Page

शहरातील चार मटका अड्डे व दोन अवैध तंबाखू व्यवसायिकांवरील धाडीत तब्बल ४४ आरोपींवर गुन्हा दाखल, दोन आरोपी फरार

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : अमरावती विभागाचे पोलिस उपमहानिरीक्षक यांच्या विशेष पोलिस पथकाने वणी शहरात छुप्या पद्धतीने सुरु असलेल्या अवैध धंद्यांवर धाडी टाकून शहरात एकच खळबळ उडवून दिली. एकाच वेळी शहरातील चार मटका अड्ड्यांवर धाडी टाकण्यात आल्या. तसेच प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व सुगंधित गुटख्याची अवैध विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या घर, गोदाम व दुकानांवरही या विशेष पोलिस पथकाने धाडी टाकल्या. सुगंधित तंबाखाची अवैध विक्री करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांसह तिघांवर कार्यवाही करण्यात आली. अवैध धंद्यांवरिल धडक कार्यवाहीत विशेष पोलिस पथकाने चार मटका आड्ड्यांवरून ४ लाख ५७ हजार १७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर ४१ आरोपींना अटक केली आहे. दोन आरोपी फरार आहेत. तसेच दोन अवैध तंबाखू व्यवसायीकांवर टाकलेल्या धाडीत पोलिसांनी ४ लाख ६३ हजार ७३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी सर्वच आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे. 

अमरावती विभागाचे पोलिस उपमहानिरीक्षक चंद्रशेखर मिना यांच्या विशेष पोलिस पथकाने २९ जानेवारीला दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास वणी येथील चार अवैध मटका अड्ड्यांवर एकाच वेळी धाडी टाकल्या. अमरावती परिक्षेत्रातील परिविक्षाधिन पोलिस अधिक्षक गोवर हसन यांच्या नेतृत्वात चार पोलिस पथके तयार करून शहरातील चार मटका अड्यांवर एकाच वेळी या धाडी टाकण्यात आल्या. परिविक्षाधिन आयपीएस गोवर हसन यांच्या नेतृत्वातील विशेष पोलिस पथकात पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा होता. अमरावती पोलिस उप महानिरीक्षक विभागाची वणीच्या इतिहासातील ही पहिलीच कार्यवाही असल्याचे बोलल्या जात आहे. या विशेष पोलिस पथकाने दीपक चौपाटी परिसरातील मटका अड्ड्यावर टाकलेल्या धाडीत चार मोबाईल, ५ दुचाकी व ९५ हजार ४०० रुपये रोख रक्कम असा एकूण २ लाख ३१ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर १२ आरोपींना अटक केली. दोन आरोपी अद्याप फरार आहेत. सिंधी कॉलनी परिसरातील मटका अड्ड्यावर वरिल धाडीत पोलिसांनी तिन मोबाईल व २० हजार ५६० रुपये रोख असा एकूण २४ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करित सात आरोपींना अटक केली. एकता नगर परिसरातील न.प. गाळ्यामध्ये सुरु असलेल्या मटका अड्यावर धाड टाकून पोलिसांनी ११ मोबाईल, १ दुचाकी व रोख १ लाख २७ हजार ११० रुपये असा एकूण १ लाख ९१ हजार ६१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, व १७ आरोपींना अटक केली. तर एकता नगर परिसरातील दुसऱ्या मटका अड्ड्यावर धाड मारून पोलिसांनी तीन मोबाईल व ५ हजार १०० रुपये रोख असा एकूण ९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. एकंदरीत चार मटका अड्ड्यावरिल धाडीत विशेष पोलिस पथकाने ४ लाख ५७ हजार १७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ४१ आरोपींना अटक केली. वणी शहरातील अवैध धंद्यांवरील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कार्यवाही असल्याचे बोलल्या जात आहे. अटक करण्यात आलेल्या ४१ व दोन फरार अशा एकूण ४३ आरोपींवर पोलिसांनी मजुका कायद्याच्या कलम १२(अ), १०९ नुसार गुन्हा दाखल केला आहे. 

शहरात सुंगधित तंबाखू व सुगंधित गुटख्याची अवैधरित्या विक्री करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांवरही या विशेष पोलिस पथकाने धाडी टाकून त्यांच पितळ उघडं पाडलं आहे. सिंधी कॉलनीतील साई ट्रेडर्स या दुकानावर धाड टाकून पोलिसांनी ४७ हजार १८८ रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू व सुगंधित गुटखा जप्त केला. प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व गुटखा दुकानात ठेऊन त्याची अवैध विक्री करणाऱ्या अनिल व्यवहारीमल नागदेव या व्यावसायिकाला पोलिसांनी अटक केली आहे. तर सिंधी कॉलनीतील राहत्या घरी धाड टाकून पोलिसांनी ४ लाख १६ हजार ५४२ रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू व सुगंधित गुटखा जप्त केला आहे. प्रतिबंधित सुगंधित तंबाखाचा घरात अवैध साठा करून ठेवणाऱ्या सुरेश परेलाल गोधाणी व दीपक कवडू चावला दोन्ही रा. सिंधी कॉलनी यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुगंधित तंबाखू व सुगंधित गुटख्याचा साठा करून त्याची अवैध विक्री करणे, याप्रकरणी पोलिसांनी तीनही आरोपींवर भादंवि च्या कलम १८८, २७२, २७३, ३२८ नुसार गुन्हा दाखल केला आहे. 

पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात एसडीपीओ पोलिस पथकाचे विजय वानखेडे, इकबाल शेख, प्रदीप ठाकरे, रवी इसनकर करित आहे.

रात्रीच्या वेळी महसुल पथकावर पाळत ठेवणारे गेले झाेपी अन् जाळ्यात अडकले अवैध रेतीचे दाेन ट्रैक्टर


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : अवैध गाैण खनिजांवर कारवाया करण्यांसाठी महसुल विभागाच्या अधिका-यांनी व कर्मचा-यांनी कंबर कसली असुन काल रविवार दि.३० जानेवारीला मध्यरात्रीला काेरपना भागातील पैनगंगा नदीच्या पात्रातुन अवैध रेती नेणां-या दाेन ट्रॅक्टरला पकडल्याचे वृत्त आहे.या धडक कारवाया काेरपना महसुल विभागाचे पटवारी विरेन्द्र मडावी, विशाल काेसनकार, अमाेल गाेसाई व काेतवाल रुपेश पानघाटे यांनी जिव धाेक्यात घालुन संयुक्तिकरित्या केल्या आहे. शेती उपयाेगासाठी या वाहनांचा परवाना असुन त्यांनी या ट्रॅक्टर वापर अवैध रेती नेण्यासाठी केला असल्याची बाब ही समाेर आली आहे. विशेष म्हणजे या वाहनांना कुठलाही क्रमांक नसल्याचे दिसून येते.अश्या वाहनांवर आरटीआे यांनी कारवाया कराव्या अशी मागणी देखिल या परिसरातील जनतेंनी केली आहे. विशेष म्हणजे या प्रकणातील एका रेती तस्करांने भाडे तत्वावर ट्रॅक्टर घेवून अवैध रेती नेण्यांचा सपाटा लावला हाेता परंतु त्याचे नशिबाने त्याला साथ दिली नाही. त्याच ट्रॅक्टरला महसुल विभागाच्या पथकाने दंडात्मक कारवाईसाठी ताब्यात घेतले असल्याचे पथकातील एका कर्मचा-यांने आज सांगितले. दरम्यान जप्तीतील एक वाहन पाेलिस पाटील माराेती राऊत यांचे सुपुर्द नाम्यावर देण्यांत आले आहे.उपरोक्त कारवाया राजुराचे उपविभागीय अधिकारी संपत खलाटे व काेरपनाचे तहसीलदार महेन्द्र वाकलेकर यांचे मार्गदर्शनाखाली महसुल विभागाच्या पथकाने केल्या आहे. सदरहु वाहने अनुक्रमे शिवराम शंकर आडे व रमेश उध्दव गाैरकर यांचे मालकीचे असल्याचे समजते. जप्तीतील दुसरे वाहन रात्री उशिरा काेरपना तहसील कार्यालयात जमा करण्यांत आल्याचे समजते.

या सततच्या कारवायामुळे रेती माफियांत चांगलीच खळबळ उडाली आहे तर राेजंदारीवर पाळत ठेवणा-यांचे अक्षरश: धाबे दणाणले आहे.

वारकरी संप्रदायाचे दादाजी निकुडे यांचे हृदयविकाराने निधन

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : वारकरी संप्रदायाचे दादाजी निकुडे यांचे आज पहाटे व्हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. आज 31 जानेवारीला दुपारी 2 वाजता शिरपूर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे. वारकरी संप्रदायाशी अनेक वर्षांपासून जुळून असलेले, व वारकरी प्रचारक म्हणून ते शिरपूर या गावात सर्व परिचित होते. पंढरपूरची न चुकता वारी करुन त्यांनी आपली निष्ठा जोपासली होती. साधं राहणीमान असलेल्या दादाजी निकुडे यांनी वारकरी म्हणून आपलं जिवन व्यतित केलं. ते आज सकाळी कापसाचे गाठे आणण्याकरिता गेले असता त्यांना व्हृदय विकाराचा झटका आला, व काही क्षणातच त्यांचा मृत्यु झाला. वारकरी संप्रदायाच्या प्रचाराची धुरा सांभाळणारा एक सच्चा वारकरी सर्वांना सोडून गेल्याने वारकरी व गावकरी शोकसागरात बुडाले आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा आप्त परिवार आहे.

नगराध्यक्ष पदासाठी इछुकांची सुरु झाली गर्दी; लता वाळके,साधना वाढई,ज्योति गेडाम नाव चर्चेत


सह्याद्री न्यूज | उमेश गोलेपल्लीवार

सावली : नागरी स्वराज्य संस्थाच्या सार्वत्रिक निवडणुकीचे नि काल हाती आल्यानंतर अपेक्षे प्रमाने का होईना सा ऱ्याच पक्ष्याने आपापल्या परिने प्रयन्त करुण उमेदवार निवडून आणण्याचा प्रयन्त केला. मात्र,  मतदारानी इतराना आपली जागा दाखवत विकासाच्या दृष्टीने कौल दिला सावली न प निवडणुकीत काँग्रेसने १४ उमेदवार निवडुन आणित पुन्हा दुस ऱ्यादा आपला तिरंगा फडकविला तर भाजपाने ३ उमेदवार निवडून आणून आपले खाते उघडले परंतु बसपा सह इतराची मोठी गोची झाली त्यामुळे सदरचा निकाल अनेकांना आत्मचिंतन करणारा ठरला निकाला नतर नगराध्यक्ष पदाच्या सोडतीकडे. सर्वाचे लक्ष लागले होते अनु जमाती कींवा खुला प्रवर्ग असा अनेकांचा अंदाज असताना सावली नगर पंच्यायत नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण महिला निघाल्याने नगराध्यक्ष पदासाठी चढाओढ सुरु झाली त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापु लागले आहे आपल्याच मताची महिला नगराध्यक्ष व्हावी अशी अनेकाची इच्या असून या बाबत निर्वाचित उमेदवारात आंतरिक कुजबुज सुरु आहे त्यासाठी नगराध्यक्ष पदासाठी लता वाळके,साधना वाढ़ई, ज्योति गेडाम आदि नावाची जोरदार चर्च्या सुरु आहे.

सावली नगरपंचायत चे नगराध्यक्ष पद.हे सर्वसाधारण महिला असे निघाल्याने.निर्विवाद बहुमत असलेल्या कांग्रेस पक्षाकडे लता लाकडे, साधना वाढ ई, ज्योती गेडाम यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे, असे असले.तरी यामधे बहुतेक चेहरे हे.पहिल्यांदा निवडुन.आले असून कांग्रेस पक्षाकडे सहा महिलाचा समावेश आहे ,परंतु लता लाकडे या प्रभाग क्रमांक १६ (अनुसूचित जाती महिला) मधून सर्वात जास्त २८३ अशी मते घेत विजय झाल्या यापूर्वी त्या तत्कालीन ग्रामपंचायत असताना सन १९९५ -२००० या कालावधीत त्या सरपंच (भारिप ) म्हणून योग्य कामगिरी बजाविली आणि खऱ्या अर्थाने त्याच्या सामाजिक आणि राजकीय कार्याला सुरुवात झाली. पेशाने अध्यापिका असताना सामाजिक जाण ठेऊन अनेक कार्यात त्या हिरहिरिने भाग घेत महिला संघटन एक वक्त त्यामुळेच जयभीम वाचनालयाच्या विद्यमान अध्यक्ष म्हणून त्या आपले कार्य पार पाडित आहे. त्यामुळेच नगराध्यक्ष पदासाठी लता लाकडे या नावाला अधिक पसंती दिली जात आहे तर दुसरीकडे विचार केल्यास माळी समाजाच्या साधना वाढई या सुध्दा ग्रामपंचायत असताना दोनदा ग्रामपंचायत सदस्य तर ,नगरपंचायत मध्ये रुपांतर झाल्यावर पहिल्या टर्म मध्येही त्या माळी साजाचे नेतृत्व करत निवडुन आल्या. ग्रा.प. ते नगरपंच्यायत पर्यन्त चा मोठा काळ त्यानी प्रशासन नात घालविला त्यामुळे सामाजिक राजकीय आणि स्थानिक प्रशासनाचा दाडगा अनुभव त्यामुळे सुधा नगराध्यक्ष पदासाठी साधना वाढई याचे नाव चर्चिले जात आहे तर सर्वसाधारण गटातून ज्योती गेडाम या निवडून आल्या त्या ढिवर (एन.टी) समाजातील असल्याने त्या सुधा नगराध्यक्ष पदासाठी दावेदार मानल्या जात आहेत. त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी इछुकांची भाऊ गर्दी सुरु असल्याचे दिसुन येत आहे निवडून आलेल्या महिला पैकी महिला आरक्षण असल्याने अनेकांनी माला संधि मिळावी यासाठी गुड़ग्याला बारशिग बांधुन तयार असले तरी राज्याचे. काबिनेट मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वड्डेटिवार यांच्या कार्यावर विश्वास ठेवून सावली नगराचा कायापालट कसा करता येईल यावर जोर देत सावली वासियांनी कांग्रेसला निर्विवाद दुसऱ्यानंदा संधि बाहाल केली आहे त्यामुळेच नगराध्यक्ष पदाची माळ नेमकी कोणत्या महिलेच्या गळ्यात पडेल हे पक्षश्रेष्ठीच ठरवेल. मात्र, लता लाकडे या नावाला अनेकांची अधिकच पसंती दिली जात असल्याचे चर्चेत समोर येत आहे.

राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिन साजरा

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

मारेगाव : स्थानिक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मारेगाव येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने दिं 25 जाने 2022 ला मतदार दिनानिमित्त भाषण व ई -घोषवाक्य कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये कु. आचल किन्हेकार, तेजस्वी वांढरे व शुभांगी मुंघाटे आदींनी मी मताधिकार बजावतो या विषयावर भाषण दिले तसेच इतर रासेयो विद्यार्थ्यांकडून ई - घोषवाक्य लिहून घेऊन समाजामध्ये मतदानाची जनजागृती व्हावी हाच एक उद्देश प्रत्येकानी मनाशी बाळगला. प्रसंगी रासेयो विद्यार्थिनी कु. आचल प्रवीण किन्हेकार हिने SPM महाविद्यालय, चिखली द्वारे मतदान दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय भाषण स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविले या विद्यार्थिनीचे प्राचार्य डॉ. अविनाश घरडे सरांनी अभिनंदन केले. उपक्रमाच्या यशस्वीतेकारिता रासेयो कार्यक्रम अधिकारी बाळासाहेब देशमुख व सहकार्यक्रम अधिकारी प्रा. भगत सर आणि शेंडे मॅडम यांनी पुढाकार घेतला.

राष्ट्रीय चर्मकार महासंघाची नांदेपेरा येथे शाखा गठीत, प.स. उपसभापती यांच्या हस्ते झाले शाखा फलकाचे उद्घाटन

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वणी तालुक्यातील नांदेपेरा येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघाची शाखा गठीत करून शाखा फलकाचे अनावरण करण्यात आले. संत रविदास महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना हारार्पण करून पंचायत समितीच्या उपसभापती चंद्रज्योती शेंडे यांच्या हस्ते या शाखा फलकाचे उद्घाटन करण्यात आले. नांदेपेरा येथील राष्ट्रीय चर्मकार महासंघाची तालुक्यातील ही चौथी शाखा असून २९ जानेवारीला चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव घोलप यांच्या आदेशाने व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माधवराव गायकवाड, यवतमाळ जिल्हाध्यक्ष प्रा. नरेश खडतरे यांच्या मार्गदर्शनात ही शाखा स्थापन करण्यात आली आहे. देशभरातील चर्मकार बांधवांच्या हक्कांसाठी लढणारी संघटना म्हणून राष्ट्रीय चर्मकार महासंघ सर्वपरिचित आहे. 

शाखा फलकाचा उद्घाटन सोहळा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे वणी विभागीय अध्यक्ष रवींद्र धुळे यांच्या अध्यक्षतेत पार पडला. यावेळी उदघाटक म्हणून प.स. उपसभापती चंद्रज्योती शेंडे उपस्थित होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून यवतमाळ जिल्हा युवा उपाध्यक्ष अमोल बांगडे, नांदेपेराचे सरपंच विलास चिकटे, तंटामुक्ती अध्यक्ष अरुण खामनकर, जेष्ठ सदस्य सुखदेव येरेकार, भास्कर खोले, पांडुरंग खोले, पंढरी बोधे यांची उपस्थिती लाभली. तसेच या शाखा उद्घाटन प्रसंगी संत रविदास महाराज चर्मकार युवा मंच वणी चे संस्थापक सदस्य विनोद ढेरे, किशन कोरडे, श्याम गिरडकर, भालर शाखेचे सचिव पंकज वादेकर व समाज बांधव उपस्थित होते. 

नांदेपेरा शाखेचे शाखा अध्यक्ष म्हणून रामा कोल्हे, उपाध्यक्ष प्रविण खोले तर सचिव पदी विकास खोले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश शेंडे यांनी तर आभार प्रदर्शन देविदास खोले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व समाज बांधव, समाजातील महिला व गावकऱ्यांनी सहकार्य केले.

खनिज निरीक्षक बंडू वरखेडेंसह खनिकर्म पथकाने पकडले रात्रीला अवैध गाैण खनिज वाहने !

सह्याद्री न्यूज | किरण घाटे  

चंद्रपूर : चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर तथा खनिकर्म अधिकारी सुरेश नैताम यांचे मार्गदर्शनाखाली शनिवार दि. २९ जानेवारीला रात्री ११ नंतर लक्कडकाेट मार्गावर गुप्त माहितीच्या आधारे व प्राणाची पर्वा न करता अवैध गाैण खनिजाची वाहने खनिज निरीक्षक बंडु वरखेडे व त्यांचे पथकाने पकडल्याचे वृत्त आहे. 

जिल्ह्यातील अवैध गाैण खनिजांवर अंकुश तथा दंडात्मक कारवायां करण्यासाठी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी या पूर्विच आदेश दिले आहे. त्याच अनुषंगाने जिल्ह्यातील महसुल विभागाचे अधिकारी व कर्मचारी अश्या अवैध गाैण खनिज वाहनांवर माेठ्या प्रमाणात कारवायां करीत असल्याचे चित्र एकंदरीत दिसून येते. दरम्यान या दाेन्ही वाहनांचे चालक कुठलेही गाैण परवाने नसतांना सर्रासपणे गिट्टीची वाहतुक करीत हाेते. वाहन चालक प्रमाेद जैस्वाल (मध्यप्रदेश) व मोहम्मद हासीन खाँन (उत्तर प्रदेश) यांनी जप्तीनामावर आपली स्वाक्षरी केली असुन ही जप्तीतील गिट्टीची दाेन्ही वाहने राजूरा तालुक्यातील लक्कडकाेटचे पाेलिस पाटील देविदास फकरु कातकर यांचे सुपुर्द नाम्यावर देण्यांत आलेली आहे यातील वाहनाचे क्रमांक एम.एच २३ ऐयु २४९३ व एम.एच.२३ऐयु २६१० अशी आहे. या धडक कारवाया मुळे अवैधरित्या गाैण खनिजांची वाहतुक करणा-या तस्करांत अक्षरशः खळबळ उडाली आहे. दाेन दिवसांपुर्विच जिवतीचे प्रभारी तहसीलदार प्रविण चिडे व काेरपनाचे मंडळ अधिकारी राजेन्द्र पचारे यांनी अवैध रेती तस्करांना चांगलाच दणका दिला आहे.

वेळ प्रसंगी त्यांनी मुजाेर व अरेरावी करणा-या रेती तस्करांवर पाेलिस कारवाया देखिल केल्या आहे तर खनिकर्म विभागाने काल रात्री केलेल्या कारवायांचे जनतेनी स्वागत केले आहे. अवैध गाैण खनिजांच्या बाबतीत काेरपनाचे मंडळ अधिकारी राजेन्द्र पचारे यांच्या कारवायां सातत्याने सुरु आहे.हे येथे विशेष उल्लेखनिय आहे.
  

रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकची वीज खांबाला धडक, खांबावरील डीपी जळाल्याने ग्रामीण रुग्णालयाचा वीज पुरवठा झाला होता खंडित

                     
सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : वणी ग्रामीण रुग्णालय परिसरातील विद्युत डीपी बसविलेल्या विजेच्या खांबाला रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने डीपी मधील रोहित्राने पेट घेतला. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयातील विद्युत पुरवठा तब्बल तिन तास घंडीत राहिल्याने रुग्णांचे मोठे हाल झाले. मागे वळण घेत असलेल्या ट्रकला साईड सांगणारा तेथे कुणीही नसल्याने चालकाचा अंदाज चुकला, व सरळ ट्रक डीपी बसवून असलेल्या वीज खांबाला धडकला. यात वीज वितरण कंपनीचे मोठे नुकसान झाले असून विद्युत विभागाच्या कनिष्ठ अभियंत्याने याबाबत पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली आहे. 

काल २९ जानेवारीला सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास रेतीची वाहतूक करणाऱ्या एका ट्रकने ग्रामीण रुग्णालय परिसरात रेती खाली केल्यानंतर मागे वळण घेतांना अंदाज न आल्याने सरळ विजेच्या खांबाला धडक दिली. या विजेच्या खांबावर विद्युत डीपी बसवलेली होती. ट्रकच्या धडकेने विजेचा खांब क्षतिग्रस्त होऊन डीपी मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने डीपी मधील रोहित्रांनी पेट घेतला, व ग्रामीण रुग्णालयातील वीज पुरवठा पूर्णतः खंडित झाला. ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारार्थी रुग्णांबरोबरच गंभीर आजाराचे रुग्णही भर्ती होते. त्याचप्रमाणे गरोदर व प्रसूती झालेल्या महिलाही ग्रामीण रुग्णालयात भर्ती होत्या. विजेचा प्रवाह खंडित झाल्याने रुग्णांचे मोठे हाल झाले. त्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. ग्रामीण रुग्णालयाच्या शासकीय निवासस्थानाचे बांधकाम सुरु असून बांधकाम ठेकेदाराची रेती घेऊन आलेल्या ट्रक क्रमांक MH २९ BE ०६९२ ने मागे वळण घेतांना विजेच्या खांबाला जोरदार धडक दिली. विजेच्या खांबावर डीपी बसविलेली असल्याने ट्रकच्या धडकेने डीपी मध्ये शॉर्ट सर्किट होऊन रोहित्राने पेट घेतला. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयातील विद्युत पुरवठा तब्बल तीन तासांपर्यंत बंद राहिला. ट्रकच्या धडकेमुळे डीपी जळाल्याने वीज वितरण कंपनीचे मोठे नुकसान झाले असून याबाबत विद्युत विभागाचे कनिष्ठ अभियंता सुदर्शन शंकरराव इवनाते यांनी पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. 

रेतीच्या जास्त चकरा लागाव्या म्हणून वाहतूकदार चालकांवर दबाव आणत असल्याने चालकांकडून निष्काळजीपणे वाहने चालविली जातात. जलद रेती खाली करून परत रेती घाटावर जाण्याकरिता चालक सुसाट वाहने चालवितात. रेती खाली करण्याकरिता वाहने मागे पुढे करतांना जराही खबरदारी घेतली जात नाही. ट्रक मागे घेतांना साईड ग्लास मधून किंवा गाडी खाली उतरून न बघता ट्रक चालक निष्काळजीपने वाहने हाताळत असल्याने अशा प्रकारच्या दुर्घटना घडतात. ट्रक चालकांचे निष्काळजीपणे ट्रक चालविणे अनेक निष्पाप नागरिकांच्या जिवावरही बितले आहे. त्यामुळे निष्काळजीपणे वाहने चालविणाऱ्यांवर पोलिसांचा वचक असणे आता गरजेचं झालं आहे. आता यावर काय कार्यवाही होते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र राज्यातील अनाथांचे छत्र हरपले - सामाजिक कार्यकर्त्या मंगलाताई ठक


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

नेवासा : महाराष्ट्राचं हृदय क्षणभरासाठी थांबलं एवढं प्रेम सिंधू ताईंनी त्यांच्या समाज कार्याच्या माध्यमातून महाराष्ट्राला दिलं. आज महाराष्ट्र राज्यातील सर्व अनाथांचे छत्र हरपले आहे मात्र, माई च्या पावलांवर पाऊल ठेऊन पुढे देखील आम्ही माईचे समाजकार्य सुरूच ठेऊ असे प्रतिपादन सामजिक कार्यकर्त्या मंगलाताई ठक यांनी केले.

माई च्या निधनानंतर पहिल्यांदा वर्धा येथील माई च्यां निवस्थानी भेट दिली या वेळी त्या बोलत होत्या 

यावेळी ठक म्हणाल्या की संपूर्ण महाराष्ट्राची माई म्हणून जगप्रसिध्द असलेल्या सिंधू ताई सपकाळ ह्या मूळच्या वर्धा येथील. दर महिन्याला त्या त्यांच्या निवास्थानी येवून राहायच्या, त्यांना समाज कार्याची देवी म्हंटल तर वावंग ठरणार नाही. हजारो अनाथ लेकरांची माय म्हणून उभ्या महाराष्ट्राला परिचित असणाऱ्या ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ सिंधुताईंच्या जाण्यामुळे अवघ्या महाराष्ट्राला पोरका झाला 
माझ्या माईच्या कार्याला शत शत नमन ...


"समाज कार्यात स्वहता चं संपुर्ण आयुष्य अर्पण करणाऱ्या माई च्या जीवनातील क्षण कधीही न विसरता येणारें आहेत माईच्या निवास्थानी भेट दिली असता मनं सुन्न झाले आहे माईचे कार्य पुढे नेण्यासाठी प्रयत्न करू "

मंगलाताई ठक (सामजिक कार्यकर्त्यां)


शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथी संपन्न

सह्याद्री न्यूज | शंकर घुगरे 

वणी : शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आज दिनांक ३० जानेवारी रोजी राष्ट्पिता महात्मा गांधी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मा श्री क्षीरसागर सर व उपमुख्याध्यापक मा श्री तामगाडगे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला मा मुख्याध्यापक व उपमुख्याध्यापक यांच्या हस्ते माल्यार्पण करून सर्वं शिक्षकांनी मौन पाळून अभिवादन केले. यावेळी शाळेतील सर्वं शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा श्री बुजोने सर यांनी केले.

वणीत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न

सह्याद्री न्यूज | शंकर घुगरे

वणी : येथील आयकॅन अकॅडमी व उडाण फिजिकल करिअर अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमानाने स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी डॉ महेंद्र लोढा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. परिश्रम आणि जिद्द याची सांगड घालून कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होता येते हे डॉक्टर लोढा यांनी विद्यार्थ्यांना पटवून सांगितले. प्रा. रवींद्र मत्ते यांनी यशाची चतूसूत्रे विद्यार्थ्यांना सांगितले. सबिया खान यांनीही आपले मत मांडले. यावेळी दोन्ही करिअर अकॅडमी संचालक सोपान लाड व गणेश आसूटकर तसेच अध्यक्ष स्थानी राजूभाऊ पहापळे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात स्व. समीउल्लाह खान (अबूजी) यांच्या स्मृतीला उजाळा देत झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोपान लाड यांनी केले. प्रसंगी सर्वं मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या नंतर ज्या क्षेत्रात ते यशस्वी झाले त्या यशस्वी विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार मान्यवरांच्या व त्यांच्या आई वडिलांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये वैभव चौलमावार (TCS), तुषार डवरे (TCS), कु.शीतल ठाकरे (इमफोसिस), कु. खुशबू चचडा (SBI क्लर्क), अमरीन शेख (SSB) ,कु. रक्षा गिरडकर (मुंबई पोलीस), कु.पुजा गुरनुले (मुंबई पोलीस), संतोष मग्गीडवार (MSF), कु.मनीषा शिवारकर (MSF), कु. माधुरी कोवे (MSF), इत्यादी यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर घुगरे यांनी केले तर आभार भगत यांनी मानले.
            

अमरावती पोलिस महानिरीक्षक पथकाच्या वणी येथील चार मटका अड्ड्यांवर व दोन सुगंधित तंबाखू विक्रेत्यांवर धाडी

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : वणी येथे अमरावती विभागाच्या पोलिस महानिरीक्षक पथकाने चार मटका अड्ड्यांवर व दोन सुगंधित तंबाखू विक्रेत्यांच्या गोदाम व दुकानावर धाडी टाकून लाखोंच्या मुद्देमालासह ३५ ते ४० आरोपींना अटक केली आहे. अमरावती पोलिस महानिरीक्षक कार्यालयाचे अतिरिक्त पोलिस अधिक्षक पोलिस पथकासह अचानक वणी येथे धडकले. कुणाला काही न कळायच्या आत एकाच वेळी चार मटका अड्ड्यांवर त्यांनी धाडी टाकल्या. एवढेच नाही तर प्रतिबंधित सुगंधित तंबाखू विक्री करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांच्या घर, गोदाम व दुकानावर धाडी टाकून लाखो रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू जप्त केला. सुगंधित तंबाखू विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना अटक करून त्यांच्यावर कार्यवाही केली. आज २९ जानेवारीला दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास अमरावती विभागाचं विशेष पोलिस पथक वणीत दाखल झालं, व त्यांनी वणीत चालणाऱ्या अवैध धंद्यांवर धाडसत्रच सुरु केलं. या धडक कार्यवाहीने कुठे पळापळ तर कुठे पाळण्याचीही वाट न मिळाल्याने मटका खेळणारे व खेळवणारे मोठ्या संख्येने पोलिसांच्या हाती लागले. आरोपींवर कार्यवाहीची प्रक्रिया सुरु असून मुद्देमालाची पडताळणीही पोलिसांकडून केली जात आहे. पोलिस महानिरीक्षक पथकाची वणीतिल ही पहिलीच कार्यवाही असल्याची चर्चा सुरु आहे. आता पर्यंतच्या या सर्वात मोठ्या व धडक कार्यवाहीने अवैध धंदेवाल्यांचे आता चांगलेच धाबे दणाणले आहेत.

वणी येथे सुरु असलेल्या अवैध धंद्यांवर अमरावती पोलिस महानिरीक्षक पथकाने एकाच वेळी धाडी टाकल्याने चांगलीच खळबळ उडाली. एकता नगर, सिंधी कॉलनी व दीपक चौपाटी परिसरात सुरु असलेल्या मटका अंड्यांवर अमरावती येथिल विशेष पोलिस पथकाने धाडी टाकून जवळपास ३५ ते ४० जणांना अटक केली. यात मटकापट्टी फाडणाऱ्या व मटका खेळणाऱ्यांचा समावेश आहे. चार मटका अड्ड्यांवर टाकलेल्या धाडीत पोलिसांनी लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. एक मटका अड्डा तर नगर परिषदेच्या गळ्यात सुरु होता. त्या गाळ्याचे शटरच बंद करून पोलिसांनी आरोपींना पळवाट शोधण्याची संधीच दिली नाही. या मटका अड्ड्यावरून तब्बल सोळा आरोपींना अटक करण्यात आली आहे. बाकी मटका अड्ड्यांवरून अटक करण्यात आलेल्या आरोपींचा आकडा अद्याप कळू शकला नाही. 

शहरात प्रतिबंधीत सुगंधित तंबाखू अवैधरित्या काही व्यापाऱ्यांकडून विक्री केला जात असल्याचीही या विशेष पोलिस पथकाला माहिती असल्याने त्यांनी सिंधी कॉलनी येथिल व्यापाऱ्यांच्या घर, गोदाम व दुकानांवर धाडी टाकून सुगंधित तंबाखाचा मोठा साठा जप्त केला. अवैधरित्या सुगंधित तंबाखू विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना अटक करून त्यांच्यावर कार्यवाही करण्यात आली. सर्वच आरोपींवर गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया सुरु असून जप्त केलेल्या मुद्देमालाचीही पडताळणी पोलिसांकडून केली जात आहे. जप्त केलेला मुद्देमाल लाखोंच्या घरात असून मुद्देमालाची निश्चित रक्कम अद्याप कळू शकलेली नाही. अमरावती पोलिस महानिरीक्षक पथकाची वणीतिल ही पहिलीच कार्यवाही असून या धडक कार्यवाहीने शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. अमरावती पोलिस महानिरीक्षक कार्यालयाचे अतिरिक्त पोलिस अधिक्षक गोवर हसन यांनी पोलिस पथकासह ही धडक कार्यवाही केली. अमरावती वरून पोलिसांचा मोठा फौजफाटा वणीला आला आहे.

"स्व. राजकमलजी भारती कला,वाणिज्य महाविद्यालय आर्णी येथे पुष्परचना कार्यशाळेचे आयोजन"

सह्याद्री न्यूज | रुस्तम शेख 

आर्णी : गृह अर्थशास्त्र विभागातर्फे कमवा आणि शिका उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी साठी पुष्परचना सजावट आणि सादरीकरण या विषयावर प्रात्यक्षिक कार्यशाळेचे आयोजन आर्णी येथील स्व राजकमल भारती कला, वाणिज्य महाविदयालयात करण्यात आले. 
सर्व प्रथम श्री दत्त प्रसादिक शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. संजयजी भारती यांनी कार्य शाळेला दिलेल्या शुभेच्छा संदेशाचे वाचन करण्यात आले. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्राचार्य डॉक्टर आर. एम. तातेड यांनी गृह अर्थशास्त्र विषयाची उपयुक्तता स्पष्ट करताना पुष्परचना सजावट विद्यार्थिनींना रोजगार सक्षम बनवू शकतो असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. वानखेडे यांनी भारतीय संस्कृतीतील ललित कला व पुष्परचना यांच्यातील सहसंबंध लक्षात घेऊन आपल्या सुप्त कलागुणांना संधी द्यावी असे मत व्यक्त केले.
कार्यशाळेच्या प्रथम सत्रात प्रा.डॉ.मनीषा क्षीरसागर यांनी पुष्प कला व मानवी जीवन यावर प्रकाश टाकला. द्वितीय सत्रात कुमारी प्रणाली अगलदरे यांनी कचर्‍यातून कला आणि पुष्परचना यांचे प्रात्यक्षिक दाखविले. 

कार्यक्रमाच्या समारोपीय भाषणात डॉ. तातेड यांनी स्वयंरोजगार याकरिता अशा प्रकारच्या कार्यशाळा उपयोगी असल्याने त्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वितेकरिता प्रा. डॉक्टर मनीषा क्षीरसागर आणि गृह अर्थशास्त्र विषयाच्या विद्यार्थिनींनी प्रयत्न केले.

वरळी मटका अड्यावर छापा, चार जण ताब्यात

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

मारेगाव : शहर पोलिसांनी येथील बाजार भागातील बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या मटका अड्यावर धाड टाकून मटका खेळवीणाऱ्या चार जणांवर गुन्हा दाखल केला. ही कारवाई पाच ते सहा च्या वाजताच्या दरम्यान करण्यात आल्याचे समजते.
छाप्याची चाहूल लागताच मटका चालवीणाऱ्यात पळापळ सुरु झाली. अशातच चार जणांना मारेगाव शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार मोहंमद जुबेर मोहंमद जावेद यांच्यासह सतिश महादेव कोराटे (५०), अंकुश कनाके (४८), श्रीकांत नेहारे (३०) सर्व रा.मारेगाव असे ताब्यात घेतलेल्यांची नाव आहे. या चार जणांच्या विरोधात मुंबई जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
त्यांच्या कडून मटका खेळण्याचे साहित्य व रोख रक्कम असा २७२० असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली मारेगाव एपीआय राजेश पुरी, जमादार आनंद,नितीन खांदवे,रौडी राठोड यांनी छापा मारून कारवाई केली.

ठाणेदार यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास बीट जमादार आनंद आलचेवर करित आहे. 

रेल्वेच्या जागेवरील घरे हटवू नये, राजूर ग्रामपंचायतेची मागणी, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : राजूर येथिल रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून घरे बांधून रहात असलेल्या गोरगरीब मजुरांची घरे हटवून त्यांना बेघर करू नये, घरे हटवायचीच झाल्यास त्यांना इतरत्र जागा उपलब्ध करून देत त्यांचे पुनवर्सन करण्याची मागणी राजूर ग्रामपंचायतेच्या वतीने जिल्हा अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. अतिक्रमित जागेवर निवास करणाऱ्या नागरिकांवर अन्याय होऊ नये, याकरिता राजूर ग्रामपंचायत सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार असल्याचे सरपंचा विद्याताई पेरकावार यांनी यावेळी स्पष्ट केले. 

रेल्वेच्या खुल्या जागेवर निवासस्थाने बांधून अनेक वर्षांपासून गोरगरीब मजूरवर्ग त्याठिकाणी वास्तव्याला आहे. वार्ड क्रमांक ४ मधील बहुतांश घरे अतिक्रमित जागेवर असून वार्ड क्रमांक ३ मधील काही वस्ती अतिक्रमित जागेवर वसलेली आहे. मागील काही महिन्यांपासून रेल्वेच्या जागेवर असलेली घरे हटविण्याच्या रेल्वेने हालचाली सुरु केल्या असून तसा फतवाही रेल्वे विभागाने काढला आहे. रेल्वेच्या अतिक्रमित जागेवर घरे बांधून रहात असलेल्या नागरिकांनाही रेल्वेने घरे हटविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे या नागरिकांनी ग्रामपंचायतेकडे धाव घेतली असून घरे न हटवू देण्याबाबत ग्रामपंचायतेला निवेदने दिली आहेत. कोळसा साईडिंग व कोळसा यार्ड बांधण्याकरिता रेल्वे अतिक्रमणधारकांना हटवित असून त्याठिकाणी तयार करण्यात येत असलेल्या कोळसा साईडींगमुळे प्रदूषणात आणखी भर पडणार आहे. गोरगरीब मजूर व निर्वासित वर्ग त्याठिकाणी ४० ते ४५ वर्षांपासून वास्तव्याला असून रेल्वे त्यांना बेघर करू पहात आहे. त्याचा संसार उघड्यावर आणून त्यांच्या उदरनिर्वाहाचे प्रश्न निर्माण करू पहात आहे. राजकीय पक्षांचे नेते व सामाजिक कार्यकर्त्यांनी गोरगरिबांची घरे हटवू नये म्हणून पालकमंत्री, लोकप्रतिनिधी व रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही निवेदने दिली आहे. रेल्वेच्या अतिक्रमित जागेवरील मजुरांची घरे हटविण्यात येऊ नये, अशी मागणीही राजकीय नेत्यांनी रेटून धरली आहे. राजूर ग्रामपंचायतेनेही रेल्वेच्या जागेवर वास्तव्यास असलेल्या रहिवाशांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहात त्यांची घरे हटवू नये म्हणून लोकप्रतिनिधींसह रेल्वे विभागाला निवेदने दिली आहेत. आता ग्रामपंचायतेने रहिवासी वस्ती हटवु नये म्हणून जिल्हा अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना थेट निवेदन दिले आहे. रेल्वेच्या अतिक्रमीत जागेवरील वस्ती हटवायचीच झाल्यास त्यांना इतरत्र जागा उपलब्ध करून देत त्यांचे पुनवर्सन करण्याची मागणी ग्रामपंचायतेने निवेदनातून केली आहे. २०० ते ३०० घरांचे पुनर्वसन करण्याकरिता राजूर ग्रामपंचायतेकडे ग्रामपंचायतेच्या मालकीची व शासकीय अशी कोणतीही जागा उपलब्ध नसून शासन प्रशासनाने त्यांच्या पुनवर्सनाचा तिढा सोडवून त्यांची निवासस्थाने अबाधित ठेवावी. कारण स्वतः जागा खरेदी करून घरे बांधण्याची या गोरगरिबांची कुवत नाही. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय होऊ नये हीच ग्रामपंचायतेची मागणी असल्याचे सरपंचा विद्याताई पेरकावार यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. 

निवेदन देतांना सरपंच विद्याताई पेरकावार यांच्यासह उपसरपंच अश्विनी बल्की, चेतना पाटिल, नंदना देवतळे, पायल डवरे, विवेक निमसटकर, विजय प्रजापती, अशोक वानखेडे, डेविड पेरकावार, अनिल डवरे, कपिल मेश्राम, नानाजी शिवदास तथा वार्ड क्रमांक ४ मधील नागरिक प्रतिभा कांबळे, पौर्णिमा कोटरंगे, ताराबाई दोरखंडे, गिरजाबाई दुबे, निता कुळसंगे, सुप्रिया कांबळे आदी उपस्थित होते.

तूझ्या कालच्या वस्तीची आज कॉलनी झाली - शंकर घुगरे


"तुझ्या कालच्या वस्तीची
आज कॉलनी
झाली. 
माझी वस्ती,मात्र अजूनही
तशीच अंधारलेली
लाचार अर्ध पोटी उपाशी
निजलेली
भिजलेली
विझलेली!"

संदर्भ :
कवी म्हणतात, "काल जी तुझी वस्ती होती त्याची आज कॉलनी झाली आहे". आज बघता बघता झपाट्याने शहरीकरण वाढलं असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. परंतु आजही काही वस्त्या ह्या शहरीकरणाच्या कोसोदूरच आहे. तिथे अजूनही विकास नावाचं खेळणं खुळखुळत नसून अंधार गरीबी आणि लाचारीचे जीवन लोक आजही जगत आहे.
भारत विकसीत होतोय भारतातील श्रीमंत लोकं,महानगरे आहे. लोकं सर्वं तंत्रज्ञाना चा वापर करतात. भारतात मेट्रो आली आहे आणि आपल्या देशात आजही झोपडपट्टी मध्ये लोक राहतात तिथे गरीबांना दोन वेळेच जेवणाचा प्रश्न पडतो, अनेक भागात लोकं अन्याय सहन करतात,  बेरोजगारीने कळसच गाठला आहेत. असे लेखकांने आपल्या कवितेतून लोकं, वस्ती शहरीकरण, गरिबी, लाचारी व बेरोजगारी मांडली आहे.
  
कवी : शंकर घुगरे, वणी
संपर्क : 9657440743

सेवानिवृत्त प्राचार्याला ३६ लाख ८७ हजारांनी गंडविले, पॉलिसीचे पैसे देण्याचे आमिष दाखवून घातला गंडा !

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : लाईफ इन्शुरन्स पॉलिसीची मुद्दत भरल्याचे सांगून पॉलिसीचे पैसे मिळण्याकरिता थोडे फार चार्जेस लागतील अशा भूलथापा देत एका सेवानिवृत्त प्राचार्याला तब्बल ३६ लाख ८७ हजार रुपयांचा गंडा घातल्याचे प्रकरण समोर आले आहे. लाईफ इन्शुरन्स पॉलिसीचे पैसे देण्याचे आमिष दाखवून सहा जणांनी वेगवेगळ्या पद्धतीने गंडविल्याची तक्रार सेवानिवृत्त प्राचार्यांनी पोलिस स्टेशनला केली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध फसवणुकीचा व माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. विद्यालयाचा प्राचार्य राहिलेला ज्ञानसंपन्न व्यक्ती भूलथापा व आमिषाला बळी पडून भविष्य निर्वाह निधी गमावून बसला याचेच आश्चर्य वाटते. 

मारेगाव येथील एका विद्यालयातून सेवानिवृत्त झालेले व वणी वडगाव रोडवरील आनंद नगर येथे वास्तव्यास असलेले मारोती महादेव घागी (६७) यांना एचडीएफसी अँड मॅक्स लाईफ इन्शुरन्स पॉलिसीचे पैसे देण्याचे आमिष दाखवून सहा जणांनी वेगवेगळ्या पद्धतीने तब्बल ३६ लाख ८७ हजार रुपयांचा गंडा घातल्याचे प्रकरण समोर आले आहे. पॉलिसी विड्रॉल करण्याकरिता थोडेफार चार्जेस लागतील अशा भूलथापा देऊन त्यांनी या सेवानिवृत्त प्राचार्यांच्या जमापुंजीलाच विड्रॉल करून घेतले. सहा जणांनी वारंवार फोन करून आधी पॉलिसीचे पैसे देण्याचे आमिष दाखवून तर नंतर आयकर विभागाच्या कार्यवाहीची भीती दाखवून त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. मारोती घागी यांनी जवळपास २५ वेळा त्यांना बँक खात्यातून पैसे ट्रान्सफर केल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. प्राचार्य पदावर राहिलेला उच्च शिक्षित व्यक्ती आमिषाला बळी पडून जीवनभराची जमापुंजी गमावून बसतो, ही चिंतनीय बाब आहे. बँकेकडून नेहमी सतर्कतेच्या सूचना दिल्या जातात. मग बुद्धिजीवी लोकं कसे काय ठगबाजांच्या आहारी जातात, याचेच नवल वाटते. ४ लाखाच्या इन्शुरन्स पॉलिसीची रक्कम मिळविण्याकरिता या सेवानिवृत्त प्राचार्याने तब्बल ३६ लाख ८७ हजार रुपये चार्जेस म्हणून भरले आहेत. सहा जणांनी वारंवार फोन करून २७ ऑक्टोबर २०२१ ते ५ जानेवारी २०२२ या काळात मारोती घागी यांच्या कडून २५ वेळा पैसे ट्रान्सफर करवून घेतले. ज्यावेळी त्यांना आमिषे व विविध करणे सांगून ठगविले जात होते, त्यावेळी त्यांनी कोणत्याही प्रकारची शाहनिशा केली नाही. आता ३६ लाख ८७ हजार रुपयांचा ठगबाजांनी गंडा घातल्यानंतर मारोती घागी यांनी २७ जानेवारीला पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भादंवि च्या कलम ४२० व ६६(ड) माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

पुढील तपास वणी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्याम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात पोलिस करित आहे.

अवैध रेती तस्करास महसूल विभागाचा परत एकदा दणका, काेरपनाचे मंडळ अधिकारी राजेन्द्र पचारेंनी पाठलाग करुन अवैध रेतीचे ट्रॅक्टर पकडले !

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध गाैण खनिजावर अकुंश तथा दंडात्मक कारवायां करण्यासाठी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार यांना विशेष निर्देश दिले असुन राजूराचे उपविभागीय अधिकारी संपत खलाटे व तहसीलदार महेन्द्र वाकलेकर यांचे मार्गदर्शना खाली काेरपनाचे मंडळ अधिकारी राजेन्द्र पचारे व काेतवाल रुपेश पानपाहटे यांनी काल गुरुवार दि.२७ जानेवारीला रात्रीला गुप्त माहितीच्या आधारे स्वताच्या जिवाची पर्वा न करता नामे प्रदीप मारोती कातकडे राहणार अंतरगाव बुजरुक यांचे अवैध रेतीचे M H34-AP 3276 या क्रंमाकाचे ट्रैक्टर पाठलाग करुन पकडले. विशेष उल्लेखनीय बाब अशी की रेतीने भरलेल्या ट्राँलीला काेणताही क्रमांक नव्हता .सदरहु ट्रॅक्टर पैनगंगा रेती घाटातून अवैध रेतीची वाहतूक करीत हाेता. उपरोक्त ट्रॅक्टरचा मंडळ अधिकारी राजेंद्र पचारे व ,कोतवाल रुपेश पाहणपटे यांनी लगेच जप्तीनामा करून ताे ट्रॅक्टर काेरपना तहसील कार्यालय येथे काही कर्मचा-यांचे देखरेखेखाली दंडात्मक कारवाई साठी रवाना केल्याचे वृत्त आहे.

दरम्यान या कारवाईची माहिती तातडीने राजेन्द्र पचारे यांनी तहसीलदार वाकलेकर यांना भ्रमणध्वनी वरुन दिली. उपरोक्त कारवाईत प्रकाश कामलवार व वाहन चालक सुरेश नागोसे यांनी माेलाचे सहकार्य केले. काेरपनाचे मंडळ अधिकारी पचारे यांच्या या धडक कारवायांमुळे या भागातील अवैध रेती माफियांचे अक्षरशा धाबे दणाणले आहे. हे तितकेच सत्य आहे.या पूर्वी सुध्दा मंडळ अधिकारी राजेन्द्र पचारे यांनी अवैध गाैण खनिजाच्या बाबतीत धडक कारवायां केल्या आहे.काल केलेल्या कारवाईचे अनेकांनी स्वागत केले आहे.

ही कारवाई केली तेव्हा रेती तस्करांच्या पाळत ठेवणां-या व्यक्तिंना देखिल याचा थांगपत्ता लागला नाही. हे विशेष !

तलवार हातात घेऊन परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : तलवार हातात घेऊन सार्वजनिक ठिकाणी धुमाकूळ घालणाऱ्या उपद्रवी तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील रंगनाथ नगर परिसरात आरोपी हा हातात तलवार घेऊन दहशत पसरवीत असल्याची माहिती ठाणेदार श्याम सोनटक्के यांना मिळाली. त्यांनी लगेच रंगनाथ नगर येथे पोलिस पथक पाठवून शस्त्रासह आरोपीला ताब्यात घेतले. निलेश दुर्वास पाटिल (२३) रा. रंगनाथ नगर असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना आज २७ जानेवारीला दुपारी ३.१५ वाजताच्या सुमारास घडली.  

रंगनाथ नगर येथे सार्वजनिक ठिकाणी एक उपद्रवी युवक हातात तलवार घेऊन धुमाकूळ घालत असल्याची माहिती ठाणेदार श्याम सोनटक्के यांना मिळाली. त्यांनी तत्काळ रंगनाथ नगर येथे पोलिस पथक पाठविले. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांना आरोपी हा हातात तलवार घेऊन परिसरात धुमाकूळ घालतांना आढळून आला. तलवारीसह परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक करून त्याच्या जवळील तलवार जप्त केली आहे. मुठीसह ८० सेमी लांबी असलेल्या या तलवारीची गोलाई ६८ सेमी एवढी आहे. स्वतःजवळ शस्त्र बाळगणाऱ्या आरोपी निलेश दुर्वास पाटिल याच्यावर पोलिसांनी आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याआधीही पोलिसांनी धारदार शस्त्रासह परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या तेथीलच एका आरोपीला अटक केली होती. चित्रपटांमधील भडक दृश्य बघून युवकांमध्ये टपोरीपणा वाढू लागला आहे. भाईगिरीचा आव आणून ते परिसरात दहशत निर्माण करू लागले आहेत. शस्त्रासह धुमाकूळ घालून चर्चेत येण्याचा केविलवाणा प्रयत्न करू लागले आहेत. त्यांना कायद्याची भाषा समजविण्याची गरज निर्माण झाली आहे. जेणेकरून तिसरा कुणी हातात शस्त्र घेऊन परिसरात धुमाकूळ घालण्याची हिम्मत करणार नाही. 

सदर कार्यवाही उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार श्याम सोनटक्के, स.फौ. डोमाजी भादीकर, डीबी पथकाचे सुदर्शन वानोळे, अशोक टेकाळे, हरिन्द्र कुमार भारती, संजय शेंद्रे, विशाल गेडाम, शंकर चौधरी यांनी केली. पुढील तपास सुदर्शन वानोळे करीत आहे.

माणसाला माणूस जोडला की उत्तरे मिळतात - सारंग गोसावी

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

वणी :  " वृत्तवाहिन्यांवरील चर्चांमधून रंगविल्या जाते किंवा समाज माध्यमातून पसरवल्या जाते तसे, दगडफेक, सैन्यविरोध, आतंकवाद एवढेच काश्मीरचे वास्तव नसून येथील सामान्य माणूस मनाने भारताशीच जोडलेला आहे. तो नित्य अडचणींशी झगडत आहे. आपला अविश्वास त्याला अधिक त्रास देणारा आहे. आपल्यापैकी जो कोणी तेथे जाऊन त्यांच्या जगण्याला सुसह्य करण्यासाठी प्रयत्न करतो त्या प्रत्येकाला तेथे प्रचंड प्रेम मिळते. हाताला काम आणि डोक्याला शिक्षण अशा स्वरूपात त्या सामान्य माणसाला सहकार्य करत माणसाला माणूस जोडला तरच काश्मीर प्रश्न खऱ्या अर्थाने हाताळता येईल. राजकीय भूमिका आपल्या जागी आवश्यक कार्य करीत असती तरी आपल्या सगळ्यांना मानव संधानाचे हे कार्य निष्ठेने करायला हवे." असे विचार असीम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सारंग गोसावी यांनी व्यक्त केले.
   
शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या लोकनायक बापूजी आणि स्मृती व्याख्यानमालेच्या ५२ व्या वर्षी "काश्मीर प्रश्नी तरुणांचे योगदान एक असीम यात्रा !" या विषयावर आयोजित आभासी व्याख्यानात ते व्यक्त होत होते. 
     
याप्रसंगी संस्थेचे सचिव एड. लक्ष्मणराव भेदी अध्यक्षस्थानी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांनी सकारात्मक विचार आणि सुयोग्य नियोजन यांच्या आधारे किती सुंदर कार्य उभे करता येते? याचा वस्तुपाठ सारंग गोसावी यांच्या कार्यातून प्राप्त होतो हे अधोरेखित केले.
    
आपल्या अत्यंत संयमित, अनुभवाधिष्ठित निवेदनात सारंग गोसावी यांनी वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी काश्मीर मध्ये जाण्याचा निर्णय, त्यामागील प्रेरणा, तेथे गेल्यानंतर आलेले अनेक अनुभव, केलेले शैक्षणिक कार्य, बेकरींचे उभे केलेले जाळे, सामान्य माणसाची मिळणारी साथ, क्रिकेटच्या माध्यमातून सैन्य आणि नागरिक यांच्यात साधलेला दुवा, सेना अधिकाऱ्यांकडून मिळालेली अनमोल शाबासकी अशा अनेक गोष्टी उघडून दाखवत, उरी म्हणजे केवळ सर्जिकल स्ट्राइक नव्हे तर राष्ट्रीय भावनेने भारतासोबत भक्कमपणे उभे असलेले गाव ही ओळख जनमानसात व्हायला हवी असे कळकळीचे आवाहन केले.
   
संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र नगरवाला यांनी प्रकृती अस्वास्थ्य असूनदेखील कार्यक्रमात सहभागी होऊन सारंग गोसावी यांना वणीचे प्रत्यक्ष आमंत्रण दिले. 
कार्यक्रमाचे अध्यक्ष लक्ष्मणराव भेदी यांनी सारंग गोसावी यांचे काम प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे हे अधोरेखित करीत त्यांना आवश्यक ती प्रत्येक मदत देण्याचे अभिवचन दिले.
  
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अभिजित अणे यांनी तर आभार प्रदर्शन संस्थेचे सहसचिव अशोक सोनटक्के यांनी केले.
कार्यक्रमाच्या तांत्रिक यशस्वीतेसाठी डॉ. गुलशन कुथे, डॉ. परेश पटेल जयंत त्रिवेदी तथा पंकज सोनटक्के इ. नी विशेष परिश्रम घेतले.

शेतकऱ्यांच्या समस्यांना घेऊन भाजपचे गाव तिथं आंदोलन, ४ फेब्रुवारी पासून आंदोलनाला होणार सुरुवात

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : अतिवृष्टीमुळे शेत पिकांचे मोठे नुकसान होऊनही तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाने नुकसान भरपाई पासून वंचित ठेवले. शिंदोला व पुनवट या मंडळांचा अतिवृष्टीग्रस्त मंडळामध्ये समावेशच करण्यात आलेला नाही. आस्मानी संकटात शेतकरी पूर्णतः भरडला गेला असतांनाही शासन शेतकऱ्यांना मदत देण्यास टाळाटाळ करीत आहे. आधी निसर्गाच्या लहरीपणामुळे व नंतर अतिवृष्टीमुळे शेत पिकांचं मोठं नुकसान झालं असून शेतकरी देशोधडीला आला आहे. हातातोंडाशी आलेली पिकंही अतिवृष्टीमुळे हिरावली गेल्याने शेतकरी पुरता हादरला आहे. त्यांना मदतीचा हात देण्याऐवजी शासन कृषी पंपाची वीज कापून त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्या व समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरिता भारतीय जनता पार्टी ४ फेब्रुवारी पासून वणी विधानसभा क्षेत्रात गाव तेथे आंदोलन करणार असल्याची माहिती आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

तालुक्यात ऑगष्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेत पिकांचं मोठं नुकसान होऊन शेतकरी चांगलाच आर्थिक अडचणीत आला आहे. हातातोंडाशी आलेली पिकंही अतिवृष्टीने हिरावून घेतली. आस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला आता सुलतानी संकटांचाही सामना करावा लागत आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची नुकसान भरपाई तर मिळालीच नाही, उलट कृषी पंपाची वीज कापून शासन शेतकऱ्यांवर कहर ढाळत आहे. रब्बी पिकांच्या हंगामात थकबाकी वीज बिलाचं कारण समोर करून जबरन कृषी पंपाची विज कापली जात आहे. शेतात चणा व गहू ही पिकं डौलावर असतांना वीज वितरण कंपनी कृषी पंपाची वीज कापत असल्याने शेतकऱ्यांसमोर सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ऐन ओलीताच्या वेळेलाच शेतातील कृषी पंपाची वीज कापली जात असल्याने पिकं करपण्याचा धोका निर्माण झाला आहे. अतिवृष्टीमुळे आधीच संकटात आलेल्या शेतकऱ्यांसमोर विद्युत विभाग आणखी संकटं निर्माण करू लागला आहे. शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी शासन अन्यायकारक भूमिका घेऊ लागल्याने भाजप शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहून शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठविणार आहे. ३० नोव्हेंबरला भाजपच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत शासनाला शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याबाबत निवेदन पाठविले होते. पण निवेदनाची दखलच घेण्यात न आल्याने भाजपच्या वतीने आता वणी विधानसभा क्षेत्रात गाव तिथं आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. ४ फेब्रुवारी पासून गावागावात आंदोलन करून शेतकऱ्यांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे. आंदोलनातील प्रमुख मागण्यांमध्ये शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची विज कापण्यात येऊ नये, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या तालुक्यातील ९ मंडळामध्ये शिंदोला व पुनवट या मंडळाचा समावेश करणे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम देणे, कृषी पंपाचे भारनियमन रद्द करणे या मागण्याचा समावेश आहे. वणी, मोरगाव व झरी या तीनही तालुक्यात गाव तिथं आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी भाजपचे विजय पिदूरकर, दिनकरराव पावडे, तारेंद्र बोर्डे, रवि बेलुरकर, संजय पिंपळशेंडे, गजानन विधाते, श्रीकांत पोटदुखे, बंडू चांदेकर, शंकर बांदूरकर उपस्थित होते.

जैताई मंदिराचे पुजारीसाधुबुवा संताने ह्यांना देवाज्ञा

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

वणी : दि.२६ येथील जैताई मंदिराचे देवीचे परमभक्त पुजारी
साधुबुवा संताने ह्यांना गणराज्य दिनी रात्री ८ च्या सुमारास मंदिरातील त्यांच्या निवासस्थानी देवाज्ञा झाली.

गेल्या दोन महिन्यां पासून व्रुध्दापकाळामुळे ते आजारी होते. वर्धेला कन्या गीताकडे राहून औषधोपचार घेतल्यानंतर त्यांना आज सायं. ५ वाजता वणीला आणण्यात आले.

वणीला पोहचताच तीन तासानंतर हा देवीभक्त देवीचरणाशी कायमचा लीन झाला.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी गीता, जावई,
नातवंड आणि त्यांच्यावर प्रेम करणारे अनेक भाविक आहेत.
त्यांची अंत्ययात्रा मंदिरातून गुरुवार दि. २७ ला सकाळी ११ वाजता निघेल.

जिल्हा परिषद निधीतून विरकुंड व नवेगाव येथे बांधण्यात येणार सिमेंट रस्ते, जी.प. सदस्य संघदीप भगत यांच्या हस्ते झाले भूमिपूजन

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : विरकुंड गट ग्रामपंचायते अंतर्गत जिल्हा परिषद निधीतून बांधण्यात येणाऱ्या सिमेंट रस्त्यांच्या बांधकामाचे नुकतेच भूमिजन करण्यात आले. विरकुंड व नवेगाव येथे जिल्हा परिषद निधीतून हे सिमेंट रस्ते बांधण्यात येणार असून जिल्हा परिषद सदस्य संघदीप भगत यांच्या हस्ते कुदळ मारून या कामाचे भूमीपूजन करण्यात आले. विरकुंड गट ग्रामपंचायतेने गावातील विकासकामांना प्राधान्य देत गावकऱ्यांना सोई सुविधा उपलब्ध करून देण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. गावातील रस्त्यांची समस्या दूर करण्याकरिता गावात सिमेंट रस्ते बांधण्याची कामे ग्रामपंचायतेने हाती घेतली असून जिल्हा परिषद निधीतून रस्त्यांच्या बांधकामाचा मुहूर्त साधण्यात आला आहे. गावातील रस्ते विकासाबरोबरच गावातील पुतळ्यांचे सौंदर्यीकरण देखील करण्यात येणार असून त्याकरिता देखील जिल्हा परिषदेने निधी उपलब्ध करून दिला आहे. विरकुंड बसस्थानकाजवळील बाबुराव शेडमाके यांच्या पुतळा परिसराच्या सौंदर्यीकरणाचे देखिल जी.प सदस्य संघदीप भगत याच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले. यावेळी विरकुंड गट ग्रामपंचायतेच्या सरपंचा कविता सोयाम, उपसरपंच पिनू डांगे, ग्रामपंचायत सदस्य विद्या विलास कालेकर, वर्षा प्रमोद मडावी, अमोल पारखी, सचिव भाकरे, विलास कालेकर, अशोक जोगी यांच्यासह गाववासी उपस्थित होते. 
विरकुंड गट ग्रामपंचातेने गावाच्या विकासाबरोबरच गावकऱ्यांना मूलभूत व इतर सोई सुविधा उपलब्ध करून देण्यावरही भर दिला आहे. गावात स्मशभूमी अभावी अंत्यसंस्काराची होत असलेली गैरसोय देखील ग्रामपंचायतने स्मशानभूमी बांधून दूर केली. लाखो रुपयांचा निधी स्मशानभूमीच्या बांधकामाकरिता खर्च करण्यात आला. मुबलक जागेत व सर्व सोई सुविधांनी सज्ज असलेली स्मशानभूमी विरकुंड या गावात ग्रामपंचायतेने बांधली. गावाचा विकास साधण्याचे ग्रामपंचायतेचे धोरण असून गावाच्या विकासाकरिता निधी खेचून आणण्याचा विरकुंड गट ग्रामपंचायतेचा प्रयत्न राहणार असल्याचे सरपंच कविता सोयाम यांनी यावेळी सांगितले.

ज्येष्ठ नागरिक निराधार अत्याचार मुक्ती समिती महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष मंगलाताई ठक यांचा नेवासा दौरा संपन्न

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

नेवासा : मंगलाताई ठक यांचा समवेत जेष्ठ नागरिक निराधार अत्याचार मुक्ती संगर्षंन समिती,  रेवणनाथ जी देशमुख महाराष्ट्र उपाध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष अहमदनगर चंद्रशेखर कडू पाटील यांच्या समवेत मंगल ताई देशमुख यांनी निराधार लोकांसाठी महाराष्ट्रभर फिरून काम करत असताना जगप्रसिद्ध प्रतिष्ठान शिर्डी, कोपरगाव स्वामी देवस्थान तथा नेवासा तालुक्यातील ज्ञानेश्वर मंदिर, मोहिनी धारण मंदिर, देवगढ, शनी शिंगणापूर महाराष्ट्रातील प्रसिद्ध प्रतिष्ठानची भेटी देवून दर्शन घेतले तसेच शिर्डी येथील बैठकीत श्री काच्रू पाटील पवार यांची संघटनेच्या महाराष्ट्र सल्लागार पदी तर नाजिर शेख यांची अहमदनगर जिल्ह्याच्या संघटक पदी नियकती केली या दिऊर्यच्या दरम्यान जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये मंगलाताई यांचे शोळ श्रीफळ देवून कार्याबद्दल सत्कार करण्यात आले. 

त्या अनुषंगाने नेवासा येथील शरणपूर आश्रम येथे मंगलाताई ठक यांनी भेट देऊन वृद्धाच्या अडचणी जाणून घेतल्या व सरकार पातळीवर वृद्धांसाठी योजना राबवली जाणार असल्याचे सांगितले व वृद्धांसाठी राज्यभर काम करत असल्याचे असल्याचेही यावेळी बोलताना सांगितले. तसेच पुढे म्हणाल्या की,नेवासा येथे येऊन खूप आनंद वाटला देवगड देवस्थान चे गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांचे दर्शन करण्याचे लाभ झाला .तसेच ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सारख्या महान ग्रंथांची निर्मिती केली त्या पावन भूमीचे दर्शन घडले यात आनंद वाटला देवगड देवस्थान चे गुरुवर्य भास्करगिरी महाराज तसेच माऊलींचे दर्शन घेऊन पुढील काळात योग्य काम करणार असल्याचेही बोलताना भावना व्यक्त केल्या. ह्या वेळी सुधीर चव्हाण, बाळासाहेब दिवखिळे, परवेज पठाण, सोनकांबळे, राजू परदेशी, बन्सी सातपुते,
 न्यूजशी बोलताना अधिक माहिती दिली.सोबतच मंगला ताई ठक यांनी लिहिलेले पाठभर जखमा एक सत्य कथन हे पुस्तक मान्यवरांना भेट दिले.

महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा मंगलाताई ठक यांच्या उपस्थितीत नेवासा येथे होमगार्ड कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

नेवासा : नेवासा येथे होमगार्ड कार्यालयात ७३ व्वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी होमगार्ड कार्यालयाचे ध्वजारोहण पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या हस्ते करण्यात आले 

या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या जेष्ठ नागरिक निराधार अत्याचार मुक्ती संघर्ष समितीच्या प्रदेश अध्यक्षा मंगलाताई ठक यांनी उपस्थिती दर्शविली, मंगला ताई या आपला संपूर्ण महाराष्ट्र भर फिरून दौरा करीत असल्याचे सांगितले.

या वेळी शिर्डी येथे बैठक घेतली व काही महत्वाच्या महाराष्ट्र व अहमनगर जिल्ह्याचा नियुक्त्या केल्या व कोपरगाव येथे स्वामी निराधार संघटनेचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर कडू पाटील, संघटनेच्या जिल्हा कार्याध्यक्षा मंगल देशमुख,जनसंपर्क प्रमुख सुधीर चव्हाण, नगरसेवक राजेंद्र मापारी, बाळासाहेब केदारे, शरणपूर वृद्ध आश्रमाचे रावसाहेब मगर, उद्योजक उदरें पाटील, राजेंद्र कडू, पोलीस मित्र नळघे, पलटनायक दिलीप गायकवाड, अशोक टेमकर, अंश कालीन लिपिक अल्ताफ शेख,माजी होमगार्ड हमीद शेख, होमगार्ड संतोष गायकवाड, अमोल मोहिते, राजेंद्र बोरुडे, यांच्या सह महिला होमगार्ड उपस्थित होत्या यावेळी सूत्रसंचालन होमगार्ड संपर्क प्रमुख सुधीर चव्हाण यांनी केले तर पत्रकार मोहन गायकवाड यांनी आभार मानले.

या प्रसंगी सर्व मान्यवरांना नेवासा येथे मंगला ताई ठक यांनी लिहिलेलं "पाठभर जखमा" एक सत्य कथन पुस्तक भेट दिले.

सूरमाज फाऊंडेशनने प्रजासत्तक दिन साजरा केला

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

चोपडा : प्रजासत्तक दिन हा आपल्या देशाचा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आणि हा दिवस साध्य करण्यासाठी आपल्या अनेक जवानांनी आपल्या प्राणांची आणि कुटुंबाची आहुती दिली आहे.

हा दिवस लक्षात ठेवणे आणि देशाच्या उन्नतीसाठी प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे. म्हणूनच आज 26 जानेवारी 2022 रोजी प्रजासत्तक दिनानिमित्त सूरमज फाउंडेशन चोपडा यांच्या कार्यालयात हाजी उस्मान शेख साहब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी शोएब शेख, जुबेर बैग, अबुललौस शेख, डॉ रागीब, जियाउद्दीन काजी साहब आणि सूरमाज फाउंडेशन चे सहकारी उपस्थित होते.

शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यायात प्रजासत्ताक दिन संपन्न


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

वणी : शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष मा श्री. रमेशजी बोहरा साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

संस्थेचे सचिव मा श्री भेदी साहेब सहसचिव मा. श्री अशोकजी सोनटक्के साहेब संस्थेचे सदस्य मा श्री जयस्वाल साहेब, शिक्षण प्रसारक मंडळ महाविद्यालयाचे प्राचार्य मा श्री क्षीरसागर सर, उप प्राचार्य मा श्री तामगाडगे सर, लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे प्राचार्य मा श्री खानझोडे सर, फार्मसी विभागाचे प्राचार्य मा श्री रेड्डी सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. ध्वजारोहण नंतर राष्ट्रगीत झाले यावेळी दोन्ही संस्थेचे सर्वं शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते संविधानाचे प्रस्ताविका वाचन मा लांडे सर यांनी केले तर, शालेय प्रार्थना मा श्री बुजोने सर यांनी सादर केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा श्री निमकर सर व बुजोने सर यांनी केले. या वेळी सर्वं शिक्षक उपस्थित होते.

खांदला गावातून प्रथम आलेल्या सुषमा सुभाष डाहुले हिला ध्वज रोहनणचा दिला मान

सह्याद्री न्यूज नेटवर्क |

वणी : खांदला ग्रामपंचतीचा अनोखा उपक्रम सरपंच हेमंत गौरकार यांनी दिला गावातील 12 वी मध्ये गावातून प्रथम आलेल्या सुषमा सुभाष डाहुले हिला ध्वज रोहनचा मान दिला.
यावेळी उपसरपंच प्रफुल बोथाडे, सदस्य गणेश जुमनाके, सदस्य वर्षा पावडे, सदस्य सुनीता आसुटकर, सदस्य सुप्रिया गौरकार, सदस्य रत्नमाला नवघरे, ग्रामसेवक शेडमाके साहेब, पाटील सर, गौरकार सर, तंटामुक्त अध्यक्ष शालिकराव पत्रकार इतर ग्रामस्थ उपस्तित होते.

या प्रसंगी सुषमा यांनी सर्वाना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या व मान्यवरांचे आभार मानले.

प्रजासत्ताक दिन चिरायू..

मातृभूमी ही अजिंक्य...
विश्वात सारया वंद्य संस्कृती,
कण कण मतीचा बोले हर्षे, 
विश्वास प्रेम इथे नांदती
संपन्न इतिहास अन,
युवकात प्रखर राष्ट्रप्रेम जागृती
हर मनात हृदयात अन,
हुंकार एकमेव जय भारती ll








प्रजासत्ताक दिन चिरायू होवो....

                      प्रजासत्ताक_दिन

न्याय,समानता,स्वातंत्र्य आणि बंधुता..
आपल्या महान भारतीय संविधानाच्या या स्तंभांना अभिवादन.बाबासाहेबांना वंदन करत ही मूल्ये प्रत्यक्षात जगण्याचा प्रयत्न करूयात.
आपला देश बलसागर होवो,चिरायू होवो,या सदीच्छेसह प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.


शुभेच्छुक : सौ सीमा स्वामी लोहराळकर
भ.ज.वि.अ.महा. राज्य मराठवाडा उपकार्याध्यक्षा, नांदेड 

 

प्रजासत्ताक दिन चिरायू होवो...

                      प्रजासत्ताक_दिन 

न्याय,समानता,स्वातंत्र्य आणि बंधुता..
आपल्या महान भारतीय संविधानाच्या या स्तंभांना अभिवादन. ही मूल्ये प्रत्यक्षात जगण्याचा प्रयत्न करूयात.
आपला देश बलसागर होवो,चिरायू होवो,या सदीच्छेसह प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.


शुभेच्छुक : अजिंक्य सुभाषराव शेंडे उपजिल्हा प्रमुख युवासेना यवतमाळ 

प्रजासत्ताक दिन चिरायू


                     प्रजासत्ताक_दिन

न्याय,समानता,स्वातंत्र्य आणि बंधुता..
आपल्या महान भारतीय संविधानाच्या या स्तंभांना अभिवादन. ही मूल्ये प्रत्यक्षात जगण्याचा प्रयत्न करूयात.
आपला देश बलसागर होवो,चिरायू होवो,या सदीच्छेसह प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

शुभेच्छुक : उमेश पोद्दार समाजसेवक वणी विधानसभा क्षेत्र 

प्रजासत्ताक दिन चिरायू होवो...


                   प्रजासत्ताक दिन 

न्याय,समानता,स्वातंत्र्य आणि बंधुता..
आपल्या महान भारतीय संविधानाच्या या स्तंभांना अभिवादन.बाबासाहेबांना वंदन करत ही मूल्ये प्रत्यक्षात जगण्याचा प्रयत्न करूयात.
आपला देश बलसागर होवो,चिरायू होवो,या सदीच्छेसह प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

शुभेच्छुक : पळसोनी ग्रामपंचायत पदाधिकारी वा कर्मचारी 

प्रजासत्ताक दिन चिरायू होवो...


                     प्रजासत्ताक_दिन

न्याय,समानता,स्वातंत्र्य आणि बंधुता..
आपल्या महान भारतीय संविधानाच्या या स्तंभांना अभिवादन. ही मूल्ये प्रत्यक्षात जगण्याचा प्रयत्न करूयात.
आपला देश बलसागर होवो,चिरायू होवो,या सदीच्छेसह प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.


प्रजासत्ताक दिन चिरायू होवो...


                    प्रजासत्ताक_दिन

न्याय,समानता,स्वातंत्र्य आणि बंधुता..
आपल्या महान भारतीय संविधानाच्या या स्तंभांना अभिवादन करत ही मूल्ये प्रत्यक्षात जगण्याचा प्रयत्न करूयात.
आपला देश बलसागर होवो,चिरायू होवो,या सदीच्छेसह प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

शुभेच्छुक : वांजरी ग्रामपंचायत पदाधिकारी 

प्रजासत्ताक दिन चिरायू होवो...

                    प्रजासत्ताक_दिन

न्याय,समानता,स्वातंत्र्य आणि बंधुता..
आपल्या महान भारतीय संविधानाच्या या स्तंभांना अभिवादन वंदन करत ही मूल्ये प्रत्यक्षात जगण्याचा प्रयत्न करूयात.
आपला देश बलसागर होवो,चिरायू होवो,या सदीच्छेसह प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

                        शुभेच्छुक :
               ग्रामसेवक आनंद धनगर
                  ग्रामपंचायत, वरुड 
 

सुंदरनगर येथील डीएव्ही सीबीएसई स्कुल वणी येथे स्थलांतरित करावी, शिवसेनेचे राजू तुराणकर यांची मागणी

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाची मान्यता प्राप्त असलेली डी. ए. व्ही. ही इंग्रजी माध्यमिक शाळा सुंदरनगर येथून वणीला स्थलांतरित करण्याची मागणी शिवसेना शहर प्रमुख राजू तुराणकर यांनी यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भूमरे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

पालकमंत्री आज वणीच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. डीएव्ही स्कुल वणी पासून अतिशय लांब असून निलजई कोळसाखाणी पासून अगदीच जवळ आहे. कोळसाखाणीमध्ये होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे शाळेच्या इमारतीला तडे गेले असून धोकादायक स्थितीत ही इमारत आली आहे. ही शाळा वणीला स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरु झाल्या असतांनाच काही अधिकारी स्वतःच्या फायद्याकरिता ही शाळा घुग्गुसला हलविण्याचा प्रयत्नात आहेत. डीएव्ही ही इंग्रजी माध्यमिक शाळा वणी परिसरातील विद्यार्थ्यांकरिता असून येथील विद्यार्थ्यांना दर्जेदार इंग्रजी माध्यमाचं शिक्षण मिळावं म्हणून या शाळेला वणी येथे स्थलांतरित करणे आवश्यक आहे. 
डीएव्ही या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये वणी परिसरातील ४५० विद्यार्थी शिक्षण घेतात. वणी परिसरातील वेकोलि कर्मचारी व कास्तकारांच्या मुलांना इंग्रजी माध्यमाचं (सीबीएसई बोर्ड) शिक्षण घेता यावं म्हणून सुंदरनगर येथे ही शाळा सुरु करण्यात आली. ही शाळा वणी परिसरातील विद्यार्थ्यांना अतिशय लांब पडत असल्याने स्कुल बसचा मोठा खर्च पालकांना उचलावा लागत आहे. त्याचप्रमाणे कोळसाखाणीमध्ये होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे शाळेच्या ईमारतीला तडे गेले असून ईमारत धोकादायक स्थितीत आली आहे. ब्लास्टिंगच्या आवाजामुळे व हादऱ्यांमुळे शिकवणी वर्ग घेतानाही व्यत्यय येत असून विद्यार्थीही भीतीच्या सावटात वावरतात. त्यामुळे डीएव्ही स्कुल वणी येथे स्थलांतरित करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग सुकर करावा, अशी मागणी शिवसेना शहर प्रमुख राजू तुराणकर यांनी पालकमंत्री संदीपान भुमरे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. 

निवेदन देतांना शिवसेनेचे संजय देरकर, दीपक कोकास, संतोष कुचनकर, अजिंक्य शेंडे, भगवान मोहिते, संजय देठे, प्रवीण खानझोडे, मो. असलम, डॉ. जुनगरी, प्रेमा धानोरकर, राजू वाघमारे, अनिल उलमाले, मंगल भोंगळे, जनार्धन थेटे, शंकर देरकर, बबन केळकर आदी उपस्थित होते.

पक्ष प्रवेशाने गाजला अभिष्टचिंतन सोहळा, डॉ. महेंद्र लोढासह शेकडोंनी घेतला काँग्रेसमध्ये प्रवेश


सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : यवतमाळ जिल्हा हा राजकारणासाठी अत्यंत पोषक असा जिल्हा आहे. जिल्ह्याचा अध्यक्ष कधी प्रदेश अध्यक्ष होऊन जातो, कळतच नाही. न जानता न मागता यवतमाळ जिल्ह्याला काहीही मिळून जातं. याच उत्तम उदाहरण म्हणजे संध्याताई सव्वालाखे या आहेत. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष झाल्यानंतर त्या महिला प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्या आहेत. तसेच दुधात साखर पडावी तसे आमदार वजाहत मिर्जा हे विदर्भाचे सुपुत्र पहिल्यांदा वक्फ बोर्डाचे अध्यक्ष झाले आहेत. त्यामुळे यवतमाळ जिल्हा व विदर्भात काँग्रेसचा भक्कम पाया तयार झाला असून येणारी निवडणूक ही काँग्रेसचीच राहणार आहे. सध्याचे दिवस काही चांगले नाहीत. विषारी असे हे दिवस आहेत. देशात विषारी विषमता माजली आहे. एकेकाळी ब्रिटिशांचे गुलाम असणारे लोक आता देशातील जनतेला गुलाम करू पाहत आहे. जाती धर्माचं राजकारण करून देशात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. निवडणुकी लढवताना जाती धर्माचा आधार घेतला जात आहे. काँग्रेसने कधी जाती धर्माचं राजकारण केलं नाही. आपला धर्मनिरपेक्ष बाणा जोपासून ठेवला. सर्वांनाच सामान संधी दिली. महिलांनाही सामान वागणूक दिली. त्यांनाही राष्ट्रपती पदापर्यंतचा सन्मान मिळवून दिला. असा हा समविचारी धोरणाचा काँग्रेस पक्ष असून या पक्षाने नेहमीच जनकल्याणाचा विचार केला आहे. आज जी विषारी विचारसरणी पसरविली जात आहे, त्या विषमता पसरविणाऱ्या विचारसरणीलाच सत्तेतून हद्दपार केले पाहिजे, असे खणखणीत विचार महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी वणी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार व प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस वामनराव कासावार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य अभिष्टचिंतन व पक्ष प्रवेश सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना व्यक्त केले. वसंत जिनिंग येथे हा अभिष्टचिंतन व पक्ष प्रवेश सोहळा घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार बाळूभाऊ धानोरकर हे होते. खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनीही आपल्या अध्यक्षीय भाषणातून भाजपवर करकचून टीका केली. जाहिरातींवर भरमसाठ खर्च करून देशाची तिजोरी या सरकारने रिकामी केली आहे. चांगले दिवस आणण्याचे स्वप्न दाखवून अत्यंत वाईट दिवस या सरकारने आणले आहेत. महागाई व बेरोजगारीमुळे जनता बेजार झाली आहे. पूजापाठ करणारे सत्तेत आले असून त्यांनी जाती धर्माचं राजकारण करण्यापलीकडे दुसरे काहीही केले नाही. देशाची संपत्ती भांडवदारांच्या घशात घालण्याचं काम सत्ताधाऱ्यांनी सुरु केलं आहे. साडेसात वर्षात भाजप सरकारने देशाला साडेसाती लावली आहे. या सरकारने आणलेल्या काळ्या कृषी कायद्यांमुळे झालेल्या शेतकरी आंदोलनात ७५० शेतकऱ्यांना वीरमरण आले. भरमसाठ आकारलेल्या जीएसटी मुळे छोट्या व्यापाऱ्यांवर अवकळा आली. हातांना कामे उरली नाही, नवीन उद्योग निर्माण झाले नाहीत. वर्षाला दोन कोटी रोजगार उपलब्ध करून देऊ म्हणणारं हे सरकार बेरोजगारांच्या फौजा तयार करू लागलं आहे. म्हणूनच आता यांच्या भुलथापांवर नागरिकांचा विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे नागरिक आता काँग्रेसकडे वळू लागले आहेत. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला मिळालेले यश, हे नागरिकांची काँग्रेसप्रती असलेली विश्वासाहर्ता असल्याचे बाळूभाऊ धानोरकर यांनी आपल्या अनोख्या शैलीत बोलतांना म्हटले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांनी वामनराव कासावार यांनी नेहमी महिलांचे संघटन मजबूत करण्यावर भर देत महिलांना जोडून ठेवण्याची शैली त्यांना अवगत असल्याचे गौरव उद्दगार काढले. तसेच त्यांनी पंतप्रधान यांच्या महिलांविषयीच्या आक्षेपार्य वक्तव्याचा यावेळी निषेध केला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले काँग्रेसचे दिग्गज नेते शिवाजीराव मोघे, प्रा. वसंतराव पुरके, वाजहत मिर्जा यांनीही आपल्या भाषणातून हास्याचे फुलोरे फुलवितांनाच वामनराव कासावार यांच्या जीवनातील काही आव्हानात्मक व गंमतीजंमतीचे किस्से सांगितले. तसेच काँग्रेसला गळतीतून सबळतीकडे नेण्याची सर्वांचीच जबाबदारी असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. यावेळी मंचकावर काँग्रेसचे राहुल ठाकरे, आमदार प्रतिभाताई धानोरकर, अरुणाताई खंडाळकर, ऍड. देविदास काळे, नरेंद्र ठाकरे हे विराजमान होते. प्रास्ताविक प्रा. टिकाराम कोंगरे यांनी केले. कार्यक्रम तब्बल दोन तास उशिरा सुरु झाल्याने उपस्थितांमध्ये नाराजी दिसून येत होती. यावेळी डॉ. महेंद्र लोढा यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. काँग्रेसमध्ये प्रवेश घेण्याचा त्यांचा निर्णय अतिशय योग्य असून आता काँग्रेसमध्ये स्थिर रहा असा उपदेश काँग्रेस नेत्यांनी आपल्या भानातून त्यांना दिला. विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. काँग्रेसमध्ये प्रवेश घेणाऱ्यांचे स्वागत व नगर पंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या उमेदवारांचा सत्कार तब्बल एका तासापर्यंत चालला. त्यामुळे दूरवरून आलेल्या नागरिकांकरिता ठेवण्यात आलेल्या दुपारच्या जेवणाला सायंकाळ झाली. वामनराव कासावार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या अभिष्टचिंतन व पक्षप्रवेश सोहळ्याला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

भुरट्या चोरांचा धुमाकूळ सुरूच, एसटी डेपो मधिल लोखंडी साहित्य केले लंपास

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : शहर व तालुक्यात भुरट्या चोरांचा सुळसुळाट चांगलाच वाढला असून या भुरट्या चोरांची नजर आता एसटी डेपो मधील लोखंडी साहित्यावर पडली आहे. वणी एसटी डेपोच्या खुल्या वर्कशॉप मधील लोखंडी साहित्य चोरट्यांनी लंपास केले आहे. वर्कशॉप मधिल बसचे लोखंडी स्पेअर पार्ट्स व तांत्रिक दुरुस्तीचे साहित्य चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार आगार व्यवस्थापकांनी पोलिस स्टेशनला केली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १५ जानेवारी ते २३ जानेवारीच्या रात्री दरम्यान घडली असून २४ जानेवारीला दुपारी १.३३ वाजता पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविण्यात आली आहे.

मागील अडीज महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. त्यामुळे डेपोमध्येही सन्नाटा पसरलेला आहे. बहुतांश एसटी बसेस या आगारातच उभ्या आहेत. त्यामुळे चोरट्यांनी आपला मोर्चा आता एसटी डेपोकडे वळविला आहे. डेपो मधील बसचे लोखंडी पार्ट्स व बसच्या दुरुस्ती करिता उपयोगात येणारे लोखंडी साहित्य चोरी करण्याचा सपाटाच चोरट्यांनी लावला आहे. एसटी डेपोमध्ये चार सुरक्षा रक्षक तैनात असतांना देखील त्यांच्या डोळ्यात धूळ झोकून चोरटे आपला डाव साधत आहे. चार दिवसांत चोरट्यांनी १० हजार रुपये किमतीचे पार्ट्स व ईतर लोखंडी साहित्य लंपास केले आहे. गेअर बॉक्स उतरविण्याकरिता वापरण्यात येणारी घोडी दोन, लोखंडी पट्टी एक, हब ड्रम एक, टायर डिक्स व रिंग तथा लोखंडी वस्तू असा एकूण १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरटयांनी लंपास केल्याची तक्रार वणी आगाराचे व्यवस्थापक सुमेध सखाराम टिपले (३९) रा. वासेकर ले-आऊट यांनी पोलिस नोंदविली आहे. त्यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंवि च्या कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल केला आहे. 

पुढील तपास ठाणेदार श्याम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात पोलिस करित आहे.

कृषी पंपांचे वीज कट करणे त्वरीत बंद करा : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने दिला आंदोलना चा इशारा


सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 

मारेगाव : आधीच कर्जाच्या खाईत पोहोचलेल्या, ओल्या दुष्काळामुळे उत्पन्नाची साधी अर्धी सरासरीही न ओलांडलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील कृषीपंपांची विजतोडणी विज मंडळाकडून केली जात आहे. ही विजतोडणी त्वरीत थांबवण्यात यावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने तहसीलदार मारेगाव यांना दिलेल्या निवेदनातून दिलेला आहे.
    
सध्या परिसरातील अनेक शेतकऱ्यांकडे वीजेचे थकीत देयके आहेत. मागील अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांवर अस्मानी संकट येत आहेत. या संकटांचा सामना करतांना शेतकरी पुरता मेटाकुटीस आला आहेत. अशातच आता या शेतकऱ्यांच्या शेतातील वीज तोडणी वीज मंडळातर्फे सुरू आहेत. यावर्षी ओल्या दुष्काळामुळे सोयाबीनचे उत्पन्न घटले. कपाशीचे उत्पन्नही अर्ध्यावर आलेले आहेत. अशातच आता शेतकऱ्यांनी काही भर भरून काढण्यासाठी शेतामध्ये चणा, गहू आणि भाजीपाला यांची लागवड केली आहे. आता हंगाम बहरत असतांना वीज मंडळातर्फे शेतकऱ्यांची विजतोडणी सुरू झाल्याने शेतकऱ्यांसमोर एक नवेच संकट समोर उभे ठाकले आहे. जर विजमंडळातर्फे ऐन रब्बी हंगामात विजतोडणी केली तर शेतकऱ्यांचे रब्बी पिकांचेसुद्धा नुकसान होऊन शेतकरी पुन्हा कर्जाच्या खाईत लोटल्या जात आहेत. त्यामुळे ही विजतोडणी त्वरीत थांबवावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन छेडले जाईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून दिलेला आहे.

यावेळी तालुकाध्यक्ष भारत मत्ते, नगरसेवक हेमंत नरांजे, उपाध्यक्ष दयाल रोगे, शहराध्यक्ष शेख चांद, नागेश रायपुरे, जिजाताई वरारकर, नितीन वाढई, सुरेश महाकुलकर, गजानन रासेकर, अभिजित जुमडे, विवेक मस्की, दशरथ बोढाले, अतुल पचारे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

पैनगंगा नदीच्या पात्रातून रेतीची अवैध वाहतुक, काेरपना महसुल पथकाने केली जप्तीची कारवाई !

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर | चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध गाैण खनिजावर अंकुश व दंडात्मक कारवायां करण्यासाठी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे तथा अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी जिल्हाभर महसुल विभागाचे फिरते पथक निर्माण केले असुन, त्याच अनुषंगाने राजु-याचे उपविभागीय अधिकारी संपत खलाटे तथा तहसीलदार महेन्द्र वाकलेकर यांचे मार्गदर्शनाखाली काेरपना मंडळाचे मंडळ अधिकारी राजेन्द्र पचारे महसुल विभागाचे पटवारी प्रभाकर कुडमेथे, व काेतवाल नंदु कुडमेथे यांनी रविवार दि.२३ जानेवारीला मध्यरात्री वनाेजा येथील पैनगंगा नदीच्या पात्रातून अवैधरित्या एका ट्रॅक्टरव्दारे रेतीची वाहतुक करतांना रंगेहात पकडल्याचे वृत्त आहे.

गुप्त माहितीच्या आधारे व स्वताच्या जिवाची पर्वा न करता या महसुल पथकाने ही धडक कारवाई केली रात्रीचा फायदा घेत काही रेती तस्करांनी अवैध रेती नेण्याचा सपाटा काेरपना भागात लावला हाेता. या पथकाने सदरहु ट्रॅक्टरचा रितसर जप्तीनामा करीत त्याच रात्री ते ट्रॅक्टर दंडात्मक कारवाईसाठी काेरपना तहसील कार्यालयात जमा केले असल्याचे मंडळ अधिकारी राजेन्द्र पचारे यांनी आज प्रतिनिधीशी बाेलतांना सांगितले. जप्तीतील क्टर मालकाचे नाव भारत रामचंद्र रागीट असून अवैध रेतीची वाहतुक वाहन चालक संदीप कुडमेथे हा करीत हाेता. या पूर्वी सुध्दा मंडळ अधिकारी राजेन्द्र पचारे यांनी अवैध गाैण खनिजाच्या बाबतीत धडक कारवाया केल्या आहे.

मध्यरात्री केलेल्या कारवाईमुळे रेती तस्करांत एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे.

 

गोवंश जनावरांची तस्करी व गोमांस विक्री करणाऱ्यांवर पोलिसांचे धाडसत्र, शिरपूर व वणी पोलिसांची धडाकेबाज कार्यवाही

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : कत्तली करिता गोवंश जनावरांची तस्करी करणाऱ्या ९ तस्करांना शिरपूर पोलिसांनी सापळा रचून अतिशय शिताफीने अटक केली. शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीतून लगतच्या प्रांतात गोवंश जनावरांची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जात असल्याची गोपनीय माहिती शिरपूरचे ठाणेदार गजानन करेवाड यांना मिळाली. त्यांनी पोलिस पथकं तयार करून शिरपूर बसस्थानक, चेंडकापुर फाटा व कायर मार्गावर सापळा रचून ९ पिकअप वाहनांमध्ये निर्दयीपणे कोंबून येत असलेल्या २५ गोवंश जनावरांची तस्करांच्या तावडीतून सुटका करित तस्करांची टोळीच जेरबंद केली. या धाडीत पोलिसांनी २५ गोवंश जनावरांसह ४२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या धडक कार्यवाहीमुळे गोवंश जनावरांची तस्करी करणाऱ्यांचे आता चांगलेच धाबे दणाणले आहेत. काल २३ जानेवारीला वणी पोलिसांनीही मोनिनपुरा व रजानगर येथे धडक कार्यवाही करून ३७० किलो गोवंश जनावरांचे मांस जप्त केले. ठाणेदार श्याम सोनटक्के यांना मिळालेल्या गुप्त माहिती वरून ठाणेदारांसह पोलिस पथकाने रजानगर व मोमीनपुरा येथे धाडी टाकून गोवंश जनावरांची कत्तल करून त्यांचे मांस विकणाऱ्या सात जणांना रंगेहाथ अटक केली. त्यांच्या जवळून ५१ हजार ८०० रुपये किमतीचे ३७० किलो गोमांस पोलिसांनी जप्त केले. गोवंश जनावरांची कत्तल करून गोमांस विकणाऱ्या व गोवंश जनावरांची कत्तली करिता तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून वणी व शिरपूर पोलिसांनी दोन दिवसांत दोन धडक कारवाया केल्या आहेत. वणी पोलिसांनी गोवंश जनावरांचे मांस विकणाऱ्या सात तर शिरपूर पोलिसांनी गोवंश जनावरांची तस्करी करणाऱ्या नऊ आरोपींना जेरबंद केले आहेत. 

शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीतून लगतच्या प्रांतात कत्तली करिता मोठ्या प्रमाणात गोवंश जनावरांची तस्करी केली जात असल्याची गुप्त माहिती ठाणेदार गजानन करेवाड यांना मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी २३ जानेवारीला रात्री पोलिस पथकं तयार करून शिरपूर बसस्थानक, चेंडकापुर फाटा व कायर मार्गावर सापळा रचला. रात्री दरम्यान शिरपूर बसस्थानक येथे २ पिकअप वाहने, चेंडकापुर येथे सात पिकअप वाहने व कायर मार्गावर एक पिकअप वाहन अडविण्यात आले. या आठही मालवाहू वाहनांची झडती घेतली असता त्यामध्ये गोवंश जनावरे आढळून आली. आठ पिकअप वाहनांमध्ये तब्बल २५ गोवंश जनावरे निर्दयीपणे कोंबून असल्याचे आढळून आले. पोलिसांनी ८ पिकअप वाहने व २५ गोवंश जनावरे असा एकूण ४२ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून अनिल देविदास आत्राम (२७) रा. कायर, सचिन महादेव थेरे (३८) रा. कुंड्रा, अमित गजानन पोटे (२१) रा. सुरला, अफनल बेग अफसर बेग (३६) रा. कायर, भोलाराम सुरेश पडोळे (२५) रा. डोर्ली, विश्वजित विलास ताजने (२५) रा. बाबापुर, भरत पिदूरकर (२८) रा. सुरला ता. वरोरा, नितीन राजेंद्र नरोटे (२७) ऐरव्हा ता. जिवती, बालाजी थोरात (२७) रा. डोंगरगाव ता. झरी या नऊ आरोपींना पोलिसांनी अटक केली. आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 

वणी शहरातील मोमीनपुरा व रजानगर परिसरात मोठ्या प्रमाणात गोमांस विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती ठाणेदार श्याम सोनटक्के यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे ठाणेदार श्याम सोनटक्के यांनी पोउपनि शिवाजी टिपूर्णे व प्रवीण हिरे यांच्यासह पोलिस पथकाला घेऊन मोनिनपुरा व रजानगर येथे धाड टाकली असता काही ईसम गोमांस विक्री करतांना आढळून आले. पोलिसांनी दोन्ही ठिकाणी टाकलेल्या संयुक्तिक धाडीत ३७० किलो गोमांस किंमत ५१ हजार ८०० रुपये एवढा मुद्देमाल जप्त करून मो. नासिर अब्दुल रशीद (५१), मो. अनिस अब्दुल रशीद (४८), मो. कैसर अब्दुल अजीज कुरेशी, मो. पाशा अब्दुल अजीज कुरेशी (३८), मो. ऐजाज अब्दुल अजीज कुरेशी (४९), अब्दुल वासे अब्दुल वाहिद (२३) सर्व रा. मोमीनपुरा, मो. ईस्तेयाक अब्दुल वहाब कुरेशी रा. रजानगर या सात आरोपींना अटक केली. त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

सदर दोन्ही कार्यवाही जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलिप पाटिल भुजबळ, अप्पर पोलिस अधिक्षक खंडेराव धरणे, एसडीपीओ संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात वणीचे ठाणेदार श्याम सोनटक्के यांनी व शिरपूरचे ठाणेदार गजानन करेवाड यांनी आपापल्या पोलिस पथकासह केली.