Page

सूरमाज फाउंडेशन ने मुस्लिम समाजाच्या वतीने IAS अधिकारी गौरव साळुंखे यांचा सत्कार


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

चोपडा : गौरव रवींद्र साळुंखे, चोपड़ा शहरातील 24 वर्षीय तरुण आहे ज्याने IAS परीक्षेत देशभरात 128 क्रमांक मिळवले. गौरवचे आईवडील खूप साधे लोक आहेत. त्याच्या मेहनतीचे आणि समर्पणाचे आज फळ मिळाले आहे. ज्यामुळे चोपड़ा शहरातील सर्व जाती आणि धर्माच्या लोकांसाठी अभिमानाची बाब आहे. म्हणूनच चोपड़ा शहराचा सूरमाज फाउंडेशन. सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने. गौरव रवींद्र साळुंखे साहेबांना अभिवंदन दिला. आणि त्यांचे भविष्य आशिष प्रकारे कार्य खरंच राहो अशी शुभेच्छा दिल्या. त्याने आपल्या शहराचे वैभव आणावे. आणि प्रार्थना केली की चोपडा शहरातील प्रत्येक तरुण मेहनत करून सिविल सर्विसेस मध्ये भरती होऊ आणि आपल्या देशाचे आणि गावाचे नाव रोशन करा. गौरव याचा सत्कार करताना हाजी उस्मान शेख यांच्यासह स्जियाउद्दीन काझी, अबुलस शेख, शोएब साहब, डॉ. एम डी रागीब, डॉ. मोहम्मद जुबैर शेख आणि सुरमज फाउंडेशनचे सर्व साथीदार उपस्थित होते.

सुरमाज फाउंडेशनने असिम खानला त्याच्या यशाबद्दल केले अभिनंदन

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

नंदुरबार : हे सांगताना आम्हाला खूप आनंद होतो की मुस्लिम समाजातील मूल. ज्याने आपले शिक्षण उर्दू भाषेत पूर्ण केले. आणि सामान्य कुटुंबाचा असून ज्याचे वडील सेवानिवृत्त शिक्षक आहेत आणि आई एक साधी घरकामगार आहे. ते मूल दुसरे कोणी नाही. महाराष्ट्र राज्यात धुळे जिल्हा राहणारा असीम किफायत खान आहे हा ज्यांनी 2020 ची UPSC परीक्षा संपूर्ण भारतात 558 रँक मिळवले आणि त्याने ते सिद्ध केले जर आपण मनापासून आणि उत्कटतेने काहीतरी करण्याच्या प्रयत्न केला तर तो आपल्याला मिळते असीम खान त्याच्या समाजासाठी एक उदाहरण बनला आहे. आणि जगातील प्रत्येक मुलाने त्यांना बघून हे समजून घेतले पाहिजे की कोणतीही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी भाषा अडथळा बनत नाही. जर तुम्ही प्रामाणिक आणि मेहनती असाल जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला नक्कीच त्या गोष्टीत यश मिळेल.
त्यांचे यश पाहून. चोपडा शहराचे सुरमाज फाउंडेशन त्यांना भेटण्यासाठी. आणि या मेहनतीबद्दल त्याचे अभिनंदन करण्यासाठी. त्याच्या घरी पोहोचले. हाजी उस्मान शेख साहब जो सुरमाज फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत. त्यांनी असीम साहेबांचे अभिनंदन केले पाणी त्यांना सांगितले की आता तुम्ही मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी आहात. आणि तुम्ही समाजासाठी एक उदाहरण बनलात. आणि आता या यशाचा लाभ तुमच्या समाजातील आणि भारत देशाला द्या. सुरमाज फाउंडेशनच्या सर्व मित्रांनी प्रार्थना केली की अल्लाह असीम साहेबांना उत्तम आरोग्य आणि उत्तम प्रगती देवो. नंतरचे अभिनंदन.

हाजी उस्मान साहाब यांच्यासोबत झियाउद्दीन काझी साहाब, डॉ. रागीब साहब, अबुलस शेख, डॉ मोहम्मद जुबेर शेख, जुबेर बेग शोएब शेख आणि सहकारी सुरमाज फाउंडेशन उपस्थित होते.

सेवानिवृत्त शिक्षिका श्रीमती बडगे यांचा सत्कार निरोप समारंभ

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

वणी : अनेक वर्षे नौकरी केल्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्यात न टाळता येणारा दिवस म्हणजे सेवानिवृती. शासनाच्या विविध कालमर्यादा नुसार श्रीमती ज्योती बडगे (शिरभये) मॅडम सेवानिवृत्त झाल्या आहे.

मॅडमनी 1988 मध्ये पवित्र शिक्षण सेवा कार्याला शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वणी जिल्हा यवतमाळ येथून सुरुवात केली आणि आज त्यांच्या शासकीय अध्यापन सेवा कार्याला पूर्णविराम मिळाला आहे. एकूण 33 वर्ष वर्षाची दीर्घ सेवा करून आदरणीय बडगे (शिरभये) मॅडम आज दिनांक 30 नोव्हेंबर 2021 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा श्री क्षिरसागर सर व उपमुख्याध्यापक मा. श्री तामगाडगे सर यांचा हस्ते शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

शांत सुस्वभावी असा त्यांचा मनमिळावू स्वभाव असलेल्या संस्कृत या विषयांचे त्या अध्यापन करीत होत्या. या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

पत्रकार दिनाच्या औचित्याने न्यूज पोर्टल व यूट्यूब चैनल डिजिटल मीडिया असोसिएशन चंद्रपुर जिल्हा (DMA) च्या वतीने स्पर्धेचे आयोजन !


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

चंद्रपुर : दरवर्षी सहा जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात "पत्रकार दिन" साजरा केल्या जातो. यावर्षी 6 जानेवारी 2022 पत्रकार दिनाचे औचित्याने रविवार दिनांक 9 जानेवारी रोजी डिजिटल मीडिया असोसिएशनच्या (DMA) माध्यमातून न्यूज पोर्टल व यूट्यूब चैनल साठी एका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेमध्ये विजेते होणाऱ्यांना प्रथम व द्वितीय व प्रोत्साहन स्तराचे पुरस्कार देण्यात येत आहे. ही स्पर्धा संपूर्ण चंद्रपुर जिल्ह्यात मध्ये न्यूज पोर्टल व यूट्यूब चैनल यांच्यासाठी आयोजित करण्यात आली असून रविवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी एमडीए, चंद्रपुर जिल्हा (DMA) कार्यालयात घेण्यात आलेल्या सभेमध्ये हा निर्णय घेण्यात आला. आपापल्या न्यूज पोर्टल व यूट्यूब वर या स्पर्धेसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील संपूर्ण न्यूज पोर्टल व यूट्यूब चैनल यांना या स्पर्धेमध्ये सहभागी होता येणार आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्यांना 
(१) चंद्रपूर जिल्ह्यामधील मूळ समस्यांवर आपले वृत्त
(२) यशोगाथा व व्यक्तिविशेष  
(३) वन्यप्राण्यांच्या हमला समस्या व समाधान 

या तीन विषयांवर प्रकाशित वृत्त स्पर्धेसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. सोमवार दिनांक 22 नोव्हेंबर 2021 पासून ते 31 डिसेंबर 2021 पर्यंत या दिवसांमध्ये प्रकाशित होणाऱ्या वृत्तांनाच प्राधान्य दिले जाईल. तीन वेगवेगळ्या विषयांवर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून वरील विषयावर वृत्त प्रकाशित करणाऱ्यांना प्रथम पारितोषिक रोख 
₹ रोख रुपये प्रथम, 
₹ रोख रुपये द्वितीय 
शाल, श्रीफळ व सन्मानपत्र व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची निवड करण्यासाठी एक परीक्षक मंडळ नेमण्यात येणार असून परीक्षक मंडळाचे निर्णय हा अंतिम राहणार आहे. डिजिटल मीडियाशी संबंधित प्रत्येकानी या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. 
या परिस्थितीत सोशल मीडिया हा फार जास्त प्रमाणात वापरला जात आहे. सोशल मीडिया ला मान्यता मिळावी यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्नही करण्यात येत आहे. स्पर्धेच्या युगात आपण सर्वश्रेष्ठ व उत्कृष्ट राहावे यासाठी या स्पर्धेचे आयोजन डिजिटल मिडिया असोसिएशन चंद्रपुर जिल्ह्यच्या माध्यमातून करण्यात आले आहे. डिजिटल मीडियाशी संबंधित जास्तीत जास्त न्यूज पोर्टल धारक व यूट्यूब चैनल वाल्यांनी यात सहभागी व्हावे असे आव्हान या माध्यमातून आयोजकांनी केले आहे.

गडचिराेलीत दाेन दिवशीय राष्ट्रीय परिसंवाद संपन्न

सह्याद्री | किरण घाटे 

चंद्रपूर : गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे आदिवासी समाज संस्कृती साहित्य इतिहास ह्या विषयावर दोन दिवस राष्ट्रीय परिसंवाद जनाधिकार मंच, आदिवासी एकता युवा परिषद, नारायण सिंह ऊईके विकास समिती ब्रम्हपूरी यांचे संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या पुढाकाराने आयोजित केला होता.गडचिरोली जिल्ह्याचे शिल्पकार कै. बाबुरावजी मडावी यांच्या दृष्टीकोनातून या जिल्ह्याचा विकास कसा होता व पुढे या परिसराची विकासाच्या दृष्टीने वाटचाल कशी असावी यावर चिंतन करण्यात आले. गडचिरोली हे देशाचे विकास माँडेल बनावे,

आर्थिक, सामाजिक प्रश्नांना घेऊन आपली विकासात्मक वाटचाल करावी. शिक्षणाची गंगोत्री व्हावी,व देशभरातून अभ्यासक, संशोधक येथे येवून अभ्यास करावे. हे त्यांचे स्वप्न होते. गोंडवाना विद्यापीठाच्या पुढाकाराने त्यांच्या स्वप्नातील आदिवासी विकासाची पूर्तता होईल असे वक्तव्य कुलगुरू डॉ.श्रीनिवास वरखेडी यांनी व्यक्त केले. सदरहु राष्ट्रीय परिसंवादासाठी विद्यापीठाच्या इतिहास विभागाने अथक परिश्रम घेतले.

डॉ .रश्मी बंड, डॉ. नरेश मडावी, डॉ .संतोष सुरडकर यांचा मोलाचा वाटा आहे. कुसुम ताई अलाम यांच्या रान आसवांचे तळे, रान पाखरांची माय, रान जखमांचे गोंदण या तीनही कविता संग्रहावर प्रमोद बोरसरे यांनी विवेचन केले.

चिचोली गावातील आदिवासी व दलितांना बेदम मारहाण करणाऱ्या "त्या" वनअधिकाऱ्यांवर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करा- राजु झोडेंची मागणी

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या चिचोली येथील दलित व आदिवासी निर्दोष नागरिकांना अमानुषपणे मारहाण करणांऱ्या वन अधिकारी व वन कर्मचारी यांची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांचेवर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे यांनी आज जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
      
 चिचोली येथील केवळ शिकारीच्या संशयावरून वन विभागाचे अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी निर्दाेष नागरिकांना बेदम व अमानुषपणे मारहाण केली. अमानवीयतेचा कळस गाठून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पीडितांना विजेचे चटके गुप्तांगाला दिले. फुले-शाहू-आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी ही घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडली. तरीही अजून पर्यंत प्रशासनाने व पोलीस प्रशासनाने कोणत्याही प्रकारची मोठी कारवाई केलेली नाही असे दिसून येत आहे. ज्यांच्यावर कारवाई झाली त्यांना जामीन मिळाला आहे. आठ ते नऊ वन कर्मचाऱ्यांनी अतिशय क्रूरतेची परिसीमा गाठली असून त्यांच्यावर दलित व आदिवासींना जाणीवपूर्वक मारहाण केल्याप्रकरणी ऍट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत तात्काळ गुन्हे दाखल करावे व कठोर कारवाई करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे .
    
जर उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली नाही तर या विरोधात जिल्हाभरात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा राजु झोडे, हनुमान आसुटकर, सागर कातकर, पियुस चांदेकर, प्रविण साव, सागर दहागांवकर, ऋषभ साव आदि गावकऱ्यानी एका लेखी निवेदनातुन दिला आहे.

दालमिया कंपनी समाेरील प्रकृती चिंताग्रस्त असलेल्या सातही उपाेषणकर्त्यांना पाेलिस बंदाेबस्तात चंद्रपूर शासकीय रुग्णालयात हलविले !

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
 
चंद्रपूर : जिल्ह्याच्या काेरपना तालुक्यातील नारंडा येथील दालमिया कंपनी समाेर काही कामगारांनी आपल्या रास्त मागण्यांसाठी दि.२३ नाेव्हेंबर पासून बेमुदत अन्नत्याग आंदाेलन पुकारले हाेते. दरम्यान, आज सोमवार दि.२९ नाेव्हेंबरला सकाळी त्या सात ही उपाेषणकर्त्यांची डॉक्टर मंडळीकडुन वैद्यकीय तपासणी करुन त्यांना पाेलिस बंदाेबस्तात चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

या वेळी महसुल विभागासह पाेलिस विभागाचे वरिष्ठ पाेलिस अधिकारी हजर हाेते. दाेन दिवसांपूर्वी उपाेषणकर्त्यां पैकी अशाेक निळकंठ कुचनकर, निळकंठ बाळकृष्ण लांडगे व हरीदास दशरथ धानाेरकर या तिघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक हाेती त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी एक वैद्यकीय पथक उपाेषण मंडपात आले हाेते परंतु उपाेषण कर्त्या कामगारांनी त्यांना आपली वैद्यकीय तपासणी न करता ते पथक परतुन लावले हाेते. विशेष म्हणजे पाेलिस विभागातर्फे बेमुदत उपाेषण आरंभ झालेल्या दिवसांपासून या ठिकाणी कडेकाेट पाेलिस बंदोबस्त ठेवण्यांत आला हाेता तर महसूल प्रशासनाच्या वतीने कायदा, शांतता व सुवस्था ठेवण्याच्या दृष्टीकाेणातुन काेरपनाचे तहसीलदार महेन्द्र वाकलकर यांनी नायब तहसीलदार प्रविण चिडे, मंडळ अधिकारी राजेन्द्र पचारे, पटवारी विशाल काेसनकर, काेतवाल रुपेश पानपटे यांची या उपाेषण स्थळी नेमणूक केली हाेती. सदरहु उपाेषण मंडपात एकूण सात कामगार बेमुदत उपाेषणास बसले हाेते.
 
उद्या मंगळवार दि.३० नाेव्हेंबरला कामगार मागण्यांचे संदर्भात एक बैठक काेरपना तहसील कार्यालयात बाेलविण्यांत आली असुन तश्या आशयाचे पत्र दालमिया कंपनी व्यवस्थापक, मनसे नेते सचिन भाेयर व पाेलिस निरीक्षक काेरपना यांना पाठविण्यांत आले आहे. ही बैठक उपविभागीय अधिकारी राजूरा यांचे अध्यक्षतेखाली दुपारी १२ वाजता हाेत असल्याचे समजते.

चंद्रपूर मनपाचा भाेंगळ कारभार जनता त्रस्त, नगरसेवक करताेयं दुर्लक्ष

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : नगर परिषदेचे रुपातंर महानगर पालिकेत झाल्या नंतर चंद्रपूरकरांना सर्व सुविधा उपलब्ध हाेवून लाेकांचे प्रश्न व समस्या जलद गतीने दूर हाेतील अशी अपेक्षा हाेती. पण आज ही येथील जनतेला अनेक समस्यांना ताेंड द्यावे लागत असल्याचे चित्र सध्या चंद्रपूर शहरात दृष्टीक्षेपात पडु लागले आहे.

दरम्यान, याच समस्या अडचणी व प्रश्ना बाबत राजकीय पक्षाचे नेते व कार्यकर्ते प्रत्यक्षात आपला आवाज बुलंद करु लागल्याचे एकंदरीत दिसत आहे. रविवार दि.२८ ला स्थानिक विक्तु बाबा मंदिर जवळील माहेर घर परिसर येथे महानगर पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे चुकीच्या पद्धतीने नालीचे अर्धवट काम केल्याने वाहत आलेले संडास व बाथरूम चे सांड पाणी हे तेथील नागरिकांच्या घरात शिरत असून संपूर्ण परिसरात ही घाण पसरून आजूबाजूच्या लोकांना रोगराईला समोर जावे लागत आहे .या आशयाची तक्रार तेथील नागरिकांनी आपचे शहर सचिव राजु कुडे यांच्या कडे केली.
परिसरातील लोकांनी आपचे कुडे यांना तक्रार करतांना सांगितले की, या भागातील ४ लोकांना मागील काही दिवसांत डेंग्यू झाला. त्या मुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले होते.
वारंवार नगर सेवक यांना तक्रार करून सुध्दा ते या कडे दुर्लक्ष करीत असल्याचे तेथील नागरिकांनी या वेळी सांगितले.

जाणीव पूर्वक नालीचे अर्धवट काम करून जनतेचा जीवाला धोका निर्माण केला आहे. ही बाब अतिशय गंभीर असून संबधित दोषी अधिकारी व ठेकेदारावर फौजदारी कारवाई करण्यात यावी या शिवाय अर्धवट नालीचे बांधकाम पूर्ण करावे अशी मागणी जनतेनी केली आहे. या बाबतीत जनतेला न्याय मिळाला नाही तर,आम आदमी पार्टी बाबुपेठ परिसरातील जनतेला सोबत घेऊन आंदोलन करेल असा इशारा आपचे शहर सचिव राजु भाऊ कूडे यांनी आज दिला आहे 

या वेळेस आपचे शहर सचिव बाबाराव खडसे, दीपक निपाणे, सागर बोबडे, सुखदेव दारुंडे, श्रीराम खंडाळे, सुजाता बोदेले, प्रवीण चूनारकर, जयदेव देवगडे, सुमित रायपुरे, चंदू माडूरवार, विशाल रामगिरवार, करण नक्षिने, जयंत थूल, महेश गुप्ता, अंजू रामटेके, स्मिता लांडे, छाया इदे, विभा कुळमेथे, इंदिरा आलाम, महेश आलाम आदीं कार्यकर्ते उपस्थित होते.

शहरातील वार्ड क्रमांक दोन मधील गौरकार ले-आऊट येथे उभारण्यात येणाऱ्या मोबाईल टॉवरला नागरिकांचा विरोध

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : शहरातील वार्ड क्रमांक 2 मधील गौरकार ले-आऊट येथे एयरटेल मोबाईल नेटवर्क कंपनीचे टॉवर उभारणीचे काम सुरु असून, याठिकाणी टॉवर उभारण्याला स्थानिक रहिवासीयांनी विरोध दर्शविला आहे. अगदी नागरिकांच्या निवासस्थाना जवळच हे टॉवर उभारले जात असल्याने या टॉवरचे काम थांबवुन टॉवर उभारणीला दिलेले ना हरकत प्रमाणपत्र नगर पालिकेने रद्द करण्याची मागणी गौरकार ले-आऊट मधिल नागरिकांनी न.प. मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे.

या टॉवरला विरोध दर्शविण्याकरिता येथील नागरिक आमदार संजीवरेड्ड़ी बोद्कूरवार यांच्या निवासस्थानी धडकले. तसेच उपविभागीय अधिकारी यांनाही निवेदन देऊन नागरिकांच्या निवासस्थानाजवळ एयरटेल मोबाईल नेटवर्क कंपनीचे टॉवर उभारू न देण्याची मागणी करण्यात आली आहे. टॉवर उभारण्याला दिलेली एनओसी रद्द न केल्यास टॉवर समोरच उपोषणाला बसण्याचा इशारा येथील रहिवासीयांनी दिला आहे. 

गौरकर ले-आऊट येथे स्वमालकीच्या जागेवर एयरटेल मोबाईल कंपनीचे टॉवर उभारण्यास परवानगी देतांना येथील रहिवासीयांशी कुठल्याही प्रकारची चर्चा करण्यात आली नाही. जागा मालकाला विचारले असता त्याने नगर परिषदेकडे बोट दाखविले. न.प. नेच एनओसी दिल्याचे सांगितले. स्थानिकांची सहमती न घेता जागा मालकाने एयरटेल कंपनीशी करार करुन टॉवर उभारण्याला परवानगी देऊन नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत आज निवेदन देतांना माजी नगराध्यक्षा प्रियाताई लभाने यांनी विद्यमान नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्याशी संपर्क साधला असता त्यानी मागील तिन वर्षात कोणत्याच कंपनीच्या टॉवर उभारणीला नगर पालिकेकडून एनओसी देण्यात आली नसल्याचे सांगितले. मग हे टॉवर काय जागा मालकाच्या आपसी संबंधातून उभारले जात आहे, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. याठिकाणी सेवानिवृत्त नागरिकांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. अगदी निवासस्थाना जवळच हा टॉवर उभारला जात आहे. या टॉवर मधून निघणाऱ्या किरणांचा मानवी जीवनावर दुष्परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोबाईल टॉवर मधून निघणाऱ्या किरणांच्या घातक परिणामांतून कर्करोग व अन्य अपायकारक आजार उद्भवत असल्याचे सिद्ध झाले असतांना देखील लोकांची निवासस्थाने असलेल्या ठिकाणी मोबाईल टॉवर उभारण्याला परवानगी देण्यात आली, याचेच नवल वाटते. केवळ कंपनीच्या करारातून मिळ्णाऱ्या रक्कमेपोटी नागरिकांचं आरोग्य धोक्यात आणलं जात आहे. याला लालसा म्हणावी की, अन्य काय हेच कळायला मार्ग नाही. मोबाईल टॉवर मधून येणाऱ्या लहरी आरोग्यास घातक असतात. मोबाईल टॉवरद्वारे होणाऱ्या रेडीएशनच्या दुष्परिणामांमुळे चिमण्या, कावळे व मधमाशांची संख्या कमी होऊ लागली आहे. या लहरींचा मानवी आरोग्यावरही विपरीत परिणाम होत असल्याचे समोर आले असतांनाही नागरिकांच्या अगदी निवासस्थाना जवळ मोबाईल टॉवर उभारण्याला परवानगी देण्यात आली आहे. हे टॉवर उभारण्याचे काम बंद न केल्यास या टॉवर समोरच उपोषणाला बसण्याचा इशारा येथील नागरिकांनी नगर पालिकेचे मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनतुन दिला आहे.

नगर पालिकेने स्थानिकांची सहमती न घेता एनओसी दिली कशी, व जर नगर पालिकेने एनओसी दिली नाही तर टॉवर उभारलेच कसे, याची चौकशी होणे आता गरजेचे झाले आहे.

दालमिया कंपनी समाेर कामगारांचे आमरण उपाेषण - तिघांची प्रकृती चिंताजनक?

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : जिल्ह्याच्या काेरपना तालुक्यातील नारंडा येथील दालमिया कंपनी समाेर काही कामगारांनी आपल्या रास्त मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन दि.२३ नाेव्हेंबर पासून पुकारले असून अजून पावेताे त्यांचे मागण्या बाबत ताेडगा निघाला नाही. दरम्यान, उपाेषण कर्त्यांची नित्य वैद्यकिय पथकाकडुन तपासणी केल्या जाते परंतु शनिवार दि. २८ नाेव्हेंबर २०२१ रोजी रुग्णालयाचे एक पथक उपाेषण (मंडप) स्थळी आले असतांना उपाेषणकर्त्यांनी त्या पथकाला आपली तपासणी न करता परत पाठविल्याचे विश्वासनिय सुत्राने आमच्या प्रतिनिधीस आज संध्याकाळी सांगितले. जाे पर्यंत आम्हाला याेग्य न्याय मिळत नाही व आमच्या रास्त मागण्या पूर्ण हाेत नाही ताे पर्यंत आम्ही या मंडपातुन हटणार नाही असा निर्धार उपाेषणकर्त्यांनी केला आहे.

शासन व प्रशासनाने या आंदाेलनाची त्वरीत दखल घेणे फारच आवश्यक झाले आहे असे आता सर्व स्तरावरुन बाेलल्या जात आहे. उपाेषणकर्त्यां पैकी अशाेक निळकंठ कुचनकर, निळकंठ बाळकृष्ण लांडगे व हरीदास दशरथ धानाेरकर या तिघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे कळते.
सदरहु उपाेषण मंडप स्थळी पाेलिस विभागातर्फे तगडा पाेलिस बंदोबस्त ठेवण्यांत आला असून महसूल प्रशासनाच्या वतीने कायदा, शांतता व सुवस्था ठेवण्याच्या दृष्टीकाेणातुन काेरपनाचे तहसीलदार महेन्द्र वाकलकर यांनी नायब तहसीलदार प्रविण चिडे, मंडळ अधिकारी राजेन्द्र पचारे, पटवारी विशाल काेसनकर, काेतवाल रुपेश पानपटे यांची या उपाेषण स्थळी ड्यूटी लावली असल्याचे समजते.
 

हजरत टिपू सुलतान फाउंडेशन वतीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन तथा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार- प्रा.नितेश कराळेंची कार्यक्रमाला उपस्थिती


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : शेर ए हिंद हजरत टिपू सुलतान यांच्या २७१ व्या जयंती निमित्त,दि.२७ नोव्हेंबरला कन्नमवार सभागृह राजुरा येथे,हजरत टिपू सुलतान फौंडेशन शाखा राजुराच्या वतीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व गुणवंत विद्यार्थी तथा विविध सामाजिक संस्थांचा सत्कार कार्यक्रम थाटात पार पडला. या कार्यक्रमाला उपविभागीय वन अधिकारी राजुराचे अमाेल गर्कल ,संस्थापक अध्यक्ष हजरत टिपू सुलतान फौंडेशन चंद्रपूरचे अमजद पापाभाई शेख, नगर परिषद घुग्घुसच्या मुख्याधिकारी आर्शिया जुही उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून खद खद फेम लाव्हारस मास्तर, फिनिक्स अकॅडमी वर्धाचे संस्थापक प्रा. नितेश कराळे आणि वैचारिक व्यक्तिमत्व,इतिहास अभ्यासक,लेखक असा होता टिपू सुलतान सरफराज अहमद,सोलापूर हे होते.वक्त्यांनी अतिशय प्रभावी मार्गदर्शन करून उपस्थितीतांची मने जिंकली.
सदरहु कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी,व्यक्ती व सामाजिक संस्थां इत्यादी 50 व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. या व्यतिरिक्त वरुर रोड येथील युवा सामाजिक कार्यकर्ता विशाल शेंडे यांचा देखिल या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. सदरहु कार्यक्रमाला प्रा.डॉ.संभाजी वरकड,विजय परचाके (गटशिक्षणाधिकारी) मुजावर अली (सायबर सेल,म.पो.चंद्रपूर), डॉ. येरमे दाम्पत्य, अस्लम चाऊस,इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होती.उपराेक्त कार्यक्रमाचे संचालन मुसा चांदसाहाब शेख (सदस्य HTSF राजुरा) यांनी केले.तर आभार प्रदर्शन शहबाज खान यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अध्यक्ष अस्लाम चाउस, शोएब शेख, रियाज शेख, नदीम शेख, मुसा शेख, जलाल बियाबानी, जफर खान, स्वप्नील रामटेके व हजरत टिपू सुलतान शाखा राजुराच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

संशयावरुन अमानुष मारहाण, वनविभाग कर्मचा-यांच्या विरुध्द पाेलिस स्टेशनला गुन्हा दाखल !


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : ताडाेबा बफर झाेनला लागून असलेल्या चिचाेली गावातील काही व्यक्तींना वनविभागाच्या कर्मचारी वर्गांनी संशयापाेटी बेदम मारहाण केल्याची घटना दि.२४नाेव्हेंबरला घडली .या घटनेसंदर्भात दुर्गापूर पाेलिस स्टेशनला मारहाण झालेल्या व्यक्तींनी तक्रार दाखल केली .संबंधित तक्रारीच्या अनुषंगाने पाेलिसांनी वनविभागाच्या दाेन कर्मचा-यांवर गुन्हा दाखल केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या मारहाण प्रकरणात वनविभागाच्या अन्य काही कर्मचा-यांची देखिल चाैकशी हाेणार असून सदरहु प्रकणात निर्दाेष व अन्याय झालेल्या व्यक्तींना याेग्य न्याय मिळावा व जे काेणी अधिकारी व वन कर्मचारी या घटनेत जबाबदार असतील त्यांना निलंबितच नाही तर सेवेतून बडतर्फे करावे अशी मागणी राजू झाेडे व अॅड.फरहत बेग यांनी दाेन दिवसापूर्वी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे व पाेलिस अधिक्षक अरविंद साळवे यांचे कडे एका लेखी निवेदनातुन केली हाेती. या शिवाय अन्याय ग्रस्त व्यक्तींनी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे कडे सुध्दा या बाबतीत तक्रार नाेंदविली हाेती. हे प्रकरण वनविभागाच्या कर्मचा-यांना चांगले भाेवणार असून, या प्रकरणात आपल्या पाठीमागे चाैकशीचा ससेमिरा लागू नये या साठी काही कर्मचा-यांनी धावपळ सुरु केली असल्याचे विश्वासनिय वृत्त आहे.

सदरहु मारहाण प्रकरणात आठ ते नऊ वन कर्मचा-यांचा समावेश असल्याचे बाेलल्या जाते. शिकारीच्या संशयापाेटी वन कर्मचा-यांनी चिचाेली गावातील काही व्यक्तींना अमानुषपणे मारहाण केली हाेती.  

ग्रामीण भागात वाघाची दहशत अजूनही कायम


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपुर : विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात असलेल्या ताडाेबा जंगलात वाघांची संख्या काही कमी नाही. पूर्वी हे वाघ जंगलातच वास्तव्य करायचे पण आता हे वाघ चक्क! ग्रामीण भागातील गावाशेजारी दिवसढवळ्या येवू लागल्यामुळे ग्रामीण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आज पावेताे या वाघांनी अनेकांना आपले शिकार बनविले आहे तर काही भागात याच वाघांनी कास्तकारांची जनावरे फस्त केली आहे. काही ठिकाणी शेतकरी शेतीवर जाण्यांस ही घाबरु लागले आहे. अश्यातच वेकाेली निलजई काेळसा खाण परिसरात एका वाघाने नुकतेच आपले दर्शन दिले.

दरम्यान, हा वाघ बघताच अनेकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावा शेजारी येणा-या नरभक्षक वाघांचा वनविभागाने तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी ही ग्रामीण भागातुन आता जाेर धरु लागली आहे.

सूरमाज फाउंडेशनने शाळेतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

नंदुरबार : शिक्षण हा प्रत्येक मुलाचा हक्क आहे. आणि आमचे शासन सुद्धा. सर्व मुलांना शिकण्याची संधी देते. पण ग्रामीण भागात. लोकांचे लक्ष शिक्षणाकडे कमी असतो. आणि कधी कधी अभ्यास करण्यासाठी. आवश्यक गोष्टी उपलब्ध नसतात.

म्हणूनच सूरमाज फाऊंडेशनने मिताफल्ली अक्कलकुवाची शाळेत. पहिली ते चतुर्थ श्रेणीचे 46 विद्यार्थ्यांना. सिलेट, नोटबुक, पेन आणि आवश्यक गोष्टी बक्षीस म्हणून दिले. जेणेकरून त्यांचा अभ्यासाकडे उत्साह वाढला आणि वर्गातील प्रत्येक विद्यार्थी दररोज शाळेत येईल.
हे कार्य डॉ. मोहम्मद जुबैर शेख यांच्या हस्ते पूर्ण झाले. आणि कार्य करत असताना शाळा चे शिक्षक मुदस्सीर सर आणि मुस्तक सर उपस्थित होते.
आम्ही सूरमाज फाउंडेशनचे अध्यक्ष. हाजी उस्मान शेख साहेब यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि अशा प्रकारचे कार्य सूरमाज फाउंडेशन करत राहू जेणेकरून मुलांमध्ये शिकण्याची इच्छा वाढत राहतील.

समाजसेवक पुराणिक यांचा भव्य सत्कार

सह्याद्री न्यूज | शंकर घुगरे 

वणी : सध्या यवतमाळात वास्तव्य असलेले वणी येथील ज्येष्ठ समाजसेवक सुधाकर पुराणिक सर यांचा सोमवार दि. २९ नोव्हेंबर रोजी जैताई सभाग्रुहात सत्कार आयोजिण्यात आला आहे .

या दिवशी पुराणिक ९० व्या वर्षात पदार्पण करीत आहे. ते जैताई देवस्थान समितीचे सर्वात ज्येष्ठ संचालक आहेत.

त्यांच्या वर्धापनदिना निमित्त त्या दिवशी संगीतमय सुंदरकांड पाठाचे दुपारी ३ ते ६ पर्यंत आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम यवतमाळ येथील श्रीराम सुंदरकांड महिला मंडळ सादर करणार आहे. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.

बंधु भगिनींनी या कार्यक्रमाला अवश्य उपस्थित राहावे अशी विनंती आयोजक जैताई देवस्थान व जैताई अन्नछत्र समिती या संस्थांनी केली आहे.

शेतातील बंड्यातून दागिण्यावर हात साफ करीत केला पोबारा


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

मारेगाव : मार्डी येथील बंड्यातून संशयिताने सोन्याच्या दागिन्यांवर हात साफ करीत पोबारा केला. ही घटना काल दि.२७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजताचे सुमारास घडली असून, संशयित आरोपी सिसि टीव्ही कॅमेऱ्यात बंदिस्त झाला आहे.

डॉ.राहुल ठाकरे यांच्या मार्डीच्या शेतातील बंड्यात सालगडी देविदास महादेव जवादे पत्नी व दोन मुलांसह मागील सात महिन्यापासून वास्तव्याला आहे. जवादे यांचे कुटुंब कामात व्यस्त असतांना संशयित हा बंड्यात घुसला. अंदाजे काळ्या बॅगमधील जवळपास १४ हजार रुपयांचे सोने लांबविले. 
दरम्यान, संशयित हा दुचाकीने आला असल्याचे सिसि टीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. या घटनेची पोलिस ठाण्यात फिर्यादी देविदास जवादे यांनी तक्रार दाखल केली असून, पोलीस संशयीताच्या मागावर आहे.

मालवाहू वाहन चालकाशी वाद घालून केली मारहाण

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : विनाकारण वाद घालून एका मालवाहू वाहन चालकाला एका जनाने आपल्या मित्रासह लाथाबुक्याने मारहाण केल्याची घटना २७ नोव्हेंबरला रात्री ९ वाजताच्या सुमारास शास्त्रीनगर येथे घडली. याबाबत वाहन चालकाने पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविल्याने पोलिसांनी आरोपीसह त्याच्या दोन मित्रांवर गुन्हा दाखल केला आहे. 

शास्त्रीनगर येथे राहणाऱ्या रसीद खान पीर खान पठाण (२९) याचे स्वतःचेच मालवाहू पिकअप वाहन असून तो स्वमालकीचे वाहन चालवितो. २७ नोव्हेंबरला तो पांढरकवडा येथे मालवाहतूक करून रात्री ९ वाजता वणीला पोहचला. शास्त्री नगर येथील वाचनालयाजवळ अमित चांदेकर (२९) रा. नारायण निवासच्या मागे, सतीघाट रोड हा दुचाकीने रसीद खान याच्या वाहनाजवळ आला. समोर वाहने असल्याने रसीद खान थांबला असतांना आरोपीने विनाकारण त्याच्या गाडीचा साईडग्लास फिरवला. रसीद खान याने साईडग्लास का फिरविला असे विचारताच अमित चांदेकर याने रसीद खानला शिवीगाळ करित मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याच्या दोन मित्रांनी रसीद खानला वाहनाच्या खाली ओढत लाथाबुक्यांनी मारहाण केली. अचानक झालेल्या मारहाणीमुळे रसीद खान मदतीकरिता ओरडू लागला. त्याचं ओरडणं ऐकून आसपासचे लोकं मदतीला धावून आल्याने अमित व त्याच्या मित्रांनी पळ काढला. रसीद खान याच्या नाका तोंडाला जबर मार लागल्याने नाकातोंडातून रक्त वाहू लागले. त्यानंतर रसीद खान याने वणी पोलिस स्टेशनला येऊन अमित चांदेकर याच्याविरुद्ध मारहाणीची तक्रार दाखल केली. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी अमित चांदेकर व त्याच्या दोन मित्रांविरुद्ध भादंवि च्या कलम ३२५, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. 

पुढील तपास ठाणेदार श्याम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गाडगेबाबा यांच्या पुतळ्यांचे आमदारांच्या हस्ते अनावरण

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : तालुक्यातील निंबाळा रोड येथे लोक सहभागातून बांधण्यात आलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या पुतळ्यांचे अनावरण वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते करण्यात आले. २७ नोव्हेंबरला हा अनावरण सोहळा पार पडला. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून जी.प. सदस्य संघदीप भगत, पंचायत समिती सभापती संजय पिंपळशेंडे, सरपंचा सुनिता ढेंगळे, शिवसैनिक प्रविण खानझोडे, विद्याताई जुनगरी, पोलिस पाटील प्रविण राऊत, सेवा मंडळाचे पदाधिकारी अरविंद महातळे, मनोज दुधकोहळे, राजू आसेकर, सुभाष लसंते, मनोज ढेंगळे यांची उपस्थिती लाभली. 

संतांनी समाजाला दिलेली मानवतेची शिकवण नेहमी स्मरणात रहावी, व लोकांच्या डोळ्यासमोर नेहमी त्यांचा आदर्श उभा रहावा म्हणून गाव शहरात राष्ट्रसंतांचे पुतळे उभारले जात आहे. तुकडोजी महाराज व गाडगेबाबा हे एक आदर्श व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन लोकांनी मानवतावादी दृष्टिकोन जोपासावा, तसेच त्यांचं व्यक्तिमत्व नेहमी डोळ्यासमोर उभं रहावं हा या राष्ट्रसंतांच्या पुतळे उभारण्यामागचा उद्देश असल्याचे सेवा मंडळाने यावेळी सांगितले. 
यावेळी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनीही आपल्या भाषणातून राष्ट्रसंतांची माहिती सांगितली. तसेच संजय पिंपळशेंडे व प्रविण खानझोडे यांनीही राष्ट्रसंतांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचालन गजानन येलपुलवार केले. गावात पुतळे उभारणीपासून तर पुतळ्यांचा अनावरण सोहळा यशस्वी करण्यापर्यंत मोलाचे सहकार्य समस्त गावकऱ्यांनी केले.

नुतन देगलुरचे आमदार अंतापुरकर यांनी आपले वडील यांनी दिव्यांगासाठी राखीव असलेला दिव्यांग निधी देण्याचे बिलोली येथील दिव्यांग शिबिरात दिलेले आश्वासन पूर्ण करतील काय? - अनिल रामदिनवार यांनी केली निवेदनातून मागणी

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

नांदेड : दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष मा चंपरतराव डाकोरे पाटिल यांच्या आदेशानंतर बिलोली देगलुर चे नुतन आमदार मा अंतापुरकर यांची दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र ता देगलुर चे ता अध्यक्ष अनिल रामशेटवार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने भेट घेऊन दिव्यांग बांधवांसाठी राखीव आमदार निधी आपल्या मतदारसंघात 3 डिसेबर दिव्यांग जागतिक दिनी वाटप करावा म्हणून निवेदन देऊन मागणी करण्यात येत आहे.
    
१) शासन निर्णय नियोजन विभाग मंञालय मुंबई क्र स्थाविका - 0616/प्र क्र.96/1482 दि.12/7/2016

२) जिल्हा नियोजन समिती जिल्हाधिकारी नांदेड जा व क्र.नियो/अस्थाविका/का-6/21/22/1461 दि.24/11/21

वरिल शासन निर्णय व जिल्हा नियोजन समिती यांच्या पञानुसार आमदार स्थानिक विकास कार्यक्रम 2021-22 दिव्यांगासाठी अनुज्ञेय कामे आपल्या मतदारसंघात दहा लक्ष निधी दिव्यांगासाठी शासन निर्णय 1 प्रमाणे खर्च करू शकतात तरी दिव्यांगासाठी असलेला निधी खर्च करून दिव्यांगाना आधार द्यावा.     
महाराष्ट्र शासन दिव्यांग हा सर्व सामान्य जनतेसाठी जीवन जगता यावे म्हणून शासन 2016 ला दिव्यांग कायदा करुन अनेक शासन निर्णय वरिष्ठ आदेश असुन संसदेत कायदा करणारे खासदार, आमदार यांनीच अंमलबजावणी करित नसल्यामुळे दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्षांपासून शासन प्रशासनाचे लक्ष व अनेक आमदार यांना निवेदनाद्वारे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न चालू असुन, देगलुर मतदार संघाचे नुतन आमदार अंतापुरकर यांना ता अध्यक्ष अनिल रामदिनवार यांच्या नेतृत्वाखाली खालील शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे दिव्यांग आमदार निधीची  मागणी केली.
     

‘अंकनाद राज्यस्तरीय पाढे पाठांतर व सात्मीकरण स्पर्धा पर्व -३’ चे आयोजन

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

मुंबई : महाराष्ट्र शासन, राज्य मराठी विकास संस्था आणि मॅप एक कम्युनिकेशन्स प्रा. लि. पुणे याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अंकनाद राज्यस्तरीय पाढे पाठांतर सात्मीकरण स्पर्धा पर्व-3 नावनोंदणी सुरु झाली आहे. महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांना उत्तेजन देण्यासाठी, गणित विषयाची गोडी निर्माण होण्यासाठी राज्य शासनाच्या सहभागाने मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रा. लि. आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या अंकनाद राज्यस्तरीय पाढे पाठांतर व सात्मीकरण स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे हे तिसर पर्व आहे.

स्पर्धेच्या पहिल्या दोन पर्वांना विद्यार्थ्यांचा उल्लेखनीय प्रतिसाद लाभला. पर्व 3 साठी नावनोंदणीस राज्यभर 8 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली असून 15 डिसेंबर पर्यंत मुदत आहे. पाठ्यांचे व्हिडीओ 25 नोव्हेंबर पासून 31 डिसेंबरपर्यंत मिळालेल्या लिंकवर अपलोड करता येणार आहेत.

मराठी परंपरा संवर्धनाचा विषय असल्याने महाराष्ट्र राज्य शासनाने मराठी भाषा विभागाच्या राज्य मराठी विकास संस्थामार्फत सह-आयोजक या नात्याने या स्पर्धा आयोजनात सहभाग घेतला आहे. अंकनाद पाढे पाठांतर स्पर्धेतून मुलांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळते आणि अंकनादच्या संगीतमय पाढ्यांमुळे मुलांचे पाढे सहज ऐकून आत्मसात होतात. त्याचे परीक्षण होणे गरजेचे आहे. त्यासाठी अंकनाद तर्फे पाढे पाठांतर व सात्मीकरण स्पर्धा ही संपूर्ण महाराष्ट्रात आयोजित केली जाते. जिल्हा पातळी, राज्य पातळीवर स्पर्धा घेतली जाईल. ही स्पर्धा मराठी भाषेतून घेतली जाईल. सर्व माध्यमाच्या विद्यार्थ्यांना पाढे पाठांतर स्पर्धा खली राहील विद्यार्थी कोणत्याही माध्यमातून शिकत असला तरी स्पर्धा मराठी भाषेतूनच होईल. पाढे पाठांतर स्पर्धा महाराष्ट्रातील सर्वस्तरातील विद्यार्थ्यासाठी आहे.

स्पर्धेचे नियोजन:

जिल्हापातळीवर स्पर्धक आपल्या गटानुसार सांगितलेले पाढे म्हणतानाचा व्हिडीओ मिळालेल्या लिंक वर अपलोड करावा. परीक्षकांकडून त्याचे परीक्षण केले जाईल

राज्यपातळीवर:- परीक्षणानंतर गटनिहाय यशस्वी विद्यार्थ्यांना पायांवर आधारीत गणितीय आकडेमोड यावर आधारित प्रश्न विचारून तोंडी परीक्षण करण्यात येईल.

बक्षिसे:- व्हिडिओ अपलोड केलेल्या सर्व स्पर्धकांना प्रशस्तिपत्र दिले जाईल आणि राज्यपातळीवरील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्र आणि प्रत्येक गटात 19 हजार, 7 हजार, 5 हजार अशी पहिल्या 3 क्रमांकांना भारतीय टपाल विभागाचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र दिले जाणार आहेत. ही स्पर्धा महाराष्ट्रातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यासाठी आणि सर्व सामान्य जनतेसाठी खुली आहे. त्यासाठी अंकनाद अॅपद्वारे फॉर्म भरून नोंदणी करु शकतील, अंकनाद अॅप गुगल प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे. स्पर्धेचे स्वरूप आणि नियम www.mahaaanknaad.com या वेबसाइटवर बघायला मिळतील, असे संचालक, राज्य मराठी विकास संस्था संजय कृष्णाजी पाटील यांनी कळविले आहे.

स्पर्धेचा अभ्यासक्रम :

बालगट (बयोगट 4 ते 6) पहिली साठी अंक उच्चार 1 ते 100

दुसरी, तिसरी साठी 1 ते 10 पाढ़े, 11 से 20 पाढे, 21 ते 30 पाढे

चौथी पाचवी साठी पावकी, निमकी

सहावी, सातवी साठी पाऊणकी, सवायकी,

आठवी, नववी, दहावी साठी दिडकी, अडीचकी, औटकी आणि एकोत्रे

खुला गट आणि शासकीय कर्मचारी गटांसाठी पाऊणकी, सवायकी, दिडकी, अडीचकी, औटकी आणि एकोत्रे

महाविकास आघाडी सरकारच्या दोन वर्षपूर्तीनिमित्त सर्वांचे आभार मानले

सह्याद्री न्यूज नेटवर्क |

मुंबई : “महाविकास आघाडी सरकारनं दोन वर्षांच्या कारकिर्दीत राज्यासमोरच्या प्रत्येक आव्हानावर यशस्वी मात केली. जनतेच्या आशा, आकांशा, अपेक्षांवर खरं उतरण्याचा, जनतेचा विश्वास सार्थ ठरवण्याचा निष्ठापूर्वक, प्रामाणिक प्रयत्न केला. कृषी, उद्योग, वीज, व्यापार, शिक्षण, सहकार, साहित्य, कला, नाट्य, संस्कृती, पर्यटन अशा सर्व क्षेत्रात महाराष्ट्राचं अव्वल स्थान कायम रहावं. नागरिकांमध्ये एकता, समता, बंधुतेची भावना वाढावी. सर्व समाजघटकांना विकासाची समान संधी उपलब्ध व्हावी. महाराष्ट्राची सर्व क्षेत्रात प्रगती व्हावी, यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीतील प्रत्येक जण प्रयत्नशील आहे. महाविकास आघाडी सरकार भक्कम असून महाराष्ट्राच्या हितासाठी, जनतेच्या कल्याणासाठी सर्वांना सोबत घेऊन यापुढेही निष्ठेनं काम करीत राहील. दोन वर्षांच्या काळात महाविकास आघाडी सरकारला साथ, सहकार्य दिलेल्या, सरकारवर विश्वास व्यक्त केलेल्या सर्वांचं मी मन:पूर्वक आभार मानतो. सरकारच्या दोन वर्षपूर्तीनिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा देतो” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारच्या दोन वर्षपूर्तीनिमित्त सर्वांचे आभार मानले असून राज्यातील जनतेला शुभेच्छाही दिल्या आहेत.

महाविकास आघाडी सरकारच्या दोन वर्षपूर्तीनिमित्त राज्यातील जनतेचे आभार मानताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्यातील सत्तास्थापनेला आज दोन वर्षे होत आहेत. दोन वर्षांपूर्वी एका विशिष्ट राजकीय परिस्थितीत महाविकास आघाडी सरकार राज्यात सत्तेवर आलं. या दोन वर्षांच्या काळात राज्यावर कोरोना, अतिवृष्टी, महापूर, चक्रीवादळासारखी अनेक नैसर्गिक संकटं आली. कोरोनामुळे टाळेबंदी जाहीर झाली. त्याचा उद्योग, व्यापार, अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला. संकटं किती मोठी असली तरी महाराष्ट्र कधी खचला नाही. कुणापुढे झुकला नाही. संकटं जितकी गंभीर.. तितका महाराष्ट्र खंबीर... हा इतिहास आहे. महाविकास आघाडी सरकारनं ती परंपरा कायम राखली. महाराष्ट्राच्या प्रगतीला खीळ बसू दिली नाही. प्रत्येक संकटाचा यशस्वी मुकाबला करण्याची परंपरा महाविकास आघाडी सरकारनंही कायम ठेवली. राज्यातील प्रत्येकाला सोबत, विश्वासात घेऊन सर्वांच्या मदतीनं, सहकार्यानं, एकजुटीनं राज्यावरच्या संकटावर मात केली. प्रत्येक महाराष्ट्रवासियाला याचा अभिमान आहे.

राज्यावरचं कोरोना संकट अभूतपूर्व असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री म्हणाले की, कोरोनाच्या संकटकाळात राज्यातील डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, फार्मासिस्ट, सफाई कामगार, पोलिस, शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज संस्थांचे, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, राज्यातल्या प्रत्येक नागरिकांनं जीवाची जोखीम पत्करुन कोरोनाविरोधी लढ्यात अमूल्य योगदान दिलं आहे. या कोरोनायोद्ध्यांचं उपमुख्यमंत्र्यांनी कृतज्ञतापूर्वक आभार मानले असून कोरोनायोद्ध्यांचा त्याग महाराष्ट्र कायम लक्षात ठेवील, असा विश्वास व्यक्त केला आहे.
कोरोना संकटांच्या बरोबरीनं राज्यासमोर आर्थिक आव्हानंही उभं राहिली. या आव्हानांचा सामना करताना राज्याची आर्थिक घडी विस्कटणार नाही, राज्यातली विकासकामे थांबणार नाहीत. विकासाची प्रक्रिया अखंड, निरंतर सुरु राहील याची संपूर्ण काळजी घेण्यात आली. रस्ते, रेल्वे, मेट्रो, कोस्टलरोड, उड्डाणपूलांसारख्या पायाभूत प्रकल्पाची कामे गतीमान करण्यात आली. पायाभूत प्रकल्प निर्मितीबरोबरंच नागरिकांचं रोजचं जगणं सुसह्य होईल यासाठी अनेक निर्णय घेण्यात आले. धोरणं आखून अंमलबजावणी करण्यात आल्याचे सांगत उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्राच्या हितासाठी, सर्वांगीण विकासासाठी बांधिल असल्याचा पुनरुच्चार केला. शेतकरी कर्जमुक्ती, शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज, आमदार स्थानिक निधीत वाढ, आपत्तीग्रस्तांना तात्काळ मदत, आरोग्य सेवेचे सक्षमीकरण, शिवभोजन थाळी, मागास, आदिवासी, अल्पसंख्याक बांधवांच्या विकासासाठी भरीव निधी अशा अनेक निर्णयांची माहितीही उपमुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

चंद्रपूरात २६ नागरिकांना मिळाला उज्वला गॅस याेजनेचा लाभ !


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरचे सचिव चंदन पाल यांनी शास्त्रीनगर प्रभागातील 26 नागरिकांना प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेचा लाभ महाराष्ट्र विधिमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात मिळवून दिला. त्या निमित्ताने लाभार्थ्यांना गॅस वितरणाचा कार्यक्रम नेहरू नगर येथील समाज भवनात आयोजित करण्यात आला होता. महिलांच्या सक्षमीकरणात उज्वला गॅसचे योगदान माेठे असल्याचे भारतीय जनता पार्टी महानगरचे जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना म्हणाले. धूर मुक्त भारताचे स्वप्न पूर्ण करणारी ही योजना असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्या नंतर उपमहापौर राहुल पावडे यांनी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले तसेच 160 नागरिकांच्या ई-श्रमिक कार्डची व 120 मतदान कार्डसाठी नोंदणी करण्यात आली.

सदरहु कार्यक्रमात भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य
तुषार सोम, महामंत्री ब्रिजभूषण पाझारे, मंडळ अध्यक्ष विठ्ठल डुकरे, बंगाली आघाडी अध्यक्ष
दिपक भट्टाचार्य, नगरसेविका वनिता डुकरे, मंडळ महामंत्री मनोरंजन रॉय, राम हरणे, महानगर सचिव रवी जोगी, सारिका संदूरकर, सतीश तायडे, बंगाली आघाडी महामंत्री कृष्णा कुंडू, शंकर सुडीत, उमेश गुजर, अनुप देवना, प्रशांत बोबडे, आशु रॉय, राज सोनू, उमेश साळुंखे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

दालमिया कंपनी समाेर कामगाराचे उपाेषण सुरुच - ५ जणांची प्रकृती खालावली ?

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : काेरपना तालुक्यातील भारत दालमिया कारखान्यासमाेर दि.२३ नाेव्हेंबर पासून कामगारांनी आपल्या रास्त मागण्यांसाठी बेमुदत आमरण उपाेषण पुकारले असून या उपाेषणाचा आज चवथा दिवस आहे.

दरम्यान या उपाेषण मंडपात उपाेषणाला अनुक्रमे अशाेक निळकंठ कुचनकार (नारंडा), दशरथ सुधाकर वडस्कर (अंतरगांव), श्रीकांत तुळशिराम धानाेरकर (पिंपळगांव) गड, अनिल दादाजी आत्राम (नारंडा), निळकंठ बाळकृष्ण लांडगे (नारंडा), राजेन्द्र छब्बी दुर्वे (नारंडा) व जीवनलाल जगतपाल निषाद (गडचांदूर) हे बसले असून आज शनिवार दि.२७ नाेव्हेंबरला वैद्यकिय चमूने उपाेषण कर्त्यांची प्रकृती तपासणी केली असता यातील पाच कामगारांना रुग्णालयात हलविण्याचा सल्ला डॉ.मंडळीने दिला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या आधी या कामगारांनी आपल्या रास्त मागण्या पदरात पडाव्या या साठी धरणे आंदोलन पुकारले हाेते परंतु त्या आंदाेलनातुन त्यांचे मागण्यांची पुर्तता झाली नसल्याने शेवटी या कामगारांनी बेमुदत उपाेषणाचा पवित्रा उचलला. अद्याप शासन व प्रशासनाने त्यांचे या सुरु असलेल्या उपाेषणाची दखल घेतली नाही हे येथे उल्लेखनिय आहे.

सदरहु आंदोलन हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमांतुन सुरु असून आंदोलन स्थळी पाेलिस बंदोबस्त ठेवण्यांत आला आहे.

कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्‍या व्यक्ती व संस्थांना होणार दंड

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

मुंबई : राज्यात कोविड १९ या आजाराचे रूग्ण कमी झाल्यामुळे राज्य शासनाने आर्थिक, सामाजिक, मनोरंजन व सांस्कृतिक क्षेत्रावरील निर्बंध पूर्णतः लसीकरण झालेल्या व्यक्तींसाठी शिथिल केले आहेत. राज्य शासन तसेच केंद्र शासनाकडून वेळोवळी देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन सेवा देणारे, मालक, परवानाधारक तसेच आयोजक यासह सर्व सेवा घेणारे, ग्राहक, अतिथी अभ्यागत यांनी करावयाचे आहे. आज जारी केलेल्या या मार्गदर्शक तत्त्वात संपूर्ण लसीकरणाची आवश्यकता, कार्यक्रमावरील निर्बंधाची व्याख्या, कोविड अनुरूप वर्तन, स्थानिक प्रशासनाचे अधिकार, कोविड वर्तणूकविषयक नियम व दंड याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

संपूर्ण लसीकरणाची आवश्यकता :

तिकोट असलेल्या किंवा तिकीट नसलेल्या कोणत्याही कार्यक्रमाच्या समारंभाच्या किंवा प्रयोगाच्या आयोजनाशी संबंधित असलेल्या सर्व व्यक्ती तसेच सर्व सेवा देणारे व सहभागी होणाऱ्या व्यक्ती (जसे की, खेळाडू, अभिनेते इत्यादी) अभ्यागत, पाहुणे, ग्राहक यांनी संपूर्ण लसीकरण केलेले असावे,कोणतेही दुकान,आस्थापना, मॉल, समारंभ, संमेलन (मेळावे) इत्यादी ठिकाणी, संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींद्वारे व्यवस्थापन केले पाहिजे आणि अशा ठिकाणी येणारे सर्व अभ्यागत, ग्राहक यांचे संपूर्ण लसीकरण झालेले असावे. सर्व सार्वजनिक परिवहन सेवांमध्ये संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच परवानगी असेल.

राज्य शासनाने तयार केलेला युनिव्हर्सल पास (https://epassmsdma.mahait.org किंवा telegram-MahaGovUniversalPass Bot) हा संपूर्ण लसीकरण झाल्याच्या स्थितीचा वैध पुरावा असेल. अन्यथा, छायाचित्र असलेले वैध ओळखपत्र असलेले 'कोविन प्रमाणपत्र देखील' त्यासाठी वैध पुरावा मानले जाईल.१८ वर्षापेक्षा कमी वयाच्या नागरिकांसाठी इतर शासकीय संस्थेने किंवा शाळेने दिलेले छायाचित्र ओळखपत्र आणि वैद्यकोय कारणांमुळे ज्या व्यक्ती लस घेऊ शकत नाहीत त्या व्यक्तींसाठी, प्रमाणित वैद्यकीय व्यावसायोकांकडील प्रमाणपत्र प्रवेशासाठी कागदोपत्री पुरावा म्हणून वापरता येईल.जेथे सर्वसामान्य जनतेतील कोणतीही व्यक्ती भेट देत नाही अशी कार्यालये व इतर आस्थापना तसेच खाजगी परिवहन सेवा यांच्यासाठी संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तीसाठी त्या खुल्या असण्याची शर्त नसली तरी, त्यांना देखील संपूर्ण लसीकरण करणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र राज्यात प्रवास:

महाराष्ट्र राज्यात प्रवास करताना कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्थानावरून राज्यात येणाऱ्या सर्व प्रवाशांना केंद्र सरकारची मार्गदर्शक तत्वे त्यांना लागू राहतील. राज्यात येणाऱ्या सर्व देशांतर्गत प्रवाशांचे एकतर यात यापुढे व्याख्या केल्यानुसार संपूर्ण लसीकरण केले जाईल किंवा ७२ तासांसाठी वैध असलेली आरटी-पीसीआर चाचणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

कोणताही कार्यक्रम, समारंभामधील उपस्थितीवरील निर्बंधामध्ये

कोणताही कार्यक्रम,समारंभ इत्यादींमधील उपस्थितीवरील निर्बंधामध्ये चित्रपट गृह, नाट्यगृह, मंगलकार्यालय सभागृह, बंदिस्त बंद जागेत घेण्यात येणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमाच्या अथवा समारंभाच्या उपक्रमाच्या बाबतीत, जागेच्या क्षमतेच्या ५० टक्के लोकांना परवानगी दिली जाईल.संपूर्ण संमेलनांसाठी तेथील जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के लोकांना परवानगी दिली जाईल.संमेलनाच्या किंवा समारंभाच्या अशा ठिकाणांच्या बाबतीतील क्षमता,औपचारिकपणे आधीच निश्चित केलेली नसेल तर (स्टेडियम प्रमाणे) संबंधित जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास अशो क्षमता ठरवण्याचा अधिकार असेल.

कोणत्याही संमेलनासाठी (मेळाव्यासाठी उपस्थित असलेल्या एकूण लोकांची संख्या १ हजारांपेक्षा अधिक असेल तर अशा बाबतीत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला त्याची माहिती द्यावी लागेल आणि स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, अशा कोणत्याही संमेलनाचे (मेळाव्याचे निरीक्षक म्हणून पर्यवेक्षण करण्यासाठी त्यांचे प्रतिनिधी पाठवील आणि तेथे स्थानिक प्रशासन काटेकोरपणे अनुपालन केले जात असल्याची खात्री करतील.कोविड अनुरूप वर्तनाचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले तर स्थानिक प्रशासनाला सदर कार्यक्रम पूर्णतः किंवा अंशत: बंद करण्याचे अधिकार आहेत.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांचे अधिकार:

कोणत्याही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास जर योग्य वाटल्यास कोणत्याही क्षणी, त्यांच्या संबंधित अधिकारक्षेत्रासाठी यात नमूद केलेले निर्बंध व शर्ती वाढविता येतील.परंतु कमी करता येऊ शकणार नाहीत, मात्र,जाहीर नोटोसीद्वारे ४८ तासांची पूर्व सूचना दिल्याशिवाय तसे करता येणार नाही. या आदेशाच्या दिनांकास, अंमलात असलेले जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने लादलेले कोणतेही निर्बंध जर ते पुढे चालू ठेवण्यासाठी जाहीर नोटीस देऊन पुन्हा जारी केले नसतील तर ते ४८ तासांनंतर अंमलात असल्याचे बंद होतील.

संपूर्ण लसीकरणाची व्याख्या :

संपूर्ण लसीकरणाची व्याख्या पुढीलप्रमाणे करण्यात आली आहे.लसीच्या दोन्हीही मात्रा (डोस) घेतल्या आहेत आणि दुसरी मात्रा (डोस) घेतल्यानंतर १४ दिवस झालेले आहेत अशी कोणतीही व्यक्ती असा आहे. ज्यामुळे त्याला किंवा तिला लस घेण्यास मुभा नाही आणि त्या व्यक्तीकडे तशा अर्थाचे मान्यताप्राप्त डॉक्टराकडील प्रमाणपत्र आहे अशी कोणतीही व्यक्ती असा आहे. किंवा कोणतीही १८ वर्षापेक्षा कमी वयाची व्यक्तो, असा आहे..

कोविड अनुरूप वर्तनविषयक नियम:

कोविड अनुरूप वर्तनविषयक नियम पुढीलप्रमाणे आहेत.कोविड १९ विषाणूचा प्रसार होण्यास प्रतिबंध करण्यासाठी आणि त्यामुळे त्याच्या प्रसाराची साखळी खंडित करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने व संस्थेने पालन करण्याची गरज असलेले दैनदिन सामान्य वर्तन अशी कोविड अनुरूप वर्तन (CAB) या संज्ञेची व्याख्या करता येऊ शकेल. कोविड अनुरूप वर्तनाचे प्रत्येकाने सदैव पालन केले पाहिजे,सर्व संस्थांनी त्यांचे सर्व कर्मचारी, त्यांच्या परिसरांत भेट देणारे अभ्यागत,ग्राहक किंवा संस्थेच्या कोणत्याही कार्यक्रमात, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहभागी होणारी कोणीतीही व्यक्ती,त्याचे पालन करतील आणि त्यांच्या परिसरांमध्ये किंवा व्यवसायाशी संबंधित व्यवहार करताना किंवा कार्य करताना त्यांची अंमलबजावणी करण्याकरिता संस्था जबाबदार असतील. सर्व कर्मचाऱ्यांनी कोविड अनुरूप वर्तनाचे पालन करण्यासाठी हॅन्ड सॅनिटायझर, साबण व पाणी, तापमापक (thermal scanner), इत्यादी गोष्टी उपलब्ध करण्यासाठी देखील जबाबदार आहेत.

नेहमी योग्य पद्धतीने मास्क परिधान करा. नाक व तोंड नेहमी मास्कने झाकलेले असले पाहिजे. (रुमालाला, मास्क समजले जाणार नाही आणि रूमाल वापरणारी व्यक्ती, दंडास पात्र असेल.) जेथे जेथे शक्य असेल तेथे, नेहमी सामाजिक अंतर (६ फूट अंतर) राखा.साबणाने किंवा सॅनिटायझरने वारंवार व स्वच्छपणे हात स्वच्छ धुवा.साबणाने हात न धुता किंवा सॅनिटायझर न वापरता, नाक/डोळे/तोंड यांना स्पर्श करणे टाळा.योग्य श्वसन स्वच्छता(आरोग्य) राखा.,पृष्ठभाग निर्वामितपणे आणि बाई सर स्वच्छ व निर्जंतुक करा.खोकताना किंवा शिकताना, टिश्यू पेपरचा वापर करून तोंड व नाक झाका आणि वापरलेले टिश्यू पेपर नष्ट करा. जर एखाद्याकडे टिश्यू पेपर नसेल तर, त्याने स्वतःचा हात नव्हे तर, हाताचा वाकवलेला कोपरा नाका तोडांवर ठेवून खोकावे व शिकावे,सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका.सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळा आणि सुरक्षित अंतर (६ फूट अंतर) राखा कोणालाही शारीरिक स्पर्श न करता, नमस्कार अथवा अभिवादन करा. कोविड-१९ विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी आवश्यक असलेले अन्य कोणतेही

कोविड अनुरूप वर्तनविषयक नियमांचे पालन न करणा-या व्यक्ती व संस्थांना दंड :

कोविड नियमांचे पालन न करणा-या व्यक्ती तसेच संस्था,आस्थापना या दंडास पात्र असतील. कोविड़ अनुरूप वर्तनाचे पालन न करणान्या कोणत्याही व्यक्तीला असा कसूर केल्याच्या प्रत्येक प्रसंगी रुपये ५००/- इतका दंड करण्यात येईल.

ज्यांनी आपले अभ्यागत, ग्राहक, इत्यादीवर कोविड अनुरूप वर्तन ठेवणे अपेक्षित आहे अशा संस्थेच्या किंवा आस्थापनेच्या कोणत्याही जागेत किंवा परिसरात जर एखाद्या व्यक्तीने कसूर केल्याचे दिसून आले तर, त्या व्यक्तीवर दंड लादण्या व्यतिरिक्त, अशा संस्थाना किया आस्थापनांना सुद्धा रुपये १०,०००/- इतका दंड करण्यात येईल.

जर कोणतीही संस्था किंचा आस्थापना तिचे अभ्यागत, ग्राहक, इत्यादीमध्ये कोविड अनुरूप वर्तन विषयक शिस्त निर्माण करण्याची सुनिश्चित करण्यात नियमितपणे कसूर करीत असल्याचे दिसून आले तर, एक आपत्ती म्हणून कोविड १९ ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत, अशी संस्था किंवा आस्थापना बंद करण्यात येईल.

जर एखाद्या संस्थेने किंवा आस्थापनेने स्वतःच कोविड अनुरूप वर्तनाचे पालन करण्यात कसूर केली तर ती प्रत्येक प्रसंगी रूपये ५०,०००/- इतक्या दंडास पात्र असेल. वारंवार कसूर केल्यास, एक आपत्ती म्हणून कोविड-१९ ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत ती संस्था किंवा आस्थापना बंद करण्यात येईल.

जर कोणत्याही टॅक्सीमध्ये किंवा खाजगी वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनात किंवा कोणत्याही बसमध्ये, कोबिड अनुरूप वर्तनात कसूर केली जात असल्याचे आढळून आले तर, कोविड अनुरूप वर्तनात कसूर करणाऱ्या व्यक्तींना, रूपये ५००/- इतका दंड करण्यात येईल,

तसेच सेवा पुरविणारे चाहनचालक, मदतनीस, किंवा वाहक यांना देखील रूपये ५००/- इतका दंड करण्यात येईल. बसेसच्या बाबतीत, मालक परिवहन एजन्सीस, कसुरीच्या प्रत्येक प्रसंगी, रुपये १०,०००/- इतका दंड करण्यात येईल.

वारंवार कसूर केल्यास एक आपत्ती म्हणून कोविड-१९ ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत मालक एजन्सीचे लायसन काढून घेण्यात येईल किंवा तिचे परिचालन बंद करण्यात येईल.

कोविड अनुरूप वर्तणुकी संबंधीच्या वर नमूद केलेल्या नियमांचे, अनिवार्यपणे पालन करण्यात येईल आणि त्यांचे उल्लंघन केल्यास वर नमूद केल्यानुसार दंड व शास्ती करण्यात येईल तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ नुसार कोणत्याही आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे उल्लंघन करणा-यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा प्रकारच्या सार्वजनिक ठिकाणी कोविड वर्तणूकीसंदर्भातील मार्गदर्शक सूचना शासनाने जारी केलेल्या आहेत.


भीमालपेन देवस्थान येथे संविधान दिवस साजरा

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

वणी : भार देश हा संविधान स्विकारण्यापुर्वी ब्रिटिश आश्रित पुरोहितशाहिच्या जबड्यात अडकलेला होता. २६ जानेवारी १९५० ला भारतदेशाने संविधान स्विकारुन सार्वभौमिक प्रजासत्ताकाचा स्विकार करुन या देशातील पुरोहित शाहीला झुगारुन दिले.
सार्वभौम लोकशाहीचा स्विकार केला. त्यामुळे भारतीय संविधान हा कुठलाही ग्रंथ नसून तो मानवी दास्यत्व व शोषण मुक्तिचा कायदेशीर आदेशनाम असल्याचे प्रतिप्रादन ट्रायबल आखाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा, अ.भा.संवैधानिक हक्क परिषचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. गीत घोष यांनी महाराष्ट्र ट्रायबल आघाडीद्वारा आयोजित संविधान दिन तथा तथा शामादादा कोलाम यांचे जयंती दिनानिमित्य केले.
 २६ नोव्हेंबर २०२१ ला भिमालपेन भिवसन देव देवस्थानाच्या प्रांगणात संविधान दिवस तथा शामादादा यांच्या जयंती अनुसंघाने या कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक ट्रायबल आघाडी द्वारा करण्यात आले होते, त्या निमीत्य ते बोलत होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष ट्रायबल आघाडी तथा अ.भा.संवैधानिक हक्क परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.गीत घोष होते तर, मुख्य मार्गदर्शक म्हणून ट्रायबल आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मा.संतोषजी भादिकर हे होते तर,मुख्य अतिथि म्हणून मा. सौ.मंथनाताई सुरपाम, अशोकजी बेसरकर हे होते. सर्व प्रथम कोरोनामुळे ज्यांना आपला प्राण गमवावा लागला. अशा योध्यांना श्रधांजली यावेळी अर्पण करण्यात आली. 
  
या प्रसंगी यांनीही मार्गदर्शन केले.
पुढे बोलतांना घोष म्हणेल की, भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास लिहणारे हे ब्रम्हण्यवादी दृष्टिकोनाचे व चातुर्वर्ण्य व्यवस्थेचे इतिहासकार असल्याने त्यांनी सर्वहारा आदिवासी बहुजन समाजाच्या स्वातंत्र्य चळवळीतील इतिसाचे योगदान दुय्यम स्तरावर ठेवले. खरा इतिहास लोकांपासून दडवून ठेवला. त्यामुळे आपल्या देशात विषमतेची दरी अधिकाअधिक वाढली आहे. ते पुढे म्हणेल की, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आमच्या ह्रदयात या ब्राम्हणी व्यवस्थेने तिरस्काराची भावना जाणीवपुर्वक रुजविली आहे,ती जोपर्यंत आम्ही आमच्या ह्रदयातून काढुन टाकत नाही तो पर्यंत आम्ही स्वतंत्र जीवन जगू शकत नाही. शेवटी ते पूढे म्हणाले की, भारतीय संविधानाने आम्हा भारतीय नागरिकांना भारताचे, सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय; विचार, अभिव्यक्त्ती, विश्वास, श्रध्दा व उपासना याचे स्वातंत्र्य; दर्जाची व संधीची समानता व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आस्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा आपण निर्धापुर्वक करुया तरच संविधानावर येणारे धर्मांध व जात्यांध प्रवृतचे संकट आपल्याला रोखता येईल व आपल्या घटनात्मक अधिकारासह आपल्या आपला देश सुरक्षित ठेवता येईल.
कार्यक्रमाचे प्रस्थाविक प्रशांत जुमनाके,संचालन दत्ता गावंडे आणि आभार रमेश मडावी यांनी मानले.

हा कार्यक्रम यशश्वी करण्याकरीता मा. संतोष चांदेकर, भाऊरावजी आत्राम, भगवानजी आत्राम, संतोष पेंदोर, बाबाराव गेडाम, प्रशांत कुमरे, सुधाम गावंडे, रानू तूमराम, लक्ष्मणराजी सुरपाम, महेश आत्राम, दुर्वासजी कुळसंगे साहेब आदिनी घेतले.

राष्ट्रीय सेवा योजना व शारीरिक शिक्षण विभागाकडून संविधान दिन साजरा


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

मारेगाव : कला, वाणिज्य व विज्ञान महा. मारेगाव येथील रा.से.यो व शारीरीक शिक्षण विभागाकडू संविधान दिन साजरा करण्यात आला.

संविधानामुळे भारताचे जागतिक महासत्ता होण्याचे स्वप्न पूर्ण होईल असे विचार कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. सिद्धराम मुंडे यांनी व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. अविनाश घरडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना उच्च शिक्षणाचे महत्व सांगितले. तर डॉ. गजानन सोडनर यांनी संविधानातील मूलभूत हक्क व न्यायिक पुनर्विलोकन या विषयी मार्गदर्शन केले. तसेच संविधान उद्देशपत्रीकेचे वाचन प्रा. विजय भगत यांनी केले. याच बरोबर  संविधान दिनानिमित्त घेण्यात आलेल्या सामान्य ज्ञान परीक्षेचे बक्षीस वितरण सुद्धा करण्यात आले.
या वेळी स्पर्धेत प्रथम  क्रमांक सायली आसूटकर, बी. ए. भाग १, द्वितीय क्रमांक अंकिता पावडे बी. ए. भाग ३ तर तृतीय क्रमांक नीरज महातले  बी. एस सी भाग २ या विद्यार्थ्यांना मिळाले. सदर कार्यक्रमाचे आयोजन रा.सो.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. बाळासाहेब देशमुख व शारीरीक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. नितेश राऊत यांच्या संयुक्त विद्यमाने झाले.
या प्रसंगी मंचावर डॉ. माधुरी तानूरकर, डॉ. विनोद चव्हाण उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रवीण कुलकर्णी तर आभार डॉ. नितेश राऊत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीकरिता प्रा. शैलेश कांबळे, डॉ. घोडखांदे मॅडम, डॉ. चिरडे सर, डॉ. अडसरे सर, प्रा. माकडे सर, प्रा. आत्राम सर, प्रा. जेनेकर सर, प्रा. वांढरे सर, डॉ. कांबळे मॅडम, आदींनी मेहनत घेतली.

संविधान दिना निमित्त वणी व राजूर येथे घेण्यात आली संविधान दौड स्पर्धा

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदणखेडे 

वणी : संविधान दिनाचे औचित्य साधून वणी व राजूर येथे संविधान दौड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. बहुजन स्टुडन्ट्स फेडरेशन वणी व ब्ल्यू व्हिजन शाखा राजूर यांच्या वतीने संविधान दिना निमीत्त ही दौड स्पर्धा घेण्यात आली. वणी येथे आंबेडकर चौकातून तर राजूर येथे शहिद भगत सिंग चौकातून या स्पर्धेला सुरुवात झाली. पुरुष व महिला अशा दोन गटात ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला महिला व पुरुषांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महिला व पुरुष गटातील पहिल्या तीन विजेत्यांना पुरस्कार रूपात रोख बक्षिसे, सन्मानचिन्ह व संविधानाच्या प्रति देण्यात आल्या. 

वणी येथे आंबेडकर चौकातून सुरु झालेली ही दौड स्पर्धा शिवाजी महाराज चौक व कृषी उत्पन्न बाजार समिती पासून परत आंबेडकर चौक अशी घेण्यात आली. क्रीडा अधिकारी मालेकर व बेलेकर गुरुजी यांचं या स्पर्धेला योग्य मार्गदर्शन लाभलं. ऍड. राहुल खापर्डे यांनी निळी झंडी दखविल्यानंतर ही दौड सुरु झाली. या स्पर्धेत प्रथम पुरस्कार प्रवीण लांडे चंद्रपूर यांनी, द्वितीय पुरस्कार रोहित येलादे वणी तर तृतीय पुरस्कार प्रविण जाधव वणी यांनी पटकावला. महिला गटातून प्रथम पुरस्कार वैष्णवी भुरसे, द्वितीय पुरस्कार रेणुका वसाके तर तृतिय पुरस्कार राणी शेंडे यांनी प्राप्त केला. संत रविदास महाराज चर्मकार युवा मंच हे या स्पर्धेचे संयोजक होते. 

राजूर येथे संविधान दौड स्पर्धेअंतर्गत शहिद भगत सिंग चौक ते दीक्षाभूमी अशी ही दौड लावण्यात आली. सरपंच विद्याताई पेरकावार, जी.प. सदस्य संदीप भगत व अशोक वानखेडे यांनी निळी झंडी दाखविल्यानंतर या दौड स्पर्धेची सुरुवात झाली. या स्पर्धेत एकूण ३८ स्पर्धकांनी सहभाग घेतला. त्यातून क्रिश विश्वकर्मा राजूर याने प्रथम, प्रवीण लांडे चंद्रपूर याने दुसरा तर आकाश ठमके वणी या स्पर्धकाने तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार पटकावला. तसेच सुबोधी सुशील अडकिने व प्रज्वत फुलझेले या चौदा वर्षांच्या मुलांनी उत्कृष्ठ दौड लावल्याने त्यांना प्रोत्सानपर बक्षिसे देण्यात आली. बक्षीस वितरण सरपंचा विद्याताई पेरकावार, जी.प. सदस्य संदीप भगत व माजी सरपंचा प्रणिता मो. असलम यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता ब्लू व्हिजन राजूर शाखेने विशेष सहकार्य केले.

कोविड-१९ ने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या निकटतम नातेवाईकांस मिळणार पन्नास हजार रूपये सानुग्रह सहाय्य – मंत्री विजय वडेट्टीवार

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने दिनांक ४ ऑक्टोबर २०२१ रोजी दिलेल्या निर्णयानुसार कोविड-१९ या आजाराने निधन पावलेल्या व्यक्तीच्या निकटतम नातेवाईकांस ५०,०००/- रूपये (रु. पन्नास हजार ) इतके सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

           
राज्य शासनाने मदतीची रक्कम लाभार्थींच्या थेट बँक खात्यात जमा करण्याकरिता ही योजना तयार केली आहे. त्यानुसार लाभार्थ्यांना मदतीची रक्कम थेट लाभार्थींच्या खात्यात जमा होणार आहे. महाराष्ट्र राज्यात जी व्यक्ती कोव्हिड-१९ या आजारामुळे निधन पावली आहे तसेच जर त्या व्यक्तीने कोव्हिड-१९ चे निदान झाल्यामुळे जरी आत्महत्या केली असेल तरी त्या मृत व्यक्तीच्या निकट नातेवाईकास रु. ५०,०००/- (रु. पन्नास हजार) इतके सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती मदत्त निधीमधून देण्यात येणार आहे. हे सानुग्रह सहाय्य देण्याकरिता कोव्हिड -१९ मृत्यू प्रकरणे निर्धारित करण्यासाठी पडताळणी करण्यात येईल. पडताळणीसाठी विविध मुद्दे शासन निर्णयात सविस्तरपणे देण्यात आलेले आहेत. ही मदत मिळण्यासाठी कोव्हिड-१९ या आजाराने निधन पावलेल्या व्यक्तीच्या निकट नातेईवाईकाने राज्य शासनाने या करिता विकसित केलेल्या वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्जदार स्वत: किंवा सेतू केंद्रात किंवा ग्रामपंचायतीत CSC-SPV मधून अर्ज करु शकेल.
       
या कामासाठी नव्याने वेब पोर्टल पुढील आठवड्यातच विकसित करण्यात येणार आहे. त्या वेब पोर्टल वर ऑनलाईन अर्ज कसा करावा तसेच संपूर्ण या योजनेची तपशीलवार कार्यपध्दतीची माहिती असेल. हे वेब पोर्टल कार्यान्वित झाल्यानंतर सर्व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणे याबाबत आपल्या स्तरावर याबाबतची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी तसेच याबाबत प्रसिद्धी करावी. जिल्हा तसेच तालुका व गाव पातळीवर देतील आणि सर्व संबंधितांना ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने करावे. याबाबतचा महसूल व वन विभागाचा शासन निर्णय आज निर्गमित केलेला आहे. यामध्ये याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.                          

भारतातील संविधान हे जगातील सर्वात माेठे संविधान -जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : भारतातील संविधान हे जगातील सर्वात माेठे संविधान असल्याचे मत चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी व्यक्त केले. ते आज येथील मुख्य मार्गावर असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात समता सैनिक दल, भारतीय बाैध्द महासभा, रिपब्लिकन पक्ष, व डॉ.बाबासाहेब आंबेडकर शतकाेत्तर जयंती महोत्सव समिती चंद्रपूर व्दारा आयोजित संविधान सन्मान दिन व प्रबाेधन सभा कार्यक्रमात कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बाेलत हाेते. ते पुढे म्हणाले की, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विधानचा मसुदा तयार करतांना अहाेरात्र मेहनत घ्यावी लागली. दाेन वर्षानंतर हा मसुदा तयार झाल्यानंतर ताे संविधान सभेत सादर करण्यात आला. त्या नंतर भारतीय राज्यघटना पारीत करण्यात आली.

आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्ह्याचे पाेलिस अधिक्षक अरविंद साळवे, प्रविण खाेब्रागडे, निर्मला नगराळे, अ.वि.टेंभरे, प्रतिक डाेर्लिकर, राजकुमार जवादे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित हाेते. कार्यक्रमाच्या आरंभी महामानव विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्याला जिल्हाधिकारी अजय गुल्हाने व पाेलिस अधिक्षक अरविंद साळवे यांनी पुष्पमाला अर्पित करुन अभिवादन केले.

या वेळी सामूहिक राष्ट्रगाण झाले. जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी मंचावर भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवि मून यांनी केले तर सूत्रसंचालन चंद्रपूरच्या मृणाली कांबळे यांनी केले. उपरोक्त कार्यक्रमाला पुरुषां साेबतच महिलांची उपस्थिती विशेष उल्लेखनिय हाेती.

  

श्री गुरुदेव विदयालय व कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन संपन्न

सह्याद्री न्यूज | शंकर घुगरे 

वणी : शिरपूर येथील श्री गुरुदेव विदयालय व कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन संपन्न झाला. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.ना.पु.पिंपळकर सर, पर्यवेक्षक श्री मो.ल.परचाके सर व प्रा.वि.दे.करमनकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.

मुख्याध्यापक श्री.ना.पु.पिंपळकर सर, पर्यवेक्षक श्री. परचाके सर व प्रा.वि.दे.करमनकर सर यांनी संविधानाचे महत्व पटवून सांगितले तर, प्रा.गणेश लोहे सर यांनी संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन केले त्यांच्या पाठोपाठ सर्व विद्यार्थी तसेच शिक्षकांनी संविधान वाचन केले.

कार्यक्रमाचे संचलन श्री.लोहे सर व श्री.योगेश किन्हेकर सर यांनी केले तर प्रा श्री.रुपेश धुर्वे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व वर्ग ५ ते १२ चे विद्यार्थी उपस्थित होते.

सुरमाज फाउंडेशनने वितरक केले रेशन किट

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

चोपडा : सुरमाज फाउंडेशन चोपडा जो नेहमी सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक कामे करते आणि लोकांकडून मध्ये जे काही शक्य असतात ते लोकांसाठी करण्याच्या प्रयत्न करतात. २०२० मध्ये सहा महिने कंप्लीट लॉकडाऊन होता आणि आपल्या देशात बरेच गरीब लोक आहेत जे दररोज काम करतात आणि दररोज जेवतात, तेव्हा अन्नासाठी उपलब्ध नव्हती हे लक्षात घेता सूरमाज फाउंडेशनने आतापर्यंत 800 राशन किट वितरण केले आहे किटमध्ये जेवण लागणारी वस्तू भोपळा, पीठ, मसूर, साखर, शेव, तेल, चहा, चणा इत्यादी 15 दिवसाच्या रेशनच्या सामान होत. गरीब लोकांना काही प्रमाणात मदत केली गेली. हाजी उस्मान शेख (अध्यक्ष, सुरमाज फाउंडेशन), काजी झायउद्दीन साहेब, अबुललौस शेख, डॉ. रागीब, डॉ मोहम्मद जुबेर शेख आणि त्यांचे सहकारी हे काम करीत होते.

मारेगांव येथील कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन साजरा

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

मारेगाव : कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय मारेगांव येथे संविधान दिन साजरा करण्यात आला.

यावेळी नेहरू कला केंद्र यवतमाळ च्या वतीने वकृत्व स्पर्धा घेण्यात आली तसेच या संविधान दिनाच्या कार्यक्रमात बोलतांना प्राचार्य हेमंत चौधरी म्हणाले ज्या संविधानाने भारतातल्या विविधतेला एकतेत बांधून ठेवले आहे त्या संविधानाचा आदर करा, संविधानाची नैतिकता टिकवा हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे.

या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राध्यापक मंडळी व विद्यार्थी उपस्थित होते.

शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन संपन्न

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

वणी : शिक्षण प्रसारक मंडळ विदयालय व कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन संपन्न झाला यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री क्षिरसागर सर व उपमुख्याध्यापक श्री तामगाडगे सर यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.

घोडमारे सर यांनी संविधानाचे महत्व पटवून सांगितले तर, बुजोने सर यांनी संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन केले त्यांच्या पाठोपाठ सर्व विद्यार्थी तसेच शिक्षकांनी संविधान वाचन केले या वेळी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थीत होते.
यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थीत होते. हा कार्यक्रम विद्यालयाचे मुख्याध्यापक व उपमुख्यापक यांच्या मार्गदर्शनात पार पडला.

गुटखा वाहतूक व विक्री करणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे गृहमंत्र्याचे निर्देश

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

मुंबई : महाराष्ट्रात गुटखाबंदी लागू करण्यात आली असून त्याची कठोर अंमलबजावणी सुरु आहे. परंतु इतर राज्यातुन येणारा गुटखा रोखण्यासाठी सीमेवरील तपासणी कडक करण्यात यावी. तसेच अवैध गुटखा वाहतूक व विक्री करणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.

गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू आणि सुपारी, खर्रा, मावा यासारख्या प्रतिबंधित अन्नपदार्थांचे उत्पादन आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात गृहमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. या बैठकीला अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, प्रधान सचिव संजय सक्सेना, अन्न व औषध प्रशासन आयुक्त परिमल सिंग, अतिरिक्त पोलीस महासंचालक राजेंद्र सिंग, सहसचिव दौलत देसाई, यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

राज्यामध्ये सन २०१२ पासून गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू, सुपारी व इतर पदार्थाच्या विक्री व वापरास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. या प्रतिबंधित अन्य पदार्थाच्या बंदीची अंमलबजावणी अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत पोलिस विभागाच्या सहाय्याने करण्यात येते आहे. परंतु परराज्यातून मोठ्या प्रमाणावर गुटखा अवैध पद्धतीने राज्यात आणला जातो तसेच वितरण आणि विक्री केली जाते. यासाठी अन्न व औषध प्रशासन व पोलिस विभाग यांनी संयुक्तपणे मोहिम राबवावी. तसेच पोलीस यंत्रणांनी या सर्व अन्नपदार्थांची उत्पादन, विक्री, साठवणूक, वितरण व वाहतूक करणाऱ्याविरुद्ध अधिक दक्ष राहून प्रभावी पणे कारवाई करावी. याबरोबरच प्राप्त तक्रारीची तातडीने दखल घेऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश श्री वळसे पाटील यांनी यावेळी दिले.

अन्न व औषधं प्रशासन मंत्री डॉ शिंगणे यांनी इतर राज्यातून आपल्या राज्यात येणारा गुटखा रोखण्यासाठी सीमाक्षेत्रात खबऱ्यांचे नेटवर्क मजबूत करावे, तसेच पोलीस यंत्रणांनी यापूर्वी दाखल तक्रारीवर कठोर कारवाई करावी यामुळे संबंधितावर वचक निर्माण होईल असे सांगितले.

वणी वरोरा मार्गावरील रस्त्यालगत असलेला वजन काटा ठरत आहे अपघात प्रवणस्थळ

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : वणी वरोरा मार्गावरील टी-पॉईंट जवळ अगदी रस्त्यालगत वाहनांचा वजन काटा असल्याने खाजगी कोळसा सायडिंगवर कोळशाची वाहतूक करणाऱ्या वाहनांची या वजन काट्यावर वजन करण्याकरिता नेहमी मोठी रांग लागलेली असते. वाहने अगदी रस्त्यावर रांग लाऊन उभी रहात असल्याने वाहतुकीला तर अडथळे निर्माण होतच आहे, पण वजन करणाऱ्या वाहनांच्या अवागमनामुळे काट्याजवळील मुख्य मार्गाची अवस्था कोळसा खदाणीतील रोड पेक्षाही निपटार झाली आहे. मुख्य रस्त्यावर धूळ मातीचे थर जमा होऊन छोटी छोटी ढिगारं तयार झाली असून त्यावरच दिवसातून एखाद वेळा पाणी मारले जात असल्याने दुचाकी वाहने स्लिप होऊन कित्येक दुचाकीस्वार खाली पडून जखमी झाले आहेत. अगदीच रोडला लागून काटा असल्याने काटा केल्यानंतर वाहने कोळसा सायडींगकडे वळवतांना तीन चार वेळा मागे पुढे घ्यावी लागतात. त्यामुळे या मार्गावर वाहनांची नेहमी कोंडी होतांना दिसते. काट्यापासून काही अंतरापर्यंत नेहमी धूळच धूळ पसरलेली असते. काट्यापासून समोर काळं धुकं पाहायला मिळतं. या मार्गाने जातांना नागरिकांचा चांगलाच मनःस्ताप होतांना दिसतो. या मार्गाने दुचाकीने जाणारा प्रत्येक जण या काळ्या धुक्यात काळाभोर होऊन निघतो. या काट्यावर वजन करण्याकरिता वाहनांची असणारी रेलचेल मोठ्या अपघाताची चाहूल देत आहे. वजन करण्याकरिता मुख्य रस्त्यावरच वाहनांची रांग लागून राहत असल्याने नेहमी याठिकाणी वाहनांचा जाम लागताना दिसतो. कोळसाखाणीतील रस्त्यासमान झालेल्या या मुख्य रस्त्यावर दुचाकी घसरून पडल्याने लगतच्या गावचे सरपंच देखील जखमी झाले आहेत. या रस्त्याने दुचाकीने जाणारं एक कुटुंबही चार पाच दिवसांपूर्वी काट्याजवळ दुचाकी घसरून पडलं. दुचाकीवरील महिला चांगलीच जखमी झाली. त्यामुळे या काट्याविषयी नागरिकांमध्ये चांगलाच रोष पाहायला मिळाला. निळापूर येथील कोल वॉशरी मधून खाजगी रेल्वे कोळसा सायडिंगवर मोठ्या प्रमाणात कोळशाची वाहतूक सुरु असते. कोल वॉशरी मधून कोळसा भरून येणारी वाहने रस्त्यालगत असलेल्या या काट्यावरच वजन करतात. त्यामुळे हा काटा आता अपघातास कारणीभूत ठरू लागला आहे. या काट्यावर काटा करण्याकरिता सदैव वाहनांचा जमावडा रहात असल्याने याठिकाणी मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच रस्त्याचीही मोठी दुर्दशा झाली आहे. त्याचप्रमाणे धुळीचे प्रदूषणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे या काट्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. काळ्या कोळशात सर्वांचेच हात काळे होत असल्याने कुणीही या गंभीर बाबीकडे लक्ष द्यायला तयार नसल्याचे दिसून येत आहे. प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, तर अनियंत्रित कोळसा वाहतुकीमुळे नागरिकांचे जीव धोक्यात आले आहे. वाहनांचा हा वजन काटा त्याच धोक्याची घंटा असून रस्त्यालगत असलेल्या या वजन काट्याची संबंधितांनी वेळीच दखल न घेतल्यास सर्वांनाच त्याचे मोठे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात.

संविधान दिनी ‘महापुरुष डॉ.आंबेडकर’ माहितीपटाचे आज समाज माध्यमांवर प्रसारण


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

मुंबई : संविधान दिनानिमित्त 'महापुरुष डॉ.आंबेडकर' या दुर्मिळ माहितीपटाचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सर्व प्रकारच्या समाज माध्यमांवर आज २६ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता एकाच वेळी प्रसारण करण्यात येणार आहे.

डॉ. आंबेडकर यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांचे काल्पनिक चित्रण तसेच, लाईव्ह फुटेजच्या चित्रीकरणाचा समावेश या १६ मिनीटांच्या माहितीपटात करण्यात आला आहे. डॉ. आंबेडकरांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारा एक महत्त्वाचा ऐतिहासिक दस्ताऐवज जुलै १९६८ मध्ये माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने तयार केला आहे.

या चित्रपटात डॉ.आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केल्याचे दृश्य आणि त्यांची नेपाळ भेट तसेच मुंबईतील दादर चौपाटीवरील त्यांच्या अंत्ययात्रेचे क्लोजअप शॉट्स आहेत. मधुकर खामकर यांनी छायांकन केले आहे. तर, जी.जी. पाटील यांनी चित्रपटाचे संकलन केले आहे. हा दुर्मिळ माहितीपट व्हटकर प्रॉडक्शनच्या बॅनरखाली नामदेव व्हटकर यांनी दिग्दर्शित केला आहे. तर दत्ता डावजेकर हे संगीतकार आहेत. ज्येष्ठ चित्रपट कलाकार डेव्हिड अब्राहम या चित्रपटाचे निवेदक होते. दिग्दर्शक नामदेव व्हटकर हे मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक होते.

महापुरुष डॉ.आंबेडकर यांची जीवनागाथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी तसेच या दुर्मिळ माहितीपटास पाहता यावे यासाठी याचे प्रसारण करण्यात येत असल्याचेही महासंचालनालयामार्फत कळविले आहे.

मुंबई विभागाअंतर्गत महासंचालनालयाच्या

यू ट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर - https://twitter.com/MahaDGIPR या लिंकवर हा माहितीपट पाहता येईल.