Page

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सर्वसामान्यांचे कैवारी होते- प्रा. डॉ. करमसिंग राजपूत

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य नाचण्यासाठी नाही तर वाचण्यासाठी आहे. त्यांचे सर्वसमावेश कार्य इतके मोठे आहे की, ते खऱ्या अर्थाने विश्व रत्न आहेत. बाबासाहेबांना दलितांचे कैवारी म्हटल्या जाते. पण त्यांच्या कृतीतून त्यांनी त्यांच्या कार्यकाळात दलितांपेक्षा इतर समाजातील गोरगरीब पुरुष व महिलांचा जास्त विचार करून काम केले आहे. त्यामुळे ते सर्वसामान्यांचे कैवारी होते असे प्रतिपादन येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयातील अर्थशास्त्राचे अभ्यासक प्रा. डॉ. करमसिंग राजपूत यांनी केले. 
       
संस्कार भारती, जैताई मंदिर आणि सागर झेप बहुउद्देशीय संस्था, वणी यांच्या संयुक्त विद्यमाने द्वारे आयोजित भारत माता पूजा उत्सवात युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयावर जैताई मंदिरात ते दिनांक 25 फेब्रुवारीला आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जैताई मंदिराचे अध्यक्ष माधवराव सरपटवार हे होते. अतिथी म्हणून संस्कार भारतीच्या संध्या अवताडे या उपस्थित होत्या. 
     
आपला विषय मांडताना डॉ. राजपूत म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर बाबासाहेबांनी देशाची घटना तयार करतांना अनुसूचित जातीच्या कलमाआधी इतर मागासवर्गीय समाजासाठीच्या कलमांचा अंतर्भाव केला. सरकार मध्ये मिळालेल्या अधिकाराचा उपयोग करून शेतकरी, नोकरदार, महिला, कामगार यांच्यासाठी भविष्याचा विचार करून निर्णय घेतले, कायदे केले. हिंदू कोड बिल व ओबीसी आयोगासाठी तत्कालीन सरकारने केलेल्या चालढकलीचे विरोधात मंत्रिमंडळाचा राजीनामा देणारे बाबासाहेब हे दूरदृष्टीचे युगपुरुष होते. 
       
या प्रसंगी आयोजक संस्थेकडून भावी पिढीचे भविष्य या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत प्रथम क्रमांक तेजस्विनी गव्हाणे, द्वितीय कांचन गुरनुले, तृतीय तर्फीया अन्सार शेख, व चतुर्थ क्रमांक झिनथ अन्सार शेख यांनी मिळविला होता. त्यांच्यासह इतर 6 स्पर्धकाना प्रोत्साहन बक्षिसे देण्यात आली. व यातील पहिल्या दोन क्रमांकाच्या स्पर्धकांना पुन्हा या मंचावरून भाषण देण्याची संधी देण्यात आली. 
      
अध्यक्षीय भाषण करताना माधव सरपटवार युगपुरुष डॉ. आंबेडकर यांच्या कार्याची महती विषद केली. कार्यक्रमाचा आरंभ सुप्रिया केदारने सादर केलेल्या खरा तो एकची धर्म या साने गुरुजींच्या गीताने सुरु करण्यात आला. प्रास्ताविक प्रवीण सातपुते यांनी केले. सूत्रसंचालन सुप्रिया केदार यांनी तर पाहुण्यांचा परिचय व आभार कार्यक्रमाचे आयोजक सागर मुने यांनी मानले. 

कार्यक्रमाची सांगता विजय गंधेवार प्रस्तुत महाराष्ट्र गीताने करण्यात आली. बंधू भगिनींची उपस्थिती विशेष उल्लेखनीय होती. राजू खुसपुरे, उम्हाकांत म्हसे, पंढरीनाथ सोनटक्के, अर्पित मोहुर्ले, संस्कार भारती समिती अध्यक्ष रजनी पोयाम, राजू तुराणकर, मनोज उरकुडे, बाळू हेडाऊ, प्रज्वल ठेंगणे, उमेश पोद्दार, शेखर वांढरे, घनश्याम आवारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

वणी तालुका अध्यक्षपदी हरीष पाते यांची निवड

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : भीम आर्मी संघटनेच्या वणी तालुका अध्यक्षपदी माजी अध्यक्ष हरीष पाते यांची निवड करण्यात आली आहे. सर्वसामान्य, शेतकरी, मजूर, विद्यार्थ्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराचे विरोधात राष्ट्रीय आझाद समाज पार्टीच्या वतीने वरीष्ठ पातळीवरुन न्याय मिळवून देणारी भीम आर्मी संघटनेची चळवळ उभी करण्यात आली आहे. या चळवळीची शाखा तालुका पातळीवरुन कार्यान्वीत करण्यासाठी वणी तालुका राष्ट्रीय आझाद समाज पार्टीच्या भीम आर्मी संघटनेची कार्यकारणी गठीत करण्यात आली असुन वणी तालुका अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते हरीश पाते यांची निवड करण्यात आली आहे. भीम आर्मीचे वणी विधानसभा अध्यक्ष श्री. रवींद्र मेश्राम यांनी निवडीचे पत्र नवनिर्वाचीत अध्यक्ष हरीष पाते यांचेकडे सुपूर्द करुन पुढील शाखा विस्तारीत करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 
"भीम आर्मीच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी करण्याचा माझा निर्धार आहे. बहुजन समाजातील लोकांमध्ये विश्वास निर्माण करून संघटनेला अधिक बळकट करणे हे माझे मुख्य उद्दिष्ट असेल." असे हरीश पाते यांनी सांगितले.


अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीला अटक

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : शहरात वास्तव्य करणाऱ्या एका 31 वर्षीय युवकाने, अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमीष दाखवुन अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून,प्रकरणी विविध कलमान्वये मारेगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे नोंद करण्यात आले आहे. प्रकाश उर्फ बाबा खंगार (31) मारेगाव वार्ड क्रमांक 7 असे गुन्हे दाखल झालेल्या संशयीताचे नाव आहे.
फिर्यादिने घटनेची तक्रार 21 फेब्रुवारी 2025 ला मारेगाव पोलीस स्टेशन मध्ये केली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मारेगाव पोलीसांनी तपास चक्रे जलद गतीने फिरविली असुन आरोपीला आज 26 फेब्रुवारी 2025 ला अटक करण्यात आली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किन्द्रे यांचे मार्गदर्शनाखाली आनंद आचलेवार यांनी पोस्टे. अप क्र. 24/2025 कलम 137 (2) अन्वये गुन्हे नोंद केले होते. मात्र पिडीता अनुसुचित जमाती मध्ये येत असल्याने अनुसुचित जात, जमाती प्रतीबंधक कायद्यान्वये गुन्ह्यात आणखी वाढ करण्यात आलीआहे. संशयीता विरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये अनुसुचीत जात जमात प्रतीबंधक कायद्यान्वये वाढ करण्यात आली असुन पिडीताचा सविस्तर जबाब नोंदवुन गुन्ह्याचे कागदपत्रात समाविष्ठ करण्यात आला आहे. 
सदर गुन्ह्यामध्ये अनुसुचित जात, जमात प्रतिबंधक कायद्या चे कलमांचा समावेश असल्याने सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किन्द्रे यांचे मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

सावर्ला येथील घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून देण्यात यावी- प्रवीण खानझोडे

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : तालुक्यातील सार्वला येथील घरकुल लाभार्थ्यांना नोव्हेंबर २०२४ मधे महाराष्ट्र शासनाच्या वतीने वणी पंचायत समितीच्या माध्यमातून घरकुल मंजूर होऊन त्याचा पंधरा हजार रुपयाचा पहिला हफ्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाला व त्यानुसार त्यांनी राहते घर उकलून घरकुल बांधायच असल्याने तात्पुरती राहायची व्यवस्था केली.

मात्र, फक्त रेतीअभावी घरकुल लाभार्थी आज उघद्यावर आले आहे. त्यामुले तहसीलदार वणी यांना सार्वला येथील घरकुल लाभार्थी ने रेती उपलब्ध करून देन्याची मागनी प्रवीण खानझोडे लढा संघटना चे संयोजक वणी यावेळी सार्वला येथील गावातील लाभार्थी पांडुरंग आवगाण, श्रीराम चिव्हाने, कर्नू नैताम, शंकर बावणे, विकास चौधरी, जंगलू नैताम, सुनीता ठमके, संतोष मडावी संजीवनी मुन, प्रताप मुन, उपस्थित होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुरेश शेंडे, अजय धोबे, आशिष रिंगोले, विकेश पानघाटे, आदी उपस्थित होते.

वणी ते नांदेपेरा रोडची तत्काळ दुरुस्ती करा, मनसेचा आंदोलनाचा इशारा

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : वणी (साई मंदिर) ते नांदेपेरा (नांदेपेरा) चौफुली रस्त्याची पूर्णतः चाळण झालेली असून यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून धुळीचे मोठ्या प्रमाणात साम्राज्य झाले आहे. याचा मानसिक आणि शारीरिक त्रास प्रवाशांना होत असल्याने या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली. 

वणी नांदेपेरा रोडने अनेक खेड्यांचा संपर्क आहे . याच मार्गावर अनेक प्राथमिक शाळा, महाविद्यालये, कंपनी, व्यायामशाळा, शेती व अनेक उद्योग आहेत. दिवसाकाठी शेकडो विद्यार्थ्यांची ये – जा असते. तर अनेक वृद्ध व युवा या रस्त्यावर शतपावली – फिरण्यासाठी जात असतात. या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक लहान सहान अपघात होत आहे. तर उडणाऱ्या धुळीमुळे प्रवाशांना व परिसरातील रहिवाशांना श्वसनाचे आजार होत आहे. त्यामुळे ह्या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करणे महत्वाचे आहे. त्यामुळे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता केतन परतानी यांना निवेदन देऊन येत्या ८ दिवसात या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपणा ‘मनसे स्टाईल’ आंदोलन करणार असल्याचा इशारा सदर निवेदनातून देण्यात आला. तर या निवेदनाच्या प्रती कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पांढरकवडा व पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन, वणी यांना देण्यात आली. यावेळी मयूर गेडाम, अंकुश बोढे, हिरा गोहोकार, प्रदिप बदखल, विजय चोखारे, प्रवीण कळसकर, सागर लखपती, संदीप बदखल, राहुल देवनपल्लीवार आदी उपस्थित होते.

विद्यार्थी होणार संगणक साक्षर...

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : कानडा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतच्या वतीने संगणक संच भेट दिल्याने या शाळेतील विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञानाचे धडे गिरविण्यातील अडचण दूर झाली आहे. 

शाळेतील विद्यार्थ्यांची संगणक शिकण्याची इच्छा लक्षात घेवून येथील सरपंच सौ सुषमा रुपेश ढोके यांनी ग्रामपंचायतच्यावतीने शाळेला संगणक संच मिळवण्यासाठी पुढाकार घेतला. शाळेत उपलब्ध झालेला संगणक हाताळायला मिळताच विद्यार्थ्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.

प्रसंगी शाळेचे शिक्षक श्री निते सर विद्यार्थ्यांचे पालक संतोष बावने, विनोद डाहूले, गावातील रामचंद्र येवले, अशोक चिडे, रूपेश ढोके, ग्रामपंचायत कर्मचारी सचिन पानघाटे व विद्यार्थी उपस्थित होते.

रिलस्टार होण्यापेक्षा रिअलस्टार व्हा- प्रतिक्षा गुरनुले

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगांव : सध्या परिस्थितीत ऐकीव इतिहासाच भांडवल करित महापुरुषांच्या शौर्याचा इतिहास पुसण्याचे काम करुन काही बाजारबूनगे तथाकथित इतिहासकार समाजात दुरी निर्माण करण्याच काम सुरु करीत आहेत.समस्त तरुणाईचे आयकॉन छत्रपती शिवाजी असताना त्यांची धोरणे , त्यांच्या निती त्यांचे कार्य अंगीकारून जीवन जगण्यासाठी उपयोगी होते.मात्र तरुनाई आज वाम मार्गाला जाऊन आपले कॅरीयर बरबाद करून धोके पत्करून घेत आहे.युवकांनी रिलस्टार होण्यापेक्षा शिक्षण उद्योगाचा मार्ग अवलंबून रिअरस्टार होण्याचा सल्ला मराठा सेवा संघ आयोजीत छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सवात महाराष्ट्रातील परखड वक्त्या प्रतिक्षा गुरनुले यांनी मारेगांव येथे प्रतिपादन केले.
    
मराठा सेवा संघ आयोजीत छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्य मारेगांव येथील नगरपंचायत प्रांगणात झालेल्या अभिवादन सभेत कार्यक्रमाचे अध्यक्ष मंगेश गवळी होते तर प्रमुख अतिथी तहसिलदार उत्तम निलावाड, पोलीस निरिक्षक संजय साळूंखे, नगरपंचायत मारेगांवचे मुख्याधिकारी शशिकांत बाबर, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भिमराव व्हनखंडे, तालुका कृषी अधिकारी दिपाली खवले, वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर हटकर, नगराध्यक्ष डॉ.मनिष मस्की, विस्तार अधिकारी प्रदिप रामटेके विचारपिठावर उपस्थित होते, जिजाऊ वंदनेने अभिवादन सभेला सुरवात झाली असून छत्रपती शिवाजी महाराज यांना सर्व प्रशासकीय अधिकारी, सामाजीक संघटनेतील प्रतिनिधी उपस्थित महिला पुरुष, विद्यार्थ्यानी अभिवादन केले. 

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मराठा सेवा संघाचे सचिव विजय घोडमारे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ नितिश राऊत यांनी केले, १९ फेब्रुवारीला सकाळ पासून सुरु झालेल्या जयंती सोहळ्याला शिवप्रेमी नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते, कार्यक्रम यशस्वीते साठी इंजि अनंत मांडवकर, अनामीक बोढे, सुधाकर इंगोले, प्रमोद लडके, प्रकाश कोल्हे, कुंदन पारखी, विलास पोटे, सुंदरलाल आत्राम, सिद्धार्थ ढवळे, भारत मत्ते, सुभाष डोंगरकर, आत्राम सर, किशोर बोढे, स्वाती बोढे, शितल पारखी, विद्या मते, विद्या मांडवकर, रंजना आत्राम, सुचित्रा गवळी, लिना पोटे, सारिका कोल्हे परिश्रम घेतले .

चोरडिया यांनी सहकुटुंब मित्र परिवारासह केले महाकुंभ मेळाव्यात पवित्र स्नान

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : येथील सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडिया यांनी आज रविवार (दि 22 फेब्रु.) लां सकाळी तिर्थराज प्रयागराज महाकुंभमेळ्याला हजेरी लावली असून यावेळी त्यांनी साप्तनिक सौ.सिमा चोरडिया, व मित्र परिवारासह महाकुंभमेळ्यात पवित्रस्नान केले.
यावेळी मा. श्री. नरेंद्रजी बरडीया, सौ. बरडीया , महाविर कटारीया व सौ. कटारीया, मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे राज्याध्यक्ष राजु धावंजेवार, पत्रकार संदिप बेसरकर, परशुराम पोटे, सामाजिक कार्यकर्ते सुरेश बन्सोड, रवी रिंगोले, चालक प्रमोद उरकुडे, सुधाकर कोडापे, फैजल शेख यांनी महाकुंभ मेळाव्याला हजेरी लावली.

महाकुंभ मध्ये रविवार ला सायंकाळ पर्यंत करोडोच्या वर लोकांनी आस्थापूर्वक डुबकी मारल्या.
त्यानंतर पुढील प्रवासासाठी अयोध्या, काशी, वृंदावन, खाटु श्याम, महाकाल उज्जन करिता रवाना झाले.