Page

दिव्यांगाना ३ टक्के निधीचे चेक सरपंचांनी दिले घरपोच


योगेश मडावी | सह्याद्री चौफेर 

झरी : अपंगाना आपल्या हक्काच्या निधीकरिता  अनेकदा शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवून सुद्धा निधी मिळत नाही, वारंवार मागणी तक्रारी केल्या जातात परंतु कोणीच पुढाकार घेतांना दिसत नाही. मात्र अडेगाव गाव च्या इतिहासात मानाचा तुरा रोवला गेला म्हणायला हरकत नाही, येथील सरपंच सीमा लालसरे यांनी अपंग निधीचे चेक घेऊन अपंग बांधवांच्या स्वतः घरी जाऊन दिले. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून आभार मानले जात आहे.

अपंग बांधवांना कार्यालय गाठण्यास त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून अडेगावच्या सरपंच व ग्रामपंचायत प्रशासनाने अपंग निधीचे चेक त्यांच्या घरी जाऊन वाटप दिले.

ग्रामपंचायतस्तरावर अनेकदा चकरा मारून सुध्दा निधी मिळत नव्हता त्यामुळे या कठीण काळात दिव्यांगाना विविध समस्या ला सामोरे जावे लागत असतांना चक्क घरपोच निधी आल्याने दिव्यांगात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गावातील जवळपास २३ अपंग बांधवांना त्यांचे हक्काचे ३ टक्के निधी वाटप करण्यात आल्याने दिव्यांग बांधवांनी सरपंच सीमा लालसरे, सचिव गवारकर व ग्रामपंचायत सदस्य यांचे आभार मानले. यावेळी सरपंच लालसरे यांचे सह ग्रा.पं. कर्मचारी पंकज उईके, ग्रामविकास अधिकारी गवारकर इतर ग्रामपंचायत सदस्य, गावकरी व जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

शिवसेना प्रणित व्यापारी आघाडी ची कार्यकारिणी गठीत

रवि घुमे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : आज दिनांक ३१ मार्च रोजी शिव सेना जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मा. विश्वासभाऊ नांदेकरयांच्या नेत्रृत्वा खाली शिवसेना प्रणीत व्यापारी आघाडी करीता वणी विधानसभातील व्यापारी आघाडीतील काही पदाधिकारीची नियुक्ती करण्यात आली.

यात शिवसेना व्यापारी आघाडी वणी तालुका संघटक पदी श्री जिवन नांदेकर, मारेगांव तालुका संघटक पदी श्री विठ्ठल लांबट, झरी तालुका संघटक पदी श्री सागर आवारी, मारेगांव तालुका सचिव पदी श्री अशोक ढाले, वणी शहर संघटक पदी श्री मोन्टू वाधवानी, वणी उपशहर संघटक पदी श्री महेश गिरटकर, वणी उपशहर संघटक पदी श्री अनिल पुनियानी, वणी शहर सचिव पदी श्री मधुकर लेडांगे, मारेगांव शहर संघटक पदी श्री करण किंगरे, मारेगांव शहर सचिव पदी श्री प्रसाद चौधरी, मारेगांव उपशहर संघटक पदी श्री जय सिडाना, झरी शहर संघटक पदी श्री शंकर नारायण रस्सावार यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच वणी विधान सभातील प्रत्येक गाव निहाय २ सदस्य असे एकुण ६०० व्यापारी आघाडी सदस्य पदांची नियुक्ती करण्यात आली.
(जाहिरात - 7218187198)

या कार्यक्रात युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत चचडा, उपजिल्हा प्रमुख शिवसेना शरद ठाकरे, व्यापारी जिल्हा संघटक हिमानशू बतरा, वणी तालुका प्रमुख रवी बाढेकर, मारेगांव तालुका प्रमुख संजय आवारी, माजी तालुका प्रमुख गणपत लेडांगे, मारेगांव शहर प्रमुख अभय चौधरी, महेश चौधरी, प्रशांत बलकी, सानु पावडे, निलेश बेलेकर, कुणाल लोणारे व इतर शिवसैनिक उपस्थित होते.

लातुरात होणार विश्वकर्मा समाजातील राज्यस्तरीय वधु वर पालक मेळावा


बालाजी सुवर्णकार | सह्याद्री चौफेर 

लातूर : विश्वकर्मा समाजातील अनेक मुले-मुली विवाहास पात्र असूनही या महागाईच्या काळात प्रवास करून स्थळ पाहणे अतिशय अवघड झाले असून या दोन वर्षाच्या करोनाच्या ताळेबंदी मुळे आणि अनेकांचे विवाह जुळणे कठीण झाली होती ही बाब लक्षात घेऊन विश्वकर्मा वंशीय समाज संघटना महाराष्ट्र राज्य च्या वतीने रविवार दिनांक 10 एप्रिल 2022 रोजी सकाळी ठीक दहा वाजता विश्वकर्मा गार्डन फंक्शन हॉल बार्शी रोड लातूर येथे आयोजित केला आहे. या तरी विश्वकर्मा समाजातील विवाह इच्छुक वकील डॉक्टर इंजिनिअर शिक्षक-प्राध्यापक विज्ञान वाणिज्य व इतर सर्वच क्षेत्रातील नोकरी-व्यवसाय करणारे पदवीधर मुले मुली आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने या राज्यस्तरीय वधू-वर मेळाव्याला उपस्थित राहून आपल्या मुला मुलीचे विवाह जुळण्यास येथे उपलब्ध होईल त्यासाठी प्रत्येकाने वधू-वर मोठ्या संख्येने उपस्थित राहावे या माध्यमातून आपल्याला योग्य ते वधु वर आपल्या आवडीनिवडी सार्थ स्थळ मिळेल अनेक उत्तम स्थळा पर्यंत पाहण्यासाठी विवाह जमविण्यासाठी आपल्या वधु वराचे नाव नोंदणी करण्यासाठी सुदर्शन बोराडे मोबाईल नंबर 7588818828 यांच्याशी संपर्क करून या राज्यस्तरीय वधू-वर मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे, विश्वकर्मा वंशीय समाज संघटना महाराष्ट्र राज्याचे मुख्य संयोजक सुदर्शन बोराडे, दीलीप मतकर अमरावती, राजू आंबेकर नांदेड, नामदेव सुवर्णकार, मधुकर टोम्पे पुणे, प्राध्यापक अतुल काटकर परभणी, विजय पेनुरकर, बालाजी सुवर्णकार, राम रत्नपारखी, श्री हरी रत्नपारखे लातूर यांच्यासह इतर सर्व सन्माननीय सदस्यांनी केले आहे.

पांढरकवड्यात अल्पवयीनचा विनयभंग, आरोपी वर गुन्हा दाखल

विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : मारेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पांढरकवडा (पिसगांव) येथे एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना (ता.२७) मार्च रोजी दुपारी २:३० वाजता सुमारास घडली. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने बुधवारी दि. ३० मार्च रोजी मारेगाव पोलीस ठाणे गाठुन सदर आरोपी विरोधात तक्रार दिली. त्या नुसार पोलिसांनी विनयभंग, पोस्को नुसार आरोपीवर गुन्हा दाखल केला.
 
सूत्रांने दिलेल्या माहितीनुसार मारेगाव तालुक्यातील पांढरकवडा (पिसगाव) येथे एक अल्पवयीन मुलगी आरोपीच्या चुलत बहिणीच्या घरी पाणी पित असतांना अक्षय रवींद्र गोलर (२४) याने पीडितेला स्पर्श करीत वाईट भावनेने विनयभंग केला. शिवाय आरोपीने पीडितेला 'तु जर कुणाला सांगशील तर तुला सोडणार नाही' अशी धमकी दिली. भेजारलेल्या पिडीतेने सर्व आपबीती आपल्या आईला सांगितली, त्यानुसार पोलिसांनी याप्रकरणी ३५४ भांदवी, पास्को, गुन्हा दाखल करून या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहे.


कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वन्य कायदा विषयावरती व्याख्यान

रवि घुमे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागा तर्फे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्याना करीता प्रा. डी. एन. वाताखरे, विज्ञान महाविद्यालय, सावली हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभले होते. त्यांनी वन्य कायदा या विषया वरती व्याख्यान दिले.

या कार्यक्रमला प्रा. डॉ. गजानन सोडनर, इतिहास विभाग प्रमुख यांनी अध्यक्ष भूषविले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. विनोद एन. चव्हाण, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख यांनी तर प्रा. स्नेहल भांदक्कर यांनी सूत्रसंचालन केले.

या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. तानुरकर, डॉ. कुळकर्णी, प्रा. देशमुख, डॉ. पवार, डॉ. परदेशी, डॉ. चिरडे, प्रा. जेणेकर, प्रा. आत्राम, प्रा. शेंडे, प्रा. भगत, श्री. आकाश कुमरे व श्री. पंढरपुरे इत्यादी मंडळी उपस्थित होती. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश घरडे यांनी कार्यक्रम घेण्यास परवानगी देऊन सहकार्य केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रा. माकडे व प्रा. डॉ. अडसरे यांनी परिश्रम घेतले.

अनु. जमातीचे यादीत ईतर कोणतीही जात समाविष्ट करु नये


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

यवतमाळ : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत धनगर समाजाला अनु. जमातीचे यादीत समाविष्ट करण्याची मागणी केली. सदर मागणी ही अयोग्य असून धनगर समाजात आदिवासीचे संस्कृती, बोलिभाषा, पेहराव, व देवदेवता यांचे कुठेही संबंध जुळून येत नाही धनगर हे आदिवासी नाहीत म्हणून धनगर समाजाला अनु. जमातीचे यादीत समाविष्ट करण्यात येऊ नये.

आधीच आदिवासी समाज अशिक्षित असून आर्थिक व शेक्षणिक दृष्टया कमकुवत आहे. त्यात प्रत्येक क्षेत्रात बोगस आदिवासी बनावट जातींचे दाखले तयार करून खऱ्या आदिवासीचे जागेवर नोकरीला लागलेले आहेत खरे आदिवासी आज देखील लाखोंचे संख्येने बेरोजगारीने वन वन फिरत आहेत. अनेक वैद्यकीय, अभियांत्रिकी महाविद्यालयात बोगस आदिवासी विध्यार्थी आदिवासीचे जागेवर प्रवेश घेऊन डॉक्टर, इंजिनिअर झालेले आहेत. आणि आज देखील होत आहेत. आदिवासीचे विद्यार्थी मात्र आपल्या हक्का पासून वंचित आहेत. त्यात आणखी ईतर जमातींचा जर समावेश केला तर ते आदिवासी जनतेवर अन्याय होईल म्हणून या पुढे आदिवासीचे यादी मध्ये ईतर जातींचा समावेश करण्यात येऊ नये.या आशयाचे निवेदन नॅशनल आदिवासी पीपल्स फेडरेशन व ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन यवतमाळ यांचे वतीने भारताचे मा.प्रधानमंत्री  यांना जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे मार्फत निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी आदिवासी पीपल्स फेडरेशन चे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद सिडाम, सचिव लक्ष्मण कुळसंगे,उपाध्यक्ष गुलाबराव मसराम,एम्प्लॉईज फेडरेशन चे केंद्रीय सदस्य पवनकुमार आतराम, राज्यउपाध्यक्ष गुलाबराव कुडमेथे, महासचिव किशोर उईके,ट्रायबल टायगर फोर्स चे विकास कुळमेथे, जि. प. कर्मचारी पतसंस्थेचे संचालक शंकर कोटनाके, बाबाराव कुळसंगे,नरेश उईके, रामभाऊ तोडासे, गणेश धुर्वे, प्रकाश उईके,शहर अध्यक्ष संजय मडावी,अविनाश कुळमेथे,माणिक मडावी इत्यादि सभासद उपस्थित होते.

दुकान गाळ्याचे वाढीव भाडे कर रद्द करा - प्रमोद उरकुडे

रुस्तम शेख | सह्याद्री चौफेर 

कळंब : दुकान गाळेचे वाढीव भाडे कर रद्द करावे , कोरोना च्या काळातील दुकान, (गाळे) भाडे कर माफ करावे तसेच दुकान भाडे कर भरण्यास काही महिन्या करिता सवलत द्यावी इत्यादी मागणीच्या संदर्भात व्यापारी संघटनेच्या वतीने मुख्याधिकारी नगर पंचायत कळंब यांना निवेदन सादर करण्यात आले.

कोरोना प्रतिबंधक उपायोजना (लॉक डाऊन) काळात सर्व व्यापार, प्रतिष्ठान बंद असल्यामुळे व्यापाऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत दुर्बल होऊन व्यवसाय डबघाईत आला आहे.

त्यामुळे वरील मागणीच्या संदर्भात व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रमोद उरकुडे यांनी व्यापारी संघटनेच्या वतीने मुख्याधिकारी नगर पंचायत कळंब यांच्याशी चर्चा करून वरील मागणीच्या संदर्भात तातडीने योग्य निर्णय घेऊन न्याय द्यावा अशी मागणी या प्रसंगी केली .

या पूर्वी नगर पंचायत कळंब यांना निवेदन दिले होते, 
परंतु निवेदनातील विषयाच्या संदर्भात गांभीर्याने दखल घेण्यात आली नसून त्या बाबत अजून पर्यंत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल प्राप्त झाला नाही.

मात्र दुकान गाळे भाडे कर ची वसुली सक्तीने करण्यात येत आहे. त्यामुळे व्यापारी वर्गात असंतोष पसरलेला आहे.

सदर मागणीच्या संदर्भात गांभीर्याने दखल घेऊन सकारात्मक भूमिका घेतली गेली नाही ,तर जन आंदोलन करण्यात येईल त्या वेळी संवेदनशील परिस्थिती निर्माण झाल्यास याला नगर पंचायत प्रशासन जबाबदार राहील असा तीव्र इशारा दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे. .

निवेदन देते वेळी मुस्ताक शेख, शैलेश नक्षणे, दीपक कुटेमाटे, राफे खतीब, संजय कुबडे, आदि गुल्हाने, प्रशांत कडूकर, सुशील खिरटकर, प्रवीण चांदोरे, यशवंत एकूणकार, किसन निलजकर, साहिल शिरभाते जानराव पोटे, रुस्तम शेख (प्रतिनिधी), अनुप साळवे (पत्रकार) इत्यादी बहुसंख्या व्यापारी उपस्थित होते.

नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष, तसेच पदाधिकारी (लोकप्रतिनिधी) यानी व्यापाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने योग्य निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आमचे प्रतिनिधी रूस्तम शेख यांच्या कडे व्यापारी बांधवांनी व्यक्त केली आहे.

संपात सहभागी का होत नाही म्हणून बस चालकाला मारहाण

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर

वणी : एकशे पन्नास दिवस होत आहे तरी संपा सुरूच आहे. त्यामुळे संपात सहभागी का होत नाही, या कारणावरून एका चालकाला शिवागीळ करत लाथा बुक्क्यानी मारहाण केल्याची घटना येथील बस स्थानकासमोर घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध वणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

भाऊराव चरणदास पेंदोर असे तक्रारकर्त्या चालकाचे नाव आहे तर, बंडू खडसे व विष्णू चिलईकर अशी आरोपिंची नावे आहेत. यातील विष्णू चिलईकर हा वांजरी येथील रहिवाशी असून तो चिमूर बस आगारात चालक म्हणून कार्यरत आहे. बंडू खडसे हा भाऊराव पेंदोर यांना संपात सहभागी का होत नाही, तुझ्यामुळे आम्हाला ड्युटीवर घेत नाहीये, असे म्हणून बंडू व विष्णू यांनी भाऊराव ला शिवागीळ करत मारहाण केल्याचा आरोप आहे.
(जाहिरात)

याबाबत तक्रार करण्यासाठी गेले असता, आगार प्रमुखांनी तक्रार घेण्यास नकार दिल्याचा आरोप पेंदोर यांनी केला.
(जाहिरातीसाठी संपर्क : 7218187198)

मुख्य निवडणूक अधिकारी भेटीला आले आमच्यासाठी उत्सवाचा दिवस – तृतीयपंथीयांची भावना

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

ठाणे : मतदार ओळखपत्रावर तृतीयपंथीय असा उल्लेख ही अभिमानाची बाब आहे..हे ओळखपत्र आमच्या जगण्याला बळ देणारं आहे..आमच्या वस्तीत पहिल्यांदा मुख्य निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी आले आमच्यासाठी हा उत्सवाचा दिवस असल्याची भावना ठाणे जिल्ह्यातील तृतीयपंथी भगिनींनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्याजवळ केली. निमित्त होते भिवंडी येथे आयोजित करण्यात आलेले तृतीयपंथी मतदार नोंदणी विशेष शिबिराचे.

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे आज ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. जिल्ह्यातील भिवंडी येथे तृतीय पंथीय मतदार नोंदणीसाठी सुरू असलेल्या विशेष शिबिरांना श्री. देशपांडे यांनी भेट दिली आणि तृतीयपंथी मतदारांना ओळ्खपत्राचे वाटप केले. यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम, मुख्य निवडणूक अधिकारी यांचे विशेष कार्य अधिकारी दीपक पवार, भिवंडीचे उपविभागीय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे, तहसीलदार अधिक पाटील, किन्नर अस्मिता संस्थेच्या तमन्ना केणे आदी यावेळी उपस्थित होते.

दि. ३१ मार्च हा आंतरराष्ट्रीय तृतीय पंथीय ओळख दिन म्हणून साजरा केला जातो. पात्र सर्व तृतीयपंथीय नागरिकांची नोंदणी करणे हे उद्दिष्ट ठेवून मतदार संघांतर्गत तृतीय पंथीयांची संख्या अधिक असणाऱ्या ठिकाणी विशेष शिबिरांचे आयोजन केले जात आहे. त्यानुसार भिवंडी येथील भंडारी कम्पाऊंड आणि गायत्री नगर येथे तृतीयपंथीय मतदार विशेष नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याला आज राज्याच्या मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी भेट दिली. त्यावेळी उपस्थित तृतीयपंथी भगिनींनी आज पहिल्यांदा राज्याचे अधिकारी, जिल्हाधिकारी आमच्या वस्तीत आले आमच्याशी संवाद साधला म्हणून भावनिक झाल्या होत्या.

यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे म्हणाले की, लोकशाही बळकट करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग असणे आवश्यक आहे म्हणून समाजातील वंचित घटक मुख्य प्रवाहात यावे त्यांनाही लोकशाही प्रकियेत सहभागी होता यावं यासाठी त्यांची मतदार नोंदणी होणे आवश्यक आहे.मतदानाचा अधिकार हा तुम्हाला सक्षम करताना लोकशाहीमधील तुमचं महत्व अबाधित राखेल, असे त्यांनी यावेळी सांगितले. तृतीयपंथी घटकांसाठी काम करणाऱ्या संस्थांनी प्रत्येक तृतीयपंथी भगिनींना शुभेच्छांचे पोस्टकार्ड पाठवावे जेणेकरून मतदार नोंदणी करताना त्या कार्डचा उपयोग हा रहिवासी पुरावा म्हणून करता येऊ शकेल. तृतीयपंथी भगिनींचे मतदार नोंदणीसाठी अर्ज आल्यावर त्यावर सहानुभूतीपूर्वक विचार करावा, त्या मतदार नोंदणीपासून वंचित राहणार नाही यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देण्याची सूचना श्री. देशपांडे यांनी केली.

जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर म्हणाले, तृतीय पंथीय मतदार नोंदणी हे क्रांतिकारक पाऊल असून ठाणे जिल्ह्यामध्ये त्यादृष्टीने चांगले काम केले आहे. जिल्ह्यात साधारणपणे सहा हजार तृतीय पंथीय असून त्यांपैकी पात्र सर्वांची मतदार नोंदणी करून त्यांना मतदानाचा हक्क बजावता येईल यादृष्टीने कार्यवाही करू, असे आश्वासन दिले. कोविड काळात समाजातील वंचित घटकांना जावणाऱ्या समस्यांमुळे प्रशासनाला त्यांच्याकडे लक्ष देता आलं त्यांच्या समस्या जाणून घेता आल्या, असे त्यांनी सांगितले.

आम्हाला समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी आणि आम्हाला मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी प्रशासनातील सर्वोच्च अधिकारी आमच्याकडे येऊन संवाद साधतात यापेक्षा भाग्याचा दिवस असू शकत नाही, अशी भावना अस्मिता संस्थेच्या तमन्ना केणी यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी श्री. देशपांडे, श्री. नार्वेकर यांच्या हस्ते तृतीयपंथी नवमतदारांना ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. तहसीलदार अधिक पाटील यांनी आभार मानले.

दरम्यान, सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे यांनी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी जिल्ह्याचे सादरीकरण केले. मतदार नोंदणी, मतदार याद्यांमधून नाव वगळणी, तृतीय पंथीय मतदार नोंदणीसाठी करण्यात आलेले प्रयत्न आदी बाबत यावेळी चर्चा करण्यात आली.


एस.पी.एम विद्यालयात बारा ते चौदा वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण संपन्न


शंकर घुगरे | सह्याद्री चौफेर 

वणी : शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयात वर्ग 5 ते 8 वीच्या वयोगट बारा ते चौदा वर्षाच्या विद्यार्थ्यांना लसीकरणाचा पहिला डोस देण्यात आला.

यावेळी एकंदरीत मुलं मुली मिळून 331 विद्यार्थ्यांनी पहिला डोस घेतला यावेळी शाळेचे मुख्यध्यापक श्री क्षीरसागर सर उपमुख्याध्यापक श्री. तामगाडगे सर उपस्थित होते. यावेळी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण केले.

शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

लक्कडकोट येथे शाळापूर्व तयारी अभियान प्रशिक्षण


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 
                
राजुरा : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बाबूपेठ , चंद्रपूर स्टार्स प्रकल्प अंतर्गत शाळा पूर्व तयारी अभियान केंद्रस्तर प्रशिक्षण पंचायत समिती राजुरा अंतर्गत जि प उ प्राथ शाळा लक्कडकोट, येथे केंद्र देवाडाचे प्रशिक्षण श्री शेषराव वानखेडे, केंद्रप्रमुख यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आले. 
       
प्रशिक्षणाची सुरवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मा सौ कल्पना श्रीकुंडावार व श्री राजकर शेडमाके सर यांच्या शुभ हस्ते पुष्पहार व दीप प्रज्वलित करून करण्यात आले. सदर प्रशिक्षणात शाळापूर्व तयारी कशी करावी शाळापूर्व तयारी कशासाठी, नवीन शैक्षणिक धोरण यामध्येपालकांची भूमिका, शिक्षक, अंगणवाडी सेविका, गावातील शिक्षण प्रेमी यांची भूमिका समजावून या सर्वांच्या मदतीने दाखलपात्र विद्यार्थी यांची शाळा पूर्व तयारी कशी करावी या बाबत सखोल माहीती मार्गदर्शक श्री दिलीप पाटील सर यांनी दिली.
               
तसेच शाळा पूर्व तयारी अभियानाच्या यशस्वीकरिता मेळावा कसा घ्यावा, मेळाव्यामध्ये ७ स्टॉल कसे लावावे, प्रत्येक स्टॉलवर कोणकोणत्या कृती घ्याव्या, कृती कार्ड कसे वापरावे व पालकांच्या मदतीने १० ते १२ आठवडे बालकांचा अभ्यास कसा घ्यावा याबाबाबत श्री प्रकाश रोकमवार सर व श्री देवेंद्र रहांगडले विषयतज्ञ गट साधन केंद्र राजुरा यांनी माहिती देऊन प्रत्यक्ष पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
             
सदर प्रशिक्षणाला देवाडा केंद्रातील सर्व जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक, १ ते ५ विला शिकविणारे सर्व शिक्षक व जिल्हा परिषद शाळा क्षेत्रातील सर्व अंगणवाडी शिक्षिका असे एकूण ५५ प्रशिक्षणार्थी यांनी उपस्थिती दर्शविली.

यावेळी सर्व प्रशिक्षणार्थी यांना स्वादिष्ट अल्पोआहार, चाय व थंड पाण्याची उत्तम सोय करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री शेषराव वानखेडे केंद्रप्रमुख देवाडा यांनी तर संचालन श्री संतोष उईके सर व आभार प्रदर्शन श्री मधुकर गोरे सर यांनी केले.

पथनाट्याच्या माध्यमातून राज्य शासनाच्या विविध योजनांबाबत जनजागृती


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

नागपूर : पथनाट्य हा निव्वळ करमणुकीचा प्रकार नाही ते निर्हेतुक नसते. विशिष्ट सामाजिक वा राजकीय विचार जनमानसात पोचवण्याचे काम ही पथनाट्ये करत असतात. ती एक सामाजिक चळवळ आहे. विशिष्ट विचारसरणी असलेले कलाकार आपल्या अभिनयाद्वारे त्यांचा विचार पसरवण्याचे काम अशा नाटकांद्वारे करत असतात. त्याच अनुषंगाने राज्य शासनाच्या विविध योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात व त्यामार्फत सामान्यांच्या जीवनात बदल घडून यावा यासाठी स्थानिक भाषेत व स्थानिक कलाकारांच्या सहभागात राज्य शासनाच्या महत्वपूर्ण योजना व गेल्या दोन वर्षातील  उपलब्धीचे सादरीकरण सध्या संपूर्ण जिल्ह्यात सुरू आहे त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

आणि गेल्या दोन वर्षात केलेल्या कामांचा आढावा, तसेच अनुसूचित जाती, जमाती, सर्वसाधारण, इतर मागासवर्गीय व अल्पसंख्यांक व सर्वसामान्यांसाठी असणाऱ्या प्राथमिक योजनांची माहिती यामार्फत दिली जाते. सदर पथनाट्य जिल्ह्यामध्ये विविध भागात सध्या जिल्हा माहिती कार्यालयाच्या मार्फत सुरू आहे. कोरोनाच्या सावटातून बाहेर पडत असलेल्या जनतेच्या पारंपारिक कलांची ही मेजवानी मनाला भावत आहे.

गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या सावटात असणाऱ्या ग्रामीण व शहरी भागात पारंपारिक कलागुणांना प्रोत्साहन देणाऱ्या विविध कलापथक, पथनाट्य, गण, गवळण,कव्वाली, भारूड, बतावणी अशा विविध कला व त्यातून होणारे लोकप्रबोधन याला खीळ बसली होती. राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाने स्थानिक जिल्ह्याच्या विविध योजनांमधून हे कार्यक्रम राबविण्यासोबतच आपल्या नव्या मोहिमेत दमदार कला पथकांच्या गटामार्फत राज्य शासनाच्या दोन वर्षातील उपलब्धी संदर्भात मांडणी सुरू केली आहे.

जिल्हा माहिती कार्यालयामार्फत हे पथनाट्य ग्रामीण भागात होत आहे. शहराच्या काही भागातही पथनाट्य होत असून त्यांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. नागपूर जिल्ह्यात विविध तालुक्यात पथकाने आपल्या स्थानिक भाषेतून लोकांसमोर योजनांची मांडणी केली. याला शहरी व ग्रामीण जनता उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहे.

आकापूर येथील युवकांची गळफास घेऊन आत्महत्या

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : तालुक्यातील आकापुर (लाखापूर) येथील २७ वर्षीय युवकाने स्वतः च्या शेतामध्ये पळसाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज मंगळवार दि. २९ मार्च रोजी सकाळी ७:१५ वाजताच्या दरम्यान घटना उघडकीस आली.
 
प्रवीण भानुदास जांभुळकर (२७) रा. आकापूर (लाखापूर) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील व एक भाऊ असा आप्त परिवार आहे.
     (मृतक प्रवीण भानुदास जांभुळकर वय २७ रा. आकापूर)

घटनेची माहिती मारेगाव पोलीसांना मिळताच घटनास्थळी दाखल होवून,घटनेचा पंचनामा करण्यात आला असून मृत्यूदेह पोस्टमार्टम साठी मारेगाव ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आला. घटनेचा अधिक तपास पोलीस करित आहे.

सौ हर्षा चेतन आगलावे यांच्या सामाजिक कार्याचा सन्मान


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

वणी : ईगल सोशल ग्रुप,साई म्युझीकल ग्रुप व श्री रंगनाथ स्वामी संगीत कला केंद्र वणी तर्फे आज स्व लता मंगेशकर श्रद्धांजली पर गीतगायन सोहळा व 
सौ हर्षा चेतन आगलावे यांचा सत्कार सोहळा 
स्थानिक वसंत जिनींग हॉल वणी येथे पार पडला.

सौ हर्षा आगलावे यांचा कोरोना काळातील व त्यानंतरच्या ही विविध सामाजिक कार्यासाठी 
 माया चाटसे सहाय्यक पोलीस निरीक्षक वणी व डॉ सौ संचिता नगराळे - स्त्री रोगतज्ञ वणी या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीमती रुपालीताई हिवरकर यांच्या हस्ते झाले तर अध्यक्षस्थानी सौ किरणताई देरकर या उपस्थित होत्या.
सौ हर्षा आगलावे यांच्या सामाजिक कार्यासाठी पुर्वी ही वणी त सत्कार करण्यात आलेला आहे.


शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : तालुक्यातील आत्महत्या चे सत्र थांबता थांबेना दर आठवड्यात एक ना एक आत्महत्या होत असल्याचे वृत्त समोर येतच असते. त्यातच आज रोजी खैरगांव (भेदी) येथे एका शेतकऱ्याने स्वतः च्या शेतात एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.

अतिवृष्टी चा फटका व सतत ची नापिकी शिवाय डोक्यावर खाजगी कर्ज याला कंटाळून गोविंद पैकू आत्राम (५५) रा खैरगांव (भेदी) याने गावालगत असलेल्या शेतात गळफास लावून आत्महत्या केली.
सतत च्या नापिकी ने ते गेल्या काही दिवसापासून तणावात होते अशी स्थानिकात चर्चा आहे. त्यांच्या पाठीमागे पत्नी, दोन विवाहित मुली असा आप्त परिवार आहे.
या घटनेची माहिती सरपंच तुळशीराम कुमरे यांनी मारेगाव पोलिसांना दिली.

तर, दुसरी घटना मुकटा येथे...
 विष प्राशन करणारा अंदाजे ७० वर्षे वामन श्रावण इनामे असे विष प्राशन केलेल्या इसमाचे नाव आहे. त्याला उपचारासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे रवाना करण्यात आले अशी माहिती स्वतः वामन यांच्या मुलाने मोबाईल द्वारे माध्यमांना दिली. 

सावली शहरात मुख्य मार्गावर गतिरोधक लावा-भाजपा तालुका महामंत्री सतीश बोम्मावार यांची मागणी


उमेश गोलेपल्लीवार | सह्याद्री चौफेर 

चंद्रपूर : गडचिरोली मुख्य मार्गावरील सावली शहरात गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते यांच्या प्रयत्नातून रस्ते महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांनी गडचिरोली ते मुल पर्यंत चारशे कोटी रुपयाचा सिमेंट रस्ता मंजूर केला व त्याचे काम 90 टक्के हे पूर्णत्वास आलेले आहे. जनतेची मागणी लक्षात घेत खासदार अशोकजी नेते यांनी केलेल्या प्रयत्नाबद्दल त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

सावली शहराच्या मध्यभागातून हा नॅशनल हायवे गेलेला असल्याने मोठ्या प्रमाणामध्ये भरधाव वेगाने गाड्या जात आहे. त्यामुळे या ठिकाणी भविष्यात अनेक ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

त्यासाठी ग्रामीण रुग्णालय जवळ,आयडीबीआय बँक ते रमाबाई आंबेडकर विद्यालय चौकात,डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे, सावली शहरातील बसस्थानक परिसरात,महात्मा ज्योतिबा फुले चौकात व बाजार समिती जुना नाक्या परिसरात वेगावर नियंत्रण करण्यासाठी गतिरोधक लावावे अशी मागणी भाजपा तालुका महामंत्री तथा नगरसेवक सतीश बोम्मावार केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीनजी गडकरी,केंद्रीय महामार्ग अभियंता तसेच खासदार अशोकजी नेते यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.

सदर जनतेच्या मागणी कडे त्वरित लक्ष घालून गतिरोधक लवकरात लवकर लावावे अश्या मागणी चे इमेल सतीश बोम्मावार यांनी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांना पाठविले आहे.

श्री रामनवमी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी विजयभाऊ चोरडिया यांची नियुक्ती

सह्याद्री चौफेर | न्यूज 

वणी : येथील रामनवमी उत्सव समितीच्या वतीने दरवर्षी मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करण्यात येतो. त्यासाठी समिती स्थापन करण्यात येते.

यावर्षी हा उत्सव साजरा करण्याकरिता २६ मार्च रोजी सायंकाळी सात वाजता श्रीराम मंदिर जुनी स्टेट बँक जवळ रामनवमीच्या निमित्ताने बैठक घेण्यात आली. त्यात श्रीरामनवमी उत्सव समिती गठीत करण्यात आली. त्यामध्ये समितीचे अध्यक्ष म्हणून विजय चोरडिया यांची नियुक्ती करण्यात आली. तर उपाध्यक्ष अरुण कावटकर, सचिव पदी श्याम बडगरे, यांची नियुक्ती करण्यात आली.

यावेळी राजाभाऊ बिलोरीया, दिपक छाजेड, किरण बुजोणे, गुलाब बिलोरिया, सतीश बिलोरिया व श्री राम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आज वाढदिवस अभिष्टचिंतन : श्री आनंद नक्षणे

                       "जीवेत शरद: शतम्"
२७ मार्च : 
आमचे परम मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस,
नाभिक समाजाचे युवा आधारस्तंभ तसेच तरुण, सक्षम, विचारी, हुशार आणि प्रगतीशील व्यावसायिक असलेले,
शहराची आण-बाण-शान आणि हजारो लाखो तरुणाईची ट्रेंड असलेले,
अत्यंत हँडसम, उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले…
मित्रासाठी काय पण, कुठे पण, कधी पण या तत्वावर चालणारे…
मित्रांमध्ये दिलखुलास पणे वावरणारे, 
कधीही कोणावर न चिडणारे हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाचे…
मित्रांच्या सुखादु:खात सहभागी होणारे असे आमचे खास परम मित्र, यांचा आज अभिष्टचिंतन!!!!

श्री आनंदभाऊ नक्षणे यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा‪…
ईश्वर आपल्याला निरोगी दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो हीच सदिच्छा व प्रार्थना…!

•• शुभेच्छुक :-
सह्याद्री चौफेर न्यूज परिवार २०२२

जाहिरातसाठी संपर्क : 7218187198

निवेदनाने नाही जमले,रुग्णसेवक उपोषणाला बसले

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 
 
जिवती : मागील बऱ्याच दिवसापासून प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी तालुक्यातील विविध समस्या सोडविण्यासाठी रुग्णसेवक जिवन तोगरे यांचे कडून वारंवार पाठपुरावा करूनही दाद न मिळाल्यामुळे त्यांनी अखेर तहसील कार्यालयासमोर उपोषण धरून बसले आहेत.

बऱ्याच वेळा निवेदन दिले तरी निवेदनाला प्रतिसाद न देणे ही परंपरा तालुक्यासाठी काही नवीन नाही.तहसील कार्यालयात नायब तहसीलदार यांची नेमणूक करावी,तालुक्यात सुरू असलेले कामे लवकर व गुणवत्ता पूर्ण झाली पाहिजे,तहसील कार्यालयासमोर असलेली आरो मशीन ही शोभेची वस्तू झाली असून ती त्वरित सुरू करावी. कारण उन्हाळा सुरू झाला असून नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. तहसील कार्यालयात सुरू असलेला सावळा गोंधळ बंद करून जनतेला दलाल व अतिरिक्त पैसे घेऊन काम करणाऱ्या कर्मचारी यावर अंकुश लावला जावा. कुंभेझरी येथे त्वरित डॉक्टर उपलब्ध करून देण्यात यावे.

अशा अनेक प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी रुग्णसेवक जिवन तोगरे यांनी उपोषण मांडले आहे. जर प्रशासन या कडे लक्ष देत नसेल तर आमरण उपोषणाचा मार्ग काढू असा इशारा रुग्णसेवक जिवन तोगरे यांनी दिला आहे. या उपोषणाला विविध संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे.

आज चंद्रपुरात "विमल दिवस"; कविसंमेलन व पुस्तक प्रकाशन सोहळा


रवि घुमे | सह्याद्री चौफेर 

यवतमाळ : चंद्रपुरातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या व कवियित्री प्रा.विमल गाडेकर यांच्या प्रथम स्मृतीदिनी आज (ता.26) 'विमल दिवस' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

स्थानिक चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात सकाळी 11 वाजता कार्यक्रम ठरला आहे. अध्यक्ष स्थानी जेष्ठ साहित्यिक व संपादक सुरेश द्वादशीवार तर प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार, माजी अर्थमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, समीक्षक डॉ.प्रतिभा वाघमारे उपस्थित राहतील.
            
यावेळी शाम पेठकर संपादित प्रा.विमल गाडेकर लिखीत अप्रकाशित साहित्य "कोवळेकंच" या पुस्तकाचे तसेच अविनाश पोईनकर व वर्षा पोईनकर संपादित प्रा.विमल गाडेकर व्यक्ती आणि वाङमय या ग्रंथाचे प्रकाशन होईल. सोबतच प्रा.विमल गाडेकर लिखीत 'चंदनी दरवळ' या रमाईवरील खंडकाव्याचे साभिनय सादरीकरण अ‍ॅड.चैताली बोरकुटे कटलावार व सुशील सहारे करतील.
             
दुसऱ्या सत्रात निमंत्रितांचे कविसंमेलन अमरावतीचे प्रसिद्ध कवी बबन सराडकर यांच्या अध्यक्षतेखाली व कवियित्री शोभा रोकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. यात उषाकिरण आत्राम, पद्मरेखा धनकर, श्रीपाद जोशी, किशोर कवठे, मनोज बोबडे, रेवानंद मेश्राम सहभागी होतील. सुत्रसंचालन कवी पुनीत मातकर करतील. 
          
इंजी.भगवान गाडेकर, डॉ.हेमन्त व सविता गाडेकर, जयंत व सोनामोनी गाडेकर, अर्चना व प्रकाश शंभरकर, डॉ.मोना पंकज तसेच प्रा.विमल गाडेकर स्मूती समीतीने कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

सूरमाज फाउंडेशन यांनी ई-न्यूजलेटर प्रकाशित केला

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

चोपडा : गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात योगदान देणारी सूरमाज फाउंडेशन. या वर्षी त्यांनी केलेल्या काही कामांचे वृत्तपत्राच्या रूपात प्रकाशन केले असून या गोष्टी लोकांनी समजून घ्याव्यात आणि सामाजिक कार्यात हातभार लावण्याचा प्रयत्न करावा हा त्यांचा उद्देश आहे. कारण आयुष्य एक दिवस संपणार आहे आणि आपले चांगले काम हेच आपले खजिना आहे.

चोपडा शहरातील सामाजिक कार्यकर्ते एस.बी.नानासाहेब, ठेकेदार आरिफ भाई, जियाउद्दीन काझी साहेब यांच्या हस्ते वृत्तपत्राचे उद्घाटन करण्यात आले.
हाजी उस्मान शेख (अध्यक्ष सूरमज फाऊंडेशन) यांनी त्यांचे कार्य धोरण व पुढे काय योजना आहे हे सांगितले व आलेल्या पाहुण्यांचे आभार मानले. डॉ. मोहम्मद रागीब, अबुलौस शेख, शोएब शेख, झुबेर बॅक आणि डॉ. मोहम्मद जुबेर शेख यांनी ई-न्यूज लेटरच्या यशस्वी प्रक्षेपणासाठी हातभार लावला.

अभिनेत्री हेमामालिनी गायत्री महिला औद्योगिक सहकारी संस्था च्या उदघाटनाकरिता नागपूर येथे...

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

नागपूर : येथील द.म.सा.के. सिव्हिल लाईन येथे आज २५ मार्च रोजी ड्रिम गर्ल(स्वप्न सुंदरी); खा.हेमामालिनी त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. 
चक्क ड्रीम गर्ल उदघाटन ला आल्याने जणू अप्सरा उतरल्या. 
      
महिला ऊद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी नागपूर एम एस एम ई. मंत्रालय आणि गायत्री महिला औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने २५ ते २८ मार्च २०२२ या कालावधीत महिला ऊद्योजकांसाठी " व्हिजन एक्सपो-"२०२२ चे आयोजन दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र नागपूर येथे करण्यात आले आहे. विदर्भातील महिलांना ऊद्योजकातेमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात आणि आर्थिक द्रुषट्या स्वावलंबी बनाव्यात ही या एक्सपोमधिल संकल्पना गायत्री महिला औद्योगिक संस्था च्या नागपूरच्या अध्यक्षा कांचनताई.नितीन गडकरी या आहेत. ईतकेच नव्हे तर महिला उद्योजकांना बाजारपेठ उपल्ब्ध करून देणे आणि रोजगाराच्या संधी वाढवणे आणि त्या द्वारे महिलांनास्वयंरोजगार करून त्यांचे सक्षमीकरण करणे हा या मागचा उद्देश आहे. 

या उदघाटन प्रसंगी गायत्री महिला औद्योगिक सहकारी संस्था. मर्यादित ना.अध्यक्षा कांचनताई नितीन गडकरी, आर. विमला जिल्हाधिकारी, यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप झाला.

मॅजिक बस संस्थेच्या वतीने मुख्यध्यापकांची एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

उमेश गोलेपल्लीवार | सह्याद्री चौफेर 

सावली : मॅजिक बस संस्थेचे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी मा. प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनात व नियंत्रनात सावली तालुक्यात SCALE - KCF कार्यक्रमा अंतर्गत १२ ते १६ वर्षे वयोगतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी "खेळाद्वारे शिक्षण/जीवन कौशल्य विकास" हा कार्यक्रम चालू वर्ष २०२२ पासून राबविला जात आहे. त्याच अनुषंगाने सदर कार्यक्रमाची माहिती पंचायत समिती सावलीच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळेतील मुख्यध्यापकांना सदर चालू असलेल्या कार्यक्रमाची माहिती व्हावी त्याकरिता दिनांक २१-०-२० २२ रोज सोमवारला पंचायत समिती सावली येथे सर्व मुख्यध्यापकांची एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
       
या कार्यशाळेच्या माध्यमातून उपस्थित सर्व शाळेतील मुखध्यापकांना सर्वप्रथम मॅजिक बस संस्थेच्या कार्याची माहिती देण्यात आली तसेच SCALE कार्यक्रम शालेय विद्यार्थ्यांसाठी कसा फायदेशीर ठरू शकतो त्याचे महत्व पटवून देण्यात आले.
        
त्यानंतर सर्व शाळेतील मुख्यध्यपकांना सावली तालुक्यातील खेडी या गावातील मॅजिक बसचे चालू असलेले प्रत्यक्ष कार्य दाखविण्यात आले. यामध्ये त्यांना शाळेतील शिक्षकांचे सत्र,शाळेचे ध्येय,बालपंचायत,गट करार, वर्तणूक व्यवस्थापन प्रणाली,वार्षिक चक्र, मुलांचे अभ्यास कोपरे व गावातील माजी पंचायत समिती सभापती,पदाधिकारी, पालक, शाळा व्यवस्थापन समिती, सर्व शिक्षक, मुखध्यापक यांच्याशी मॅजिक बसचा कार्यक्रम आपल्या शाळेला, सर्व गावाला आणि सर्व विद्यार्थ्यांना कसा फायदेशीर आहे हे चर्चेच्या माध्यमातून सर्व मुख्यध्यापकांना सांगण्यात आले.

या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी श्री.आकाश गेडाम तालुका समन्वयक मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन सावली, शाळा सहाय्यक अधिकारी संदेश रामटेके,मंगेश रामटेके , दिनेश कामतवार,शुभांगी रामगोणवार, निशा उमरगुंडावार व गावातील समुदाय समन्वयक प्रतिक तुंगीडवार यांनी प्रयत्न केले.

धान उत्पादक शेतकऱ्यांना धाणाचा बोनस जाहिर करा...


उमेश गोलेपल्लीवार | सह्याद्री चौफेर 

सावली : यावर्षीच्या खरीप हंगाम २१-२२ मध्ये राज्य शासनाने खरेदी केलेल्या धानाला राज्य सरकारने अजूनर्यंत बोनस जाहीर केलेला नाही त्यामुळे चंद्रपूर-गडचिरोली, भंडारा व गोंदिया या धान पट्ट्याच्या जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होत  असून शेतकऱ्यांना आर्थिक संकटा चा सामना करावा लागत आहे.

आपल्या हक्काच्या प्रतिक्षे मुळे शेतकऱ्यांमध्ये कमालीची नाराजी आहे. शेतकऱ्यांमध्ये हक्काच्या बोनस जाहीर करण्यात यावा याकरिता भारतीय जनता पार्टी तालुका सावलीच्या वतीने धरणे देत मुख्यमंत्री यांना नायब तहसीलदार सागर कांबळे यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.

यावेळी भाजप तालुका अध्यक्ष अविनाश पाल,भाजपा तालुका महामंत्री तथा नगरसेवक सतीश बोम्मावार, जिप सदस्य संतोष तंगडपल्लीवार, जिल्हा भाजपा महिला उपाध्यक्ष तथा नगरसेविका निलिमा सुरमवार, नगरसेविका शारदा गुरुनुले, पंचायत समिती सदस्य तुकाराम ठिकरे, पंचायत समिती सदस्य गणपत कोठारे, पंचायत समिती सदस्य छाया शेंडे,भाजपा युवा तालुका अध्यक्ष विनोद धोटे, भाजप शहराध्यक्ष आशिष कार्लेकर, महिला अध्यक्ष गुड्डी सहारे, जेष्ठ नेते प्रकाश खजांची, कवेंद्र रोहनकर, दिवाकर गेडाम, नामदेव भोयर, राकेश गोलेपल्लीवार, युवा नेता प्रसाद जक्कुलवार,मयूर गुरुनुले, शुभम कटारे,वृषभ कोटरंगे, अंबादास गुरुनुले, अंकुश भोपये, मुक्तेश्वर थोराक, मनोज अमरोजवार आदी कार्यकर्ते सह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्तीत होते.

ॲड रोहिणी पटवारी यांची नांदेड जिल्हा न्यायाधीश पदी निवड


बालाजी सुवर्णकार | सह्याद्री चौफेर 

उदगीर : उदगीर तालुक्यातील तोंडार येथील रहिवासी असलेल्या ॲड रोहिणी राजेंद्र पटवारी यांची नांदेड जिल्हा न्यायाधीश पदी निवड झाली आहे.

माननीय उच्च खंडपीठ व एम पी एस सी च्या वतीने सात जागांसाठी जिल्हा न्यायाधीश याच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या त्यात त्यांनी उज्वल यश संपादन केल्यामुळे त्यांची न्यायाधीश पदी निवड झाली आहे.

ॲड रोहिणी राजेंद्र पटवारी या बी ए एल एल एल एल एम बी असून लातूर येथे जिल्हा न्यायालयात दहा वर्ष वकिली व्यवसाय केलेला आहे. त्या दयानंद लॉ कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्य केलेले आहेत तसेच त्यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या वकील म्हणून कार्य केलेले आहे.

 त्या लातूर जिल्ह्यातील पहिल्या एकमेव महिला न्यायाधीश म्हणून निवड झाली आहे त्या ऍडव्होकेट राजेंद्र पटवारी यांच्या त्या सुविज्ञ पत्नी आहेत त्यांच्या या निवडीबद्दल टीचर ग्रुप ऑफ महाराष्ट्र संत नरहरी महाराज दैवज्ञ सोनार संघ उदगीर व सावित्रीबाई फुले महिला शिक्षण व प्रशिक्षण केंद्राच्या संचालिका महानंदा सुवर्णकार, बालाजी सुवर्णकार, सुधाकर बापकेकर यांनी त्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.

वऱ्हाडी, कोरकू अशा स्थानिक भाषेतून शासकीय योजनांचा प्रचार


सह्याद्री चौफेर | न्यूज 

अमरावती : लोककलावंतांच्या पारंपारिक लोककलेतून सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या लोक कल्याणकारी योजनांची माहिती व्हावी, यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय व जिल्हा माहिती कार्यालयांमार्फत विशेष कार्यक्रम राज्यभर राबविण्यात आला. या अभिनव कार्यक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

स्थानिक भाषेतून शाहिरी, लोकगीत, पोवाडा, भारुड आदी पारंपारिक लोककलांच्या माध्यमातून आणि विशेषतः वऱ्हाडी आणि कोरकू भाषेतून गावकऱ्यांपर्यंत राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती अमरावती जिल्हा माहिती कार्यालयामार्फत पोहचविण्यासाठी आली. गावकऱ्यांचे मनोरंजनात्मक पद्धतीने प्रबोधन करुन त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. जिल्ह्यात लोककला पथकांच्या माध्यमातून गावोगावी, खेडोपाडी जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले.

राज्य शासनाने दोन वर्षात विविध लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविल्या आहेत. या लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी आणि ते शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे यावेत, हा या मोहिमेचा उद्देश होता.


लोककलावंतांच्या अभिनयाने दिली शासकीय योजनांना प्रसिद्धी
गत दोन वर्षात महाविकास आघाडी शासनाने घेतलेले निर्णय, त्यांची अंमलबजावणी, विविध योजना, उपक्रम, कोरोना काळात राबविण्यात आलेले विविध उपक्रम, शिवभोजन थाळी, महात्मा ज्योतिराव फुले कर्ज मुक्ती योजना, महिला व बाल विकास योजनेसाठी राखीव निधीची तरतूद, विद्यार्थी, शेतकरी बांधव, आरोग्यसेवा, कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम आदी योजना व उपक्रमांची माहिती लोककला पथकांच्या माध्यमातून जिल्ह्यात सर्वत्र पोहोचवण्यात आली.

समर्पण बहुद्देशीय संस्था, माई मानव बहुद्देशीय संस्था तसेच गंधर्व बहुद्देशीय संस्था या लोककलापथकामार्फत जिल्ह्यात 63 च्या वर प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आले. जिल्ह्यातील अमरावती, भातकुली, चांदूरबाजार, अचलपूर, चांदुररेल्वे, धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, तिवसा, मोर्शी, वरूड, अंजनगाव सूर्जी, दर्यापूर, चिखलदरा तसेच धारणी तालुक्यात कलापथकाच्या माध्यमातून विविधरंगी मनोरंजनात्मक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविण्यात आले. धारणी तसेच चिखलदरा या भागात कोरकु भाषेतूनही ग्रामस्थांना प्रबोधन करण्यात आले, हे विशेष.


ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया
जिल्हा माहिती कार्यालयाचा लोककलापथकामार्फत शासकीय योजनांच्या प्रसिद्धीसाठी राबविण्यात आलेला उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. लोककलेच्या माध्यमातून आमच्यासाठी शासन राबवित असलेल्या योजनांची माहिती आम्हाला सोप्या भाषेत सांगण्यात आली. आता आमच्यासाठी शासनाच्या कोणत्या योजना आहेत ते समजल्यामुळे आम्ही या योजनांचा अवश्य लाभ घेणार, अशा प्रतिक्रिया गावकऱ्यांनी व्यक्त केल्यात.

ग्रामस्थांनी घेतला लोककलेचा आस्वाद
आपल्या महाराष्ट्रात विशेषतः ग्रामीण भागात लोककलेला अनन्य साधारण महत्त्व आहे. परंतु कोरोना निर्बंधामुळे लोककलेचे आयोजन दोन वर्षात झाले नव्हते. जिल्हा माहिती कार्यालयामुळे ग्रामस्थांनी लोककलेचा आनंद घेतला. या पारंपारिक लोककलेच्या कार्यक्रमाचे प्रथमच जिओ टँगिंगही करण्यात आले होते. कलापथकांच्या सादरीकरणाच्या वेळी गावातील सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील यांनी या अभिनव उपक्रमाचे स्वागत करुन कलावंतांचे आदरतिथ्य केले.

टँकर पलटून चालक जागीच ठार

विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : तालुक्यातील बेंबळा कालव्याची कामे  परिसरात अतोनात सुरू आहे. येथील कामांना विविध साहित्यासह पाणी पुरवठा करण्याकरिता जात असलेला टँकर नाल्यात कोसळला. या घटनेत चालकाचा जागीच मृत्यू झाला असल्याचे वृत्त असून सदर घटना आज (ता.२४ मार्च) रोजी २ वाजता च्या दरम्यान घडली.

शिवदास जयसिंग राठोड (६४ वर्ष) रा. करजी असे मृतक चालकाचे नाव आहे. तालुक्यातील बेंबळा (प्रकल्प) कालवाच्या कामाला पाणी टँकरद्वारे पुरविण्यात येतेय. अशातच आज पाणी भरलेला टँकर घेऊन जात असतांना अचानक नाल्यात कोसळून पलटी झाला असून यामध्ये चालक जागीच ठार झाला असल्याचे समजते.
दरम्यान,पोलीस येण्यापूर्वीच टँकर जैसे थे करून ठेवण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

याबाबतचा अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर सावंत करित आहे.


माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या उपस्थितीत शहरातील युवकांचा भाजपात प्रवेश

कालू रामपुरे | सह्याद्री चौफेर 

वरोरा : शहरातील यात्रा व बाजार वार्ड परिसरातील युवकांनी मोठ्या संख्येने २३मार्च बुधवारला माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्षप्रवेश केला.

यावेळी हंसराज अहीर यांनी युवकांना प्रवेश केल्याबद्दल शुभेच्छा देत कोणतीही मागणी न करता ज्या आनंदाने आपण भाजपात प्रवेश केला तो आनंद वाढेल.या पक्षात आपला मान सन्मान राखला जाईल अशी ग्वाही दिली . जाती पातीचा विचार न करता सबका साथ-सबका विकास-सबका विश्वास या मूलमंत्राने काम करणारा भाजप हा पक्ष आहे.अश्या पक्षात आपले स्वागत आहे असे उद्गार यावेळी काढले. 
      
दीपक चव्हाण यांच्या सोबत नासिर खान, अनिल सिंग, शशिकांत गुप्ता, निसर्गाने, आदर्श सोयाम,सागर चौधरी, बशीर पठान, रिजवान रंगरेज, आतिक पठान, रमेश पंधराम या प्रमुख युवकांच्या यात्रा व बाजार वार्ड परिसरातील ७९ युवकांच्या गळ्यात मान्यवरांच्या हस्ते भाजपाचा दुपट्टा टाकत व गुलाब पुष्प देत पक्षात प्रवेश दिला. या युवकांनी हातात भाजपाचे झेंडे घेत जय घोष करीत विजयी घोषणा दिल्या. 
या युवकांच्या प्रवेशामुळे या भागातील भाजपाची स्थिती बळकट झाली असून येत्या आगामी नगरपरिषद निवडणुकीत याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल असे मत भाजपचे जिल्हा सचिव व माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांनी यावेळी नोंदविले.

माजी मंत्री हंसराज अहिर यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली, भाजप युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष आशिष देवतळे, प्रदेश युवा मोर्चाचे सचिव करण देवतळे, बाबासाहेब भागडे, ओम मांडवकर, विजय वानखेडे, सुरेश महाजनआदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. 
      
या कार्यक्रमाला देविदास ताजने, महेश श्रीरंग, आशिष रणदिवे, संजय राम, विलास गयनेवार, दिलीप घोरपडे, अक्षय भिवदरे, डॉ.गुणानंद दुर्गे, मोहन रंगदळ, ओम यादव, दिपक घुडे, रेखा समर्थ, ममता मरसकोल्हे, ज्योति किटे,छाया चौव्हाण आदी भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गजानन राऊत यांनी कार्यक्रमाचे संचलन तर विनोद लोहकरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

फिस्कीच्या जंगलात वाहतुकीची होते कोंडी, प्रवाशी त्रस्त

सह्याद्री चौफेर | न्यूज 

मारेगाव : तालुक्यातील मार्डी वणी जाणारा रस्त्यालगत असलेले फिस्की जंगल हे सध्या वाहतूक कोंडीचे कारण ठरत असून संबंधित मार्गाने जायचे असल्यास फिस्की जंगलात असलेला अरुंद रस्ता सर्वांसाठी डोकेदुखी चे कारण बनलेला आहे.

या मार्गाने जड वाहुतक म्हणून सिमेंट, कोळसा, रेतीचे ट्रक जास्त प्रमाणात वर्दळ सुरू असते शिवाय महत्वाचे म्हणजे सदर रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. वनविभागाकडून रस्त्याची परवानगी न मिळाल्याने रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे जड वाहनांना क्रॉस करण्यासाठी मोठी तारेवरची कसरत करावी लागत असून ह्या अरुंद रस्त्यामुळे वाहन रस्त्याच्या कडेला उतरून तर, कधी कडेला फसून रस्ता जाम होतो,त्यामुळे या मार्गाने दैनंदिन खासगी व शासकीय येरजाऱ्या करणाऱ्यांना या ठिकाणी होत असलेली वाहतूक कोंडीमुळे हा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी प्रवाशांना कित्येकदा तासंतास येथील वाहतूक कोंडीने कामावर, घरी वेळेवर पोहचणे शक्य होत नाही ताटकळत बसाव लागत आहे. असे सामाजिक कार्यकर्ते धनंजय आसूटकर यांनी सांगितले.

नागपूर येथील कॅन्सर रूग्णालय लवकरच सुरू करणार - वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

सह्याद्री चौफेर | न्यूज 

मुंबई : नागपूर येथील शासकीय वैद्यकीय रूग्णालयाच्या परिसरात कॅन्सर रूग्णालय उभारण्याचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी विधानसभेत दिली.

नागपूर येथील शासकीय वैद्यकीय रूग्णालयाच्या परिसरात कॅन्सर रूग्णालय लवकर उभारण्यासंदर्भात विधानसभा सदस्य समिर मेघे यांनी प्रश्न उपस्थित केला.

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख म्हणाले, नागपूर येथे शासकीय वैद्यकीय रूग्णालयाच्या परिसरात कॅन्सर रूग्णालय उभारण्यासाठी २०१८ मध्ये २३ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला होता. सन २०१९ ला बांधकामाच्या आराखड्याला मंजुरी मिळाली आणि सन २०२० मध्ये कोरोनाचे संकट आले त्या कालावधीत राज्य सरकारने बांधकामाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्या काळात हे काम बंद होते. सध्या हे काम नागपूरचीच एनआयटी ही संस्था करत असून या संस्थेने निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. हे काम दोन महिन्यात सुरू होणार आहे.

कॅन्सर रूग्णालय उभारण्यासाठी लागणारा खर्च तसेच यंत्रसामग्रीसाठी खरेदी करण्यात येईल व लवकरात लवकर हे कॅन्सर रूग्णालय सुरू करण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सभागृहात दिली.

बालाजी सुवर्णकार वाचक मित्र शिक्षक पुरस्काराने सन्मानित


बालाजी सुवर्णकार | सह्याद्री चौफेर 

उदगीर : येथील श्री विश्वनाथराव चलवा प्राथमिक विद्यालयातील सहशिक्षक श्री बालाजी सुवर्णकार यांना चला कवितेच्या बना अंतर्गत वाचक संवाद २६१ मध्ये मध्ये त्यांनी सन १९८८ पासून आजतागायत उदगीर शहरात शैक्षणिक सामाजिक धार्मिक इत्यादी कार्यात सहभागी होऊन उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना व मर्यादित ज्ञान मर्यादित वेळेत प्राप्तीसाठी चालू असलेल्या जागतिक कीर्तिच्या वाचक संवादात नोंदवत असलेली त्यांची उपस्थिती महत्त्वपूर्ण असून वाचन संस्कारा संदर्भात देत असलेले योगदान ना बद्दल वाचक मित्र पुरस्कार प्राध्यापक संधी कर व सेवानिवृत्त शिक्षक तथा योगाचार्य शिवमूर्ती भातांब्रेकर सर व आनंद कदम यांच्या उपस्थितीत वाचक मित्र पुरस्कार २०२२ देण्यात आला.

सुवर्णकार बालाजी यांना हा वाचक मित्र पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल दैवज्ञ सोनार संघाचे राज्याध्यक्ष दिलीप महत्कर अमरावती व दैवज्ञ सोनार युवक मंडळ सेवाभावी संस्था नांदेड चे राजू आंबेकर, दैवज्ञ सोनार एकता संघ पुणे चे पदाधिकारी मधुकर टोंपे, नामदेव सुवर्णकार व संत नरहरी महाराज दैवज्ञ सोनार संघाचे उदगीर चे अध्यक्ष सचिन पोद्दार उपाध्यक्ष विजय पेनुरकर, कोषाध्यक्ष राजेंद्र रत्नपारखी, सहसचिव एकनाथ रत्नपारखी व दैवज्ञ सोनार युवक मंडळाचे अध्यक्ष अच्युत पंडित, उपाध्यक्ष भागवत पोद्दार व इतर सर्व पदाधिकारी तसेच बारा बलुतेदार सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुधाकर दापकेक, परभणीचे प्राध्यापक अतुल काटकर यांच्यासह इतर सर्व पदाधिकारी यांनी त्यांचे कौतुक केले असून बालाजी सुवर्णकार यांचे वाचक शिक्षक पुरस्काराने सन्मानित झाल्या बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आयजीच्या दौऱ्यानंतरही अशीच शिस्त कायम राहील काय, शहरातील अनियंत्रित वाहतुकीला नियम लागतील काय !

प्रशांत चंदनखेडे | सह्याद्री चौफेर 

वणी : दुचाकी व चार चाकी वाहनांनी नेहमी वेढुन राहणाऱ्या रस्त्याने आज मोकळा श्वास घेतल्याचे पाहायला मिळाले. पोलिस स्टेशन, तहसील कार्यालय व न्यायालयाकडे जाणारा हा रस्ता आज अगदीच खुला वाटत होता. नेहमी रस्त्याला घेरून राहणारी वाहने रस्त्यापासून दूर अगदीच शिस्तीत लावली जात होती. मार्गक्रमण करतांना आज जराही अडथळे निर्माण न झाल्याने नागरिकांनाही कौतुकास्पद वाटत होतं. दुचाकी व चार चाकी वाहनांचा रस्त्याच्या भोवती असणारा गराडा आज मात्र दिसून आला नाही. कार्यालयीन कामाकरिता येणाऱ्या नागरिकांना त्यांची वाहने अगदीच शिस्तीत लावण्याची ताकीद देण्यात येत होती. एरव्ही शासकीय वाहनांना अडथळे निर्माण होत असतांनाही कधी कार्यालयीन परिसरात वाहने उभी करतांना शिस्त लावण्यात आली नाही, ती शिस्त आज कटाक्षाने पाहायला मिळाली. कारण होते अमरावतीचे पोलिस उप महानिरीक्षक चंद्रकिशोर मिना यांच्या वार्षिक निरीक्षण दौऱ्याचे. आयजींचा आज निरीक्षण दौरा असल्याने पोलिसांनी आज चांगलीच खबरदारी घेतली. रस्त्यावर नियमबाह्य पद्धतीने वाहने उभी राहणार नाही याची दक्षता घेतली. पोलिसांमध्येही आज शिस्त दिसून येत होती. कामात शिस्तबद्धता दिसावी याचा पोलिसांनी पुरेपूर प्रयत्न केला. पण ही शिस्त आयजीच्या दौऱ्यापूर्तीच राहील की कायमस्वरूपी, या चर्चेला आज शहरात उधाण आले होते. 

मागील काही महिन्यांपासून वाहतूक विभागाने शहरातील वाहतुकीच्या समस्येकडे पुरते दुर्लक्ष केल्याचे पाहायला मिळत आहे. शहरात वाहतुकीचा कोंडवाडा झाला आहे. वाहतुकीची समस्या खूपच बिकट झाली आहे. शहरातील वाहतुकीने अगदीच बकाल रूप धारण केलं आहे. अनियंत्रित वाहतुकीवर पोलिसांचं नियंत्रणच उरलेलं नाही. अनियंत्रित वाहतुकीमुळे नागरिकांचं रस्त्यांनी मार्गक्रमण करणं कठीण झालं आहे. वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून शहरात वाहतूक सुरु आहे. त्यामुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांवर नेहमी जाम लागताना दिसतो. शहरातून मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सुरु आहे. पोलिसांच्या डोळ्यादेखत जड वाहने शहरातून जाणे येणे करतात. ट्रक व ट्रेलर सारखी मोठी वाहनेही शहरातून जातांना दिसतात. टोल नाका वाहचविण्याकरिता टिळक चौक ते इंदिरा चौक मार्गे ब्राह्मणी फाटा हा जड वाहनांचा नेहमीचा मार्ग झाला आहे. टिळक चौक ते टागोर चौक मार्गे दिपक चौपाटी ते लालगुडा चौपाटी हा मार्ग वाहतुकीने नेहमी गजबजलेला असतो. खाती चौक ते गांधी चौक मार्गावर नेहमी वाहतुकीचा जाम लागताना दिसतो. रस्त्यांवर नियमबाह्य पद्धतीने उभ्या असलेल्या वाहनांमुळे रहदारीला अडथळे निर्माण होण्याबरोबरच वाहतुकीची कोंडी होतांना दिसते. रस्त्याच्या कडेला थाटलेली दुकाने, हातगाड्या, साहित्य ठेवण्याकरिता रस्त्यापर्यंत वाढवलेली दुकाने यामुळे रस्ते अरुंद झाल्याने नेहमी वाहतुकीची कोंडी होतांना दिसते. शहरातील काही रस्ते तर वाहने उभी करण्याचे मैदान बनले आहे. हा रास्ता आहे की, वाहने पार्किंग करण्याची जागा हेच कळत नाही. टिळक चौकाव्यतेरिक्त अन्य चौकात वाहतूक पोलिसांची उपस्थितीच दिसत नाही. अंतर्गत रस्त्यांवरून सुसाट वाहने चालवली जातात. दुचाकींवर ट्रिपल सिट बसणं आता नित्याचाच झालं आहे. दुचाकीस्वारांच्या स्टंटबाजीकडेही सपशेल दुर्लक्ष केलं जात आहे. वाहतूक पोलिस फक्त शहराबाहेरील वाहतूक नियंत्रित करण्यावर भर देत आहे. ब्राह्मणी फाटा, लालगुडा चौपाटी, वरोरा टी-पॉईंट, चारगाव रोड, संविधान चौक, वरोरा रोड, मुकुटबन घोन्सा टी-पॉईंट, मुकुटबन रोड ही वाहतूक पोलिसांची वाहने चलान करण्याची नेहमीची ठिकाणे झाली आहेत.शहरातील वाहतुकीच्या समस्येकडे मात्र वाहतूक पोलिसांनी कायम दुर्लक्ष केलं आहे. मागील काही महिन्यात तर वाहतुकीला कुठलीच शिस्त उरली नसल्याचे पाहायला मिळत आहे. ऑटो धारकांनी तर रोडचा मालकीहक्क मिळविल्यागत रोडचा ताबा घेतला आहे. रस्त्यांवर मानमर्जीने कुठेही ऑटो उभे केले जातात. प्रवासी वाहतूक करणारी खाजगी वाहनेही रस्ता वेढुन तासंतास उभी असतात. पेट्रोल पंपांवर नेहमी ट्रकच्या रांगा लागलेल्या असतात. डिजल भरण्याकरिता रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी वाहने लावली जातात. डिजल भरण्याकरिता रांग लावून उभ्या असणाऱ्या वाहनांमुळे तर कित्येक छोटे मोठे अपघात झाले आहेत. शहरात छोटे मोठे अपघात तर आता नित्याचेच झाले आहेत. नियमांची पायमल्ली करून शहरात वाहतूक सुरु आहे. वाहनधारकांचे वेगावर नियंत्रण राहिले नाही. तरुण मंडळी स्टंटबाजी करत शहरातून सुसाट वाहने चालवितात. वाहतुकीच्या समस्येने बकाल रूप धारण केले असतांनाही वाहतूक पोलिसांचा कर्तव्यदक्षपणा दिसून येत नाही, याचेच नवल वाटते. शहराबाहेरील वाहतूक नियंत्रणाकडेच त्यांची कर्तव्यनिष्ठा असल्याचे पाहायला मिळते. आयजीच्या दौऱ्यानिमित्ताने जी शिस्तबद्धता पाहायला मिळाली, ती शिस्त कायमस्वरूपी शहरातील वाहतुकीला लावण्याची गरज निर्माण झाली आहे.

शौचास गेलेल्या मुलीवर दिवसाढवळ्या अत्याचार, घटनेने उडाली एकच खळबळ

विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : महिला व मुलींवरील अत्याचारांच्या घटना प्रचंड वाढल्या असून दिवसागणिक अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होतांना दिसत आहे. महिला व मुलींवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तालुक्यातील कुंभा येथील एका अल्पवयीन मुलीवर वासनेने पिसाटलेल्या एका नराधमाने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास शेतात शौचास गेलेल्या एका १७ वर्षीय मुलीवर वासनांध युवकाने झडप घातली, व तिला आपल्या वासनेचा शिकार केले. वासनेने पिसाळलेले हे नराधम महिला व मुलींच्या आब्रूचे लचके तोडू लागले आहेत. दिवसा ढवळ्या मुलींवर अत्याचार करण्याइतपत या नराधमांची मजल वाढली आहे. माणसात जनावरी प्रवृत्ती वाढू लागल्याने मुलींचे एकटे घरून बाहेर पडणे धोकादायक झाले आहे. या नराधमांना कायद्याची भीती न उरल्याने ते चांगलेच निर्ढावले आहेत. शौचास गेलेल्या मुलीचा पाठलाग करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाच्या पोलिसांनी काही तासांतच मुसक्या आवळल्या असल्या तरी मुलींच्या आब्रूवर हात घालण्याचे धाडस करणाऱ्या या विकृतांना कायद्याचा धडा शिकविण्याची गरज निर्माण झाली आहे. पोलिसांनी अतिजलद तपास करून शहाबाज शेख शब्बीर (२७) रा. माता नगर राळेगाव या नराधमाला व एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला अटक केली आहे. 
कुंभा येथील अल्पवयीन मुलगी जवळच असलेल्या शेतशिवारात शौचास गेली होती. दरम्यान त्याच मार्गाने प्रवास करणाऱ्या एका विकृताची नजर त्या मुलीवर पडली. मुलगी एकटीच शौचास जात असल्याचे पाहून त्याच्यातली वासना जागी झाली. त्याने तिचा पाठलाग करून तिला आपल्या वासनेचा शिकार बनविले. आरोपी सोबत असलेला विधिसंघर्षग्रस्त बालक रस्त्याची निगराणी करत होता. मुलीवर अत्याचार केल्यानंतर दोघांनीही दुचाकीने पळ काढला. अचानक घडलेल्या घटनेने मुलगी चांगलीच हादरली. तिने घरी येऊन वडिलांसमोर आपबिती कथन केली. या घटनेने तिचे कुटुंबही पुरते हादरले. परिसरातही या घटनेने खळबळ उडाली. वडिलांनी मुलीला घेऊन सरळ पोलिस स्टेशन गाठले, व पोलिसांना घटनाक्रम सांगितला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून जलद तपास केला, व राळेगावच्या दिशेने पाळलेल्या आरोपींना राळेगावातून तत्काळ अटक केली. आरोपी शहाबाज शेख शब्बीर याच्या विरुद्ध पोलिसांनी भादंवि च्या कलम ३७६, ३७६(२)(J) व सहकलम ४,६,८ बाल लैंगिक प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. एका विधिसंघर्षग्रस्त बालकालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलिस करित आहे.