Page

जाणीव एक हात मदतीचा संस्थेने दिले ६ फुटावरील अजगराला दिले जीवदान

सह्याद्री चौफेर | रुस्तम शेख

कळंब : कळंब तालुक्यातील राजुर या गावालगतच्या शेतात सोयाबिन पिकात भल्ला मोठा 6.5 फूट लांबीचा अजगर दिसताच मजुरांची ताराबंळ उडाली. त्याच वेळी शेत मालक दिनेश भाऊ बोभाटे यांनी जाणीव एक हात मदतीचे वन्यजीव रक्षक अब्दुल कलाम व सय्यद तौसीफ यांना माहिती दिली.

यावेळी क्षणाचा विलंब न करता राजुर येथील शेतात जाऊन सुरक्षितरित्या त्या अजगराला रेस्क्यू करून सापा विषयी जनजागृती करून आपल्या परिसरात कुठेही वन्य प्राणी जखमी किंवा कोणत्याही संकटात दिसल्यास त्याला न मारता जवळच्या वन्यजीव रक्षक (सर्प मित्रा) ला बोलवण्याचे आवाहन केले.

दरम्यान, काही अंतरावर असलेले पोटगव्हाण बिट मध्ये त्या अजगराला निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करण्यात आले. 
यावेळी वन विभागाचे वनरक्षक कु. एन. वि. ढोरे, पोटगव्हाण बिटचे वनरक्षक कु. बि.एस डुकरे, वनरक्षक एस. यु. राठोड, वनरक्षक एस.एस. राठोड व जाणीव एक हात मदतीचे अब्दुल कलाम, नदिम शेख, सय्यद तौसिफ उपस्थितीत होते.

जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मनसेचा विराट जनआक्रोश मोर्चा; शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ मदत जमा करण्याची मागणी !


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीच्या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पक्षनेते राजूभाऊ उंबरकर यांच्या नेतृत्वात यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी महोदयांना विविध मागण्यांचे निवेदन देत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ मदत करण्याची मुख्य मागणी मनसेने केली.

अतिवृष्टी व पूरग्रस्त भागांतील विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ मदत करण्याची मुख्य मागणी, दिलेल्या निवेदनातून करण्यात आली शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस, तूर, सोयाबीन, मुग, उडीद, ज्वारी, बाजरी, हळद आदी खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले. परिणामी जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून ते चिंताग्रस्त स्थितीत आहेत.
जिल्ह्यातील १६ तालुक्यांतील १४ तालुक्यांमध्ये ही भयंकर अतिवृष्टी झाली. यात ७७ महसूल मंडळे ३१६ ते १५० मिमी पर्यंतच्या पावसाने बाधित झाले. या पावसाने शेतकरी पूर्णत: हतबल असून, अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना पुनः उभे करणे आवश्यक असून अतिवृष्टीने बाधित झालेले शेतकरी, घरे व उध्वस्त झालेल्या कुटुंबीयासाठी विशेष पॅकेज देण्यात यावे.अन्यथा पूर्वीच खचलेला शेतकरी पुढील अनेक वर्षात उभा होऊ शकणार नाही.
जुलै च्या अतिवृष्टीमुळे शेतकरीच नव्हे, तर स्थावर मालमत्तेचेही मोठे नुकसान झाल्याने सर्वसामान्य नागरिकांनाही फटका बसला आहे. या मुसळधार पावसामुळे नदी व नाल्या काठच्या पिकांचे तर, नुकसान झालेच मात्र शेकडो हेक्टर जमिनी खरडून गेल्या आहेत. त्या शेतामध्ये फक्त दगड धोंडे उरले आहेत. म्हणजे त्या जमिनींवर शेती करायचे म्हटले, तरी पुढील ३-४ वर्षे शेती करता येणार नाही अशी भयाण अवस्था आहे. शेतीसह घरेदारांची परझड झाली. एकीकडे शेतीचे नुकसान झाले, तर दुसरीकडे गावकरी उद्ध्वस्त झाले आहे. विशेष म्हणजे आता शेतकऱ्यांकडे दुबार पेरणीचीही संधी नाही. केवळ रब्बी हंगामाच्या माध्यमातून शेतकरी लागवडीचा दुसरा डाव मांडू शकतात; मात्र त्यासाठीही कर्जपुरवठा हे नवे संकट राहणार आहे. जुने कर्ज फेडायचे कसे? हा देखील गंभीर प्रश्न आहे.
अतिवृष्टीमुळे शेतकरी चौफेर संकटाच्या चक्रात अडकला असून शासनामार्फत त्वरित सानुग्रह अनुदान म्हणजेच आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी. तसेच शेतकऱ्यांना जी हेक्टरी १० हजार रुपये अशी मदत विधिमंडळात जाहीर झाली ती मदत २४ तासाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणे अपेक्षित होते परंतु जिल्ह्यातील शेतकरी अद्यापही मदतीपासून वंचित आहे. यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी पसरली असून त्यांच्यातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. तरी अतिवृष्टी व पुरामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ताबडतोब आर्थिक सहाय्य देण्यात यावे, अशी मागणी मनसेने केली. यावेळी मनसेचे नेते राजू उंबरकर यांच्या सह जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

मारेगावात असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष प्रवेशाची मालिका पुन्हा सुरू झाली आहे. भाजपाचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, बीजेपी जिल्हा सचिव शंकर लालसरे यांच्या नेतृत्वाखाली वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीव रेड्डी बोदकूरवार यांच्या उपस्थितीत शहरी तथा ग्रामीण भागातील असंख्य कार्यकर्त्यांनी आज रविवारी भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला. 

अविनाशभाऊ लांबट यांनी मोठा निर्णय घेतला, अखेर त्या निर्णयावर आज शिक्का मोर्तब झाले. यात मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा सरपंच परिषदेचे ता.अध्यक्ष अविनाश लांबट, डोमाजी भादीकर (सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक, मारेगाव), दीक्षित मोरे (युवा सामाजिक कार्यकर्ते), श्रीकांत गौरकार (सरपंच कोथुर्ला), चंद्रकांत धोबे, (माजी उपसरपंच गौराळा), तथा यांच्या सौभाग्यवती विद्यमान सरपंच, मनोहरराव गेडाम (गोंडबुरांडा सोसायटी सदस्य), प्रदिप डाहूले (ग्राम.सदस्य, सिंधी), प्रविण बोथले (सामाजीक कार्यकर्ते कुंभा), दिलीप आत्राम, (उपसरपंच मांगली), दिनेश गेडाम, (ग्रा.पं.सदस्य सिंधी), नरेश चौधरी (ग्रा.पं. सदस्य दापोरा), गणेश खुसपुरे (सामाजिक कार्यकर्ते, महागाव), प्रशांत चौधरी (कुंभा), आशीष खंडाळकर (रामेश्वर), गोपाल ढाकणे (कोथुर्ला), मुरलीधर बलकी (महागांव), सुमीत जुनगरी (देवाडा), गणेश वांढरे (कोथुर्ला), सचिन गौरकार (मांगरूळ), संजय तुराणकर (महागांव), अनिल पारखी (गोडबुरांडा), विजय दानखेडे (गोडबुरांडा), विनोद चहानकर, (रामेश्वर सोसायटी सदस्य), राहुल पोतराजे, कैलास ठाकरे, सुहास वरारकर (सामाजिक कार्यकर्ते), प्रसाद राजापूरे, विघ्नेश दुर्गे, आदित्य डाखोरे, आयुष्य आसुटकर, या सर्वांनी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर प्रवेश केला आहे.

मारेगाव भाजपा युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष अनुप महाकुलकर, युवा मोर्चाचे ता अध्यक्ष गणेश झाडे व इतर पदाधिकारी यांच्या पुढाकाराने हा प्रवेश सोहळा मारेगाव विश्राम गृह येथे पार पडला. या पक्ष प्रवेशामुळे मारेगांव शहर तसेच ग्रामीण भागातील भारतीय जनता पार्टीची ताकद वाढली असून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था च्या निवडणुका मध्ये याचा मोठा फायदा पक्षाला होईल असा विश्वास आमदार बोदकुरवार यांनी व्यक्त केला.

यावेळी दिनकरराव पावडे, भाजपा जिल्हा सचिव, तालुका सरचिटणीस प्रशांत नांदे, ता. सरचिटणीस पवन ढवस, वैभव पवार नगरसेवक, शशिकांत आंबटकर, मंगेश देशपांडे, जयंत ठेपाले, बोबडे गुरुजी, प्रसाद ढवस, शेखर काळे, राहुल राठोड, नगर उपाध्यक्ष सौ. हर्षा महाकुलकर, नगरसेवक भादेकर काकू, रवि टोंगे, जगदीश ठेंगणे (सरपंच मांगरूळ), आदी पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.




आमदार बोदकुरवार यांनी केली मारेगावतील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसान ग्रस्त भागाचा दौरा वणी विधानसभा मतदार संघाचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी विविध गावांना भेट देत पाहणी केली. 
दोन दिवसापूर्वी झालेल्या ढग फुटी नंतरच्या अतिवृष्टीने अनेकांना फटका बसला आहे. घराची पडझड झाल्यामुळे वास्तव्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.तसेच संसार उपयोगी साहित्य पूर्णपणे खराब झाली आहे. अनेकांची संसार उघड्यावर आली आहे. त्यामुळे रात्रीची झोप घ्यायची कुठे असा प्रश्न नुकसानग्रस्ता समोर निर्माण झाला आहे.
शेतकऱ्याची शेतीपिके खरडून गेली आहे. यामध्ये वनोजा (देवी) बामर्डा, मार्डी, खैरगांव, दापोरा, कोसारा, केगांव, चानोडा आपटी, दांडगाव, शिवणी, यासह अनेक गावाचा नुकसान नुकसानग्रस्त गावा मध्ये समावेश आहे. या सर्व नुकसान ग्रस्त गावांना आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली आहे.त्यांच्या सोबत भाजप चे दिनकर पावडे, ज्ञानेश्वर चिकटे, प्रसाद ढवस,नगरसेवक वैभव पवार,मंगेश देशपांडे,सुधाकर बोबडे,प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी त्यांनी बामर्डा वनोजा येथील उपसरपंच प्रशांत भंडारी, बामर्डा येथील धनंजय आसुटकर, सरपंच सोयाम, मार्डी येथील सरपंच रविराज चंदनखेडे, उपसरपंच सुधाकर डाहुले, सदस्य सुरेश चांगले, सूरज पंडिले, गणेश कनाके यांची भेट घेतली व गावकऱ्याच्या व्यथा जाणून घेतल्या.

नुकसान भरपाई तात्काळ मिळावा यासाठी प्रशासकीय यंत्रणेला घटनास्थळ पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. घराच्या नुकसानीसाठी त्यांना ५ हजारावरून १० हजार रुपये शासनाने वाढवून दिले आहे. ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांनाच अर्थ सहाय्य देण्यात येईल. शेतीपिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्याना प्रतिहेक्टरी मदत लवकर मिळेल.
-आ. संजीवरेड्डी बोदकुरवार
 विधानसभा मतदार संघ वणी

नगर उपाध्यक्षा हर्षा अनुप महाकुलकर यांनी मानले आमदार संजीव रेड्डी बोदकूरवार यांचे आभार


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : शहरातील नागरी वस्ती झपाट्याने वाढत आहे. या वाढलेल्या भागात अनेक नागरी समस्या निर्माण होतात. त्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे. या भागाचे लोकप्रिय आमदार संजीव रेड्डी बोदकूरवार म्हणून व त्यानंतर सुद्धा मारेगावच्या विकासासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला. त्यामुळे भविष्यात सुद्धा हीच भुमीका आपली असुन शहरांचा विकास ही निरंतर प्रक्रिया आहे,असे माध्यमातून नगर उपाध्यक्षा हर्षा अनुप महाकुलकर यांनी सांगितले. व आमदार संजीव रेड्डी बोदकूरवार यांचे आभार मानले.
मारेगाव शहराच्या विकासासाठी ३ कोटीपेक्षा वर निधी मंजूर,खालीलप्रमाणे होणार विकास कामे 

प्रभाग क्रमांक सहा,सोनुले यांचे घरापर्यंत डांबरीकरण रस्ता, नाली बांधकामासाठी प्रभाग क्रमांक सहा मधील जुमनाके ते वांढरे व सोनुले ते कोलगांव रोड, सुभाष मत्ते ते राजु थाटे, विलास पोटे ते, निलेश भेंडे व निकम ते आष्टकर, मेन रोड डॉ. महाकुलकर ते सतिश पांडे, यांचे घरापर्यंत डांबरीकरण रस्ता, नाली बांधकाम करणे. प्रभाग क्रमांक तीन मधील महादेव मंदिर ते मार्डी रोड पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे.
प्रभाग क्रमांक पंधरा मधील विविध विठ्ठल आटा चक्की ते डोमाजी भादिकर यांचे घरापर्यंत सिमेंट रस्ता, भूमीगत नालीचे बांधकाम करणे. प्रभाग क्रमांक पंधरा, अनंता भोयर ते डोमाजी भादिकर, सुरेश वांढरे ते दासरवार साहेब, सोनटक्के, शरद खापने, माटे ते केळकर, सोमलकर ते धोपटे यांचे घरापर्यंत भूमीगत नालीचे बांधकाम करणे.
प्रभाग क्रमांक सोळा मधील चिकटे ते मुन, प्रमोद जांभूळकर ते आशिष आस्कर, खंडारे ते देवाळकर, विठ्ठल ठक ते अनिल देहांडे यांचे घरापर्यंत सिमेंट रस्ता व भूमीगत नालीचे बांधकाम करणे. प्रभाग क्रमांक सोळा मधील विविध ठिकाणी गणेश गोहोकार ते टायगर झाडे, देविदास खोले ते आनंद झोडे, धोपटे ते दरेकार, काटकर ते गाणार, ठक ते आनंद झोडे यांचे घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे. असे ३.५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याने शहराचा विकास साधता आहे. 
वणी मतदार संघांचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या आमदार निधीतून तब्बल ३ कोटी पेक्षा वर निधीच्या पायाभुत विकास सुविधांकरिता मंजूरी मिळाल्याने या माध्यमातून मारेगाव शहराचा विकास मोठ्या प्रमाणावर करण्यात येणार आहे, इतरही सोयी सुविधा उपलब्ध केल्या जाणार असल्याचे मत नगर उपाध्यक्षा हर्षा अनुप महाकुलकर यांनी व्यक्त केले आहे.

साहेबांनी मागणीची दखल घेत मारेगाव शहराच्या विकासासाठी भरगोस निधी उपलब्ध करुन दिल्याने आमदार बोदकुरवार यांचे  मारेगाव नगर पंचायतच्या नगर उपाध्यक्षा हर्षां महाकुलकर यांनी आभार मानले. 

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त “जनसेवा सप्ताह”


सह्याद्री चौफेर | कालू रामपुरे 

वरोरा : शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा वाढदिवस वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात “जनसेवा दिन सप्ताह” म्हणून साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत संपूर्ण आठवडाभर सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 
आज (दि.२९) ला जनसेवा दिन सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी विधानसभा क्षेत्रातील आपादग्रस्तांना आर्थिक मदत करण्यात आली. भद्रावती तालुक्यातील वाघेडा येथील मनोज टोंगे यांचे गोठ्याला आज (दि.२९) च्या रात्री एक वाजताच्या सुमारास आग लागली. सुदैवाने कोणतीही जिवित हानी झालेली नाही. गावकऱ्यांच्या अथक परिश्रमाने सुमारे चार तासात आग विझविण्यात आली. तसेच गोठयातील बैलजोडी सुखरुप वाचविण्यात यश आले. वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांना ही घटना कळताच रात्रीच वाघेडा येथे आपतकालीन मदत पोहचविण्यात आली.
वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांनी वाघेडा येथे मनोज टोंगे यांची स्वत: वैयक्तीक भेट घेतली व वास्तविक परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर त्यांना तात्काळ मदत केली.

या प्रसंगी हनुमान टाले, मनोज कसारे, राकेश बोथले बंडु काकडे, प्रफुल थेरे, मंगेश भोयर व गावकरी मंडळी घटनास्थळी उपस्थित होते. सोबतच स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती वासुदेव ठाकरे, मिथुन खोब्रागडे, अक्षय बंडावार यांची घटनास्थळी उपस्थिती होती.

यावेळी वाघेडा येथील ग्रामस्थ सुरेश महादेव वराटे व देवराव गणपत टाले यांचे बैल अनुक्रमे सर्पदंशाने व विद्युत करंटने मृत्युमुखी पडले, हे समजल्यावर त्यांनासुध्दा तात्काळ आर्थिक मदत देण्यात आली.

शिवसेना (उबाठा) वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तथा पक्षाच्या विचारधारेला प्रेरीत होवून पक्षप्रवेश सुरू

शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, युवासेनेचे प्रमुख तसेच माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विचारांशी प्रेरित होऊन भद्रावती तालुक्यातील बेलगाव (भु.), नेताजी नगर, विंजासन आणि गौतम नगर येथील युवकांनी व महिलांनी शिवबंधन बांधून शिवसेना (उबाठा) पक्षात प्रवेश केला.

वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे यांच्या उपस्थितीत या तरुणांनी शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला आहे. याप्रसंगी भद्रावती शिवसेना (उबाठा) तालुकाप्रमुख व नगरसेवक नरेंद्र पढाल यांच्या नेतृत्वात बेलगाव (भू.) ग्रामपंचायत सदस्य नंदकिशोर गाडगे, शिवसेना उपशहर प्रमुख अरुण घुगुल यांच्या नेतृत्वात सचिन पाचभाई, सुनील पायघन, नरेश कचाटे, सुरज बावणे, विकास बावणे, कृष्णा मोहितकर, रामा टाले आणि भावना खोब्रागडे यांच्या नेतृत्वात व्यंकट रमण, सुरेश पेटकर, शामलता पेटकर अश्विनी टिकले, वनमाला टिकले यांचा शिवबंधन बांधून पक्षप्रवेश करण्यात आले. 

या पक्षप्रवेश सोहळ्याला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) महिला जिल्हा संघटिका नर्मदा बोरेकर, वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे, विधानसभा उपजिल्हाप्रमुख भास्कर ताजणे, विधानसभा समन्वयक वैभव डहाणे, विधानसभा संघटक मंगेश भोयर, तालुका प्रमुख नरेंद्र पढाल, भद्रावती शहरप्रमुख घनश्याम आस्वले, युवासेना भद्रावती तालुका अध्यक्ष राहुल मालेकर, प्रशांत कारेकर, रोहीत वाभिटकर, संतोष माडेकर, गोपाल सातपुते व पदाधिकारीसह शेकडो शिवसैनिकांची उपस्थिती होती.

वरोरा-भद्रावती शिवसेना (उबाठा) तर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन व स्वागत करण्यात आले आहे.

मारेगाव नगरपंचायतला ६१ लाखांचा निधी..!

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : सामाजिक विकास योजनेअंतर्गत मारेगाव नगरपंचायतसाठी ६१ लाखाचा निधी मंजूर झाला असून शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयाला पुस्तके आणि फर्निचर साठी नगरसेवक शंकर मडाविंनी शासनदरबारी नेहमीच पाठपुरावा केला. त्याची प्रशासकीय मान्यता आणि निधी वितरण आदेश दिनांक १७ जुलै २०२३ रोजी प्राप्त झाले. शंकरावांच्या प्रयत्नातून तब्बल ६१ लक्ष निधी मंजूर करण्यात आला.

केवळ निधी मंजूर करून घेण्यावर नगरसेवक शंकर मडावी थांबल्या नाहीत तर त्या कामांची प्रत्यक्ष अंमलबजावणी नगरसेवक मडाविंनी प्रशासकीय मान्यता करून घेतली.  मारेगाव शहरातील विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी सर्व सोयीसुविधा पूर्ण अशी सुसज्ज ग्रंथालयाची प्रभाग क्रमांक १७ यमध्ये तयार आहे. स्वीकृत नगरसेवक शंकर मडावी 
यांच्या प्रयत्नातून मारेगाव तालुक्यासाठी सामाजिक विकास योजनेमधून नगरपंचायतला भरगोस निधी वाट्याला आला..!

तसेच येणाऱ्या काळात मारेगाव शहरात बिरसा मुंडा सांस्कृतिक सभागृहासाठी लवकरच निधी प्राप्त होणार आहे. त्याकरिता नगरपंचायत कडून जागा सुद्धा प्राप्त झाली असून यापुढेही अजून मोठ्या प्रमाणात शासनाकडून विविध योजेनेतून निधी तालुक्यासाठी आणला जाईल असे, नगरसेवक तथा काँग्रेस अध्यक्ष शहर शंकर मडावी यांनी सांगितले.

मारेगाव येथे गुणवंत विद्यार्थी गुण गौरव सोहळ्याचे आयोजन


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : सावित्रीबाई फुले गुणगौरव समितीच्या वतीने मारेगाव तालुक्यातील 10 वी व 12 वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा सोमवार दि.31 जुलै 2023 रोजी येथील शेतकरी सुविधा केंद्रात आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून मा.श्री.न्याय. निलेश वासाडे न्यायाधीश दिवाणी व फौजदारी न्यायलाय, मारेगाव हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे. आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुंभा येथील सरपंच अरविंद ठाकरे राहणार आहे. या सोहळ्याचे उदघाट्न वर्धमान फाउंडेशन वणीचे अध्यक्ष तथा बुलढाणा अर्बन को. आप्रेटिव्ह सोसायटीचे डायरेक्टर विजय चोरडिया करणार आहे. या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून पेसा समिती अध्यक्ष भैय्याजी कनाके पहापळ, हे राहणार आहे. प्रमुख मार्गदर्शक म्हणून उत्तम निलावाड, तहसीलदार मारेगाव, जनार्दन खंडेराव, ठाणेदार मारेगाव, पद्माकर मडावी बिडीओ, मारेगाव, शंकर हटकर वन परीक्षेत्राधिकारी, मारेगाव, सुनील निकाळजे तालुका कृषी अधिकारी, मारेगाव, नरेंद्र कांडुरवार गट शिक्षणाधिकारी, मारेगाव, प्रा. हेमंत चौधरी, शैलेंद्रकुमार पाटील अभियंता विद्युत मारेगाव, अर्चना देठे तालुका आरोग्य अधिकारी, मारेगाव, दिपक कळमणकर, विस्तार अधिकारी, म. बा.कल्याण मारेगाव, पुंडलिक काका साठे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ता हे करणार आहे. 
गुणगौरव समितीने प्रथमच एक चांगला भारतीय नागरिक घडावा व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे आणि त्याचा उपयोग देशाच्या प्रगतीसाठी झाला पाहिजे,यासाठी विद्यार्थी गुणगौरव घेण्यात येत आहे. गुणवंत विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचालीस योग्य दिशा मिळावी असा 
 गुणगौरव समितीचा मानस आहे. या कार्यक्रमात तालुक्यातील "विशेष कार्य गौरव" सुद्धा करण्यात येत आहे. या सोहळ्याला तालुक्यातील सर्व विद्यार्थी,पालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सावित्रीबाई फुले गुणगौरव समितीच्या अध्यक्षा सौ. प्रतिभा तातेड यांनी केले आहे.

बेंबळा कालव्याच्या पाण्यामुळे शेती पिकांचे नुकसान

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : गट ग्रामपंचायत सिंदी-महागाव व रामेश्वर परिसरात जुलै शेवट च्या पावसाने तुंबलेल्या बेंबळा प्रकल्पाचे पाणी विसर्ग होऊन शेती सह घरात शिरले. यात नागरिकांच्या जीवनाश्यक वस्तू सह महत्वाचे कागदपत्राचे नुकसान झाले आहे. ही नुकसान भरपाई तात्काळ देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
संततधार पावसाने कालव्याचे विसर्ग होऊन अनेकांच्या घरात शिरले. या भागात जुलैच्या पावसाने अतोनात नुकसान झाले असून, घरात पाणी शिरण्याचे प्रकार दरवर्षी वाढलेले आहेत. या भागातील पावसाळी व बेंबळा प्रकल्प कालव्याचे वाहिन्या रामेश्वर गावाच्या दिशेने वळविल्याने, कालव्याचे वारंवार पाणी गावात घरात शिरून अतोनात नुकसान होत असल्याचे तक्रारी येथील नुकसान ग्रस्त तथा नागरिकांच्या आहे. याबाबत ग्रामस्थांनी संबंधितांना सुचना व लेखी पाठपुरावा करण्यात आला. परंतु याकडे दुर्लक्ष करित असल्याचा आरोपी स्थानिक गावाकऱ्यांनी केला असून, मोठे नुकसान होत असल्याची ग्रामसमस्या सरपंचा निलिमा थेरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपसरपंच अविनाश लांबट यांच्या उपस्थितीत तहसीलदार निलावाड यांना निवेदनातून मांडली.
परिसरात अनेक वर्षापासून बेंबळा प्रकल्पाचे कामे होत आहेत, पण एकही पावसाळा असे नाही की, घरात शेतात पाणी शिरले नाही. त्यामुळे पिकांचे व घरातील आवश्यक वस्तुचे मोठे नुकसान होत आहे. परिणामी प्रशासनाने नुकसान ग्रस्त शेतकरी, तथा मोल मजुरी करणाऱ्या नुकसानग्रस्ताच्या होत असलेल्या नुकसानीचे निवारण तातडीने करावे अशी आग्रही मागणी गट ग्रामपंचायत सिंदी,महागांव व रामेश्वर येथील सरपंचा सौ थेरे यांचे मार्गदर्शनात ग्रामस्थांनी निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी उपसरपंच अविनाश भाऊ लांबट, आशिष खंडाळकर, चंद्रशेखर थेरे, विनोद चहानकर, चंद्रभान बेसेकर, राजू लांडे, संजय देवाळकर, मारोती उरकुडे, दिलीप ताजणे, विनोद एकरे, प्रफुल उरकुडे, प्रफुल पाटील आदींची उपस्थिती होती. 

शेतकऱ्यांच्या खात्यात 14 व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा, पैसे आले नसतील तर 'या' ठिकाणी साधा संपर्क...

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

राजस्थान राज्यातील सिकर या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये पाठवणार असल्याचे सांगितले आहे व यांनी पंतप्रधान किसन सन्मानिधीचा 14 वा हप्ता जारी केला आहे. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून दोन लाख 60 हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवण्यात आले आहेत.

तुमच्या खात्यात पैसे आले की नाही असे तपासा...
 रजिस्टर मोबाईल नंबरवर आलेला संदेश तपासा- पीएम किसानचा चौदावा हप्ता जारी झाल्यानंतर योजनेत नोंदणी केलेला मोबाईल नंबर वर खात्यात आलेले दोन हजार रुपये हस्तांतरित केल्याचा संदेश आलेला असेल तो तपासणे गरजेचे आहे.

खाते बॅलन्स तपासा- समजा तुमच्या मोबाईलवर जर मेसेज आला नसेल तर तुम्ही काही काळ वाट पाहू शकतात. परंतु बऱ्याच कालावधीनंतर देखील संदेश आला नाहीतर तुम्ही एटीएम मध्ये जाऊन मिनी स्टेटमेंट काढू शकता किंवा तुमच्या खात्याचा बॅलन्स चेक करू शकतात. तसेच बँकेत जाऊन पासबुक मध्ये एन्ट्री करून देखील तुमच्या खात्यात दोन हजार रुपये आले की नाही हे तुम्ही तपासू शकतात.

नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून तपासा- जर तुम्ही नेट बँकिंग ची सुविधा वापरत असाल तर तुम्ही तुमच्या खात्यातील शिल्लक किंवा तुमच्या खात्यात दोन हजार रुपये जमा झाली की नाही हे नेट बँकिंग च्या साह्याने ऑनलाईन देखील तपासू शकतात. तसेच तुमच्या बँकेच्या मिस्ड कॉल नंबर वर देखील मिस्ड कॉल देऊन तुमच्या खात्यातील बॅलन्स जाणून घेऊ शकतात.

तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर या हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधा...!

जर बऱ्याच कालावधीनंतर तुमच्या खात्यात पैसे आले नाहीत तर तुम्ही खालील पी एम किसान हेल्पलाइन नंबर वर संपर्क साधू शकता.

➢ पी.एम. किसान टोलफ्री नंबर- 18001155266

➢ पी.एम. किसान नवीन हेल्पलाइन- 011-2430060

➢ पी.एम.किसान लँडलाईन नंबर- 011-23381092, 23382401

➢ पी.एम. किसान हेल्पलाइन नंबर- 155261


डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी १० ऑगस्टपर्यंत अर्ज करावेत

सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर 

मुंबई : अल्पसंख्याक विकास विभागाकडून डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना" सन २०२३-२४ मध्ये राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मदरसांनी जिल्हाधिकारी कार्यालयात १० ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन मुंबई जिल्हा नियोजन अधिकारी यांनी केले आहे.

राज्यातील धर्मादाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत व मुंबई शहर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील मदरसांनी विहित अटी व शर्तींची पूर्तता करुन विहित नमुन्यातील अर्जाचा परिपूर्ण प्रस्ताव, जिल्हाधिकारी, मुंबई शहर, जुने जकात घर, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई ४००००१ यांच्याकडे तत्काळ सादर करावा. विहित अर्जाचा नमुना https://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी ०२२-२२६६०९६७ या क्रमांकावर संपर्क साधावा.

जिल्हाधिकारी कार्यालयाने शासनास प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट, २०२३ पर्यंत असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमातून साजरा

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या नेतृत्वात तालुक्यातील शिरपूर, लालगुडा, व वणी शहरातील अनेक ठिकाणी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात गरजुंना छत्री वाटप व वृक्षारोपण करून महाराष्ट्राचे माजी कुटुंब प्रमुख यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम शहरातील साई मंदिर चौकातील हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा.श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून शिरपूर येथील आरोग्य केंद्रात छत्री वाटप व वृक्षारोपण केले. त्यानंतर व श्री गुरुदेव माध्यमिक विद्यालयात, पोलिस स्टेशन शिरपूर, महावितरण कार्यालयात वृक्षारोपण करण्यात आले. लालगुडा येथेही गरजुंना छत्री वाटप व वृक्षारोपण करण्यात आले. तसेच शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जेष्ठ पत्रकार जब्बार चिनी व परशुराम पोटे, रमेश तांबे यांच्या हस्ते गरजुंना छत्री वाटप, साई मंदिर चौकात गोरगरीब गरजुंना छत्री वाटप करण्यात आले. अशा प्रकारे सामाजिक उपक्रम राबवून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी राजु वाघमारे, अविनाश भुजबळ, सचिन भोयर, लक्ष्मण डावरे, सतिश प्रफुल बोरडे, मयूर नागपुरे, सचिन करमळर, नयन कैराती, शत्रुघ्न मालेकर, राकेश मालेकर, चेतन उलमाले, निलेश ठमके, युवराज नागपुरे, प्रवीण गिरोले, यश बोबडे, राहुल सूर्यवंशी, ललित पोतराजे, मारुती गिरोले, दिपक मत्ते, शंकरजी गुरनुले, प्रवीण खोबरे, श्रीकांत वाढई, किशोर ठाकरे, कुणाल डोंगरकर, गोपाल वाढई, महादेव ठमके, अविनाश कोंगरे आदीची उपस्थिती होती. 

मणिपूर सरकार बरखास्त करा - तालुका काँग्रेस कमिटीची मागणी

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : मणिपूरच्या कलंकित अत्याचाराचे तीव्र पडसाद शहरात उमटले असून २५ जुलैला मोर्चे काढून असंतोष व्यक्त केला आहे. तालुका काँग्रेस कमिटी, कॉम्युनिष्ट पक्ष, शिवसेना (उ. बा. ठा.) वंचित बहुजन आघाडी, अल्पसंख्यांक सेल व जिजाऊ ब्रिगेड संघटनांच्या वतीने २५ जुलै रोजी तीव्र निषेध करण्यात आला आहे. मणिपूरचे सरकार बरखास्त करण्याची व गुन्हेगारांना फाशी द्या, व मणिपूर येथे राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी केली जात आहेत.
गेले दोन महिने मणिपूर जळत आहे. हिंसक हल्ले होत आहेत. दीडशेपेक्षा जास्त नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. या दंगलीमध्ये आदिवासी व महिलांवर अत्याचार केले जात आहेत. त्यामुळे मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना सत्तेवर राहण्याचा एक क्षणभरही अधिकार नाही. त्यांचा ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे किंवा त्यांना बरखास्त केले पाहिजे तसेच पंतप्रधान आणि गृहमंत्री यांना ह्या दंगली, महिलावरील अत्याचार, आटोक्यात आणण्यात अपयश आल्याने गृहमंत्र्यांची हकालपट्टी केली पाहिजे, अशी मागणी तालुका काँग्रेस कमिटी तर्फे तालुका अध्यक्ष मारोती गौरकार, गौरीशंकर खुराणा यांनी तहसीलदार यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना केली आहे. 
या निवेदनावर मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष मारोती गौरकार, सभापती गौरीखुराणा, प्रफुल विखणकर, संतोष मडावी, विजय घोरपडे, शालिक नेहारे, सय्यद समीर, युवक काँग्रेस अध्यक्ष, नयन आसूटकर, माया गाडगे महिला ता. अध्यक्ष, माया पेंदोर, शांता निझाडे, साधना खापणे, गुलाब बरडे, सोनू टेकाम, तुषार पवार, शकुंतला वैद्य, आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत. यावेळी तालुक्यातील असंख्य काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते तथा नागरिक उपस्थित होते. 

असा लाईनमन परत मिळणे नाही; अभियंतांना ग्रामस्थांनी घातले साकडे

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : तालुक्यातील म्हैसदोडका येथील कार्यरत लाईनमन यांची प्रशासकीय कारणास्तव बदली झाली. ही बातमी गावाकऱ्यांना कळताच ग्रामस्थ गहिवरले आणि वेळ न घालवता आज 27 जुलै रोज गुरुवारला महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, मारेगाव येथील कार्यालयावर धडकले. आणि सहा.अभियंता यांना निवेदनातून आग्रही मागणी केली.
भिमेश फुलझेले लाइनमन अत्यंत कुशल, विजेच्या कामात, असो की वारा वादळानंतर उद्भवल्यास वीज पुरवठा ते प्रामाणिकपणे पूर्ववत करतात. रात्री बेरात्री विद्युत पुरवठा कुठेही खंडीत, प्रॉब्लेम आल्यास,सुरळीत करण्यासाठी धावून येतात, ट्रान्सफॉर्मर, मीटर, मीटरिंग उपकरणे, स्थापना, बांधकाम, देखभाल आणि दुरुस्ती ऐका हाकेवर तातडीने कर्तव्य पार पडतात. शिवाय फुलझेले हे मनमिळाऊ स्वभावाचे ते म्हैसदोडका परिसरात सुपरिचित आहे. त्यामुळे ग्रामस्थांची त्यांच्या सोबत एक आपुलकीची भावना जुळली आहे, असा लाईनमन पुन्हा आम्हांला मिळणे नाही,असे उपस्थित नागरिकांनी यावेळी 'सह्याद्री चौफेर'ला बोलतांना सांगितले.
मौजे म्हैसदोडका येथील लाईनमन यांची बदली झाल्यामुळे ग्रामस्थ भावुक झाले, आम्हाला हेच लाईनमन हवे म्हणून त्यांनी आज मा सहा. अभियंता शैलेंद्रकुमार पाटील, म.रा.वि.वि.कं.मारेगाव यांना निवेदनातून साकडे घातले आहे. फुलझेले यांनी सोज्वळ पद्धतीने परिसरातील अनेक नागरिकात आपुलकीचे संबंध दृढ केले. आपल्या कर्तव्यात कसूर न करता सामाजिक बांधिलकी जपत अनेकांना आपलंसं करून आपले कर्तव्य पार पडतात.त्यांच्या कामांना कधीच विसरता येणार नाही. त्यांची ही स्थानांतरण (बदली) त्वरित रद्द करून भिमेश फुलझेले यांनाच म्हैसदोडका येथे कायम द्यावे अशी आग्रही आर्तहाक निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी मारोती तुरणकार, जिवन डाखरे, नारायण सोनेकार,
बालु पारखी, निलेशपारखी, नरेश तुराणकर, रामचंद्र जरिले, 
मारोती वांढरे, विजय घागी, गणेश वांढरे, शुभम हेपट, 
छत्रपती सोनेकार, वामन मटाले, खुशाल पारखी यांचे सह असंख्य गावकरी उपस्थित होते.


आमच्या कर्मचाऱ्यावर अशी प्रेम करणारे ग्रामस्थ बघितले, आभार, छान वाटलं..मी आपणास या बदलीबाबत काही बोलू शकणार नाही. वरिष्ठ काय निर्णय घेतात ते त्यांच्या अधिकारात असून मी आपण सर्वांची मागणी वरिष्ठाकडे मांडतो.

-शैलेंद्रकुमार पाटील
सहा. अभियंता विद्युत वितरण कंपनी, मारेगाव 

कलंकित घटनेतील गुन्हेगारांना फाशी देण्यात यावी- वंचित बहुजन आघाडीची मागणी

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : मणिपूरमध्ये गेल्या दोन अडीच महिन्यापासून महिलांवर अत्याचार करून त्यांना जीवानीशी ठार मारल्याच्या घटना घडत आहे. प्रचंड हिंसाचार सुरू आहे. शेकडो लोकांचे मृत्यू झाले आहे. हजारो लोक बेघर आहे. लहान मुलामुलींचे अतोनात हाल सुरू आहे. त्यामुळे या कलंकित घटनेचा वंचित बहुजन आघाडी तीव्र शब्दात निषेध करत असून घटनेतील गुन्हेगारांना फाशी देण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. 
जमाव जेव्हा एखाद्या महिलेला रस्त्यावर निर्वस्त्र करतो आणि जाहीरपणे त्या महिलांची धिंड काढतो तेव्हा आमचा प्रधानमंत्री त्यावर काहीही बोलत नाही, मणिपूर सरकार व केंद्र सरकार हा अत्याचार रोखण्यास अपयशी ठरत असल्यामुळे मणिपूर सरकार बरखास्त करून येथे राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी वंचित मागणी आहे.

देशात असे निर्लज वर्तणूक करणाऱ्यावर कडक कायदे कारवाई फाशीची शिक्षा झाली पाहिजे तरच अशा प्रकारच्या कृत्याला आळा बसेल अन्यथा अशा प्रकारचे मुकदर्षकपणे पाहत रह्ययचे. हे आपल्या सुसंस्कृत देशाला लाजिरवाणे आहे. तात्काळ बंदोबस्त करून तेथील नागरिकांना संरक्षण देण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा गर्भीत ईशारा वंचित बहुजन आघाडी च्या वतीने निवेदनातून सरकार ला दिला आहे.
तसेच यवतमाळ जिल्ह्यातील पाथरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली सोबतच मिरज येथे कमानी निमित्त झालेल्या त्या घटने संदर्भात तात्काळ कारवाई व्हावी यासाठी वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभा च्या वतीने तहसीलदार यांचे मार्फत महामहिम राष्ट्रपती यांना करण्यात आली आहे.

निवेदन देताना वंचित चे तालुका अध्यक्ष गौतम दारुंडे, प्रफुल आदे, संजय जिवने,ता.उपाध्यक्ष, प्रफुल भगत, भगवान इंगळे, अनंता खाडे, रविंद्र तेलंग, विनय गजभिये, लक्ष्मीकांत तेलंग, रमेश चिकाटे, गौतम मालखेडे, विजय खाडे, नूतनताई तेलंग, सपनाताई वनकर, सुधाकर भगत आदीसह विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. 

शेतकरी बांधवानो आज होणाऱ्या पीएम किसान संमेलनात सहभागी व्हा - आत्मा समितीचे अध्यक्ष प्रसाद ढवस यांचे आवाहन



सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : अमृतकाळात देशातील गावे, देशाच्या शेतकऱ्यांच्या सामर्थ्यात वाढ करण्यासाठी आता देशाच्या सहकार क्षेत्राची भूमिका खूप मोठी ठरणार आहे. सरकार आणि सहकार एकत्रित होऊन, विकसित भारत, आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाला दुप्पट मजबुती देतील. याच अनुषंगाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पीएम 'किसान संमेलन' हा महासोहळा सीकर राज्यस्थान येथे आज दि.27 जुलै 2023 रोजी संपन्न होत आहे. या संमेलनाला तालुक्यातील शेतकरी बांधवांना सहभागी होण्याचं आवाहन आत्मा समितीचे अध्यक्ष प्रसाद ढवस यांनी केले आहे.
देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून 2019 आली शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य मिळावे, या उद्दात हेतूने सुरु करण्यात आलेल्या "पीएम किसान" योजनेच्या 14 व्या हप्त्याचे एका क्लिक वर थेट बँक खात्यावर वितरण व प्रधानमंत्री देशातील तमाम शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. सरकार ने डिजिटल इंडियाद्वारे पारदर्शकतेत वाढ केली, थेट लाभ प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचवला. आज देशातील गरीबातील गरीब व्यक्तीला देखील याची जाणीव झाली असताना, सर्वसामान्य लोक, आपले शेतकरी, आपले पशुपालक यांना दैनंदिन जीवनात देखील याचा अनुभव मिळणे आणि त्यांनी देखील हे सांगणे अतिशय गरजेचे आहे. 
आज डिजिटल व्यवहारांसाठी जगात भारताची ओळख निर्माण झाली आहे. शासनाच्या विविध योजनेचे लाभ थेट खात्यात वितरण होत आहे. यापुढेही काम जलदगतीने करण्याचा केंद्र सरकार चा मानस आहे. त्यामुळे या आयोजित समारंभास सहभागी होऊन या महासोहळ्याचे साक्षीदार व्हा, हा सोहळा ऑनलाईन वेब लिंक द्वारे पाहता येणार आहे. या सोहळ्याच्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे शेतकरी धोरणाचे काय ते समजून घेता येणार आहे. त्यासाठी आज सकाळी 11 वाजता 
 https://pmevents.ncog.gov.in/या दिलेल्या वेबलिंक वर जॉईन व्हावे असे आवाहन आत्मा समिती मारेगावच्या वतीने करण्यात येत आहे.