताना न्यायालयाच्या सर्व निकालांचा विचार करुन राज्यातील कोणत्याही घटकावर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या.

राष्ट्रसंत डॉ.रामराव महाराज यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा - गोर केसुला ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष वासुदेव राठोड यांची मागणी


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
नांदेड, (२८ जुलै) : अखंड भारतातील बंजारा समाजाचे श्रध्दास्थान धर्मगुरू राष्ट्रसंत डॉ. रामराव महाराज यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी गोर केसुला ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष वासुदेव राठोड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केली आहे.

राष्ट्रसंत डॉ.रामराव महाराज यांनी वयाच्या ९ व्या वर्षापासून देश सेवेचे कार्य हाती घेतले होते. दारूबंदी,हुंडाबंदी,अस्पृश्यता,अंधश्रदा,हिंदूरक्षक,धर्मजागृती आदी सुधारणे साठी अहोरात्र त्यांनी परिश्रम घेतला आहे. ते १५ करोड बंजारा समाजासह सर्वांचे श्रध्दास्थान असून बालब्रम्हचारी अखंड देवी तपस्या,अत्रत्याग करून तांडा ,वाडी,वस्ती,गाव,शहर पातळीवर संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी अर्पण केले होते.
रामराव महाराज यांना मरणोत्तर त्यांना देशसेवेसाठी भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गुणगौरव करावा यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे शिफारस करावी अशी मागणी गोर केसुलाचे संस्थापक अध्यक्ष वासुदेव राठोड यांनी केली.

घुग्घुस येथे समाधान पूर्ती सुपर बाजारचा भव्य शुभारंभ


सह्याद्री न्यूज | शिला जी धोटे
चंद्रपूर, (२८ जुलै) : आज घुग्घुस येथील जुना बसस्थानक जवळ चंद्रपूर येथील प्रसिद्ध समाधान पूर्ती सुपर बाजार च्या ८ व्या शाखेचे उदघाटन भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे व चंद्रपूरचे तहसीलदार निलेश गौड यांच्या शुभ हस्ते फीत कापून करण्यात आले. याप्रसंगी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

समाधान पूर्ती बाजार मध्ये दैनंदिन जीवन उपयोगी वस्तू 365 दिवस एमआरपी दरा पेक्षा कमी दरात बाय 1 गेट 1 मुफ्त घुग्घुस वासियांकरिता उपलब्ध करण्यात आले आहे. 999 रुपयाच्या खरेदीवर प्रथम बक्षीस 1 एलइडी टीव्ही, दुसरे बक्षीस 1 वाशिंग मशीन, तीसरे बक्षीस 1 मायक्रोव्हेव ठेवण्यात आले आहे.
       
यावेळी नकोडा जि. प. सदस्य ब्रिजभूषण पाझारे, भाजपा युवामोर्चा जिल्हा महामंत्री विवेक बोढे, संचालक उमेश चांडक, गिरीश चांडक, दत्तात्रय कंचर्लावार, ज्ञानेश कंचर्लावार, भाजपाचे विनोद चौधरी, निरीक्षण तांड्रा, संजय भोंगळे, ऋषी कोवे, संजय तिवारी, हसन शेख, सुनील बाम, सिनू कोत्तूर उपस्थित होते.

जिल्हा मध्यवर्ती बँक वसुली संदर्भात आढावा बैठक संपन्न


सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
महागांव, (२८ जुलै) : जिल्हा मध्यवर्ती बँकेची वसुली संदर्भात आढावा आज बैठक संपन्न झाली. यामध्ये 
जिल्हा मध्यवर्ती बँकचे अध्यक्ष श्री. टिकारामजी कोंगरे  यांनी चालू पिक कर्ज व दुधाळ थकीत कर्ज वसुली संदर्भात सोसायटी सचिव व वसुली अधिकारी यांना शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे मानसिक त्रास न देता वसुलीला प्राधान्य द्या अशा सूचना देण्यात आल्या.

कर्ज वसुलीच्या संदर्भात आढावा बैठक आज दिनांक २८ जुलै २०२१ रोजी अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती बँक श्री. टिकारामजी कोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा मध्यवर्ती बँक निरीक्षक व सर्व सोसायटी सचिव सह पुसद मंडळ यांच्या उपस्थितीत जिल्हा मध्यवर्ती पुसद बँकेच्या सभागृहात आज पार पडली.
या बैठकीसाठी मा.श्री. टिकारामजी कोंगरे जिल्हा मध्यवर्ती बँक अध्यक्ष यवतमाळ, श्री. वसंतराव घुईखेडकर जिल्हा मध्यवर्ती बँक उपाध्यक्ष, प्रा. शिवाजी राठोड उपविभागीय अध्यक्ष, संचालक श्री. प्रकाश पाटील देवसरकर, अनुकूल चव्हाण संचालक, श्री. साहेबराव हिवरेकर, विभागीय अधिकारी जऊळगावकर साहेब,  आदीसह तालुक्यातील महागांव, पुसद उमरखेड येथील सोसायटी चे सचिव व बँक निरीक्षक उपस्थित होते.

भारतीय सिमेंट मजदुर संघाची दालमिया सिमेंट कंपनी प्रशासनासोबत बैठक संपन्न

 
सह्याद्री न्यूज | शिला जी धोटे
कोरपना, ( २८ जुलै) : भारतीय सिमेंट मजदुर संघाची नारंडा येथील दालमिया सिमेंट कंपनी प्रशासनासोबत बैठक लोकलेखा समितीचे अध्यक्ष व आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार गडचांदुर येथे संपन्न झाली असून यावेळी कंपनीचे युनिट हेड सुनील भुसारी,मानव संसाधन प्रमुख उमेश कोल्हटकर,व्यवसायिक प्रमुख गिरीश सोमानी,भारतीय सिमेंट मजदुर संघाचे नेते अँड.शैलेश मुंजे,पराग पामपट्टीवार,भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने,अनिल बंडीवार, किशोर राहुल,रामरूप कश्यप,सुनील टोंगे,प्रवीण शेंडे,राजू गोहणे उपस्थित होते.
       सदर बैठकीमध्ये कंपनीमध्ये स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे,जुन्या ३०६ कामगारांना पैकी ८५ कामगारांना O&M मध्ये नौकरी दिली गेली असून ४१ जुन्या स्थायी कामगारांचे नियुक्ती पत्र तयार आहेत व बाकी कामगारांसुद्धा टप्या टप्याने कामावर घेऊ व तसेच उरलेल्या बाकी जुन्या कंत्राटी कामगारांना कंपनीमध्ये प्राधान्याने कामावर घेऊ अशी माहिती कंपनी प्रशासनाने यावेळी दिली.
         तसेच भारतीय सिमेंट मजदुर संघाचे स्वतःचे स्वतंत्र कामगार संघटन ३६१६ या क्रमांकाची नोंदणी असून काही कामगार संघटना आम्ही भारतीय सिमेंट मजदुर संघाची संलग्न आहो असे सांगत कंपनी प्रशासन व कामगारांची दिशाभूल करत होते,त्यामुळे भारतीय मजदुर संघाचे प्रदेश अध्यक्ष यांनी पत्राद्वारे मे महिन्यात तसा सविस्तर खुलासा केला आहे त्यामुळे कोणत्याही कामगार संघटनेवर भारतीय मजदूर संघाशी संलग्नता आहे म्हणून विश्वास ठेवू नका अशी माहिती यावेळी अँड.शैलेश मुंजे यांनी यावेळी कंपनी प्रशासनाला दिली.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रुग्णवाहिकेचे लोकार्पण

सह्याद्री न्यूज | संतोष गडवे 
औरंगाबाद, (२८ जुलै) : गेल्या वर्षभरापासुन कोराना या महा भयंकर रोगाने संपूर्ण भारतात थैमाण घातले त्यामुळे अनेकांना रूग्नवाहीका, ऑक्सीजन, व्हेंटिलेटर तसेच इतर उपचाराचे साहित्य सामुग्री व योग्य उपचार न मिळाल्याने नाहक अनेकांना आपला जीव गमवावा लागला.

कित्येकवेळा गोरगरीबांना रूग्णालयात जाण्यासाठी रूग्णवाहीका न मिळाल्याने आपला जीव सोडावा लागला ती अत्यंत गंभीर परिस्थीती होती. या गोष्टीचा विचार करून माजी महापौर विमलताई बी राजपूत व किशोर राजपूत यांनी वार्ड क्र 62 संभाजी काॅलनी सिडको एन सहा मध्ये मोफत रूग्णवाहीका उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला त्या अनुषंगाने दि. २७ जुलै २०२१ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्त रूग्णवाहीका लोकार्पण सोहळा अर्पण करून वार्डातील तसेच शहरातील गोरगरीबांना मोफत रूग्णवाहीकेमार्फत चोवीस तास सेवा करण्यासाठी रूग्णवाहीका उपलब्ध करून दिली.

म्हणुन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) विद्यार्थी आघाडीचे जिल्हाअध्यक्ष मनीष नरवडे यांनी त्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या याप्रसंगी सचिन दाडगे, मयुर जमधडे, सचिन गायकवाड, अभिजीत गावडे, शेखर बिडला, निखिल गवळी, क्षितीज काबळे, अनिकेत श्रीवास्तव, उमाकांत वैद्य, पप्पु गवई, महेन्द्र कुलकर्णी, उपस्थित होते.

महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वणीत मॅरेथॉन दौड स्पर्धा संपन्न


सह्याद्री न्यूज | विवेक आवारी 
वणी, (२८ जुलै) : महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज दि. २७ जुलै २०२१ रोज मंगळवारला शिवतीर्थ वणी येथे सकाळी ७ वाजता भव्य मॅराथॉन दौड स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

ही स्पर्धा ओपन गट मुले /मुली व १८ वर्षाआतील मुले/मुली अशा दोन गटात घेण्यात आली. प्रत्येक दोनही गटातील १० मुले/मुली विजेत्यांना बक्षिसे देण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सुनिलभाऊ कातकडे अध्यक्ष इंदीरा सुतगिरणी तथा शिवसेना वणी विधानसभा संघटक, प्रमुख पाहुणे म्हणुन संजय देरकर तर कार्यक्रमाचे संयोजक राजू तुराणकर शिवसेना शहर प्रमुख युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हारार्पणकरून तथा खेळाडूंना हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेला सुरुवात केली .
त्यानंतर लगेचच बक्षिस वितरणाचा सोहळा संपन्न झाला. यावेळी ललित लांजेवार, मंगल भोंगळे, महेश पहापळे, असलमभाऊ,सचिन पचारे, पचारे,नामदेवराव शेलवडे, काका,राजुभाऊ देवडे, प्रमोद मिलमिले, प्रा.मालेकर सर,संतोष बेलेकर सर,जनार्दन थेटे,हितेश गोडे, राहुल झटे,सौरभ वानखेडे,उपस्थित होते.

संचालन सागर जाधव यांनी केले तर आभार ललित लांजेवार यांनी मानले.

बीड : प्रेमप्रकरणातून नर्सची गळफास घेऊन आत्महत्या

सह्याद्री न्यूज | ऋतुजा सोनवणे 
बीड, (२८ जुलै) : बीडमधील एका रूग्णालयात नर्स म्हणून काम करणाऱ्या सोनाली अंकुश जाधव (२६) हिने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मांजरसुंबा घाट परिसरात एका झाडाला गळफास घेतल्याच्या अवस्थेत २६ जुलै रोजी तिचा मृतदेह आढळला. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिने प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाली जाधव ही पालवन चौकात राहत होती. ती दीप हॉस्पीटलमध्ये नर्स म्हणून कामाला होती. सोनाली आणि बीडच्या एका खासगी लॅबमध्ये काम करणाऱ्या अक्षय राजाभाऊ आव्हाड (वय २७, रा. डोईफोडवाडी) याच्यासोबत प्रेमसंबंध जमले होते.
अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध असल्याने सोनाली हिने अक्षयला लग्न करण्याची मागणी केली. आधी लग्नाची बाब अक्षय याने टाळली. मात्र, सोनाली हिचा लग्नासाठी जास्तच रेटा वाढल्याने अक्षयने लग्नास नकार दिला. अक्षयने लग्नास नकार दिल्याच्या राग मनात धरून सोनाली जाधव हिने मांजरसुंभा घाटातील पालीजवळ असलेल्या एका झाडाला गळफास घेतल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी मृत सोनाजी जाधव हिचा भाऊ अजय जाधव याने अक्षय आव्हाड याच्या विरोधात नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

वणी विधानसभा क्षेत्रात मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (२८ जुलै) : महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस वणी विधानसभा क्षेत्रात अगदीच साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. राज्यावर एकामागून एक येणारं संकट व संकटात बळी पडलेल्या जनतेचं दुःख पचवता येण्यासारखं नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी आपला वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करण्याच्या सूचना शिवसैनिकांना दिल्या. राज्यावरील कोरोनाचं संकट टळलं नसतांनाच नैसर्गिक आपत्तीन राज्याला हादरवून सोडलं. कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत नाही तोच निसर्ग कोपला. पावसानं राज्यातील काही भागात थैमान घातलं. दरड कोसळली, आभाळ फाटलं, घरं पडली, घरं दबली. होत्याचं नव्हतं झालं. नद्या नाल्यांना पूर आले. पुराच्या पाण्यानं गावं वेढल्या गेली. माणसे वाहून गेली. कित्येकांना अकाली मरण आलं. कित्येक निष्पाप जीवांना जल समाधी मिळाली. कोरोना महामारीचा मृत्यू तांडव थांबत नाही तोच निसर्गानं उग्र रूप धारण केलं. आभाळ फाटल्यागत पाऊस कोसळला. रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले. पाल्यापाचोळ्या प्रमाणे माणसे वाहून गेली. अशा या संकटाच्या काळात राज्यावर दुःखाचं सावट असतांना स्वतःचा वाढदिवस थाटामाटात साजरा करणं ही अतिशयोक्ती ठरेल, म्हणून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी आपला वाढदिवस अत्यंत सध्या पद्धतीने साजरा करण्याच्या सूचना केल्या. राज्यातील तमाम शिवसैनिकांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनर, होल्डिंग्ज व जाहिरातींवर पैशाची उधळण न करता पूरग्रस्तांना मदत करण्याचे आव्हान केल्याने वणी विधानसभा क्षेत्रात त्यांचा वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. वणी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार व शिवसेना जिल्हा प्रमुख विश्वासभाऊ नांदेकर यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करीत त्यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हारार्पण करून शिवसेनेच्या टागोर चौक व नारायण निवास परिसरातील शाखा फलकाचे अनावरण केले. 
शहरातील टागोर चौकव नारायण निवास परिसरात शिवसेनेची शाखा तयार करण्यात आली असून मुख्यमंत्रांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माजी आमदार विश्वासभाऊ नांदेकर यांच्या हस्ते शाखा फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख रवी बोढेकर यांनी शाखा फलकाचे विधिवत पूजन करून अन्य सोपस्कार पार पाडले. याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संजय निखाडे, शरद ठाकरे, युवासेना शहर प्रमुख निखिल येरणे, उपशहर प्रमुख महेश चौधरी, अजय चन्ने, धर्मा काकडे, उपशहर प्रमुख निलेश करडभुजे, अनुप चटप, सौरव खडसे, महिला शहर प्रमुख सविता सातपुते, महिला संघटक नंदाताई गुहे, युवासेना जिल्हा समन्वयक संतोष वऱ्हाटे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

वारंवार होणाऱ्या बळजबरीमुळे अल्पवयीन मुलीला झाली गर्भधारणा


                        (संग्रहीत फोटो)

सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 
झरी, (२८ जुलै) : तालुक्यातील वल्हासा पोड येथील रहिवासी असलेल्या व जुनोनी आश्रम शाळेत शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन मुलीशी ओळख वाढवून तिच्याशी जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिला गर्भवती करणाऱ्या पंचवीस वर्षीय युवकाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर बाल लैंगिक प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला वणी येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता ती गर्भवती असल्याचे लक्षात आले. मुलीच्या आईने मुलीला विश्वासात घेऊन या गंभीर प्रकाराबाबत जाणून घेतले असता मुलीने जुनोना येथीलच एका युवकाने ओळख निर्माण करून अनेकदा जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची माहिती दिली. तसेच शारीरिक संबंधाबद्दल आई वडिलांना सांगितल्यास तुला व तुझ्या आईवडिलांना जीवानिशी ठार मारेन, अशी धमकीही आरोपीने दिल्याचे मुलीने आपल्या आईला सांगितले. मुलीची आपबिती ऐकल्यानंतर मुलीच्या आईने २६ जुलैला रात्री ८.२३ वाजता मुलीवर अत्याचार झाल्याची तक्रार मुकुटबन पोलिस स्टेशनला नोंदविली. 
झरी तालुक्यातील वल्हासा पोड येथे राहणारी १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी जुनोनी येथील आश्रम शाळेत ९ व्या वर्गात शिकत होती. शाळेला सुटी असली की, ती जुनोना गावातील दुकानात आवश्यक वस्तू खरेदीकरिता जायची. अशातच गावातील एका युवकाने तिच्याशी ओळख निर्माण केली. ओळख वाढतच गेली, व तो तिच्याशी जवळीक साधण्याची संधी शोधू लागला. मागच्या वर्षी दसऱ्याच्या दिवशी तो वल्हासा पोड येथे आला, व मुलीला भेटला. दरम्यान मुलगी शौचास गेली असता सदर युवक तिच्या मागे गेला, व जबरदस्ती त्याने मुलीला तिच्या आजोबाच्या वावरात नेत तिच्याशी बळजबरी केली. त्यानंतर फेब्रुवारी २०२१ मध्ये तिच्या आजोबाच्याच वावरात परत तिच्यावर त्याने बळजबरी केली. नंतर नेहमी तो तिला भेटायला बोलावून तिच्याशी बळजबरी करू लागला. वारंवार तिचे शारीरिक शोषण करण्यात आल्याने तिला गर्भधारणा झाली. अचानक तिच्या पोटात वेदना होऊ लागल्याने तिला वणी येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी ती साडेपाच महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले. हे ऐकताच मुलीची आई चांगलीच हादरली. आईने मुलीला विश्वासात घेऊन या गंभीर प्रकाराबाबत जाणून घेतले असता तिने आपल्यावरील आपबिती कथन केली. मुलीच्या आईने जुनोना येथे जाऊन मुलीवर बळजबरी करणाऱ्या युवकाला तिच्याशी केलेल्या अपकृत्याबाबत जाब विचारला असता त्याने मुलीच्या आईला पोलिसांत तक्रार केल्यास सरळ जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर मुलीच्या आईने मुकुटबन पोलिस गाठून मुलीवर झालेल्या अत्याचाराची रीतसर तक्रार नोंदविली. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तत्काळ आरोपी विलास तुकाराम आत्राम (२५) रा. जुनोनी ता. झरी याला अटक करून त्याच्यावर भादंवि च्या कलम ३७६ (२)(N), ३७६ (A)(१), ५०६ व RW ४,८ बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 
पुढील तपास पीएसआय राठोड करीत आहे.

पूरग्रस्त भागातील वीज, पाणीपुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

सह्याद्री न्यूज नेटवर्क |
मुंबई, (२६ जुलै) : पूरग्रस्त भागातील वीज आणि पाणीपुरवठा तातडीने सुरु करण्यात यावा. तसेच अनेक ठिकाणी रस्ते खचले असून, पूल पाण्याखाली गेले आहेत. तेथील वाहतूक तातडीने सुरु होईल, यासाठी दुरुस्ती हाती घ्या. पूरग्रस्त भागात रोगराई पसरू नये यासाठी स्वच्छतेच्या आणि आरोग्याच्या सुविधा पुरविण्यासाठी युद्धपातळीवर कार्यवाही करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थिती आणि नुकसानीबाबत मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी आज वर्षा या शासकीय निवासस्थानी आढावा घेतला. बैठकीस उद्योग मंत्री सुभाष देसाई, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय चहांदे, आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ड़ॉ. प्रदीप व्यास, ऊर्जा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दिनेश वाघमारे, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव विकास खारगे, वित्त विभागाचे प्रधान सचिव ओ.पी. गुप्ता, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रदान सचिव असीमकुमार गुप्ता, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. महेश पाठक, पशु संवर्धन विभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा गृह निर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, जलसंपदा विभागाचे विशेष कार्य अधिकारी विजय गौतम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव देबडवार, अन्न व औषध प्रशासन आय़ुक्त परिमल सिंह आधी उपस्थित होते.

पूरग्रस्त भागातील रस्ते, पाणीपुरवठा योजना, वीजपुरवठा यांच्या अनुषंगाने बैठकीत तपशीलवार आढावा घेण्यात आला.

रस्त्यांची दुरूस्ती युद्धपातळीवर करा

सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव उल्हास देबडवार यांनी माहिती दिली की, महाबळेश्वर, पोलादपूर आणि पन्हाळा याठिकाणचे रस्ते अर्धे खचले आहेत. त्याठिकाणी पाईप्स टाकून एकमार्गी वाहतूक सुरु करण्यात येत आहे. एकूण २९० रस्ते दुरूस्त करण्याची गरज असून, ४६९ रस्त्यांवरची वाहतूक बंद आहे. ८०० पूल आणि मोऱ्या पाण्याखाली गेल्या आहेत. प्रत्येक विभागात एक-एक अतिरिक्त मुख्य अभियंता दर्जाचा अधिकारी नियुक्त केला आहे. तो प्रत्यक्ष सर्वेक्षण करत आहे.

वीजपुरवठा सुरळीत करा

ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांनी सांगितले की, बारामती- सातारा आणि पेण अशा दोन उपकेंद्रांचे नुकसान झाले आहे. १४ हजार ७३७ ट्रान्सफॉर्मर्स नादुरूस्त झाले होते, त्यापैकी ९ हजार ५०० दुरूस्त झाले आहेत. नादूरुस्त ६७ उपकेंद्रांपैकी ४४ परत सुरू करण्यात आले आहेत. एकंदर ९ लाख ५९ हजार बाधित ग्राहकांपैकी साडे सहा लाख ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. महाडमध्ये दोन मोठे वीज मनोरे तातडीने दुरूस्त करणे सुरु आहे.

पाणीपुरवठा योजनांची तातडीने दुरुस्ती

पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे यांनी सांगितले की, रत्नागिरी, चिपळूण, खेड, पोलादपूर याठिकाणी पाणीपुरवठा योजनांचे नुकसान झाले असून, रत्नागिरीत १७ गावांना तसेच सिंधुदुर्गात २० गावांत पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या ठिकाणी टँकर्सद्वारे पाणी पुरविण्यात येत आहे. पूरग्रस्त ७४६ गावांमध्ये पाणीपुरवठा योजनांचे नुकसान झाले आहे.

साथ रोग पसरू नये म्हणून काळजी

आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले की, पूरग्रस्त ४९६ गावांमध्ये ४५९ वैद्यकीय पथके प्रत्यक्ष घरोघर भेटी देत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात २९३ तर रत्नागिरी जिल्ह्यात ६ मदत छावण्या उघडण्यात आल्या आहेत. ही पथके पाणी शुद्धीकरणासाठी क्लोरीनच्या गोळ्यांचे वाटप, किटकनाशक औषधांची फवारणी करत आहेत. याशिवाय सर्पदंशावरील लशीची पुरेशी उपलब्धता आहे. गरोदर माता आणि लहान मुलांकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. लेप्टास्पायरोसीस टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक औषधे देणे सुरु केले आहे. याशिवाय गंभीर रुग्णांना पुरेश्या रुग्णवाहिकांची सोय करण्यात आली आहे.

नुकसान भरपाई, मदतीचे प्रस्ताव तयार करा

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, नुकसानीबाबतची आकडेवारी आणि करावयाची मदतीबाबत तपशीलवार वस्तूनिष्ठ अहवाल तयार करा, जेणेकरून आपदग्रस्तांना वेळेत आणि तातडीने मदत पोहचविता येईल. पूराचा फटका बसलेल्या सर्वच व्यापारी, व्यावसायीकांची माहिती एकत्र करा, त्यांना राज्य आणि केंद्राच्या कोण-कोणत्या योजनांमधून सवलत देता येईल, मदत करता येईल त्याबाबतचे प्रस्ताव तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. तत्काळ मदत देऊच, पुन्हा पुन्हा ही आपत्ती येऊ नये. त्यातून बचाव करता येईल यासाठी पूरसंरक्षक भिंती, धोकादायक वस्त्यांयाबाबत जिल्हा निहाय प्रस्ताव तयार करा. डोंगराळ भागातील खचणारे रस्ते, पायाभूत सुविधांबाबतही एक सर्वंकष आराखडा तयार करा, असेही त्यांनी सांगितले. पंचनामे करण्यासाठी ड्रोन तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. तसेच हे पंचनामे वेळेत पूर्ण करावेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कोकणात पुराचा इशारा देणारी यंत्रणा तीन महिन्यात

कोकणामधील एकंदर २६ नद्यांची खोरे असून, याठिकाणी पूराबाबत इशारा देणारी ‘आरटीडीएस’ यंत्रणा लवकरात लवकर कार्यान्वीत करा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यानुसार जलसंपदा विभागाकडून पहिल्या टप्प्यात सात नद्यांवर येत्या तीन महिन्यात अशी यंत्रणा कार्यान्वीत करण्यात येणार आहे.

एसडीआरएफचे बळकटीकरण करणार

एनडीआरएफच्या धर्तीवर राज्यात प्रत्येक जिल्ह्यात एसडीआरएफचे केंद्र असावे. तसेच त्याठिकाणी जवांनांना मदत व बचावाचे प्रशिक्षण द्यावे यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी मदत व पुनर्वसन विभागाला दिले.

दरडग्रस्त गावांचे पुनर्वसन

महाड येथील तळीये गावांचे पुनर्वसन करण्यासाठी योग्य जागा निश्चित करा. तेथील सोयी-सुविधांसाठी नियोजन करा, उद्योजकांची देखील मदत घ्या. गावकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी अडचण येणार नाही असे बघा, तसेच त्यांच्या घरांचा आराखडा लगेच तयार करून कार्यवाही करा. अशा प्रकारे डोंगर उतारांवरील वाड्या आणि वस्त्यां ग्रामीण भागात तसेच शहरी भागात देखील आहेत. धोकादायक स्थितीतील या वाड्या-वस्त्यांचे कशापद्धतीने पुनर्वसन करता येईल, यावर निश्चित असा आऱाखडा तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.