Page

दारव्हा येथे मा.आ संजयभाऊ राठोड यांची पाणीटंचाई निवारणार्थ आढावा सभा सपन्न


चेतन पवार | सह्याद्री चौफेर 

दारव्हा : येथील शासकीय विश्रामगृह येथे दारव्हा दिग्रस नेर मतदार संघाचे लाडके आमदार मा.संजय भाऊ राठोड माजी वनमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी दारव्हा तालुक्यातील पाणी टंचाई निवारणार्थ आढावा सभा घेतली यावेळी दारव्हा तालुक्यातील सर्व गावांमध्ये शासनाच्या विविध योजनेतून जसे राष्ट्रीय पंप योजना जल जीवन मिशन खनिज विकास निधी जिल्हा नियोजन निधी तसेच संपूर्ण तालुक्यात सद्यस्थितीत चालू असलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला व पाणी टंचाई निवारणार्थ सर्व उपाययोजना तातडीने पूर्ण कराव्यात व समस्त तालुक्यातील पाणी पुरवठा सुरळीत व्हावा अशा संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

यावेळी सौ.कालींदाताई पवार माजी जिल्हा परिषद अध्यक्षा,श्रीधर मोहोड माजी शिक्षण व आरोग्य सभापती, सुधीर पाटील उपविभागीय अधिकारी दारव्हा, सुभाष जाधव तहसीलदार, राजीव शिंदे गटविकास अधिकारी दारव्हा,उपविभागीय अभियंता पाणीपुरवठा कवाडे साहेब, महावितरणचे कवाडे साहेब, डी.वा. ई.राठोड साहेब, माजी पंचायत समिती सभापती सौ.सुनीता राऊत, उपसभापती नामदेव जाधव,माजी उपसभापती सौ.उषाताई चव्हाण, शहर प्रमुख राजू दुधे तथा हरिभाऊ लिंगणवार व समस्त पटवारी, सचिव सरपंच,उपसरपंच व समस्त पदाधिकारी उपस्थित होते.

खळबळजनक: शेतकऱ्यांचा सामूहिक गळफास घेऊन जीवनयात्रा संपावण्याचा प्रयत्न


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : तालुक्यात खळबळ उडवून देणारा प्रकार हटवांजरी येथे शुक्रवारच्या रात्री घडला. चक्क! पिडीत शेतकऱ्यांनी सामूहिक गळफास घेऊन जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केल्याने प्रशासनाची पुरती भंबेरी उडाली. त्यामुळे हटवांजरी येथील जमिनीचा मोबदला प्रकरणाला वेगळे वळण आले आहे. 

तालुक्यातील सराटी, हटवांजरी शिवारात १३ वर्षांपूर्वी सिंचन विभागाने प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. यात येथील किमान चोवीस शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरेदी करीत अधिग्रहीत करण्यात आल्या. यातील केवळ ६ जणांना नव्या निकषानुसार चौपट पटीने नुकसान भरपाई अदा करण्यात आली. उर्वरित शेतकऱ्यांची जमीन तोडक्या दरात खरेदी केल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याने पिडीत शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली.

सदरील प्रकरण न्यायप्रविष्ट असतांना जिल्हा सिंचन प्रशासनाने शुक्रवारला थेट जेसीबी मशीनच्या सहाय्याने खोदकाम सुरू करताच बघता बघता दोन शेतकऱ्याने चक्क! गळफास लावला. उपस्थितात आरडाओरड होताच ग्रामस्थांच्या समयसुचकतेने समोरील अनर्थ टळला. या घटनेने प्रशासनात कमालीची भंबेरी उडाली मात्र, स्थानिकात प्रचंड संतापजनक वातावरण निर्माण झाले आहे.

संतप्त प्रकरणाची माहिती मिळताच आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी घटनास्थळी भेट देत सदरील प्रकरण शासन दरबारी मांडण्यात येऊन शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्यासाठी शेतकऱ्यांना आश्वस्थ केले. तूर्तास प्रकरण शांत करण्यात आले असले,तरी प्रशासनाच्या बेताल भूमिकेवर शेतकऱ्यांच्या मनात असंतोषाची भावना खदखदत आहे.

सूरमाज फाउंडेशनच्या वतीने रेशन किटचे वाटप


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

चोपडा : रमजानच्या या पवित्र महिन्यात तुम्ही जे काही चांगले काम कराल, त्यामध्ये आम्हाला ७०% अधिक गुण मिळतात. आणि ही विचारधारा डोळ्यासमोर ठेऊन सूरमाज फाऊंडेशनचे डॉ. मोहम्मद जुबेर शेख यांनी 29/04/2022 आणि 30/04/2022 तारीखला अक्कलकुवा शहरातील, मोठी राजमोवी, मीताफळी, सीता नगर, संजय नगर, सुरापाडा, सिकफळी, ताकवा मस्जिद, कुरेशी वाडा, बाजारपेठ, दर्गा रोड, हवालदार फली मकरणी फल्ली, अशा अनेक भागात, सर्व धर्माचे, गरीब, आणि गरजू लोकांना खाद्यपदार्थ कीट स्वरूपात वाटले.

किटमध्ये तांदूळ, तेल, तुवर डाळ, साखर, चहा, साबण, धने, हळद आणि इतर अनेक दैनंदिन वस्तूंचा समावेश होता. जे एक कुटुंब सुमारे 8 दिवस खाऊ शकते. वायरमन समीर पठाण, ताहीर शेख, तयेब मकरानी, जमील शेख, आदिल मकरानी, इर्शाद मेमन, मौलाना सैफुल्लाह मकरानी, हाफिज अब्दुल मतल्ली मकरानी, आकिब मकरानी या सर्व बांधवांनी हे काम पूर्ण करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. त्यामुळे डॉ मोहम्मद जुबेर शेख यांनी त्या सर्वांचे मनापासून आभार मानले.
(गरजूना खाद्यकिट वाटप करताना सुरमाज फाउंडेशन टीम)

हाजी उस्मान शेख (अध्यक्ष सूरमाझ फाऊंडेशन) यांचे हे कार्य स्वीकारावे आणि त्यांच्या सर्व साथीदारांना अशाच प्रकारे सहभागी होण्यासाठी आम्ही अल्लाहकडे प्रार्थना करतो.


राज्य शासनाच्या विकासकामांची माहिती देणाऱ्या प्रदर्शनांचे आयोजन; राज्याच्या विभागीय स्तरावर १ मे रोजी महाराष्ट्र दिनी उद्घाटन


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

मुंबई : कोविड महामारी, महापूर, चक्रीवादळे अशा विविध आपत्तींना तोंड देत राज्य शासनाने राबविलेल्या विविध लोककल्याणकारी योजना आणि विकासकामांची माहिती देणाऱ्या सचित्र प्रदर्शनाचे मुंबई आणि मुंबई उपनगरसह राज्याच्या सर्व विभागीयस्तरावर आयोजन करण्यात आले आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या या प्रदर्शनांचे उद्या दि.1 मे रोजी उद्घाटन होणार आहे.

महाविकास आघाडी सरकारने विविध विकासकामे केली असून कोरोना महामारी आणि अनेक नैसर्गिक आपत्तीचा सामना करीत सर्वसामान्यांना मदतीचा हात दिला आहे. राज्य शासनाने सर्वसामान्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी विविध योजना राबविल्या असून या योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी, या उद्देशाने राज्यातील विविध ठिकाणी ही प्रदर्शने आयोजित केली आहेत. मुंबईतील वरळी सी-फेस येथे कॉमन मॅन पुतळा परिसरात आणि रमाडा हॉटेल मागील जुहू बीच येथे प्रदर्शने भरविण्यात येणार आहेत.
दि. 1 ते 5 मे, 2022 या कालावधीत 5 दिवस ही प्रदर्शने सर्वसामान्यांसाठी दिवसभर खुली राहणार आहेत.

'दोन वर्षे जनसेवेची, महाविकास आघाडीची' या मोहिमेअंतर्गत आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते वरळी सी फेस येथे तर मुंबई उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते जुहू बीच येथे होणार आहे. मुंबई आणि मुंबई उपनगर सह ठाणे, नाशिक, औरंगाबाद, पुणे, अमरावती आणि नागपूर येथे याच कालावधीत या प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले असून संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री यांच्या हस्ते या प्रदर्शनांचे उद्घाटन होणार आहे.

शासनाच्या जनकल्याणकारी योजनांची सचित्र माहिती असलेले हे प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांनी आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन माहिती व जनसंपर्कचे प्रधान सचिव तथा महासंचालक दीपक कपूर यांनी केले आहे.


ग्रामपंचायत पांढूर्णा आदर्श येथीलसूक्ष्म नियोजन योजनेकरिता निवड

चेतन पवार | सह्याद्री चौफेर 

दारव्हा : तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनाअंतर्गत दश वार्षिक नियोजन/आराखड्यासाठी २०२२-२०२३ करिता पांदुर्णा आदर्श/ग्रामपंचायतीची निवड झाली असून त्या आराखड्यामुळे "मागेल त्याला काम" ही लक्षात घेऊन गावातील प्रत्येक कुटुंबाला लखपती करण्यासाठी पाहिजे ते समृध्दी बजेट घेणे आवश्यक आहे. चमु निवासी दिवसाची कुटुंब सर्वेक्षण कारुन गावफेरी, शिवरफेरी व गावासभा घेऊन दहा वर्षाचा आराखडा बनविण्यात आला आहे. ह्या आराखड्याचा योग्य तऱ्हेने अंमलबजावणी झाल्यास “ मी समृध्द तर गाव समृध्द, गाव समृध्द तर मी समृध्द, पर्यायाने माझा महाराष्ट्र समृध्द" ही संकल्पना साध्य होणार आहे . 

यावेळी पी.एम. डांबकर प्रामुख्याने ह्या आराखड्यासाठी एपीओ कलीम शेख, पीटीओ तायडे, अभियंता संजय रामटेके, कसंबे, राठोड, संघटक ऑपरेटर ठोंबरे तसेच गावातुन सरपंच रत्नदीप यादवराव पवार, सचिव संतोष पराते, तलाठी सुर्यवंशी, कोतवाल किरण मोरे उपसरपंच शितल पांडव, सदस्य नारायण आरु, वेणुताई लंगडे, आरती गडपायले, वंदना राठोड , सोपान आरु, नितीन जाधव, केवल पवार, रोहित राठोड, आरती देशमुख आदी नागरिक यावेळी उपस्थित होते.

या उपक्रमाद्वारे पांढर्णा आदर्श गावाची पुन्हा आदर्श ग्रामपंचायतीकडे वाटचाल होणार निश्चित .

चिंचमंडळ ग्रामपंचायत सदस्याच्या पती विरोधात विविध कलमानव्यये गुन्हे दाखल तर, सचिवावर विनयभंगाची तक्रार

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : तालुक्यातील चिंचमंडळ ग्रामपंचायत ही काहींना काही कारणास्तव वादाच्या भोवऱ्यात नेहमी चर्चेत असते. अशीच काहीशी चर्चा सध्या तालुक्यात ऐकायला मिळत आहे. महिला सदस्यांच्या पती आणि सचिवांच्या कुस्ती ची चित्रफीत सोशल मीडियावर  वायरल होतांना दिसत आहे. या प्रकरणात पोलिसात परस्पर विरोधी तक्रार दिल्याचे माहिती आहे. 

सविस्तर असे की, चिंचमंडळ येथे मासिक सभा घेण्यासाठी गेलेल्या ग्रामसेवकाला मासिक सभेचा वेळ निघून गेल्यानंतर सरपंच व एक महिला सदस्य हजर झाले. महिला सदस्यांनी पाणी प्रश्न व यापूर्वी माहितीच्या अधिकारात मागविलेल्या कागदपत्रांची पूर्तता केली नसल्याचे जाब विचारण्यात आला. मात्र, यावर समाधान झाले नसल्याने महिला सदस्याचे पती सचिवास भेटण्यास गेले. यावेळी दोघात शाब्दिक खडाजंगी होत महिला सदस्यांच्या पतीने थेट सचिवांच्या कानशिलात मारल्याची तक्रार ग्रामसेवक किशोर खरात यांनी मारेगाव पोलिसात केली.

एका महिला सदस्यांनीही ही ग्रामसेवकाविरुद्ध विनयभंगाची तक्रार पोलिसात दाखल केल्याने ग्रामसेवक खरात यांचेवर विनयभंगाचा तर शासकीय कामात अडथळा निर्माण व अनु.जाती / जमाती प्रतिबंधक कायदा अंतर्गत सातपुते यांचेवर मारेगाव पोलिसात शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. 

शुक्रवार (ता.२९) रोजी चिंचमंडळ ग्रामपंचायतच्या मासिक सभेचे दुपारी १२ वाजता आयोजन करण्यात आले होते. या सभेकरिता ग्रामसेवक किशोर चिंदाजी खरात व ग्रामपंचायत कर्मचारी वेळेपूर्वी उपस्थित होते. मात्र, विहित वेळेतील ग्रामसभा सदस्यांच्या अनुपस्थिने झाली नाही.
दरम्यान, या मासिक सभेकरिता ग्रामपंचायत सदस्या भाग्यश्री दिवाकर सातपुते या उशीरा पतीसह उपस्थित झाल्या. यावेळेस ग्रा.पं. सदस्या भाग्यश्री सातपुते यांनी जुन्या माहिती अधिकारातील कागदपत्रे आणि अलीकडेच गावातील पेटत असलेला पाणी प्रश्नांवर शाब्दिक खडाजंगी झाली. यावेळेस सदस्य सातपुते यांचे पतीने शासकीय कामात अडथळा निर्माण करित मारहाण केल्याची तक्रार ग्रामसेवक किशोर खरात यांनी पोलिसात तक्रार दिली. तर महिला सदस्याने ग्रामसेवकाने वाईट हेतूने हात पकडत विनयभंग केल्याची तक्रार पोलिसात दिली.

तक्रारीनुसार ग्रामसेवक किशोर खरात यांचेवर विनयभंगाचा तर, दिवाकर सातपुते यांचेवर शासकीय कामात अडथळा आणि अनु.जाती/जमाती प्रतिबंधक कायद्याअंतर्गत मारेगाव पोलिसात शुक्रवारला रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला.

पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांचे मार्गदर्शनात मारेगाव पोलिस करित आहेत.

अवैध सावकारी लूट खपवून घेतली जाणार नाही – सहकारमंत्री बाळासाहेब पाटील


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

नांदेड : अवैध सावकारी लूट थांबविण्यासाठी कायदेविषयक जेवढे प्रावधान आहेत त्याचा काटेकोर वापर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करून याला आळा घातला पाहिजे. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी अवैध सावकारांनी कब्जा करून ठेवल्या आहेत, हडप केलेल्या आहेत त्या जमिनी मूळ मालक असलेल्या शेतकऱ्यांना परत करण्याबाबत कायदाचा प्रभावी वापर करावा, असे निर्देश राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी जिल्हा उपनिबंधकांना दिले.

नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रादेशिक सहसंचालक (साखर) सचिन रावळ, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. मुकेश बारहाते, मार्केटिंग फेडरेशनचे उपसरव्यवस्थापक वीर, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, बाजार समितीचे सचिव व वरिष्ठ अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

जिल्ह्यातील अतिरिक्त ऊसाचा गाळपाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन स्तरावर निर्णय घेण्यात आलेला आहे. हे गाळप 25 मे पूर्वी पूर्ण होण्याबाबत योग्य ती दक्षता व नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रादेशिक सहसंचालक सचीन राव यांना दिल्या. जिल्ह्यातील पीक कर्ज वाटपासाठी 2021-22 या आर्थिक वर्षात एकुण लक्षांकाच्या 75 टक्के कर्ज वाटप झाले आहे. जिल्हा बँकेने लक्षांकाच्या 87 टक्के कर्ज वाटप केले आहे. तसेच जिल्हा बँकेतर्फे दोन एटीएम व्हॅन व नवीन एटीएम कार्ड वाटप तसेच एटीएम उभारणीसाठी पुढाकार घेतला. प्रतिकुल परिस्थितीतही जिल्हा बँकेने 12 कोटी रुपयांचा नफा कमावला याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

बाजार समितीच्या निवडणुका या वेळेवर झाल्या पाहिजे. याचबरोबर बाजार समित्यांनीही उत्पन्न वाढविण्यासाठी विविध मार्गाचा अवलंब करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. नांदेड येथे सहकार खात्यातील सर्व संबंधित कार्यालयांसाठी एक प्रशस्त इमारत, सहकार संकुल उभारणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा, असेही त्यांनी उपनिबंधक नांदेड यांना सांगितले.

जीव धोक्यात घालून सरपणासाठी महिला जंगलात...

चेतन पवार |सह्याद्री चौफेर 

यवतमाळ : दारव्हा तालुक्यात दिवसेंदिवस स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचे दर गगनाला भिडत आहे.गरिबाचे रॉकेल तर गायब झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील गोर गरीबांना आता पुन्हा एकदा चुली कडे वळावे लागत आहे.चुल म्हटले की सरपण आवश्यक आहे.हे सरपण गोळा करण्यासाठी वन्य प्राण्यांच्या दहशतीत ग्रामीण भागातील महिला भल्या पहाटेच जंगल परिसराकडे जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. 
    
सकाळी लवकर उठून इतर सर्व कामे बाजूला सारून जंगलात जाऊन वाळलेले सरपण गोळा केले जाते.त्यानंतर त्यांची माेळी बांधून घरी आणली जाते.एका महिन्यातच पावसाळ्याला सुरुवात होणार आहे.अश्यावेळी उन्हाळ्यातच सरपण गोळा करून वाळवुन घरात अथवा गोठ्यात पावसाळ्यासाठी जमा करून ठेवले जात आहे. हे सरपण गोळा करण्यासाठी जंगल व शेतालगत फिरावे लागते, अशा वेळी अनेक संकटाचा सामना सरपण गोळा करणाऱ्या महिलांना करावा लागतो.यामध्ये वाघ, रानडुक्कर, अस्वल,कोल्हा,आदी वन्य प्राण्यांचा हल्ला होण्याची भीती असते.सरपण गोळा करताना आशा वन्यप्राण्यांच्या हल्ला करण्याच्या अनेक घटना तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये घडल्या आहेत.या सर्व संकटांचा सामना करुण उन्हातान्हात उपाशीपोटी महिला आपल्या कुटुंबासाठी सरपण गोळा करून घरी आणताना दिसून येत आहेत.

एका माेळीसाठी दिवसभर भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे. बरेचदा सरपण हे जवळपास मिळत नसल्याने पायपीट करीत अनेक किलोमीटरपर्यंत महिलांना भटकंती करावी लागत आहे. कधी-कधी ५ ते १० किलोमीटर अंतर तुडवूनही सरपण मिळत नाही. अशावेळी केव्हा निराशा हाती लागते. अनेकदा शेतमालकाच्या तर कधी वन अधिकाराच्या रोषाला बळी पडावे लागते.

तेरे शहर का माहोल कुछ इस तरह था,के वो होश उडाते गये और हम होश में नही थे - शंकर घुगरे

सह्याद्री | चौफेर न्यूज 


तेरे शहर का
माहोल कुछ
इस तरह था,
के वो होश
उडाते गये और
हम होश मे
नही थे!!

वणी : विदर्भ साहित्य संघ शाखा वणी व नगर वाचनालय च्या संयुक्त विद्यमानाने कवी कट्याचे चौथे पुष्प कवी शंकर घुगरे व कवयित्री मीनाक्षी गोरंटीवार यांनी गुंफले. यात शंकर घुगरे यांनी 'तेरे शहर का माहोल' या बहारदार रचनेने सुरवात करून तर मीनाक्षी गोरंटीवार यांनी ताला सुरात बहारदार कविता सादर केल्या.

या कवी कट्याची प्रस्तावना नगर वाचनालय चे अध्यक्ष मा. श्री माधवरावजी सरपटवार यांनी केली कवी कट्याचे अध्यक्षीय स्थान राजेश महाकुलकार यांनी भूषवले.

यावेळी वि. सा. साहित्य संघ चे अध्यक्ष डॉ. दिलीप अलोणे तर,सचिव प्रा.अभिजित अणे नगर वाचनालयाचे सचिव गजानन कासावार होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सपना पावडे यांनी केले.

 कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रमोद लोणारे देवेंद्र भाजीपाले राम लिंगावर यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला रसिक वर्ग मोठया संख्येने हजर होता.

गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी व जवानांच्या पाठीशी संपूर्ण सरकार – उपमुख्यमंत्री अजित पवार


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील विकासासाठी शरद पवार मुख्यमंत्री होते तेव्हा तसेच आर.आर. पाटील पालकमंत्री होते तेव्हापासून ते आजपर्यंत आम्ही या जिल्ह्याचा प्राधान्याने विचार केला आहे. येथील विकास कामांसाठी तसेच जवानांच्या पाठीशी गृह विभाग, अर्थ विभाग आहेच. परंतू संपूर्ण कॅबिनेट संपूर्ण सरकार यासाठी प्रयत्न करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गडचिरोली येथे कार्यक्रमात दिली. ते पोलिस विभागातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी आले होते. सी- 60 जवानांच्या सन्मान कार्यक्रमावेळी ते बोलत होते.

अर्थमंत्री या नात्याने आम्हाला गृह विभागाकडून सी-60 जवानांच्या भत्त्यामधील वाढीचा प्रस्ताव आला होता तो तातडीने मंजूर केला. तसेच यापूर्वी नक्षल भागात कार्यरत अधिकारी कर्मचारी यांच्या वेतनातही वाढ केली आहे. आता गडचिरोलीत सैन्य दलातील दवाखान्याच्या धर्तीवर सुसज्ज दवाखाना निर्माण करण्यास मंजूरी दिली आहे. आरोग्य प्रतिपूर्ति देयकाच्या यादीत अकरा नवीन आजारांचा समावेश केला आहे. अशा प्रकारे जवानांची सुरक्षा, चांगले आरोग्य व त्यांचे चांगले राहणीमान यासाठी प्रयत्न करु असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

यावेळी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार धर्मरावबाबा आत्राम, जिल्हाधिकारी संजय मीणा, पोलीस उप महानिरिक्षक संदीप पाटील, पोलीस अधिक्षक अंकित गोयल, जिल्हा परिषद सदस्या भाग्यश्रीताई आत्राम व सी-60 जावानांची पथकं उपस्थित होती. सी-60 जवानांच्या कार्यक्रमात आतापर्यत विविध चकमकीत जवानांच्या चांगल्या योगदानाबद्दल प्रशस्तीपत्रक देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना सन्मानीत केले. यावेळी प्रत्येक जवानांशी मंचावर आल्यावर आदराने विचारपूस केली व कौतुकाची थाप मारली. यावेळी बोलतांना ते म्हणाले मर्दीनटोला येथील नक्षल चकमक ही ऐतिहासिक घटना आहे. याची नोंद पंतप्रधानांनी घेतली. मुख्यमंत्री यांनी विशेष कौतुकही केले. राज्यात जिल्ह्यात शांतता अखंड रहावी म्हणून तुम्ही आहोरात्र मेहनत घेता यासाठी मी सर्व सी-60 जवानांना सलाम करतो असे गौरवोद्गार त्यांनी बोलतांना काढले.

गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी नक्षलवाद्याविरुद्ध लढत असतांना आता सी-60 जवानांची नवीन ओळख निर्माण झाल्याचे म्हटले. नक्षलवाद्यांचा बिमोड करणारी टिम म्हणून तुमच्याकडे पाहिले जाते. नक्षल चळवळीतील लोकांमध्येही या सी-60 पथकाचा दरारा निर्माण झाला असल्याचे ते यावेळी म्हणाले. कर्तव्याला श्रेष्ठ माननाऱ्या जवानांसाठी आम्ही त्यांच्या भत्त्यामध्ये वाढ केली. आता पुढील मागण्याही लवकरच पुर्ण करु यासाठी राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांना याबाबत सविस्तर माहिती देणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन अतिरिक्त पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी केले. कार्यक्रमाला उपस्थितांचे आभार पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी मानले.
रेल्वे मार्गाच्या कामासाठी मुंबईत बैठकीचे आयोजन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात रेल्वे मार्गावर भाष्य केले. यासाठी जिल्हा‍धिकारी, पोलीस अधीक्षक यांना उद्देशून पुढील अडचणी सोडविण्यासाठी तातडीने मुंबईला बैठक आयोजित करु असे सांगितले. यावेळी अडचणी, निधी, तसेच कामे वेळेत कशी पूर्ण होतील याबाबत विचार विनिमय करु, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

कटेझरी पोलिस स्टेशनच्या नवीन इमारतीचे उद्घाटन

महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरच्या अतिदुर्गम गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील कटेझरी पोलिस स्टेशनच्या नवीन इमारतीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील कटेझरी गावाच्या परिसरातील नागरिकांशी, आरोग्य सेविका, आदिवासी बांधव, बालकांशीही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी साधला संवाद. यावेळी उपस्थित मुलांशी त्यांनी शालेय स्तरावरील गप्पा मारल्या. तसेच नागरिकांनाही शेतीविषयक प्रश्न विचारले. दैनंदिन स्वरूपात आदिवासी बांधवांचा दिनक्रम कसा चालतो याबाबत ही विचारणा केली. उपस्थितांना उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी विविध साहित्याचे वाटपही करण्यात आले.

आपल्या मराठवाड्याचा माणूस कोविडसाठी देशाचे नेतृत्व करतो याचा अभिमान – पालकमंत्री अशोक चव्हाण


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

नांदेड : मराठवाड्यातला आपला भूमिपुत्र कोरोना सारख्या आजाराच्या संशोधनासाठी, या आजारातून सर्व देशवासियांना वाचविण्यासाठी संशोधनात स्वत:ला मग्न करून घेतो, या आजाराशी लढायचे कसे, या आजारापासून सुरक्षित राहायचे कसे याचे शास्त्रोक्त व सुत्रबद्ध पद्धतीने लोकांना बळ देतो, कोरोनासह आजवर असंख्य जीव घेण्या आजारातून नव्या लसीचे संशोधन देतो, असे आपले ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मश्री सन्मानित डॉ. रमण गंगाखेडकर यांच्याप्रती प्रत्येकाला सार्थ अभिमान असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या जीवन गौरव पुरस्काराची त्यांच्या माध्यमातून जी भव्य सुरूवात झाली आहे, विशेषत: या निवडीने पुरस्काराचाही गौरव झाल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.

नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या रौप्य महोत्स सोहळ्याचे उद्घाटन व श्रद्धेय डॉ. शंकररावजी चव्हाण जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. कुसूम सभागृह येथे आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यास पुरस्काराचे मानकरी पद्मश्री सन्मानित ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रमण गंगाखेडकर, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, आमदार अमर राजूरकर, आमदार मोहनअण्णा हंबर्डे, महापौर जयश्री पावडे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी, उपमहापौर अब्दुल गफार अ. सत्तार, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता बस्वराज पांढरे, मनपा स्थायी समितीचे सभापती किशोर स्वामी, अपर्णा नेरळकर, पदाधिकारी यांची विशेष उपस्थिती होती.

महानगरपालिका 25 वर्षांचा एक टप्पा पार पाडत असतांना मला एका आठवणीचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. ती आठवण आजही तेवढीच ताजी आहे. राज्याच्या मुख्यमंत्री पदी तेंव्हा मनोहर जोशी होते. नांदेड वाघाळा महानगरपालिकेची घोषणा त्यांनी करून या महानगराच्या विकासाला नवे पर्व सुरू करून दिले. या विकासाच्या टप्प्यात भारताचे तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी गुरूत्ता गद्दी सोहळ्या निमित्त विविध सेवा-सुविधांसाठी 2 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. त्यानंतर आता पालकमंत्री म्हणून, राज्याचा सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून निधीसाठी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आग्रह धरला. त्यांनीही जिल्ह्याच्या विकासासाठी जी पाठराखण केली त्यामुळेच आपण पुन्हा या महानगराच्या विकासासाठी सुमारे सातशे ते आठशे कोटी रुपयांची कामे करू शकत आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नांदेडकरांच्यावतीने मी आभार मानतो या शब्दात त्यांनी नांदेडच्या विकासाला अधोरेखीत केले. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या पहिले नगराध्यक्ष म्हणून कारकिर्दपासून ते आजवर जो मैलाचा टप्पा आपण गाठू शकलो त्यात सर्वसामान्य लोकांचेही योगदान अधिक आहे, या शब्दात त्यांनी नांदेडकरांचे आभार मानले.

कोरोनाचा काळ आठवला की, आजही अंगावर शहारे येतात. पहिल्या लाटेतच मी बाधित झालो. उपचारासाठी मुंबईला जातांना लोकांच्या मनात एक धास्ती होती. अनेकांना ही भेट शेवटीचीच आहे की काय इथपर्यंत भीतीने गाठले होते. अशा काळात नांदेडचा भूमिपुत्र संपूर्ण देशाला कोरोनातून बचावासाठी दिलासा देतो, या आजाराची माहिती सांगून लोकांना धीर देतो, ही बाब अशाकाळात औषधापेक्षाही अधिक परिणामकारक होती, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगून पद्मश्री डॉ. गंगाखेडकर यांच्या कार्याला अधोरेखित केले. या काळात सगळ्यांना खूप काही सोसावे लागले. जिल्हा अधिक सुरक्षित रहावा यावर आम्ही नंतर अधिक दक्ष राहिलो. संपूर्ण जिल्हाभर कोविड बाधितांवर उपचार करण्यासाठी केंद्र उभारण्यावर आम्ही भर दिला. नांदेड महानगर हे वैद्यकीय क्षेत्रात प्रगतशील असल्याने स्वाभाविकच अप्रत्यक्षरित्या त्याचा ताण नांदेड वर आला. शेजारच्या जिल्ह्यातून रुग्ण येथे आले. अशा स्थितीत संपूर्ण जिल्हा प्रशासनची टीम, वैद्यकिय महाविद्यालय, महानगरपालिका, आरोग्य विभाग यांनी जे काम केले त्याला तोड नाही. एक जबाबदारीचे पर्व कोरेाना काळात आपण देऊ शकलो, याचा आवर्जून उल्लेख पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केला.

नांदेड महानगरपालिका, जिल्हा प्रशासन हे वाढत्या महानगराच्या गरजा लक्षात घेऊन काम करत आहे. यात अनेक पातळीवरचे प्रश्न आहेत. नागरीकरणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासमवेत ज्या समतेचा आग्रह डॉ. रमण गंगाखेडकर यांनी घेतला आहे त्या जेंडर समानता, तृतीयपंथीयांना अधिकार आदी नाजूक प्रश्न जिल्हा प्रशासनातर्फे संयमाने हाताळल्या जात असल्याचे सांगून लोकाभिमुख प्रशासनाची त्यांनी व्याप्ती व जबाबदारी स्पष्ट केली. डॉ. रमण गंगाखेडकर हे नव्या पिढीचे प्रेरणास्थान आहेत. मराठवाड्यातील भूमिपुत्र म्हणून आम्हाला त्यांचा अभिमान जरूर आहे. त्यांचे विचार नव्या पिढीपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहचले जावेत, त्यांचे मार्गदर्शन त्यांना मिळावे यासाठी वेळोवेळी निमंत्रीत केले जाईल, असे ते म्हणाले.

शब्द निट सापडत नाहीत. कोणी सन्मान केला की जबाबदारीमध्ये आणखी वाढ होईल याची एक नकळत धास्तीही राहते. प्रत्येकांच्या मनाशी जवळकिता साधणाऱ्या या साध्या शब्दातून ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांनी आपल्या साध्या जीवन शैलीसह कर्तव्य तत्पर विचारसरणीला प्रवाहित केले. डॉ. शंकरराव चव्हाण जीवन गौरव पुरस्कार स्विकारल्यानंतर ते बोलत होते. मनाच्या भावूक अवस्थेला सावरत त्यांनी उपस्थितांशी साधलेला संवाद हा प्रत्येकजण टिपून घेत होता. जिल्हा परिषद शाळा, बिलोली, धर्माबाद येथील विज्ञान महाविद्यालय, अंबेजोगाई येथील वैद्यकिय महाविद्यालय आणि औरंगाबाद येथील वैद्यकिय महाविद्यालयातील सर्व शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करीत हा पुरस्कार अप्रत्यक्षरित्या त्यांनी मराठवाड्याच्या ग्रामीण भागालाच अर्पण केला.   

डॉ. शंकरराव चव्हाण यांचे व्यक्तीमत्व उत्तुंग होते. त्यांची बरोबरी कोणाला करता येणार नाही. माझे वडील याच जिल्ह्यात तहसिलदार असल्याने त्यांच्या बोलण्यातून शंकररावांप्रती सदैव नम्रतापूर्वक उल्लेख असायचा. ते नेहमी म्हणायचे “शंकररावांसारखी सचोटी कोणाजवळ मिळणार नाही” जिल्हा परिषदेच्या शाळेतून मी चांगल्या गुणांनी एसएससी उत्तीर्ण झालो. वडील म्हणाले “चल शंकररावांना भेटायला जावू” मी घाबरलो. तसाच घाबरत त्यांच्याकडे गेलो. त्यांच्यातला साधेपणा पाहून माझ्या मनातली भीती गळून पडली ते लक्षातही आले नाही. या भेटीची आठवण डॉ. रमण गंगाखेडकर यांनी आवर्जून सांगत शंकरराव चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा दिला.

लहानपणी शिकत असतांना आपण फार काही पुढे मोठे होऊ असे काही निश्चित नव्हते. प्रामाणिकपणे शिकत राहिलो. विशेषत: शिक्षक जे काही सांगतील ते सर्व नम्रतेने ऐकत राहिलो. माझ्या जिल्हा परिषदेतील शाळेच्या शिक्षकांपासून ते पुढे वैद्यकिय महाविद्यालयापर्यंत व जिथे कुठे शिक्षणाचा संबंध येत राहिला तिथे मी गुरूजींच्या सांगण्याला प्राधान्य दिले. आज माझ्यात जे काही चांगले असेल ते गुरुजनांचे आहे. माझी सर्व मूल्य जिल्हा परिषदेच्या शाळेमुळे घडली असे निसंकोचपणे सांगत त्यांनी गुरू जर चांगले भेटले नसते तर केवळ पैशाच्या मागे लागणारा डॉक्टर झालो असतो, असेही स्पष्ट सांगायला त्यांनी कमी केले नाही.

वैद्यकीय क्षेत्रात कार्य करीत असतांना विविध पातळ्यांवर काम करण्याची संधी मला मिळाली. यात एड्स संदर्भात कार्य करीत असतांना सेवाभावी संस्थांच्या कार्यकर्त्यांपासून तृतीयपंथीयापर्यंत, विविध सेक्स वर्कर्स व तळागाळातील लोकांकडून पुस्तकांच्यापलीकडे शिकायला मिळाले. एड्सला नियंत्रण हे गोळ्या औषधांसमवेत वर्तणाशी निगडीत अधिक आहे. यासाठी लोकांना अगोदर समजून घेणे महत्वाचे आहे. हे लक्षात घेऊन त्यांचेही प्रतिनिधी एड्स कंट्रोल सोसायटीवर, संस्थांवर असले पाहिजेत यासाठी धरलेल्या आग्रहाचा त्यांनी उल्लेख केला. आयुष्यात मला प्रत्येक ठिकाणी मन मोकळे करणारी माणसे मिळाली. सेवाभावी संस्थांमुळे, समाजातील या जागृत लोकांमुळे मला पद्मश्रीचा सन्मान मिळू शकला अशी वस्तुस्थिती प्रांजळपणे त्यांनी सांगितली. पुरस्कारासाठी कुठेही अर्ज करणे मला भावले नाही. एक मात्र खरे की डॉ. शंकरराव चव्हाण जीवन गौरव पुरस्काराने मला माझ्या पुढच्या आरोग्य क्षेत्रातील कामासाठी व समाजात जी असमानता आहे त्यावर काम करण्यास बळ मिळाले आहे, प्रेरणा मिळाली आहे असे पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांनी सांगितले.

नांदेडच्या नगरपरिषदेपासून ते महानगरपालिकेच्या प्रवासातील विविध संदर्भांना उजाळा देणारा हा महोत्सव आहे. या महानगराच्या विकासातील कटिबद्धतेला, योगदानाला अधोरेखीत करणारा हा उत्सव आहे. डॉ. शंकरराव चव्हाण हे या नगराचे पहिले नगराध्यक्ष राहिले असून विकासाचा त्यांनी घातलेला पाया हा तेवढाच भक्कम असल्याने या शहराच्या विकासातील काळानारूप निर्माण होणाऱ्या गरजा पूर्ण करण्याची क्षमता आपल्या महानगरपालिकेत, पालकमंत्री अशोक चव्हाणा यांच्या नेतृत्वात असल्याचे प्रतिपादन माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत यांनी केले.

यावेळी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे महापौर पद भूषवून योगदान देणाऱ्या सर्व महानुभवांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महापौर जयश्रीताई पावडे यांनी केले तर आभार मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी मानले.


क्रीडा संकुलाच्या विकासासाठी खनिज विकास निधीतून ८ कोटी देणार – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

चंद्रपूर : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली रवी भवन, नागपूर येथे चंद्रपूर, जिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत चंद्रपूर, जिल्हा क्रीडा संकुलाच्या विकास कामांबाबत चर्चा करण्यात आली.

या ठिकाणी मुला-मुलींचे वसतिगृह, जिम्नॅशियम, बॉक्सिंग हॉल, प्रशासकीय इमारत, तलवारबाजी प्रशिक्षण केंद्र आदी नव्याने करण्याचे या बैठकीत निश्चित करण्यात आले. सद्यस्थितीत असलेल्या जुन्या इमारती, ज्यामध्ये प्रशासकीय इमारत, मुला-मुलींचे वसतिगृह, जिम्नॅशियम या सर्व निर्लेखित (डीमालिश) करून त्याठिकाणी मल्टीलेव्हल सुविधा उभाराव्यात. याकरीता शासनाच्या 7 कोटीच्या तरतुदी व्यतिरिक्त 8 कोटी रुपये खनिज विकास निधीतून देण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
या बैठकीला प्रभारी जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, विभागीय उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रिडा अधिकारी अविनाश पुंड प्रामुख्याने उपस्थित होते.

वनोजा (देवी) सोसायटी वर शिवसेना - काँग्रेस आघाडीचा झेंडा

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : वनोज देवी विविध कार्यकारी संस्थेवर शिवसेना व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी मिळून शेतकरी विकास आघाडी ची स्थापना करून ३० मार्च ला निवडणूक लढवली,त्यात शेतकरी विकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यानंतर अध्यक्ष व उपाध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. 
 
आज गुरुवार (ता.२८) एप्रिल रोजी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड करण्यासाठी खरेदी विक्री मारेगाव येथे पाचरण करण्यात आले. यात शिवसेनेचे गोवर्धन टोंगे हे अध्यक्ष तर काँग्रेसचे मारोती नगराळे यांची उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तसेच 
संचालक मंडळ बंडू पुनवटकर, शंकर वैद्य, रामभाऊ पिदूरकर, किशोर धांडे, प्रभाकर ढवळे, टिवलू टोंगे, उमेश राजूरकर, आनंदराव घोटकर, रवींद्र धांडे, शोभा नागपुरे, जाई टोंगे आदींचा समावेश आहे. हे सर्व आनंदी वातावरणात घडवून आणण्यासाठी पराकाष्ठा नेतृत्वाला करावी लागली, हे विशेष...
     (अध्यक्ष उपाध्यक्ष यांचे अभिनंदन करताना)

त्याकरिता गोवर्धन टोंगे, प्रशांत भंडारी, उपसरपंच जनार्दन गाडगे, गंगाधर कडुकर, संभाजी बहिरे, प्रकाश पिदूरकर, संदीप भोपरे, विजय बोढाले इत्यादीचे खूप मोठे योगदान लाभले.

यावेळी निवडणूक अधिकारी इंगोले साहेब, भाऊराव काळे, सचिव यांचे यांचे मार्गदर्शनात अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड शांततापूर्ण व बिनविरोध संपन्न झाली. 

"शिक्षण विभाग पंचायत समिती झरी यांच्या संकल्पनेतून साकारला यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा."


निकेश पत्रकार | सह्याद्री चौफेर 

झरी : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मानवी जीवन अतिशय गतीमान होत चालले आहे. बदलत्या युगात ज्यांनी स्वतःमध्ये बदल केला ते प्रवाहात टिकले व ज्यांनी बदल स्विकारला नाही. अशा बाबी मात्र काळाच्या पडद्याआड लुप्त झाल्या.

मानवाला यशोशिखरावर पोहोचायचे असेल तर, त्याला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची,पराकोटीच्या जिद्दीची व चिकाटीची,उच्चतम महत्वाकांक्षेची गरज असते. विकासाला पुरक असलेली मानवी सचोटी केवळ स्पर्धेच्या सहाय्याने प्राप्त करता येते.शहरातील वातावरण व तेथील पुरक परीस्थिती ह्यामुळे शहरी विध्यार्थी स्पर्धेच्या प्रवाहात सहजच सामील होतो. याउलट ग्रामीण भागातील विद्यार्थी परिस्थितीच्या अभावामुळे दिवसा गणिक मागे पडतो. त्यामुळे मनात न्यूनगंड निर्माण होऊण स्पर्धेतून अलगद बाहेर फेकला जातो. ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारे विध्यार्थी स्पर्धेच्या प्रवाहात टिकावेत ह्या करिता जडण घडणी सोबतच स्पर्धात्मक युगाचे बाळकडू त्याला दिल्यास भविष्यात जि. प. शाळेचा विध्यार्थी स्पर्धेत मागे पडणारच नाही. हया विचाराने ध्येयवेडे होवून,जि.प.यवतमाळचे शिक्षणाधिकारी मा.सूर्यवंशी साहेब ह्यांनी "महादिप " ह्या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परिक्षेस सुरूवात केली व हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबविला.

विविध उपक्रमाच्या माध्यमातून संवेदनशील भागातील दुर्लक्षित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी सतत प्रयत्न करणारे उपक्रमशिल गटशिक्षणाधिकारी मा. नगराळे साहेब व मानवतावादी द्दृष्टी जपणारे विध्यार्थीप्रीय गटविकास अधिकारी मा.मुंडकर साहेब यांनी मा.केंद्रप्रमुख व गटसाधन व्यक्ती सर्व मान्यवर मुख्याध्यापक व नवोपक्रमशील शिक्षक यांच्या सहकार्याने "महादिप" ह्या स्तुत्य उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी केली. त्या मुळे झरी सारख्या अतिदुर्गम तालुक्यातून तब्बल २१ विध्यार्थी जिल्हा स्तराकरिता निवडल्या गेले. ह्या सर्व विद्यार्थ्यांचा व त्यांच्या यशस्वीते करिता अपार मेहनत घेणाऱ्या शिक्षकांचा प्रशस्तीपत्र व मानचिन्ह देवून सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला.

"महादिप" उपक्रमा करिता प्रश्नावली तयार करून नंतर झटणारे सौ.सुरेखा ठाकरे मॅम पंचायत समिती पांढरकवडा,सौ.आशालता कोवे मॅम पंचायत समिती वणी व श्री.कैलास गव्हाणकर सर यांचा सुद्धा मान्यवरांच्या हस्ते शाल-श्रीफळ,सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात आला.'आपल्या पंचायत समितीमधील ८९ शाळा कोरोणा काळात सुध्दा अखंडपणे सुरू होत्या. आमचा शिक्षकवर्ग विध्यार्थी हिताचे कार्य निरंतरपणे करत होता. त्यामुळे विध्यार्थी आजही शाळेशी कायमचा जुळून राहू शकला. म्हणूनच आज संपूर्ण तालुक्यातून एवढ्या उत्तम प्रकारे विद्यार्थी स्पर्धेत निडरपणे उतरू शकला. 'असे मत आपल्या प्रास्ताविक भाषणातून सन्माननीय नगराळे साहेब ह्यांनी व्यक्त केले. यवतमाळ येथून आलेले सन्माननिय काठोळे सर ह्यांनी, झरीतील शैक्षणिक प्रगती बाबत व शिक्षकांच्या बदल्या तथा पदोन्नती बाबत आपल्या भाषणातून माहिती विषद केली. "स्पर्धा ही मानवी जीवनातील एक नसंपणारी बाब आहे." असे मत शिक्षक सत्कारमूर्ती मा.शंकर केमेकार सर ह्यांनी आपल्या शब्दातून व्यक्त केले."आमच्या मनात सकारात्मक उर्जा भरण्याचे काम मा.मुंडकर साहेब व नगराळे साहेब निरंतर करतात परंतु मा मुंडकर साहेबांच्या बदली मुळे आम्ही पोरके होवू.आपणास शक्य असल्यास दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी आपली बदली रद्द करुन बघा" अशी आर्त हाक माननिय पोलचेट्टीवार सर यांनी आपल्या शब्दातून व्यक्त केली. ह्या शब्दांनी क्षणभर सभाग्रुहातील प्रत्येक मुख्याध्यापकाच्या मनात भावनिक लहर निर्माण झाली व प्रत्येकाच्या मनपटलावर मा.मुंडकर साहेबांनी त्यांच्या कारकिर्दीत केलेल्या विविधशैक्षणिक कार्याची प्रतिमा उमटली. श्रीकांत काळे सर ह्यांनी आपल्या गायनाने उपस्थितांचे मन प्रफुल्लित केले.

कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन हर्षदा चोपणे मॅम ह्यांनी तर आभारप्रदर्शन श्री मोहन काटकर सर ह्यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मा.नगराळे साहेब यांच्या मार्गदर्शनात केंद्रप्रमुख सर्वश्री कुळसंगे सर,चुधरी सर,विनोद मडावी सर,पोलचेट्टीवार सर,सहारे सर,काटकर सर,यमसनवार सर, गजानन आकुलवार सर,मुंडाले मॅम,वांढरे सर,भोयर सर,वाईकर सर व सर्व गटसाधन व्यक्ती पंचायत समिती झरी यांनी परिश्रम घेतले.

मा.कुरेकर सर ह्यांनी सर्व मुख्याध्यापकांना (U-dise) प्रपत्रामध्ये नव्याने समावेशीत करण्यात आलेल्या घटका बाबत सखोल मार्गदर्शन केले. सर्व उपस्थित मुख्याध्यापकांच्या सहकार्याने सत्काराच्या कार्यक्रमाला सोहळ्याचे स्वरूप प्राप्त झाले.

राज्यस्तरीय "आदर्श समाजरत्न" प्रेरणा पुरस्कार २०२२ मा.निर्भीड पत्रकार सुनिल भोसले यांना प्रदान


स्नेहा मडावी | सह्याद्री चौफेर

पुणे : संघर्ष सामाजिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य. यांच्या तर्फे या वर्षी पासुन २०२२ अर्थात पहले वर्षी सुरूवात करण्यात आली आहे.

हा पुरस्कार समाजातील काही वेगळ्याच तऱ्हेची वेडी माणस उपेक्षितांसाठी झटत असतात. हे वेड ध्येयाच, समाजसेवेच असत, आणि याचीच जाणीव ठेवून संघर्ष सामाजिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने हे पुरस्कार मा.सुनिल ज्ञानदेव भोसले यांना प्रदान केले आहे. 

सुनिल ज्ञानदेव भोसले संपादक, ते समाजात विविध उपक्रम राबवित असतात. अनेक आजच्या काळात अशी उल्लेखनीय माणसं मिळणे कठीण आहे. सुनिल ज्ञानदेव भोसले यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

विविध माध्यमातून पुढील वाटचालीस त्यांना खूप खूप शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

रमजान ईदच्या तयारीसाठी सूरमाज फाउंडेशनने मदत केली


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

चोपडा : रमजान हा पवित्र महिना आहे ज्यामध्ये प्रत्येक मुस्लिम उपवास करतो. उपवासाचा अर्थ असा आहे की तो दिवसभर अल्लाहची उपासना करतो आणि फक्त उपाशी राहत नाही तर खोटे बोलणे, एखाद्याचे नुकसान करणे, वाईट करणे, भांडणे करणे आणि चुकीचे काम करणे या सारख्या सर्व वाईट कृत्यांपासून दूर राहतो. यामुळे अल्लाह त्या व्यक्तीला त्याने केलेल्या कामापेक्षा त्याच्या बँकेतून 70 टक्के नफा देतो. जे ईदच्या रुपात एक मेंढी आहे.

ईदच्या दिवशी मुस्लीम समाज आपल्या घरी विविध प्रकारचे पदार्थ बनवतात, ज्यामध्ये खास शिरकुर्मा असतो आणि हा शिरखुर्मा ईदच्या दिवशी आलेल्या आपल्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना वाटून दिला जातो.  परंतु अनेक गरीब कुटुंबे या आनंदापासून वंचित आहेत म्हणून सूरमाज फाउंडेशन चोपडा यांना हे धार्मिक कार्य करण्याची संधी मिळाली आणि गुरुवार 28 एप्रिल 2022 रोजी चोपडा तालुक्यातील बेवा, गरीब आणि गरजू लोकांना 300 शिरखुर्मा किटचे वाटप करण्यात आले. 

शिरकुर्मा किटमध्ये कोपरा, काजू, चारोळी, बेदाणे, साखर आणि शिरकुर्मा बनवण्यासाठी लागणारी प्रत्येक गोष्ट होती आणि ती सुमारे 20 लोक खाऊ शकतात.  सूरमाज फाऊंडेशन असेच कार्य करत राहावे आणि आपण सर्वांनी यात नेहमी योगदान द्यावे अशी प्रार्थना करतो.

हे काम पूर्ण करण्यासाठी हाजी उस्मान शेख (अध्यक्ष सूरमाज फाऊंडेशन), डॉ.मोहम्मद रागीब, शेख मुजाहिद इस्लाम, अबुलौस शेख, डॉ.मोहम्मद जुबेर शेख, जियाउद्दीन काझी साहेब, शोएब शेख, जुबेर बेग व त्यांच्या सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य लाभले.

बोटोणीतील सरपंचासह दोन सदस्य अपात्र

सह्याद्री | चौफेर न्यूज 

मारेगाव : जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने मारेगाव तालुक्यातील बोटोणी येथील सरपंच सह दोन सदस्यांना अपात्रतेची टांगती तलवार उभी ठाकली आहे. अप्पर जिल्हाधिकारी यांच्या निर्गमित आदेशाने मारेगाव तालुक्याच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

तालुक्यातील बोटोणी ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक सन २०२० मध्ये पार पडली. या निवडणुकीत सुनीता जुमनाके, सुवर्णा ठक, अश्विनी मडावी हे सदस्य म्हणून निवडून आले. नव्हेतर गावातील प्रथम नागरिक म्हणून सुनीता विनायक जुमनाके ह्या सरपंचपदी विराजमान झाल्या.

दरम्यान, या तिन्ही सदस्यांनी वर्षभरात जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याची तक्रार येथील महादेव सिडांम यांनी जिल्हाधिकारी यांचे कडे केली. त्यानुसार अप्पर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने तिघांना अपात्र घोषित करण्याचा निर्णय निर्गमित केला. या निर्णयाने बोटोणीसह तालुक्यातील राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
न्यायालयात दाद मागू
      
मध्यंतरी कोविड ने सर्वसामान्य जनतेची झालेली परवड,एसटीचा संप यामुळे जात वैधता प्रमाणपत्र दाखल करण्यात अडसर निर्माण झाला. अशातच अपात्र संदर्भात कुठली नोटीस आपणास यापूर्वी प्राप्त झाले नाही. त्यामुळे अपात्र च्या विरोधात आपण न्यायालयात दाद मागू.
       
- सुनीता जुमनाके
सरपंच ग्रामपंचायत, बोटोणी

पत्रकार कैलास ठेंगणे यांचेवर रानडूकाराचा हल्ला


सह्याद्री | चौफेर न्यूज 

मारेगाव : कुंभा येथील दै. सकाळचे बातमीदार तथा "विदर्भ सर्च न्यूज" नेटवर्क पोर्टलचे उपसंपादक कैलास नथ्थूजी ठेंगणे यांच्या धावत्या दुचाकीवर रानडुकराने हल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना आज गुरूवारला सकाळी साडे दहा च्या सुमारास ईसार पेट्रोल पंप पासून हाकेच्या अंतरावर राज्यमहामार्गावर घडली. 

सविस्तर असे की,कैलास ठेंगणे हे आज सकाळी कुंभा येथे शेतात मोपेड स्कुटीने जात असतांना राज्यमहामार्गावर करणवाडी मारेगावच्या मधात झुडपातून सैरावैरा आलेल्या रानडुकराने थेट वाहनावरील कैलास यांचेवर जबर हल्ला चढविला. काही कळण्यापूर्वी घडलेल्या घटनेने कैलास हे धाडकन खाली कोसळले.या घटनेत त्यांना हात, पायांना जबर इजा झाली. तात्काळ त्यांना प्राथमिक उपचारानंतर वणी खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना हाताची शस्त्रक्रिया करण्यास सांगितले असून,त्यांचेवर सायंकाळी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. 

दरम्यान, रानडुकर हल्ला व जखमी प्रकरणी वनविभाग प्रशासनास तक्रार दाखल करण्यात आली असून तात्काळ आर्थिक मदत प्रदान करण्याची मागणी पिडीताने केली आहे.
"मानवी हल्ल्या पाठोपाठ वन्य प्राण्यांचे हल्ले पत्रकारांवर होऊ लागल्याने पत्रकारांच्या सुरक्षाचा प्रश्न ऐरणीवर आला असून,पत्रकार संरक्षण कायदा कागदावरच न असता खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात अंमलबजावणी ची गरज असल्याचे मत सह्याद्री चौफेर न्यूजचे सर्वेसर्वा कुमार अमोल यांनी व्यक्त केले आहे."

"उन्हाळी शैक्षणिक शिबिर" हटवांजरी येथे


विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : हटवांजरी येथे जीवनविकास माध्य.व उच्च माध्य.विद्यालय हटवांजरी येथील विद्यालयात दिनांक ०४ मे २०२२ ते ११ जून २०२२ पर्यंत सकाळी ७ ते ९ या दरम्यान संपूर्णपणे निःशुल्क "शैक्षणिक उन्हाळी शिबीर" आयोजित करण्यात आले आहे.
    
कोविड-१९ मुळे गेल्या दोन वर्षांमध्ये शाळा चालू बंद मुळे विद्यार्थाचे अतिशय शैक्षणिक नुकसान झाले. त्यातल्या त्यात शहरी भागामध्ये ऑनलाईन शिक्षण उपलब्ध झाले परंतु ग्रामीण व अतिदुर्गम भागात मोबाईल ची व तंत्रज्ञानाच्या कमतरतेमुळे खेड्यात नावालाच शिक्षण झाले होते.
परंतु ग्रामीण भागात अशाप्रकारचा उपक्रम राबवून जी शैक्षणिक तूट झाली होती ती भरून काढण्यास अतिशय मोलाची मदत मिळेल.

अशा प्रकारचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत असल्यामुळे पालक व विद्यार्थामध्ये आनंदाचे वातावरण आहे. जास्तीत जास्त या परिसरातील विद्यार्थांनी या शिबिराचा लाभ घ्यावा व ताबडतोब आपली नोंदणी करून आपला प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन शालेय व्यवस्थापकाने केले आहे.
 
  
"कोविड-१९ च्या काळात ग्रामीण भागातील विद्यार्थाचा जो शैक्षणिक आलेख खाली गेला व अभ्यासापासून दूर झाले त्याकरीता या शैक्षणिक शिबिराद्वारे गुणवत्ता कौशल्य वाढवून अभ्यासात आवड निर्माण करण्याचा हेतू आहे."

- मुकेश महादेवराव महाडुळे मुख्याध्यापक
जीवनविकास माध्य.व उच्च माध्य. विद्यालय,हटवांजरी

शिंधीवाढोना ते डोंगरगाव रस्त्याचे काम चालू करण्यासाठी दिले निवेदन


 
नितेश पत्रकार | सह्याद्री चौफेर 

झरी : मा.मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत मंजूर असलेल्या शिंधीवाढोना ते डोंगरगाव रस्त्याचे काम बंद असलेले त्वरित सुरू करा, अशी मागणी डोंगरगाव वासियांनी कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनातून केली.

२०१९ ते २०२० या आर्थिक वर्षात मा.मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सिंधीवाढोना ते डोंगरगाव अंतर ५ किलोमिटर रस्त्याचे काम मंजूर झाले,त्यानंतर कामाला सुरवात झाली. सदर मंजूर रस्त्यावर मुरूम व गिट्ठी चा एक थर टाकण्यात आला आणि काम बंद झाले. आता हे काम बंद होऊन जवळ जवळ तीन वर्ष झाले आहे.
रस्त्यावरील मुरूम व गिठ्ठी ची व्यवस्थित दबाई न झाल्याने व पाऊसामुळे टाकलेला मुरूम वाहून गेला. परिणामी रस्त्यावर फक्त गिठ्ठीच उरली आहे.

गावाचा मुख्य रस्ता असल्यामुळे गावकऱ्यांना या रस्त्यावरून दैनंदिन ये जा करणे कठीण झाले आहे. तीन वर्षे लोटूनही याकडे संबंधितांनी साधे लक्ष सुद्धा दिले नसल्याने शिंधीवाढोना ते डोंगरगाव रस्ता मृत्यूचा सापळा झाला आहे. दि. २४ मार्च २०२२ रोजी गावातील रहिवासी बाळा रूप पवार यांचा सदरील रस्त्यावर अपघाती मृत्यू झाला आहे,अशाप्रकारे अनेक घटना या रस्त्यावरून ये जा करतेवेळी घडत आहे, अशा तक्रारी नागरिकांच्या आहे. तसेच या नंतर या रस्त्यावर अपघात होऊन एखाद्याचाही मृत्यू झाल्यास किंवा दुखापत झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित विभागाची असेल आणि येत्या आठ दिवसात या रस्त्याचे काम सुरू न झाल्यास संपूर्ण गावकरी याच रस्त्यावर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा उपस्थित डोंगरगाव ग्रामवासीयांनी कार्यकारी अभियंत्यांना निवेदनद्वारे देण्यात आले.

निवेदन देते वेळी शिवसेना तालुकाध्यक्ष चंद्रकांत घुगुल यांच्या नेतृत्वात वासुदेव देठे,तेजस झाडे,रमेश जिवतोडे,गोपीचंद निखाडे,सूरज कष्टी,रामदास चारलिकर,विश्वास बल्की,तुकाराम नवले,यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यासह डोंगरगाव ग्रामवासी उपस्थित होते.


आटोला अपघात, दोन गंभीर जखमी

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : मारेगावहून घुगलदरा येथे लग्न सोहळ्याला जात असतांना प्रवाशी आटो ला अपघात झाला. यात दोन गंभीर तर, चिमुकल्यांना किरकोळ मार लागला असून ही घटना आज (ता.27) एप्रिल रोजी मारेगाव यवतमाळ महामार्गांवरील खडकी (टेकडी) टर्निंग वर सकाळी ९:३० वाजता घडली.

प्राप्त माहितीनुसार मारेगावहुन नेहारे परिवार व इतर जण घुगलदरा येथे लग्न सोहळ्याला निघाले, सकाळचे साडे नऊ वाजले असतील या दरम्यान, आटो चालक मालक भूपेश वाडगुळे (40) रा.मारेगाव याला वाहन चालवताना अचानक झोप लागली असता आटोचे बॅलन्स बिघडले आणि आटो पलटी होऊन रस्त्याच्या कडेला आदळला यात मधुकर लसवंते (65) रा.पुलगाव जि. वर्धा, यांच्या पायाला जबर मार लागला. तसेच आटो चालक भूपेश वाडगुळे याला ही जबर गंभीर दुखापत झाली आहे. तर अदिती राऊत (7) रा. कळंब, दर्शक पवन नेहारे (2) रा. मारेगाव या लहान चिमुकल्यांना किरकोळ मार लागल्याची माहिती आहे. जखमीना मारेगाव ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले. येथे प्राथमिक उपचार करून भूपेश याला यवतमाळ आणि मधुकर लसवंते यांना चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.

यावेळी रुग्णालयात बघ्याची  एकच गर्दी उसळली होती. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. मात्र, झालेल्या अपघातात पत्रकार पंकज नेहारे यांचे मोठे बंधू पवन नेहारे यांचा मुलगा व सासरा यांचा समावेश आहे.
 

चिमडा नदीच्या पुलावरून वाहतूक सुरू करा-नगरसेवक सतीश बोम्मावार यांची मागणी


सह्याद्री न्यूज | उमेश गोलेपल्लीवार

सावली : चंद्रपूर-गडचिरोली महा मार्गावरील चिमडा नदी वरील पुलाचे काम गेल्या 3 वर्षांपासून सुरू आहे काम पूर्णत्वास असल्याचे दिसत असून पुलावरून वाहतूक सुरू करावी अशी मागणी भाजपा तालुका महामंत्री तथा नगरसेवक सतीश बोम्मावार यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे केली आहे.

चंद्रपूर-गडचिरोली महामार्गाचे काम गेल्या 4 वर्षांपासून सुरू आहे सदर काम पूर्णत्वास झाले असल्याचे दिसत आहे.त्याच प्रमाणे चिमडा नदीवर सुरू असलेल्या पुलाचे बांधकाम अतिशय संथ गतीने करीत ते पूर्ण झाल्याचे दिसत आहे.सदर पुलाच्या बाजूने वाहतूक सुरू आहे मात्र त्या ठिकाणी रोजच अपघाताची मालिका सुरू आहे. त्यामुळे याचा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.तसेच धुळीने नागरिक बेहाल होत आहे.

त्या साठी चिमडा नदीवरील पुलावरून लवकरात लवकर वाहतूक सुरू करून प्रवाशांना प्रवास सुलभ करून द्यावे अशी मागणी सावली तालुका भाजपा महामंत्री तथा न.पं.नगरसेवक सतीश बोम्मावार यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी राष्ट्रीय रस्ते महामार्ग बांधकाम विभाग ला पत्र पाठविले आहे.

कोसारा,जुनी पडोली (शर्मा पेट्रोलपंप) पडोली फाटा रस्त्याच्या दोन्ही बाजूला स्पीड ब्रेकर,आईस कॅट पट्टे ही कामे तात्काळ करण्यात यावी - प्रदेश सचिव अनिल डोंगरे यांची मागणी

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

चंद्रपूर : चंद्रपूर नागपूर हायवे रोड लगत नवीन चंद्रपूर (कोसार),जुनी पडोली तसेच पडोली फाटा चौक घुगुस रोड हे चौक नेहमी वर्दळीचे असून या ठिकाणच्या रोडचे स्पीड ब्रेकर नादुरुस्त असून तसेच जुनी पडली साईटच्या रोडला स्पीड ब्रेकर नसून या भागात नेहमी छोटे-मोठे अपघात होत असतात ही कामे तात्काळ करण्यात यावे याकरीता अनिल डोंगरे प्रदेश सचिव भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या माध्यमातून विशाल कुमार मेश्रम साहेब निवासी उपजिल्हाधिकारी तसेच सुनील कूभे साहेब कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग चंद्रपूर यांना निवेदन देण्यात आली. ही कामे तात्काळ न झाल्यास चक्का जाम आंदोलन करण्यात येईल असा निवेदनाच्या माध्यमातून इशारा देण्यात आला. यावेळी अशोक पटेल तालुका उपाध्यक्ष हे होते.

सिमेंट काँक्रीट रोडच्या कामाची चौकशी करा राकेश गोल्लेपल्लीवार सदस्य यांची मागणी

सह्याद्री चौफेर | गोलेपल्लीवार

सावली : सावली तालुक्यातील जीबगाव ग्रामपंचायत येथे जिल्हा विकास निधी अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम सुरू आहे. सदर कामाचे वर्क ऑर्डर ग्रामपंचायतला प्राप्त झाले नसतानाही विनापरवानगी काम सुरू असल्याचा आरोप जीबगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य राकेश गोल्लेपल्लीवार यांनी केला आहे. विनापरवानगी ने सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाचे सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी सुद्धा निवेदनाद्वारे संवर्ग विकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.

परंतु आज आठ दिवसाचा कालावधी लोटुन ही कामाजी चौकशी करण्यात आली नसल्याने जिल्हा निधीतील सी सी रोड बाधकाम पुर्ण झाले असल्याने अधिकारी यांनी सुध्दा या भ्रष्टराला दुजोरा देत असल्याचे दिसुन येत आहे. जीबगाव ग्रामपंचायत अंतर्गत निळू कीनेकर ते मेन रोड व गंगाधर भोयर ते प्रकाश देठे यांचे घरापर्यंत सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. सदर काम हे सरपंच, सचिव व कंत्राटदारांच्या संगनमताने सुरू आहे. या कामाचे वर्क ऑर्डर ग्रामपंचायत कडे उपलब्ध नसतांना कामाची सुरुवात कशी काय केली ? असा आरोप ग्रामपंचायत सदस्य राकेश गोलेपल्लीवार यांनी निवेदनातून करण्यात आली आहे. विनापरवानगी ने सुरू असलेल्या कामाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.


"सदर कामाबाबत ग्रामपंचायत मासिक मिटिंग मध्ये कोणतेही प्रस्ताव न ठेवता सदस्य यांना माहीती न देता विना परवानगीने कामास सुरुवात करण्यात आली त्यामुळे मनमर्जीने काम सुरू असून निकृष्ट दर्जाचे होत आहे. याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आठ दिवसा आधी संर्वग विकास अधिकरी यांचे केले असताना मात्र निवेदनाकडे दुर्लक्ष होताना दिसुन येत आहे."

– राकेश गोल्लेपल्लीवार ग्रा.सदस्य ग्रामपंचायत जीबगाव.


"सदर कामाचे वर्क ऑर्डर व अंदाजपत्रक ग्रामपंचायतला उपलब्ध आहे कामास सभेत मंजुरी घेऊनच शाखा अभियंता यांचे मार्गदर्शनात काम सुरू आहे."

- सरपंच पुरुषोत्तम चुदरी
ग्रामपंचायत जीबगाव

मधमाशांच्या हल्ल्यात उपसरपंचाचा मृत्यू


योगेश मडावी | सह्याद्री चौफेर 

झरी : तालुक्यातील येडशी गावातील एका इसमावर मधमाशाने हल्ला करून ठार केल्याची दुःखद घटना आज (ता.२५) एप्रिल रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडली.

हा इसम येडशी गावातील उपसरपंच असून, भोला महादेव नगराळे (अंदाजे ४०) असे मधमाशाने हल्ला करून ठार केलेल्याचे नाव आहे. घरचा कर्ताधर्ता च निघून गेल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

सूत्राच्या माहितीनुसार आई विमल महादेव नगराळे ह्या सोसायटीच्या निवडणूकीमध्ये उमेदवार म्हणून उभे होत्या. विजय सुद्धा निश्चित केला मात्र,त्यामुळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याने पेढे आणण्यासाठी गेलेल्या येडशी येथील उपसरपंच भोलाभाऊ नगराळे यांच्या वर "अपना देशी बार" समोर एका झाडाला असलेल्या मधमाशाने (आग्या मोहं)  अचानक हल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केले. ही बाब परिसरात पसरताच मित्र मंडळींनी त्या दिशेने धाव घेतली. दरम्यान,तिथे ते पडून असल्याचे दिसून आले. अश्यातच त्यांना सरकारी दवाखाना मुकुटबन येथे नेण्यात आले व त्यांच्यावर उपचार सुरू ठेवत त्यांना वणी येथे हलविण्यात आले. मात्र, वणी येथे उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

त्यांच्या पश्चात पत्नी,आई,वडील,मुलगी व मुलगा असा आप्त परिवार आहे. 

३२ वर्षीय तरुणाची विष प्राशन करून आत्महत्या


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर

मारेगाव : तालुक्यातील पहापळ येथील तरूणाने विष प्राशन करून आत्महत्या केली.आज (ता.२५ एप्रिल) सोमवारला दुपारी तिन वाजताच्या दरम्यान, घटना घडली. विशेष उल्लेखनीय की, तरुण हा विवाहित असून त्याच्या पत्नीसोबत त्याचा घटस्फोट होऊन दहा वर्षे झाले आहे.

विशाल शंकर इंगोले (३२) असे विष प्राशन करून आत्महत्या केलेल्या घटस्फोटीत तरुणाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार विशालने आज दुपारी तीन वाजताच्या दरम्यान,विषारी औषध सेवन केले. निदर्शनास येताच त्याला कुटुंबियांनी तातडीने उपचारांसाठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचाराअंती त्याचा मृत्यू झाला. ३२ वर्षीय विशाल हा विवाहित असून त्याच्या पाठीमागे एक मुली, आई वडील व भाऊ असा परिवार आहे.

अधिक तपास पोलीस करीत आहे.  

सूरमाज फाऊंडेशन तर्फे रमेश भाऊ शिंदे यांचा सत्कार


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

चोपडा : रमेश भाऊ जे चोपडा नगरपरिषदेचे गेली अनेक वर्षे पासून अतिशय चांगले कार्यकर्ता व नगरसेवक म्हणून परिचित आहेत.

त्यांच्या कार्यकाळात केजीएन कॉलनी आणि चोपडा शहरातील अनेक क्षेत्रांची प्रगती झाली असून, त्यांच्या कार्य धोरणामुळे त्यांची 'चोपड़ा ग्रामीण औद्योगिक वसाहत लिमिटेड' च्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली, त्या मुळे हाजी उस्मान शेख (अध्यक्ष, सूरमाज फाऊंडेशन) यांनी पुष्पगुच्छ आणि फुलांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

आपल्या गावाचा असाच विकास करत सामाजिक कार्यात हातभार लावावा अशी अपेक्षा केली. सत्कार करताना अबुलौस शेख, झियाउद्दीन काझी साहब, डॉ. रागीब, शोएब शेख, मुजाहिद इस्लाम, डॉक्टर मोहम्मद जुबेर शेख व सूरमाज फाऊंडेशनचे सहकारी उपस्थित होते.

पालकमंत्री मा. विजय वडेट्टीवार यांच्या ताफ्याला लोडशेडिंग बंद करा, अशी घोषणाबाजी देऊन निर्देशन आंदोलन


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

चंद्रपूर : भारतीय जनता पार्टी,भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या वतीने पडोली फाटा चौक चंद्रपूर(ग्रामीण) येथील महाविकास आघाडी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे वीज टंचाई विरोधात मेणबत्ती पेटवून चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय विजय वडेट्टीवार यांच्या ताफ्याला लोडशेडिंग बंद करा अशी घोषणाबाजी नारे देऊन विरोध दर्शविण्यात आला.

माननीय आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार माजी अर्थमंत्री तथा लोक लेखा समिती प्रमुख विधिमंडळ व माननीय देवरावदादा भोंगळे जिल्हा अध्यक्ष भाजपा, मा. नामदेव डाहुले जिल्हा महामंत्री भाजपा यांच्या मार्गदर्शनात व प्रदेश सचिव भारतीय जनता युवा मोर्चा अनिल डोंगरे यांचे नेतृत्वात झालेल्या या निदर्शने आंदोलनात विजय आग्रे तालुका महामंत्री भाजपा, सौ.दुर्गा बावणे तालुका महामंत्री भाजपा, महिला आघाडी रामू बल्की तालुका महामंत्री, विनोद खेवले तालुका सचिव, विनोद खडसे, आशिष वाढई,अशोक पटेल,विनोद करमरकर,रोहन चालेकर,विक्की रेगुंत्वार,मोनू ठाकुर,दीपक गायकवाड, विष्णू वर्भे,संतोष सोनकर,राहुल पेंदल,बबन श्रिसागर, जागेश्वर चांदेवार, इत्यादी यांच्या उपस्थितीत या आंदोलन वेळी अनिल डोंगरे यांनी मागील भाजपा सरकारच्या काळात शेतकरी छोटे-मोठे उद्योग व्यापारी घरगुती वीज ग्राहक यांना वीज टंचाई व लोडशेडिंगमुळे कसल्याही प्रकारचा त्रास व नुकसान भरपाई चा सामना करावा लागला नाही. परंतु या महाविकास आघाडी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आज संपूर्ण महाराष्ट्र प्रकाशातून अंधारात जात आहे.

चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा आहे या जिल्ह्यात मोठ मोठे वीज प्रकल्प आहे. कोळसा खाणी, सिमेंट कारखाने,पोलाद कारखाने इत्यादी मुळे पहिलेच चंद्रपूर जिल्ह्याचे तापमान संपूर्ण भारतातून उच्चांक गाठत आहे. या तापमानामुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या जनतेच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. आमची या आंदोलनाच्या रूपाने शासनाला विनंती आहे की, चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेला या वीज टंचाईचा (लोडशेडिंग) भार पडू देऊ नये, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे ते यावेळी बोलले.या आंदोलनाला चंद्रपूर (ग्रामीण) तालुक्यातून पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

आबड भवनला भीषण आग, फर्निचर जळून लाखोंचे नुकसान

सह्याद्री | चौफेर न्यूज

वणी :  टागोर चौकात असलेल्या आबड भवन ला दुपारी तीन वाजता च्या दरम्यान अचानक भीषण आग लागली. आग लागल्याचे वृत्त परिसरात पसरताच नागरिकांनी भवन कडे धाव घेतली. दरम्यान भवन अगीच्या विळख्यात असतांना भवन लगत दुकान आगीत जळून खाक झाल्याचे वृत्त आहे.

  
थोडक्यात असे,शहरातील टागोर चौकात असलेल्या  आबड भावनातून धूर निघत असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले, जवळपास दुपारचे ३ वाजले असतील. बघता बघता धूरातून भीषण आग दिसून आल्याने त्याठिकाणी बघ्यांची एकच गर्दी उसळली होती.

अग्निशमन दलाला कळताच अग्निशमन कर्मचारी घटनास्थळी आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करीत असून,यात लगतचे फर्निचर शॉप जळून खाक झाले. लाखोंचे नुकसान झाल्याचे बोलल्या जात आहे,मात्र नेमकी आग कशाने लागली याबाबत माहिती मिळू शकली नाही.


किरकोळ विक्रेत्याने कॅरीबॅगसाठी माणसाकडून 12 रुपये आकारले. आता त्याला 21,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी लागेल

                       (फाईल फोटो)


विशाखापट्टणम येथील वकील सीपना रामा राव या ग्राहकाने किरकोळ विक्रेत्याकडून 600 रुपयांपेक्षा जास्त किमतीचे कपडे खरेदी केले होते. चेकआउटच्या वेळी, त्याला आउटलेटचा लोगो असलेल्या कॅरी बॅगसाठी पैसे देण्यास सांगण्यात आले.

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आंध्र प्रदेशातील एका ग्राहक न्यायालयाने अलीकडेच एका किरकोळ विक्रेत्याला ग्राहकाला त्याच्या लोगो असलेल्या बॅगसाठी शुल्क आकारल्याबद्दल नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

विशाखापट्टणम येथील वकील सीपना रामा राव या ग्राहकाने किरकोळ विक्रेत्याकडून 600 रुपयांपेक्षा जास्त किमतीचे कपडे खरेदी केले होते. चेकआऊटच्या वेळी त्याला कॅरीबॅगसाठी 12 रुपये देण्यास सांगण्यात आले. राव यांनी कॅशियरला सांगितले की ते बॅगसाठी पैसे देणार नाहीत परंतु त्यांनी आग्रह केल्यावर त्यांनी हे प्रकरण स्टोअर व्यवस्थापकाकडे मांडले.

त्याला बॅग फुकट देण्यासही व्यवस्थापकाने नकार दिला. जेव्हा राव यांनी दुकानाची जाहिरात करणाऱ्या बॅगसाठी शुल्क आकारणे बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट केले तेव्हा व्यवस्थापकाने त्याच्यावर ओरडले, अहवालानुसार.

त्यानंतर झालेल्या मानसिक छळाबाबत ग्राहकाने भरपाईची मागणी करत शहरातील ग्राहक न्यायालयात धाव घेतली.

टाईम्स ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार, विशाखापट्टणम जिल्हा ग्राहक आयोगाने किरकोळ विक्रेत्याला त्या व्यक्तीला 21,000 रुपये नुकसानभरपाई, 1,500 रुपये कायदेशीर खर्च आणि बॅगसाठी आकारलेले पैसे परत करण्याचे आदेश दिले. किरकोळ दुकाने कंपनीचा लोगो असलेल्या कॅरी बॅगसाठी शुल्क आकारू शकत नाहीत.

2021 मध्ये, हैदराबादमधील एका ग्राहक न्यायालयाने असा निर्णय दिला होता की, लाइव्ह लॉ (live law) अहवालानुसार, हे एक अयोग्य व्यापार प्रथा आहे.

जोपर्यंत ईच्छा आकांक्षा असेल तोपर्यंत सुख दुःख कधीही संपणार नाही: अंध बाल कलाकार "चेतन"


सह्याद्री | चौफेर न्यूज 
          
मारेगाव : स्वतःच्याच हाताने स्वतःचा मृत्यु ओढवुन घेणे अर्थात आत्महत्या करणे ही कृती चुकीची असल्याचे मनोगत (ता.२०) एप्रिल रोजी नगरपंचायत मारेगावच्या प्रांगणात झालेल्या चेतन सेवाकुंर प्रस्तुत "मैफिल स्वरांची" ह्या संगीतमय कार्यक्रमातील मुख्य वादक अंध बाल कलाकार "चेतन" ह्याने व्यक्त केले. जीवनाशी संघर्ष करणाऱ्या या अंध बाल कलावंतानी सादर केलेल्या हिंदी मराठी गीतांनी मारेगावकरांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले होते.
        
दरम्यान या कार्यक्रमाचे उद्घाटन ठाणेदार राजेश पुरी, राकेश खुराणा, ॲड.सूरज महाडोळे, याचे हस्ते करण्यात आले तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ नेते गजानन किन्हेकर,माजी जि. प.सदस्य अनिल देरकर, नगरसेवक नंदेश्वर आसुटकर होते. यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष संजय देरकर व एस.बि.ट्रेडर्स चे संचालक गौरीशंकर खुराणा तसेच कुंभा येथील सरपंच अरविंद ठाकरे यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व सन्मामचिन्ह देवुन सत्कार करण्यात आला.
            
मारेगाव तालुक्यात सातत्याने होणाऱ्या आत्महत्या हा चिंतेचा विषय असुन मागील दोन वर्षात शतकी आकडा पार झाला आहे. हाच धागा जोडत अंध बाल कलाकार चेतन पुढे म्हणाला, आम्ही अंध असुन सुध्दा सकारात्मक (positive) विचार करुन आनंदी जीवन जगतो. जोपर्यंत ईच्छा आकांक्षा असेल तोपर्यंत सुख दुःख कधीही संपणार नाही. यासाठी कर्तव्यनिष्ठ राहुन हिम्मत, परिश्रम उद्योग करण्यात पुरुषार्थ असुन आपले जिवन तेजोमय करण्यासाठी सकारात्मक विचारसरणी असेल तर आत्महत्या होणार नाही. असे मनोगत व्यक्त करुन गीतांच्या संगीतमय कार्यक्रमातून नातेसंबंध व समाज प्रबोधनाचे दर्शन घडवत मारेगावकर तथा परिसरातील बांधवांना मंत्रमुग्ध केले. 

कोट्यावधी निधी शासनाला देणारा मोहदा गाव विकासापासून वंचित: सचिन रासेकर

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

वणी : यवतमाळ जिल्हातील तालुका वणी अंतर्गत मौजा मोहदा गाव नावे गौणखनिज शासनाला कोट्याधीश रुपये प्राप्त होतं असताना, 30 वर्षांपासून गाव मात्र स्वामीत्व धनाच्यानिधीपासू आजही वंचित असल्याचे माहिती अधिकाराच्या माहिती वरून समोर आले आहे. ही उदासीनता कोणाची? असा प्रश्न माहिती अधिकार कर्ते सचिन रासेकर यांनी उपस्थित केला आहे.

वणी तालुक्यातील मोहदा हे गाव गौणखनिज साठी प्रसिद्ध असून,वणी उद्योगिक विकास महामंडळ यांच्या कडून स्वामीत्व धन प्राप्त होणाऱ्या धना पेक्षा मोहदा हे एक मात्र गाव मागील तीस वर्षा पासून शासनाला 400 कोटी स्वामीत्व धन देणारे गाव ठरले असून, देणाऱ्यानी देतच राहावे, घेणाऱ्यानी घेतच राहावे हे धोरण शासना प्रती राहिल्याने मोहदा गावाचा विकास हा वाजोटा ठरला असून तो का झाला नाही? झाला तर शासन खर्च किती हा प्रश्न माहिती अधिकार निर्माण कर्ते सचिनला यांना भेडसावला असल्याने दिनांक 21 फेब्रुवारी 2022 रोजी जिल्हाअधिकारी खनिकर्म विभाग यांना खनिज विकास निधी अंतर्गत झालेली कामे या बाबत माहितीचा तपशील मागितला असता जन माहिती अधिकारी यांचा अभिप्रायात सन 2016 ते 2021 या कालावधीत खनिज विकास निधी मधून कामे मंजूर झाल्याचे दिसून येत नाही अशी पुष्टी देऊन, शासन कामा प्रति व जनते प्रति जनसेवक कर्तृत्वाचे काम हे निष्टेने पूर्ण करत नसल्याचे चित्र समोर येत असून शासनाच्या तिजोरीत नजाराणा स्वरूपात स्वामीत्व धन प्राप्त होत असताना गावाच्या वाट्याला फक्त खड्डे व पिण्यास दूषित पाणी, प्रदूषण हेच वाट्याला काय?असा संतप्त प्रश्न माहितीधिकार करत्याकडून उपस्थितीत केला असून उत्पन्न प्राप्त गाव विकासा पासून वंचित राहत असेल तर, तांडा वस्ती, पोड वस्ती, यांचा विकास खरंच झालं असतील काय हे माहिती अधिकारावरून समोर येत असून शासन दप्तरी, कामाची दिरंगाई खरंच विकासाच्या दिशेने घेऊन जातील काय हा प्रश्न सचिन रासेकर यांना दिलेल्या माहिती वरून समोर येत असून स्वामित्व धन आकडा लक्षात घेता गौणखनीज गाव निधीच्या थकीत 40 कोटीच्या निधीला दिशा येणार तर केव्हा? अस्या थकीत देयकाच्या विकास निधी वरून प्रश्न सचिन रासेकर यानी केला आहे.

मारेगाव महाविद्दालयात जागतिक वसुंधरा दिन साजरा

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : येथील कला, वाणिज्य व विज्ञान महविद्दालय, येथे, दि. 22 एप्रिल 2022 रोजी जागतिक वसुंधरा दिनानिमित्त महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागा तर्फे विज्ञान प्रद्रशनीचे आयोजन केले होते. या प्रदर्शनीत बी. एस. सी. भाग 3 च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यांनी टाकावू वस्तू पासून विशिष्ठ प्रकारचे मॉडेल बनवून प्रकल्प सादर केले. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्री. जिवन पाटील कापसे अध्यक्ष म्हणून तर प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश घरडे, कनिष्ठ महविद्यालयाचे प्राचार्य श्री. हेमंत चौधरी व प्रा.‌ डॉ. पवार उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. विनोद चव्हाण यांनी तर प्रा. स्नेहल भांदक्कर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. कापसे साहेब यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करून सादर केलेल्या प्रकल्पाला भविष्यामध्ये प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रोत्साहनपर शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. कुळकर्णी, डॉ. चिरडे, डॉ. राऊत, प्रा. कांबळे, प्रा. जेणेकर, प्रा. आत्राम, प्रा. वांढरे व श्री. आकाश कुमरे इत्यादी मंडळी उपस्थित होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रा. माकडे व प्रा. डॉ. अड्सरे यांनी परिश्रम घेतले.

यवतमाळात अमोल मिटकरी विरोधात ब्राम्हण संघ आक्रमक

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

यवतमाळ : इस्लामपूर येथील कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण व पुरोहितांबाबत भाषणात अपमानास्पद उल्लेख केला. ब्राह्मण समाजाविषयी तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य करुन ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या, त्याबद्दल त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी ब्राह्मण पुरोहित सेवा संस्थेने केली आहे. शनिवार शहर पोलिस ठाण्यात तशी तक्रार देण्यात आली असून उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
 
आमदार अमोल मिटकरी यांनी अपमानास्पद उल्लेख केल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे, जयंत पाटील यांनी ब्राह्मणांच्या केलेल्या नकलेवर हसून दाद देत या भावनांना प्रोत्साहन दिले. धार्मिक भावना तसेच जनसामान्यात ब्राह्मण वर्गाबाबत गैरसमज निर्माण करून तेढ निर्माण करून खिल्ली उडविली. पौराहित्य करणार्‍या ब्राह्मण समाजाचा सार्वजनिक बदनामी केली. हे गंभीर स्वरुपाचे गुन्हेगारी कृत्य केल्याबद्दल आमदार मिटकरी वर कारवाईची मागणी ब्राम्हण, पुरोहीत संस्थेने केली आहे. याशिवाय परंपरागत हिन्दु विवाह पद्धतीवर टीका केली आहे. सभेत राज्य शासनातील मंत्री उपस्थित हेाते. मात्र, त्यांनी यांचा निषेध केला नाही. आमदार मिटकरी यांचे वक्तव्य व्देष निर्माण करणारे आहे. त्यामुळे त्यांचेवर भारतीय दंड संहितेनुसार कारवाई करण्याची मागणी ब्राम्हण पुरोहीत सेवा संस्थेने केली. यावेळी ब्राम्हण सेवा संस्थेचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

सात महिने उलटूनही मुलाचा शोध लागत नसल्याने १ मे महाराष्ट्र दिनापासून "त्या" मातेचे उपोषण

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

वणी : सावर्ला येथील १८ वर्षीय बेपत्ता असलेल्या मुलाचा सात महिने लोटूनही पोलिसांना शोध लावण्यास अपयश येत असल्याने बेपत्ता मुलाची आई गेली सात महिन्यापासून पोलीस स्टेशन चे चकरा मारत असून माझ्या मुलाचा शोध लावा असा टाहो 'सह्याद्री चौफेर' न्यूज ला बोलतांना फोडला आहे.

सविस्तर असे की, वणी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजा सावर्ला येथील अजय अनिल तामगाडगे (१८) इयत्ता १२ वी पास होता, पुढे बि ए (BA1st) प्रथम वर्षांकरिता प्रवेश घेणार दरम्यान, ७ सप्टेंबर २०२१ रोजी अजय नेहमीप्रमाणे घरून बाहेर पडला. मात्र, तेव्हापासून तो घरी परतलाच नाही. याबाबत ८ सप्टेंबर २०२१ रोजी वणी पोलीस ठाण्यात अजय बेपत्ता असल्याची तक्रारी त्याच्या आईने दाखल केली. तेव्हा पासून पोलीस त्या बेपत्ता मुलाच्या शोधात आहे. परंतु गेली सात महिने लोटूनही पोलिसांना मुलाचा शोध लावण्यास यश आले नाही.
परिणामी मुलाची आई सुमन तामगाडगे ह्या पोलीस स्टेशन च्या येर जाऱ्या करीत असून माझ्या मुलाचा शोध लावा म्हणून सतत मागणी करीत आहे. परंतु सात महिने लोटूनही पोलिसांना बेपत्ता मुलाचा शोध लावण्यास यश येत नसल्याने मुलाच्या न्यायासाठी आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला असून, येत्या १ मे महाराष्ट्र दिनापासून वणी पोलीस स्टेशन समोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा आज (ता.२५) एप्रिल रोजी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी वणी, उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणेदार पोलीस स्टेशन यांना निवेदन देऊन यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना देण्यात आहे.

समृद्धी महामार्ग गडचिरोली, भंडारा, गोंदियापर्यंत वाढविणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

नागपूर : हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गामुळे विदर्भातील उद्योग-व्यवसायाला प्रचंड गती मिळणार आहे. गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांनाही या महामार्गाचा फायदा झाला पाहिजे, यासाठी हा महामार्ग या जिल्ह्यांपर्यंत वाढविणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

वाशिम जिल्ह्यातील शेलूबाजार ते नागपूरपर्यंत २१० किलोमीटर स्वतः वाहन चालवत श्री. शिंदे यांनी आज समृद्धी महामार्गाची पाहणी केली. यादरम्यान वाशिम जिल्ह्यातील शेलूबाजार, वर्धा जिल्ह्यातील आर्वी टोल प्लाझा येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, सह व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड आदी उपस्थित होते.

शेलूबाजार येथून श्री. शिंदे यांनी पाहणी दौऱ्यास स्वतः वाहन चालवत प्रारंभ केला. वर्धा जिल्ह्यातील आर्वी टोल प्लाझा येथे त्यांनी महामार्गाची पाहणी केली. त्यानंतर वर्धा जिल्ह्यातीलच वेरूळजवळ वन्यप्राण्यांना आवागमन करता यावे, यासाठी बांधण्यात आलेला वन्यजीव उड्डाणपूल, नागपूर जिल्ह्यात वायफळ येथील टोल प्लाझा व परिसर, तसेच नागपूर येथे ज्या भागातून महामार्गास प्रारंभ होतो, त्या भागाची सुद्धा बांधकाम मंत्र्यांनी पाहणी केली.

समृद्धी महामार्गामुळे खऱ्या अर्थाने विदर्भात समृद्धी येणार आहे. येथील औद्योगिकीकरणासह उद्योग-व्यवसायाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. महामार्गाचा विदर्भातील अन्य जिल्ह्यांनाही फायदा झाला पाहिजे, ही भूमिका समोर ठेवून हा महामार्ग गडचिरोली, भंडारा, गोंदियापर्यंत वाढविण्यात येणार आहे. या महामार्गाच्या वाशिम जिल्ह्यातील शेलूबाजार ते नागपूर या पहिल्या टप्प्यातील २१० किलोमीटर मार्गाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते येत्या २ मे रोजी लोकार्पण होणार आहे. जो मार्ग पूर्ण झाला आहे, तो सर्वसामान्यांसाठी खुला झाला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे या टप्प्याचे लोकार्पण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डिसेंबर २०२३ पर्यंत संपूर्ण महामार्ग वाहतुकीस खुला होणार असल्याचे श्री. शिंदे यांनी आर्वी टोल प्लाझा येथे बोलताना सांगितले.

या महामार्गावर वाहने १५० च्या गतीने धावू शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षेचीही पूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे. त्यामुळे या महामार्गावर अपघाताचे प्रमाण शून्य राहील. महामार्गावर तत्काळ प्रतिसाद पथके राहतील. मार्गाच्या बांधकामासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. हा इकोफ्रेंडली रस्ता असून मार्गाच्या दुतर्फा ११ लाख ३० हजार झाडे लावून ग्रीन कव्हर तयार करण्यात आले आहे. महामार्गावर आपण २५० मेगावॉट सौरऊर्जा तयार करतो आहोत. महामार्गाशेजारी एक हजार शेततळी तयार करण्यात आली असून या तळ्यातून दोन हजार ५०० कोटी लिटर पाण्याचा साठा झाला. यामुळे परिसरातील पाणी पातळी वाढली असून त्याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे.

या संपूर्ण महामार्गावर वन्यप्राण्यांना आवागमनासाठी ७६ अंडरपास तर ८ ओव्हरपास तयार करण्यात आले आहेत. यावर ३०० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. तसेच प्रवाशांना महामार्गावर ये-जा करता यावी, यासाठी २४ इंटरचेंजेस देण्यात आले आहेत. महामार्ग तयार करताना वृक्षारोपण, सौरऊर्जा, शेततळे, पर्यावरण, वन्यप्राणी, उद्योग, शेतकरी आदींचा विचार करण्यात आल्याने हा केवळ महामार्ग नाही तर लोकांच्या आयुष्यात समृद्धी आणणारा महामार्ग ठरणार आहे. विकासाच्या कोणत्याही प्रक्रियेत भूसंपादन अतिशय महत्वाचे असते. या महामार्गाचे महत्व लोकांना समजावून सांगितल्याने आणि पाचपट मोबदला दिल्याने वेळेत भूसंपादन होवू शकले. महामार्गावर नवनगरे उभारण्यात येणार असून त्याचेही काम गतीने होणार असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.

‘महाज्योती’च्या योजनांची प्रभावी अमंलबजावणी करा – इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

नागपूर : इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेष मागासप्रवर्ग या प्रवर्गातील व्यक्तींच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकासासाठी विविध योजना, उपक्रमांची ‘महाज्योती’मार्फत प्रभावी अंमलबजावणी करा, असे निर्देश इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज येथे दिले.

सामाजिक न्याय भवन येथे महाज्योतीच्या संचालक मंडळाची बैठक श्री. वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. महाज्योतीच्या कामकाजाचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला. महाज्योतीचे सदस्य लक्ष्मण वडले, दिवाकर गमे, बबनराव तायवाडे, व्यवस्थापकीय संचालक प्रदीपकुमार डांगे, समाजकल्याण उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड, मुख्य लेखा वित्त अधिकारी अतुलकुमार वासनिक, कंपनी सेक्रेटरी अविनाश गंदेवार, प्रकल्प अधिकारी कुणाल सिरसाठे आदी यावेळी उपस्थित होते.

समाजातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग या कमकुवत घटकांच्या सर्वसमावेशक सर्वांगिण शाश्वत विकासासाठी ‘महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था’ (महाज्योती) या स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात आली असून संस्थेमार्फत मागासवर्गियांसाठी सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास, संशोधन, रोजगारभिमुख वृध्दी, कौशल्यविकास, स्वयंरोजगार, ग्रामीण विकास, शेती विकास, व्यक्तिमत्व विकास , स्पर्धात्मकता विकास, सामाजिक ऐक्य व सलोखा आणि तत्सम क्षेत्रांमध्ये विविध उपक्रम राबवावे, असे श्री. वडेट्टीवार यांनी सांगितले.

इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील जातींचा इतिहास, संस्कृती, चालीरीती, रुढी-परंपरा, पारंपारिक व्यवसाय आदींची माहिती तसेच समग्र वाङमयाची निर्मिती महाज्योतीतर्फे करण्यात येणार आहे. त्यामध्ये पाच खंडांचा समावेश असून या खंडांची छपाई शासकीय मुद्रणालय व ग्रंथागार येथून करण्यात येईल, यादृष्टीने काटेकोर नियोजन करावे, असे आदेश महाज्योती प्रशासनास त्यांनी दिले.

महाज्योतीतर्फे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी विविध योजना व उपक्रम राबविण्यात येतात. त्यानुषंगाने इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेष मागासप्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना युपीएससी, एमपीएसी स्पर्धा परीक्षेसंदर्भात दिल्ली येथील नामांकीत संस्थेत प्रशिक्षण व पंधराशे रुपये प्रतीमाह छात्रवृत्ती (स्टायपेंड) दिल्या जाते. डॉक्टरेट (पीएचडी) करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. जेईई, नीट व एमएचसीइटी परीक्षेच्या विद्यार्थ्यांना टॅब पुरवठा केला जाणार असून प्रशिक्षण सुविधाही त्यांना पुरविल्या जाणार आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोग नागरीसेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेसाठी आर्थिक सहाय्य संस्थेव्दारे देण्यात येणार आहे. संस्थेव्दारे वैमानिक प्रशिक्षणाकरिता वीस विद्यार्थ्यांची निवड केल्याची माहिती श्री. वडेट्टीवार यांनी दिली.

शेतकऱ्यांसाठी करडई तेलबिया उत्पादन प्रकल्पांतर्गत अर्थसहाय्य योजनेतून विदर्भातील सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लागवडीसाठी खते, किटकनाशक व पिक संवर्धक औषधीसाठी 2 हजार 200 रुपये अनुदान दिल्या जाईल. याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनचरित्रावर आधारित “तृतीय गुणरत्न” या उत्कृष्ठ नाटकाच्या प्रयोग सादरीकरणासाठी निर्मात्यांना व त्यांच्या चमूला अनुदान दिल्या जाईल. येत्या काळात मुंबई, रत्नागिरी व नांदेडे येथेही महाज्योतीचे कार्यालय स्थापन करण्यात येणार असून त्यामार्फत तेथील क्षेत्रातील मागासवर्गीयांना विविध योजनांचा लाभ दिला जाईल, असेही श्री. वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले.

नागरी सुविधांची कामे गतीने पूर्ण करा

गावांचा व शहरांचा विकास तेथील मुलभूत सोयी-सुविधा, रस्ते, शाळा, आरोग्य केंद्र तसेच स्वच्छता आदी घटकांवर अवलंबुन असतो. गावांचा कायापालट होऊन सुंदर शहर म्हणून लौकीक मिळविण्यासाठी नगर परिषद असलेल्या शहरात नागरी सुविधांची कामे नियोजनबध्द व गतीने पूर्ण करा, असे निर्देश इतर मागास बहुजन कल्याण, खार जमिनी विकास, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज येथे दिले.

सामाजिक न्याय भवन येथे ब्रम्हपूरी, सिंदेवाही व सावली या नगरपरिषदेच्या विकास कामांबाबत आढावा मंत्री महोदयांनी घेतला. ब्रम्हपूरी, सिंदेवाही व सावली नगरपरिषदेचे पदाधिकारी व मुख्याधिकारी यावेळी उपस्थित होते.

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपूरी, सिंदेवाही व सावली या नगरपरिषदांना नागरी सुविधांची कामे पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यातून नाविण्यपूर्ण योजनेतील कामे, चौक सौंदर्यीकरण, पुतळा उभारणे, डिपी रस्त्यांचे बांधकाम, इमारत बांधकाम, तलाव बांधकाम व सौंदर्यीकरण, जलतरण तलाव आदी कामे नियोजनपूर्वक व गतीने पूर्ण करावी. नगरोत्थान योजनेंतर्गत नियोजित कामांना प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी प्रयत्न करावे. दलीतवस्ती सुधार कार्यक्रमांतर्गत प्रस्तावित कामे पूर्णत्वास नेण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर दोन डिजीटल शाळा निर्मितीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. त्या शाळांमध्ये डिजीटल क्लासरुमसह पिण्याच्या पाणी, स्वच्छता गृह, विविध शैक्षणिक साहित्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करुन शैक्षणिक आलेख उंचाविण्यासाठी प्रयत्न केल्या जाईल, असेही श्री. वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले.