Page

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मुंबई : राज्य सरकारच्या विविध विभागातील 524 रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2024 रविवार, दिनांक 21 जुलै, 2024 रोजी घेण्यात येणार असल्याची घोषणा आयोगाकडून दिनांक 30 मे, 2024 रोजीच्या शुद्धीपत्रकानुसार करण्यात आली आहे.

शासनाकडून प्राप्त झालेल्या सूचना विचारात घेऊन अराखीव किंवा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी इतर मागास वर्गाचे जात प्रमाणपत्र प्राप्त केले असल्यास, अशा उमेदवारांना इतर मागास वर्गाचा दावा उपलब्ध करून देण्याचा तसेच सदर प्रवर्गातून नव्याने पात्र ठरलेल्या (अराखीव करीता वयापेक्षा अधिक) उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी देण्याचा निर्णय सदर शुद्धीपत्रकानुसार आयोगाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2024 दिनांक 06 जुलै, 2024 ऐवजी सुधारित दिनांकास म्हणजेच दिनांक 21 जुलै, 2024 रोजी घेण्यात येणार आहे.

आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 परीक्षेकरीता मूळ जाहिरातीस अनुसरून अर्जाद्वारे फक्त अराखीव (खुला) अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून अर्ज केलेल्या उमेदवारांना इतर मागास वर्गाचा दावा करण्याकरीता विकल्प सादर करणे तसेच अराखीव (खुला) मधील उमेदवार जे मूळ जाहिरातीकरीता वयापेक्षा अधिक ठरल्याने अर्ज सादर करू शकले नाहीत, अशा इतर मागासवर्गातील उमेदवारांकरीता अर्ज सादर करण्याचा कालावधी दिनांक 31 मे, 2024 ते दिनांक 7 जून, 2024 असा आहे. सविस्तर माहितीसाठी संबंधित उमेदवारांनी आयोगाच्या संकेतस्थळावरील उपरोक्त शुद्धीपत्रकाचे अवलोकन करावे, असे आयोगाकडून कळविण्यात येत आहे.

शासन प्रतिबंधित कपाशी बियाणे बाळगणे आले अलंगट


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : दिनांक 29/05/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक अ उपड गुन्हे उघडकीस आणने व पाहिजे फरार आरोपीतांचा शोध घेणे संबंधाने पो.स्टे. वड़की हद्दीत पेट्रोलीग करीत असतांना गोपनीय बातमीदारकडून खात्रीलायक माहिती मिळाली की, विलास नानाजी देवेवार व अविनाश संतोषराव निकम दोन्ही रा. सावित्री (पिपरी), बडकी, हे दोघेही इसम कोठारी ता. बल्लारशा जि. चंद्रपूर येथून भारत सरकारने प्रतिबंधीत केलेले अनाधिकृत कपाशी बियाने विक्री करीता ताब्यात बाळगुण ते स्वतःचे अधिक फायद्याकरीता एक सुझुकी ब्रेझा कार मध्ये वडकी येथे विक्री करीता घेवून येणार आहेत. अशी माहिती मिळाल्याने पथकाने त्याबाबत वरिष्ठाना अवगत करुन त्यांचे मार्गदर्शनानुसार कृषी विभागाचे अधिकारी व त्यांचे पथकास सोबत घेवून माहिती प्रमाणे खैरी बसस्थानक येथे सापळा लावून थांबले असतांना माहिती प्रमाणे सुझुकी ब्रेझा वाहन क्र. (एम एच 41, ई - 6196) हे खैरी बसस्थानकाकडे येतांना दिसल्याने पथकाने त्यास थांबवून वाहनातील दोन इसमांना त्यांची नावे विचारली असता त्यांनी त्यांची नावे विलास नानाजी देवेवार (40), व अविनाश संतोषराव निकम (29) दोघेही रा. सावित्री-पिपरी, असे असल्याचे सांगितलं. दरम्यान कृषी अधिकारी व पथकांनी यांनी वाहनाची झडती घेतली असता वाहनाचे मागील सिट समोरील मोकळ्या जागेत एका प्लास्टीक पोत्यात अंदाजे 33 किलो खुले कपाशी बियाने किमंत अंदाजे 1,05,000/- रु.चे आढळून आल्याने त्यांना सदरचे बियाने कोठून आणले याबाबत विचारपुस केली असता त्यांनी ते बियाने सागर अरुण पारलेवार रा. कोठारी ता. बल्लारशा जि. चंद्रपुर यांचेकडून विक्री करीता आणले असल्याचे सांगितले आहे. नमुद इसमांकडे अनाधिकृत कपाशी बियाने विक्री करीता बाळगून असलेले मिळून आल्याने सदरचे बियाने व नमुद इसमांचे ताब्यात असलेले वाहन तसेच त्याचे कडील मोबाईल फोन असा एकूण 8,15,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन पो.स्टे. वणी येथे तिनही इसमाविरुध्द कारवाई नोंद केली. तसेच दिनांक 27/05/2024 रोजी पो.स्टे. शिरपुर हद्दीतील कृषी विभागाचे अधिकारी यांना सोबत घेवून केलेल्या कारवाई मध्ये आरोपी अमोल विजय चिकनकर (33), रा. वार्ड नं.02 भालर, (ता. वणी) ह.मू. पिपरी-कापर (ता. वणी) याचे कब्जातून बलवान रिसर्च हायब्रीड कॉटन सिड 5 जी या अनाधिकृत कपाशी बियांनाचे 15 पाकीटे किमंत 18,000/- रुपये किंमतीचे जप्त करून पो स्टे. शिरपुर येथे त्याचे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कारवाई ही जिल्हा पोलीस अधीक्षक, यवतमाळ डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक, पियुष जगताप, आधारसिंग सोनोने, पोलीस निरीक्षक, स्थागुशा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात सपोनि अमोल मुडे, पोउपनि रामेश्वर कांडुरे, पोलीस अंमलदार योगेश उगवार, सुधिर पांडे, सुनिल खंडागळे, निलेश निमकर, सुधिर पिदुरकर, रजनिकांत मडावी सर्व स्थागुशा यवतमाळ तसेच राजे माळोदे, अमोल जोशी, प्रविण जाधव, कल्याण पाटील व सर्व कृषी विभाग यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

मारेगाव तालुक्यात विजेचा लपंडाव नित्याचाच !


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यात असा एकही दिवस नसेल ज्या दिवशी विजेचा लपंडाव झाला नाही. शहरासह ग्रामीण भागात विजेची समस्या सतत उद्भवत असते. तूर्तास विजेचा वारंवार होणारा लपंडाव व खंडीत वीज,अंखंडित वीज पुरवठा ठेवण्यात यावी अशा आशयचे निवेदन उपाभियंता कार्यालय मारेगाव यांना देण्यात आले. 

आकापूर, नेत, गौराळा, वरुड, चिंचाळा या भागात अधूनमधून लपंडाव सुरूच असतो. वीज विभाग आणि अधिकारी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. परंतु गेल्या काही दिवसापासून विजेचा लपंडाव व खंडीत होणे याला यश आले आहे. त्यामुळे यावर्षी चा उन्हाळा पाहता,जीवाची लाही लाही होत आहे. त्यातच लाईन मात्र दिवसातुन 50-60 वेळा बंद चालू असते. तसेच वीज बिलात मोठी रक्कम आवाजवी वाढ येत आहे. 

अनेकदा वारंवार फोनव्दारे संपर्क करुन याबाबत अवगत करून सुद्धा वीजपुरवठा खंडित होण्याचाही प्रकार सुरू असतो. त्यावर कायमस्वरूपी उपाय योजना करावी अन्यथा मारेगाव वीज कंपनी चच्या विरोधात धडक मोर्चा काढण्यात येइल किंवा उपोषण करू, त्वापासुन होणाऱ्या परीणामास आपण स्वतः जबाबदार राहाल असा ईशाराही दिला.

बुधवारी (ता.29) मे रोजी दिलेल्या निवेदनावर मयुरी चंद्रकांत धोबे (गौराळा सरपंच), संदीप कारेकार (नेत सहपंच), गोवर्धन तोडासे (चिंचाळा सरपंच), अनुल गानफाडे (गौराळा उपसरपंच), सरपंच शशीकांत नावडे (चिंचाळा उपसरपंच), देवीदास भट (वरुड संरपंच) मनोज झट्टे,अनिकेत कारेकर,शुभम उपरे, आकाश जांभुळकर, प्रशांत धोबे,सागर राऊत,मयूर मरस्कोल्हे, अनिल कारेकर, विनोद कारेकर यांच्या सह्या आहेत.



शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी संजय खाडे यांचे निवेदन


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : पीकविमा तसेच बी-बियाणे व खतांच्या किंमतीबाबत कापूस पणन महासंघाचे संचालक व काँग्रेस नेते संजय खाडे यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले. यील्डबेस पीकविम्यापासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यात तात्काळ रक्कम जमा करावी व बि-बियाणे, खतांच्या वाढलेल्या किंमती कमी करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. 

सन 2022-23 या शेतीच्या हंगामाचा यील्डबेस पीकविमा सरसकट मंजूर झाला आहे. मात्र काही शेतकरी अद्याप लाभापासून वंचित आहे. तसेच सन 2023-24 या हंगामात तालुक्यातील अनेक शेतक-यांना पीकविम्याची रक्कम अद्याप मिळालेली नाही. शिवाय ज्या शेतक-यांना पीकविम्याची रक्कम मिळाली आहे ती अत्यल्प आहे. त्यामुळे पीकविम्याची रक्कम तात्काळ जमा करावी. तसेच किती शेतकरी अद्याप लाभापासून वंचित आहे. किती शेतकरी प्रोसेसमध्ये आहे. याची यादी जाहीर करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. 


निवेदन देते वेळी प्रमोद वासेकर, पुरुषोत्तम आवारी, राजाभाऊ पाथ्रडकर, विवेक मांडवकर, तेजराज बोढे, संदीप ढेंगळे, अक्षय कुचनकर, प्रशांत जुमनाके, आकाश टेकाम, उमेश कोसारकर, सिताराम झाडे, वेदांत चाफले, विजय ढेंगळे, अरुण नागपुरे, प्रतिक गेडाम, अनुराग गायकवाड, अनिकेत गंधारे, कैलास पचारे, भारत डंभारे, मनोज भगत, भास्कर वासेकर, यादव आसुटकर, विकेश पानघाटे, ईश्वर खाडे, अशोक पांडे, अरुण चटप, काजल शेख, करण आसुटकर, गणपत कोसारकर, शालिक काथवटे यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते.

बी-बियाणे व खतांच्या किमती कमी करा
अवघ्या काही दिवसात शेतीचा नवीन हंगाम सुरु होणार आहे. मात्र सध्या बी-बियाणे व खतांच्या किमती वाढलेल्या आहेत. गेल्या हंगामात सातत्याने ओला व कोरडा दुष्काळ, गारपीट याचा उत्पादनावर परिणाम झाला. तसेच गेल्या हंगामात शेतमालाला अत्यल्प दर मिळाला. त्यामुळे बी-बियाणे व खतांच्या किमती कमी करा, अशी मागणी संजय खाडे यांनी केली आहे. 

तहसीलदारांनी अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक पकडला

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : अवैध वाळू वाहतुकीच्या विरोधात मारेगाव तहसीलदार उत्तम निलावाड यांनी धडक कारवाई सुरू केली आहे. आज बुधवारी 2.45 पहाटेच्या सुमारास तहसीलदारांनी आपल्या टीमला घेऊन मार्डी फाट्यावर एका ट्रक वर कारवाई केली. 

तालुक्यातील सावंगी, कोसारा घाटातून अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी होत होत्या. त्यामुळे महसूल पथक होणाऱ्या अवैध वाळू वाहतुकीवर नजर ठेऊन होते. आज दिनांक 29/5/2024, बुधवार रोजी पहाटे 2.45 वाजता मार्डी चौफुली, आदर्श शाळेजवळ अवैध उत्खनन करून वाळू वाहतूक करीत असताना एक ट्रक पकडण्यात आला आहे. 

ही कारवाई तहसीलदार उत्तम निलावाड यांच्या उपस्थितीत,मंडळ अधिकारी अमोल गुघाने, तलाठी सनी कुळमेथे, विवेश सोयाम व वाहन चालक विजय किनाके यांनी केली. ह्या धडक कारवाईने अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनचालकात चांगलीच दहशत पसरली आहे. 


लिपीक हबीब शेख यांचे अल्पशा आजाराने निधन


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : येथील नगर पंचायतचे वरिष्ठ लिपीक शेख हबीब शेख लाल यांचे आज दि.28 मे रोजी साय.6 वा. अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते 44 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी व 2 मुली असा आप्तपरिवार आहे.

हबीब मागील 2 महिन्यापासून कावीळ आजाराने ग्रस्त होते. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना सेवाग्राम (जि. वर्धा) येथे दाखल करण्यात आले. येथे चार दिवसापासून उपचार घेत होते. परंतु प्रकृतीत सुधारणा जाणवत नसल्याने त्यांना पुढील उपचारार्थ नागपूर येथे हलवीत असताना शेख हबीब यांनी अखेर चा श्वास घेतला.

      

विवो कंपनीचा सापडलेला मोबाईल केला परत

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : अनेकदा फोन हरविण्याच्या घटना घडत असतात, मग कुठे रस्त्यात, बसमध्ये, अगदी कुठेही. मात्र अनेकदा हे मोबाईल सापडत नाहीत. पण काहीवेळा माणुसकीमुळे अनेकजन मोबाईल परत करतात. आज प्रत्येकाजवळ अँड्रॉइड मोबाईल आहे, मात्र मोबाईल फोन एकदा हरवला की परत मिळणे कठीण होऊन बसते. तर काहीवेळा अनेक माणसे स्वतःहून मोबाईल फोन परत करत असतात.
तसाच काहीसा प्रकार वनोजा देवी परिसरात पहायला मिळाला. काल दिवसा (ता.27) मे ला प्रशांत भंडारी उपसरपंच वनोजा देवी येथील रहिवासी हे नेहमीप्रमाणे शेत शिवारात जात असतांना त्यांना विवो (vivo) कंपनीचा मोबाईल सापडला. त्यांनी बराच वेळ तेथील परिसरात कोणी मोबाईल संबंधित चौकशी करेल याची वाट बघितली, पण कोणीही आले नाही. 
एखाद्या व्यक्तीला स्क्रीन टच मोबाईल सापडला तर तो खूप खुश होतो. परंतु त्यांनी मोबाईल सापडल्यानंतर, हा मोबाईल कोणाचा हरवला असेल, तो व्यक्ती किती काळजीत असेल असा विचार करत आज सकाळी प्रशांत भंडारी यांनी सापडलेला मोबाईलच्या मूळ मालकापर्यंत पोहचवण्यासाठी गावात लाऊडस्पीकरने दिवंडी मारून चौकशी केली असता मोबाईल हा गावातीलच रोशन आस्वले यांचा असल्याचे समजले. यावेळी प्रशांत भंडारी यांनी आज दि. 28 मे ला संबंधित मोबाईलच्या मूळ मालकाच्या वडिलांना हरवलेला मोबाईल परत दिला. यावेळी विठ्ठल आस्वले यांनी मोबाईल परत केल्यानंतर त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. 
प्रशांत भंडारी यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे कौतुक केले. असा प्रामाणिकपणा आजकाल क्वचितच पाहावयास मिळत आहे. परिसरात सर्वत्र त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सावंगी घाटातून माती मिश्रित वाळू पुरवठा होत असल्याची ओरड


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : तालुक्याच्या शेवटच्या टोकाला वर्धा नदी वाहते. या वर्धा नदी पात्रातून मागील काही महिन्यापासून बुकिंग वाळू थेट लाभार्थी व अन्य बांधकामला वाळू चा पुरवठा केल्या जात असताना मात्र, चांगल्या प्रतीची वाळू जिल्ह्यात आणि माती मिश्रित वाळू तालुक्यातील लाभार्थीना पुरवल्या जात आहे. व जादा पैसे मोजणाऱ्याना दर्जेदार वाळू मिळत असल्याचे तक्रारी माध्यमाकडे बोलून दाखवल्या जात आहे. त्यामुळे अनेकांनी सावंगी घाटाकडे पाठ फिरवली असून याकडे संबंधित विभागाने लक्ष द्यावे अशी आर्तहाक मागणी आहे. 

मारेगाव तालुक्यात पांढऱ्या सोन्याला भाव नसेल, तेवढे भाव या काळ्या मातीच्या (वाळू) सोन्याला आले आहे. कधी काळी ढुंकूनही न पाहणाऱ्या वाळू ही आता कमाईच साधन म्हणून बनली आहे. ज्याचं त्यांचं लक्ष फक्त वाळू तस्करी कडेच असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेती मशागतीकरिता निर्माण करण्यात आलेले ट्रॅक्टर हे वाळू तस्करीकरिता सर्रास वापरले जात असल्याचे दिसून येत आहे. महसूल विभागाकडून आतापर्यंत अनेक कारवाया ह्या ट्रॅक्टर व अन्य वाहनावर झाल्याचे वृत्त समोर आले आहे. परंतु वाळू ची क्वालिटी कशी असली पाहिजे किंवा वाळूचा दर्जा हा उत्तम असावा म्हणून संबंधित विभागाने साधी तपासून तसदी केली नसावी,असे कधी वाचण्यात ऐकण्यात गेलेले नाही. त्यामुळे अनेक वर्षांपासून आपल्या हक्काचं घर म्हणून स्वप्न रंगवलेल्याना त्यांच्या घराचे बांधकाम हे माती मिश्रित वाळू ने बांधावे लागत असेल यासारखे दुर्दैव नाही. याकडे संबंधित विभागाने जातीने लक्ष दिले पाहिजेत असे लाभार्थ्यातून बोलले जात आहे. 

मोठा गाजावाजा करून शासनाने वाळू चे नवीन धोरण आणले. गरिबांना मोफत वाळू मिळेल म्हणून नियम लादले. परंतु नियमांना धुऱ्यावर टांगत सावंगी घाटातून आजतागायत ना क्वालिटीची वाळू मिळत,ना अशीही वाळू मिळत. मिळतात फक्त वाळू धनदांडग्याना, अशी लाभार्थ्यातून ओरड आहे. पावसाळा अगदी तोंडावर आला, कित्येकांचे घर मोडून खाली जागेवर संसार मांडून दिवस काढणे सुरू आहे. वाळू पटकन मिळेल आणि घर बांधू म्हणून चांगल्या प्रतीची वाळू मिळावी या प्रतीक्षेतच लाभार्थ्यांचे दिवस असेव जात असल्याने घराचे बांधकाम पूर्ण होईल कि नाही, उच्च प्रतीची वाळू मिळेल कधी? अशी चिंता लाभार्थ्यांना सतावत आहे. परिणामी प्रशासनाने या वाळू च्या गोरखधंद्याची चौकशी करून प्रथम लाभार्थ्यांना नियम शर्ती अटी बाजूला ठेऊन सावंगी डेपोतून उच्च प्रतीची वाळू उपलब्ध करून द्यावी अशी मागणी जोर धरत आहे.

आई-वडिलांच्या कष्टाचं चीज; ‘तिने’ दहावीत मिळवले घवघवीत यश

सह्याद्री चौफेर | लखन लोंढे 

महागांव : आई-वडील हे मुलांच्या शिक्षणासाठी खूप कष्ट घेतात. मात्र, त्यांच्या या कष्टाचे चीज मुलांनी केल्यानंतर याचे समाधान त्यांच्यासाठी मोलाचे असते. याचप्रकारे दहावीच्या परिक्षेत ८५.८० टक्के गुण मिळवणाऱ्या सलोनी इंदल चव्हाण या विद्यार्थिनीने आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचे चीज केले आहे. आपल्या या यशाचे श्रेय तिने केवळ आई-वडिलांना दिले आहे. 

सलोनीचे वडील इंदल चव्हाण व आई पुष्पा चव्हाण हे दांपत्य रोज मजुरी करतात व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, उरलेल्या पैशात प्रपंच आणि मुलीचं शिक्षण सलोनी ही श्री साईबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, टेंभी इयत्ता दहावीत शिक्षण घेत होती. दहावीत ८५.८० टक्के गुण मिळवत तिने आई-वडिलांची मान गर्वाने उंच केली आहे. ती अत्यंत गरिबी परिस्थिती वाढलेली. मात्र, कधीच कुठल्या गोष्टीसाठी तिने हट्ट केला नाही, अगदी पुस्तकांसाठी देखील. आई-वडील जेवढं देतील तेवढ्यातच तिने आनंद मानला. हे घवघवीत यश मिळवताना तिनेही स्वतः मोठे कष्ट घेतले. विशेष म्हणजे ट्युशन लावण्याची परिस्थिती नसल्यामुळे ती स्वतः घरी सकाळी सहा वाजल्यापासून तिचा अभ्यास सुरु व्हायचा त्यानंतर शाळा आणि पुन्हा सायंकाळी ६ वाजल्यापासून रात्री ११ वाजेपर्यंत अभ्यास असा तिचा दिनक्रम होता.

आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचे भान ठेवत सलोनीने दिवस रात्र अभ्यास करीत दहावीत चांगले गुण मिळवले. सलोनीला भविष्यात उच्च शिक्षण घेऊन डॉक्टर बनायचं आहे. समाजसेवेचीही तिला आवड असून याद्वारे वृद्ध, दिव्यांग आणि गरीबांसाठी काम करण्याची इच्छा तिने आमच्या प्रतिनिधी जवळ बोलून दाखवली आहे.

कठीण प्रसंगातून संघर्ष करत दहावीच्या परीक्षेत मिळवले यश

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : 10 वर्षांचा असतांना वडिलांनी दुसरी पत्नी केली, त्यात घरची परिस्थिती हलाखीची, मायमाउलीने मोलमजुरी करून मुलाच्या शिक्षणात खंड न पडावं म्हणून आश्रम शाळेत टाकले. 8 वीपासून शिक्षण घेत-घेत 10 व्या वर्गात गेला. शेवटी त्याचे फळ मिळाले. ही कोणत्या चित्रपटाची कथा नाही तर ही खऱ्या संघर्षाची कहाणी आहे.
मारेगाव तालुक्यातील कानडा येथे राहणाऱ्या अनिकेत हनुमान कोवे ह्या विद्यार्थ्यांने परिस्थितीवर मात करत यश संपादन केलं आहे. अनिकेत नुकताच दहावीत पास झाला. त्याने या परीक्षेत 72 टक्के घेतले असून त्याचे विशेष कौतुक होत आहे. अनिकेत कोवे 4 थीत असतांना म्हणजे 10 व्या वर्षीच वडीलांनी पहिली पत्नी (अनिकेत ची आई) सोडून दुसऱ्या महिलेशी लग्न केले होते. म्हणून अनिकेतची अपंग आई मजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह करत होती. तर अनिकेत अभ्यासात हुशार होताच पण परिस्थितीने त्याला फार काही शिखर गाठता येत नव्हते. अपंग आईने मुलाच्या शिक्षणात खंड पडू नये, किंबहुना आपला मुलगा शिक्षणात कुठे मागे पडू नये म्हणून अनिकेत ला भद्रावती तालुक्यातील सुमठाणा येथील माध्यमिक आश्रम शाळेत टाकले. 
तिथे तो आठवी पासून शिक्षण घेत होता, अनिकेत ने दहावीची परीक्षा दिली होती. आज सोमवार (दि.27) मे ला दुपारी 1 वा. ऑनलाईन 10 वीचा निकाल जाहीर झाला. त्यात त्याने अतिशय कठीण प्रसंगातून संघर्ष करत दहावी च्या परीक्षेत 72.60 टक्के घेऊन उत्तीर्ण झाला. एवढी हलाखीची परिस्थिती असतांनाही अनिकेत हे यश संपादन केले त्या बद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शिंदोला-शिरपूर सर्कल गटाच्या वतीने शिवसेना (उबाठा) गटाचा पार पडला मेळावा


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिंदोला-शिरपूर सर्कल यांच्या संयुक्त विद्यमानाने शिंदोला येथे भव्य सत्कार सोहळा व पक्षप्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वणी विधानसभा क्षेत्रातील लोकप्रिय नेते तसेच यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक उपाध्यक्ष संजय देरकर यांच्या गेल्या 20 वर्षाच्या राजकीय कारकीर्दीची दखल घेऊन सन्माननीय पक्ष प्रमुख श्री.उद्धवसाहेब, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी संजय भाऊ देरकर यांची वणी विधानसभा प्रमुख पदी नियुक्ती केली त्याबद्दल त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. 

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिवसैनिक तथा माजी सभापती अनिल भाऊ राजूरकर हे होते तर, प्रमुख पाहुणे म्हणून शिंदोला येथील ज्येष्ठ नागरिक विठ्ठल सुरपाम श्री. संजय देठे शिवसैनिक वणी लोकेश्वर बोबडे, प्रीतम बोबडे, सौ.मंगलाताई भटवलकर सरपंच चिखली, श्री विठ्ठल बोंडे माजी सरपंच शिंदोला, श्री अनिल झाडे सोसायटी अध्यक्ष चनाखा परमडोह, श्री.मयूर बांदुरकर सोसायटी अध्यक्ष येनाडी, महादेव मसे सोसायटी अध्यक्ष कोलगाव, नथूभाऊ गौरकार सोसायटी अध्यक्ष टाकळी, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. 

या कार्यक्रमामध्ये निंबाळा, बोरगाव, ढाकोरी, बोरी, पाथरी गोवारी, परमडोह, शिंदोला, येनाडी, कोलगाव, साखरा येथील शेकडो युवकांनी संजय देरकर यांच्या कार्यावर विश्वास ठेवून शिवसेना (उबाठा) मध्ये जाहीर प्रवेश केला व पक्षासाठी तन-मन-धनाने काम करेल व वणी विधानसभेवर भगवा फडकवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, असे युवकांनी सांगितले. 

कार्यक्रमांमध्ये विचार व्यक्त करताना संजय देरकर यांनी देशाची व महाराष्ट्राची परिस्थिती पाहता फक्त एकमेव पक्षप्रमुख उद्धव साहेब, बाळासाहेब ठाकरे हेच एकमेव व्यक्तिमत्व देशाला व महाराष्ट्राला ह्या वाईट परिस्थितीमधून म्हणून बाहेर काढू शकते. त्याकरिता वणी विधानसभा क्षेत्रातील सर्व युवकांनी पक्षांमध्ये प्रवेश करावा आणि पक्षप्रमुख श्री.उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांचे हात मजबूत करावे. शिवसेना (ऊबाठा) च्या माध्यमातून वणी विधानसभा क्षेत्रातील सर्व युवक-युवती शेतकरी, शेतमजूर विद्यार्थी, विद्यार्थिनी यांच्या समस्या प्रामुख्याने सोडवल्या जाईल असे, आश्वासन विधानसभा प्रमुख यांनी मनोगत व्यक्त करताना दिले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल राजुरकर यांनी सुद्धा कार्यक्रमात बोलताना कुठलाही मतभेद न ठेवता शिवसेना पक्षाकरिता एक मताने आणि खांद्याला खांदा लावून आपण सर्व शिवसैनिक म्हणून काम करू असे सांगितले. या कार्यक्रमाला शिंदोला,शिरपूर सर्कल मधील असंख्य शिवसैनिक उपस्थित होते. कार्यक्रमामुळे शिवसैनिकांमध्ये एक नवसंजीवनी निर्माण झाली आहे असे, उपस्थित शिवसैनिकांचे मत होते. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.राजेंद्र इददे यांनी केले तर, आभार प्रदर्शन व प्रास्ताविक श्री लोकेश्वर बोबडे यांनी केले.  सत्कार सोहळा व पक्षप्रवेश कार्यक्रम अतिशय आनंदात व उत्साहात पार पडला हे विशेष...!

नवयुवकाचा पाण्यात बुडून मृत्यू


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : चंद्रपूर जिल्ह्यातील तालुका वरोरा येथील एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज रविवारला दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली. 
याबाबत माहिती अशी, वरोरा, जि. चंद्रपूर येथील मानव अविनाश राऊत (वय 15) हे दि. 26 मे रोजी मित्रां सोबत वर्धा नदीच्या पात्रातील मौजे दांडगाव (ता. मारेगाव जि. यवतमाळ) च्या बाजूने पोहण्यासाठी गेला असता पाण्यामध्ये बुडून मृत्यू पावला आहे. ही घटना अंदाजे दोन वाजण्याच्या सुमारास घडली. 
वृत्तलिहेपर्यंत बुडालेल्या मुलाची बॉडी थोडयाच वेळापूर्वी सापडली असून ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे शवविच्छेदनासाठी आणण्याची प्रक्रिया चालू असल्याचे माहिती असून पुढील तपास संबंधित विभाग करित आहे. 

हे आशीर्वाद आणि प्रेम असेच कायम आमच्या पाठीशी असु द्या -संजय खाडे

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : जनतेच्या समस्याना वाचा फोडणारी नवी चळवळ वणी विधानसभा मतदार संघात निर्माण झाली आहे. असं म्हणणं काही आता वावगं नाही. जन्मजात धाडसी वृत्ती, वादळे झेलण्याचा; अनेकदा अशी वादळे ओढवून घेण्याची बेदरकार वृत्ती आणि जनमानसाची नस ओळखण्याची कला या आधारे संजय खाडे यांना मिळालेली संधी राजकीय वर्चस्वात कशी बदलवली हे भल्या-भल्यांना कळले नाही. सध्या ते वणी विधानसभा मतदार संघात शेतकऱ्यांचा प्रश्न असो की, कामगारांच्या समस्या या जन आंदोलनाचे नेतृत्व संजयभाऊ खाडे भुषवित आहेत. 

त्यांच्या झुंजार कार्य पध्दतीमुळे मतदार संघातील कार्यकर्त्यांना बळ मिळाले असुन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पर्याय उपलब्ध झाल्याने कार्यकर्त्यामध्ये वेगळाच उत्साह दिसून येत आहे. वणी मतदार संघात श्री.खाडे, यांनी जय जगन्नाथ मल्टीस्टेट क्रेडीट को. आपरेटिव्ह सोसायटीची स्थापना करुन आर्थिक विकासाचे रोपटे वणी शहरात लावले आहे. त्याच सोबत अनेक सामाजिक कार्यात ते नेहमीच सक्रिय असतात. म्हणूनच त्यांनी केलेल्या विविध कार्याची पावती म्हणुन नुकत्याच पार पडलेल्या वसंत जिनिंग च्या निवडणुकीसह मुंबई पणन महासंघाच्या निवडणुकीत त्यांना घवघवीत यश मिळालं आहे. सरपंच पदासह ईतर संस्थाच्या कार्याचा अनुभव असल्यामुळे त्यांना मतदार संघात अनुभवी नेता म्हणुन त्यांची लोकप्रियता प्राप्त झाली आहे. नुकतेच संजयभाऊ खाडे मित्र परिवारातर्फे गुरुवारी 23 मे रोजी त्यांचा "अभिष्टचिंतन सोहळा" आयोजित करण्यात आला होता. वणी, झरी, मारेगाव, उपविभागीय क्षेत्रात आयोजित या अभिष्टचिंतन सोहळ्यात अफाट जनसमुदाय उसळला होता. 

विशेष म्हणजे, वणी विधानसभा मतदार संघातील समस्यांची जाण, संजयभाऊ खाडे यांना असल्यामुळे भविष्यात या मतदार संघात प्रतिनिधित्व करण्याची त्यांना संधी मिळेल, असा आशावाद त्यांच्या चाहत्याकडुन व्यक्त होत आहे. या जन्मदिनी अनेकाकडुन त्यांच्या कार्याचा गौरव करुन पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या. 'Thakns'आभार धन्यवाद! हे आशीर्वाद आणि प्रेम कायम आमच्या पाठीशी असु द्या असे, आवाहन देखील खाडे यांचेकरून करण्यात आलं आहे.

दहावीच्या निकालाची तारीख जाहीर, रिझल्ट कधी व कसा पाहायचा? जाणून घ्या...

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल येत्या सोमवारी ता.२७ दुपारी एक वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रकटनाद्वारे दिली आहे.

या वेबसाईटवर पाहता येणार निकाल

साईटवर कशी पाहाल मार्कशीट?
- अधिकृत वेबसाइटला mahresult.nic.in वर भेट द्या.
- मुख्यपृष्ठावर उपलब्ध महाराष्ट्र SSC Results 2024 लिंकवर क्लिक करा.
- लॉग इन तपशील भरून सबमिट वर क्लिक करा.
- एंटर क्लिक करा आणि पेज डाउनलोड करा.
- निकाल डाउनलोड केल्यानंतर प्रिंट काढा.

महाराष्ट्र बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी आवश्यक तपशील
- हॉल तिकीटवरील रोल नंबर
- आईचे नाव

ॲप किंवा digilocker.gov.in वर आपला निकाल असा पाहा..
१. सर्वप्रथम, तुमच्या मोबाईल फोनवर किंवा इतर कोणत्याही डिव्हाइसवर DigiLocker ऍप्लिकेशन उघडा.
2. आता, तुमचे युजरनेम आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा. आवश्यक असल्यास, तुमच्या प्रोफाइल पेजवर आधार क्रमांक सिंक प्रक्रिया पूर्ण करा.
3. डाव्या साइडबारवर, 'पुल पार्टनर डॉक्युमेंट्स' असे लिहिलेल्या पर्यायावर क्लिक करा.
4. ड्रॉपडाउन मेनूमधून 'महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ' निवडा.
5. तुम्हाला हवा असलेला प्रकार निवडा, जसे की SSC मार्कशीट, स्थलांतर किंवा उत्तीर्णता प्रमाणपत्र.
6. उत्तीर्ण होण्याचे वर्ष आणि तुमचा रोल नंबर प्रविष्ट करा.
7. तपशील सबमिट करा आणि मार्कशीट स्क्रीनवर दिसेल.
8. डाउनलोड करा व प्रिंटआउट घ्या.


बोरगाव वाळू घाटावर महसूल पथकाची धाड, तीन हायवा जप्त

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : तालुक्यातील बोरगाव वाळू घाटावर अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याची गुप्त माहितीच्या आधारे महसूल विभागाच्या पथकाने धाड टाकून दंडात्मक कारवाई साठी तीन हायावा जप्त केले असून यात एक वाळू भरलेला हायवा असून दोन हायवा (ट्रक) रिकामे आहेत.
घाट बंद असलेल्या घाटातून वाळू उपसा करून वाहणे चोरट्या मार्गाने वणी तालुक्यात धावत आहे. याबाबत संबंधित विभागाला तक्रारी, निवेदने प्राप्त होत आहे. परंतु प्रशासनाला न जुमानता वाळूचा गोरखधंदा सुरूच होता. त्यामुळे उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या मार्गदर्शनात नेमलेल्या पथकाला कार्यान्वित करून वाळू तस्करांचे दिवस असो की रात्रीचे खेळ, हाणून पाडा अशा सूचना देत असताना गुरुवार च्या रात्री बोरगाव घाटावर अवैध उपसा होत असल्याची माहिती मिळाली. दरम्यान गस्तीवर असलेल्या नायब तहसीलदार खिरेकर व मंडळ अधिकारी देशपांडे यांनी त्या ठिकाणी धाड टाकून एक वाळू भरलेला हायवा क्र.(एम एच 40, बी जि- 0198) व दोन त्याच ठिकाणी खाली केलेले हायवा क्र. (एम एच 40, सि टी-3742) आणि (एम एच 34, बी जि - 9064) असे या तीनही वाहणांना ताब्यात घेत तहसील कार्यालयाच्या आवारात जमा केले. या कारवाईने वाळू माफियाचे धाबे चांगलेच दनाणले आहे.
वणी तालुक्यातील वाळू घाटावरून सर्रास वाळूची अवैध वाहतुक केली जात आहे. ह्या अवैध वाळूचा उपसा रोखण्यासाठी वणी उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले व तहसीलदार निखिल धुळधर यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार रामचंद्र खिरेकर, मंडळ अधिकारी देशपांडे, तलाठी पाचभाई, इंगोले, गोहणे व मोहितकर यांनी कारवाई करिता कंबर कसल्याचे दिसून येत आहेत.

बुद्ध जयंती निमित्त अन्नदान व खीर वाटप


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : जगाला शांती, सत्य, अहिंसेचा संदेश देणारे जगातील पहिले वैज्ञानिक तथागत गौतम बुद्ध यांच्या २५६८ व्या जयंती निमित्त मारेगाव येथे समता सैनिक दल मिशन जय भीम यांच्या तर्फे भोजनदान व खीर वाटप करण्यात आली. 
बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्म मानणाऱ्यांचा प्रमुख सण आहे. वैशाख महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला, या दिवशी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि याच दिवशी त्यांना महानिर्वाणही मिळाले. बुद्ध पौर्णिमेला जगभर त्यांची जयंती साजरी केली जाते. त्याच अनुषंगाने मारेगाव येथेही बुद्ध जयंती साजरी करण्यात आली, या निमित्ताने समता सैनिक दल मिशन जय भीम तर्फे आंबेडकर चौक येथे अन्नदान व खीर वाटप करण्यात आली. 
या सामाजिक उपक्रमात मार्शल सातपुते, मार्शल तेलंग, मार्शल वनकर, मार्शल सिडाम, मार्शल हस्ते, अविनाश सातपुते आदींनी उपस्थिती दर्शवली होती.

उदिष्ट गाठण्यासाठी ध्येय निश्चित केले पाहिजे- मुनि अर्हतकुमारजी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

प्रगतीचे उदिष्ट गाठण्यासाठी मनुष्याने आपले ध्येय निश्चित केले पाहीजे,असे प्रतिपादन आचार्य श्री महाश्रमणजी यांचे शिष्य मुनि अर्हतकुमारजी यांनी केले.ते मारेगाव येथील तातेड निवासात प्रथम आगमना प्रित्यर्थ उपदेश करताना बोलत होते,ते पुढे बोलतांना म्हणाले की,विना ध्येय व्यक्ती कोणत्याच ठिकाणी पोहचु शकत नाही. 

याबाबतचे उदाहरण देताना ते म्हणाले की,लिफाफा ज्या पत्त्यावर पाठवायचे आहे तो पत्ता लिहिला गेला नाही तर तो लिफाफा त्याठिकाणी पोहचु शकत नाही.सोबतच प्रगती करायची असेल तर व्यक्ती ला सहनशीलता ठेवणे आवश्यक आहे.ही सहनशिलता प्रबळ होण्यासाठी देव गुरू धर्मावर श्रध्दा असावी व गुरूनी दिलेल्या मार्गदर्शनावर चालून आपले लक्ष साध्य करावे असा उपदेशात्मक प्रबोधन करत ते शेकडो कि.मी. अंतर पायदळ विहार करत आहे. मुनी अर्हतकुमारजी, मुनि भरतकुमारजी,मुनि द्विपकुमारजी आदि ठाणा तिन औरंगाबाद वरुन पायदळ विहार करत करत मारेगाव तालुक्यातील बुरांडा येथील जुमनाके यांच्या फार्म हाऊस मध्ये पोहचल्यानंतर ते मारेगाव शहरातील प्रतिभा तातेड निवासात काही वेळाच्या विश्रांती साठी थांबले होते. त्यांतर त्यांचा मांगरुळ येथील डॉ.लोढा यांच्या फार्म हाऊस मध्ये मुक्काम करुन पुढचा विहार सुरु होणार असुन आज रामदेवबाबा मंदिर कडे विहार करून उद्याला वणी येथे 10 दिवस येथे थांबण्याची संभवना आहे. तेथे प्रवचनाचा कार्यक्रम होणार असून धर्म आराधना व अध्यात्मा वर चर्चा होणार आहे.

मुनिश्रींचा आगामी चातुर्मास नागपुर येथे होणार असून ते वनोजा, मार्डी, खैरी, वडकी विहार करत करत ते चातुर्मास पुर्वी नागपूर ला पोहचणार आहे.उन्हाचा तडाखा सुरु असतानाही मुनीजींचा पायदळ प्रवास सुरु आहे.मारेगाव तालुक्यात त्यांचे आगमन झाले विहरामध्ये धर्मेंद्र भंडारी, अंकुश भंडारी, संभव भंडारी, प्रतिभा तातेड, गुनेश तातेड, आदेश तातेड, यांच्यासह जैनधर्माचे श्रावक तथा श्राविका त्याच्या सेवेत सहभाग घेत आहे.

लोकसेवा मिळविण्यासाठी अडचणी आल्यास आयोगाकडे दाद मागा – आयुक्त डॉ. एन. रामबाबू

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

अमरावती : महाराष्ट्र राज्यातील पात्र व्यक्तींना पारदर्शक, कार्यक्षम व समयोचित लोकसेवा प्रदान करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अमंलात आणला आहे. त्याद्वारे प्रत्येक शासकीय विभागाने पात्र व्यक्तींना लोकसेवा प्रदान करणे कायद्याद्वारे बंधनकारक केले आहे. या कायद्याद्वारे राज्य शासनाच्या विविध 38 विभागाच्या एकूण 642 लोकसेवा अधिसूचित केलेल्या आहेत. त्यापैकी 451 सेवा ह्या ऑनलाईन पोर्टलवर प्रदान करण्यात येतात. नागरिकांनी कायद्याचे महत्त्व समजावून घेऊन व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन अधिकाधिक लोकसेवा ह्या ऑनलाईन पद्धतीने प्राप्त करुन घेण्यासाठी ‘आपले सरकार पोर्टलचा’ वापर करावा तसेच अधिसूचित केलेल्या लोकसेवा प्राप्त करण्यामध्ये अडचणी येत असल्यास आयोगाकडे दाद मागावी, असे आवाहन राज्य सेवा हक्क आयोगाचे आयुक्त डॉ. एन. रामबाबू, यांनी केले.

राज्य शासनाच्या विविध विभागाने अधिसूचना निर्गमित करुन अधिसूचित केलेल्या सेवांचा तपशिल, त्या प्रदान करण्यासाठी लागणारी विहित कालमर्यादा, सेवा प्रदान करणारे पदनिर्देशित अधिकारी, सेवा प्रदान करण्यास विलंब होत असल्यास किंवा दिरंगाई होत असल्यास करावयाच्या प्रथम व द्वितीय अपिलाबाबतची माहिती प्रसिद्ध केलेली आहे, अशी माहिती आयोगाने दिली आहे.

या कायद्याच्या प्रयोजनासाठी महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाची स्थापना करण्यात आलेली असून त्याचे मुख्यालय मुंबई येथे आहे. उर्वरित सहा महसूल विभागामध्ये आयोगाची प्रत्येकी एक विभागीय कार्यालय आहे. राज्य सेवा हक्क आयोग, अमरावती विभाग, अमरावती या कार्यालयाची स्थापना डिसेंबर 2021 मध्ये करण्यात आली आहे. अमरावती महसूल विभागासाठी डॉ. एन. रामबाबू,(भा.व. से.) (से. नि.) यांची आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या आयोगाचे कार्यालय ‘कार्य आयोजना इमारत, पहिला मजला, वन विभाग, उर्ध्व वर्धा प्रकल्प वसाहत मार्ग, कॅम्प, अमरावती 444602’ येथे कार्यरत आहे.

शासनाच्या विविध विभागानी अधिसूचित केलेल्या सेवा प्रदान करण्यामध्ये विलंब होत असल्यास अथवा दिरंगाई होत असल्यास, त्यानुषंगाने पात्र व्यक्ती या आयोगाकडे तृतीय अपिल दाखल करु शकतो, जास्तीत जास्त नागरिकांना या कायद्याची ओळख व्हावी यासाठी अमरावती विभागामध्ये झालेल्या विविध कृषि प्रदर्शनी, शासन आपल्या दारी कार्यक्रमांमध्ये आयोगातर्फे माहितीवर्धक स्टॉल लावण्यात आले होते. तसेच या कायद्याचा व्यापक प्रचार-प्रसार होण्यासाठी आकाशवाणीवर मुलाखती व ध्वनीफिती प्रसारित करण्यात आलेल्या आहेत. याशिवाय अमरावती महसूल विभागातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालय व इतर जिल्हास्तरीय तसेच उपविभागस्तरीय शासकीय कार्यालयांमध्ये आयोगाकडून महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 बाबत सजगता आणण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम व आढावा बैठका आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

आयोगाकडे प्राप्त होणाऱ्या अपिल प्रकरणांवर आयोगाव्दारे कार्यवाही करण्यात आली आहे. यामध्ये ज्या अधिकाऱ्यांनी अधिसूचित असलेली लोकसेवा प्रदान करण्यामध्ये दिरंगाई अथवा दुर्लक्ष केले असल्याचे निदर्शनास आले आहे. त्या प्रकरणांमध्ये आयोगाकडून दंडात्मक कार्यवाही सुध्दा करण्यात आलेली आहे.

या कायद्याचे महत्व समजावून घेऊन व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन अधिकाधिक लोकसेवा ह्या ऑनलाईन पध्दतीने प्राप्त करुन घेण्यासाठी “आपले सरकार पोर्टलचा” सर्वसामान्य नागरिकांनी वापर करावा. तसेच अधिसूचित केलेल्या लोकसेवा प्राप्त करण्यामध्ये अडचणी येत असल्यास नागरिकांनी आयोगाकडे दाद मागावी, असे आवाहन राज्य सेवा हक्क आयोज आयुक्त डॉ. एन. रामबाबू यांनी केले आहे.

विधानपरिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची २६ जून रोजी द्वैवार्षिक निवडणूक

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मुंबई : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४ जागांसाठी निवडणूक होत असून सोमवार, २६ जून २०२४ रोजी मतदान होणार आहे.

विलास विनायक पोतनीस (मुंबई पदवीधर मतदारसंघ), निरंजन वसंत डावखरे (कोकण पदवीधर मतदारसंघ) किशोर भिकाजी दराडे (नाशिक शिक्षक मतदारसंघ) आणि कपिल हरिश्चंद्र पाटील (मुंबई शिक्षक मतदारसंघ) हे सदस्य दिनांक ७ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेतून निवृत्त होत आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने २ शिक्षक मतदारसंघ आणि २ पदवीधर मतदारसंघाकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

या निवडणुकीसाठी शुक्रवार, ३१ मे २०२४ रोजी अधिसूचना जारी केली जाईल. त्यानंतर शुक्रवार, ७ जून २०२४ पर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येईल. उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी सोमवार, १० जून २०२४ रोजी केली जाईल तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत बुधवार, १२ जून २०२४ अशी आहे. बुधवार २६ जून २०२४ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत या चारही मतदारसंघाकरिता मतदान होईल. सोमवार १ जुलै २०२४ रोजी मतमोजणी होईल. ही संपूर्ण प्रक्रिया दिनांक ५ जुलै २०२४ रोजी पूर्ण होईल, असे भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

यवतमाळ : काँग्रेस कार्यालयात जिल्हा व तालुका महिला पदाधिकारी यांची बैठक

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : गुरुवारी २३ मे रोजी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात दुपारी दोन वाजता महिला पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार वामनराव कासावार तर वसंत पुरके माजी शिक्षणमंत्री म.रा यांच्या मार्गदर्शनाखाली नवनिर्वाचीत यवतमाळ जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष संध्याताई बोबडे, पुष्पाताई नागपुरे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. 
सर्वप्रथम भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेला अभिवादन करून नवनिर्वाचित यवतमाळ जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष संध्याताई बोबडे यांचा वसंत पुरके, वामनराव कासावार यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. महिलांची संघटनात्मक बांधणी, राजकारणात महिलांचा सहभाग, तालुका अध्यक्ष व शहराध्यक्ष यांनी आपापल्या कार्यकारणी तयार करून अहवाल सादर करण्यात यावे तसेच वामनराव कासावार, वसंत पुरके, पुष्पाताई नागपुरे यांनी महिलांना मार्गदर्शन केले. 
या बैठकीला शालिनीताई रासेकर, डॉ मीनाक्षी सावळकर, स्वाती येंडे, वैशाली सवाई, किरण मोघे, वैशाली पिसाळकर, अर्चना हजारे, गायत्री नवाडे, मंदा बांगरे, मंजुषा हजारे, विद्या परचाके, सविता चौधरी, संजीवनी कासार, जयश्री मडावी, लियाकत बी शेख, विद्या पाताल बन्सी, सरस्वती ठाकूर, नलिनी, व कल्पना मुनेश्वर आदी सह असंख्य महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

नांदेपेरा रोड वर भरधाव जाणाऱ्या कारची वीज खांबाला जोरदार धडक

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : शहरातील नांदेपेरा मार्गावरील पाच नंबर शाळेच्या बाजूला नगराळे हॉस्पिटल च्या समोर एक आश्चर्यकारक घटना घडली आहे. वास्तविक वेगात कार चालविणाऱ्या एका व्यक्तीने विजेच्या पोलला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, पोल वीस फूटावर फेकला गेला आणि कार त्यात अडकून पडली. त्या कारची अशी अवस्था झाली होती की, त्या कारचा दर्शनीभाग चेंदामेंदा झाला आहे. 
नांदेपेरा रोड हा मोठ्या प्रमाणात वर्दळीचा परिसर असून, या रोडवर वाहणांची रेलचेल मोठ्या प्रमाणात सुरू असते. मात्र, ही घटना आज पहाटे चार वाजता घडली असल्याचे बोलल्या जात असून नेमकं कसं घडलं आणि काय घडलं याबाबत तरी निश्चित सांगता येत नाही,परंतु आज सकाळपासून हा अपघात बघण्यासाठी नागरिकांची याठिकाणी गर्दी होत होती. शहरात दाखल होत असलेल्या चक्क कारने इलेट्रिक पोल ला धडक दिल्याने अनेकांनी आपल्या मोबाईल मध्ये या घटनेचे दृष्य टिपले असून या आश्चर्यदायक घटनेची चर्चा विविधांगी जोर धरत आहे. तूर्तास वृत्त लिहेपर्यंत घटनेबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. 

कृषी निविष्ठा विक्रेते तालुका स्तरीय खरीप आढावा व प्रशिक्षण

सह्याद्री चौफेर | नंदकिशोर मस्के 

महागांव : दिनांक 22 मे 2024 रोजी तालुक्यातील कृषी निविष्ठा विक्रेते यांची खरीप हंगामपूर्व आढावा सभा व साथी पोर्टल 2 प्रशिक्षण तालुका कृषी अधिकारी कार्यालय महागाव येथे घेण्यात आली. सभेकरीता श्री कल्याण पाटील जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक, तालुका कृषी अधिकारी शिवनेरी चव्हाण, पंचायत समिती कृषी अधिकारी श्री.राठोड, कृषी विस्तार अधिकारी निरावार व महागाव तालुक्यातील सर्व कृषी निविष्ठा संचालक उपस्थित होते. 
यावेळी कृषी निविष्ठा विक्रेत्यांना मार्गदर्शन करतांना श्री कल्याण पाटील यांनी बियाणे वितरण सनियंत्रणासाठी व बोगस बियाण्यांना आळा घालण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या महाराष्ट्र शासनाच्या साथी ॲप बद्दल माहिती दिली. 
तालुका कृषी अधिकारी शिवनेरी चव्हाण यांनी गुणवत्तापूर्ण रासायनिक खते,किटकनाशके व बियाणे विक्री संबंधी सूचना दिल्या,श्री राठोड यांनी खताची विक्री पीओएस मशीनद्वारे करणे, लेबल क्लेमनुसार किटकनाशकाची विक्री करणे इत्यादी सूचना दिल्या.

लाखों आदिवासी बांधवाचे जागजई येथे वैशाखस्नान व देवदर्शन

सह्याद्री चौफेर | विनोद माहुरे 

राळेगाव : विदर्भातील तमाम आदिवासी समाजाचे पंढरपूर असलेल्या राळेगाव तालुक्यातील जागजई येथे दरवर्षी वैशाख-पोर्णिमा या तिथीवर आदिवासी बांधव हे यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, नागपुर जिल्ह्यातून लाखोंच्या संख्येने येथील पवित्र वैशाखस्नान करण्याकरीता व देवदर्शन घेण्याकरिता येत असतात. आज सुद्धा विदर्भातील लाखों आदिवासी समाज बांधवांनी वैशाखस्नान व देवदर्शन घेण्यासाठी जागजई येथे आले होते. 
23 मे रोजी वैशाख पौर्णिमेच्या पर्वावर आदिवासी समाज बांधव पवित्र स्नानासाठी व देवदर्शनाकरीता येणाऱ्या आदिवासी भाविकांच्या सुरक्षेतेच्या दृष्टीने सुधीर पाटील उपविभागीय अधिकारी राळेगाव, अमित भोईटे तहसीलदार राळेगाव, रामेश्वर वेंजणे उपविभागीय पोलिस अधिकारी पांढरकवडा, गटविकास अधिकारी केशव पवार, राळेगाव पोलिस निरीक्षक रामकृष्ण जाधव,तसेच आरोग्य विभाग, लाईफबोट, तसेच भक्तांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून स्वत: हजेरी लावली होती.या प्रसंगी भाविकांना कुठलीही अडचण निर्माण होणार नाही याची महसुल प्रशासन, पोलिस प्रशासन, आरोग्य विभाग, आपत्ती व्यवस्थापन दल, अग्निशमक दल हे विशेष लक्ष ठेवून नदी पात्राच्या पाण्याच्या जवळ आपले पोलिस कर्मचारी तसेच महसुलचे कर्मचाऱ्यांनी पहरा दिला असून कोणीही खोल पाण्यात जाणार नाही याची पुरेपूर दक्षता घेण्यात आली. दरम्यान, कुठलाही अनुच्छित प्रकार घडणार नाही यासाठी महसुल प्रशासन, पोलिस प्रशासन आरोग्य विभाग, आपत्ती व्यवस्थापन दल व मंदीर समितिच्या वतीने सोईसुविधा पुरविण्यात आल्या होत्या. आदिवासी समाज बांधवांच्या सुरक्षितेची यावेळी अधिक काळजी घेण्यात आली. 
तमाम आदिवासी समाजाचे पंढरपुर म्हणून ओळखले जाणाऱ्या जागजई येथे पवित्र स्नानसाठी व देवदर्शन करण्यासाकरीता आलेल्या सर्व आदिवासी देवाचे दर्शन घेण्याकरिता वसंत पुरके माजी शिक्षणमंत्री म.रा., अंकुश मुनेश्वर, अरविंद वाढोणकर, राजेंद्र तेलंगे, व ईतर पदाधिकारी सुद्धा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जागजई येथे उपस्थिती दर्शविली होती. 

कोळश्याच्या खाणीतील अनमोल हिरा-संजय खाडे

अभिष्टचिंतन | वाढदिवस 

संजय खाडे व माझी ओळख गेल्या २५ वर्षापासुन ची आहे. मी नोकरीच्या निमित्याने वणीत आलो. व नंतर सामाजिक कार्यात सक्रिय झाल्यानंतर अनेकांच्या संपर्कात आलो. त्यातील एक ध्येयवेडे व्यक्तीत्व म्हणजे संजय खाडे हे आहे.
संजय रामचंद्र खाडे यांचा जन्म एका सामान्य शेतकरी कुंटूबात उकणी ता. वणी जि. यवतमाळ येथे २३ मे १९७० रोजी झाला. त्यानी शालेय शिक्षण पुर्ण केल्यानंतर कोल माईनस मध्ये नोकरी पत्करली. नोकरीत असताना त्यांनी "जनसेवा हिच इश्वर सेवा" हे ध्येय स्विकारून त्यांनी नोकरी बरोबरच समाज सेवेस प्रारंभ केला. ते उकणी गावचे १५ वर्षे सरपंच होते. सरपंच पदाच्या कालावधीत अनेक लोकोपयोगी योजना त्यांनी उकणी गावाच्या विकासासाठी प्रभावीपणे राबविल्या, त्या कार्यकुशलते मुळेच राहुल गांधीच्या महाराष्ट्राच्या यंग ब्रिगेड मध्ये सन २००८ मध्ये त्यांचा श्रीमती मा. यशोमती ठाकुर, स्वर्गिय निलेश पारवेकर यांचे नेतृत्वात वावर सुरू झाला. ही गौरवाची बाब आहे. तेव्हापासुन सुरू झालेल्या त्यांचा राजकिय व सामाजिक कार्याचा प्रवास हा सतत उंचावतच जात आहे.
ते १. शिवकृपा शेतकरी फाउन्डेशनचे उकणी अध्यक्ष आहेत.
२. रंगनाथ स्वामी शेतकरी उत्पादक कंपणीचे अध्यक्ष आहेत.
३. जय जगन्नाथ मल्टीस्टेट केडीट को. ऑफ सोसायटी चे संस्थापक अध्यक्ष आहेत. ४. दि. वसंत सह. जिनींग अॅन्ड प्रेसिंग फॅक्टरी वणी चे संचालक आहेत.
५. महाराष्ट्र राज्य सहकारी कापुस उत्पादक पणन महासंध मर्यादित, मुंबई चे संचालक आहेत.
सध्या ते वरील निरनिराळया पदावर कार्यरत आहे. त्यांनी सहकार क्षेत्रात नाव लैकीक मिळविला आहे. त्यांनी वणी येथे भव्य शंकरपटाचे आयोजन केलेले आहे. त्यांचा कामगार चळवळीत सक्रिय सहभाग असुन त्यांनी सामाजिक चळवळीत दानत्व स्विकारलेले आहे. शेतकऱ्यांच्या व सामान्य जनतेच्या भल्यासाठी ते सतत संघर्षरत आहे. गाव खेडयात सामान्य शेतकरी कुटुंबाच्या पोटी जन्मलेल्या संजय खाडे यांचा हा जीवन प्रवास खरच मनाला थक्क करणारा आहे. त्यांचे हे जीवन कोळश्याच्या खाणीतील एका अनमोल हिऱ्यासारखे मौल्यवान आहे. आज त्यांचा ५४ वा वाढदिवस त्यांना भरभरूण शुभेच्छा...!!

- उत्तम गेडाम 
रा. रवी नगर ता. वणी जि. यवतमाळ 
मो.न. ९८२३९२४८५५

दहावीच्या निकालाची तारीख जाहीर; 'या' तारखेला लागणार दहावीचा निकाल...

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालाबद्दल अत्यंत मोठे अपडेट आले आहे. मेच्या चाैथ्या आठवड्यात *27 मे 2024* रोजी दहावीचा निकाल लागणार आहे. 

राज्यात दहावीची परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च 2024 यादरम्यान पार पडली. यंदा 16 लाख 9 हजार 444 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिलीये. आता विद्यार्थ्यांनी निकालाची प्रतिक्षा संपली आहे.

या वेबसाईटवर पाहता येणार निकाल:

असा पाहा निकाल
1. सर्वात आधी वर दिलेल्या कोणत्याही एका वेबसाईटवर ती क्लिक करा
2. तुम्हाला तुमचा Roll Number टाकावा लागेल.
3. त्यानंतर तुमच्या हॉल तिकीट वरती असलेले तुमचे आईचे नाव टाका.
4. View Result या बटणावर क्लिक करा.
5. तुम्ही जर माहिती बरोबर टाकली असेल तर तुमचा निकाल तुम्हाला दिसेल.
6. खाली Print असा पर्याय दिसेल त्याच्यावर क्लिक करून प्रिंट काढू शकता किंवा मोबाईलमध्ये सेव करू शकता.

अगोदर ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर केला जाईल, त्यानंतर काही दिवसांनी विद्यार्थ्यांना मार्कशीट मिळेल.


संजय खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : दातृत्वाचे धनी व समाजकारणी संजय खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त वणी विधानसभा क्षेत्रात गुरुवारी दिनांक 23 मे रोजी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात सामाजिक, धार्मिक, आरोग्य, शेतीविषयक उपक्रमांचा समावेश आहे. 

स. 8 वाजता रंगनाथ स्वामी मंदीर, वणी येथे पूजा व सत्कार समारंभ, स. 9 वाजता ग्रामीण रुग्णालय वणी, 10.30 वाजता कायर, दुपारी 11 वाजता मुकुटबन, दु. 12.30 वाजता भीमनाळा,घोन्सा येथे दु 1 वाजता. वणी येथे दु. 2 वा. तर दु. 4 वाजता मारेगाव येथील शेतकरी मंदिर व संध्या 6 वाजता वणी येथील बाजोरिया लॉन येथे अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. 

या उपक्रमाला स्थानिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संजय खाडे मित्र परिवारातर्फे करण्यात आले आहे.

त्या लुटमार प्रकरणात 'लक्ष्मण'च निघाला मास्टर माईंड

सह्याद्री चौफेर । वृत्तसंस्था 

वणी : पाच दिवसांपूर्वी वणी-घोन्सा मार्गावरील कोरंबी (मारेगाव) गावाजवळ घडलेल्या लुटमार प्रकरणात वाहन चालकाचा हेल्परच मास्टर माईंड निघाला. या प्रकरणात पोलिसांनी चौघांना बेड्या ठोकल्या असून यातील फरार असलेल्या एकाचा शोध वणी पोलिस घेत आहेत.
लक्ष्मण शंकर मेश्राम (21) रा. मेसा ता. वरोरा असे मास्टर माइंड आरोपीचे नाव आहे. तो वणीतील पंचशीलनगरमध्ये वास्तव्याला आहे. त्यानेच कट रचून चार मित्रांच्या मदतीने ही लुटमारीची घटना घडवून आणल्याची बाब पोलिस चौकशीतून उघड झाली आहे. लक्ष्मणने रचलेल्या कटानुसार, त्याचे मित्र वैभव ऊर्फ कुणाल अनिल निखाडे (19) रा. दावत हॉटेलजवळ इंदिरा चौक वणी, अभिषेक बळीराम मेश्राम (21) रा. नायगाव ता. वणी, व राहुल सुनील राजुरकर (24) रा. नायगाव ता. वणी व अन्य एक आरोपी अशा चौघांनी ही लुटमार केली. वणी येथील किराणा व्यावसायिक राजेश तारुणा यांचे वाहेगुरु किराणा भंडार नावाने दुकान आहे. ते ग्रामीण भागात किराणा मालाचा पुरवठा करतात. 
16 मे रोजी त्यांनी आपल्या तीनचाकी मालवाहू वाहनात किराणा माल भरून चालक जितेंद्र रिंगोले याला घोन्सा, दहेगाव, रासा, या भागात पाठविले होते. यावेळी लक्ष्मण मेश्राम हा हेल्पर म्हणून सोबत होता. किराणा मालाचा पुरवठा व जुनी वसुली घेऊन परत येताना कोरंबी (मारेगाव) जवळील जनता शाळा परिसरात सायंकाळी साडे सहा वाजताच्या दरम्यान, दोन वेगवेगळ्या दुचाकीवर आलेल्या चौघांनी ऑटो अडविला व हेल्पर लक्ष्मण मेश्रामसह चालकाला मारहाण केली. त्यानंतर रोख असलेली बॅग हिसकावून घेतली, तर दोघांनी लक्ष्मणच्या खिशातील मोबाईल हिसकावून नेला.